Showing posts with label पुणे. Show all posts
Showing posts with label पुणे. Show all posts

12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आज जारी होणार तुमचं हॉल तिकीट; या वेबसाईटवर थेट असेल उपलब्ध..

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

पुणे : महाराष्ट्र स्टेट बोर्ड परीक्षा 2023 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र स्टेट बर्ड बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकिट्स आजपासून उपलब्ध झाली असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

आज दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता पासून कॉलेज लॉगइन मधून हे हॉल तिकिट्स उपलब्ध झाली आहेत. http://www.mahahssscboard.in या वेबसाईटवर ही प्रवेशपत्रं उपलब्ध असणार आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे.

फेब्रुवारी-मार्च 2023 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी इ.12 वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. तसंच प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठीकोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी असंही बोर्डानं आपल्या नोटीसमध्ये म्हंटलं आहे

हॉल तिकिट्समध्ये काही चूक असल्यास?
प्रवेशपत्रामध्ये विषय किंवा माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यायच्या आहेत. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायाची आहे असंही सांगण्यात आलं आहे. प्रवेशपत्रं हरवलं तर? प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा 'प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विदयार्थ्यांना दुसरं प्रवेशपत्रं द्यावं असं सांगण्यात आलं आहे. तसंच फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रवेशपत्रं हरवलं तर?
प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा 'प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विदयार्थ्यांना दुसरं प्रवेशपत्रं द्यावं असं सांगण्यात आलं आहे. तसंच फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

शास्त्रीय संगीत प्रसारासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी राज्य शासनातर्फे भरीव मदत करण्यात येईल आणि सवाई गंधर्व महोत्सवाच्या धर्तीवर मुंबई येथे आंतरराष्ट्रीय महोत्सव घेण्यात येईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

ते आज गणेश कला क्रीडा मंच येथे भारतरत्न पं.भीमसेन जोशी जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित केलेल्या संगीत महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी पद्मविभूषण पं.हरिप्रसाद चौरसिया, पं. श्रीनिवास जोशी, पं.सारंगधर साठे, पं.प्रमोद गायकवाड, विदुषी सानिया पाटणकर, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, उल्हास पवार, संचालक विभीषण चवरे आदी उपस्थित होते.

श्री.देशमुख पुढे म्हणाले की, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षात, कोरोनामुळे कार्यक्रम आयोजन शक्य झाले नाही, मात्र भविष्यात असे कार्यक्रम दिल्ली, गदग व मुंबई येथे आयोजित करण्यात येतील. शास्त्रीय संगीत परंपरेला जपण्यासाठी शासनातर्फे आवश्यक प्रयत्न करण्यात येत असून, नव्याने आढावा घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक धोरणात शास्त्रीय संगीतासाठी विशेष बाबींवर विशेष लक्ष देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील शास्त्रीय संगीत क्षेत्रातील कलाकारांना विविध माध्यमातून सहकार्य करण्यात येईल व शासनाच्या ज्या योजना पं. भीमसेन जोशी यांच्या नावाने आहेत, त्यांचाही विस्तार करण्यात येईल, असे अमित देशमुख यांनी नमूद केले.

पंडीतजींनी कर्नाटक, महाराष्ट्र आणि संपुर्ण देशात शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात नावलौकीक मिळविला. त्यांच्या योगदानाचे स्मरण व्हावे यासाठी जन्मशताब्दीच्या निमित्ताने अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. पंडीतजींच्या नावाने होत असलेल्या महोत्सवाचा आनंद नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

आदिवासी संशोधन कृती समितीचे बेमुदत धरणे आंदोलन


कुमार अमोल |सह्याद्री चौफेर 

पुणे : पुण्यातील आदीवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे (TRTI) च्या कार्यालयासमोर सेट, नेट, पिएचडी (ph.d) पात्र आदिवासी विद्यार्थ्यांनी परत दि. 2 मे 2022 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. गेल्या महिन्यात आठदिवस विद्यार्थी आंदोलनास बसले होते. हे दुसऱ्यांदा करीत असल्याचे माहिती आहे.

17 मार्च 2022 रोजी (TRTI) संस्थेकडून अधिछात्रवृत्ती चालू करणेबाबतचा मागणी प्रस्ताव आदीवासी विकास विभागाला पाठवला होता. या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने 1 एप्रिल 2022 रोजी आदीवासी मंत्री मा.के सी पाडवी यांची भेट घेतली होती. मंत्रीमहोदयांनी शब्द दिला होता की, महिनाभरात फेलोशिपचा आदेश काढतो. यानंतर विद्यार्थ्यांनी पाठपुरावा चालू ठेवला तेव्हा सांगण्यात आलं की, आदिवासी विभागाची मंजुरी मिळून प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. 
      
