Showing posts with label केळापूर. Show all posts
Showing posts with label केळापूर. Show all posts

लापता भिमराव पोतु टेकामचा "रेस्क्यू टीम" घेणार शोध


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (२८ ऑक्टो.) : केळापूर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील अर्ली पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळशेंडा या गावातील शेतकरी भीमराव पोतू टेकाम (६५) हा नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेला असता, शेजारील नाल्यांमध्ये शौचास बसल्या ठिकाणी अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली.

भिमराव वर वाघाने हल्ला तर केला नसेल ना! असा  संशय व्यक्त केला जात असून, पांढरकवडा पोलीस स्टेशन ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कोळी साहेब, वनविभाग, अभयारण्य विभागाची टीम तसेच शेकडो गावकऱ्यासह शोध मोहीम राबवली असून, गेल्या आठ दहा तासापासून सात ते आठ किलोमीटरचे अंतर शोधले, परंतु भिमराव चा कुठेच शोध न लागल्याने आज रेस्क्यू टीम कडून शोध घेण्यात येणार असल्याचे समजते.
या शोध भूमीमध्ये पोलीस विभाग, वनविभाग व गावकरी यांच्या माध्यमातून शोधाशोध केली असता, भिमराव न सापडल्याने वाघाने हल्ला केला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
"गावकऱ्यांनी दिलेल्या माहितनुसार भिमराव टेकाम हा ईसम २७ ऑक्टाेंबर पासून बेपत्ता असल्याचे कळले त्या अनुषगाने जंगल व परिसरात शोध घेण्यात येत आहे. परंतु अजून पर्यंत भिमराव चा शोध लागलेला नाही."

~ महेश बाळापूरे
वनपरिक्षेत्र अधिकारी टीपेश्वर अभयारण्य

पर्यटकांसाठी टीपेश्वर अभयारण्याचे दार उघडले: ऑनलाईन बुकींग करून अभयारण्यात करता येणार सफारी


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
केळापूर, (२७ ऑक्टो.) : "केळापूर तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्य सध्या पर्यटकांसाठी फुलले आहे. त्यांचे मुख्य आकर्षण आहे येथील व्याघ्र दर्शन. या अभयारण्यात वन्य प्राणी मोठ्या संख्येने आहेत. तसेच वाघाचे दर्शनही हमखास होत असल्याने पर्यटकांचा ओढा वाढला आहे."


पावसाळ्यात वाढलेल्या गवतामुळे अभयारण्यातील पायावाटा पुसल्या जातात; तसेच गाड्या चिखलात रुतण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात अभयारण्ये पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला होता. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यात टीपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची सफारी बंद करण्यात आली होती. 

टीपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची सफारी वाढल्याने पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेता पांढरकवडा वन विभागाचे उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली १९ ऑक्टोबर रोजी टीपेश्वर अभयारण्याचे सुन्ना गेट व माथणी गेट उघडण्यात आले असुन पर्यटकांसाठी सफारी सुरू करण्यात आली आहे. टीपेश्वर अभयारण्यात सफारी करण्याकरीता पर्यटकांना ऑनलाईन बुकिंग www.magicalmelghat.in या संकेतस्थळावरून करता येईल. सुन्ना गेट व माथणी गेटवरून सफारी प्रारंभ करताना सहाय्यक वनसंरक्षक रविंद्र कोंडावार, वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश बाळापुरे, विवेक येवतकर आदी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

वांजरी विहीर प्रकरणाची कार्यवाही निश्चित,गटविकास अधिकारी कार्यवाहीच्या प्रतिक्षेत..


