Showing posts with label लातूर. Show all posts
Showing posts with label लातूर. Show all posts

नेत्रदान चळवळ व्यापक करावी - डॉ. रामप्रसाद लखोटिया

बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : समाजातील अंधमुल, मुलींना दृष्टी प्राप्त व्हावी त्यांना ही निसर्ग पहाता यावा या समाजातील अंधाचे जिवन प्रकाशमय करण्यासाठी नेत्रदान उपक्रम ही चळवळीचे व्हावी. एका व्यक्ती आपल्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते. त्यामुळे नेत्रदानाचा संकल्प प्रत्येकाने करावा व इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे. नेत्रदान हेच श्रेष्ठदान असल्याचे मत उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररंग्नालय उदगीर चे अध्यक्ष डाॅ रामप्रसाद लखोटीया यांनी जागतिक दृष्टी दिन निमित्ताने आयोजित महिला बचत गट कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर उपस्थित 
श्रीकांत श्रीमंगले तालुका अभियान व्यवस्थापक, संतोष भुताळे, धनाजी भोसले, सारासारचे अध्यक्ष योगेश चिद्रेवार, गणेश मुंडे, रवी जवळे, जावेद शेख आदी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांचा सत्कार तालुका अभियान व्यवस्थापक यांच्या वतिने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.पुढे बोलताना नेत्रदान म्हणजे मनुष्य मृत्यू पावल्या नंतर त्याचे डोळे अंध व्यक्तीला दान करता येते. व समाजातील अंध मुल मुलीना नेत्रदानाचा नक्की फायदा होतो.
नेत्रदान करण्यासाठी नोंदणी करावी नेत्रदान लहान मुलापासून वृध्दांपर्यंत कोणीही व्यक्ती नेत्रदान करू शकते.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती, ज्यांना चष्मा आहे, रक्तदाब,मधुमेह, दमा आदी विकार असलेले
नागरीकही नेत्रदान करू शकतात. तर 
एड्स, ब्लड कॅन्सर असे आजार असलेल्या व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत. त्यामुळे आपण मोठ्या संख्येने बचत गटाच्या महिला उपस्थित राहीले आहेत त्यामुळे आपण नेत्रदान नोंदणी आवश्य करावे असे अव्हाण ही त्यांनी केले.
त्यामुळे मृत व्यक्तीचे नेत्रदान करावयाचे असल्यास लवकरात लवकर आरोग्य विभाग किंवा नेत्रपेढीशी संपर्क साधणे आवश्यक आहे. त्यांच्या अव्हानाला प्रतिसाद देत उपस्थित कार्यक्रमात तब्बल ३५ महिलांनी (नेत्रसखी) नेत्रदानाचा संकल्प केले आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत श्रीमंगले यांनी केले तर आभार धनाजी भोसले यांनी मानले.

सुपर स्टार छोटे उस्ताद सायली टाकचा लातूरात झाला सन्मान


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

लातूर : नुकत्याच संपन्न झालेल्या स्टार प्रवाह या चित्र वाहिनीच्या वतीने संपन्न झालेल्या गीत गायन स्पर्धेत लातूरची सायली सुनील टाकणे छोटे उस्ताद सुपरस्टार या स्पर्धेत महाराष्ट्रातून बाल कलाकारांमध्ये सुंदर गीत गायन सादर करून बाल कलाकारांमध्ये तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल तिचा संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघ उदगीर,संत नरहरी सोनार सेवाभावी शिक्षण संस्था उदगीर,सावित्रीबाई फुले महिला शिवणकला शिक्षण व प्रशिक्षण केंद्र उदगीर,दैवज्ञ सोनार एकता संघ पुणे,टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य खाजगी विद्यालय,श्री विश्वकर्मा विकास महामंडळ च्या वतीने तिला महाराष्ट्राची बालकलाकार सुवर्णकन्या ने सन्मानित करण्यात आले यावेळी तिची आई सुषमा टाक व वडील सुनील टाक व भाऊ व्यंकटेश टाक ची एम बी बी एस साठी निवड झाल्याबद्दल वरील संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात व सत्कार समारंभ प्रसंगी टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य खासगी विद्यालयाचे मुख्य ॲडमिन तथा श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालय उदगीर येथील सहशिक्षक बालाजी सुवर्णकार, विश्वकर्मा विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे सुदर्शन बोराडे,ओबीसी ब्रिगेडचे लातूर जिल्हा अध्यक्ष दिलीप पिनाटे,विश्वकर्मा विकास महामंडळ लातूर चे जिल्हाध्यक्ष सुदाम पांचाळ,टीचर ग्रुपचे सदस्य तथा संग्राम माध्यमिक विद्यालय उदगीर येथील सह शिक्षक पंडित पांचाळ, पाटोदा तालुका जळकोट येथील सेवा निवृत्त माजी सैनिक विलास नागरगोजे,राज्य उत्पादन शुल्क कार्यालय लातूर येथील टंक लेखक तथा लिपिक नितीन रत्नपारखी,चाकुर येथील सुवर्णकार समाजाचे सदस्य सागर रत्नपारखी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला या सन्मान सोहळ्यानंतर सर्वांनी सायली व तिच्या आईवडिलांचे भरभरून कौतुक करून पुढील कार्यासाठी सर्वांनी सायली टाकला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागातील छोट्या किराणा दुकानदाराचा मुलगा रामेश्वर सब्बनवाड झाला आय ए एस अधिकारी उदगीर

बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील रामेश्वर सब्बनवाड यांनी एमपीएससी (mpsc) परीक्षेत स्वतःच्या जिद्द चिकाटी मेहनतीच्या जोरावर लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून 202 क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला आहे.

हंडरगुळी गावाचे नाव उज्वल करून तो हंडरगुळी ग्रामीण भागातील पहिला आयएएस होण्याचा मान पटकावला आहे. या उज्वल यशाबद्दल उदगीर तालुक्यात आनंद व्यक्त होत आहे. रामेश्वर सब्बनवाड यांचे प्राथमिक शिक्षण गावातच रामराव पाटील प्राथमिक विद्यालय हंडरगुळी येथे झाले, ६ ते १० शिक्षण लातूर येथील जवाहरलाल नवोदय विद्यालयात झाले. ११-१२ वी चे शिक्षण भारतीय जैन संघटना पुणे येथील विद्यालयात झाले असून, सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पुणे येथील शासकीय महाविद्यालयात पूर्ण केले.

चांगल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना त्यांनी स्वतः शिकवनी घेऊन स्वबळावर स्पर्धा परीक्षा दिली परंतु त्यांना प्रथम त्यात यश आले नाही दुसर्यांदा ध्येय उद्दिष्ट जिद्द चिकाटी अहोरात्र मेहनतीच्या अभ्यासाने त्यांना दुसऱ्यांना यश प्राप्त झाले आहे.

वडिलांचे गावात छोटेसे किराणा दुकान आई वडील व दोन भाऊ असून त्यांना उच्च शिक्षण देण्याचा त्यांचा मानस असून रामेश्वर सब्बनवाड यांनी इतर मागास वर्गात (OBC) प्रवर्गात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल तो मोठा अधिकारी होणार असल्याचा आनंद आई वडील भाऊ व गावातील नागरिकांना होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल गावातील शिक्षणप्रेमी नागरिक ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले असून तालुक्यात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अंजुम कादरी (शेख) यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते ॲड मनोहरराव गोमारे यांच्यासह मान्यवरांची सदिच्छा भेट

बालाजी सुवर्णकर | सह्याद्री चौफेर 

उदगीर : नुकत्याच उदगीर येथे झालेल्या 15 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा डॉक्टर अंजुम कादरी (शेख) यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते तथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लातूर जिल्हाध्यक्ष ॲड मनोहर
 गोमारे,अंधश्रध्दा निर्मुलन समितिचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे,लातूर जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर,सचिव सुधीर भोसले, उदगीर येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत शिक्षक तथा ज्येष्ठ साहित्यिक विश्वनाथ रावजी मुडपे, साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य तथा पत्रकार धनंजय गुडसुर, श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयातील शिक्षक तथा सावित्रीबाई फुले महिला शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचे संचालक बालाजी सुवर्णकार यांनी सदिच्छा भेट देऊन उदगीर येथे पार पडलेल्या विद्रोही साहित्य संमेलना विषयी चर्चा झाली. या वेळी डॉ.अंजुम कादरी (शेख) यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करुन त्यांना पुढील कार्यासाठी सर्व उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा डॉ.अंजुम कादरी (शेख) व नगरसेवक अहमद सरवर शेख यांनी सन्मान केला.

 या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नगरसेवक अहमद सरवर यांनी पुढाकार घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहमद यांनी केले. तर संमनाबद्दल आभार बालाजी सुवर्णकार यांनी केले.

उदगीरात कै. विठ्ठलराव केदार राज्यस्तरीय वाड्.मय पुरस्कार वितरण


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : तालुक्यातील देऊळवाडी येथील कै. विठ्ठलराव केदार प्रतिष्ठान चे प्रोढ व बाल वाड्.मय राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व अंबादास केदार लिखित तारांबळ या आत्मकथनाचे प्रकाशन ८९ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते  मंगळवारी येथील लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या सभागृहात पार पडले.