हजारो कोटी रुपयांचा निधी राज्यातील सरकारी  नोकरदार (आस्थापना) यांच्या पगारावर खर्च केला जातोय ज्याचा आदिवासी समाजाला कोणताही परतावा नाही. मात्र, आदिवासी समाजाचे प्रश्न,अडी अडचणीवर संशोधन करून त्या प्रकाशात आणण्याचे कार्य विद्यार्थी करत आहेत. परंतु यांच्यावर खर्च करण्यासाठी आदिवासी विभागाकडे पैसा नाही ही शरमेची बाब आहे. अशी तीव्र नाराजी आंदोलनकर्त्यांनी "सह्याद्री चौफेर" ला बोलून दाखविली आहे. इतर समाजासाठी (मराठा-कुणबी,ओबीसी, दलित) काम करणाऱ्या संस्थांकडून प्रत्येकी 500 पिएचडी (ph.d) करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशी दिली जाते. मात्र, खरी गरज असूनही आदिवासींवर अन्याय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
    
मुळात आदिवासी विकास मंत्री हे सरकारच्या आणि काँग्रेस पक्षाच्या हातातील बाहुला आहेत,ते स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत हे स्पष्ट झाले आहे. असा संतापजनक आरोप करीत आदिवासी विकास विभागाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांची लवकरात लवकर दखल घ्यावी. अन्यथा यापुढे विद्यार्थी आंदोलनाचा जो कठोर निर्णय घेतील त्याला जबाबदार आदिवासी मंत्री महोदय व शासन जबाबदार राहील असे, आदिवासी संशोधन कृती समिती (नियोजित) च्या वतीने इशारा देण्यात आला आहे.

राज्यस्तरीय "आदर्श समाजरत्न" प्रेरणा पुरस्कार २०२२ मा.निर्भीड पत्रकार सुनिल भोसले यांना प्रदान


स्नेहा मडावी | सह्याद्री चौफेर

पुणे : संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य. यांच्या तर्फे या वर्षी पासुन २०२२ अर्थात पहले वर्षी सुरूवात करण्यात आली आहे.

हा पुरस्कार समाजातील काही वेगळ्याच तऱ्हेची वेडी माणस उपेक्षितांसाठी झटत असतात. हे वेड ध्येयाच, समाजसेवेच असत, आणि याचीच जाणीव ठेवून संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने हे पुरस्कार मा.सुनिल ज्ञानदेव भोसले यांना प्रदान केले आहे. 

सुनिल ज्ञानदेव भोसले संपादक, ते समाजात विविध उपक्रम राबवित असतात. अनेक आजच्या काळात अशी उल्लेखनीय माणसं मिळणे कठीण आहे. सुनिल ज्ञानदेव भोसले यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

विविध माध्यमातून पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

"विरांगणनेंच्या पाठीवर कौतुकाची थाप" रवि घुमे पुणे हून लिहीतात.

सह्याद्री चौफेर | न्यूज 

पुणे : म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली, ता. मुळशी येथे पासिंग आऊट परेड व चित्तथरारक सैनिकी प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डाॅ.सुहास दिवसे,आयुक्त, महानगर विकास प्राधिकरण, सी.ए.श्री.योगेश दीक्षित कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषणजी गोखले (निवृत्त) संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट श्री राजीवजी सहस्त्रबुद्धे,नियामक मंडळ सदस्या व शालासमिती अध्यक्षा डॉ.माधवी मेहेंदळे, सदस्य श्री.बाबासाहेब शिंदे, अॅड. श्री.सागर नेवसे,संस्थेचे सचिव श्री भरत व्हनकटे ,सहाय्यक सचिव श्री सुधीर गाडे,शालासमिती महामात्रा ,प्रा.चित्रा नगरकर,प्रा.सुधीर भोसले,प्रा.शैलेश आपटे, शाळेच्या प्राचार्या डॉ.सुलभा विधाते यांच्या उपस्थितीत झाला, शानदार संचलनानंतर इयत्ता १२ वी ची पासिंग आऊट परेड झाली,त्यानंतर प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला,यात लेझिम,योगासन, मर्दानी खेळ,रोप मल्लखांब, धनुर्विद्या,रायफल शुटिंग, हाॅर्स रायडिंग व कराटे यांचा समावेश होता, याप्रसंगी "टाकाऊतून टिकाऊ "या संकल्पनेनुसार विमान शिल्प ,एन.सी.सी कक्ष व आर्ट वाॅल चे उद्घघाटन ही प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते झाले.
 Sword Of Honour हा पुरस्कार कु.वृंदा पवार व उत्कृष्ट विद्यार्थिनी हा पुरस्कार साक्षी टेकवडे हिला मिळाला, उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादरीकरणाचा पुरस्कार रायफल शुटिंग ला मिळाला मार्गदर्शन आॅनररी कॅप्टन (निवृत्त) श्री.चंद्रकांत बनसोडे यांनी केले. राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनी कु.देवयानी चव्हाण,गीता धनवडे व गिरिजा जोगळेकर तसेच शाळेला मदत करणारे चित्रकार श्री.विक्रम कुलकर्णी, शिल्पकार श्री.रोहन चंद्रचूड, वेल्डर श्री.सुनिल लोहार तसेच शैक्षणिक योगदानाबद्दल शाळेचे उप मुख्याध्यापक श्री अनंत कुलकर्णी,सौ.मंजिरी पाटील, श्री.रविंद्र उराडे ,सौ.वैशाली शिंदे या शिक्षकांना ही सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.सुहास दिवसे यांनी पासिंग आऊट परेड व मुलींची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून भारावून गेल्याचे सांगितले तर अध्यक्षीय मनोगतात एअर मार्शल श्री.भूषणजी गोखले (निवृत्त) यांनी कोरोनाच्या आपत्तीनंतर प्रात्यक्षिकांचे सुंदर सादरीकरण केल्याबद्दल सर्व विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे ही कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.माधवी मेहेंदळे, सूत्रसंचालन श्री.अद्वैत जगधने यांनी केले तर उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकर्णी यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या डॉ.सुलभा विधाते यांच्या मार्गदर्शनानुसार क्रीडा विभाग प्रमुख व पर्यवेक्षक श्री.संदीप पवार व सैन्यप्रशिक्षण विभागप्रमुख हवालदार श्री.गजानन माळी व सर्व सैनिकी परिवार यांनी केले. कार्यक्रमानंतर प्रशालेत सैनिकी व शालेय शिक्षण घेत असलेल्या सर्व विरांगनांना दिवसभराकरीता पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
             
