Showing posts with label झरी. Show all posts
Showing posts with label झरी. Show all posts

निंबादेवी ग्रामस्थांनी दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी जमानी :  झरी जामणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या निबादेवी येथे ग्रामपंचायत मध्ये पंतप्रधान आवास घरकूल योजना ही यादी आली आहे. मात्र निबादेवी येथील ग्रामस्थांनी नवीन बेस यादी मध्ये छेडछाड करून अनुक्रमांकाचे नाव खाली वर करण्यात आले आहे अशी तक्रार निंबादेवी येथील लाभार्थी यांनी गट विकास अधिकारी यांना दिली आहे.
   
पंतप्रधान आवास घरकुल योजना लाभार्थी यांना घरकूल आले असून त्यामध्ये नवीन बेस यादी नुसार ग्रामपंचायती मध्ये प्राप्त झाली, असून ग्रामसेवक सरपंच व उपसरपंच यांनी त्या यादीला छेडछाड करून खालचे नाव वर व वरचे नाव खाली करून सर्व त्यांच्या संबंधित लाभाथाचे नावे वर समाविष्ठ करण्यात आले आहे. 

प्रथम अनुक्रमांका वरील सर्व प्राप्त लाभार्थी यांचे नाव शेवटच्या क्रमांकावर असून हे भूमिहीन ,अल्पभूधारक लाभार्थी आहे. त्यामुळे यांना नवीन घरकुल यादी मान्य नसून बेस यादी नुसार घरकुल देण्यात यावे अशी मागणी पंचायत समिती गट विकास अधिकारी याना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

सेवा निवृत्त सूरदापूर येथील पोलिस पाटील रविन्द्र रेड्डी येलटीवार यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : १७ डिसेंबर "पोलिस पाटील दिवस" च्या औचित्याने दिनांक ९ जाने.२२ रोजी सूरदापूर येथे पोलिस पाटील दिवस व वार्षिक स्नेहसंमेलन तसेच निवृत्त पोलिस पाटील यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला श्री. पुलजलवार साहेब, एसडीपीओ वणी, श्री. जाधव साहेब, पोलिस स्टेशन, मुकुटबन, व संगीता हेलोंढे मॅडम, पोलिस स्टेशन पाटन व पोलिस पाटील संघटना पाटन अध्यक्ष श्री धवने पाटील, सचिव श्री. विनोद पेरकावार पाटील यांची उपस्थिती होती.

यावेळी सेवा निवृत्त सूरदापूर येथील पोलिस पाटील श्री. रविन्द्र रेड्डी येलटीवार पाटील यांचा सपत्नीक मान्य वरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. इंगोले पाटील, यांनी केले तर प्रास्ताविक सचिन कूलसगे पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मार्गदर्शन मध्ये एसडीपीओ साहेब यांनी पोलिस पाटील हा प्रशासनाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे असे सांगितले.

या कार्यक्रमाला पोलिस पाटील संघटना, पोलिस स्टेशन चे सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती. तसेच प्रकाश गेडाम पाटील, भोयर पाटील, पवार पाटील, कोरांगे पाटील, आत्राम पाटील, यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन श्री पेरकावार पाटील यांनी केले.

संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांचा अडेगावात संवाद दौरा


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर यांचा विदर्भ विभागीय संवाद दौरा सुरू आहे. त्या निमित्त अडेगाव येथे भेट देऊन यवतमाळ जिल्हाअध्यक्ष अजय धोबे यांच्या अध्यक्षतेखाली हा संवाद दौरा पार पडला.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या अनेक सामाजिक व राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे कार्य नव्याने सांगण्याची गरज नसून तुम्ही केलेल्या कार्यातून लोक संभाजी ब्रिगेडला ओळखतात. संभाजी ब्रिगेडच्या राजकीय प्रवेशावर बोलतांना आपण जे काय काम करतो आपल्यातील जे अनेक लोक तयार झाले. आणि ते आपला विचार आपला अजेंडा ते घेऊन जाऊन आपल्या पदरात काहीतरी पाडून घेतील. आपण निर्माण केलेले सामाजिक वैचारीकतेने समाजाचा राजकीय मंडळी कडून काही फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे नेतृत्व करण्याची धमक असणाऱ्या तरुणाने दुसऱ्या कुठल्या पक्षाचा दावणीला बांधला जाऊ नये.

आपल्या पंचसूत्री मध्ये राजसत्ता हा उल्लेख पूर्वीच होता. कारण देशातील कुठल्याही प्रश्नांचे उत्तराची चाबी ही राजसत्ता आहे. आणि निकोप समाज घडविण्यासाठी ही चाबी आपल्या हाती असणे गरजेचे आहे. मागचं काही सांगण्यापेक्षा पुढं आपल्याला काय करायचं आहे हा विचार करायला हवा. संभाजी ब्रिगेड ने पहिल्याच प्रयत्नात ३५० ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकविला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत बऱ्यापैकी आपली ताकद दाखविली. नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या निवडणुका सुध्दा मोठ्या ताकदीने लढविणार असल्याचे यावेळी ते बोलले.