अध्यक्षस्थानी जि. प. चे माजी अध्यक्ष राहुल केंद्र होते. व्यासपीठावर मसापचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामचंद्र तिरूके, डॉ. रामप्रसाद लखोटीया, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर, ललिता सबनीस, लेखक अंबादास केदार यांची उपस्थिती होती. यावेळी कोल्हापूर येथील साहित्यिक डॉ. श्रीकांत पाटील यांच्या ऊसकोंडी या कादंबरीला, बीड येथील डॉ. भास्कर बडे यांच्या बाईचा दगड या कथासंग्रहास, बाळासाहेब कांबळे यांच्या भिनवाडा या कादंबरीस, हबीब भंडारे यांच्या जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता व अंकुश सिदगीकर यांच्या काळोखाचे कैदी या कविता संग्रहाचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

बालवाङमय पुरस्कारासाठी पुणे येथील शिवाजी चाळक यांच्या उंदरांचा टांगा या बालकविता संग्रहास, हिंगोली येथील बबन शिंदे यांच्या जगावेगळा कीर्तनकार या बाल कादंबरीस, नांदेड येथील लेखिका कमल कदम यांच्या आरपार या आत्मकथनासाठी तर सिराज शिकलगार यांच्या गझलतारा या गझल संग्रहास तर सुप्रिया दापके यांच्या सानुल्याच्या कथा या कथासंग्रहाचा गौरव करण्यात आला. प्रत्येकी दोन हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल धनंजय गुडसूरकर, परिक्षक प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, रसूल पठाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक रामदास केदार यांनी केले. सूत्रसंचालन नीता मोरे यांनी तर आभार प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांनी मानले. यासाठी एकनाथ केदार, देविदास केदार,  प्रा. बिभीषण मद्देवाड, सिध्दार्थ सुर्यवंशी, लक्ष्मण बेंबडे, प्रा. राजपाल पाटील, विवेक होळसंबरे, ॲड. महेश मळगे, विक्रम हलकीकर आदींनी पुढाकार घेतला. 

चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने ५ गरजू कुटुंबांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे वाटप


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : येथील सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या अग्रगण्य अशा चंदरआण्णा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी मागच्या 4-5 वर्षांपासून सहकार महर्षी चंद्रकांतआण्णा वैजापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदान किटचे वाटप, अनेकवेळा रक्तदान शिबिराचे आयोजन, वृक्षारोपण कार्यक्रम, पाणपोईची सुविधा, आतापर्यंत 50 कुटुंबांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे वाटप इत्यादी एकापेक्षा एक स्तुत्य कार्यक्रम घेतलेले आहेत. आजच्या कार्यक्रमातही गरजू पाच कुटुंबांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये रोख वाटप करण्यात आले याच बरोबर सुप्रसिद्ध उद्योजिका श्रीमती विमलताई गर्जे यांच्या मुलाच्या 17 व्या लग्न वाढदिवसानिमित्त उपस्थितीत मान्यवराच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी मा.चंद्रकांतआण्णा वैजापुरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी प्रविणजी मेगशेट्टी साहेब, शासकीय रुग्णालयाचे डिन डाॅ.दत्तात्रय पवार साहेब, चंदरअण्णा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, डाॅ.सोमवंशी साहेब, डाॅ.प्रकाश येरमे साहेब, डाॅ.संदीप सोनटक्के, माजी नगराध्यक्षा उषाताई काबंळे, उद्योगपती विमलताई गर्जे, शंकरराव लासूने, शिवकुमार गुळंगे, भगवानराव पाटील गगंनबीडकर, श्रीराम गर्जे, सौ.सोनाली गर्जे, सौ.गायत्री गर्जे, बालाजी पाटील नेत्रगावकर, राजकुमार बिराजदार बामणीकर, प्रा.सिद्धेश्वर पटने, प्रा.संजय जामकर सर, प्रा.संतोष चौधरी, भरत पस्तापुरे, रमेश कंटे, अशोक काबंळे, पञकार सुरेश पाटील नेञगावकर, सुनील हवा, संगम पटवारी, पत्रकार डावळे, पत्रकार गुट्टे, मुख्याध्यापक हक्कानी पाशा, प्रा.अख्तार सर, खिंडिवाले सर,माधव पाटील चिघळीकर, सचिन वाघमारे, तानाजी जाधव, प्रा.महेश धनश्री, ऐतवार सर, कल्याण बिरादार, रमेश खंडोमलके, संगुळगे सर, मुन्ना सुर्यवंशी, सुनील रासुरे, सत्यप्रकाश डांगे, तुकाराम शिंदे, सुवर्णकार, अजित काबंळे, महादेव महाजन अविनाश खरात, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय अशा सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचलन प्रा.सिद्धेश्वर पटणे, प्रास्ताविक अशोकराव कांबळे तर आभार प्रदर्शन प्रा.संजय जामकर यांनी केले.

लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप उत्साहात संपन्न


सह्याद्री चौफेर | बालाजी सुवर्णकार 

उदगीर : लोकनेते विलासरावजी देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप चे आयोजन विजय राजेश्वर निटूरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते, यात उदगीर शहर व ग्रामीण भागातून जवळपास 40 ते 45 संघानी सहभाग नोंदविला होता.

covid-19 या महामारी मुळे काही काळ अश्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते पण या स्पर्धेमुळे खेळाडूंना एक नवऊर्जा मिळालेली दिसून आली.याबरोबरच उदगीर येथील प्रेक्षक वर्गांनी याचा मोठ्या प्रमाणात आंनद घेतला.या स्पर्धेत अंतिम सामना हा निडेबन टीम,निडेबन विरुद्ध नक्ष्या टीम,उदगीर यांच्या मध्ये अत्यंत चुरशीचा सामना झाला.या अंतिम सामन्यात नक्ष्या टीम,उदगीरने 8 खेळाडू राखून विजय मिळवला.विजय मिळवलेल्या टीमला लोकनेते विलासरावजी देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप समितीच्या वतीने रोख रक्कम 51000 (एक्कावन हजार रुपये) ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.तर द्वितीय आलेल्या टीमला रोख रक्कम 31000 (एकतीस हजार रुपये) ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून अबू पठाण यांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रोहन येणालडे यांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तर मालिकावीर म्हणून रुपेश तुकडे यांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेत प्रथम आलेल्या टीमची निवड ही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण करण्यासाठी काँग्रेस कमिटी उदगीरचे ता.अध्यक्ष श्री.कल्याण पाटील साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीरचे सभापती मुन्ना उर्फ सिद्धेश्वर पाटील साहेब, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.विजय निटुरे साहेब, उदगीर काँग्रेस कमिटी उदगीर श.अध्यक्ष श्री.मंजूर खा पठाण साहेब, महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस सौ.उषा कांबळे, शिक्षक काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष्या बालिका मुळे, शहर काँग्रेस कमिटी महिला अध्यक्षा ललिता झिल्हे, विलास सहकारी साखर कारखाना संचालक श्री.नाना ढगे, मा.न.प.सदस्य व्यंकट बोईनवाड, रेखाताई कानंमदे, काँग्रेस नेते शिवाजी लाखवाले, प्रा.गोविंद भालेराव प्रा.शिवाजीराव देवनाळे, संदीप पाटील, अमोल घुमाडे, दत्ता सुरनर, संजय काळे, संतोष वळसणे, श्रीनिवास एकुर्केकर, नागेश पटवारी, सद्दाम बागवान, विपिन जाधव, आशिष चंदेले, प्रकाश गायकवाड, फय्याज डांगे, आदर्श पिंपरे, रामजी पिंपरे, शिवाजी पकोळे, एशवंत पाटील, ईश्वर समगे, शेख जावेद, दत्ता सगर, अजय कबाडे, राहुल सातापुरे, बंटी कसबे, राहुल सुतार, सागर राठोड, नासिर शेख याबरोबरच काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऊसतोड कामगार महिलांच्या मृत्युबद्दल पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून दु:ख व्यक्त

(संग्रहित फोटो)

बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

लातूर : लातूर जिल्ह्यातील तुळशिराम तांडा ता.अहमदपूर येथे एका तलावात पाच ऊसतोड कामगार महिलांचा मृत्यु झालेल्या घटनेबद्दल लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबियांना जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत आणि सहकार्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

अहमदपुर तालुक्यातील तुळशिराम तांडा येथे तलावात कपडे धुण्यासाठी राधाबाई धोंडीबा आडे (४५), दीक्षा धोंडिबा आडे (२१), काजल धोंडिबा आडे (१९), सर्व रा. रामापूर तांडा, तालुका पालम जिल्हा परभणी व सुषमा संजय राठोड (२२), अरुणा गंगाधर राठोड (२६), रा मोजमाबाद तांडा ता.पालम . जि. परभणी येथील या ऊसतोड महिला कामगार गेले असता ही दुर्दैवी घटना घडली आहे.एकाच वेळी पाच महिलांचा मृत्यु झाल्याची ही घटना अत्यंत दुर्देवी आणि दुःखदायक आहे असे पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
मृत महिलांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची ईश्वराने शक्ती द्यावी अशी प्रार्थना करुन पालकमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 या दुर्देवी घटनेत मृत्यु पावलेल्या महिलांच्या कुटुंबियांना जिल्हा प्रशासनाने तातडीची मदत आणि सहकार्य करावे,असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

सेवानिवृत्ती बद्दल सोमवंशी कालिदास यांचा सन्मान सोहळा संपन्न

बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : सेवानिवृत्ती बद्दल सोमवंशी कालिदास यांचा सन्मान सोहळा संपन्न उदगीर प्रतिनिधी मराठा शिक्षण प्रसारक मंडळ या अंतर्गत चालणाऱ्या श्री विश्वनाथराव चालवा प्राथमिक विद्यालय उदगीर येथील हिंदी विषयाची सहशिक्षक कालिदास सोमवंशी हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.

