Showing posts with label चंद्रपूर. Show all posts
Showing posts with label चंद्रपूर. Show all posts

चंद्रपूर शहर काँग्रेस सोशल मीडिया प्रभारी पदी दीपक कटकोजवार यांची नियुक्ती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
           
चंद्रपूर : चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया प्रभारी पदी सक्रिय कार्यकर्ते दीपक कटकोजवार यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया च्या पूर्व विदर्भाचे प्रभारी सुमित लोणारे यांनी केली असून नियुक्तीचे पत्रही पाठविले आहे.
           
 या आपल्या नव्या नियुक्तीकरिता सहकार्य केल्याबद्दल दीपक कटकोजवार यांनी विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, जिल्ह्याच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रितेश तिवारी, जिल्हा काँग्रेस चे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, प्रदेश काँग्रेस महासचिव विनोद दत्तात्रेय, माजी प्रदेश सचिव सौ. सुनिताताई लोढीया, शहर जिल्हा काँग्रेस चे माजी अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर विधानसभा उमेदवार प्रवीण पडवेकर, माजी महापौर सौ.संगीताताई अमृतकर आदी मान्यवर नेत्यांचे आभार मानले आहे.

सर्वसामान्याच्या सदैव हितासाठी संघर्ष करणारा कार्यकर्ता अनिलभाऊ डोंगरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

चंद्रपूर : समाजाला दारू व्यसनापासून व्यसनमुक्त करण्यासाठी धडपडणारे अनिलभाऊ डोंगरे प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र तथा उपसरपंच यांचा 4 जून रोजी वाढदिवस या वाढदिवसानिमित्त त्यांनी जनहितार्थ कार्यक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा केला. 

अनिलभाऊ हे नेहमी जनतेच्या हिताचे उपक्रम राबवित असतात. नेत्र चिकित्सा शिबिर विद्यार्थ्यांना नोटबुक, शालेय बॅग, अभ्यासिका गरीब विधवा महिलांना साडी, वृद्ध लोकांना आधार काडी वाटप, शुद्ध आरो, पेजजल सेवा, अपंग निराधार यांना मदतीचा हात, इत्यादी कार्याच्या माध्यमातून सेवाभाव कार्य करणारे अनिलभाऊ डोंगरे यांनी आपला वाढदिवस खैरगाव येथील लोकनेते मा.आ.श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाने जनसेवा कार्यालयाचा शुभारंभ करून तसेच खैरगाव,विचोडा (बू) विचोडा (रई) येथील गरीब, विधवा महिला व वृद्ध लोकांना साडी,आधार काडी वाटप करण्यात आले. 

अनिलभाऊ डोंगरे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात शुभेच्छा देण्याकरिता समाजात समाजसेवा करणाऱ्या संघटना तसेच भाजप पदाधिकारी कार्यकर्ते प्रत्येक जाती धर्माच्या समूहाच्या पुरुष,महिलांनी केक कापून स्वागत सत्कार शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा सौ.माधुरी सागोरे सरपंच, मा.विलासजी झटे सोशल मीडिया फेम, भाजप नेते काशिनाथ सिंह, ब्रिजभूषण पाजारे, सौ. लक्ष्मी सागर भाजप नेत्या, सौ.शोभाताई पिदुरकर, विजय आगरे, मनोज ठेंगणे, रमेश बुच्चे, वसंतराव महाले, नलगे ताई इत्यादी उपस्थित होते. 

वाढदिवसाचे कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अर्जुन नगरकर, विनोद खडसे, संगीता हेलवडे, रजनीताई ढुमणे, जयेंद्र ताजने, मनोज जाधव, प्रतीक मेश्राम, बबन पिंपळकर, गौरव गोहने, पियुष भोगेकर, विष्णू वरभे,  प्रमोद जाधव, ऑटो संघटनाचे पदाधिकारी राजू कुबेर, आकाश भेडारे, इत्यादीने परिश्रम घेतले. या कार्यक्रमात चंद्रपूर व तालुक्यातून शेकडोच्या संख्येने भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व इतर समूहातील पुरुष महिला वर्ग उपस्थित होते.

स्वार्थ नसलेला गावच्या विकासासाठी नेहमी अग्रेसर असणारा सामाजिक मनाचा जनतेच्या हितासाठी संघर्ष करणारा श्री.अनिल डोंगरे हा सोन्यासारखा कार्यकर्ता
मा.श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी व्हिडिओ माध्यमातून संभाषण करून त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या...