राजकारण कश्यासाठी आपले जे मूळ प्रश्न आहे. शेतकरी, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यावर अधिवेशनात कुणीही बोलायला तयार नाही. हे अधिवेशन कुत्रे मांजरी म्याव म्यावं करण्यात घालविल असे बोलत त्यांनी प्रस्थापितावर घोचक टीका करत आपल्या जातीची आपल्या मातीची लोक जो पर्यंत तिथे पोचत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे सर्वांनी येणाऱ्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड ला मदत करण्याचे आव्हान यावेळी खेडेकर यांनी केले.

यावेळी मंचावर उपस्थित सुधीरदादा देशमुख, (संभाजी ब्रिगेड केंद्र कार्यकारिणी सदस्य) अजय धोबे (जिल्हाध्यक्ष यवतमाळ) मोहन पानघाटे, अशोक उरकुडे (पो पाटील) संतोष बरडे, पारखी सर हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम राऊत, प्रस्थावना समीर लेनगुरे (जिल्हा कार्याध्यक्ष)यांनी केली. तर आभार प्रदर्शन संदीप आसुटकार यांनी केले यावेळी शेकडो कार्यकर्ते व महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

प.स झरी ग्रामसेवक संघ १३७० शाखाचे एक दिवसीय धरणे व सामुहिक सुट्या टाकून कामबंद आंदोलन

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

झरी : पंचायत समिती झरी अंतर्गत एकूण ५४ ते ५३ ग्रामपंचायत येथे असून आज रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ १३७० जिल्हा शाखा यवतमाळ याचा वतीने प.स झरी एक दिवसीय धरणे व कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

संदर्भ क्र. १ नुसार ४० ते ५० सविनय निवेदने लोकशाहीच्या मार्गाने शासन निर्णयातील तरतुदीनुसार असताना देखील समस्या जिल्हा परिषद स्तरावरून निकाली न काढल्यामुळे दिनांक ०१ जानेवारी २०२२ पासून सामूहिक सुट्टया टाकून संपूर्ण कामबंद आंदोलन समस्या निकाली लागे पर्यत करणे बाबतचा निर्णय झालेला असून ग्रामसेवक संघाच्या एकूण १ते११ मागण्या असून त्या अनुषंगाने रजा मंजूर करून मुख्यलय सोडण्यांची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ १३७० जिल्हा शाखा यवतमाळ झरी ग्रामसेवकांनी उपस्थिती दर्शवून केली आहे.

या सभेला येथील मुख्याध्यापिका सौ. निर्मला जगन्नाथ रोगे, श्री. विठ्ठल नानाजी ठावरी पद. विषय शिक्षक, सौ. संगीता खंडारे पद. विषय शिक्षक, श्री. सूर्यभान नागोबा चिडे पद. विषय शिक्षक, श्री. डोंगरकर सर सहा. शिक्षक, कु. डबाले मॅडम सहा. शिक्षिका, कु. गजघाटे मॅडम सहा. शिक्षिका, कु. चालखूरे मॅडम, कु. शुभांगी ठक मॅडम सहा. शिक्षिका व अनेक महिला पुरुष पालक हजर होते.

शेतकरी पुत्रांचे सिमेंट प्रकल्पच्या विरोधात आंदोलन सुरू


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

झरी : तालुक्यातील मुकूटबन येथे जनसुनावणीच्या वेळी प्रत्येक शेतकऱ्याला कंपनीत नोकरीवर घेऊ असे लॉलीपॉप दाखवून येथील अनेक शेतकऱ्यांनी दहा वर्षापूर्वी स्वतः ची शेती आरसीसीपीएल अँड एमपी बिर्ला ग्रुप सिमेंट कंपनीला विकत दिली.

चार वर्षापासून आरसीसीपीएल अँड एमपी बिर्ला ग्रुप सिमेंट कंपनीचे युद्ध स्तरावर काम सुरू आहेत. परंतु स्थानीक शेतकरी पुत्रांना कंपनीत कामावर घेण्यापासून वंचित ठेवल्या जात आहे. सिमेंट कंपनीत काम करण्याकरीता हवे तेवढे शिक्षण युवकाकडे आहे परंतु स्थानिकांना कामावर घेण्यास कंपनी डावलत आहे. या कंपनीत स्थानिक बेरोजगारांना कंपनीत हक्काच्या नोकऱ्या तर मिळाल्याचं नाही त्यामुळे बेरोजगार शेतकरी पुत्र सिमेंट प्रकल्पाच्या विरोधात आज गुरुवार (ता. ३०) पासून आंदोलन करीत आहे. मागणी मंजूर न झाल्यास आमरण उपोषण सुध्दा करण्याचा इशारा आंदोलन कर्त्यानी दिला आहे.

मुकूटबन ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाण पत्र देताना शेतकरी पुत्रांना रोजगार, शहराच सौन्दर्यीकरण या बाबीच ठोस आश्वासन दिले. दहा वर्षापासून येथील स्थानिक बेरोजगारांना मोठी आशा लागली होती की, सिमेंट कंपनीत प्रत्येक तरुणांच्या हाताला मागेल तेवढा रोजगार मिळेल. परंतु कंपनीने शेतकरी पुत्रांच्या हातात तुरी देण्याचं काम केलं आहे. लोकप्रतिनिधी सुध्दा या बाबीकडे लक्ष देत नाही.

