Showing posts with label बीड. Show all posts
Showing posts with label बीड. Show all posts

राष्ट्रीयकृत बँका हया कोणाची वैयक्तिक खाजगी मालमत्ता नाही - किशन तांगडे


सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
बीड, (१० ऑगस्ट) : उच्च शिक्षण घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकाकडे उच्च शिक्षित तरुणाने पैसे मागणे हा त्याचा संवैधानिक हक्क आहे आणि तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही.
माजलगाव येथील उच्च शिक्षित तरुण डॉ.अमोल मोरे याचे एम बी बी एस चे शिक्षण पूर्ण झाले होते आणि त्याला पुढील शिक्षण घेण्यासाठी पैशांची खूप गरज होती म्हणून त्याने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजलगाव येथील शाखेकडे रितसर मागणी केली होती.
त्या शाखेने काही दिवसात ती फाईल मंजुरी साठी बीडच्या मुख्य शाखेकडे पाठविली. पण या ना त्या कारणाने किंवा काही त्रुटी आहेत म्हणून बीडच्या मुख्य शाखेने त्यांची फाईल एक महिना नाही तर तब्बल आठ महिने ती रखडून ठेवली. बँकेच्या खेट्या मारून मारून ते आणि त्यांचे मोठे बंधू पार वैतागून गेले.
अशातच त्यांचे मोठे बंधू आनंद मोरे आणि मामा अभिमान उजगरे यांना किशन तांगडे यांची आठवण आली आणि त्यांनी किशन तांगडे यांना फोन करून भेटावयाचे आहे, असे सांगितले.
आणि भेट झाल्या नंतर त्यांनी या विषयाची सविस्तर हकीगत सांगितली. आणि काही मिनिटांत किशन तांगडे हे त्यांना सोबत घेऊन "जिल्हा लीड बँकेचे" कर्तव्यदक्ष अधिकारी श्रीधर कदम साहेबांची भेट घेऊन त्यांना हि सर्व माहिती दिली. आणि कदम साहेबांनी मी स्वतः हे प्रकरण माझ्या हातावर घेतो आणि १००% मार्गी लावतो अशी किशन तांगडे यांना खात्री दिली. आणि विशेष म्हणजे श्रीधर कदम साहेबांनी दोन दिवसा नंतर किशन तांगडे यांना स्वतः फोन करुन तुम्ही सांगितलेले. डॉ.अमोल मोरे यांचे आम्ही "सत्तावीस लाख रुपयांचे" प्रकरण मार्गी लावले आहे.
कर्तव्यदक्ष अधिकारी असतील तर निश्चितच सुशिक्षित तरुणाचा, गोर-गरीबांचा आणि पर्यायाने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाल्या शिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की.
                   
   

स्त्रियांच्या भावना कोणी समजून घेईल का?