 या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजाराम भोसले यांच्यासह विचारपीठावर शाळेतील शिक्षिका कुसुम फरकांडे व शिक्षक बालाजी सुवर्णकार उपस्थित होते याप्रसंगी शाळेच्या वतीने कालिदास सोमवंशी व त्यांच्या सुविद्य पत्नी आनीता सोमवंशी यांना शाळेच्या वतीने सन्मानपत्र व शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी बालाजी सुवर्णकार, कुसुम फरकांडे व यांची समयोचित भाषणे झाली. या प्रसंगी कालिदास सोमवंशी यांनी आपल्या सेवेच्या कालावधीत केलेल्या कार्याची माहिती दिली व यापुढेही मी शाळेच्या कार्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले मुख्याध्यापक राजाराम भोसले यांनीही कालिदास सोमवंशी यांच्या केलेल्या कार्याचा गौरव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 या कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका मीना गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका सुनिता तेलंग यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

'ओंजळ प्राजक्ताची' कवितासंग्रह पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 
           
उदगीर : येथील आयोजित 95 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनात केंद्रीय प्राथमिक शाळा गौंडगाव येथे प्राथमिक पदवीधर म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती वर्षा करंजे लिखित 'ओंजळ प्राजक्ताची' कवितासंग्रहाचे प्रसिध्द साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

व्यासपीठावर श्रीपाल सबनीस,कवियत्री वर्षा करंजे,श्रीमती अदिती टाकेकर,डाॅ.बालाजी संमुखराव व साहित्यिक उपस्थित होते.यावेळी अनेक रसिक उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत 'ओंजळ प्राजक्ताची 'कवितासंग्रहांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
        
कवितासंग्रह प्रकाशित झाल्यामुळे देवणी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व्यंकटराव बोईनवाड,शिक्षणविस्तारअधिकारी सुर्यकांत येडले,केंद्रप्रमुख केशव नरवटे,मु.अ.शिवाजी इंचुरे,जिल्हाध्यक्ष किशनराव बिरादार,तालुकाध्यक्ष शिवाजी टिळे व तालुक्यातील शिक्षक बांधवांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त भव्य कामगार मेळावा


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : धडक कामगार युनियन महासंघ आणि दैनिक मुंबई मित्र व वृत्त मित्र यांचे संपादक/संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेता अभिजीत राणे व त्यांच्या समुहाने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून कामगार संघटना, वृत्तपत्र समुह,सामाजिक कार्यकर्ते पत्रकार,यांचा भव्य-दीव्य नागरिक सत्कार गोरेगाव,आरे मुंबई येथे ठेवण्यात आला होता.

त्या निमित्ताने संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुहास राणे (संपादक साप्ताहिक प्रजेचे शिवराज्य, मासिक विर जनसेना, संभाजी ब्रिगेड कामगार संघटना, उपाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड चित्रपट आघाडी,उपाध्यक्ष) यांनी सामाजिककार्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना "महाराष्ट्र मित्र २०२२" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आद्य कवियत्री सावित्रीमाई फुले राष्ट्रीय पुरस्काराने सौ. विमलताई माळी व सौ. शांताबाई क्षीरसागर सन्मानित !


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : आद्य कवियत्री सावित्रीमाई फुले राष्ट्रीय पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील आधुनिक काळातील बहिणाबाई सौ. विमलताई माळी, अनगर व सौ . शांताबाई क्षीरसागर जेष्ठ कवियत्री यांना अखिल भारतीय माळी महासंघ आयोजित राज्यस्तरीय सर्व शाखीय परिचय मेळावा, अरण येथे सन्मानपत्र, विजयचिन्ह (पारितोषिक) पुष्पगुच्छ अखिल भारतीय माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. रोहिणीताई पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी सौ. विमलताई माळी* या शेतकरी कुटुंबातील इ.२ री शिकल्या असून त्यांच्या ६०० पेक्ष्या जास्त कविता तोंडपाठ आहेत. त्यांचा महाराष्ट्रमध्ये अनेक कवी संमेलन सामाजिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग असतो. त्यांना शासकीय स्तरावर महिला दिनानिमित्त कवी संमेलनात सहभागी केले जाते. अशा या कवियत्रीच्या कविता शासनाने प्रकाशित करून त्यांचा उचित सन्मान करावा. अशी मागणी लिंगे यांनी केली. सौ. शांताबाई क्षीरसागर यांचे बरेच कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. मराठी साहित्य संमेलनाच्या त्या सक्रीय सदस्या आहेत . त्यांचाही शासनाने उचित सन्मान करावा. अशी मागणी करून अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी पुरस्काराच्या मानकरी सौ. विमलताई सिद्राम माळी, सौ. शांताबाई व्यंकटेश क्षीरसागर यांना शुभेच्छा दिल्या. 