मुकूटबनात परप्रांतीयांचा एक प्रकारे अड्डाच बनला असून परप्रांतीयांचा भरणाच कंपनीत आहे. तरूणांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी सिमेंट कंपनीत मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करून देऊ, अच्छे दिन आने वाले है, असे नाना तऱ्हेची आश्वासनाची खैरात वाटली गेली. मात्र आता कंपनीचे अच्छे दिन व तरूणांचे बूरे दिन आल्याने कंपनीला शेती दिलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना आरसीसीपीएल अँड एमपी बिर्ला प्रा. लि. कंपनीने मुकूटबन मध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्तीपत्र देऊन थेट कंपनीत समाविष्ट करून नौकरीवर घेण्यात यावे. कंपनीच्या नियमानुसार वेतन देण्यात येऊन भविष्य निर्वाह निधी (प्रोव्हिडेंट फंड) कपात करुन इतर सेवा सवलती देण्यात यावे. या मुख्य मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. 


लिखीत आश्वासनाने चौथ्या दिवशी उपोषणाची सांगताआरोग्य केंद्रातील सर्व रिक्त पदे भरणार


(मुकूटबन : जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण व तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम उपोषणकर्त्यांना फ्रुटी मँगो ज्यूस पाजून उपोषणाची सांगता करताना.)


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : मुकूटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २३ पदे रिक्त असून, ही २३ रिक्त पदे न भरल्यामुळे मंगळवार (ता. २१) पासून ज्येष्ठ पत्रकार रफीक कनोजे व समाजसेवक नारायण गोडे हे मुकूटबन येथे आमरण उपोषणास बसले होते. या उपोषणाची सांगता शुक्रवार (ता. २४) संध्याकाळी सहा वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांचे हस्ते निंबु शरबत पाजून समाप्ती करण्यात आली.

तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम व तहसीलदार गिरीश जोशी यांनी मुकुटबन येथे (ता. २२) उपोषणकर्त्यांना भेट घेऊन, आपण उपोषण सोडावे अशी विनंती केली. जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांनी सुध्दा व्हॉट्स अपद्वारे पत्र पाठवून (ता. २० व २३ ला) उपोषणकर्त्यांना उपोषणापासून प्ररावृत्त व्हावे अशी विनंती पत्राद्वारे केली. परंतु उपोषणकर्त्यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. जोपर्यंत २३ रिक्त जागा भरण्यात येणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही यावर ठाम होते.

त्यानंतर कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तीवारी यांनी मुकूटबन येथील रिक्त पदाचा प्रश्न मुख्यमंत्र्याच्या दरबारी मांडला तसेच अर्चना पाटील डायरेक्टर आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांचेशी संपर्क साधून चर्चा केली. आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी मुंबई येथील अधिवेशनात ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदन देऊन चर्चा केली. या सर्वांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेशी चर्चा करून उपोषणाच्या चौथ्या दिवशी (ता. २४) शुक्रवारी जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण व त्यांची जिल्हा चमू यांनी मुकूटबन येथे उपोषण मंडपला भेट दिली. त्यांनी उपोषणकर्त्या सोबत चर्चा करून प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांच्या समस्या जाणून घेतल्या. चर्चे अंती एक आरोग्य अधिकारी व दोन आरोग्य सेवकांची स्थायी स्वरूपाची नेमणूक करण्यात आली. तसेच झरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक औषधी निर्माण अधिकारी, एक प्रयोग शाळा तंत्रज्ञ व एक लिपिक यांची आठवड्यातून तीन दिवसासाठी नेमणूक मुकूटबन येथे करण्यात आली. व उर्वरित पदे लगेच अनुकंपा तत्त्वावर भरती करण्यात येईल त्या भरतीतून ता. ५ जानेवारी २०२२ पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र मुकूटबन येथील सर्व रिक्त पदे प्रथम प्राधान्याने व त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र शिबला येथील रिक्त पदे भरण्यात येईल असे लिखीत आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांनी दिले. या सर्व बाबी ज्येष्ठ पत्रकार रफीक कनोजे व समाजसेवक नारायण गोडे यांनी मान्य केल्या. यावेळेस मुकूटबनचे सरपंच मिना आरमुरवार, उपसरपंच अनिल कुंटावार, तहसीलदार गिरीश जोशी, तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम, गट विकास अधिकारी गजानन मुंडकर, भालचंद्र बरशेट्टीवार, जगदीश आरमुरवार, सुरेश मानकर, रमेश उदकवार, खुपिया पोलीस संजय खांडेकर, नागेश अक्केवार, संजय आकीनवार, शेख शरीफ शेख कासम हे उपस्थित होते.



ई-श्रम कार्ड नोंदणी शिबिराचा कामगारांनी घेतला लाभ


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

झरी : संभाजी ब्रिगेड झरी तालुक्याच्या वतीने मुकुटबंन येथे ई-श्रम कार्ड शीबिराचे आयोजन केले होते. असंघटित श्रेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या आर्थिक सुरक्षेसाठी सरकार कडून अनेक विधायक पाऊले उचललेली जात आहे. अश्या सर्व लोकांसाठी ई श्रमिक कार्ड योजना लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत कामगारांना सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. सरकारी योजने पासून एकही कामगार वंचित राहू नये यासाठी संभाजी ब्रिगेडने या शिबिराचे आयोजन केले होते. 
      