विचोडा (बू) येथे विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

चंद्रपूर : अँड्रॉइड युगातही विद्यार्थ्यांना ऑफलाईन अभ्यासाची सवय, गोडी कायम राहण्यासाठी अभ्यासिका ची गरज होती. विद्यार्थ्यांची ही गोष्ट लक्षात घेऊन, विचोडा (बु) येथील विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करू शकतील, असा सुसज्ज अभ्यासिका तयार करण्यात आली असून सामाजिक कार्यकर्ता अनिल डोंगरे यांच्या पुढाकारातून आज 1 मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त चांदसुर्ला, विचोडा (रई) येथील पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, टिफिन बॉक्स इत्यादी भेटवस्तू दिल्या आहेत.
या अभ्यासिकेचे उद्घाटन चंद्रपूर उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उपजिल्हाधिकारी व्यवहारे यांनी अभ्यासिकेचे महत्त्व विशद करून ही एक संधी आहे, याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी अनिल डोंगरे हे चंद्रपूर जिल्ह्यात व्यसनमुक्तीचे उत्कृष्ट कार्य करत असून आता त्यासोबत विद्यार्थी शिक्षणात मागे पडला नाही पाहिजे, त्यांना आपली कुठेतरी गरज आहे. यासाठी अभ्यासिका सारखे समाज उपयोगी कार्यासोबत विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून समोर येत आहे, असेही ते म्हणाले. 

याप्रसंगी विद्यार्थी, पालक तसेच गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

मायलेकी बेपत्ता, पोलिसात तक्रार...


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वरोरा : बेपत्ता होण्याची अनेक घटना सध्या समोर येत आहेत. अशातच केळी येथील एक मायलेकी बेपत्ता झाल्याची बातमी आहे. या घटनेत प्रियंका संदीप किनाके(30) आणि अडीच वर्षांची मुलगी रियांशी 27 एप्रिलपासून बेपत्ता आहेत. संतोष बापुना गेडाम रा. वडकी ता. राळेगाव, यांनी वरोरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

प्रियंका आणि रियांशी ही 27 एप्रिल पासून सासरी किरकोळ वाद निर्माण झाल्यामुळे माहेरी जाते असं सांगून सकाळी दहा वाजता गेल्या आहेत.मात्र, त्या वडिलांकडे पोहचली नसल्याने सर्वत्र विचारपूस करून तिची बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. या मायलेकी कुठे आढळून आल्यास 7057839682 या मोबाईल क्रमांकावर कळवावे व पोलिसांनाही माहिती द्यावी असे, आवाहन तक्रारकर्त्यांसह पोलिसांनी केले.

प्रिंकाचे वर्णन रंग सावळा, उंची 5 फुट, केस लांब, अंगात सलवार सुट, चेहयावर थोडे डाग व रियांशी हिचा सावळा रंग उंची 2 फूट,केस बारीक, अंगात डंगरी घातलेली. 

आदिवासी बेरोजगार तरुणांना स्थानिक कंपन्यामधे रोजगार द्या - ए टी एस


सह्याद्री चौफेर| ऑनलाईन

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असून या जिल्ह्यात नावाजलेल्या अनेक खाजगी कंपन्या आहेत.त्या कंपन्यामध्ये परप्रांतीय व राजकीय नेते ह्यांच्याशी सलोखा असणाऱ्या किवा स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधी यांच्याशी संबध असणारे ह्यांचीच शिफारिस असेल तर त्या कंपनी मध्ये खाजगी रोजगार दिला जातो. अशी खंत जिल्ह्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

चंद्रपूर गडचिरोली आदिवासी बहुल जिल्हे असून अनेक आदिवासी बेरीजगार युवक आहेत. त्यांना जिल्ह्यातील विविध कंपन्यामध्ये रोजगार उपलब्ध करून द्यावा अश्या मागणी चे निवेदन नामदार डॉ.प्रा.अशोकराव उईके आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर महा.राज्य यांना आज संतोष कुळमेथे विदर्भ अध्यक्ष, जितेश कुळमेथे विदर्भ प्रवक्ता,साईनाथ कोडापे विदर्भ सचिव,आदिवासी टायगर सेना च्या वतीने करण्यात आली.

मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी विक्की बांगर यांची नियुक्ती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी विक्की बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार यांनी शुक्रवारी २१ मार्च ला एका नियुक्ती पत्राद्वारे केली.नियुक्तीपत्र देतेवेळी महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्य परशुराम पोटे, अमोल कुमरे, वेणुदास हुसुकले, निशांत मेश्राम, सोनु भाऊ पाटील आदी उपस्थित होते.
 
सामान्य माणसावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरोधात मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे विक्की बांगर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी सौ माधुरी झबाडे तर, शहर महिला अध्यक्षपदी सौ सविता आत्राम यांची नियुक्ती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी सौ माधुरी झबाडे तर, शहर महिला अध्यक्षपदी सौ सविता आत्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार यांनी केली आहे. नियुक्तीपत्र देतेवेळी महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्य परशुराम पोटे, ज्ञानेश्वर बोनगीनवार, निशांत मेश्राम, अमोल कुमरे, वेणुदास हुसुकले, सुनिल झबाडे, उपस्थित होते.
 