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
पांढरकवडा, (२० ऑक्टो.) : वांजरी गटग्रामपंचायत येथे रोजगार हमी अंतर्गत सन २०१८-२०१९ रोजी विहीर दुरुस्तीकरणासाठी मंजुर झाली. परंतु मंजूर झालेल्या रक्कमेची परस्पर उचल करण्यात आली आणि दुरुस्तीकरण कोणत्याही प्रकारचे करण्यात आले नाही.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) जिल्हा परिषद यवतमाळ नरेगा यांच्या आदेशाने संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश मिळाले. गटविकास अधिकारी यांनी कामाची चौकशी करण्यासाठी ग्रामसेवकांना मोजपुस्तिका व फाईल्सची मागणी केली. परंतु ग्रामसेवकांना कामाविषयी दस्तऐवज ग्रामपंचायत कार्यलयात रेकॉर्ड उपलब्ध नाही आहे. असे उत्तर मिळत आहे. यावर गटविकास अधिकारी उचित कार्यवाही करेल. मनरेगा जॉबकार्ड धारक काम न करता थेट ठेकेदारांनी विहिरीचे काम दाखवून मजुरांच्या थेट अकाउंट मध्ये पैसे टाकून संबंधित व्यक्तीला उचलून दिल्याचे विधान मजूर (जॉबकर्ड) धारक आपल्या बयानीतुन व्यक्त करत आहे.
                   
रोजगार हमी योजना ही बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे. बेरोजगार आधार देण्याचे काम रोजगार हमी करत आहे. याकरिता प्रशासन दिवसरात्र जनतेच्या कल्याणासाठी आपला देह झिजवत आहे. परंतु या रोजगार हमी चा फायदा भ्रष्ट ठेकेदार घेतांना दिसत आहे.
                 
कामाची संपूर्ण माहिती मिळताच संबधित व्यक्तीचे अपूर्ण काम पूर्ण करण्यात येईल. आणि लवकरात लवकर अधिकाऱ्यांवर व भ्रष्ट ठेकेदारांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे.

अर्थसंचित केअर इंडिया संस्थेद्वारे जागतिक जागतिक हात धुवा दिन साजरा


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवडा, (२० ऑक्टो.) : व्यवस्थित हात धुण्याची सवय ही खरेतर कायमस्वरूपी हवी. परंतु तसे होत नसल्याने दरवर्षी १५ ऑक्‍टोबर हा "जागतिक हात धुवा दिन" म्हणून पाळला जातो. जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, स्वच्छ भारत अभियान याबाबत मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करीत आहे. हात धुण्याची सवय लोकांच्या अंगवळणी पडावी हा त्यामागचा उद्देश आहे.
                   
सार्वजनिक स्वच्छता व वैयक्तिक स्वच्छता या सारख्या महत्त्वपूर्ण बाबींन वर ऋस्त्र कल्लू. द्वारा अर्थसंचलित व केअर इंडिया या संस्थेद्वारे संचलित महिला + पाणी (वुमन + वॉटर) प्रकल्पांतर्गत पांढरकवडा तालुक्यात "जागतिक हात धुवा दिन" हा १५ ऑक्टोंबर ते २३ ऑक्टोंबर पर्यंत गाव पातळी वर पिंपरी, दातपाडी, कोंघारा, धारणा, घोडधरा, सखी, वाढोना, साखरा, वेडद, तातापुर, झुंजारपूर या ग्रामीण भागात कार्यक्रम करण्यात आला आहे. महिलांची वैयक्तिक प्रगती व कारकीर्द विकास या प्रशिक्षणाद्वारे गावपातळीवर महिलांना ज्या शैक्षणिक गटांच्या मार्फत आरोग्य आरोग्य स्वच्छता पाणी या विषयावर वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पांढरकवडा तालुक्यातील येत आहे "माझे कुटुंब माझी जबाबदारी" "स्वच्छता ठेवा घरोघरी" याविषयी संस्थेचे अधिकारी तथा ट्रेनर मार्गदर्शन करत आहे. उपक्रमात हात धुण्याच्या पद्धती समजून सांगण्यात येत आहे.
सदर वुमन वॉटर प्रकल्पाची कार्यकारी व्यवस्थापक रविकांत घाटोलजी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक अमोल बोरकर सर व केअर इंडिया टीम ची सर्व ट्रेनर किरण बाराहाते, कविता जुमनाके, शीतल ठाकरे, विशाखा ताई, ज्योती फुलझले, प्रेमीला आत्राम,विद्या वातीले,आशिया शबीर, सचिन संदलवार, सलमान खान व इतर कर्मचारी आपली महत्त्वपूर्ण भूमिका राबवत आहे.