सरकारी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ई-श्रम पोर्टल वर नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर देशातील कोनात्याची काना कोपऱ्यात काम करणाऱ्या कामगारांना विविध सरकारी योजणांचा लाभ घेता येणार आहे. प्रत्यक्षात हे कार्ड 16 ते 59 वयोगटातील कामगारांसाठी असून रजिस्ट्रेशन ऑनलाईन ऑफलाईन करता येणार आहे. अर्ज न करता योजनेपासून वंचित राहू नये यासाठी हा कॅम्प मुकुटबंन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित करून नोंदणी ची सुविधा उपलबध करून दिली होती.
      
शिबिराचा कार्यक्रमाचे अध्यक्ष नितेश ठाकरे, उद्घाटक पी एस आई राजेश मदेवार (धंतोली नागपूर पोलीस स्टेशन), प्रमूख पाहुणे राजू लोडे, उपस्थिती समीर लेनगुडे (संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष यवतमाळ), देव येवले (संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष), केतन ठाकरे (तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ), शंकर झाडे (शाळा सुधार समिती अध्यक्ष) अशोक पणघाटे (माजी ग्राम पंचायत सदस्य), प्रफुल भोयर (रक्तविर बहुउद्देशीय संस्था) आशिष झाडे अध्यक्ष (शिवाक्रांती कामगार संघटना ), सुरज सुरपाम यांचा उपस्थिती त पार पडला. 
  
कार्यक्रमाचे संचालन शुभम राऊत यांनी केले. तर शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुमित क्षीरसागर, मंगेश झाडे, संदीप आसुटकार, लखन कांबळे, दीपक हिरादेवे, विवेक सोनटक्के, प्रशांत बोबडे, दिलीप पाचभाई, आकाश पारखी, संदीप येवले, गौरव धोटे, गणपत गेडाम, प्रणय काळे, आदींचे सहकार्य लाभले.

गोंजंद तर्फे प्रणाली चिकटेंचा झरीत स्वागत व सत्कार


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

झरी : आज दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी झरी येथे 21 वर्षीय प्रणाली चिकटे हिचा सत्कार करण्यात आला. प्रणाली ने महाराष्ट्र दर्शन करून निसर्गावर होणारी हानी व निसर्गाविषयी अभ्यास करण्यासाठी तिला एकूण दिवस 429 दिवस लागले. ती 429 व्या दिवशी झरी (जामणी) येथे पोचल्यानंतर तिचा गोंजद तर्फे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपस्थित जंगम दल अध्यक्ष कालिदास अरके, उक्के साहेब, अयुब कडोडे, प्रशांत किनाके, प्रमोद भांडेकर, गोंडवाना युवा जंगम दल प्रदेश प्रदेशाध्यक्ष चेतन भाऊ कुडमेथे, झरी तालुका शामा दादा कोलाम संघटना कोषाध्यक्ष संजय आत्राम, सामाजिक कार्यकर्ते व समस्त झरीवासी यावेळी उपस्थित होते. 

संभाजी ब्रिगेड झरी तालुक्याच्या वतीने ई-श्रमकार्ड शिबिराचे आयोजन


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

झरी : झरी तालुक्यातील मुकुटबंन हा परिसर औद्योगिक वसाहत म्हणून नावारूपास आला आहे. अडेगाव येथे डोलोमाईट, गणेशपूर येथे चुना कंपन्या, मुकुटबंन येथे कोल माईन्स, बिरला सिमेंट प्रोजेक्ट, पांढरकवडा येथील इस्पात कंपनी अशी अनेक छोटी मोठी उद्योग या परिसरात आहे. शेती जाऊन त्या जागी झालेल्या कंपन्या मुळे येथे बेरोजगार संख्या अधीक, यात परराज्यातून अनेक कामगार आलेे. त्यामुळे या शिबिरास अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मुकुटबंन येथे रविवार व सोमवार या दिवशी शिबीर होणार आहे. परिसरातील सरपंच यांच्या उपस्थितीत शिबिर संपन्न होईल.
  
या शिबिरात बांधकाम कामगार, रस्त्यावरील विक्रेते, घरकाम करणाऱ्या महिला, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, ऑटो चालक, वृत्तपत्रे विक्रेते, पशुपालन कामगार, शिलाई मशीन कामगार, सुतार काम करणारी व्यक्ती, आशा व अंगणवाडी सेविका, मिठ कामगार, न्हावी कामगार, पिठ गिरणी, ब्युटी पार्लर, पेंटर, इलेक्टरेशीयन, प्लंबर या सर्व कामगारांना आपली नोंद या शिबिरात करता येणार आहे. 
कार्डधारकांना वित्तीय सहायता, मुलांच्या लग्नासाठी आर्थिक मदत, मातृत्व लाभ, घर बांधणी आर्थिक सहाय्य अशी काही सरकारी मदत घेता येणार आहे.
यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक व मोबाईल न. ची गरज राहील. 
   
