Showing posts with label चिमूर. Show all posts
Showing posts with label चिमूर. Show all posts

नेरी येथील महिलांचा राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश

सह्याद्री न्यूज | किरण घाटे         

चंद्रपूर : चिमूर तालुका महिला राष्ट्रवादी कांग्रेसच्या अध्यक्षा प्रियंका कृष्णा बहादुरे यांच्या नेतूत्वावर विश्वास दर्शवित नेरी येथील १९ महिलांनी दि. १७ जानेवारीला राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे वृत्त आहे.
   
स्थानिक महात्मा फुले नगरात एका हळदी कुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक महिलांनी आपला सहभाग नाेंदविला होता. दरम्यान, याच वेळी नेरी नगरीतील महिलांनी तालुका महिला आघाडी अध्यक्षा प्रियंका बहादुरे यांचे नेत्रूत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवीत पक्ष प्रवेश केला.

यात मनीषा कामडी, योगिता बोरसरे, मंगला गानार, शिला अंबादे, संगिता गायकवाड, पुनम बावने, पुष्पा  वाघे, भुमेश्वरी बावने, निर्मला बावने, लता सिडाम, लक्ष्मी उईके, जोसना मुगंले, सुरेखा पुनवटकर, मंगला रामटेके, ललिता कराडे, रामकला ढवळे, ताटीकाबाई अंबादे, प्नितम गेडाम, अबुली जांभूळे यांचा समावेश आहे.

पक्ष प्रवेश वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

चद्रंपूर जिल्ह्यात आढळला दुर्मिळ "काळा गरुड"


सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार 

सावली :  सध्या गुलाबी थंडीची चाहुल लागली आहे.त्यामुळे पक्षीप्रेमीची पाउले आपसुकच पानथडे व तलावाकडे पक्षी निरिक्षणाकरिता वळले असतांना नागभिड तालुक्यातील घोडाझरी जगंल परिसरातील किटाळी (बो.) येथिल गाव तलाव जवळ पक्षीतज्ञांना दुर्मिळ "काळा गरुड" पक्षी आढळल्याने पक्षीमित्रांत आनंद व्यक्त होत आहे. पुर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्यातील नागभिड तालुक्यातील घोडाझरी सारखे मोठे तलाव व इतर अनेक लाहान तलाव तसेच डोगंर रांगानी नैसर्गिक सुष्टीनी नटलेले निसर्गरम्य स्थळ आहे. नोव्हेबर महिण्याचे सुरवातीलाच स्थांलातरीत पक्षाच आगमन येथे होत असतो. त्यामुळे नागभिड येथिल म.गाधी विद्यालयातील पक्षीतंज्ञ डाँ जि.डी.देशमुख, यांचे मार्गदर्शनात प्रा. निखिल बोराडे, प्रा. अमोल रेवसकर, व संजय सुरजुसे पक्षीनिरिक्षणाला गेले असता.घोडाझरी परिसरालगत चिधिचक जवळील किटाळी(बो.) तलावाचे पाळीवर एका झाडावर मोठ्या आकाराचा,देखणा, व रुबाबदार पक्षी बसलेला आढळला तेव्हा त्या पक्षाचे विविध मुद्राचे फोटो कँमेरात टिपण्यात आले व त्याचा शास्त्रीय अभ्यासाअंती अतिशय दुर्मीळ आढळणारा "भारतीय काळा गरूड पक्षी" असी ओळख पटली.त्याचे शास्त्रीय नाव "इक्टिनिट्स मलाइन्सिस" असे असल्याचे पक्षितंज्ञाने सागितले. 
साधारणता: हिमालय पर्वत रागांमे नैसर्गिक अधिवास असलेला हा पक्षी भारतामधे व महाराष्टात अतिशय तुरळक नोदं झाल्याचे कळते. या ऋतूमधे हिमालयात बर्फ असल्यामुळे खाद्याच्या शोधात हे पक्षी राजस्थानामधे स्थांलातर करतात तर मैदानी भागात हे पक्षी अभावानेच आढळतात. असी माहिती शास्त्रीय अभ्यासक सागतात.त्या भारतीय काळा गरुड पुर्णता: काळा असतो. त्याची चोच तळासी गडद पिपळ्या रगांची, व पाय सुध्दा पिवळ्या रगांचे पायमोचे घातल्यासारखे दिसतात.हा पक्षी शिकारी असुन सरडे, सप, उदीर, घुसी, असुन प्रसंगी लाहान पक्षाची शिकार सुध्दा करतो.निर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे त्याच्या अधिवासाला धोका निर्माण झाल्याने.असा या दुर्मिड पक्षाची संख्या कमी होत आहे.त्यामुळे वातावरणाचा समतोल ढासळत असुन असा शिकारी पक्षाच्या संर्वधनासाठी प्रशासनाने योग्य पाऊल उचलण्याची गरज असल्याचे मत पक्षीतंज्ञ डाँ. जी.डी. देशमुख यांनी व्यक्त केले.

चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीसाठी मुख्यमंत्री यांना एसडीओ मार्फत दिले निवेदन

सह्याद्री न्यूज | विलास पिसे

चिमूर : चिमूर क्रांती जिल्हा झाला पाहिजे हे चिमूर वाशीय जनतेचे व या परिसरातील जनतेची खूप दिवसापासूनची ही मागणी आहे. देशात पहिले स्वतंत्र झालेले गाव म्हणजे 'चिमूर', या चिमूर चे सुपुत्र बालाजी रायपूरकर हे शहीद झाले. हा ऐतिहासिक वारसा या चिमूर तालुक्याचा आहे. चिमूर जिल्हा झाला पाहिजे...त्याचे कारण म्हणजे छोटे मोठे काम करण्यासाठी या चिमूर परिसरातील नागरिकांना चंद्रपूरला जावे लागते आणि तिथे गेले तर,अधिकारीवर्ग हजर राहत नाही. किंबहुना काम हे वेळेवर होत नाही. शिवाय येण्या-जाण्याचा वेळ लागतो, पैसा लागतो. चिमूर जिल्हा झाला पाहिजे यासाठी आज चिमूर क्रांती जिल्हा निर्मिती साठी मुख्यमंत्री यांना एसडीओ मार्फत निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदन देताना चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र बंडे, प्रा राम राऊत, गजानन अगडे, प्रा संजय पिठाडे, रमेश कराळे, संजय घुटके, सारंग दाभेकर, अविनाश अगडे, सिंधुताई रामटेके, विजय डाबरे, बाळकृष्ण बोबाटे प्रकाश बोकारे,विकास नवले,योगेश अगडे आदी उपस्थित होते.

थोर महापुरुषांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज व पुढील पिढीला घडवावे - डॉ.सतीशभाऊ वारजूकर

सह्याद्री न्यूज | विलास पिसे

चिमूर : आज दिनांक ५/१/२०२२ ला चिमूर विधानसभा क्षेत्रातील आदिवासी माना जमात माँ मानिकादेवी महिला व पुरुष मंडळ,व आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना,विदर्भ ग्राम शाखा आंबेनेरी यांच्या संयुक्त विद्यमाने नागदिवाळी उत्सव २०२२ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन करतांना आपले ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक तथा चंद्रपुर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतीशभाऊ वारजूकर, पंचायत समिती उपसभापती रोषनभाऊ ढोक, माजी मंत्री डॉ.रमेशजी गजभे, ग्राम पंचायत सरपंच आंबेनेरी संदीप दोडके, माजी जि. प.सदस्य विजयजी घरत, बोरगांव बुटी सरपंच रामदासजी चौधरी, प्रा.दिनकरजी चौधरी, पवनभाऊ बंडे, एकनाथजी भुते सर, माजी सैनिक तुकारामजी नंनावरे, माजी पोलीस पाटील दयारामजी मुंढरे, संदीप घोडमारे, संजयजी घोडमारे, सूरज घोडमारे, सदाशिव दोडके, अरुण गरमकळे, मनोहर बारेकर,व गांवकरी मंडळी उपस्थित होते.
 

शेत शिवारात मिळाले अजगराला जीवदान


सह्याद्री न्यूज|  विलास पिसे

चिमूर : मौजा नेरी पासून २ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चिखली या परिसरामध्ये रेखा ताराचंद बोरसरे यांच्या शेतामध्ये भल्ला मोठा साप आढळून आला.

सविस्तर असे की,मुलगा प्रशांत बोरसे आणि त्यांची पत्नी दोघे शेतात तुरीची कापणी करत असताना प्रशांत यांची पत्नी पारिवर तुरीची पेंडीजमा करीत का असताना त्यांना एक भलामोठा अजगर साप दिसला. बघताच त्या भयभीत झाल्या आणि त्यांनी आपल्या पतीला याची माहिती दिली. बोरसे हे भयभीत न होता लगेच नेरी येथील सर्पमित्र मुन्ना शेख यांना शेतामध्ये पाचारण करण्यात आले. सर्पमित्र शेखच्या माध्यमातून भल्यामोठ्या अजगराला त्यांनी पकडलं आणि त्याला जीवदान दिलं.