सामान्य माणसावर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा विरोधात मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे माधुरी झाबाडे व सविता आत्राम यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

कृषी सहाय्यक अडकला ACB च्या जाळ्यात: फवारणी पंपसाठी मागितले 1 हजार रुपये!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वरोरा : लाच घेणे व देणे हा कायद्याने गुन्हा आहे.
परंतु महिन्याकाठी शासनाचा गलेलठ्ठ पगार उचलणा-या एका कृषी सहाय्यकला लाचेचा मोह टाळता आला नाही.अश्यातच आज तो एक हजार रुपयांची लाच घेताना अलगद चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.

या घटनेमुळे भद्रावती कृषी विभागाच्या कार्यालयासह अन्य शासकीय कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. लाचेच्या जाळ्यात अडकणा-या या लाचखोराचे नांव सरजीव अजाबराव बोरकर असून त्याचे वय अवघे 36 वर्षाचे आहे. सदरहु लाचखोराने माजरी काॅलरी येथील एका शेतकऱ्याकडून फवारणी पंप देण्यासाठी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे व चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, वैभव गाडगे, प्रदीप ताडाम, राकेश जांभूळकर, पुष्पा काचोळे, सतिश शिडाम यांनी ही यशस्वी कारवाई केली .
लाचखोराने ही लाच विनायक लेआऊट नंदनवन चौक वरोरा येथे स्विकारली.


राज्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले व्रतस्थ नेतृत्व म्हणजे लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार!


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर येथे लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती सोहळा संपन्न झाला.

राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन व्रतस्थ जीवन जगलेले द्रष्टे नेते म्हणजे कर्मवीर दादासाहेब कन्नमवार, त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरोग्य केंद्र उभारण्याची संकल्पना मांडली तसेच चंद्रपूर आणि विदर्भात शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी काम करत आपल्या जीवनामध्ये अनेक मानके तयार केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यासोबतची आपली नाळ अधोरेखित करत या जिल्ह्याच्या विकासातील सर्व अडचणी दूर करणार असे आश्वस्त केले. यासोबतच लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या कार्याचा गौरव करणारा ग्रंथ राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या माध्यमातून निर्माण करणार असेही श्री. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

याप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे यांच्यासह माजी मंत्री शोभाताई फडणवीस व इतर मान्यवर उपस्थित होते.

धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीकरिता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

चंद्रपूर : खरीप पणन हंगाम २०२४-२५ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.*

पोर्टलवरील नोंदणीसाठी दि. १५ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, नोंदणी केंद्रावरील गर्दीमुळे नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. शेतकरी धान खरेदी नोंदणीपासून वंचित राहू नये. यासाठी मुदतवाढ देण्याची शेतकरी तसेच अभिकर्ता संस्थानी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती. आमदार सुधीर मुनगंटीवार मागणीची दखल घेत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिवांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत शेतकरी नोंदणीकरीता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली. तात्काळ दखल घेत काही तासातच शासनाचे अवर सचिवांनी नोंदणीकरीता दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे मागणीची तात्काळ दखल घेऊन शासनस्तरावर पाठपुरावा करत काही तासातच मुदतवाढ मिळाल्याबद्दल शेतकरी बांधवांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.

बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्या बेपत्ता महिलेची गळा दाबून हत्या


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

चंद्रपूर : मागील १५ दिवसांपासून चिमूर येथील बेपत्ता व्यापारी महिलेचा मृतदेह मंगळवारी नागपूर येथील बेलतरोडी परिसरातील निर्जनस्थळी आढळला. व्यापारी महिलेची हत्या दुचाकी चोरीप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलीसच निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली. नरेश डाहुले (४०) रा. तुकूम, चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

चिमूर येथील देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका अरुणा अभय काकडे (३७) या २६ नोव्हेंबरला नागपूर येथील इतवारी मार्केटमध्ये दुकानातील साहित्य खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्या उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र विचारपूस केली. मात्र, त्यांचा काही शोध लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी चिमूर पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीत इतवारी येथून हरविल्याची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून संथगतीने तपास सुरू असल्याने जिल्हा व्यापारी मंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन या प्रकरणाकडे लक्ष वेधले. पोलिसांनी प्रकरणाला गांभीर्याने घेतले.

दरम्यान, ६ डिसेंबरला दुचाकी चोरीप्रकरणात आरोपी नरेश डाहुले याला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. शनिवारी न्यायालयात हजर करून पोलिसांनी पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपी नरेश याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

याचदरम्यान, आरोपींची कॉल रेकॉर्डची तपासणी करीत असताना सदर बेपत्ता महिलेसोबत बोलणे झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांचा संशय बळावल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्याकडे सोपविला. यावेळी पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविल्यानंतर बेपत्ता असलेल्या महिलेचा खून केल्याची आरोपीने कबुली दिली. २६ नोव्हेंबरला अरुणा काकडे हिची नागपुरात भेट झाली. अरुणा वर्ग मैत्रीण असल्याने आमची चांगली ओळख होती. त्यादिवशी आम्ही दिवसभर सोबत होतो. त्यानंतर रेशीमबाग मैदानावर आमच्या दोघांत वाद झाला. यावेळी रागाच्या भरात अरुणाचा गळा आवळून खून केला व नंतर आपल्या चारचाकी वाहनात अरुणाचा मृतदेह बेलतरोडी येथील निर्जनस्थळी असलेल्या घरातील शौचालयाच्या टाक्यात टाकून दिल्याचे सांगितले.