शिबिराच्या यशस्वीतेसाठी देव येवले तालुका अध्यक्ष, अनिलभाऊ कडू, शंकर झाडे (पंचायत समिती सर्कल प्रमुख अडेगाव कोसारा), समीर लेनगुडे (झरी पंचायत समिती सर्कल प्रमुख), सचिन टोंगे, प्रशांत बोबडे, संदिप आसुटकार, सुरज सुरपाम वेदड, अनिकेत टोंगे भेंडाला, कामतकर खातेरा, किशोर क्षीरसागर डोंगरगाव, छंदक तेलंग मांगली, फैजल शेख मुकुटबंन, गीतेश बेलेकर गणेशपूर, विवेक गोडे कोसारा, आशिष झाडे दृष्यांत काटकर, विजय भेदूरकार वैभव मोहितकर मार्कि, प्रणय काळे वेदड आदींचे सहकार्य राहणार आहे.

गवारा येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती उत्सहात साजरी


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी

झरी : तालुक्यातील गवारा येथे भगवान क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची १४६ वी जयन्ती साजरी करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्द्दा चांगल्या प्रकारे जयंती चा कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदित्य धुर्वे, कैलाश मेश्राम, अंकुश आत्राम, वैभव गेदाम, बंडू गेदाम, गुलाब माडावी, रमेश गेडाम, राकेश मेश्राम, प्रमोद मेश्राम,  पोलिस पाटिल श्री चरणदास गंद्रावार, उपसरपंच श्री प्रविण गुरनुले, अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष श्री दिनेश गुरनुले, कुणबी समाजाचे अध्यक्ष सुनील भोयर, पेरकी समाजाचे अध्यक्ष व माली समाजाचे अध्यक्ष व आदि समाजाचे अध्यक्ष या महामानवाच्या जयंती उत्सहाला उपास्थित होते. व संदीप भोयर, गंगाधर राऊत वृषभ ठाकरे, अशोक किलचटवार, दरलावार, मैचिंद्र गंड्रतवार, राजू करमगुलवार, निखिल किलचतवार, सलेवार साहेब, महादु मडावी, गुलाब मडावी, रमेश राऊत, हनमतू कुडमेथे, प्रकाश गोडे, संतोष गोडे, पांडु कनाके, किशोर राऊत, नरेश पेंडोर व सामजिक कार्यकर्ते मंगेश भाऊ कुडमेथे, संजय भाऊ आत्राम, गजुभाऊ कुडमेथे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस पाटील यांनी मिळून कार्यक्रम आयोजित करून यशस्वी  केला.

मुकुटबन : क्रेशरने घेतला चंद्रपूर जिल्ह्यातील मजुराचा बळी

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (३० ऑक्टो ) : तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खडकी (गणेशपूर) शेत शिवारात एका मजुराचा सोयाबीन काढत असतांना क्रेशर मध्ये पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुपारी 3 च्या दरम्यान घटना घडली.

मृतक विलास भूदाजी तोडासे (अंदाजे वय ५५) रा. भाटाडी जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहे. 
सध्या जिल्ह्यात मजुरांची कमतरता असल्याने बाहेरील जिल्ह्यातील मजूर कामाला येत आहे. कापूस वेचणी ला वेग आला असून समोर दिवाळी असल्याने शेतातील शेतकऱ्यांचे सोयाबीन मोठया क्रेशरने (हडंबा) काढून देण्याचे काम सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील गँग मजुरीसाठी या परिसरात येऊन असून, त्या गँग मधील काही लोक खडकी येथील विठ्ठल ठावरी यांच्या शेतात क्रेशरने सोयाबीन काढण्याचे काम करीत होते. पुढे दीपावली असल्याने हे मजूर आज सर्व कामे आटोपून आपापल्या घरी जाण्याच्या तयारीत असतांना दि.३० ऑक्टोबर रोजी विलास तोडासे नामक व्यक्तीचा  सोयाबीन काढतांना अचानक तोल जाऊन क्रेशेरच्या पट्ट्यावर मजूर पडल्याने तो सरळ क्रेशेरच्या आतपर्यंत गेल्याने अर्धे शरीर छिंनविच्छिन्न झाले व त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी अपघाताची माहिती खडकी,मुकुटबन,गणेशपूर व अडेगाव पर्यंत वाऱ्यासारखी पसरताच हजारो लोकांची गर्दी पाहण्याकरिता उसळली.
सदर घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते राजू लोंढे व पोलीस पाटील मंगेश बरडे हजर होते त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक राजू नेवारे व पोलीस नाईक संतोष मडावी घटनास्थळी पोहचले. पंचनामा सुरू होता. पंचनामा करून शव शविच्छेदन करिता झरी येथे पाठविण्यात येणार आहे. मात्र येत्या सणासुदीच्या पर्वावर तोडासे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले. 

 

 











महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त नागरिकांचा प्रतिकात्मक मोर्चा



सह्याद्री न्यूज | सुनील शिरपुरे
झरी, (२७ सप्टें.) : तालुक्यात मागील चार-पाच महिन्यापासून सातत्याने वीज पुरवठयाचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण नागरिक त्रस्त झाले आहे. बोगस वीज मीटर, रिडींगमध्ये होत असलेली तफावत म्हणजे मागील वर्षीच्या माहेचा सरासरी रिडींग, अवाच्या-सव्वा वीज देयके काढून सुरू करण्यात आलेली लुटमार अशा विविध कारणाने संपूर्ण नागरिक त्रस्त झाले आहे. या कारणांच्या विरोधात आज चक्क महावितरण कार्यालयावर महावितरणची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत तिरडी आंदोलन करण्यात आले आहे. 
          
