Showing posts with label रत्नागिरी. Show all posts
Showing posts with label रत्नागिरी. Show all posts

पर्यटक प्रेमीकडून पडवणेवाडीची दखल घेण्यास सुरुवात...

 
सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
रत्नागिरी, (२५ ऑक्टो.) : दिनांक २३ ऑक्टो. २०२१ रोजी पुणे येथील पर्यटक समितीचे, (पर्यटक प्रेमी) पडवणेवाडीत आले असे सामाजिक कार्यकर्ते श्री सरपडवळ यांनी सांगितले. 
जवळपास पन्नास जण आहेत, त्यात दोन पुणे पाटबंधारे विभागाचे अधिकारी आहेत, चार मुंबई सचिवालय मधील, तर पाच शिवसैनिक आहेत,
तसेच छत्रपती शिवाजी महाराज गडकिल्ले संवर्धनचे मावळे ही आले होते.

सर्वांनी "वरवडे" गावातील पडवणेवाडीची धुपुन गेलेला, फुटूनवाहून गेलेल्या भागाची एकत्रित पाहणी करण्यात आली. त्या नंतर या विषयी त्यांनी येथील सु. बा. सरपडवळ यांच्याशी चर्चा केली, यावेळी काही गहन विषयावर मार्गदर्शन ही केले.

                     (पर्यटक प्रेमी टीम)

समुद्राच्या लाटेने अख्ख गाव ढवळून निघत असतांना किंबहुना कोणी या गावाकडे लक्ष द्यायला समोर येत नव्हते, मात्र पुणे पर्यटक प्रेमी दाखल झाल्याने येथील ग्रामवासीयात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या सर्व पर्यटक प्रेमींनी पडवणेवाडीची दखल घेतली आहे. 
त्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार प्रदोष बळीराम पडवळ यांनी मानले.



 

"पडवणे वाडी" येथील २५ एक घर भीतीच्या सावटाखाली

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
रत्नागिरी, (५ ऑक्टो.) : रत्नागिरीतील, गणपती पुळे नजीक - मालगुंड (कवी-केशवसूत स्मारक) शेजारील "पडवणे वाडी" ही वरवडे (भंडारवाडा) या गावाचे मुलभूत अंग आहे आणि प्राचीन काळापासूनची प्रस्थापित आहे. परंतु ह्या "पडवणे वाडी" कडे आता सर्वांचाच दुर्लक्ष होत आहे. पडवणे वाडीतली खाडी ही केसपुरची खाडी म्हणून ओळख होती, आता पडवणेखाडी म्हणून आताची पिढी ओळखते ही "पडवणे वाडी" खाडी आणि समुद्र याचे एक मध्यबिंदू आहे. याच "पडवणे वाडी" ची काय दशा होत आहे, समुद्रातील ताणामुळे लाटांच्या मार्याने पडवणे वाडी पुढून आणि मागुन दोन्ही कडून ही कोणता ही संरक्षण बांध नसल्याने, निवल वाळूचा तट खाडीच्या पुराने व समुद्राने जवळ जवळ १५ फुट यंदा जमिनीचा भाग फुटून वाहून गेला. त्यामुळे येथील २५ एक घर भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. पडवणे वाडीतील रहिवासी सरकारच्या मदतीच्या आशेकडे डोळे लाऊन आहेत कारण वाडीला संरक्षण बांधारा नसल्याने पडवणे वाडी पुर आणि समुद्र लाटांनी दिवसेंदिवस वाहत चालली आहे. प्रशासन लोकप्रतिनिधी चे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने येथील २५ एक घर भीतीच्या सावटाखाली वावरत असून, येथील झालेल्या हाणी ला जबाबदार कोण? असा सवाल येथील नागरिक सु बा सरपडवळ यांनी निवेदनातून उपस्थित केला आहे.