मंचकावरील विठ्ठल (आबा) तोडकर (लातूर), संजय इनामदार (सोलापूर), अमर बोराटे (पुणे), विलास माळी (ठाणे) संतोष गायकवाड (सोलापूर), भाऊसाहेब झगडे (सोलापूर), कैलास जामगडे (नागपूर), दादा महाराज वसेकर (सावता महाराज यांचे वंशज), गणेश वसेकर, दामू माळी, पोपट वसेकर, माजी सरपंच विजया वसेकर, शामल गोरे, गौतम क्षिरसागर (उस्मानाबाद), सोपान खारे इ. मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

आद्य कवियत्री सावित्रीमाई फुले राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने सौ. विमलताई माळी व सौ. शांताबाई क्षीरसागर यांचे सर्वत्र कौतुक, अभिनंदन, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन कार्यक्रम संपन्न



बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : मराठा शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाऱ्या श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालय उदगीर येथे महाराष्ट्र दिन नुकताच साजरा करण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक राजाराम भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडी मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच शाळेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुण पत्रकाचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

ईदगाह मैदानावर मंडप टाकण्याची जन परिवर्तन सेवाभावी संस्थेची मागणी


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : पवित्र रमजान ईद निमित्त उदगीर येथील इदगाह मैदानावर 'ईद उल फित्र' चा नमाज आदा करण्यासाठी मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र येतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने समाज बांधवांना नमाज आदा करताना उन्हाचा त्रास होण्याची शक्यता आहे.

या करिता संपूर्ण ईदगाह मैदानावर मंडप टाकण्याची मागणी जन परिवर्तन सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आली. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व शहरातील मुस्लीम समाजाच्या सर्व स्मशान भूमीची साफसफाई करण्याची ही मागणी उदगीर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे जन परिवर्तन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अझरोद्दीन शमशोद्दीन शेख यांनी केली आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्य मंत्री ना संजयजी बनसोडे यांना निवेदन दिले असता त्यांनी तात्काल उदगीर नगर परिषद प्रशासनास मंडप टाकण्या करिता आदेशित केले.

वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांचे स्वागत

बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : ढोल-ताशाचा गजर, सुमधुर वाद्यवृंद, फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी अशा मंगलमय वातावरणात ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आणि ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांचे उदगीर नगरीत स्वागत करण्यात आले.


संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. संजय बनसोडे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन भारत सासणे यांचे स्वागत केले.  
उदगीर रेल्वे स्थानक येथे सकाळी साडेसात वाजता भारत सासणे आणि त्यांच्या पत्नी मीना सासणे यांचे आगमन झाले. संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, मुख्य समन्वयक दिनेश सास्तुरकर, संमेलन समन्वयक रमेश अंबरखाने, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, सुभाष देशपांडे यांनी पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
   
ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांचे स्वागत करताना कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर. समवेत रमेश अंबरखाने, धनंजय गुडसूरकर, दिनेश सास्तुरकर आदी उपस्थित होते.

उदगीरीचा मुलुख साहित्यप्रेमींच्या प्रतिक्षेत! संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

बालाजी सुवर्णकार |सह्याद्री चौफेर 

उदगीर : अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी केवळ मराठवाडा, महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक आणि आंध्रप्रदेशचा सीमाप्रांतही सज्ज झाला आहे. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी म्हणून उदगीरच्या चौका चौकात कमानी सुशोभित करण्यात आल्या असून एकूण तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

ऐन एप्रिलच्या कडाक्याच्या उन्हात साहित्याचा थंडगार शिडकावा करणा-या या सम्मेलनाची धुरा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने आपल्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त पेलली आहे. महाविद्यालयाच्या एकूण 36 एकरच्या परिसरात व्यासपीठांसाह विविध दालने सुसज्ज करण्यात येत आहेत. त्यात आजवर झालेल्या 94 साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या छायाचित्रांचे तसेच नियोजित अध्यक्ष यांचे दालन हे वैशिष्ट्य आहे. याशिवाय भव्य मुख्य मंडपाला छत्रपती शाहू महाराज सभागृह असे नाव देण्यात आले आहे. तसेच येथील व्यासपीठाला उदयगिरी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉ. ना. य. डोळे व्यासपीठ म्हणून संबोधण्यात येणार आहे.

परिसंवादाचे दालन लोकनेते विलासराव देशमुख सभागृह म्हणून मिरवणार आहे. याशिवाय शांता शेळके कविकट्टा हा देवीसिंह चौहान सभागृहात तर सुरेश भट गझलकट्टा हा सिकंदर अली वज्द सभागृहात रंगणार आहे. याशिवाय ग्रंथ प्रकाशनाची तीन स्वतंत्र दालने, चित्र-शिल्प कलादालन, अभिजात मराठी दालन, बालमेळाव्याचे स्वतंत्र दालन अशा कित्येक दालनांच्या तयारीने वेग घेतला आहे.
उदगीर नगरीतल्या या साहित्यनगरीचे प्रवेशद्वार उदगीर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या प्रतिकृतीने स्वागताला सुसज्ज होत आहे. 
एखाद्या लग्नसोहळ्याला घरातील प्रत्येकाचा हातभार लागावा त्याप्रमाणे अगदी छोट्यातल्या छोट्या कर्मचा-यापासून मंत्र्यांच्या प्रत्यक्ष पाहणी दौ-यापर्यंतची लगबग येथे सुरू झाली आहे.