मंगेश पाचभाई यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात विविध समस्या व मागण्या घेऊन मोठ्या संख्येने नागरिक महावितरण कार्यालय मुकुटबन येथे धडकले. यावेळी अभिनव तिरडी यात्रा काढून जनतेचे लक्ष वेधण्यात आले. यामुळे संपूर्ण मुकुटबन शहर दुमदुमले. या आंदोलनात विविध मागण्या रेटून धरण्यात आल्या. यात प्रामुख्याने झरीजामणी तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात येणे , अधिकारी मुख्यालयी ठेवण्यात येणे , मुकुटबंन येथे वीज दुरुस्ती केंद्र देणे व बोगस रिडींग घेणाऱ्यावर कार्यवाही करणे या सविस्तर मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या. अशा इतरही मागण्या घेऊन आज मुकुटबन बसस्थानक पासून तर महावितरण कार्यालयापर्यंत तिरडी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने लोकांनी सहभाग दर्शवून जनतेच्या मागण्या महावितरण अधिकाऱ्यासमोर मांडत निदर्शने केली. 
           
आंदोलनामुळे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांनी समस्त जनतेला ग्वाही दिली की, समस्त जनतेच्या समस्या सोबतच मुकुटबन येथील वितरण केंद्रात वीज बिल दुरुस्ती करीता कर्मचारी ठेवणे, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देणे, तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याकरिता वेळोवेळी मेन्टेनन्स ची कामे करणे तालुक्यातील नादुरुस्त मीटर उपलब्धतेनुसार लवकरात लवकर बदलविणे, त्याच प्रमाणे बोगस रिडींग घेऊन चुकीचे बिल पाठविणाऱ्या एजन्सीवर नियमानुसार कठोर कार्यवाही करणे या संदर्भात लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आले, तेव्हा आंदोलनाची सांगता करण्यात आली. सोबतच पोलीस विभागाने सुध्दा आंदोलनाला सहकार्य केले . 
           
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे, सौ. लक्ष्मी बच्चेवार, जेस्ट नागरिक गोविंदा उरकुडे, अडेगावच्या सरपंच सीमाताई लालसरे, ग्रा.प.सदस्या सौ. वंदना पेटकर संतोष पारखी, संजय आत्राम, खातेराचे सरपंच विशाल ठाकरे, येडशीचे सरपंच विनोद धोटे , कोसाराचे सरपंच सचिन गोडे, मार्कीचे जीवन उलमले व मित्रपरिवार, पांडरकवडाचे बाळू चेडे, तेजापूरचे शंकर भगत, मांगलीचे विलास कसोटे, मंगेश चामाटे, गणेश पेटकर, राहुल ठाकूर, विजय लालसरे व तालुक्यातील महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे त्रस्त झालेले समस्त नागरिक उपस्थित होते.

कृषी दुताने केले ई- पिक पाहणी प्रात्यक्षिक

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (२४ सप्टें.) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित असलेल्या कृषी महाविद्यालय कोंघारा ता. पांढरकवडा येथील कृषिदुत चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी कु . वैभव विठ्ठलराव गुरणुले या विद्यार्थ्याने कृषी मंत्रालय महाराष्ट्र शासन यांनी सुरू केलेल्या ऑनलाईन पिक पाहणी कशी करायची या बद्दल उत्तम महादेव भोयर (पो.पाटील) पिवरडोल थेट यांच्या शेतात जाऊन मार्गदर्शन केले.
पेरवे भरते वेळी 7-12, आणि गाव नमुना आठ जवळ बाळगावे तसेच चालू मोबाईल क्रमांक जवळ ठेवावा, शेतात जाऊनच नोंदणी करावी, कमी नेटवर्क असेल तिथून नोंदणी करू नये, पिकाचा फोटो घेताना लोकेशन चालू करावे इत्यादी गोष्टींबाबत मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.

यावेळी तलाठी श्री खैरे साहेब, उपसरपंच मोहन गुरनुले तसेच पो.पाटील उत्तम भोयर, शंकर वाडगुरे, अविनाश शेंडे, यादव ठाकरे, विष्णू वाढई, संदीप गुरनुले व समस्त गावकरी उपस्थित होते. या प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय कोंघारा चे प्राचार्य श्री राठोड सर तसेच कृषी कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी श्री भाकडे सर व कीटक शास्त्र विभागाचे प्रमुख श्री वानखडे सर तसेच माने मॅडम, दत्ता जाधव सर, अजय सोलंकी सर, इंझालकर मॅडम, शिरपूर्कर सर व आत्राम मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कृषीदुता तर्फे जनावरांचे लसीकरण करून शेतकऱ्यांना लासिकरणाबाबत मार्गदर्शन

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (२४ सप्टें.) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित असलेल्या कृषी महाविद्यालय कोंघारा, येथील कृषिदुत चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी कु . वैभव रविंद्र मुसळे या विद्यार्थ्याने शेतकऱ्यांच्या जीवनातील गुरांचे महत्त्व स्पष्ट करून त्यांच्या बद्दल घ्यावयाची काळजी व लसीकरण करण्याबाबत मार्गदर्शन केले शेतीच्या कामाच्या वेळी बैल हा सुदृढ असला पाहिजे पावसाळ्यात गुरांवर विविध आजार येतात त्या पासून कसा बचाव करायचा कोणत्या आजारावर कोणती लस उपयुक्त ठरते त्यांना चारा काय व किती प्रमाणात द्यायला हवा दुधाळ जनावरांची विशेष काळजी कशी घेतली पाहिजे इत्यादी गोष्टींबाबत माहिती देऊन लसीकरणाचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.