नेहरू युवा केंद्र, यवतमाळ अंतर्गत,जगदंबा संस्थान केळापूर येथे स्वछता अभियान


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (१७ ऑक्टो.) : नवरात्री उत्सवानिमित्याने भाविकभक्त जगदंबा संस्थान केळापूर, येथे मोठया संख्येने माँ जगदंबेच्या दर्शनासाठी उपस्थिती दर्शविली. नागरीक ९ दिवस मोठया संख्येने असल्यामुळे जगदंबा संस्थानाच्या परिसरात जिकडे तिकडे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्या अनुषंगाने नेहरू युवा केंद्र यवतमाळ अंतर्गत दि.१७/१०/२०२१ रोजी जगदंबा संस्थान केळापूर येथे सहभागी ब्लॉक पांढरकवडाच्या वतीने स्वच्छ भारत (क्लीन इंडिया) कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
                     
देशात प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे नुकसान लक्षात घेता खेळ मंत्रालयाद्वारे संपुर्ण देशात प्लास्टिक कचरा जमा करण्याचे अभियान राबविले जात आहे. त्याच अनुषंगाने नेहरू युवा केंद्र यवतमाळ यांच्या वतीने जगदंबा संस्थान केळापूर येथे आज प्लास्टिक व केर कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली.

स्वच्छता अभियान कार्यक्रमात नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक पांढरकवडा विशाल दुबे, सलमान खान, गुरुबच्चन सिंग, नितेश चव्हान, सागर गुरनुले, राहुल चांदेकर, रोहन केळापूरे, विशाल मेश्राम, अक्षय सिडाम, सुशील मिसाल व शाहिद भगतसिंग क्रीडा मंडळचे खेळाडू कार्यक्रमात सहभागी झाले.

मित्रता दुर्गोत्सव मंडळ चालबर्डी येथे नवरात्रीचा जल्लोष


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवडा, (१४ ऑक्टो.) : नवरात्री उत्सवानिमित्य चालबर्डी येथे अष्टमीला माँ दुर्गाच्या दर्शनासाठी अनेक भक्तांनी दर्शनासाठी आपली हजेरी लावली. अष्टमीच्या निमित्याने महाआरती चा कार्यक्रम करण्यात आला. गावातील नागरिक व आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शविली. आरती आणि भजनांच्या वातावरणात चालबर्डी परिसर भक्तमय झाले.

मित्रता दुर्गोत्सव मंडळी राम गोनेवार, अनुप पाटील, रोशन पाटील, आकाश गंड्रावर, संतोष रासमडगुवार, संतोष सोनुले, गजानन श्रीमनवार, वासुदेव नेहारे, निळकंठ ध्यांवरनेनीवार, गजानन तोटावार, संतोष तोटावार,  तुळशीदास सातघरे.आणि समस्त चालबर्डी् ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

खासदार बाळू धानोरकर यांची केळापूर जगदंबा संस्थाना भेट

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवडा, (१३ ऑक्टो.) : नवरात्री उत्सवानिमित्याने जागृत जगदंबा संस्थान केळापूर येथे चंद्रपूर आर्णी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी भेट देऊन आई जगदंबे मातेचे दर्शन घेतले. यावेळी जगदंबा संस्थानात खासदार बाळू धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी शंकर बडे, विजय पाटील, गजानन बेजंकीवार, अमर पाटील, रवि बोरेले, जितेंद्र कोंघारेकर, श्रीनिवास नालमवार, मनोज भोयर, विष्णू राठोड, बिशनसिंग शिंदो, ईक्राम अली, अवि पाटील, प्रेम राठोड उपस्थित होते. तसेच पांढरकवड्यातील विविध दुर्गोत्सव मंडळाला खासदार धानोरकर यांनी भेटी दिल्या.