आरोपीने सांगितलेल्या घटनेनुसार चंद्रपूर पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला. बेलतरोडी येथील परिसरात मृतदेह आढळताच पोलिसांनी कुटुंबीयांना बोलावून मृतदेहाची ओळख पटविली. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. याप्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी खुनाच्या प्रकरणात आरोपी नरेश डाहुले याला अटक केली. पुढील तपास ठाणेदार प्रभावती एकुरके करीत आहे.

भद्रावतीत आदिवासिंचा भव्य आक्रोश निषेध मोर्चा

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

चंद्रपूर : सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारच्या शोषणापासून त्यांचे संरक्षण करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी किंवा दायित्व आहे. असा कायदा सांगतो. मात्र, समाजातील काही समाजकंटक कायदा हातात घेऊन राज्यातील आदिवासी मुली, महिलांवर अन्याय अत्याचार करतच आहे आणि सरकार हे गप्प बसून पाहत आहे. म्हणून या शासनाचा निषेध, मोर्चा आज (ता. १४) भद्रावती येथे आदिवासीच्या विविध संघटनेच्या वतीने काढण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील सात वर्षाच्या आदिवासी मुलीवर एका 37 वर्षीय नराधमाने विनयभंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असल्यामुळे समाजात या कृत्याबाबत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा दावा करणाऱ्या राज्यातील शासनाची निष्क्रियतेची यातून स्पष्ट होत असल्याचे मोर्चा दरम्यान चित्र पहायला मिळत होते.
महाराष्ट्रात बदलापूर, पुणे, मुंबई, कोलकत्ता, कोरपना, वरोरा चंद्रपूर, याशिवाय अन्य राज्यातही महिलावर अन्याय अत्याचार होत आहे. अशा प्रकारचा निंदनीय व घृणास्पद कृत्य भद्रावती येथे घडले असून त्या घटनेचा तीव्र निषेध सर्व समाजाच्या वतीने करण्यात आला. दिवसेंदिवस आदिवासी समाजावर होणारे अन्याय व अत्याचारात सारखी वाढ होत आहे. या घटनेकडे शासन व कोणाचेही लक्ष नाही, जाणीवपूर्वक समाजाकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. असा आरोपही उपस्थिताकडून केला जात होता. भद्रावती येथील घडलेल्या या घृणास्पद कृत्याच्या विरोधात आज मंगळवारी सकाळी ११ वा. भद्रावती येथील नागमंदिर ते बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वार ते तहसील कार्यालय पर्यंत हजारोच्या उपस्थितीत अक्रोश मोर्चा काढण्यात आला.
यावेळी भद्रावती येथील विनयभंग प्रकरणातील आरोपी नराधमावर कठोर शिक्ष देण्यात यावी,पीडित मुलीचा शिक्षण व संगोपणाची जबाबदारी शासनाने स्वीकारावी, महिलावरील अन्याय अत्याचारविरोधात कायद्यात सुधारणा करून अधिक कठोर कायदे बनवावे,पीडित मुलीच्या कुटुंबियांना शासनाने दहा लाखाची आर्थिक मदत त्वरित करावी,यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी शासनाने योग्य ती अंमलबजावणी करावी,व आदिवासी समाजावर होणाऱ्या अत्याचार व अन्याय विरोधात कठोर कायदे तयार करावे. अशा प्रमुख मागण्या घेऊन आक्रोश मोर्चा व मातृशक्ती सन्मान रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील समाज बांधवानी हजेरी लावून या घृणास्पद कृत्याचा तीव्र निषेध केला. या मोर्चा ला मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई किनाके, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कोवे महाराज, डॉ. प्रवीण येरमे व इतर उपस्थित मान्यवरांनी केले. व सरकारचा खरपूस समाचार घेतला.
यात प्रामुख्याने गोंदाला समूह, गोंडवाना टायगर सेना,जागतिक गोंड सगा मांदी,ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन,सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था, आदिवासी सगा समाज संघटना,आदिवासी विकास परिषद तसेच भद्रावती-वरोरा शहरातील विविध सामाजिक संघटना, समाजबांधव, महिलांनी मोठया संख्येने सहभाग दर्शवीला होता. या आक्रोश मोर्चा ने शहरवासियांचे काहीकाळ लक्ष वेधले होते. 

काँग्रेस चे इच्छूक उमेदवार असलेल्या डॉ. झाडे यांचा टोला


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून फार पूर्वीपासून तयारी सुरू असून आपण मैदान सोडलेले नाही. पक्षाचे आदेश आणि निर्णय सकारात्मक मिळतात जोमाने मैदान गाजवू अशी भूमिका काँग्रेसचे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे इच्छुक उमेदवार डॉक्टर विश्वास झाडे यांनी आज येथे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून स्पष्ट केली आहे. 