कोवीडमुळे निर्माण झालेला अनेक अडचणींची धग इथेही दिसून आली. पालक आणि पाल्यांच्या भेटीसंदर्भात शाळेला नियोजन करतांना सुचना वारंवार बदलाव्या लागल्यामुळे पालकात संभ्रम निर्माण झाला. व त्यामुळे काही पालकांमधे कमालीचा रोष दिसून आला.

मात्र "विरांगणनेंच्या पाठीवर कौतुकाची थाप" रवि घुमे पुणे हून लिहीतात.

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तक देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

पुणे :
ऊसतोड कामगारांच्या जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी शैक्षणिक साहित्य यावे असा प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्यांच्या शिक्षणासाठी शासन सर्व सहकार्य करेल , अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

सामाजिक न्याय भवन परिसरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या दुरदृष्यप्रणालीद्वारे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासोबत संत भगवान बाबा वसतिगृह योजनेच्या माध्यमातून २० वसतिगृहे भाड्याच्या जागेत सुरू करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगारांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी त्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. राज्याचा कुटुंबप्रमुख म्हणून महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल.

ऊसतोड कामगार ऊन, पाऊस थंडी याचा विचार न करता मेहनत करतात. त्यांचे कुटुंब गावोगावी फिरत खूप मेहनत करतात आणि आपल्या आयुष्यात गोडवा आणतात. त्यांच्या प्रश्नांना नेमकेपणाने सोडविण्याचे काम महामंडळाच्या माध्यमातून होणार आहे. ऊसतोड कामगारांच्या माताभगिनींच्या आरोग्याचेही अनेक प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठीदेखील विशेष लक्ष देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शासनाने गेल्या दोन दिवसात महत्वाच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करून कृतीतून राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे या क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन महामंडळाला त्यांचे नाव देण्यात आल्याचे सांगून स्व. मुंडे यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधांचाही श्री.ठाकरे यांनी उल्लेख केला. ऊसतोड कामगारांशी स्वतः संवाद साधणार असल्याचेही ते म्हणाले.

पुण्यात धारावी कट्टा चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे 

पुणे : लेखक दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या धारावी कट्टा या हिंदी , कन्नड आणि तेलुगू चित्रपटाचा मुहुर्त पुण्यात नुकताच संपन्न झाला. अल्ताफ शेख यांच्या 2018 मध्ये रिलीज झालेल्या वेडा बी एफ या चित्रपटाने चित्रपटगृहात चांगलाच गल्ला केला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित केले आहे. या चित्रपटानंतर बेतुका हा हिंदी चित्रपट, कम ऑन विष्णू हा कन्नड चित्रपट आणि आता धारावी कट्टा या चौथ्या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
        
दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या लेखणी वैविध्यपूर्ण आहे. त्यांनी लिहिलेल्या मराठीतल्या पहिल्या कव्वालीची 'वर्ल्ड बुक रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. आता धारावी कट्टा या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, याचे डिजिटल राईट्स प्राईम पिक्चर फाईव्ह या ओटिटी प्लॅटफॉर्मने घेतले असल्याचे माहिती अल्ताफ शेख यांनी दिली आहे. धारावी कट्टाचे लेखक आणि दिग्दर्शक स्वतः अल्ताफ शेख आहेत. या सिनेमाची कथा एका वस्तीमधील चार मुले आपली काहीही चूक नसताना गुन्हेगार म्हणून दोषी ठरवले जातात. या मुलांना गुन्ह्यात अडकवले गेले आहे, हे एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात येते आणि तो पोलिस अधिकारी या मुलांची यातून सुटका करतो, अशी या चित्रपटाची कथा आहे.  
       
या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळी ज्येष्ठ अभिनेते विजय नवले, ज्येष्ठ अभिनेत्री वृंदा बाळ, संगीता चवरे, अभिषेक चवरे, सहायक दिग्दर्शक हर्ष राजे, साहाय्यक दिग्दर्शक अरबाज शेख, आरती पाटील,  कुतुबुद्दीन गड्डेकर, नागेश स्वामी, आशिक राजपूत, नृत्य दिग्दर्शक शाहिद राजपूत, कास्टिंग दिग्दर्शक भैरव पवार, प्राजक्ता ठिगळे, शोभा देशपांडे,  मुस्कान शेख, सलमान शेख, सतीश कुंभार, प्रॉडक्शन मॅनेजर अमजद शेख आदी कलाकार उपस्थित होते.
        
धारावी कट्टा या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी मुंबई क्रिएशन एंटरटेनमेंट प्राईम पिक्चर 5 निर्माता मिथलेश अगरवाल, केतन जाधव आणि सय्यद शेख यांच्याकडे आहे.