एकीकडे महाविद्यालयातील प्रवेशासाठी गर्दी करणारे विद्यार्थी त्याचवेळी संमेलनाच्या आयोजनासाठी राबणारी मंडळी अशा गोंगाटात पांढ-या स्वच्छ पडद्यांचे भलेमोठे सभागृह साहित्य सहवासासाठी आसुसले आहे. 
ग्रंथदिंडीचे वेगळेपण साहित्य संमेलनाची सुरूवात ग्रंथदिंडीने करण्याचा प्रघात आहे. यंदाची ग्रंथदिंडी तीन वैशिष्ट्यांच्या पालखीतून मिरवणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या सीमांना एकसंध करणारी ही ग्रंथदिंडी महिलांच्या नेतृत्वातील वाहन पथकाने नेतृत्व करणार आहे. यात 11 महिला बुलेटधारी असून स्कूटी पथकासोबतच घोडेस्वारी पथकातही महिलांचेच वर्चस्व राहणार आहे.

ग्रंथदिंडीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे 'गुगलविधी' होय. कर्नाटकातील गुगल नृत्यप्रकारानुसार विवाहापूर्वी वाजत गाजत, नृत्य करत देवतेची पूजा करण्याचा हा विधी या ग्रंथदिंडीत अनुभवायला मिळणार आहे.
मराठी भाषेच्या नवरसांची समृद्धी दर्शविणारी नवरंगदिंडी हे यावेळच्या ग्रंथदिंडीचे तिसरे वैशिष्ट्य. यात 500 शालेय विद्यार्थी नऊ रंगांच्या टोप्यांसह सहभागी होणार आहेत. याशिवाय ढोल, लेझीमसह वासुदेव, गोंधळी आणि अन्य लोककला सादर करणारे 150 कलावंतही ग्रंथदिंडी संमेलनाच्या उद्घाटनाला तयार रहाणार आहे.
शब्दोत्सवाचा आनंद घ्यावा : ना. संजय बनसोडे 
साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी, यशस्वीतेसाठी गेल्या तीन महिन्यापासून अनेक हात अहोरात्र झटत आहेत.

 नियोजन अंतिम टप्प्यात आले असून रासिकांनी संमेलनाला उपस्थित राहून शब्दोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. संजय बनसोडे ,. कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, मुख्य कार्यवाह रामचंद्र तिरुके, कोषाध्यक्ष प्रा.मनोहर पटवारी ,प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर.तांबोळी उपप्राचार्य डॉ.आर के मस्के यांनी केले आहे.

नांदेड येथील कवी व्यंकटेश काटकर यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीरचे निमंत्रण


सुवर्णकार बालाजी | सह्याद्री चौफेर 

उदगीर : 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे संपन्न होत असून सुवर्णकार समाजातील एक सेवानिवृत्त आदर्श शिक्षक कवी, साहित्यिक व्यंकटेश काटकर नांदेड यांचे रविवार, दिनांक 24 एप्रिल रोजी कवी कट्टयावर कविता सादर करण्यात येत असून ते मराठी साहित्य संमेलनात "माझ्या कशी विसरू मी आई" हि सुंदर कविता सादरीकरण करणार आहेत. तरी उदगीर परिसरातील सुवर्णकार समाज बांधव-भगिनींनी ही कविता ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बालाजी सुवर्णकर, विजय कुमार पेणुरकर, सुरेश आंबेकर, अमोल नखाते, सचिन पोदार , अच्युत पंडित, भागवत पोतदार, स्मिता पोतदार, अर्चना पेनुरकर, भारतीबाई रत्नपारखी, राजेंद्र रत्नपारखी, महानंदा सुवर्णकार, सारिका सुवर्णकार, सुरेखा केजकर इत्यादींनी केले असून त्यांच्या या कवितेच्या निवडीबद्दल सुवर्णकार समाजात सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे..

जयंतीनिमित्त विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयात भाषण स्पर्धा

 

बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : मराठा शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत चालणाऱ्या श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालय उदगीर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे औचित्य साधून भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राजाराम भोसले तर प्रमुख वक्त्या म्हणून लालबहादूर शास्त्री विद्यालयातील साहित्यिका तथा कवियत्री नीता मोरे व शाळेतील शिक्षिका श्रीमती अनुसया मोरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या जयंती प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांची भाषणे झाली व प्रमुख वक्त्या नीता मोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करून, डॉ.बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र अभ्यास करून आपण उज्वल यश संपादन करून उच्चपदावर स्थानापन्न व्हावेत असा मौलिक सल्ला दिला. प्रमुख पाहुणे अनुसया मोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोप प्रसंगी मुख्याध्यापक राजाराम भोसले यांनीही आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श घेऊन आपले जीवनमान उंचविवेत असेही ते म्हणाले . स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून शाळेतील सहशिक्षक श्री शिवाजी दाडगे व महेश जगळपूरे यांनी केले या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेतील सहशिक्षिका मीना गायकवाड यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वच शिक्षकांनी पुढाकार घेतला.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न.

बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे औचित्य साधून संत नरहरी सोनार सेवाभावी शिक्षण संस्था, संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघ उदगीर, सावित्रीबाई फुले महिला शिवणकला शिक्षण व प्रशिक्षण केंद्र उदगीर व टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक शंकर बोइनवाड यांच्या त्यांना साहित्यिकाचा कोल्हेवाडी चा बाजार या कवितासंग्रहाला नांदेड पुणे येथील पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल, संस्कार प्राथमिक विद्यालय उदगीर येथील सहशिक्षिका बालिका मुळे यांची इंडियन काँग्रेस ब्रिगेडबच्या महिला आघाडीच्या लातूर जिल्हाअध्यक्षी पदी निवड झाल्याबद्दल, प्रदीप ढगे यांनी मराठा सेवा संघात जिल्ह्यात उत्कृष्ट वक्ता म्हणून कार्य केल्याबद्दल व गणपतराव गादिया सर यांनी शैक्षणिक, सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. विश्वकर्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उदगीर चे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुधाकर दापकेकर यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी संचालिका महानंदा सुवर्णकार, रेश्मा वाडीकर, बालाजी सुवर्णकार, विश्वनाथे सर यांची उपस्थिती होती. उपस्थितांनी संस्थेचे विविध उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

 या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव तथा टीचर ग्रुप चेॲडमिन बालाजी सोनकर यांनी केले.

जनतेच्या विकासाचा निधी राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी आणि मनोरंजनासाठी उधळणार का - निवृत्ती सांगवे (सोनकांबळे)


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अर्थात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!या साठी महाराष्ट्र शासनाचा निधी दिला जातो. त्यासोबतच अनेक आमदारांनीही आपला निधी या साहित्य संमेलनासाठी दिल्याचे सांगण्यात आले आहे.

गोरगरीब जनतेच्या विकासासाठी आमदार खासदार यांचा निधी वापरायला पाहिजे, तो निधी उदगीर येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या मनोरंजनाचे कार्यक्रम आणि राजकीय मैदान गाजवणारे राष्ट्रवादीचे नेतेमंडळी हे आपल्या स्वार्थी राजकारणासाठी खर्च करणार का? हा मोठा प्रश्न आहे. यातून जनतेच्या विकासाचा पैसा मनोरंजन करणाऱ्या कलाकारांना वाटप करण्यात येत आहे. यात साहित्यिकांनाही फाटा दिला जातोय. हे अत्यंत दुर्दैवी आहे. राजकारण करण्यासाठी यांनी हे व्यासपीठ वापरायला नको होते,पण राजकारणी लोकांना मिळेल त्या व् व्यासपीठावर पोळी भाजण्याची सवय आहे
याठिकाणी फक्त आणि फक्त साहित्यिकांना संधी मिळाली पाहिजे, परंतु दुर्दैवाने साहित्यिकांना बाजुला ढकलुन राजकारणाचे मैदान गाजवण्याचे राष्ट्रवादीने ठरवले आहे.

या साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर आहेत तर स्वागत अध्यक्ष राष्ट्रवादीचे राज्यमंत्री संजय बनसोडे आहेत आणि उद्घाटक म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद चंद्रजी पवार साहेब आहेत!एकंदरीत हा राष्ट्रवादीचा महामेळावा आहे. असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही! जनतेच्या पैशाची उधळण राजकिय स्वार्थ साधण्यासाठी होत असलेल्या या कार्यक्रमाला महामहीम राष्ट्रपतींनी ही उपस्थिती लावायची ठरवली आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे साहित्य संमेलन साहित्यिकांचे आहे की राजकारण्यांचे ?असा मोठा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. असेही विचार विद्रोही साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक तथा राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी मांडले आहेत.
वास्तविक पाहता ग्रामपंचायती सारख्या स्थानिक स्वराज्य संस्था, आमदारांचा निधी, खासदारांचा निधी हा सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा साठी देण्यात आलेला असतो. हा निधी साहित्य संमेलनावर स्थानिक स्वराज्य संस्थांनी का उडवावा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची घोषणा संमेलनाच्या