इच्छुक उमेदवार म्हणून पक्षाकडे अर्ज केला मात्र प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर न राहिल्याच्या अफवा काही विरोधकांकडून जाणीवपूर्वक पसरविल्या जात आहेत यासाठी माध्यमांचाही चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे यावरून प्रतिस्पर्धी आपल्या उमेदवारीला घाबरले असल्याचा टोलाही डॉ. झाडे यांनी यात लगावला आहे.
 
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात गेल्या पाच वर्षापासून आपले सामाजिक कार्य सातत्याने सुरू आहे त्यामुळे इच्छुक क्षेत्रातून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही उलट पक्षी या क्षेत्रात मागील निवडणुकीत मैदान गाजवल्या चा इतिहास बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेला माहीत असल्याने जनतेच्या चर्चेतही आपले नाव अग्रक्रमावर असल्याचा दावा डॉक्टर झाडे यांनी केला आहे. 

माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात डॉक्टर झाडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून पक्षाला अर्ज करण्यासोबतच 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये सक्रिय सहभाग घेतला, यावेळी मुलाखतीत बाजू मांडली, त्यामुळे आपण सकारात्मक आहोत. पक्ष आपल्यासोबत इतर समाजाला सुद्धा योग्य वाव तसेच न्याय देईल अशी अपेक्षाही डॉ. झाडे यांनी व्यक्त केली आहे.

चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नावात बदल...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : राज्याचे वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (महिला) राणी दुर्गावती यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आहे. 

राणी दुर्गावतीच्या 500 व्या जन्मशताब्दी वर्षात हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. ना. श्री. मुनगंटीवार यांनी यासंदर्भात काही दिवसांपूर्वी कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्रालयाला यासंदर्भातील प्रस्ताव पाठवला होता, हे विशेष.

आदिवासींच्या समृद्ध इतिहासात आपल्या अफाट शौर्यासाठी ओळखली जाणारी राणी दुर्गावती हिचे नाव महिलांसाठी समर्पित एका संस्थेला देणे, ही अत्यंत आनंदाची बाब मानली जात आहे. त्यासाठी ना. श्री. मुनगंटीवार यांचे आदिवासी समाजाकडून आभार मानण्यात येत आहेत. ना. श्री. मुनगंटीवार यांनी 18 सप्टेंबर 2024 ला संबंधित विभागाला पत्र दिले होते.

चंद्रपूर येथील महिलांसाठी असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राणी दुर्गावती यांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांनी पाठवला होता. त्यानुसार सोमवार, दि. 30 सप्टेंबरला झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करून निर्णय जाहीर करण्यात आला. तसे कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्रालयाकडून ना. श्री. मुनगंटीवार यांना कळविण्यात आले आहे.

विरांगणा राणी दुर्गावतीने आपल्या राजवटीत उत्तम प्रशासक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून लौकीक प्राप्त केला. सशक्तपणे आदिवासी साम्राज्य सांभाळत शत्रूपासून सुरक्षित ठेवले. त्यामुळे महिलांसाठी समर्पित संस्थेला तिचे नाव देणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, अशी भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. 

विरांगणा राणी दुर्गावती यांचा 500 वी जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (महिला) राणी दुर्गावती हिचे नाव देणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांच्यामुळे हे शक्य होऊ शकले, याबद्दल आदिवासी बांधवांनी त्यांचे विशेषत्वाने आभार मानले आहेत.

आदिवासीच्या आरक्षणात धनगर जातीचा समावेश करू नये-

सह्याद्री चौफेर । कुमार अमोल 

जिवती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातुन भारतीय राज्यघटना लिहून त्यात भारतीय समाजातील जातीय असमानता दुर करून समताधिष्टीत बलशाली भारत निर्माण करण्यासाठी आरक्षणाची तरतूद केली. भारतीय संविधानात एस. टी. आरक्षण लागू केले आहे. मात्र अजूनही या समाजाचे मागासलेपण संपलेले नसल्याने एस.टी. समुहाला घटनेनुसार प्राप्त आरक्षणाला धक्का लावून केंद्र किंवा राज्य सरकारने धनगरासह अन्य कोणत्याही जातीला या प्रवर्गातून आरक्षण दिल्यास आदिवासी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. मा. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच धनगर जातीला, आदिवासी/अनुसूचीत जमातीचे यादित समाविष्ठ करता येत नाही, असे स्पष्ट केलेले आहे. तरीपण धनगर जातीचा समुह, आदिवासींच्या यादित धनगर जातीला समाविष्ठ करण्यासाठी राजकिय दबाव आणत आहे. 