शहीद भगतसिंग क्रीडा मंडळ पांढरकवडा यांच्या वतीने राष्ट्रपीता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती साजरी करून स्मारकास अभीवादन

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (३ ऑक्टो.) : देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावणारे, सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वाच्या आधारावर ब्रिटिशांना अनेक वेळा गुडघे टेकण्यास भाग पाडणारे असे राष्ट्रपीता महात्मा गांधी. आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहीद भगतसिंग क्रीडा मंडळ पांढरकवडा च्या वतीने माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात पांढरकवडा शहरातील नामवंत विधितज्ञ अॅडवोकेट खैरकार साहेब यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. व.न.प.पांढरकवडा नगरसेवक पवनभाऊ कुडमथे यांची प्रमुख ऊपस्थीती होती.

यावेळेस मंडळाचे मार्गदर्शक शामजी राठोड, विरेंद्र बैस, अक्रम अली, गुरूबचनसींग जुनी लखन मेश्राम, अनस काझी, अर्जुनसींग, साजीद शेख, कौसरभाई, नेहरू युवा केंद्र पांढरकवडा तालुका स्वयंसेवक विशाल दुबे व शहीद भगतसिंग क्रीडा मंडळाचे सर्व पदाधीकारी व खेळाडू उपस्थित होते.

केळापुर तालुक्यातील रोजगार सेवकाचे पांढरकवड्यात धरणे आंदोलन

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (३ ऑक्टो.) :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत असलेले रोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करण्यात यावे. या प्रमुख मागणीचे निवेदन दिनांक 23/09/2021 ला तहसीलदार यांच्या सह वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. अन्यथा येत्या दोन आक्टोबर गांधी जयंती दिनी लक्षणिक उपोषण करण्यात येईल असा इशाराही महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य तालुका शाखा पांढरकवडा वतीने देण्यात आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत रोजगार सेवकांची महत्वाची भुमिका असताना तुटपुंज्या मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे.गावाच्या विकासासह बेरोजगारांना काम उपलब्ध करून देण्यात रोजगार सेवक जबाबदारीने कर्तव्य पार पाडत आहे. मात्र, त्यांना स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला बळी पडावे लागत आहे. मनमानीला बळी न पडता कामे केल्यास त्यांना कामावरुन काढून टाकण्याचा घाट घातला जातो. अशावेळी प्रशासनाने शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करावी, राजकिय दडपणाखाली कारवाई करु नये, रोजगार सेवकांच्या तक्रारीची चौकशी करून त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी, राजकीय सुडबुध्दीने बेकायदेशीर रित्या रोजगार सेवकांना काढुन टाकण्याची कारवाई करण्यात येवु नये, तसेच राज्यातील २८ हजार १४४ रोजागार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करावे अशा आशयाची मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य तालुका शाखा पांढरकवडा यांनी पांढरकवडा तहसीलदार सुरेश कव्हडे यांच्या मार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले आहे.

यावेळी ग्राम रोजगार संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष रामदास राठोड, पुनाजी मडावी, लक्ष्मण आरेवार, विलास चांदुरकर, देवराव राऊत, गणेश सिडाम, विनोद वाहिले, देविदास चव्हाण, धरमसिंग पराचे, भारत पेंदोर, ध्यानेश्वर चोधरी, हिरामण राठोड, शंकर राठोड, विनोद किनाके, खुशाल येडमे, राजू आडे, रमेश पालेपवार आदी 2 तारखेला तहसील कार्यालय समोर उपोषण ठिकाणी उपस्थित होते.