वंचितचा आदर्श : सर्वसामान्य कुटुंबातील एका 24 वर्षीय तरुणीला दिली मोठी संधी

सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे 

पुणे : मुंबई महानरपालिकेला आशिया खंडात महत्वाचं मानलं जातं. कारण भौगलिकदृष्ट्या, आर्थिकृष्टया या शहराचे महत्व देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात प्रचंड महत्वाचे आहे.येत्या काही महिन्यातच निवडणुका लागणार आहेत. त्या दृषटीकोनातून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. नुकतेच वंचित बहुजन आघाडीने मुंबई प्रदेशची कार्यकारणीजाहीर केली. या कार्यकारणी मध्ये वंचितने स्नेहल सोहनी या 24 वर्षाच्या तरुणीला मुंबईच्या उपाध्यक्ष पदी बसवले आहे.ही ना महिला आघाडी ना युवती आघाडी सरळ मेन स्ट्रीम मध्ये. अर्थातच तिचं आजवरच सामाजिक,धार्मिक व राजकीय चळवळीत योगदान तेवढच महत्वाचं आहे. अशा मुंबई महानगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी एका तरुणीला संधी देणं हे खरतर देशाच्या राजकारातील महत्वाचं पाऊल मानावं लागेल. कारण आजवर देशात राजकारण गडगंज संपती,राजकीय घराणेशाही यातून संध्या दिल्या जाताना आपण पाहिलं आहे. विशेषतः महिलांच्या बाबतीत हे प्रामुख्याने दिसून येत. पण वंचित ने मात्र सर्वसामान्य कुटुंबातील एका तरुणीला संधी देऊन एक आदर्श निर्माण केला आहे.

स्नेहल फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील विचारशील सक्रिय कार्यकर्ता असून तिच्याकडे उत्कृष्ट वकृत्व आणि उत्तम संघटन कौशल्य आहे. येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात हे नाव नक्कीच आपल्याला वेगळ्या उंचीवर पाहायला मिळेल अशी आशा आहे.



प्रहार संघटना व पुणे महानगरपालिकेचा "एक हात मदतीचा" उपक्रम


सह्याद्री न्यूज : अतुल खोपटकर

पुणे : महानगरपालिका दिव्यांग कर्मचारी-अधिकारी व प्रहार दिव्यांग शासकीय-निमशासकीय कर्मचारी व अधिकारी संघटनेचे अध्यक्ष श्री. हरीष आल्हाट यांनी ३ डिसेंबर २०२१ रोजी जागतिक दिव्यांग (अपंग) दिनाचे औचीत्य साधून, आपली सामाजिक जाणीव ओळखून, सिंहगड रोड परिसरातील श्री साईबाबा शिर्डी अंध निवासी महिलाश्रम, विशेष मुलांच्या निवासी शाळेत भेट देऊन, तेथील परिस्थिती पाहून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

पुणे महानगरपालिका व प्रहार दिव्यांग शासकिय-निमशासकीय कर्मचारी व अधिकारी संघटना यांच्या वतीने या सामाजिक लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन कोरोना नियम पाळून, सुरक्षित अंतर ठेऊन, नियोजनबद्ध करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे नियाजन श्री. तुळशीदास येनगुल यांनी केले. अध्यक्ष हरीष आल्हाट यांचे हस्ते धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या वेळी दिव्यांग अधिनियम २०१६ विषयी माहिती अध्यक्ष श्री. हरीष आल्हाट यांनी योग्यप्रकारे समजावून सांगितली. या कायद्यातील कलम ३४ नुसार दिव्यांगासाठी ४ टक्के नोकरीत आरक्षण व कलम ९२ नुसार दंड कायदेशीर कार्यवाही करण्यात येत असल्याचे श्री. आल्हाट यांनी आवर्जून सांगितले. या कायद्याची जागृती होणे आवश्यक आहे, असे सर्व दिव्यांग सेवकांचे मत आहे.

यावेळी तुळशीदास येनगुल, पुष्कर मोरे, रोहिणी मडीकर, भाई ताम्हणे, अंध महिला आशा शेवकर, शालन शिंदे, गीता सावंत आश्रम संचालिका मनिषा लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेना प्रमुखांना काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने अभिवादन

सह्याद्री न्यूज | अतुल खोपटकर
 
पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्रात मराठी माणसांनाच हिण आणि उपरी वागणूक मिळत असताना, मराठी माणसांना महाराष्ट्रात मानाने जगण्यासाठी, ताठ मानेने उभं राहण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज उठवून शिवसेनेची स्थापना केली व खुप मोलाचे मार्गदर्शन करून मराठी माणसाला एकत्र ठेवले.
आज, दिनांक १७ नोव्हेंबरला हिंदुस्थानचे हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे ह्यांना स्मृतिदिन प्रित्यर्थ अभिवादन करण्यासाठी काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या वेळी मा. अरुणभाऊ आंब्रे (मा.शिवसेना विभागप्रमुख), शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सुनीताताई चव्हाण (मा. महिला शहर संघटक पि.चि.), विभाग संघटक प्रदीप बांद्रे यांची विशेष उपस्थिती या निमित्ताने होती.

या कार्यक्रमात सुनील तात्या पालकर, राजू रहाटे, बाळू ननावरे, अनिकेत आंब्रे, उपशहर प्रमुख सुधाकर नलावडे, राजेंद्र पालांडे, विलास निकम, भरत शिंदे, रामचंद्र उत्तेकर, कृष्णा निकम, पांडुरंग भांगे, जांभळे, किसन रेकटे, सहदेव कदम, सुंदर जोगदंड शिरीष घोडके, आदि उपस्थित होते.