यापूर्वी TISS संस्थेकडून अभ्यासगट तयार करून धनगर व आदिवासी यांचा तुलनात्मक अभ्यास करून अहवाल तयार केलेला आहे. सदर अहवाल आजही प्रकाशित न करता नव्याने धनगर जातीचा समावेश आदिवासीचे प्रवर्गात करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आदिवासी समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. घटनात्मक कायद्याने सरकारने धनगर समाजाला आरक्षण निश्चितपणे द्यावे मात्र अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) यादीत समावेश करण्यात येऊ नये. धनगर समाजाच्या नेत्यांनी पंढरपूर येथे आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश करण्यासाठी बेमुदत उपोषण केले असताना त्यावर मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करून 'धनगर व धनगड' हे एकच असल्याचे म्हटले आहे. 

यावर चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात आदिवासी संघटनांनी विरोध दर्शविला व गजानन जुमनाके यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना आदिवासीच्या आरक्षणात धनगर जातीचा समावेश करू नये अशी मागणी निवेदनातून केली. यावेळी प्रा. लक्ष्मण मंगाम, माजी सभापती भीमराव मेश्राम, सोनेराब पेंदोर, मारोती कुमरे, शित्रू गेडाम, गोचू पेंदोर, सुखलाल कोटनाके, आनंदराव कोटनाके, मारोती सिडाम आदींची उपस्थिती होती. उच्च न्यायालय मुंबई, तसेच सर्वोच्च न्यायालयात धनगड (जमात) व धनगर (जात) हे या भिन्न जमाती व जाती असून धनगर या जातीला आदिवासींमध्ये समाविष्ट करता येणार नाही, असा स्पष्ट निकाल दिला. तरीही निवडणुकांवर डोळा ठेवून, मते मिळवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. असे झाल्यास आदिवासी समाजावर अन्याय होईल, असे या निवेदनात म्हटले आहे.

भोगवटा वर्ग २ ते १ ची सर्व प्रलंबित प्रकरणे येत्या २ महिण्यात निकाली काढा : हंसराज अहीर


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वरोरा : वरोरा व भद्रावती तालुक्यातील भोगवटा वर्ग २ ची वर्ग १ मध्ये वर्गीकरण* करण्यासाठीची प्रलंबित व नव्याने दाखल केलेली प्रकरणे येत्या आठवडाभरात निकाली काढावी असे निर्देश राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे विद्यमान अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिले.

वरोरा, भद्रावती या दोन्ही तालुक्यामध्ये भो. वर्ग २ मधून भो. वर्ग १ मध्ये परिवर्तीत करण्यासाठी मागासवर्गीय व अन्य प्रवर्गातील शेकडो शेतकरी बांधवांची प्रकरणे प्रलंबित असल्याच्या तकारी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे दाखल झाल्याने ही प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याकरिता मागासवर्ग आयोगाने दि.०४ सप्टेंबर २०२४ रोजी वरोरा येथील कटारिया सभागृहात महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत वाटप, सिलींग,भूदान, कुळ, औद्योगीक, न.प. क्षेत्र व अन्य जमिनीचे भोगवटा २ ते १ करण्याच्या मागणी अर्जावर ही सुनावणी घेतली. 

मागासवर्ग आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या जनसुनावणीला आयोगाचे सल्लागार व अन्य अधिकारी तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा, उपजिल्हाधिकारी कुंभार, वरोराचे उपविभागीय अधिकारी जेनीथ चंद्रा, वरोराचे तहसिलदार योगेश कौटकर व महसुल विभागाचे विविध खातेप्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी इंजि. रमेश राजुरकर, करण देवतळे, बाबा भागडे, डॉ. भगवान गायकवाड, तुळशीराम श्रीरामे, विजय वानखेडे, ओम मांडवकर, राजु घरोटे, अंकुश आगलावे, नरेंन्द्र जिवतोडे, राजु गायकवाड, धनंजय पिंपळशेंडे, राजु गायकवाड, रोहिणीताई देवतळे, अॅड. सुनिल नामोजवार, प्रशांत डाखरे, अर्चना जिवतोडे, वसंता बावणे, पवन एकरे व दोन्ही तालुक्यातील शेतकरी बांधव बहुसंख्येनी उपस्थित होते.
 
या जनसुनावणीमध्ये मार्गदर्शन करतांना हंसराज अहीर यांनी भोगवटा वर्ग १ मध्ये जमिनीचे रूपांतर करण्याकरिता मालमत्तेच्या ५० टक्के रक्कमेचा भरणा करण्याचा नियम असल्याने ही रक्कम कमी व्हावी याकरिता आयोगाच्या माध्यमातून राज्यशासनाकडे शिफारस केली जाईल असे, उपस्थित शेतकरी बांधवांना आश्वासन दिले. दोन्ही तालुक्यातील सर्व प्रकरणे शेतकऱ्यांच्या हिताशी निगडीत असल्याने ती व्यवस्थित हाताळुन प्रशासनाने या प्रकरणात तातडीने निर्णय घेत आयोगास अहवाल सादर करावा अशा सुचना जनसुनावणीस उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी भोगवटा वर्ग २ ते १ संबंधात सविस्तर माहिती दिली.