वांजरी शिवारात वाघाने केला बैलावर हल्ला


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवडा, (२७ सप्टें.) : वांजरी शिवारात दिवसेंदिवस जनावरांवर हल्ल्याच प्रमाणात वाढलेलं आहे. जंगलालगत व माळा लगत असलेल्या शेतकऱ्यांना शेतात येणे जाणे अतिशय कठीण झाले.अशा वातावरणात शेतात जाणे कठीण झाले आहे. जणांवरांवर हल्ले महिन्याला आठवड्याला होत आहे. ती वेळ माणसावर येऊ नये. या करिता वनविभागाने तात्काळ योग्य ते पाऊल उचलणे तितकेच महत्वाचे आहे. श्री.बाबुराव ढवा आत्राम रा.वांजरी या शेतकऱ्यांच्या बैलावर वाघाने प्राणघातक हल्ला केला परंतु जिवाच्या आकांताने बैल घरी पळून आला आणि जीव वाचला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांने तात्काळ शेतकऱ्यांच्या घरी धाव घेतले. जणांवरांवर तात्काळ खाजगी उपचार करण्यात आले. सदर हल्ल्याचे प्रकरण या पुढे घडू नये. याकरिता, वनविभागाने आपल्या टीम द्वारे गावात येऊन लोकांना जनजागृती करणे व विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे.

वांजरी शिवारात जंगलालगत असलेल्या शेतात भीतीचे वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेकरिता शेतकऱ्यांना वॉलकंपाउंडची गरज आहे. ती वनविभागाने त्वरित करून देण्याची मागणी वांजरी ग्रामस्थ करत आहे.

भाजपा युवा मोर्चा तर्फे राज्य सरकारचा निषेध

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवडा, (२७ सप्टें.) : दिनांक २५ व २६ सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाची, वर्ग 'क' आणि 'ड' ची होणारी परीक्षा परीक्षेच्या एक दिवस आधी रात्रीच्या वेळी रद्द करण्याचा दुर्दैवी निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मानसिक त्रास व आर्थिक फटका बसला आहे. या विरोधात आज केळापूर पांढरकवडा भाजपा युवा मोर्चा तर्फे राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला व विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई द्यावी ही मागणी करण्यात आली आणि तसे निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले.

या वेळी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रितेश बोरेले, भाजपा शहराध्यक्ष दिलीप मुथा, भाजपा किसान आ.तालुकाध्यक्ष यशवंत काळे, भाजपा उत्तर भारतीय मोर्चा तालुकाध्यक्ष धीरज शर्मा, भाजपा महिला तालुकाध्यक्ष अश्विनी नरडवार, भाजपा महिला शहराध्यक्ष सौ.शीतल बाजोरिया, भाजपा नगरसेवक बंटी जुवारे, भाजपा नगरसेवक सौ.रिता कनोजे, किसन रोडे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष मनोज त्रिशूलवार, तरुण सिंघानिया, किशोर मलीये, अनिल बुद्धपवार, उमाशंकर कनोजे, संदीप बाजोरिया, उ.भा मोर्चा वीरू बैस, युवा मोर्चा चे विशाल दुबे, शुभम जुमडे, शुभम घोडमारे, प्रमोद राऊत, शुभम जुनघरे, अतुल चितलवार, आकाश गहरवाल, प्रवीण मंडाले, राकेश मिरलवार, रोहित खडीकर, समीर गेडाम, अंकित घोडाम, वैष्णव सिडाम, सर्वेश हींकरे सह अनेक भाजपा पदाधिकारी, भारतीय जनता युवा मोर्चा चे कार्यकर्ते उपस्थित होते.