माहिती कार्यक्रमा दरम्यान डॉ. भोयर सर, गावातील शेतकरी समीर गाहोकार, पोलिस पाटिल रमेश मुसळे, पुंण्डलिक वासेकार, बबन वासेकार, राजेंद्र मुसळे, रविंद्र मुसळे, लखन वासेकार, तसेच इतर गाव करी बंधू उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य महेश राठोड, कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल भाकडे, प्रा. हेमंत वानखेडे, प्रा. अजय सोळंकी, प्रा. दत्ता जाधव, प्रा. शुभम शिरपुरकर, प्रा. पल्लवी येरगुडे, प्रा. स्नेहल आत्राम, प्रा. काजल माने, प्रा. गायत्री इंजालकर या शिक्षकांचे या विद्यार्थ्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले.

पाटण (बोरी) येथील भूमिपुत्र कार्तिक कायतवार यांचे जंगी स्वागत

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (२३ सप्टें.) :  पाटण (बोरी) येथील भूमिपुत्र  कार्तिक सतीश कायतवार यांची भारतीय सेनेत निवड झाल्यानंतर प्रथमच त्याचे पाटण आगमनानिमित्त नॅशनल हायवे ४४ पासून महिला व पुरुषांनी स्वागत करत पाटण (बोरी) येथे जंगी आगमनात सहभागी होऊन त्यांचे स्वागत केले.

कार्तिक कायतवार हा पाटण बोरी येथील एका गरीब कुटुंबातील विद्यार्थी असून, त्याची भारतीय सैन्य सेवेत रुजू झाल्यानंतर शहरात त्यांचे आगमन झाले. या प्रसंगी गावातील नागरिक, महिला पुरुषांनी त्याचं गावाचा  भूमिपुत्र सैन्यात भरती झाला हा अभिमान आम्हाला म्हणून स्वागत करत त्यांच्या घरी घेऊन आले.

वडीलांचे छत्रछाया हरवलेल्या कार्तिकला आईने काबाड कष्ट करून त्याला शिकवलं, त्याच मेहनतीचं फलित झाले असून त्याची आज भारतीय सैन्यात त्यांची निवड झाल्याबद्दल पाटण (बोरी) मध्ये कार्तिक यांचे  जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी असंख्य नागरिकांच्या उपस्थित त्यांचे अभिनंदन व परिवाराची स्तुती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना पाटणबोरीची नविन कार्यकारणी गठीत


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
पाटणबोरी, (२०सप्टे.) : दिनांक १९ सप्टेंबर रोजी स्थानिक श्री कालीका मंदिरात पत्रकार कार्यकारिणी गठीत करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. पण, ठरल्याप्रमाणे नव्यांना संधी न देता जुन्याच व्यक्तींना अध्यक्ष बनविले. परंतु अनेक लोकांना ही बाब पटली नाही, त्यामुळे जवळपास तेरा पत्रकारांनी एकत्रित येऊन आपली नवीन कार्यकारिणी अविरोध तयार करण्यात आली.

यावेळी जयंत भागानगरकर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अध्यक्ष सचिन पत्रकार, उपाध्यक्ष आदित्य भागानगरकर, कार्याध्यक्ष विनोद कनाके, सचिव सचिन गुडेटवार, सहसचिव भास्कर मालीकर, कोषाध्यक्ष मोहन एनगुर्तीवार तर, सदस्य म्हणून सौ.संध्याताई भागानगरकर, अमन सिडाम, कार्तिक धुर्वे, सल्लागार म्हणून गोपालजी शर्मा, नंदुभाऊ अर्गुलवार, मोबीन जाटू, अनिल गुंडेवार व जयंत भागानगरकर आदींची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी वरील प्रमाणे कार्यकारणी गठीत करण्यात आली असे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने माहिती देण्यात आली.

कार्यालयीन कामासाठी आलेल्या माहिला गेल्या परत..


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (१८ सप्टें.) : झरी जामणी मधील शासकीय कार्यलयात काम करणारे जास्तीत जात कर्मचारी अपडाऊन करतात. यामध्ये विशेतः वणी, पांढरकडा यवतमाळ, या ठिकाणाहून कर्मचारी येजा करतात. कार्यालयीन वेळेत उशीरा येणे, व लवकर निघून जात असल्याच अनुभव कार्यालयीन कामाकरिता आलेल्या जनतेला येतो आहे. अधिकारी दौऱ्याची निमित्य करून निघून जातात, ते गेले की कर्मचारी घरची वाट धरतात.  शुक्रवार दि.१७ सप्टेंबर ला ३:०० वाजता अर्धे अधिक कर्मचारी हजर नसून बऱ्याच खुर्च्या रिकाम्या आढळून आल्या चित्र पहायला मिळतेय.