यावेळी मुन्ना शेख यांनी सांगितले की, हा अजगर आपला भक्ष्य शोधण्यासाठीच याठिकाणी शेत शिवारात आला असावा. काम करीत असताना काळजी घेऊन च काम करावी. असे कसे साप आढळून आल्यास आम्हाला कळवावे, आम्ही या अजगराला आणि इतर अनेक विषारी सापाला ताडोबाच्या जंगलामध्ये सोडत असतो. हा अजगर साप सुद्धा उद्या ताडोबाच्या जंगलामध्ये सोडण्यात येणार आहे असे सर्पमित्र शेख यांनी सांगितले. दरम्यान, अजगराला पाहण्यासाठी बघ्यांची गावात एकच गर्दी उसळली होती 

शालेय मुलींच्या सायकलींचा व्यापारी वर्गांना होतोय त्रास

सह्याद्री न्यूज | विलास पिसे
नेरी- बाहेर गावातील प्रत्येक पाच किलोमीटरच्या अंतर्गत ज्या गावांमध्ये बस जात नाही अशा गावातील वर्ग 8 ते 12 वी च्या वर्गातील मुलींना शिक्षणासाठी ये-जा करण्यासाठी मानव विकास अंतर्गत आठवी ते बारावी या मुलींना सायकलचे वाटप शालेय अंतर्गत करण्यात आले या वेळी मुलींना बाहेर गाव वरून सायकलने शिक्षण घेण्यासाठी सायकलने येतात तेव्हा त्या सायकली बाजार चौकात दुकानाच्या समोर लावून अस्ताव्यस्त ठेवतात याचा नाहक त्रास हा व्यापारी वर्गांना दुकान खोलताना होतो शाळेतील विद्यार्थिनी आपल्या सायकली शाळेत नेण्याचे करावे आणि शाळेत पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून जनतेला त्रास होणार नाही या विषयी व्यापारी मंडळाने शाळेतील प्रत्येक प्रिन्सिपल ला पूर्वसूचना देण्यात आली असताना सुद्धा हा प्रकार बंद झाला नाही आणि याकडे लक्ष दिले नाही तर कदाचितअनुचित प्रकार सुद्धा घडू शकतो कारण की बाहेर गावातील मुलीं हया सायकल शाळेत न ठेवता बाजार चौकात ठेवतात आणि शाळेतून सुट्टी न काढून परस्पर ही कुठे पण जाऊ शकतात त्यामुळे शाळेत सायकल ठेवायला हवी हा प्रकार जर बंद झाला नाही तर याची तक्रार शालेय विभाग चंद्रपूर यांच्याकडे करण्यात येईल अशी व्यापारी वर्गातील मंडळी बोलत आहेत.

खांबाडा येथे सौर पंपाचे लोकार्पण

सह्याद्री न्यूज | विलास पिसे 

चिमूर : दिनांक 30 डिसेंबर 2021 ला खांबाळा येते सौर पंपाचे सौ लताताई पिसे सभापती पंचायत समिती चिमूर यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.

चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या खांबाळा हे गाव दोन हजार लोकसंख्येच्या वस्तीचे असून,येथील एका वाड्यातील गेल्या काही दिवसांपासून महिलांची पाणी भरण्याची अडचण होती ही बाब लक्षात घेता लताताई पिसे सभापती यांनी आपल्या पंधराव्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून खांबाळा येथील हातपंपावर सौर पंप व टाकी लावून महिलांची अडचण दूर केली.
या वेळी खांबाळा येथील सरपंच काजल ननावरे, उपसरपंच मंगेश धाडसे, सदस्य अमोल गजबे, सुनील कडवे, रामभाऊ चौखे, सुनंदा खाटे, वंदना बावणे, दुर्गा चौखे व कर्मचारी आणि गावातील मंडळी उपस्थित होते.

लोकार्पण सोहळा प्रसंगी खांबाळा वासीय महिलांनी तसेच गावकरी यांनी सभापतींचे आभार मानले.

चिमूर नगर परिषद च्या परिसरात अस्वच्छता, प्रशासनाचे दुर्लक्ष?

 सह्याद्री न्यूज | विलास पिसे 

 चिमूर : नगर परिषद अंतर्गत क्षेत्रात स्वच्छता होत नसल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने नप प्रशासनाने दखल घेण्याची मागणी कांग्रेस शहर मीडिया प्रमुख पप्पूभाई शेख यांनी केली आहे.

नगर परिषद ला मागील ऐक वर्षांपासून प्रशासन बसले तेव्हा पासून नगर परिषदचे कोणत्याही कामाकडे लक्ष नाही स्वच्छता आणि नाल्या सफाईची निविदा काढण्यात आली काही महिने ठेकेदारने कामे केली पण ठेकेदारने मजुरची मजुरी दिली नाही म्हणून मागील काही महिने महिन्यापासून नाल्या उपसा झाल्या नाही. त्यामुळे नालीतील पाणी प्रवाह वाहत नसल्याने पाणी साचून राहत असल्याने मच्छर वाढत आहे. रस्त्याची साफसफाई होत नसल्याने रस्त्याच्या कडेला कचरा ढिग पडून आहे. कचरा गाडी दोन,तिन दिवसानंतर योतो पण काही प्रभागात सातही दिवस येत नाही,आणि सार्वजनिक विहीर, हेंण्ड पंप ( बोरिंग )ला सुद्धा ब्लिचिंग पावडर टाकत नसल्याचा प्रकार निदर्शनास येत असल्याने याकडे नगर परिषद प्रशासन चे दुर्लक्ष होत असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
करिता नगर परिषद प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन सफाई ठेकेदारावर कार्यवाही करावी आणि नगर परिषद ने स्वच्छताकडे लक्ष देऊन पूर्णपणे कामे करावी असी मागणी चिमुर कांग्रेस शहर मीडिया प्रमुख पप्पूभाई शेख यांनी केली आहे. 
अन्यथा सफाई कर माफ करण्यात यावे.