सुंदर माझे कार्यालय अभियान

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (२६ सप्टें.) : पांढरकवडा श्रमदान व साफसफाई कार्य आज तहसील कार्यालयात राबविण्यात आले. यावेळी तहसीलदार श्री. सुरेशजी कव्हळे सर, नगरपरिषद मुख्यधिकारी श्री. राजू मोत्तेमवार सर यांनी विशेष परिश्रम केले.

"सुंदर माझे कार्यालय अभियान" राज्य शासनांतर्गत सर्व शासकीय कार्यालयामध्ये राबविण्याबाबत मा.जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक कार्यलय हे स्वच्छ सुंदर निटनेटके असावे तसेच तेथील वातावरण नागरिक व कर्मचा-यासांठी काम करण्यायोग्य प्रेरक, उत्साहवर्धक असावे यासाठी संपुर्ण कार्यालय परिसराची साफसफाई व स्वच्छता करण्यात आली.

मा.जिल्हाधिकारी यांचे अभियनास प्रतिसाद देत आज तहसील कार्यालयात सर्व घाण साफ करणे, कचरा गोळा करून विल्हेवाट लावणे, झाडांची आणि गवत कटाई करणे आणि अनावश्यक प्लास्टिक यांची विलेवाट लावणे इत्यादि कार्ये करण्यात आली.

पांढरकवडा येथे भारतीय सैन्य व पोलीस भरती मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२६ सप्टें.) : यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज यवतमाळ द्वारा संचलित, राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय. पांढरकवडा येथे भारतीय सैन्य आणि पोलीस भरती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २५/०८/२०२१ शनिवार रोजी करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सतीश भेदोडकर सर उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री सेवानिवृत्त माजी सैनिक जक्कावार साहेब हे उपस्थिती होती. याप्रसंगी श्री विकास गोरे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यात कोणकोणत्या संधी असतात या संदर्भात विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. पोलिस भरतीमध्ये सुद्धा आपण सहजपणे लागू शकतो हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत केला. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे मैदानावर प्रशिक्षणासाठी आम्ही येऊ असे आश्वासनही त्यांनी दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग अकरावी कला शाखेतील विद्यार्थिनी कुमारी स्नेहा संजय गौरकार हिने केले. प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ किशोर अग्गुवार हे सुद्धा उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि कोरोनाच्या नियमाचे पालन करून बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

पांढरकवडा शहरात शासकीय सेवेत असणारे शिक्षकांद्वारे शिक्षणाचा भ्रष्टाचार ?


                          (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२५ सप्टें.) : पांढरकवडा येथील शासकीय अधिकाऱ्यांना मागील चार ते पाच वर्षापासून अवैधरित्या खाजगी शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकांबद्दल तक्रारी व निवेदने दिलेत परंतु अद्याप त्या शिक्षकांवर कार्यवाही झालेली नाही.

पांढरकवडा येथील शासकीय अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत कार्यरत असणारे वेतन धारी शिक्षक फार मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या खाजगी वर्ग घेत आहेत त्यासंदर्भात तक्रारी व निवेदने गेल्या चार ते पाच वर्षापासून सादर केले आहेत, परंतु संबंधित अधिकारी अशा भ्रष्ट शासनाचे वेतन घेणारे शिक्षकांवर अध्याप कार्यवाही केलेली नाही.

हा सर्व प्रकार स्थानिक पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांना जसे गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना निदर्शनास आणून दिले आहे, परंतु अजूनही कोणतीही कार्यवाही संबंधित शिक्षकांवर प्रत्यक्ष झाली नाही तर याउलट संबंधित शिक्षक दार बंद करून व लपून शिकवणी वर्ग घेत आहे. त्यांच्यावर तक्रार झाली आहे याबद्दलची माहिती संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व संस्थाचालक यांना पुरवली जाते व त्यांना सावध करतात.


 _तर प्रश्न असा आहे की अशा भ्रष्ट शिक्षकांवर संस्थाचालकांवर किंवा संबंधित अधिकाऱ्यावर कोण कार्यवाही करेल?_ असा प्रश्न समस्त जनतेवर पडला.