राज्य सरकारने ५ दिवसाचा आठवडा केला व कार्यालयीन कामकाची वेळ वाढविली. ती १० ते ६ वाजेपर्यंत करण्यात आली. मात्र, झरीत कोणाचे कोणावर नियंत्रण नसल्याने ४ वा. औपचारिक सुटी झाल्याचे पाहायला मिळते आहे. कामासाठी आलेल्या जनतेला एका कामासाठी चार वेळा चकारा माराव्या लागत असून, वेळ व पैसा खर्च करून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

लाईनमनची गळफास घेवून आत्महत्या


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (१३ सप्टें.) : मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोन्सा येथे एका लाईनमनने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. किशोर बंडू भोसकर (३५) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. 

सविस्तर वृत्त असे की, किशोर बंडू भोसकर हा कुंभारखनी येथील रहिवाशी होता. तो लाईनमन म्हणून काम करायचा. मुलगी व पत्नीसह तो घोन्सा येथे राहत होता. सध्या त्यांची पत्नी गर्भवती असल्याने ती डिलेव्हरीसाठी मुलीला घेऊन माहेरी गेली होती. त्यामुळे किशोर घरी एकटाच असायचा. आज संध्याकाळी ६.०० वाजताच्या सुमारास किशोरने घराच्या छताच्या हुकला दोरीने गळफास लावला. दरम्यान, काही वेळाने ही घटना शेजारीच राहत असलेल्या त्यांच्या भावाला कळली. त्यांनी त्वरित याची माहिती मुकुटबन पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच सहायक फौजदार अनिल सकवान, नाहिम शेख, होमगार्ड प्रज्योत ताडुरवार हे पोलीस वाहन घेऊन घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनाकरीता वणी येथे पाठविला आहे. किशोरने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

घटनेचा पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार अनिल सकवान व संजय खांडेकर करीत आहे.

भरलेल्या कर्जा पेक्षाही कमी पिक कर्ज मंजूर


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (१२ सप्टें.) : तालुक्यातील माथार्जुन येथील महिला शेतकरी अनुसया आनंदराव आत्राम यांना भरलेल्या कर्जाच्या रक्कमे पेक्षाही कमी पिककर्ज मंजूर केल्याची तक्रार आत्राम यांनी तहसीलदार यांचे कडे केली आहे.

अनुसया आत्राम यांच्या नावावर मौजा माथार्जुन गट क्र.१८२ क्षेत्र ११.७१ हे.आर. सामाईक क्षेत्र शेतजमीन आहे. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा झरी (जामणी) कडून कर्ज मिळावे, या अनुषंगाने गेल्या हंगामातील १ लाख ६२ हजार रुपये कर्जाची परतफेड केली. परंतु येथील शाखा व्यवस्थापक महिलेला १ लाख ५० हजार रुपये पीक कर्ज मंजूर करून अन्याय केला असल्याचे महिलेचे म्हणणे आहे.

३ लाखापर्यंत पिक कर्ज मंजूर करणे अपेक्षित असतांना कमी रक्कम पीक कर्ज मंजूर केल्याने शेतीच्या खर्चाचा ताळमेळ बसविणे कठीण झाले आहे. त्यामुळे बँक व्यवस्थापकाच्या मनमानी कारभाराविरुद्ध प्रशासनाकडे तक्रार करण्याची वेळ येथील महिला शेतकऱ्यांवर आली आहे.  

वारा कवठा वांजरी जाणाऱ्या रस्त्यावरील पुल पाण्याखाली, काही काळ वाहतूक ठप्प

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (११ सप्टें.) : पाटण (बोरी) पासून दोन किलोमीटर अंतरावर खूनी नदीपात्रातील कवठा व वांजरी पांढरकवडाकडे जाणारा रस्त्यावरील पूल पाण्याखाली आला. त्यामुळे या मार्गाने जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

यावर्षीचा प्रथमच एवठा मोठा पूर आल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. तालुक्यात सतत कोसळधार पाऊस पडत असल्याने हा पूर आल्याचे म्हटलं जातेय. दरम्यान, काही वेळासाठी हा रस्ता बंद होता. यंदा पहिलाच मोठा पूर आल्याने सगळी वाहतूक ठप्प झाली असून, सकाळ च्या शाळकरी शिक्षक वृंदाना पुरामुळे अडकून राहावं लागलं.

कवठा वांजरी हाडोळी गोपालपूर या मार्गाने जाणाऱ्या प्रवाशी व शेतकरी, कर्मचारी यांचा रस्ता पाण्याने अडवून काही काळासाठी बंद होता. अशावेळी नागरिकांनी पूल ओलांडू नये व सावधगिरी बाळगावी असे प्रशासनाकडून सांगितले. 

आज बापाला दीड दिवसाच्या विसर्जन निरोपाच्या तयारीसाठी पाटणबोरी मार्केटला नागरिकांना बाजार पेठेसाठी या रस्त्याने यावे लागते, परंतु खूनी नदीला पूर असल्याने आज सकाळ पासूनच काही वेळासाठी हा रस्ता बंद असल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली होती.