राेशन-कल्याणीचे अतुट प्रेम; त्यांचे जीवन साथी हाेण्याचे स्वप्न साकारले !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील नेरी या गावी काल महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या पुढाकारातुन राेशन रघुनाथ कडवे व कल्याणी परसराम कामडी यांचा प्रेमविवाह पार पडला.

हे प्रेमी युगुल चिमूर या एकाच गावचे रहिवाशी असून या दाेघांचे एकमेकांवर ब-याच दिवसांपासून अतुट प्रेम हाेते.या विवाहाला प्रेमी युगुलाच्या परिवारांकडुन विरोध दर्शविला जात हाेता. परंतु प्रेमात आकंठ बुडालेल्या या प्रेमी युगुलांनी जीवनसाथी बनण्यांचे वचन घेतल्यामुळे त्यांनी थेट आंतरजातीय प्रेम विवाहासाठी नेरीच्या तंटामुक्ती समितीकडे अर्ज सादर केला.

समितीच्या पदाधिका-यांनी त्यांचे सर्व जन्मतारखेच्या दाखल्यासह इत्तर कागदपत्रांची तपासणी करुन नेरी ग्राम पंचायतच्या परिसरात विवाह लावून दिला. सध्या नेरीत या प्रेमविवाहची एकच चर्चा ऐकावयास मिळत आहे.

चिमूर न.प. क्षेत्रात विविध समस्यांमुळे जनता त्रस्त - शहर काँग्रेस कमिटीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


सह्याद्री न्यूज | विलास पिसे 

चिमूर : चिमूर ऐतिहासिक व क्रांतिकारी नगरीत नगर परिषदेच्या गलथान व दुर्लक्षित कारभारामुळे जनतेला दैनंदिन समस्येला ताेंड द्यावे लागत असल्याने याची दखल घेत जिप गट नेते डॉ. सतीश वारजूकर यांच्या मार्गदर्शनखाली शहर काँग्रेस कमेटीचे वतीने राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना चिमूर तहसीलदार यांच्या मार्फत एक निवेदन देण्यात आले. 

चिमूर शहरातील आठवडी बाजारची जागा नसल्याने रस्त्यावर बाजार होत असल्याने अपघात होण्याची शक्यता असून वाहतुकीची कोंडी होत आहे. तेव्हा आठवडी बाजाराची जागा उपलब्ध करून देण्यात यावी, शहरातील पिण्याच्या पाण्याकरिता पाईप लाईन खोदकाम सुरू असून जनतेला त्रास होत आहे याची व्यवस्था तात्काळ करून देण्यात यावी,नाल्या पूर्णतः तुडूंब भरल्या असून आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे तेव्हा दखल घेण्यात यावी,ग्राम पंचायत काळातील अंगणवाडी केंद्र नगर परिषदला हस्तांतरीत करण्यात याव्या,नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या योजनांची जनजागृती करण्यात यावी,जिप व पंस समिती योजना नप मार्फत राबविण्यात याव्या.

तत्कालीन वडाळा पैकू ग्राम पंचायतचे दस्तऐवज हस्तांतरण करण्यात यावे. काग व बाम्हणी गावात कचरा गाडी जाण्यास आदेशीत करावे,अभ्यंकर मैदानावरील जीर्ण पाण्याची टाकी पाडून नवीन टाकी बांधकाम करण्यात यावे, शहरातील सिमेंट रोड फोडलेले असून दुरुस्त करण्यात यावे, नप क्षेत्रात पंतप्रधान आवास योजनाची अंमलबजावणी करण्यात यावी, उद्याने निर्माण करण्यात यावे, शहरातील मुख्य मार्गावर शौचालय बांधकाम करण्यात यावे, नपमध्ये आकृतीबद्ध कर्मचारी नियुक्तीची अंमलबजावनी करण्यात यावी, नपला रुग्णवाहिका देण्यात यावी,ग्राम पंचायत काळातील सफाई कामगार नप सेवेत सामावून घेण्यात यावे, मरावि कडून शेतकऱ्यांना पूर्णवेळ विद्युत पुरवठा सुरू देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश असलेले निवेदन शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश अगडे व मीडिया प्रमुख पप्पू शेख यांच्या नेतृत्वात तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देत असतांना शहर काँग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष अविनाश अगडे, शहर मीडिया प्रमुख पप्पूभाई शेख, माजी नप सभापती तथा शहर काँग्रेसचे सहसचिव नितीन कटारे, शहर काँग्रेसचे महासचिव विनोद सातपुते, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजू चौधरी, तालुका काँग्रेसचे सचिव विजय डाबरे, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष गुरुदास जुनघरे,शहर संपर्क प्रमुख धनराजजी मालके, तालुका काँग्रेसचे सहसचिव नागेश चटे, तालुका काँग्रेसचे सरचिटणीस विलास मोहिणकर, योगेश अगडे आदी उपस्थित होते. तदवतच याच समस्यांचे एक निवेदन नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, एसडीओ चिमूर तथा मुख्यधिकारी चिमूर यांना दिले आहे.