पांढरकवडा शहरात डेंग्यू,मलेरियाचे साम्राज्य


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२२ सप्टें.) : संपूर्ण जिल्हासह पांढरकवडा शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकणगुनिया यासारख्या साथीच्या रोगांचे प्रमाण वाढलेले आहे. त्याकरिता वॉर्डनिहाय गावातील प्रत्येक घरी भेट देण्याकरिता नगर परिषद पांढरकवडा व आरोग्य विभाग यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले असून, पथक आपल्या घरी आल्यानंतर त्यांना आपण सहकार्य करावे. विचारलेली माहिती द्यावी. घरात, अंगणात व परिसरातील जागा दाखवून द्यावी जेणेकरून डेंग्यू,मलेरिया उत्पत्तीच्या डासांचे नायनाट करण्यात येईल. पथकाद्वारे टेमिफोस ऍक्टिव्हिटी, फोगिंग, स्प्रेइंग करण्यात येईल.
                     
शहरातील सुज्ञ नागरीकांनी डेंग्यू व मलेरिया या डासांची उत्पत्ती घरातील व परिसरातील साचून असलेल्या पाण्यात होत असल्यामुळे डेंगू, मलेरिया डासाची उत्पत्ती स्थान समूळ नष्ट करावे. आपल्या घरातील व अंगणातील कुंड्यात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पाणी साठवून ठेवलेले भांडे झाकून ठेवावे. निरुपयोगी टायर्स नारळाच्या करवंट्या काचेच्या प्लास्टिकच्या वस्तू घरातून परिसरातून काढून फेकून द्यावे. घरातील कुलर टबमध्ये पाणी असल्यास कुलर टब पालथी करून ठेवावे. आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा व घरातील सर्व भांडी कोरडे करून ठेवावे. जेणेकरून, डासांची अंडी भांड्याला चिकटून राहणार नाही. मॉस्किटो बॅट व कॉइल चा वापर करावा. डास पळवणार्‍या धूप, अगरबत्ती यांचा वापर करावा. रोगांची कोणते ही लक्षणे आढळल्यास नजीकच्या दवाखान्यात जाऊन उपचार करावा.

 घरातील सेफ्टीक टाक्याचे पाईपवर जाळी बसविण्याचे काम नगर परिषद मार्फत सुरू असून येणाऱ्या कर्मचाऱ्यास सहकार्य करावे. वरील सर्व सूचनांचे पालन केल्यास शहरातून डेंग्यू व मलेरिया नक्कीच हद्दपार होईल याकरिता सर्व नागरिकांनी नगर परिषदेला व प्रशासनास सहाय्य करावे असे, आव्हान नगराअध्यक्षा सौ.वैशाली अभिनय नहाते व नगर परिषद मुख्याधिकारी श्री.राजू मोट्टेमवार यांनी नागरिकांना आव्हान केले आहे.

बेलोरी येथे चोरट्याचा धुमाकूळ, बोरवेल चा केबल चोरट्यांनी लंपास केला

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (१४ सप्टें.) : पांढरकवडा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या बेलोरी शेत शिवारातील बोरवेलचा केबल रात्री चोरट्यांनी लंपास केला. सुनील पावडे यांचे बेलोरी शिवारात शेत असून तेथे बोअरवेल असुन बोअरवेलला असलेला २०० फूट तांब्याच्या धातूने केबल पोळ्याच्या मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेला.

याबाबत सदर शेतकरी सुनील पावडे यांनी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे रीतसर तक्रार दाखल केली असता पोलिसांनी घटनास्थळावर येऊन पाहणी करून गेले परंतु तब्बल सहा दिवसाचा कालावधी होऊन सुद्धा पोलिसांना चोरट्याचा शोध लागू शकला नाही तरी पोलिसांनी चोरट्यांना त्वरित शोध घेऊन लंपास केलेला केबल मिळवून द्यावी अशी मागणी सदर शेतकऱ्यांनी केली आहे.