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
सन २०१९, २०२० वर्ष खूप धामधुमीत चिंतेत गेले आहे १५ मार्च २०२० पासून कोरोना या मारीला सुरुवात झाली ,आणि संपूर्ण जग पृथ्वी यांना धोका निर्माण झाला होता, तर 15 मार्च २०२० पंधरा दिवसाचा पहिला टप्पा लॉक डाऊन केल सगळ जग पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं नंतर १ एप्रिल २०२० दुसरा टप्पा लॉक डाऊन केले आणि असे दहा महिने पूर्ण झाले तरी लॉक डाऊन उघडण्याचे नाव घेत नव्हता
कोरोना विषाणूचा प्रसार चीन (वुहान) येथे झाला कोरोनाला covid-19 हे नाव (world health organisation) या संस्थेने घोषित केले कोरोना हा लॅटिन भाषेतील शब्द आहे कोरोना हा विषाणू मानवाच्या फुफ्फुसे या भागावर हल्ला करतो तसेच भारतात केरळ मध्ये कोरोना चा पहिला रुग्ण सापडला महाराष्ट्रात पुणे येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला कोरोनामुळे लॉकडाऊन करणारे पहिले राज्य राजस्थान आहे . कोरोना मुळे कर्फ्यू लागणारे पहिले पंजाब राज्य आहे ,तसेच भारत सरकारचे ॲप विकसित केले आहे ते म्हणजे आरोग्य सेतू असं नाव दिला आहे कोरोनाच्या लसीकरणासाठी co-win ॲप विकसित झाले आहे कोरोना या व्हायरसमुळे प्रत्येक जण स्वतःच स्वतःची काळजी घेत आहे आणि स्वतः बरोबर इतरांनाही सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे,
पहिली लाट आली तेव्हा असं बोलायचे की कोरोना चा रुग्ण संपर्कात आला की भीती असायची पण मला असं वाटतं असं जर झालं असतं तर एकही माणूस या जगात जिवंत राहिले नसते अस मानव मृत्युमुखी झाले असते या रोगामुळे काहींचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे कारण लॉक डाऊन म्हटलं की घरातच रहा काळजी घ्या असा संदेश प्रत्येक मोबाईलवर टेलिव्हिजनवर पाहायला ऐकायला भेटायचं तर काहीच सदुपयोग झाले असे पण म्हणता येईल ज्यांना एक दिवस पण सुट्टी (holiday) नव्हता त्यांना भरपूर ( Holiday) मिळाला सगळे कामे बंद असल्या कारणाने तरुण पिढी व बरेचसे लोक गावी येऊन राहू लागले काहीजण शेतातले काम पण शिकली तर काहीजण फक्त आळशी झाले. पण ह्या लॉकडाउनच्या काळात माझ्या लक्षात एकच गोष्ट आली
घरातल्या प्रत्येक मानवाला सुट्टी मिळाली म्हणजे मुलांना म्हातारी माणसे आजी आजोबा तरुण लोकांना वडील भाऊ काका दीदी या सगळ्यांना त्यांच्या कामातून वेळ घालवता आला सगळ्यांनी भरभरून सुट्टीचा आनंद घेतला पण ज्या व्यक्तीला अजून पण व्यक्त व्हायला घाबरते ती माझी आई माझ्या काकी यांना लॉकडाउनच्या काळात एक पण दिवस सुट्टी मिळाली नाही आणि ह्याआधी पण नव्हती मिळाली
त्या माझ्या आईला काकीला घरातल्या प्रत्येक महिलेला सुट्टी मिळाली नाही आणि त्यांचा विचार पण कोणी केला नाही असं मला वाटतं सगळे म्हणतात मी कमवतो पण तुम्ही कमवता म्हणजे नक्की काय करता ? फक्त सामान आणून देतात पण त्याच महिलांनी ठरवलं एक वेळेच काम नाही करायचं जेवण नाही बनवायचं मग कळतं घर कमावती कोण असतं ? मुलांना भूक लागली तर आईच लागते असे विचार फक्त तिला होणारा त्रास समजून घ्या त्या स्त्रीला म्हणून मग असं झालं तर भारताचं काय संपूर्ण जगात स्त्रियाला मान सन्मान तिचा अभिमान सगळं भरून येईल सगळ्यात जगात एकच नाव असलं ते म्हणजे महिलांच जग अरे ती आई काकी मावशी दीदी आत्या ज्या कोणी महिला असतील त्या सगळ्या आडाणी असत्या तर त्या स्त्रीयांनी मागेच त्यांचा विचार केला असता प्रत्येक घरातील महिला उच्च पदावर असती पण ती अडाणी नाही तर खूप प्रेमळ स्वामीनिष्ठ हुशार कर्तबगार आहे म्हणून मी एवढच म्हणन त्या स्त्रीयांनीच आपली संस्कृती जपली आहे स्त्रियांच मी मध्येच वर्णन केले आहे कारण मला आलेला अनुभव मी मांडला आहे पण हे कडवट वाटलं वाटलं पण खरं आहे असं मला वाटतं तसेच १५ मार्च २०२० पासून फक्त गरजेच्याच वस्तू मिळू लागल्या परत नवीन २०२१ वर्ष चालू झाले पण जानेवारी व फेब्रुवारी २०२१ मधले दोन महिने परत सगळे जग चालू केलं म्हणजे unlock केलं परत १५ मार्च २०२१ रोजी लॉक डाउन केलं पहिला टप्पा पंधरा दिवसाचा होता तर दुसरा टप्पा पंधरा दिवसाचा होता असं चार टप्प्यापर्यंत लोकडाऊन पोहोचला आहे पण या महामारीत बरेचसे लोक असे आहेत की ज्यांना एक वेळचे जेवण मिळालं नाही त्यांचं कुटुंब व त्यांची माणसं कसं जीवन जगत असतील? तर काही लोकांचे या मारामारीत प्राण गमावले मृत्यू पावले कोणाची आई कोणाचा मुलगा तर कोणाचे वडील तर कोणाचा भाऊ तर कोणाची बहीण कुठे गेले हे नाते का नाही वाचऊ शकलो आपण त्या सर्वांना देवा सांग तु तरी 
कोरोना कोरोना कोरोना 
कधी जाशील तू तुझ्या गावाला
दीड वर्ष झालं तरी तुला काहीच कसं वाटत नाही
माफ कर आम्हाला सोडून दे रे तुझ्या लेकरांना
ऑक्सिजन पुरवठा कसा करायचा
व्हेंटिलेटर आणि बेड मिळाला तर बरं वाटेल आम्हाला
डॉक्टर पोलीस कर्मचारी करतायेत त्यांची ड्युटी तू मात्र केली सगळ्यांशी कट्टी
शाळा नाही कॉलेज नाही holiday असून उपयोग काय तुझा?
उन्हाळा गेला पावसाळा आला
आता तरी सांग कधी जाशील तू तुझ्या गावाला?
सगळेजण म्हणतात भीती वाटते तुझी आम्हाला..


चाळक किरण विलास, बीड
मो. नं. 9503577245

स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देशातील अनेक लोकांना बलिदान द्यावे लागले- प्राचार्या डॉ.दीपा सावळे


सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनावणे 
परांडा, (०९ ऑगस्ट) : आज दि. ९ ऑगस्ट २०२१ स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देशातील अनेक लोकांना स्वतःचे बलिदान द्यावे लागले. त्यामुळेच आपला भारत देश स्वतंत्र झाला आहे असे, प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले.

सांस्कृतिक विभागाच्या आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयात क्रांती दिन कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून दीपक ओव्हाळ उपस्थित होते. व्यासपीठावर आय क्यु ए सी चे चेअरमन डॉ.महेशकुमार माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी covid-19 चे पालन करत उपस्थित होते. पुढे बोलताना दीपक ओव्हाळ म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीमध्ये महिलांचे अतुलनीय योगदान आहे. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारी महिलांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. छोडो भारत, करेंगे या मरेंगे हा मंत्र गांधींनी जनतेला ९ ऑगस्ट १९४२ ला दिला. त्याचेच विस्तारित रूप म्हणजे ऑगस्ट क्रांती दिन होय असे त्यांनी यावेळी सांगितले.  
    
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ.दीपा सावळे म्हणाले की, क्रांती म्हणजे बदल महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य प्राप्त केले. महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन केले,चले जाव चा नारा दिला, भारतीयांच्या जीवनातील क्रांती दिन हा महान दिवस आहे. यानंतर अनेक चळवळी तयार झाल्या असून लोक रस्त्यावर उतरले.