वंचित बहुजन महिला आघाडीचे मनपा प्रशासनाला निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या अद्यापही सुटली नसुन नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषत: महिला वर्गात संताप व्यक्त केल्या जात आहे. स्थानिक वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने याबाबत निवेदन चंद्रपूर मनपा प्रशासनाला देण्यात आले आहे. 

एका आठवड्यात पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन महिला आघाडीच्या महानगर अध्यक्ष तनुजा रायपुरे व अन्य पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून दिला आहे. या शिवाय सुगत नगर नगिनाबाग येथील नाल्यांची अवस्था बिकट झाली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. या नाल्या रोगराईला आमंत्रण देत असल्याचे वंचित बहुजन महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी ही बाब प्रामुख्याने नमुद केली आहे. 

यावेळी मनपाला निवेदन देतांना तनुजा रायपुरे, मोनाली पाटील, चंद्रप्रभा रामटेके, सुलभा चांदेकर या शिवाय वंचित बहुजन महिला आघाडीच्या विजया भगत, कल्पना शेंडे, रेखा उमरे, चंदा सहारे, सुनंदा भगत, नंदा बावणे, सुनंदा फुलमाळी, पुष्पा ठमके, प्रियंका चहांदे, सविता जिवणे, शरयू रोडके, आशा भसारकर, पुष्पा गाणार, रेखा उमरे, तृप्ती उराडे, शोभा नरवाडे, अश्विनी नरवाडे, आशा उराडे, ज्योती उंदीरवाडे, शोभा वाघमारे, इंदुताई डोंगरे आदिं पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.



काँग्रेस च्या तालुका महिला माजी अध्यक्ष वर्षा ठाकरेंचा काँग्रेस ला रामराम

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

भद्रावती : स्वर्गीय खासदार यांच्या वरोरा-भद्रावती मतदार संघात काँग्रेसला तडा गेल्याचे वृत्त समोर आले आहे.आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर तालुक्यातील कुचना येथील तालुका महिला काँग्रेस च्या माजी अध्यक्षा वर्षा ठाकरे ह्यांनी आज 18 ऑगस्ट रोजी नागपूर येथील रेडीसन ब्लू हॉटेल येथे शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत मशाल हाती घेतली. 

याप्रसंगी शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख रविद्र शिंदे, चंद्रपुर जिल्हा महीला आघाडी संपर्क प्रमुख  सुषमा साबळे, जेष्ठ शिवसैनिक जयदीप पेंडसे, पुर्व विदर्भ युवासेना सचिव तथा सिनेट सदस्य निलेश बेलखेडे आणि भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल हे प्रामुख्याने उपस्थित होते.
      
वर्षा राजेश ठाकरे ह्यांनी त्यांच्या तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दित कुचना ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच व सदस्य पद भूषविले. त्या कुचना ग्राम.पं. च्या विद्यमान सदस्या तसेच भद्रावती नागरी पतसंस्थेच्या संचालिका आहे. त्याच सोबत त्यांचा विविध संघटनांत सक्रिय सहभाग सुद्धा आहे. 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंद्रपुर जिल्हा महीला आघाडी व वरोरा-भद्रावती विधानसभा महीला आघाडीच्या वतीने त्यांचे आदरपूर्वक स्वागत करण्यात आले.मात्र या प्रवेशाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ला आगामी काळात मोठा धक्का बसणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आता रंगत आहे. 
    

पडोली फाटा राज्य महामार्गावरील खड्डे बुजावण्यास सुरुवात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : पडोली फाटा चौक येथे नेहमीच जड वाहतुकीची वर्दळ असतात. अशातच या राज्य महामार्गावर खड्डे पडल्याने काल एका मुलीची गाडी ट्रक खाली येऊन तिचा पाय गंभीरित्या जखमी झाला. या अपघाताचे कारण श्री.अनिल डोंगरे प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र यांना कळताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी मोबाईल द्वारे संपर्क साधून तत्काळ या परिसरातील राज्य महामार्गावरचे खड्डे बुजविण्यात यावे असे सांगण्यात आले.

आज बुधवार (ता.१६) ला लगेच खड्डे बुजवण्याकरिता आलेल्या टीमला रस्त्यावरील ठिकठिकाणीचे खड्डे दाखवून त्वरित खड्डे बुजवण्यास सुरुवात करण्यात आली तसेच यानंतर या रोडवर कुठल्याही प्रकारे खड्डे दिसता नये, असे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून ताकीद देण्यात आली.

या महामार्गांवरील "रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते" असे बोलले जात असताना श्री. डोंगरे यांनी कामाप्रती दाखवलेल्या तप्तरतेचे प्रवाशा सह स्थानिक नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. 