चालबर्डी येथे कृषी विद्यार्थ्यांनी राबवली लसीकरण मोहीम


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवडा, (१० सप्टें.) :  कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश उपेंद्र गुडेवार व कृषी महाविद्यालय अकोला येथील विद्यार्थी आदित्य सुनील मंचलवार यांनी पावसाळ्यात जनावरांना विविध आजारांचा सामना करावा लागतो त्यामुळे जनावरांची काळजी कशी घ्यावी त्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. चालबर्डी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ.जी आर पडलवार यांच्या मार्गदर्शनात जनावरांना लसीकरण करण्यात आले.

 यावेळी शेतकऱ्यांना जनावराच्या घटसर्प, लंपी इत्यादी विविध रोगांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर ए ठाकरे सर उपप्राचार्य एम व्ही कडू सर आणि प्राध्यापिका एस पी लोखंडे मॅम यांचे मार्गदर्शन लाभले.

पांढरकवडा येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नवीन कार्यकारिणीची गठण

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (०९ सप्टें.) : तालुक्यातील पांढरकवडा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नवीन कार्यकारिणीच्या गठण दिनांक ०४ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीही जादूटोणा, भूत, भानामती, बुवाबाजी, चमत्कार, गैरसमजुती, अनिष्ट रूढी परंपरा, यांच्याविरुद्ध लोकांचे प्रबोधन करून देवाधर्माच्या नावावर सर्वसामान्यांची आर्थिक लूट करणारे त्यांचा भंडाफोड करणे. तसेच अंधश्रद्धा व गैरसमजामुळे समाजात होणारी भांडणे, खुन, नरबळी, मारामाऱ्या, अशा प्रकारच्या अनेक घटना छढतांना आढळतात. त्यापासून दूर ठेवण्याच्या दृष्टीने समाज प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पांढरकवढा तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

शाखेच्या कार्याध्यक्षपदी प्रफुल कोमावर, प्रधान सचिवपदी अरविंद गांगुलवार, अध्यक्षपदी तुकारामजी नेहारे, उपाध्यक्षपदी चंद्रभानजी उदे, प्रशिक्षण विभाग कार्यवाह चंद्रकांत कोयरे, विविध उपक्रम कार्यवाह रवि वल्लमवार.बुवाबाजी संघर्ष कार्यवाह पुरण राठोड. वार्तापत्र विभाग कार्यवाह यशपाल खांडे, प्रकाशने वितरण कार्यवाह अक्षय शिरपूरवार, प्रशिक्षण सहभाग कार्यवाह नंदकिशोर तुरणकर, सोशल मीडिया व्यवस्थापन रविंद्र सिडाम, महिला सहभाग कार्यवाह मंगला आंबेकर यांची सभेत सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

आमदार प्रा. अशोक उईके यांना ढाईफोड येथील माता भगिनींनी बांधल्या राख्या


सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार 
केळापूर, (०५ सप्टें.) : मा. आमदार प्रा. अशोकभाऊ उईके हे अती अतिदुर्गम भाग असलेला ४५ घराची वस्ती असलेल्या ढाईपोळ येथे भेट दिली असता, तेथील भंगिनीनी राखी बांधून आमदार प्राचार्य अशोकभाऊ उईके यांचे स्वागत केले.

ढाईपोड येथील माता भगिनींची तसेच ग्रामस्थ लोकांच्या असलेला समस्या जाणून घेवुन आमदार साहेबांनी अत्यल्प वस्ती असलेल्या ढाईपोड येथील विविध अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी विनोद बोरतवार, बाळा मानकर, महादेव ठाकरे, मारुती ठाकरे, आकाश राठोड, सचिन मडावी, गजानन मेश्राम, महादेव टेकाम, उपस्थित होते.