रजा मंजूर न करता परस्पर सुट्टीवर गेलेल्या सहा पटवा-यांना कारणे दाखवा नाेटीसा !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : जिल्ह्यातील चिमूर तालूक्यातील गत काही दिवसांपूर्वी रजा मंजूर न करता परस्पर रजेवर गेलेल्या सहा तलाठ्यांना मंगळवार दि.२३ नाेव्हेंबरला तहसील कार्यालयाकडुन कारणे दाखवा नाेटीस पाठविण्यांत आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या तलाठ्यांनी व्हाटसअपच्या माध्यमांतुन सुट्टीचा अर्ज तहसीलदार यांचे कडे सादर केला हाेता. या तील दाेन तलाठ्यांनी फक्त तीन दिवसाची रजा मागितली हाेती पण प्रत्यक्षात ते तलाठी अधिक दिवस रजेवर असल्याचे कळते. दरम्यान आज दुपारी या प्रतिनिधीने चिमूर तहसील कार्यालयाचे प्रभारी तहसीलदार तुलसीदास काेवे यांचेशी भ्रमनध्वनी वरुन संपर्क साधला असता तलाठी विलास नागपूरे, रितेश आमटे, अमाेल घाटे, चंदन करमरकर, वैभव कार्लेकर,तथा तुरारे यांच्या रजेच्या कालावधीतील वेतन राेखून ठेवण्यांत आल्याचे त्यांनी सांगितले. सदरहु तलाठी परस्पर रजा मंजूर न करता गाेवा सहलीला गेले असल्याचा आराेप माजी जि.प.सदस्य विलास डांगे यांनी या पूर्वीच केला हाेता. कास्तकारांचे अतिशय महत्वाचे काम साेडुन हे तलाठी आनंद उपभाेगण्यासाठी सहलीला गेले असल्याचे डांगे यांनी म्हटले हाेते. हे वृत्त लिहीपर्यंत संबंधित तलाठ्यांचे त्या कालावधीतील (सहा ते सात दिवसाचे) वेतन देण्यांत आले नव्हते. संबंधित तलाठ्यांना आता वैद्यकीय प्रमाण पत्रे जाेडल्या शिवाय रजा कालावधीतील वेतन मिळणार नाही हे ही तितकेच खरे आहे. तहसीलदार यांनी पाठविलेल्या कारणे दाखवा नाेटीसांना उपरोक्त तलाठी का उत्तर देतात या कडे सा-या महसूल विभागातील कर्मचा-यांसह तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे. तदवतचं या भागात सहा तलाठ्यांच्या या गाेवा सहलची चर्चा अद्यापही बरीच रंगू लागली आहे. 

रेती वाहतुकीमुळे मॉर्निंग वॉकला हाेणारा अडथळा दूर करा - डॉ.श्याम हटवादेंची मागणी

चंद्रपूर -किरण घाटे 

चंद्रपूर : मॉर्निंग वॉक अर्थात सकाळी फिरण्याच्या सवयीमुळे सर्वात मोठा फायदा मिळतो. नित्य सकाळी चालल्याने तुमचे हृदय अधिक मजबूत होते आणि आजार होण्याचा धोका कमी होतो. रक्तप्रवाह चांगला आणि सुरळीत राहतो. निरोगी राहण्यासाठी सकाळी फिरायला बरेच जण जातात. सकाळी चालणे हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते. दिवसाची पहिली प्रहर अप्रतिम आणि कमी प्रदूषित असते. हवा शुद्ध आणि स्वच्छ असते. त्यामुळे मनाला शांतता मिळते. शरीरात अधिक ऊर्जा निर्माण होते. आपण अशा वातावरणात राहतो की जिथे अनेक आजारांचे मूळ हे नैराश्य अर्थात डिप्रेशन असते. घर असो या कार्यालय सध्या सगळेच वातावरण तणावग्रस्त झालेले आहे. त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. मात्र, सकाळी पायी चालल्याने शरीराला अधिक फायदा मिळतो.

जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नेरी येथील ब-याच कुटुंबातील सदस्य सकाळी चालायला घराबाहेर पडतात परंतु ज्या रस्त्याने ते फिरायला जातात त्या प्रत्येक रस्त्यावरून रेती तस्कर हे आपले रेती भरलेले ट्रॅक्टर भरधाव वेगाने चालवतात. तसेच सदरहु ट्रॅक्टर ना कुठलाही नंबर नसून ते विना नंबरने चालवित असतात. इतकेच नाही ट्रॅक्टर चे पूर्ण लाईट बंद करुन ठेवतात. त्यामुळे अश्या वेळी अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्यातच अनावधानाने एखादी घटना घडली तर, चालणाऱ्याला आपला जीव गमवावा लागेल हे तितकेच खरे आहे. सदरहु ट्रॅक्टरांना नंबर प्लेट नसल्यामुळे ते ट्रॅक्टर कोणाच्या मालकीचे किंवा कोण चालवत होते हे कळणार नाही. ही बाब अतिशय गंभीर असून संबंधित आरटीओ ऑफिसनी यांना नंबर दिलेले नाहीत का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे.

या ट्रॅक्टरांमुळे दिवसेंदिवस सकाळी मार्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण कमी हाेवू लागले आहे. सदरहु रेती तस्करांवर कारवाई होणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. तूर्तास रेती तस्करी ही पहाटे ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारिणी सदस्य नेरीचे डॉ.श्याम हटवादे यांनी केेली आहे.
 

केन्द्र सरकारच्या विराेधात काँग्रेसचे जन जागरण अभियान सुरु

सह्याद्री न्यूज | विलास पिसे (नेरी)

चिमूर : आज बुधवार दि.१७ नाेव्हेंबरला चिमुर तालुका कांग्रेसचे वतीने पेट्रोल, डिझेल, गैस,व खाद्य तेलाच्या वाढत्या महागाईमुळे केंद्र सरकारच्या विरोधात जन जागरण अभियान खडसंगी सर्कल मधील सोनेगाव वन येथे करण्यात आले.

या वेळी तालुका कांग्रेसचे अध्यक्ष संजय घुटके, कार्याध्यक्ष विजय पाटील गावंडे, तालुका सचिव विजय डाबरे, तालुका सन्मवयक विनोद रणदिवे, चिमुर शहर अध्यक्ष अविनाश अगडे, शहर संपर्क प्रमुख धनराज मालके, शहर मीडिया अध्यक्ष पप्पुभाई शेख, शहर सदस्य सारंग भट तालुका उपाध्यक्ष रहेमान पठाण, उपाध्यक्ष रुपचंद शास्त्रकार, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत डवले, सोनेगावचे माजी सरपंच रिफुजी दडमल, सुनील भजभूजे , दिनेश वाकडे, नितेश रणदिवे, प्रीतम गेडाम, रामदास चौधरी, बंडू चौखे, आदीं हजर होते.

अभिनेत्री कंगना राणावतवर कारवाई करा - सरपंच साईश वारजूकरांची मागणी


सह्याद्री न्यूज | विलास पिसे (नेरी)

चिमूर : सिने अभिनेत्री कंगना अमरदीप राणावत हिला केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार दिल्यानंतर कंगना राणावत हिने सन १९४२ मध्ये देशाला स्वातंत्र्य हे भिकेमध्ये मिळाले, या देशाला खरे स्वातंत्र्य सन २०१४ नंतर मिळाले असे वक्तव्य करून देशाच्या स्वातंत्र्य लढण्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा अपमान केला आहे. त्यामुळे तिच्या वर देशद्राेहाचा गुन्हा दाखल करावा या आशयाची मागणी काल दि.१६ नाेव्हेंबरला भिसी पाेलिस स्टेशनचे पाेलिस निरीक्षक यांचे कडे एका निवेदनातुन शंकरपूरचे सरपंच साईश सतीश वाजूरकर यांनी केली.
   
या वेळी अक्षय सहारे, कविश चौधरी, जगतजी तांबे, आकाश हजारे, वैभव चौधरी हे उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या कंगनावर गुन्हा दाखल करा - चिमूर तालुका काँग्रेस कमिटीची मागणी


सह्याद्री न्यूज | विलास पिसे (नेरी)

चंद्रपूर : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी चिमूर क्रांती भूमीतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनाच्या व खंजरीच्या माध्यमातून रनशिंग फुंकले, 'पथर सारे बाम्ब बनेंगे भक्त बनेगी सेना' असे नारे लावून सन १९४२ मध्ये सर्वात पहिले चिमूर स्वातंत्र्य झाले.

देशामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, बालाजी रायपुरकर, भगतसिंग या सारख्या अनेक,महापुरुषांनी अगदी अल्प वयात देशासाठी घराचा त्याग करुन बलिदान दिले. परंतु कंगना अमरदीप राणावतला केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार दिल्यानंतर कंगना राणावतने सन १९४२ मध्ये देशाला स्वातंत्र्य हे भिकेमध्ये मिळाले या देशाला खरे स्वातंत्र्य सन २०१४ नंतर मिळाले असे वक्तव्य करून देशाच्या सत्ताधीशांना खुश करण्याचा प्रयत्न केला. देशाच्या स्वातंत्र्य लढण्यासाठी बलिदान देणांऱ्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा अपमान करून देशातील व समाजातील लोकांना चीड आणणारे,संभ्रम तयार करणारे व शांतता भंग करणारे विधान केले कंगना अमरदीप राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा साेबतच सरकारने दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा. जाे पर्यंत पद्मश्री पुरस्कार परत घेत नाही ताे पर्यंत काँग्रेस आंदोलन करेल तदवतचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करणे व कंगना अमरदीप राणावतचा पद्मश्री पुरस्कार मा.राष्ट्रपती यांनी परत घ्यावा. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी योगदान देणा-या स्वतंत्र वीरांचा सन्मान करावा अशी मागणी काँग्रेस
पक्षाकडुन करण्यात आली.

काल मंगळवार दि.१६ नाेव्हेंबरला चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पोलिस स्टेशन चिमुरचे पाेलिस निरीक्षक यांना कंगना राणावतवर गुन्हा दाखल करण्यासाठी एक निवेदन दिले.

या वेळी प्रामुख्याने चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष संजय घुटके, चिमूर तालुक कार्याध्यक्ष विजयजी गावंडे, काँग्रेसचे जेष्ठ धनराज मालके, प्रा. राम राऊत, चिमूर पंचायत समिती उपसभापती रोषण ढोक, शहर अध्यक्ष अविनाश अगडे,राजु चौधरी, रुपचंद शास्त्रकर, नागेंद्र चट्टे, नाजेमा पठाण, अमोल जूनघरे, अनिल राऊत, विलास मोहिनकर आदीं उपस्थित होते.

मालेवाडा येथे वंदनीय तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव


सह्याद्री न्यूज | रामचंद्र कामडी

चिमूर : जीवनामधे मानवाला खुप मोठा अहंकार आहे, जो व्यक्ति पैसे कमावुन मोठा झाला त्यांचे नाव येथे चालत नाही, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आम्बेडकर, डॉ. ऐ. पी.जे अब्दुल कलाम यानी पैसा नाही कमविला, त्यानी अहंकार सोडून समाधानाच्या पलीकडे जाऊन स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले, म्हणून तेच आज अमर झालेत असे विचार चिमूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षण मंगेश मोहोड़ यानी मालेवाडा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पुण्यतिथि निमित्त आज व्यक्त केले,
         
ब्रम्हलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पुण्यतिथीचा कार्यक्रम चिमूर तालुक्यात्यातील मालेवाडा येथे सम्पन्न झाला या वेळी सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड, कृषि उत्तपन बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम डुकरे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य राजु पाटिल झाडे, प्रा. चरडे , प्रान्त सेवाधिकारी विठ्ठलराव सावरकर, सेवाधिकारी नत्थुजी भोयर, प्रा.संजय पीठाडे, केशव वरखडे, कापसे महाराज व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता गुरुदेव सेवा मंडळ मालेवाडाच्या गुरुदेव भक्तांनी अथक परिश्रम घेतले.

नेरी ग्राम पंचायतचा मनमानी कारभार विलास डांगेंचा आराेप

सह्याद्री न्यूज | रामचंद्र कामडी

चिमूर : नेरी ग्राम पंचायतच्या ग्राम विकास अधिका-याचे पद नुकतेच भरले असून ते पंचायत समिती चिमूर येथे रुजू झाले आहे. नेरी येथे रुजू होणार असतानाच प्रभारी कार्यभार बघणारे ग्राम सेवक नखाते यांनी आर्थिक फायदा करून घेण्यासाठी ग्राम पंचायतचा पदभार न देता त्यांना चुकीचा संदेश देत रुजू होऊ दिले नाही. व झालेल्या कामाचे नियम बाह्य बिल काढले असल्याचे समजते माहिती अधिकारातील व पत्राद्वारे केलेली मागणी प्रमाणे कागद पत्र त्यांनी पुरविले नाही. नखाते यांनी ग्राम पंचायत चे सगळे नियम डावलून मन मर्जीने काम सुरू केले असल्याचे दिसून येते. मुख्यालयात ते नियमित हजर राहत नाही. त्याच प्रमाणे उपविभागीय अधिकारी जिल्हा परिषद बांधकाम विभाग चिमूरचे बांगडे यांना तिसऱ्या महिण्यांपासून दोन पत्रे देऊन झाले. पंधरा ते वीस वेळा प्रत्यक्ष दूरध्वनीवर संपर्क साधला असता कारवाई करतो एवढेच उत्तर मिळत असल्याचे माजी जि.प. सदस्य विलास डांगे यांनी म्हटले आहे परंतु यात चाैकशी झाली नाही. संबधित ग्रामसेवकावर कारवाई न झाल्यास मुंडण आंदोलन करण्याचा इशारा डांगे यांनी नुकताच दिला आहे.

पिंपळनेरीच्या लुटी महाजन बाबा मंदिर सभागृह बांधकामाचे भूमिपूजन

सह्याद्री न्यूज | रामचंद्र कामडी.   