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी चा कालावधी होता तेव्हा अनेक लोकांनी बलिदान दिले आणि १५ ऑगस्ट रोजी महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य मिळाले. कार्यक्रमाचे आभार डॉ सचिन चव्हाण यांनी मानले.

बावची ग्रामस्थांना कृषिदूत अभिषेक क्षीरसागर यांचे लाभले मार्गदर्शन - डॉ.शहाजी चंदनशिवे


सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
बीड, (०९ ऑगस्ट) : आज रोजी सौ. केएसके काकू कृषी महाविद्यालय बीड यांच्या अंतर्गत कृषी दूत परांडा येथील क्षिरसागर अभिषेक बाबासाहेब यांनी प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांना आधुनिक यंत्राची माहिती दिली. त्यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व त्याचे फायदे, बोर्डो पेस्ट करण्याची प्रक्रिया, बीज उगवण क्षमता चाचणी, शेतीसाठी वापरात असणारे विविध ॲप एकत्रित कीटक रोग व्यवस्थापन, वृक्ष लागवड, बँकेच्या विविध योजना, माती परीक्षण यासारखे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दाखवत आहेत. त्यासाठी त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एस शिंदे, डॉ एस एस चव्हाण, डॉ. एस. पी.मोरे, प्रा बी पी मांजरे, डॉ.एसटी शिंदे प्रा.बीपी तांबोळकर, प्रा. एस वि राठोड, प्रा.बिडी बामणे, प्रा एस एस राठोड, प्रा. बी डी तायडे, प्रा.डी एस जाधव, प्र. बीआर चादर, व प्र. एस पी शिंदे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. कृषिदूताने दिलेल्या माहितीबद्दल शेतकरी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

नाळवंडी नाका येथे आम आदमी पार्टीचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू


बीड, (०८ ऑगस्ट) : नाळवंडी नाका येथे आम आदमी पार्टीच्या वतीने ठिय्या आंदोलन बेमुदत सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये पॅड बीड ते नाळवंडी रोडचे काम जोपर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचे पार्टीच्या वतीने सांगण्यात आले.

गेल्या २०११ पासून बीड शहरातील नगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला, त्या भागाचा विकास व्हावा यासाठी आम आदमी पार्टी जन आंदोलन सुरु केले आहे.  जोपर्यंत काम सुरू होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहिल असे, आम आदमी पार्टीचे संघटनमंत्री ज्ञानेश्वर राऊत यांचनी माहिती दिली. 

दरम्यान राऊत यांच्या नेतृत्वात या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहे.
यावेळी सर्व बीड जिल्ह्याची 'आप' ची टीम त्यांच्यासोबत सहकार्याची भूमिका निभावत आहे.

यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष अशोक येडे, रामधन जी जमाले, सचिव सय्यद सादेक, शहर प्रमुख कैलासचंद पालीवाल व समस्त गावकरी आंदोलनात सामील होते.

पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या पथकाची वाळू माफिया विरुध्द धडक कारवाई

सह्याद्री न्यूज | रुतुजा सोनवणे
बीड, (०७ ऑगस्ट) : बीड पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या पथकाने वाळू माफिया विरुध्द कारवाई करुन बीड जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला.

आर राजा यांच्या पथकाचे प्रमुख एपी आर हजारे यांच्या टीम ने आज पहाटे गेवराई तालुक्यातील राक्षभुवन येथील परिसरातील वाळू माफिया विरुध्द धडक कारवाई दरम्यान, त्यांना नदी पात्रात जेसीबी हायवामध्ये वाळू उपसा सुरु असतांना विशेष पथकाने छापा टाकला. त्या मध्ये दोन जेसीबी, हायवा क्रमांक एम.एच.२३ ए. व्ही. १८५५, हायवा क्रमांक एम.एच.४६ ए.आर. ४१४८ व काही वाळू उपसा असा, १ कोटी २ लाख २० हजार रुपयेचा माल जप्त करुन ८ जणांविरुद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी जेसीबी चालक संदीप सुरेश पवळ रा.ढाकलगाव तालुका अंबड, हायवा चालक सलमान मिर्झा बेग (२४) रा. इस्लामपुरा बीड, हायवा चालक महादेव दगडू निर्मळ  (३५) रा.शिदोड तालुका बीड सोबत आणखीन पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी एक जेसीबी चालक फरार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगितले आले आहे.

पोलीस सहाय्यक उप निरीक्षक पदी राजाभाऊ नागरगोजे यांची निवड तर पाणी पुरवठा सुपरवायझर पदी अमोल बागलाने रुजू

सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे
बीड, (०६ ऑगस्ट) : पोलिस दलात सहाय्यक पोलिस उप निरीक्षक पदी निवड झाल्याने,सहाय्यक पोलीस निरीक्षक, वसुदेव मिसाळ, राजाभाऊ नागरगोजे, यांचा सत्कार करताना, तसेच नगर पालिका पाणी पुरवठा विभागाचे सुपर वायझर दुधाळ साहेब याचं सेवानिवृत्ती निमित्त तसेच त्यांचा कार्यभार स्विकारणारे अमोल बागलाने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी, पोलीस उप.निरीक्षक विजय जाधवर, मराठी पत्रकार संघनटनेचे विभागीय सचिव विशाल साळुंके, सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे, सहकारी आबा सावंत, शंकर काशीद, तांबे सर, रिपोर्टर चे मजीद शेख, शहर वाहतूक शाखेचे मोहम्मद आवेज, चिंतामणी शिंदे, हे उपस्थित होते.

कार्यक्रम चे सूत्र संचालन पोलीस उप निरीक्षक जाधवर यांनी केले व समारोप शहर वाहतूक शाकेचे मोहम्मद आवेज यांनी केला.

कोविड काळात काळा बाजार करणाऱ्या संबंधितावर गुन्हे दाखल करा - दिपक थोरात

सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे
बीड, (०५ ऑगस्ट) : सध्या जगभरामध्ये कोरोना  संकटाने लोक हैराण झाले असून, मनोबल खचले आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांचे आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोविड-19 संकटावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. मात्र या उपयोजनेचा तिनतेरा करून संबंधित प्रशासन व त्यांचे मर्जीतील दलाल हे महत्वाचे उपलब्ध इंजेक्शन, टॅबलेट यावर तिरडी नजर ठेवून बसलेत. त्यात काही संबंधित अधिकारी आणि त्यांच्या हाताखाली असलेले दलाल या रेमडीसीव्हर इंजेक्शनचा व टॅबलेटचा काळाबाजार करीत असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्त्ते दीपक थोरात यांनी केला आहे.

सर्वसामान्य जनतेला या कठीण काळात वेळीच उपचार मिळावा म्हणून वेळोवेळी कोविड संबधी इंजेकशन टॅबलेटचा काळाबाजार झाल्याने या काळाबाजारात जिल्हा रुग्णालयातील संबंधित लोकांची चलती तत्कालीन बीड शल्य चिकित्सक यांच्या कार्यकाळात झाला. अशा संबंधित लोकावर तात्काळ एफआयआर दाखल करावा यासाठी बीड जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. जोपर्यंत या संबंधित लोकांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी उपोषण सुरु राहणार असे  सामाजिक कार्यकर्ते दीपक थोरात यांनी सांगितले. त्यामुळे आता या सर्व बाबीवर बीड जिल्हा पोलिस अधिक्षक काय कारवाई करतील याकडे सर्व बिडकरांचे लक्ष लागले आहे.

कोरोनामुळे एकल झालेल्या महिलांना आधार देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध : अॅड.यशोमती ठाकूर

सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
बीड, (०५ ऑगस्ट) : राज्यात कोरोना संसर्गामुळे विधवा झालेल्या एकल महिलांचे प्रश्न गंभीर आहेत. या महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिला व बालकल्याण विभाग लवकरच सकारात्मक निर्णय घेईल. या महिलांना आधार देण्याची भूमिका महाराष्ट्र सरकार घेईल असे महिला व बालकल्याण मंत्री अॅड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले. कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती च्या सर्व सदस्यांशी त्यांनी झूम मीटिंग घेऊन चर्चा केली. यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्रातील १५० संस्थानी एकत्र येऊन कोरोना संसर्गामुळे विधवा झालेल्या महिलांच्या प्रश्नासाठी नेटवर्क स्थापन केले आहे. या नेटवर्कचे महाराष्ट्र राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी साहेब असुन महाराष्ट्राच्या २२ जिल्ह्यातून १९५ सदस्य या बैठकीत सामील झाले होते. श्रीमती आय ए कुंदन, प्रधान सचिव महिला व बाल विकास विभाग मुंबई , आयुक्त श्री राहुल मोरे ,उपायुक्त  दिलीप हिवराळे उपसचिव श्री वरुडकर, जॉइंट सेक्रेटरी श्री अहिरे उपस्थित होते. 

सुरूवातीला या एकल महिला पुनर्वसन समितीचे महाराष्ट्र राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी कोरोनाने २०,००० पेक्षा जास्त महिला विधवा झाल्या आहेत. या महिला हॉस्पिटलच्या बिलामुळे कर्जबाजारी झाल्या आहेत. तेव्हा शासनाने या महिलांना एक रक्कमी आर्थिक मदत करावी.

 राजस्थान,आसाम,केरळ,बिहार,आसाम या राज्यांनी जशी आर्थिक मदत दिली आहे तशीच या महिलांना पण द्यावी. या महिलांना पेन्शन देण्याची गरज आहे व या महिलांचे प्रश्न गंभीर असल्याने राज्यातील स्वयंसेवी संस्था व शासन यांनी एकत्र काम करावे अशी भावना व्यक्त केली. या समितीचे ज्येष्ठ सदस्य मकाम व उगम संस्थेचे जयाजी पाईकराव(हिंगोली) यांनी या महिलांची संख्या नक्की करण्यासाठी शासनाने गावपातळीवर सर्वेक्षण करावे जिल्हा पातळीपासून तालुका पातळीपर्यंत स्वयंसेवी संस्थांना घेऊन समित्या निर्माण केल्या तर या कामाला गती येईल असे सांगितले.

मंडलिक ट्रस्ट संस्थेचे अल्लाउद्दीन शेख(पनवेल) यांनी रेशनच्या अंत्योदय मध्ये या महिलांचा समावेश करावा व १५ व्या वित्त आयोगातून या महिलांसाठी मदत करणे कसे शक्य आहे हे तपशीलवार पटवून दिले. निर्माण संस्थेचे वैशाली भांडवलकर(पुणे) यांनी वेगवेगळ्या शासकीय योजना या महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने काय करायला हवे याची मांडणी केली व योजनांची पुस्तिका प्रसिद्ध करण्याची सूचना केली. आधार बहुउद्देशीय संस्थेच्या विद्या कसबे(नांदगाव) यांनी संजय गांधी निराधार योजनेतील अडचणी मांडल्या.
२१००० उत्पन्नाची अट ही हास्यास्पद असून ती बदलण्याची गरज आहे व सर्व योजनांमध्ये या एकल महिलांना प्राधान्यक्रम देण्याची मागणी त्यांनी केली .

चेतना महिला विकास संस्थेच्या असुंता पारधे (पुणे) यांनी या महिलांचे घर शेत व मालमत्तेवरील हक्क शाबूत राखण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात याबाबत नेमक्या सूचना केल्या. नवचेतना स्वयंरोजगार संस्थेचे प्रशांत पाटील(नाशिक) यांनी रोजगार निर्मितीच्या पुढाकाराने महिला स्वयंपूर्ण होतील त्यासाठी या महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे व छोटे छोटे कोर्सेस सुरू करावेत अशी सूचना केली.

बालकल्याण समितीच्या सविता कुलकर्णी(लातूर) यांनी बालसंगोपन योजनेतील अडचणी सांगून त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल ? याबाबत अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या. या बैठकीस बीड जिल्ह्यातील समन्वयक संस्था श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला ता केज सहभागी होऊन या महिलांच्या बाबतीत येणाऱ्या विविध समस्या या बाबतीत अडचणी ची माहिती एकत्र करून ती राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांना देण्यात आली.

या सर्व सूचनाबाबत महिला बालकल्याण विभागाच्या सचिव कुंदन यांनी या महिलांच्या प्रश्नाबाबत महिला बालकल्याण विभाग तातडीने योग्य निर्णय घेईल असे सांगून जिल्हा स्तरावर असलेल्या टास्क फोर्स ची कक्षा रुंदावण्याची भूमिका घेतली जाईल व मुलांसाठी काम करणारा टास्क फोर्स इथून पुढे महिलांसाठीही काम करेल असे सांगून स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या सर्वच सूचना महत्वाच्या असून त्या प्रत्येक सूचनेची दखल घेतली जाईल असे सांगितले.इतर राज्यांच्या योजनांचा अभ्यास केला जाईल. महिला बाल विकास विभागाचे आयुक्त राहुल मोरे यांनी इतर विभागांशी संबंधित असलेल्या सूचनाबाबत त्या विभागांशी चर्चा केली जाईल व टास्क फोर्सच्या माध्यमातून या महिलांचे प्रश्न जिल्हास्तरावर सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील.

स्वयंसेवी संस्थांनी अत्यंत नेमकेपणाने सूचना केल्याबद्दल त्यांनी स्वयंसेवी संस्थांचे कौतुक केले. या बैठकीस बीड जिल्ह्यातील शांतीवन आर्वी, श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला ता. केज, सरस्वती सेवाभावी संस्था, संत सावता महाराज सेवाभावी संस्था, संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था यासह अनेक सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. या बैठकीचे सूत्रसंचालन बालकल्याण विभागाचे उपायुक्त दिलीप हिवराळे यांनी केले.

यावेळी बीड जिल्ह्यातुन कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती चे जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे, प्रल्हाद कुंटे, सुरेश गांजुरे, अशोक मुंडे, पंचफुला ओव्हाळ, भगवंत पाळवदे, कुंभारकर , संदिप बहिर यांच्या सह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

कोविड लस पूर्णपणे सुरक्षित आहे - आरोग्य विभाग

बीड, (५ ऑगस्ट) : जगामध्ये कोरोना विषाणू च्या संकटाने थैमान घातले असून, या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्रा तर्फे आणि राज्य सरकार तर्फे मोहीम राबवून चांगल्या प्रकारच्या व्यवस्था केलेल्या आहेत. 

लसीकरणाची अत्यंत चांगल्या प्रकारची व्यवस्था सरकार कडून करण्यात आलेली असताना काही लोलं कोरोना लसीच्या संदर्भामध्ये विविध चर्चा करत आहेत. लस घ्यावी का ना घ्यावी अशा प्रकारच्या चर्चेला सध्या बीडमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच उधाण आलेले आहे. असे असताना बीड जिल्हा रुग्णालय अंतर्गत चंपावती शाळा नगर रोड बीड या ठिकाणी बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष असणारे कर्तव्यनिष्ठ शैल्य चिकित्सक श्री. सुरेश साबळे साहेब यांनी ही व्यवस्था केलेली आहे.

आज कोरोना लस घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना रेखाताई अंधापूरे आणि कुमारी भारतीताई अंधापुरे सह राणीताई माळवे यांनी ही व्यवस्था चांगली आहे. या ठिकाणी लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच तरुण वर्ग, सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी व  महिलांसाठी तसेच सर्व अठरा ते 40 वयोगटातील बंधू आणि भगिनीसाठी देखील घेता येईल अशी व्यवस्था या चंपावती शाळेमध्ये जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे.

 लस सुरक्षित आहे. ही लस भारतीय असून या लसीच्या बाबतीत कोणीही किंचितही शंका निर्माण करू नये, सर्वांनी सुरक्षित आसलेली लस घ्यावी आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे तसेच जिल्हा आरोग्य प्रशासनाचे जिल्हा प्रशासनाचे सर्व नियमाचे कठोरात कठोर पालन करावे असेही यावेळी रेखाताई अंधापुरे आणि राणीताई माळवे सह कुमारी भारतीताई अंधापुरे यांनी बोलताना सांगितले.

 कुमारी भारतीताई पुढे बोलताना म्हणाल्या की, सर्व तरुण बंधू आणि भगिनींना लस टोचून घ्यावी. या कोरोना संकटाला बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे व ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी पुढे यावे.
नुकताच बारावीचा निकाल जाहिर झाला. त्या अनुषंगाने  सर्वांना शुभेच्छा व पुढील वाटचालीस पुनःश्च शुभेच्छा. सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करावा आणि आपले नाव देशा मध्ये लौकिक करावे असे ताई म्हणाल्या.

बीड जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे आणि त्यांचे सर्व डॉक्टर्स स्टाफ नर्स वार्ड बॉय या सर्वांचे आरोग्य प्रशासनाच्या कामाचे रेखाबाई अंधापुरे आणि राणी ताई माळवे सह कुमारी भारती ताई यांनी भरभरून कौतुक केले. तेव्हा सर्वांनीच कुठलीही शंका न ठेवता कोविड लस घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

के एम के महाविद्यालय बारावी सायन्सची विद्यार्थीनी अस्मिता नेहरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार


सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
बीड, (०५ ऑगस्ट) : आज बीड येथे विद्यार्थिनी अस्मिता नेहरकर यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आज शुभेच्छा देण्यात आल्या. काल नुकताच लागलेला बारावीचा निकाल या निकालामध्ये के एस के महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारिका अस्मिता नेहरकर या विद्यार्थिनीने बारावी सायन्स शाखेतून 90 टक्के गुण मिळवल्याबद्दल त्यांचा आज सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित नेते तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेशचे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राज योग समूहाचे संपादक साहेब तथा केज जिल्हा बीड येथील राखीव मतदार संघाचे भावी आमदार आदरणीय वैभव जी स्वामी साहेब सह उपस्थित बीड जिल्हा सत्र न्यायालयातील एडव्होकेट कायदे सल्लागार कायदेपंडित विलास जी जोशी साहेब तसेच उपस्थित हितोपदेश जी वडमारे, संदेश जी वडमारे, राजेश जी वडमारे, अशोक जी धुताडमल तसेच अस्मिता नेहरकर यांचे बंधू गोटू भैया नेहरकर तसेच उपस्थितीत संजय देवा कुलकर्णी, कुकडगांवर पत्रकार दैनिक समर्थ राज योग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड यांची यावेळी उपस्थिती होती.

चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्त्यांचा सन्मान जपणारा रिपाई पक्ष - पप्पू कागदे


सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनावणे 
बीड, (०४ ऑगस्ट) : आज केज येथे युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष दिपक कांबळे यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीचे अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन वाघमारे हे होते. प्रमुख पाहुणे जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष दशरथ सोनवणे हे  उपस्थिती होते. तसेच प्रमुख उपस्थितीत राहुल सरवदे, बाळासाहेब ओव्हाळ, रवींद्र जोगदंड, दिलीप बनसोडे, रमेश निशिगंध, कैलास जावळे, विकास आरकडे, रमेश निशिगंध, मिलिंद भालेराव, संभाजी हजारे, कालिदास आरकडे, मसू बचुटे, मिलिंद वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 
या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पप्पू कागदे म्हणाले की, ना. रामदास आठवले साहेबांचा रिपाई पक्ष हा स्वाभिमानी व प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष असून बेईमानी करणाऱ्यांना रिपब्लिकन जनता त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही. पुढे बोलताना कागदे यांनी अतिक्रमित गायरान जमिनी आणि कार्यकर्त्यांना सक्षम बनविण्यासाठी शासकीय लाभाच्या विविध योजना यांची माहिती दिली. 
जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड यांनी केज विधानसभा मतदार संघातून या पुढे रिपाइंचा आमदार व्हायला हवा यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले. 
दीपक कांबळे, राहुल हजारे, भास्कर मस्के, गौतम बचुटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिलीप बनसोडे यांनी केले. या बैठकीला तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

माजलगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनावणे 
बीड, (०१ ऑगस्ट) : अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर असे पानं. आपल्या लेखणीला तोफ बनवून तिच्यातून क्रांतीचे तोफगोळे फेकणारे साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ. आपल्या डफावर परिवर्तनाची थाप देऊन जनमाणसं विद्रोहाने पेटवणारे शाहिर म्हणजे अण्णाभाऊ.

जग बदलाची भाषा बोलणारा माणुस! म्हणजे अण्णा भाऊ साठे. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त माजलगाव येथे त्यांना त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी माजलगाव शहराचे कर्तव्यदक्ष ठाणेदार पोलीस निरीक्षक मा. फराटे साहेब यांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात. यावेळी मा. लहुश्री भास्कर शिंदे, दत्ता भाऊ कांबळे, प्रदीप तांबे, अभिजित देंडे, अनिल ढगे, आदींची उपस्थिती होती.

'नेहरू युवा केंद्र' बीड कार्यालयाच्या व रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाचा आरंभ


सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
बीड, (०१ ऑगस्ट) : नेहरू युवा केंद्र कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार रयत सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने आज संपूर्ण जिल्ह्यात नेहरू युवा केंद्रा ची संलग्न असलेल्या युवा मंडळाच्या माध्यमातून आपापल्या गावात सार्वजनिक ठिकाणी, बस स्टँड, शाळा, सार्वजनिक आरोग्य केंद्र, मैदाने आदी ठिकाणी शुभारंभ करण्यात आला. या पंधरवड्यात विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये स्वच्छता विषयावर निबंध प्रतियोगिता स्लोगन प्रतियोगिता व्याख्याने सार्वजनिक ठिकाणी श्रमदान आधी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आज नेहरू युवा केंद्र बीड कार्यालयात स्वच्छते विषयी नाना पाटील यांनी शपथ वाचन करून सर्वाना देण्यात आली असून, कार्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली.

 याप्रसंगी रयत सामाजिक प्रतिष्ठानचे बीड सचिव आर. जी. माने, व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान चे नानाभाऊ गव्हाणे, स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचेअमोल जगताप, गहू बाई महिला बहुउद्देशीय संस्थेचे वैजनाथ खोडवे, याप्रसंगी नेहरू युवा केंद्राचे नानाभाऊ पाटील, प्रमोद जव्हेरी, उदय देशमुख संतोष देवकर, विकास धोत्रे, मनोज पतंगे, जयराज सुरवसे एस. डी. माने आदींची उपस्थिती होती.

बीड : प्रेमप्रकरणातून नर्सची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
बीड, (२८ जुलै) : बीडमधील एका रूग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या सोनाली अंकुश जाधव (२६) हिने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मांजरसुंबा घाट परिसरात एका झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत २६ जुलै रोजी तिचा मृतदेह आढळला. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली जाधव ही पालवन चौकात राहत होती. ती दीप हॉस्पीटलमध्ये नर्स म्हणून कामाला होती. सोनाली आणि बीडच्या एका खासगी लॅबमध्ये काम करणाऱ्या अक्षय राजाभाऊ आव्हाड (वय २७, रा. डोईफोडवाडी) याच्यासोबत प्रेमसंबंध जमले होते.
अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध असल्याने सोनाली हिने अक्षयला लग्न करण्याची मागणी केली. आधी लग्नाची बाब अक्षय याने टाळली. मात्र, सोनाली हिचा लग्नासाठी जास्तच रेटा वाढल्याने अक्षयने लग्नास नकार दिला. अक्षयने लग्नास नकार दिल्याच्या राग मनात धरून सोनाली जाधव हिने मांजरसुंभा घाटातील पालीजवळ असलेल्या एका झाडाला गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मृत सोनाजी जाधव हिचा भाऊ अजय जाधव याने अक्षय आव्हाड याच्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कामगारांच्या हितासाठी कार्यरत राहणे हेच संघटनेचे एकमेव ध्येय - नगरसेवक एड. विकासजी जोगदंड

सह्याद्री न्यूज | सोनवणे
बीड, (२४ जुलै) : कामगार वर्ग विविध शासकीय योजने पासुन कायम वंचित राहिला असुन शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना गरजु कामगारांपर्यंत पोहचविणे हे आपले आद्यकर्तव्य असुन, कामगारांच्या हितासाठी भिम स्वराज्य कामगार संघटना कार्यरत असुन, हेच संघटनेचे मुख्य ध्येय असल्याचे प्रतिपादन भिम स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक एड. विकासजी जोगदंड यांनी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कामगार सुरक्षा साहित्य वाटप कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित कामगारांना संबोधित करतानां केले
कार्यक्रमास मानवहीत लोकशाही पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रणजित जोगदंड, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिम स्वराज्य कामगार संघटनेचे जिल्हा समन्वयक मंगेश जोगदंड यांनी केले. याप्रसंगी महादेव वंजारे पठाण, अप्पा चक्रे, सचिन जाधव, गोविंद वाघमारे, नवनाथ गोरे, आकाश गायकवाड, आदर्श जोगदंड, आदित्य जोगदंड सह कामगार महिला भगिनी व बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

जिल्हा रुग्णालय बीड च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी

सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
बीड, (२१ जुलै) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा आरोग्य यंत्रणा विविध उपक्रम राबवत आहे. जिल्हाभर विविध उपक्रमासह माध्यम समुहातील सर्व पत्रकार, कर्मचारी, कॅमेरामन, संगणक परिचालक यांचे आरोग्य तपासून दिले जाणार आहे. उद्या दिनांक २२ जुलै २०२१ला 
सकाळी 10:00 वाजेपासून सुरु होणार असून, स्थळ सिव्हील हॉस्पिटल बीड येथे आयोजित केला आहे. असे  डॉ. सुरेश साबळे जिल्हा शल्यचिकित्सक बीड व डॉ. एकनाथ माले आरोग्य उपसंचालक लातूर यांनी माहिती दिली आहे.

कोरोना च्या काळात पत्रकारांनी उचललेली जोखीम आणि जबाबदारी ही आदर्श सेवा आहे. म्हणूनच आपले आरोग्य, आमची जबाबदारी असल्याचे आम्ही समजतो. जिल्हा रुग्णालय बीड, सर्व तालुका स्तरावर उपजिल्हा रुग्णालयाकडून आयोजित उपक्रमात रक्तदाब, शुगर, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, अँटीजन (ऐच्छिक) केले जाणार आहे. सर्व दैनिक व इलेक्ट्रॉनिक माध्यम बंधूंना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक बीड च्या वतीने करण्यात आले.
 



जुन्या वादातून एका तरुणावर गोळीबार, फरार आरोपीना शोधताय पोलीस प्रशासन


सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
बीड, (१८ जुलै) : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे जुन्या भांडणातून एका तरुणावर अगदी जवळून गोळीबार करण्यात आल्याची थरारक घटना १६ जुलै ला शुक्रवारी भरदुपारी ३ वाजेच्या सुमारास महामार्गालगत घडली. वेळीच सतर्कता दाखविल्याने गोळीबारात तरुणाचे प्राण वाचले आहेत. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मादळमोही येथील पवन गावडे या तरुणाचे महामार्गालगत घर व येथेच बांधकाम साहित्याचे दुकान आहे. दरम्यान, शुक्रवार रोजी दुपारी ३ वाजता च्या  सुमारास दुकानासमोर पवन गावडे हे थांबले असता, या ठिकाणी दोन तरुण मोटार सायकल वरुन आले. यानंतर जुन्या भांडणातून दाखल असलेला गुन्हा परत घे म्हणून गावडे यांच्याशी हुज्जत घालत एकाने पिस्तुल काढली. काही कळायच्या आत पिस्तुल गावडे यांच्या पाठीला लावत त्याने गोळी झाडली. मात्र, गावडे यांनी मोठ्या हिम्मतीने सतर्कता दाखवत त्याच्या हाताला झटका दिला. यामुळे गोळी डोक्याला चाटून गेली आणि पुढील अनर्थ टळला. यानंतर मारेकरी तेथून फरार झाले.  


हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी पवन गावडे यांच्या फिर्यादीवरून संजय पवार व अविनाश पवार रा. सावरगाव या दोघांविरोधात शुक्रवार रोजी रात्री उशिरा गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही आरोपी फरार असून, या प्रकरणी पुढील तपास सपोनि संदिप काळे हे करित आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे

बीड जिल्ह्याचे लाडके तत्कालीन पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या केलेल्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल


सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनावणे 
बीड, (११ जुलै) : मागील दोन वर्षापासुन देशांमध्ये कोरोना महामारी चे संकट आहे. या दरम्यान पहिल्या  लाटेतील बीड जिल्ह्यातील कोरोना महामारी च्या संकटावर मात करण्यासाठी तत्कालीन पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार साहेब यांनी अत्यंत उत्कृष्ट उत्तमरित्या नियोजन केले होते, या त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरून घेण्यात आली आहे.

न्यूयार्क येथील कोलंबिया स्कूल ऑफ इंटरनॅशनल अंड पब्लिक अफेअ सर्च च्या माध्यमातून आता आंतरराष्ट्रीय अभ्यासाचा विषय झाला आहे. गेल्या मार्च महिन्यामध्ये कोरोना महामारीची लागण होण्यास सुरुवात झाली होती, याचे चोख नियोजन करण्याचे काम बीड जिल्ह्याचे लाडके तत्कालीन पोलीस अधिक्षक मा.श्री. हर्ष पोद्दार  यांनी आपल्या उत्कृष्ट कुशल बुद्धिमत्तेने अतिशय चांगले कार्य केले होते. विशेष उल्लेखनीय की, बीड जिल्ह्यातून ऊस तोडणी साठी गेलेले ७० हजार ऊसतोड कामगार एप्रिल-मे मध्ये परतले. या मजुरांच्या माध्यमातून कोरोना चा फैलाव होऊ नये, यासाठी सहा जिल्ह्याच्या भिडणाऱ्या सीमा वर तीनशेहून अधिक आंतर जिल्हा रस्ते शोधून ते सील करण्यात आले होते. जागोजागी परतणाऱ्या ऊस तोड कामगारांसाठी तालुका स्तरावर ऊसतोड मजुरांच्या राहण्या जेवणाची व्यवस्थाही  उत्कृष्टपणे केली होती. 

सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांना याबाबतच्या नियोजनाच्या सूचनाही देण्यात आल्या  होत्या, कॉन्टेन्ट कॅन्ट ट्रे सिंग मार्फत ३५० जणांना कोरोना चाचण्या करून त्यांना काही दिवसासाठी एका ठिकाणी बाजूला ठेवले होते. लॉकडाउनच्या काळामध्ये अडकलेल्या कुटुंबासाठी क्यूआर कोड (QR) युक्त पास तसेच त्यांच्या मदतीसाठी पोलिसांचा चमु २४ तास सेवा पुरवली जात होती, त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरून घेतली गेली आहे.

जगातील एक सर्वश्रेष्ठ विद्यापीठांपैकी एक हे असलेले 'कोलंबिया स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफे'  सर च्या माध्यमातून आता हा विषय अभ्यासासाठी घेण्यात येत आहे. सध्या बीड जिल्ह्याचे तत्कालीन कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले मा.श्री.हर्ष पोद्दार हे आता जिल्हा अमरावती या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रमुखपदी आपले कार्यरत  आहेत. 

त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरून घेतली असल्याने आता परत बीड जिल्ह्याला खरोखरच हर्ष पोद्दार यांची गरज आहे. असा जिल्ह्यातून एकमताने सुरु उमटत आहे. या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील तमाम जनतेमधून पोद्दार साहेबांच्या कार्याचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच हर्ष पोद्दार साहेब हे परत बीडला विराजमान व्हावे अशा प्रकारचे साकडे ही बीड जिल्ह्यातील जनता आता पोद्दार साहेबांसाठी ईश्वराकडे मागणी घालत असल्याचे चित्र सध्या बीड जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. 

भावी सरपंच लक्ष्मण खाकरे पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
बीड, (११ जुलै) : वाकनाथपुर येथील भावी सरपंच तसेच सर्वांच्या सुखा दुःखात सहभागी होणारे, पाठीशी खंबीरपणे ऊभे राहणारे, वेळप्रसंगी कोणालाही मदत करणारे, गेले कित्येक वर्ष वाकनाथपुर गावाच्या  विकासासाठी झटणारे मित्रांचे हृदय स्थान युवा नेते लक्ष्मण खाकरे पाटील यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला.

त्यावेळी सरपंच गोरख घाडगे, गुत्तेदार शौकत शेख, भागवत खाकरे, वार्ताहर नवनाथ गोरे, राजु कानडे, कैलास खाकरे, संतोष कानडे, शेख मजहर, गोकुळ भंडारे, केशव बजगुडे, अचित खाकरे, जयराम खाकरे, अक्षय खाकरे, जनार्धन भांडरे, आदीच्या उपस्थितीत नेते खाकरे पाटील यांचे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला आहेत.

यावेळी लक्ष्मण खाकरे पाटील सर्वांचे आभार मानून आपले प्रेम, आशीर्वाद सह अशीच साथ असुद्या, येणारा काळ आपल्यासाठी च व गावकर्यांसाठी उभं आयुष्य झोकून देऊ असे ही बोलून दाखवले.