पोलीस प्रशासनाच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : जिल्ह्यातील आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत शासन प्रशासन किती गंभीर आहे हे एका पिडीत तरुणीच्या तक्रारी वरून समोर आले आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल असूनही त्यांना अजून पर्यंत पोलिसांनी अटक केली नाही. पोलीस प्रशासनाच्या विरोधात आदिवासी टायगर सेना च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 

आदिवासी टायगर सेना चंद्रपूर च्या वतीने आदिवासी तरुणीवर अत्याचार व फसवणूक प्रकरणाचा पाठपुरावा करीत असताना अत्यंत धक्कादायक बातमी मिळाली की, आरोपींनी पिढीत मुलीच्या बाबतीत कुठलीही हयगय न करता, अश्लील शिवीगाळ, अंगावर हात टाकून तिचे केस पकडून मारहाण करण्यात आली. पोलिस स्टेशन दुर्गापूर येथे सुद्धा तिची तक्रार घेतल्यानंतर तीन दिवसांनी तिची FIR घेऊन तिला रात्री एकटीला १ वा.घरी पाठविण्यात आले.

गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन सुद्धा, ४० दिवसानंतर ही पोलिस विभाग अटक करायला तयार नाही, तेच आरोपी पिढीत मुलीला धमकी देत असतात की, तू कुठंही गेली तरी तुला काही मिळणार नाही. आम्ही पोलिसांना पैसे देऊन आहोत, तू केस वापस घे अश्या प्रकारच्या धमकी बद्दल पिडी त मुलींनी उपविभागीय पोलिस अधिकारी ह्यांना सांगितले असता, उडवा उडवी चे उत्तर पोलिस उप विभागीय अधिकारी देत आहे अशी माहिती पिढीत मुलींनी दिली आहे.
   
आदिवासी टायगर सेना चंद्रपूर च्या वतीने पोलिस अधीक्षक चंद्रपूर, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रपूर, ह्यांच्या भेटी देऊन प्रकरणाचा गांभीर्य समजवून सांगितले. तरीही पोलिस विभागाला जाग येत नाही असे दिसताच आज दिनांक ५/७/२०२४ रोजी जिल्हाधिकारी ह्यांच्या कार्यालय समोर पोलिस विभागाविरुध्द एक दिवसीय धरणे आंदोलन देण्यात आले.

या एक दिवसीय धरणे आंदोलनास विविध सामाजिक संघटना चा पाठिंबा देण्यात आला. त्यात, ओबीसी सेवा महासंघ चे नेते सचिन राजूरकर, भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस चे कादर शेख, इरफान शेख, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे प्रमोद बोरीकर, कृष्णा मसराम, बिरसा क्रांती दल चंद्रपूर ओंकार गेडाम, राजेंद्र धुर्वे, बिरसा सेनेचे कमलेश आत्राम, सोशल एज्युकेशन मुमेंट चे भास्कर मून, ह्यांनी पिढीत मुलीला न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व सामाजिक संघटना च्या वतीने रस्ता रोको आंदोलन व चक्का जाम आंदोलन करू असा गर्भीत इशाराही देण्यात आला आहे.

या समोरही आम्ही सर्व आदिवासी टायगर सेना च्या पाठीशी राहून पिढीत मुलीला न्याय मिळून देऊ अशी माहिती सर्व सामाजिक संघटना च्या पदाधिकारीनी यावेळी दिली.
   
या आंदोलनात आदिवासी टायगर सेनाचे अ‍ॅड. संतोष कुळमेथे, विदर्भ अध्यक्ष, जितेश कुळमेथे विदर्भ महासचिव, सुमित्रा आलाम विदर्भ महा, माया पेण्डोर विदर्भ प्रवक्त्या, इंजी. अभिलाष परचाके विदर्भ युवा अध्यक्ष, आयुष मडावी युवा उपाध्याय, निशीगंधा मडावी विदर्भ उपाध्यक्ष युवती, आकाश गेडाम विदर्भ प्रसिध्दी प्रमुख,प्रा.हितेश मडावी जिल्हा अध्यक्ष, वैशाली मेश्राम जिल्हा अध्यक्ष कामगार महिला,माजी सैनिक ड्रेफुल आत्राम जिल्हा उपाध्यक्ष, यशोधरा उईके जिल्हा महासचिव, सोज्वळ कुमरे जिल्हा उपाध्यक्ष, दीपक पेंदोर जिल्हा युवा उपाध्यक्ष, प्रियांका मडावी जिल्हा युवती अध्यक्ष, रंजीत मडावी जिल्हा युवा अध्यक्ष, राहुल पेंदाम जिल्हा युवा उपाध्यक्ष, विराज सुरपाम जिल्हा महासचिव, दामिनी मडावी जिल्हा युवती तालुका अध्यक्ष बल्लारपूर, रज्जु कुळसंगे जिल्हा युवती उपाध्यक्ष, भाग्यश्री कुमरे जिल्हा कोष्याध्यक्ष महिला, सावन ऊईके जिल्हा सदस्य, बाळू कुळमेथे जिल्हा सदस्य, सूरज गावडे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.