चिमूर : कुर्मी समाजाला ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी सतत प्रयत्न करीत असून येत्या अधिवेशनात हा विषय सभागृहात मांडण्यात येईल असा शब्द देत आमदार बंटीभाऊ भांगडीया म्हणाले की सभागृह बांधकाम करण्यासाठी १० लक्ष रुपये मंजूर असून निधी कमी पडत असेल त्यासाठी पुन्हा १५ लक्ष रुपयांची निधीची घोषणा करीत मोठा सभागृह उभारून सर्व ताे सामान्य नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी होईल. 
      
विदर्भ क्षत्रिय कुर्मी समाज लुटी महाजन सभागृह बांधकाम उदघाटन प्रसंगी आमदार भांगडीया बोलत होते. यावेळी वसंत वारजूरकर, भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष मायाताई ननावरे, किशोर सिंगरे, दिगंबरराव खलोरे , विकास बिरजे, आदीं उपस्थित होते.क्षत्रिय कुर्मी समाज लहान असला तरी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सभागृह बाधकाम साठी निधी दिला असून कुर्मी समाजातील विखुरलेल्या जाती एकत्रित करण्याचे काम सुरू आहे.
राज्यात कुर्मी समाजातील नेते कमी पडत असल्याने समस्या सुटत नाही. तेव्हा कुर्मी समाजाचे नेतृत्व आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी करण्याचे विवेक कापसे यांनी सांगून १० लक्ष निधीत पुन्हा निधी वाढवून देण्याची विनंती केली. लुटी महाजन बाबा मंदिर बांधकाम करण्यासाठी १ लाख ११ रुपये वर्गणी दान करण्याची घोषणा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी केली. प्रास्ताविक प्रभाकर शीरभय्ये यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन विवेक कापसे यांनी केले.

उपस्थितीतांचे आभार नाना उर्फ ज्ञानेश्वर शीरभैय्ये यांनी मानले या वेळी अनेक समाज बांधव उपस्थित होते.

प्रहारच्या प्रयत्नाला आले यश: दिव्यांग,अनाथ, निराधार योजनेचे अनुदान दिवाळी पूर्वीच अदा

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर : समाजातील गरीब ,अनाथ, निराधार वृद्ध दिव्यांग व्यक्तीं यांना उपजिविका करण्याच्या उदेशाने शासनाकडून विविध प्रकारच्या योजनेचा लाभ देण्यांत येते. परंतु मागिल काही महिन्यांपासून अनुदानचे (मासिक) वितरण करण्यात आले नव्हते. त्या साठी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी तहसिलदार चिमूर यांना एक लेखी निवेदन दिले हाेते.
त्यांचे अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांना उपजिविकेसाठी अडचणीचा सामना करावा लागत होता. तर अनेक लाभार्थी प्रशासकीय कार्यालय व बॅंकेचे उंबरठे झिजवित होते. मात्र, त्यांचे खात्यात रक्कम जमा न झाल्यामुळे आल्या पाऊलीच त्यांना घरी जावे लागत होते. त्यामुळे दिव्यांग,अनाथ, निराधार योजनेचे अनुदान दिवाळीपूर्वी देण्यात यावे. यासाठी चिमूर प्रहारच्या वतीने ही मागणी रेटून धरण्यांत आली.
दरम्यान तहसीलदार यांच्या कॅबीनमध्ये स्वतःला कोंडून आंदोलन करण्याचा इशारा प्रहारने प्रशासनाला या पुर्विच दिला होता. सदरहु निवेदनाची दखल घेत अवघ्या ६ दिवसांत अनुदान वितरित करण्यात आले. या मागणीचे निवेदन सादर करतांना प्रहार सेवक विनाेद उमरे, मुरलीधर रामटेके, नारायण निखाडे, सत्यपाल गजभे, स्वप्नील खोब्रागडे, रमेश वाकडे आदीं उपस्थित होते.

देवदारी : देवा तुझ्या दारी आली धाया तुझी रे कराया

                              देवदारी

            देवा तुझ्या दारी आली
                 धाया तुझी रे कराया 

नको असा अंत पाहू आपले लेकरांचा
कशी तुझी रे माया कशी तुझी रे लीला 
कोरोनाचा संकट असं जगावरी पाडीला ।।१।। 

काय चूक झाली देवा कसा रे रुसला 
या महामारी ने जीव रे घेतला
बापा वीन लेक झालं कस रे पोरका 
काळजाच्या तुकड्याविना माय झाली पिसा ।।२।।

कुंकवाचा धनी गेला, आधार हरपला
संसाराची झाली दशा हा खेळ रे कसा 
झालं देवा पूर झालं थांब तू आता ।।३।।

निर्दयी कसा झाला,
सांग देवा आता 
डोळ्या मध्ये अश्रू माझ्या नाही पाहवत आता ।।४।।