बक्षिस वितरण समारंभ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व प्राधिकरण विचार मंच आयोजित "गौरी गणपती सजावट स्पर्धा"


सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे 
पुणे, (२१ सप्टें.) : निमित्त निगडी प्राधिकरण मधील नागरिकांनसाठी गौरी गणपती सजावट स्पर्धा ऑनलाईन
आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत निगडी प्राधिकरण मधील सर्व नागरिकांनी आपल्या घरातील गौरी गणपती देखाव्याचे छायाचित्र, आपले नाव फोन नंबर व पत्ता, व्हॅटसफ वर पाठवले. फोटो पाठवण्याची अंतिम तारीख १५/९/२०२१ पर्यंत होती.

या स्पर्धेस नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला, प्राधिकरण मधील 287 नागरिकांनी सहभाग घेतला. अनेक नागरिकांनी उल्लेखनीय सजावट केली होती त्यामध्ये पहिला, दुसरा, आणि तिसरा क्रमांक दिला व स्पर्धेत सहभागी प्रत्येकास स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देवुन गौरवण्यात आले.
स्पर्धेचे बक्षिस वितरण प्रत्येक स्पर्धकांच्या घरी जाऊन देण्यात आले आहे. बक्षिस वितरण गुरुवार दिनांक १६/९/२०२१ ते रविवार दिनांक १९/९/२०२१ पर्यंत रोज चार दिवस स्पर्धेत सहभागी प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जाऊन बक्षिस देवुन गौरवण्यात आले.
या स्पर्धेचे बक्षिस वितरण, उपशहराध्यक्ष मनसे पिंपरी-चिंचवड शहर बाळा दानवले, महिला प्राधिकरण विचार मंच अध्यक्षा सौ.स्वाती दानवले, सौ. माधुरी ताई पाटोळे, शितलताई कदम, शितलताई बैरागी, सिमाताई शेलार, उपविभाग अध्यक्ष ओंकार पाटोळे, वाॅड अध्यक्ष प्रसाद मराठे, शाखा अध्यक्ष शंतनु चौधरी, रुषिकेस कांबळे च्या हस्ते वितरण करण्यात आले. 
गौरी गणपती सजावट स्पर्धा मध्ये
१) पहिला क्रमांक, उमेशकुमार हरिकिशन अग्रवाल सजावट, (नारळ मध्ये अष्टविनायक गणपती)
 २) दुसरा क्रमांक, विशाल मटके सजावट, ( हिमालय मधील श्री शंकर महादेव मंदीर)
 ३) तिसरा क्रमांक, अभिषेक चंद्रकांत दाणी सजावट, ( ATM मशीन अध्यात्मिकता स्टेटिंग मशिन) यांना स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र गुलाब पुष्प देवुन गौरवण्यात आले व स्पर्धे मध्ये सहभागी घेतलेल्या सर्व स्पर्धकांना स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले.
या स्पर्धे बाबतीत अनेक महिलांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या, हि स्पर्धा घेतल्यावर आम्हाला गणपती सजावट करण्यासाठी उत्सुक होऊन सजावट केली व आपण बक्षिस देवुन पुढील वर्षी अजून जोरदार सजावट करण्यासाठी प्रोत्साहन दिले व आपली परंपरा, सन, उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यासाठी या स्पर्धे च्या माध्यमातून बळ मिळाले. अशी प्रतिक्रिया महिलांनी दिल्या व आभार मानले.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन 
मा. बाळा दानवले उपशहराध्यक्ष मनसे पिंपरी-चिंचवड शहर व सौ.स्वाती बाळा दानवले महिला प्राधिकरण विचार मंच निगडी 
यांनी केले होते.

यावेळी प्रभाग क्र.१२ मधील सफाई कामगारांना दिला आरतीचा मान

सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे 
पुणे, (१४ सप्टें.) : आज दि.१४/०९/२०२१ रोजी टॉवर लाइन येथील साईभक्त प्रतिष्ठान यांच्या तर्फे आरतीचा मान प्रभाग क्र.१२ मधील सफाई कामगार यांना देण्यात आला. यावेळी सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी प्रतिष्ठानाचे अध्यक्ष देवेंद्र निकम, उपाध्यक्ष राहुल जाधव, खजिंदार निखिल लावंद, साहिल पठान, गोरक्षनाथ अहिवाले इत्यादि उपस्थित होते.

इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब तर्फे श्री रमेश मुसुडगे यांना मानपत्र देऊन गौरव

सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे 
पुणे, (११ सप्टें.) : आज रोजी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब यांच्यातर्फे मानवंदना या कार्यक्रमात दिव्यांगांचे शेत्र २७ वर्ष अध्यापनाचे काम केल्याबद्दल मानपत्र देऊन श्री रमेश मुसुडगे विशेष शिक्षक यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.

११ सप्टेंबर २०२१ रोजी दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब यांच्यातर्फे मानवंदना या कार्यक्रमामध्ये शिक्षकांचे मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. श्री. रमेश मुसुडगे गेली सत्तावीस वर्ष दिव्यांग क्षेत्रामध्ये दिव्यांग मुलांना अध्यापनाचे त्याच बरोबर विविध कौशल्य व्यायाम खेळ यांच्यामार्फत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करीत आहे. याची दखल घेऊन दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब यांनी श्री.मुसूडगे यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले. रमेश मुसुडगे यांचे सर्वस्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अभिसर फाउंडेशन तर्फे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती साजरी

सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे 
पुणे, (०७ सप्टें.) : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीचा कार्यक्रम अभिसर फाउंडेशनच्या ऊर्जा दिव्यांग मुलांची शाळा व कार्यशाळा वाकड पुणे येथे आज साजरी करण्यात आली.

प्रतिमापूजन सौ राणी ताई विजय मुसुडगे उपसरपंच श्री क्षेत्र देहुगाव व श्री. मिलिंद संपतराव शेलार सर अध्यक्ष पुणे जिल्हा कला शिक्षक संघ पुणे खजिनदार रोटरी क्लब ऑफ तळेगाव यांच्या हस्ते झाले. यावेळी देहू गावच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. जाई नीलेश मोरे, अभिसर फाऊंडेशनचे संचालक सौ. कल्पना मोहिते, सौ. डांगे मॅडम व श्री. रमेश मुसुडगे, श्री. विजय मुसुडगे हे  उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी गोपी व ऋषिकेश यश यांनी मदत केली व कार्यक्रमाची कल्पना श्रीयुत अभिजीत तांबे यांनी सुचवली. 

डॉ प्रशांत खांडे यांना राज्यस्तरीय कुशल जननायक लोकगौरव पुरस्कार


सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे 
पुणे, (२८ ऑगस्ट) : मनुष्यबळ लोकसेवा विकास ट्रस्ट यांच्या तर्फे देण्यात येणारा "राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार" २०२१ हा या वर्षीचा पुरस्कार डॉ. खांडे यांना २५ आगस्ट रोजी प्रधान करण्यात आला.

डॉ. प्रशांत खांडे हे मागील २० पेक्षा अधिक वर्षांपासून सामाजिक कार्यात कार्य करीत आहेत, त्यांनी आपल्या सामाजिक जिवनाचा प्रवास इंजिनीरिंग काॅलेज मध्ये तिसऱ्या या वर्षाला असतांना राजीवजी दिक्षीत यांच्या सोबत स्वदेशी बचाओ आंदोलन पासून सुरू केला. तसे लहान वयापासून सामाजिक क्षेत्रात काम आणि नेतृत्व गुण असल्यामुळे टीम काॅप्टन, क्लास माॅनिटर ते काॅलेज मध्ये प्रसिडेन्ड ऑफ मॅनेजमेनट असोसिएशन कमिटी अश्या संधी मिळाल्या. त्या नंतर त्यांनी काॅलेज जीवनातच प्रोग्रेसिव युथ क्लब ची स्थापना करून सामाजिक कार्यात सहभाग वाढवला.

त्यांनी आतापर्यंत अण्णा आंदोलन,बेटी बचाव आंदोलन, विविध आंदोलन, विविध सामाजिक संस्थांना मदत कार्य, ग्रामीण भागात युवकांना मोफत करियर आणि व्यवसाय मार्गदर्शन तसेच सामाजिक उद्योजकांना आणि सामाजिक नोकरी मेळावा हे त्यांनी सर्व महाराष्ट्रात सुरू केले. याची नोंद विविध माध्यमांनी घेतली आहे. असे उद्धार कृष्णाजी जगदाळे अध्यक्ष मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांनी काढले.

डॉ. प्रशांत खांडे यांनी लिहिलेले ३ पुस्तके लिहिली पण हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित झालेली आहेत, त्या पुस्तकातुन त्यांनी नवे देशासाठी नेतृत्व कसे निर्माण होईल याचा विचार समोर मांडले आहेत. ते अखिल रयत सेवक क्रांतिकारी संघ आणि रयत सेवक एज्युकेशन अँड टिचभर असोसिएशन चे काम सांभाळत आहेत.

मागील २ वर्षापासुन ते स्पार्टबन सोशल वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया यांचे चेअरमन म्हणून काम बघत आहेत. त्याच्या नेतृत्त्वात फेडरेशन तर्फे राज्यस्तरीय सरपंच परिषद, राज्यस्तरीय पाणी परिषद, राज्यस्तरीय पालक परिषद बालक परिषद आणि राज्यस्तरीय बचत गट परिषद असे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या अश्या कुशल नेतृत्व गुणामुळे त्यांना कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन पध्दतीने २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी संस्थेतर्फे घेण्यात आला. त्यांना लिडर अवाॅर्ड झी टीव्ही असोसिएशन एम आरसी २४ लिडर अवार्ड २०१६, विवेकानंद युवा रत्न पुरस्कार २०१८, रंग अचीवर अवार्ड २०२०, नेलडा सन्मान २०१८, महापालक तर्फे सन्मान २०१९, पुणे कट्टा सन्मान, अशा बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांनी मिळवलेल्या पुरस्कार त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना समर्पित केला आहे.

बक्षिस वितरण समारंभ: महिला प्राधिकरण विचार मंच व महाराष्ट्र नवनिर्माण सेना द्वारा "ऑनलाईन स्पर्धा" आयोजित


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
पुणे, (२० ऑगस्ट) :  "नागपंचमी" निमित्त निगडी प्राधिकरण मधील महिलांसाठी ऑनलाईन मेहंदी स्पर्धा व नऊवारी साडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ गुरुवार दिनांक 19 ऑगस्ट 2021 रोजी, से. २४ श्री चिंतामणी गणेश मंदिर काचघर चौक प्राधिकरण येथे संपन्न झाले.

यावेळी बक्षिस वितरण समारंभास प्रमुख उपस्थिती होती, मा.नगरसेविका मा.अश्विनी ताई सचिन चिखले (मराठे), व स्वातंत्र्य विर सावरकर मंडळाच्या कार्याध्यक्षा मा. निवेदिता ताई कच्छवा,  मा.विदुरा ताई देठनकर सचिव, मा.सिमाताई शेलार, माधुरी ताई पाटोळे, शितलताई कदम, शितलताई बैरागी, उपविभाग अध्यक्ष ओंकार पाटोळे, वाॅड अध्यक्ष *प्रसाद मराठे शाखा अध्यक्ष शंतनु चौधरी, रुषिकेस कांबळे व अनेक महिला नागरिक उपस्थित होते.
मेहंदी स्पर्धा मध्ये १) पहिला क्रमांक, सौ. संध्या कुंभार. २) दुसरा क्रमांक, सौ.पिंकी मित्तल, ३) तिसरा क्रमांक कु.प्रज्ञा देठनकर, तसेच नऊवारी साडी स्पर्धा मध्ये १) पहिला क्रमांक सौ. पल्लवी चाफळकर, २) दुसरा क्रमांक सौ. आर्या उंबरजकर, ३) तिसरा क्रमांक सौ. गौरी घिगे यांना उपस्थितांच्या हस्ते स्मृती चिन्ह,प्रमाणपत्र गुलाब पुष्प देवुन गौरवण्यात आले व दोन्ही स्पर्धा मध्ये सहभागी घेतलेल्या सर्व महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी उपस्थितांचे स्वागत सौ.स्वाती बाळा दानवले यांनी केले व आभार, बाळा दानवले यांनी मानले. या कार्यक्रमा बाबतीत अनेक महिलांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या व आभार मानले.  

या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन मा.बाळा दानवले
उपशहराध्यक्ष मनसे पिंपरी-चिंचवड शहर व
सौ.स्वाती बाळा दानवले महिला प्राधिकरण विचार मंच निगडी यांनी केले होते.

राख्यांची मनमोहक सजावट वेधत आहे बघीणींचे लक्ष

सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे 
पुणे, (२० ऑगस्ट) : बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतिक असणारा तसेच विश्वासाचे अतुट नाते जपणारा 'रक्षाबंधन' सण येत्या २२ ऑगष्टला हाेवू घातला असुन, या निमित्ताने पुणेसह शिरूर तालुक्यातील गावातील दुकाने विविध आकर्षक व मनाेवेधक राख्यांनी तथा रेशीम धाग्यांनी सजली असल्याचे या शहरात दृष्टीक्षेपात पडले. गत वर्षी काेराेनाचे सावट, या ही वर्षी काेराेनाचे सावट असतांना व्यापाऱ्यांनी आवश्यक तेवढ्याच विविध रंगाच्या राख्यां विक्रीसाठी आणल्या आहे. दरम्यान, आतापासूनच बाहेर गावी राख्या पाठविण्यासाठी महिलांमंडळींनी व तरुणींनी राखी खरेदी करणे लगबग सुरु झाले असल्याचे एका छाेट्या विक्रेत्यांने आमच्या प्रतिनिधीस सांगितले. एका राखीचा दर ५ ते २०० रुपयांपर्यत असल्याचे ताे म्हणाला. 
या वर्षी सर्वाधिक राख्या मुंबई, मलाड मार्केट, अहमदाबाद, कानपुर वरुन आल्या आहे. तसेच बच्चे कंपनीसाठी खेळणी स्वरुपाच्या राख्या माेठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असुन, ऑगस्टपासून बाजारपेठत महिलां मंडळी ची गर्दी वाढली असल्याचे दिसून येते.

केळापूर तालुक्याच्या लेकीचा पुण्यात सन्मान


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
पुणे, (१७ ऑगस्ट) : सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहीलेल्या लोकशाही उत्सव समिती इंदापूर, इंदापूर पत्रकार राष्ट्र सेवा दल इंदापूर तालुका यांच्या वतीने कोरोना काळात स्वतः च्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेचे बहुमोल काम केल्याबद्दल पूजा शंकर गेडाम यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

पूजा गेडाम ह्या केळापूर तालुक्यातील गोंडवाकडी या छोटाश्या गावातील रहिवाशी आहे. गेल्या एक वर्षांपासून त्या पुण्यात राहतात. तिथे नर्सिंग म्हणून काम करत असतांना मागील वर्षांपासून देशात कोरोना महामारीचे संकट आल्याने त्यांनी नर्सिंग च्या माध्यमातून या कठीण काळात रुग्णांची सेवा करण्याची इच्छा बाळगून पुण्यातील कोविड सेंटर मध्ये रुग्ण सेवेचे काम करत आहे. या त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना लोकशाही उत्सव समिती इंदापूर, इंदापूर पत्रकार राष्ट्र सेवा दल इंदापूर तालुका च्या वतीने सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्ह्यातील विविध मान्यवर उपस्थित होते. आयोजक समिती चे श्री.अरुण होळकर अध्यक्ष राष्ट्र सेवा दल इंदापूर, श्री. महेश स्वामी समन्वयक (लोकशाही उत्सव समिती) इंदापूर, श्री. शैलेश काटे (नवराष्ट्र इंदापूर प्रतिनिधी), श्री. विजय शिंदे (एम एच १२ न्यूज) यांनी सन्मानपत्र देऊन पूजा यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अनेकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या प्रसंगी पूजा गेडाम यांनी सन्मान स्विकारून आनंद व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले व ७५ वा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या.

त्यामुळे केळापूर तालुक्यातील युवा लेकीला पुण्यात कोविड सन्मान मिळाल्याने गावात तसेच नातेसंबंधात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पूजा यांचा  सामाज माध्यमातून कौतुकासह शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. 

माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता; पुणे पोलिसांच्या हाती लागला महत्वाचा पुरावा

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
पुणे, (०२ ऑगस्ट) : एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले माजी वनमंत्री संजय राठोड हे आणखी गोत्यात येण्याची शक्यता आहे. संजय राठोड यांच्या विरोधात पुणे पोलिसांच्या हाती सबळ पुरावा आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

'इंडियन एक्स्प्रेस'नं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. मृत तरुणीच्या फोन कॉल्सच्या रेकॉर्डिंगवरून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या आधी ती ज्या व्यक्तीच्या संपर्कात होती, ज्याच्याशी बोलत होती, ती व्यक्ती संजय राठोड हीच असल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर येत आहे. त्या दोघांमध्ये बंजारा भाषेत संभाषण झालं होतं. त्याचा अनुवाद करून घेतला जात आहे,' असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

मूळची बीडची असलेल्या या तरुणीनं ६ फेब्रुवारी रोजी राहत्या इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव समोर आलं होतं. राठोड यांचे पूजाशी संबंध असल्याचे आरोप झाले होते. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळं राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राठोड यांच्यासोबत झालेल्या तरुणीच्या कथित संभाषणाचं रेकॉर्डिंग पुण्यातील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलं होतं. त्याचबरोबर, ज्या दिवशी संबंधित तरुणीनं आत्महत्या केली, त्याच्या २४ तास आधीचे यवतमाळ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या इमारतीतील सीसीटीव्ही फूटेजही फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या फूटेजमध्ये संबंधित तरुणी संजय राठोड यांचा जवळचा सहकारी अरुण राठोड यांच्यासोबत दिसली होती. तिनं जिथं आत्महत्या केली, त्या हेव्हन पार्क इमारतीत अरुण राठोड व विलास चव्हाण हे दोघे तिच्यासोबत राहिले होते.

मृत तरुणीचे फोन रेकॉर्डिंग व सीसीटीव्ही फूटेजच्या फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. मात्र, फोन रेकॉर्डिंगमधील आवाजाचे नमुने माजी मंत्र्याच्या व अन्य व्यक्तींच्या आवाजाशी जुळताहेत का, याची तपासणी होणे अद्याप बाकी आहे. सीसीटीव्ही फूटेज खऱ्या असल्याचं पोलीस सूत्रांकडून समजतं.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रकरणी अधिक काही बोलण्यास नकार दिला आहे. 'चौकशीची सगळी माहिती देता येणार नाही. तपासासाठी जे काही केलं जाणं आवश्यक आहे, ते केलं जात आहे,' एवढंच त्यांनी सांगितलं.

मनसेचे प्रभाग क्र.१ मध्ये रस्त्यावरील खड्यात वृक्षारोपण

सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे 
पुणे, (२९ जुलै) : प्रभाग क्र.१ मधील टाळगाव चिखली सोनवणे रस्ता हा खड्डेमय रस्ता म्हणून आता ओळखला जात आहे. ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
वारंवार सूचना देऊन ही प्रशासन अधिकारी लक्ष देत नसल्याचा मनसेचे प्रभाग अध्यक्ष क्रं.१२ चे देवेंद्र निकम यांनी आरोप केला आहे.

चिखली - सोनवणे वस्ती रस्ता
मागील वर्षी ऑक्टोबर २०२० रोजी निवेदन देण्यात आल्यानंतर २३ जानेवारी २०२१ ला रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले परंतु ('फ') क्षेत्रीय कार्यालय येथील - स्थापत्य विभागाच्या मार्फत अत्यंत खालच्या दर्जाचे काम करण्यात आले, 
यात मल - मूत्र व स्टॉर्म वॉटर लाईन विभाचा देखील तेवढाच मोठा कामचुकारिचा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. 

फेब्रुवारी २०२१ पासून ते जुलै २०२१ पर्यंत या रस्त्याला ड्रेनेज ची काम झाली, पाण्याची पाईप लाईन आली परंतु रस्त्याचे खोद काम झाल्यानंतर पुन्हा डांबरीकरण करण्यात आले नाही.
वारंवार सूचना देऊन देखील अधिकारी काम करत नाही म्हणून आज सोनवणे वस्ती रोड वर महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने वृक्षारोपण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. या वृक्षारोपणाला स्थानिक व वाटसरूनी प्रतिसाद देत या रस्त्यातील खड्डे बुजवून दर्जेदार काम करावे असे मत व्यक्त केले.  

वृक्षारोपण करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग १ टाळगाव चिखली येथील शाखाध्यक्ष प्रतिक बबन शिंदे, देवेंद्र निकम सहकारी, ऋषिकेश दादा पाटील, दत्ता धर्मे, नारायण पठारे, तुषार बनसोडे, मनोज दगडे, सुनी चव्हाण व अनेक महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते.