वणीत हॉटेलमध्ये भीषण आग,संपूर्ण साहित्य जळून खाक

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरातील साई मंदिर चौकात भीषण आगीची घटना घडली आहे. नांदेपेरा मार्गावरील एका हॉटेलला भीषण आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. या आगीच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आगीच्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात आगीचे लोळ भीषण दिसत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील साई मंदिर चौक रसोई हॉटेल मध्ये ही आग लागल्याचे समजते. गुरुवार दि. 27 ला रात्री 1 ते 1.30 वाजता च्या दरम्यान ही आग लागल्याचे बोलल्या जात आहे. आग लागल्याने काही वेळ मोठा गोंधळ निर्माण झाला. या आगीत हॉटेलमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवतहानी झाली नसल्याचे वृत्त समोर आले नाही. मात्र, ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही.
 
ही आग गुरुवार मध्यरात्रीच्या वेळी लागली होती. आग लागल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये तिथे पोलीस प्रशासन दाखल झाले त्यांनी अग्निशमन दल पाचारण केले आणि आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी ही भीषण आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, हॉटेलमध्ये मोठा स्फ़ोट झाल्याची चर्चा आहे. 

घटनेचा व्हिडीओ पहा :



वणी उपविभागात 'महाकुंभ' तीर्थदर्शन सोहळा संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : सामाजिक समरसतेचा मंत्र घेऊन वणी उपविभागीय क्षेत्रातल्या 33 वस्तीमध्ये तीर्थ कलश दर्शन सोहळे संपन्न झाले.
प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान भरलेला महाकुंभमेळा आता संपन्न झाला आहे. हा 45 दिवसांचा धार्मिक कार्यक्रम होता, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी भाग घेतला. परंतु ग्रामीण भागातील यामध्ये जे 'महाकुंभ' ला जाऊ शकले नाहीत, त्यांच्या पर्यंत तीर्थ कलश दर्शन आणि जल पोहोचवण्याचे कार्य अनुलोम भाग वणी च्या वतीने उपविभाग प्रमुख सुनील दालवनकर, वैभव मेहता व वैभव सुर भाग जनसेवक यांनी केले.
याप्रसंगी मार्गदर्शन हरिभक्त परायण मुन्ना महाराज तुघनायत,
दीपक नवले, घनशाम आवारी, चिंतेश्वरजी वैद्य, गजानन विधाते, प्रज्योत हेपट, अमित उपाध्ये यांनी तीर्थ कलश दर्शन दरम्यान केले.

बाईपण....सौ समीक्षा गणेश डवरे देऊळकर यांच्या शब्दात


बाईपण

आईपण आणि बाईपण 
दोन्ही जिवांचा सांभाळ करते, 
ति आई कुठे काय करते..!

आईचो माया मुलांना देते, 
बाई म्हणून संपुर्ण वेळ घरात देते, 
जबाबदारी सोबत, सर्वांचा सांभाळ करते, 
ति आई कुठे काय करते..!

डोक्यावर जरी बापाचं छप्पर असले तरी,
 त्या घराला घरपण आई देते, 
नऊ महीने स्वतः त्रास घेते,तेव्हा ति एका बाळाला जन्म देते, शिक्षणासोबत त्यांना संस्कार करते, 
ति आई कुठे काय करते..!

घरातला त्रास सर्वांची कटकट सहन करते, 
समाज काय बोलले. नेहमी ति एकच विचार करते, 
ति आई कुठे काय करते..!

दुःख जरी असले तरी सर्व संकटांवर मात करते, 
पोट च्या गोळ्याला लहाण्याचं मोठं करते,
ति आई कुठे काय करते..!

सौ. समीक्षा गणेश डवरे देऊळकर 
रा. खरवड, ता. वरोरा, जि. चंद्रपूर 

पत्नी कमावती असल्यास पोटगी नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

पती आणि पत्नीची आर्थिक तसेच सामाजिक स्थिती समान असेल, तर पत्नीला पोटगी देण्याची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.  

प्रकरणाचा तपशील:
एका महिलेने विभक्त पतीकडून पोटगी मागण्यासाठी याचिका दाखल केली होती. पती आणि पत्नी दोघेही सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्याने न्यायालयाने स्पष्ट केले की, पत्नी स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम असल्याने तिला पोटगीची आवश्यकता नाही. 

न्यायालयाचे निरीक्षण:
•दोघांची आर्थिक स्थिती समान असल्यास पतीवर पोटगीची जबाबदारी राहणार नाही.  
•पत्नी स्वतःच्या उत्पन्नावर उदरनिर्वाह करू शकत असल्यास पोटगीची गरज नाही.  
•पतीचे मासिक उत्पन्न 1 लाख आणि पत्नीचे 60 हजार असूनही, आर्थिक समानतेच्या तत्त्वावर निर्णय घेण्यात आला.  

पत्नीचा युक्तिवाद:
महिलेने दावा केला की – "मी कमावत्या असले तरी पोटगी मिळण्याचा मला हक्क आहे."
पण पतीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, आर्थिक समानता असल्याने हा हक्क ग्राह्य धरला जाऊ शकत नाही.  

महत्त्वाचे निर्देश:
सर्वोच्च न्यायालयाने पती-पत्नीला मागील वर्षभराच्या पगाराच्या पावत्या सादर करण्याचे निर्देश दिले होते. कनिष्ठ न्यायालय आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयानेही महिलेची पोटगी याचिका फेटाळल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते.  

निर्णयाचा प्रभाव:
•स्वावलंबी महिलांच्या हक्कांबाबत स्पष्टता  
•आर्थिक समानतेच्या तत्त्वाचा पुनरुच्चार  
•दोघांची परिस्थिती सारखी असल्यास एकाने दुसऱ्यावर अवलंबून राहू नये  

निष्कर्ष:
सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल महत्त्वाचा ठरतो, कारण तो न्याय्य आणि आर्थिक समानतेच्या तत्त्वांवर आधारलेला आहे. भविष्यातही असेच निर्णय दिले जाऊ शकतात. 


वणी येथील शिवतीर्थावर तरुणांचे आमरण उपोषण

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : झरी जामणी तालुक्यातील अडेगांव येथील काही तरूणांनी सोमवार दि.24 मार्च पासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. 

हिरापुर बिटच्या वनरक्षकाला निलंबित करा या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या तरूणांनी सोमवार पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून आज उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला तरी यावर तोडगा निघाला नाही.

2 मार्च 2025 रोजी रात्री महिला वनरक्षक हिरापूर बिट यांनी वनविभागाच्या हद्दित नसतांना अवैधरित्या रेतीचा ट्रॅक्टर पकडून 40 हजार रुपये बळजबरीने वसुल करीत वनमजुर व वनरक्षकाचा भाऊ यांनी लाठी काठीचा धाक दाखवून व अश्लील भाषेत शिवीगाळ करून पैसे देण्यास भाग पाडले. 

या बाबतची तक्रार सहाय्यक वनरक्षक वणी यांच्याकडे महिला वनरक्षकाला निलंबित करा व दोन्ही वन मजूरांसह संबंधित भावावर कारवाई करण्यात यावी,अशा प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, त्यांचेवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे अखेर वनविभागाचे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली.