Showing posts with label झरी जामणी. Show all posts
Showing posts with label झरी जामणी. Show all posts

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात दिलीप अलोणे यांचे प्रबोधन


योगेश मडावी | 

झरी : कोरोना काळात भयग्रस्त जीवन जगत असलेल्या गावकऱ्यांच्या मनावर नकलांच्या माध्यमातून हास्य फुलवता आले या निमित्त्याने लोककलेचा गुदमारलेला श्वास मोकळा झाला असे मत लोककलावंत नकलाकार डॉ. दिलीप अलोणे यांनी व्यक्त केले. श्रीमती लक्ष्मीबाई राजगडकर कला महाविद्यालयाच्या वतीने चारगाव येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरात लोकरंजन या कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, सभापती संजय पिंपलशेंडे, दिनकर पावडे, प्राचार्य बेले, सरपंच स्वप्ना नावडे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. दिलीप अलोणे व राम झिले या कलावंतांनी विविध नकलांच्या माध्यमातून लोकमनोरंजना बरोबर प्रबोधनही केले. गावकऱ्यांनी दाद देत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रम अधिकारी प्रा. ठमके यांनी या लोककलावंत यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार केला.

व्यसनात पैसे खर्च करण्याऐवजी मुलांच्या शिक्षणावर खर्च करा - नयन मडावी



योगेश मडावी | 

झरी : शेवाळा येथे गोंडराजे वीर बाबुराव शेडमाके यांची जयंती पावन पर्वावर मोठ्या ऊत्सवात शनिवारी (12 मार्च) साजरी करण्यात आली. त्या दरम्यान शिवचरित्रकार नयन मडावी शिंदोला यांचे वीर बाबुराव शेडमाके यांच्या क्रांतिकारी लढ्यावर व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानातून पालकांनी व्यसनात पैसे खर्च करण्याऐवजी मुलांच्या शिक्षणावर खर्च करा असे प्रतिपादन नयन मडावी यांनी केले.

ईतिहासाच्या पानांवर लुप्त पावत असलेले वीर बाबुराव शेडमाके यांच्या क्रांतिकारी लढ्यावर व्याख्यान करतांना नयन मडावी यांनी पालकांनी व तरुणांनी व्यसनमुक्त राहून आपले ध्येय गाठावे, पैसे दारूत वाया घालण्याऐवजी तेच पैसे आपल्या पोरांच्या शिक्षणासाठी खर्चिक करा आणि त्यांचं जीवन उज्वल करावे असे त्यांनी वक्तव्य केले. त्यावेळी कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य विजयभाऊ पिदूरकर, शेवाळा ग्रामपंचायतचे संरपच्या आञाम ताई, धनराज राजगडकर, गोपाल तुमराम, विनोद आत्राम, श्रीकांत कोडापे, मदन कोडापे तसेच शेवाळा येथील समस्त ग्रामवासीयाच्या उपस्थितमध्ये हा जंयती उत्सव आंनदी वातावरनात संपन्र झाल्याचे चिञ सर्व ग्रामस्थानी अनूभवले.

शिबला येथील कबड्डीच्या खुल्या सामन्याचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : शिबला येथील मित्र क्रीडा मंडळाच्या वतीने हनुमान करपते यांचे पटागणावर भव्य कबड्डीचे खुले सामने आयोजीत करण्यात आले होते.कबड्डी सामन्याचे उद्घाटन मा.आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार साहेब यांचे हस्ते करण्यात आले.

उद्घाटनाला मा.सुरेशभाऊ बोलेंवार प.स.सभापती मा.राजुभाऊ गोंड्रावार प्रिया भोयर ,धर्मा आत्राम मा.पांडुरंगभाऊ पोयाम अ.भा.आदिवासी विकास परिषद तालुका अध्यक्ष, शिबला शाखा अध्यक्ष प्रकाश मेश्राम, अजय कोवे, सीताराम तलांडे, विशाल आत्राम, हनुमंत मडावी, मधूकर मडावी, अजय नेहारे, मंगल पु साम, नामदेव आडे, बंडू आडे, विदेश मेश्राम,शामराव सोयाम, श्रावण गेडाम, बळीराम कोडापे, केलास मडावी,उमेश परत म , गंगाधर मडावी, विलास मरस्कोले, विनोद आत्राम, यांचे उपस्थित करण्यात आले आणि बक्षीस वितरण कार्यक्रम श्री पांडुरंग भाऊ पोयाम अ. भा.आदिवासी विकास परिषद तालुका अध्यक्ष यांचे उपस्थितीत प्रथम पुरस्कार जय पेरसापेन मंडल कटलीबोर गाव तीस हजार रुपये,मां. आमदार संजीव रेड्डी बोदकुर्वार साहेब, सुरेश भाऊ बोलेन वार यांचे कडून द्वीतिय पुरस्कार जय बजरंग मंडल पारडी बी. वीस हजार रुपये, राजू भाऊ गोंड्रावार प.स.सभापती दीपक राय व कपिल कुंघाटकर यांचे कडून, तृतीय पुरस्कार मित्र क्रीडा मंडळ शिबला पंधरा हजार रुपये, वनविभाग शिबला वीरेंद्र पवार, व धन सिंग गाहरवाल,स्वप्नील कोडापे यांचे कडून, चतुर्थ पुरस्कार जय परसापेन मंडल दाभाडी (लहान) दहा हजार रुपये, अजू कोवे यांचे कडून देण्यात आले.

या कबड्डी वितरणाच्या कार्यक्रमाला मित्र क्रीडा मंडळाचे पदाधिकारी अजय नेहारे, व प्रकाश मेश्राम, सूरज शिडाम, गजानन मेश्राम, शुभम कुळसंगे, मारोती मडावी, रामप्रसाद कोडापे आणि ग्रामवासी शिबला यांचे सहकार्य लाभले. कबड्डी स्पर्धेत संचालन प्रभुदास सुरपाम यांनी तर आभार प्रदर्शन विशाल आत्राम यांनी केले.

ब्रिटिश कालीन मैलकुली नामशेष; झरी जामणी तालुक्यात एकही मैलकुली नाही


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : ब्रिटिश सरकारच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील सार्वजनिक रस्त्यांची देखभाल करण्याकरिता मैलकुलीची या पदाची निर्मिती केली गेली. मात्र गेल्या दहा वर्षांपासून या पदाची भरतीच बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात व तालुक्यात विविध रस्त्यांच्या डागडुजीचे काम मैलकुली करीत होते. तुटपुंज्या पगारावर काम करीत असलेल्या मैलकुली आता काळाच्या ओघात नामशेष झाल्यागत आहे. 

एकेकाळी तालुक्यातील विविध सार्वजनिक रस्त्यावर काम करणारे पंधरा मैलकुली होते. त्या मैलकुली चा एक प्रमुख असायचा त्याला "मेट" असे म्हणत होते. हा मेट मैलकुली कडून डागडुजी व रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या झाडे झुडुप कटाईची कामे करून घेत होता. आता झरी जामणी तालुक्यात एक ही मैलकुली नाही. पूर्वी हे मैलकुली विविध संकटांना सामोरे जात इमानेइतबारे रस्त्यांची देखभाल करीत होते. त्या काळात केवळ तीन ते चार हजार रुपये पगारावर नोकरी करीत रस्त्याची डागडुजी करत होते.

कंत्राटदारामार्फत रस्त्याच्या डागडुजीची कामे

हल्लीच्या काळात रस्त्यांच्या डागडुजीचे काम कंत्राटदारामार्फत करण्यात येते. त्यामुळे जिल्हा परिषदेने पद भरणे बंद केले. त्याकाळी मैलकुलींना केवळ तीन ते चार हजार मानधन मिळत होते. तुटपुंज्या पगारात मैलकुली रस्त्याची डागडुजी करीत होते. त्याचप्रमाणे रस्त्याच्या आजूबाजूला वाढलेली झाडे झुडपे तोडून रस्ता सुव्यवस्थित करीत होते. आता मात्र ग्रामीण भागाला जोडण्यात येणाऱ्या रस्त्यांची डागडुजी होत नाही. परिणामी रस्ते खड्डेमय झाले आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत शहरी भागाला लागून असलेल्या गावांना शहराला रस्त्याच्या मार्फत जोडण्यात आले. सर्व गावांना रस्ते देण्यात आली. डांबरीकरण करण्यात आलेली रस्ते आता मात्र खड्डेमय झाले आहेत. मैलकुलींची संख्या कमी असल्यामुळे रस्त्याची डागडुजी करण्याकरता प्रशासनाला देखील वेळ नाही. जनतेची मागणी असेल तरच प्रशासनाला जाग येते अन्यथा प्रशासन झोपेत असल्याचे चित्र सध्यास्थितीत दिसून येत आहे.

तुटपुंज्या पगारातही केले काम 

१९९० ते २००० या काळात मैलकुली म्हणून तुटपुंज्या पगारात कामे केली. मला केवळ सुरुवातीला एक हजार दोनशे रुपये मानधन मिळत होते. दहा वर्षापूर्वी २०१३ मध्ये सेवानिवृत्त पूर्वी वेळेस मला सोळा हजार रुपये मिळायचे. आमच्या कालावधीत रस्त्याची डागडुजी मोठ्या प्रमाणात  होत होती. आता मात्र, कंत्राटदारामार्फत रस्त्यांची डागडुजी केली जाते. इमानदारीने सेवा देत निवृत झालो आहे.

-गोविंदा गोवारदिपे
सेवानिवृत्त मैलकुली,मुकूटबन.


२१ वर्षांत शेतकऱ्यांना थेंबभरही पाणी मिळाले नाही; शेतकरी म्हणतात, जमीन पूर्ववत करून द्या!


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : आदीवासीबहुल तालुक्यातील अहेरअल्ली या गावातील शेतकरी तब्बल २१ वर्षांपासून धरणाच्या पाण्यासाठी तरसले आहेत. सतपल्ली पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरी (पोड) धरणातून या लोकांना पाणी तर मिळालेच नाही, पण त्यांच्या जमिनी सुध्दा वाया गेल्या आहेत. अहेरअल्ली येथील शेतकरी म्हणतात जमीन पूर्ववत करून देण्यात याव्यात.

‘सरकारी काम अन् एक वर्ष थांब’ असं शासकीय कार्यालयांच्या बाबतीत नेहमीच बोललं जातं. परंतु एक वर्ष नाही तर २१ वर्षांपूर्वी येथे लघु पाटबंधारे विभाग पांढरकवडा व्दारे सतपल्ली जवळील उमरी येथे धरण बांधण्यात आले. उजवा आणि डावा, असे दोन कालवे तयार करण्यात आले. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्या. शेतांमध्ये खोदकाम करून कालवे काढण्यात आले. पण तेव्हापासून आजता गायत एक थेंबही पाणी अहेरअल्लीतील शेतकऱ्यांना मिळालेले नाही. कालवे मात्र प्रत्येकाच्या शेतात खोदून ठेवलेले आहेत. त्यामुळे गेल्या २१ वर्षांपासून तेथे पीक घेता येत नाही. आधी आमचे वडील आणि आता आम्ही दरवर्षी नुकसान सोसतोय.

शेत पूर्ववत करून द्या!

आम्ही स्वतः कालव्यात गेलेली जमीन पूर्ववत करतो म्हटलं, तर लाख रुपयांच्यावर खर्च लागेल आणि हा खर्च करण्याच्या परिस्थितीत आम्ही नाही. गेल्या २१ वर्षांत धरणाचे पाणी मिळू शकले नाही, ते आता मिळण्याची शक्यताही पूर्णतः मावळली आहे. त्यामुळे मायबाप सरकारला विनंती आहे की, नका देऊ पाणी, पण आमचे शेत पूर्ववत करून द्या. धरणात लिकेज झाल्यामुळे तेथे पाणी शोधूनही सापडत नाही. त्यामुळे जे धरणातच नाही ते आमच्या शेतात कसे येणार, असा प्रश्‍न वैभव राऊत, रिवास भोयर, रोहित राऊत या शेतकऱ्यांनी केला आहे.

मत्स्य उत्पादनही नाही

धरणात पाणी तर नाही, पण जमिनीही गेल्या. धरणात मत्स्य उत्पादनाचेही नियोजन केले गेले होते. मच्छीमार संस्थेने तशी तयारीही केली. पण धरणात पाणीच टिकत नसल्यामुळे त्यांचेही मोठे नुकसान झाले. धरणासाठी जमिनी घेतल्या तेव्हा परिसर सुजलाम सुफलाम होईल, असे चित्र रंगवण्यात आले होते. पण काहीच झाले नाही. मग या प्रकल्पातून साध्य काय झाले तर, संबंधितांनी थातूरमातूर प्रकल्प उभारला आणि आपले उखळ पांढरे करून घेतले. आज या प्रकल्पावर एक कर्मचारीसुद्धा नाही, असे हितेश राऊत म्हणाले.

झरी जामणी तालुक्यात पोलीओ लसीकरण, प्रत्येक गावात सरपंच व पदाधिकारी कडून पोलिओ डोस पाजून उदघाटन!


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत रविवारी (ता.२७) ० ते ५ वर्षे वयोगटातील ४८३० नोंदणी बालकापैकी ४१४१ बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आली एकूण ८६ टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले.

तालुक्यातील प्रत्येक गावाला सरपंच व पदाधिकारी कडून प्रथम पोलिओ डोस पाजून उदघाटन करून सुरवात झाली. मुकूटबन येथे सरपंच मीनाताई आरमुरवार यांचे हस्ते लसीकरण ला सुरुवात झाली तर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मांडवी येथे पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार कडून सुरुवात झाली. 

झरी तालूक्यात झरी (जामणी), शिबला व मुकूटबन असे ३ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. पोलिओ डोस पासून एक ही बालक वंचित राहू नये यासाठी तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम यांनी रुग्णवाहिकेत साऊंड सर्व्हिस लावून स्वतः प्रत्येक गावात रस्त्यावर उतरून शनिवारी प्रचार केला. प्राथमीक आरोग्य केंद्र झरी जामणी येथे १७०३ बालकापैकी १४७७ बालकांना ८८ टक्के, प्राथमिक आरोग्य केंद्र शिबला येथे १०३६ बालकापैकी ८६६ बालकांना ८४ टक्के, प्राथमीक आरोग्य केंद्र मुकूटबन येथे २०९१ बालकापैकी १७९८ बालकांना ८६ टक्के, असे एकूण झरी जामणी तालुक्यात ४८३० अपेक्षीत बालकापैकी ४१४१ बालकाना पोलिओ लस देण्यात आली. अपेक्षित बालकांची ८६ टक्केवारी झाली.

तालुक्यात १२३ पोलिओ बूथ, २६४ कर्मचारी, पर्यवेक्षक, ३१ मोबाईल पथक ४ व फिरते पथक ५ कार्यरत होते. तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम यांनी आकस्मिक भेट देऊन बुथांची पाहणी करून पोलिओ डोस पासून एक ही बालक वंचीत राहू नये अश्या सूचना बुथ कर्मचाऱ्यांना दिल्या. आरोग्य विभागाच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. लसीकरण सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू होते.

झरी (जामणी), मुकूटबन, शिबला, पाटण, माथार्जून व ईतर ठिकाणी बसस्टँड वर बूथ होते व प्रत्येक गावात आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, नितीन मनवर यांचे स्काऊट यांनी लहान मुलांना पोलिओचा लाभ दिला.

तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली मुकूटबनचे वैद्यकीय अधिकारी अरविंद वानखेडे, जीवन कुळमेथे, शिबलाचे वैद्यकीय अधिकारी ज्योती मगर यांनी चोख व्यवस्था ठेवली होती. प्रत्येक आरोग्य केंद्राअंतर्गत गावात फिरते पथक, मोबाईल पथक कार्यरत होते.

तुटणाऱ्या लग्नाच्या मुकूटबन पोलिसांनी बांधल्या रेशीम गाठी


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : पोलीसाचे नाव येताच सर्व सामान्यांच्या मनात धडकी भरते. पोलिसांची प्रतिमा जनतेच्या मनात तितकीशी चांगली नाही. मात्र मुकूटबन पोलिसांचं सामाजिक रुप पाहायला मिळालं. जवळपास मोडलेलं लग्न पोलिसांनी परत जुळवून वधू वराच्या रेशीम गाठी बांधल्या. त्यामुळे मुकूटबन पोलिसांचे परिसरात कौतुक होत आहे. 

झरी जामणी तालुक्यातील लहान पांढरकवडा येथील बौध्द समाजाचे पंचफुलाबाई राजू आनंदराव वाळके यांची द्वितीय कन्या सपना व मारेगाव तालुक्यातील आकापुर येथील भावनाताई गौतम डेपुटी भरणे यांचे चिरंजीव प्रकाश या दोन्ही परिवारात दोन महिन्यांपूर्वी लग्नाचे नाते जुळले होते. काही पारिवारिक कारणांमुळे हे नाते तुटण्याच्या मार्गावर आले. त्यामुळे दोन्ही कुटुंबांत वितुष्ट निर्माण झाले. वडील हयात नाही मुलीच्या आईची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. लग्न मोडले तर मुलीचे काय होणार, या भीतीने त्यांची चिंता वाढली. त्यानंतर मुलीकडील आप्त संबंधातील माणसे घरी बैठक घेऊन बसले. यानंतर मुलीची आई पंचफुलाबाई, मुलगी सपना, सरपंच मधुकर राजूरकर, सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे, अनिल पावडे व नातेवाईक शनीवारी (ता. २६) मुकूटबन पोलीस ठाण्यात पोहोचले. 

सपनाची आई पंचफुलाबाई वाळके हिने आपली कैफियत ठाणेदार अजीत जाधव व पोलीस उप निरीक्षक अनिल सकवान यांचे समोर मांडली. कैफियत ऐकल्यानंतर ठाणेदार अजीत जाधव यांनी मारेगाव तालुक्यातील आकापुर येथील भरणे परिवाराला मुकूटबन ठाण्यात येण्यास सांगितले. हे दोन्ही परिवार एकत्र आल्यानंतर प्रकाश व त्यांच्या कुटुंबियाची ठाणेदार अजीत जाधव व पोलीस उप निरीक्षक अनिल सकवान यांनी दुपारी १२:०० ते ६:०० वाजेपर्यंत दोन्ही परिवाराचे समुपदेशन करून समजूत काढली. अखेर नवरदेव प्रकाश व भरणे परिवार तयार झाले. दुसरे दिवशी विवाहाचा विधी उरकण्याची तयारी सुरू झाली. या कार्यास लागणारा सर्व खर्च मुलामुलींना कपडे, मंगळसूत्र, जोडवे, हारतुरे, मिठाई व अल्पोपहारचा खर्च वाळके परिवार कडून करण्यात आला. शेवटी दोन्ही पक्षाच्या वऱ्हाडीच्या साक्षीने रविवारी संध्याकाळी ७:३० वाजता लहान पांढरकवडा येथे वधू मुक्कामी मंडपात विवाह सोहळा पार पडला. 

बौध्द समाजाचे रितिरिवाज प्रमाणे मंगलाष्टके झाली, फुलांच्या अक्षता पडल्या, दोघांनी एकमेकांच्या गळ्यात माळ टाकली. हा अविस्मरणीय प्रसंग मुकूटबन पोलिस ठाण्याचे ठाणेदार अजीत जाधव व पोलीस उप निरीक्षक अनिल सकवान यांच्या समुपदेशन ने पार पडला. पोलीस उप निरीक्षक अनिल सकवान, पोलिस कर्मचारी मंगेश सलाम, दिलीप जाधव, संदीप बोरकर, संजय खांडेकर, संदीप कुमरे, सरपंच मधुकर राजूरकर, सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे, व दोन्ही पक्षाकडील वऱ्हाडांच्या साक्षीने वधू-वर लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन संपन्न


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : यवतमाळ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या तेजापूर येथे शनिवारी (ता. २६) ला विविध भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमापूर्वी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार त्यांचे गावातील मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

तेजापूर ते निंबाळा व देऊरवाडा या गावाला जाण्यासाठी नागरिकांना सोयीचे व्हावे त्यासाठी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार स्थानिक फंडातून पुलांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य मंगलाताई पावडे, माजी सभापती लीलाताई विधाते, दिनकर पाटील पावडे, सरपंच चंद्रभागा सहारे, आशु पानघाटे, गजानन मालेकर, आशिष मालेकार , भैयाजी भोयर, आशिष उमाटे, सचिन झाडे, मधुकर धांडे, कानोबा झाडे, गणेश काकडे ,छगन मालेकर, अमोल सहारे, व इतर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, गावकरी मोठ्या संख्येने हजर होते.

स्काऊट गाइड कडून पोलिओ लसीकरणला मदत

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : हिंदुस्थान स्काऊट आणि गाइड च्या वतीने पोलिओ लसीकरण मोहीमेला यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन येथे रोव्हर अँड रेंजर च्या समूहाने आरोग्य केंद्र मुकूटबन येथे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे मदत केली.

हिंदुस्थान स्काऊट गाइड चे जिल्हा सचिव नितीन मनवर, गाइड ऋतुजा देवाळकर, गाइड स्नेहा जेट्टीवार, गाइड संजीवनी जंगमवार, गाइड वैष्णवी चेलपेलवार, गाइड दिशा केळझरकर, गाइड श्रद्धा बेंद्रे, स्काऊट गौरव निब्रड, महेश टेकाम यांनी यांनी सेवा दिली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी अरविंद वानखेडे, डॉ. जीवन कुडमेथे, नर्स भावना भेतफुलावर, आशा वर्कर शोभा मेश्राम, राधा लिकेवार, शोभा गड्डेवार, संतोष उमरे, स्वप्नील कडुकर हे होते. तर महाराष्ट्र अध्यक्ष नरसिंगजी मेंगजी तथा महाराष्ट्र सचिव गोपालराव डोंगरे यांच्या मार्गदर्शनात सहकार्य करून सेवा देण्यात आली.

आश्रमशाळा माथार्जुन येथे चाळीस आदिवासी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : आश्रमशाळा माथार्जुन येथे ४० आदिवासी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. मा प्रकल्प अधिकारी यांच्या पुढाकाराने प्रकल्पातील सर्व आश्रमशाळेवर एकाच दिवशी आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत जात प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्धार मा प्रकल्प अधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केला होता,त्या अनुषंगाने आश्रमशाळा माथार्जुन येथील मुख्याध्यापक,शिक्षक यानि पालकांशी संपर्क साधून,घरोघरी जाऊन आवश्यक प्रमाणपत्र गोळा करून जवळपास ४० प्रस्ताव दाखल केले आणि अगदी ३ ते ४ दिवसात जात प्रमाणपत्रे तयार झालित यासाठी झरी तहसील चे तहसीलदार यांनी कर्मचाऱ्यांना विशेष आदेश देऊन अगदी कमी कालावधीत काम पूर्ण करून घेतले,विशेष म्हणजे पालकांना कोणत्याही प्रकारचे शुल्क पालकांना भरावे लागले नाही, झेरॉक्स (xerox) सुद्धा आश्रम शाळेकडूनच काढून दिल्या गेल्या अत्यंत कमी कालावधीत पूर्णपणे मोफत जात प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना मिळाली याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून याचे परिसरात विशेष कौतुक होत आहे.

या साठी प्रभारी मुख्याध्यापक श्री सोनोने,शिक्षक श्री नागोसे,क्रीडाशिक्षक श्री साजिद सर,संगणक शिक्षक श्री भिवरकर ,शिपाई श्री मारोती सीदाम चोकीदार महेश परचाके यांनी विशेष मेहनत घेतली.

दिग्रस येथे मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी शिबीर संपन्न

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी जामणी : असंघटित कष्टकऱ्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी, श्रमजीवींना सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी तसेच सरकारकडून राबविल्या जाणार्‍या विविध योजनांचा लाभ कष्टकऱ्यांना मिळावा यासाठी झरी जामणी तालुक्यातील दिग्रस ग्रापमपंचायतीचे सरपंच तथा सरपंच सेवा संघाचे तालुका अध्यक्ष निलेश येल्टीवार यांनी असंघटित कामगारांची ई-श्रम कार्ड नोंदणी निःशुल्क करून दिली.

लहान व सिमांत शेतकरी, शेतमजूर, सुतार, कुंभार, न्हावी, पशुपालन करणारे, रस्त्यावरचे विक्रेते, बांधकाम कामगार, दुध उत्पादक, लेदर कामगार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, ऑटो चालक, गवंडी, लोहार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन व ईतर श्रमजीवी काम करणाऱ्या कामगारांना कामाच्या मोबदल्या व्यतिरिक्त कोणतेही लाभ मिळत नाहीत. त्यांनाही सामाजिक सुरक्षा मिळावी व विमा योजनांचा लाभ मिळावा याकरीता सरपंच निलेश येल्टीवार यांनी त्यांच्या दिग्रस गावात ई-श्रम कार्ड नोंदणीच्या माध्यमातून असंघटित कामगारांना संघटीत केले.

नगर पंचायत अध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : आज उपविभागात नगर पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. झरी, मारेगाव नगराध्यक्ष पदासाठी सोमवारी निवडणूक झाली. त्यात नगर पंचायत अध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेने आपले उमेदवार अध्यक्ष पदावर विराजमान झाले तर झरी येथे जंगोमने उपाध्यक्ष पदी बाजी मारली तर मारेगाव नगरपंचायत मध्ये भाजप चा उमेदवार उपाध्यक्ष पदी. त्यामुळे उपविभागात शिवसैनिकात आनंदाचे वातावरण आहे.
         (मारेगाव नगरपंचायतचे विजयी उमेदवार)

विशेष म्हणजे भाजप व काँग्रेसचे बाहुबल्य असलेल्या झरी येथे शिवसेनेची ही कामगिरी मोठी मानली जात आहे. तीच कामगिरी मारेगाव येथेही पाहायला मिळाली. झरी नगर पंचायतीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे ज्योती बिजगूनवार तर प्रथमच सत्तेत आरूढ झालेले जंगोमचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोडापे हे विजयी झाले.

सगळ्यांचे लक्ष लागलेले मारेगाव नगर पंचायतीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे डॉ मनिष मस्की तर उपाध्यक्ष पदी हर्षा महाकुलकर (भाजप) ह्या ईश्वर चिट्ठीने विजयी झाल्या. अत्यंत चुरशीच्या नगर पंचायत अध्यक्ष निवडणुकीत शिवसेना सत्तेत बसली. परंतु  काँग्रेस अधिक मताने असून सुद्धा सत्तेबाहेर राहिली. हा चर्चेचा विषय ठरला. शिवसेनेने नगर पंचायतींमध्ये मिळवलेले हे यश भविष्यात भाजप आणि काँग्रेसला धक्कादायक ठरले आहे.

या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दिवस-रात्र एक करून ही आपला जलवा दाखवू शकली नाहीत. त्यामुळे भविष्यात काँग्रेस ला उपविभागात चिंतनाची गरज आहे.

लांडगी येथे शाखा व फालकाचे अनावरण संपन्न


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : तालुक्यातील लांडगी येथे दिनांक २१ नोव्हेंबर रोज रविवारला समाज मंदिर चावडी परिसरात शामा दादा कोलाम समाजाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,यावेळी बोर्डाचे अनावरण व शाखा स्थापन करण्यात आले.

या प्रसंगी उद्धघाटक मा श्री राहुल भाऊ आत्राम यवतमाळ जिल्हा अध्यक्ष व कायक्रमाचे अध्यक्ष तुकारामजी आत्राम, सल्लागार समिति अध्यक्ष झरी तालुका व उपाध्यक्ष सुदर्शन भाऊ आत्राम, मा.श्री.गणेश दादा आत्राम जिल्हा - सचिव, मा.श्री. सुरेश मुंडाले साहेब वनरक्षक पांढरकवडा, मा.श्री.कैलासजी आत्राम, ता.अध्यक्ष झरी संजय भाऊ आत्राम, कोषाध्यक्ष झरी तालुका व सामाजिक कार्यकरता झरी तालुका मा.श्री.अक्षयभाऊ आत्राम, घाटंजी तालुका अध्यक्ष, मा.श्री.पांडूजी आत्राम, उपाध्यक्ष झरी मा.श्री. अर्जुन दादा आत्राम, उपाध्यक्ष घाटंजी मा.श्री.देवाजी टेकाम,
मा.श्री. विजयभाऊ ढोबरे बाभूळगाव ता.सचिव,
मा.श्री. दिलीपभाऊ मलांडे उपाध्यक्ष कळंब,
सचिव झरी मा.सौ.जयाताई संतोष मेश्राम, सरपंच लांडगी/गवारा, मा.श्री.हरिभाऊ रामपूरे सामाजिक कार्यकर्ते, मा.श्री.गंगाधरजी आत्राम सरपंच मांडवा, मा.श्री.किशोर भोनुजी मेश्राम सामाजिक कार्यकर्ते लांडगी, महाजन - मा. अय्याजी टेकाम,
घटया - मा.मारोती टेकाम, कारभारी - मा.पांडुरंग मडावी, पुजारी - मा. जंगा मडावी, शाखा अध्यक्ष - दिलीप कुमरे,शाखा उपाध्यक्ष - मा.पुंजाराम मडावी,
सचिव - मा.विष्णु मडावी, कोषाध्यक्ष - मा.अंकुश टेकाम आणि गावातील बंधू भगिनी युवक विद्यार्थी व गवारा या गावातील सामाजिक कार्यकर्ते रमेशजी किलचटवार, माजी सरपंच (सामजिक कार्यकर्ते व ग्राम पंचायत सदयस) संदीप भाऊ भोयर सामजिक कार्यकर्ते, संजय भाऊ कुरमचेट्टीवार सामजिक कार्यकर्ते (ग्राम पंचायत सदस्य) तसेच शाखा स्थापण व अनावरण सोहळा खालील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

खनिज संपत्तीचे वरदानच ठरत आहे घातक,कोळशाचे प्रदूषण आरोग्यासाठी घातक


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी जामणी : झरी जामणी तालुक्यातील टॉपवर्थ ऊर्जा अँड मेटल पॉवर लिमिटेड पांढरकवडा (लहान) येथील कोळसा खाणींमुळे प्रदूषणाची समस्या गंभीर झाली असून खनिज संपत्तीचे वरदानच लहान पांढरकवडा, अर्दवन, भेंडाळा, रूईकोट, मुकूटबन, गणेशपुर, नेरड व परीसरातील काही ग्रामवासियांसाठी घातक ठरत आहे. हवेतील कोळशाच्या थरात वाढ झाली असून ती आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे दमा, त्वचा संबं‌धीत रोग, कॅन्सर यासारख्या गंभीर आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

झरी जामणी तालुक्यात दोन खुल्या कोळसा खाणी आहेत. या खाणींमधून रोज शेकडो टन कोळसा उत्पादन घेतले जाते. भूमिगत कोळसा खाणी असुरक्षित म्हणून खुल्या कोळसा खाणी अस्तित्वात आल्या. परंतु टॉपवर्थ ऊर्जा अँड मेटल पॉवर लिमिटेड पांढरकवडा (लहान) येथील कोळसाखाण प्रदूषणाच्या दृष्टीने घातक ठरू लागली आहे. खुल्या कोळसा खाणींमधून जास्त कोळशाचे विक्रमी उत्पादन निघत असताना या परिसरात सुरुवाती पेक्षा प्रदूषणाच्या बाबतीत वाढीचा उच्चांक गाठत असल्याचे समोर येत आहे. लहान पांढरकवडा येथील कोळसा कंपनीत आठ वर्षांपासून कोळसा उत्खनन चालू असून कोळशाच्या धुळीमुळे वाढणारे प्रदूषण आणि कोळशाच्या जड वाहतुकीमुळे रस्त्यांची होणारी दुर्दशा गंभीर समस्या बनली आहे. प्रदूषण होऊ नये म्हणून रुईकोट ते मुकूटबन पर्यंत रस्त्यांवर पाणी न टाकणे, कोळसा उत्खनन करून काढण्याच्या प्रक्रियेने जमिनी खालील पाण्याची पातळी खाली जात आहे, सुरुंग स्फोटांमुळे घरांना तडे जाणे, धुळीने पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. कोळसा खाणीतील काळे पाणी अर्धवन च्या नाल्याला सोडल्याने ते दूषित पाणी जनावरांना प्यावे लागत आहे. कोळसा कंपनीने कुठेही दवाखाना तयार केला नसून इथे रुग्णवाहिका सुध्दा उपलब्ध नाही. आरोग्य शिबीर घेतले जात नाही. ग्रामीण मार्गावर वृक्षारोपण केले नाही. लोकांनी वारंवार लिखीत व तोंडी तक्रारी करूनही आरोग्य संबधी समस्या सोडविल्या जात नाही.

आरोग्याच्या गंभीर समस्या खाणप्रवण क्षेत्रातील नागरिकांना भेडसावत आहेत. या समस्या ‘जैसे थे’ च आहेत. या कोळसा खाणीवर वेळोवेळी टीकेची झोड उठली. पण त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्नच झाला नाही. केवळ विक्रमी उत्पादन काढण्याचा सपाटा जारीच आहे. पण त्यात आरोग्याकडे, सामाजिक समस्यांकडे व प्रदूषणाकडे मोठे दुर्लक्ष होत आहे. या खाणींमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून खाणीने प्रदूषण नियंत्रणा संदर्भात निकष पाळले नाहीत हे विशेष. वायू व जल प्रदूषणाने उच्चांक गाठल्याचे समोर येत आहे.

कोळसा कंपनी बाबत नागरिकांची सतत नाराजी:
कोल वॉशरी प्रकल्पाची पर्यावरण जनसुनावणी ११ फेब्रुवारी २०२० ला प्रादेशिक प्रदूषण निगम मंडळ अधीकारी चंद्रपूर मधुकर लाड यांच्या उपस्थीतीत घेण्यात आली होती. प्रास्तवित कोल वॉशरी प्रकल्पाला पांढरकवडा (लहान), मार्की, भेंडाळा, अर्धवन या ग्रामपंचायतीनी विरोध करीत हा प्रकल्प होऊ नये यासाठी चार ग्रामसभेचे ठराव सादर करण्यात आले होते. लहान पांढरकवडा येथील कोळसा कंपनीचे आठ वर्षांपासून उत्खनन सुरू आहे. परंतु या कंपनीचे अधिकाऱ्यांनी परिसरातील जनातेसोबत विकासात्मक समन्वय केव्हाच ठेवला नाही. कार्यरत अधिकारी अरेरावीची भाषा वापरतात यावरून या कोळसा कंपनी बाबत परिसरातील नागरिकांची सतत नाराजी उघडपणे स्पष्ट होते.


"कोळसा कंपनी विरुध्द आंदोलनाचा इशारा.
पांढरकवडा (लहान) पासून मुकुटबन, गणेशपुर, नेरड परिसरात कोळसा खाणीमुळे संपूर्ण परिसरात प्रदूषण केले आहे. मानवाचे हाडे दिवसेंदिवस ठीसुळ होत आहे. कोळशाच्या धुळीमुळे खाज, पोटाचे विकाराने जनता त्रस्त असून अनेक व्याधींनी ग्रस्त आहे. यात कोळसा वाहतूक करणारी कंपनी रस्तावर पाणी मारत नाही. प्रादेशिक प्रदूषण निगम मंडळ चंद्रपूर चे यावर कोणतेही नियंत्रण नसुन कसल्याच प्रकारची कारवाई करत नाही. या प्रदूषणाच्या विरोधात येत्या काही दिवसात या कंपनी विरुध्द भव्य अदोलन करू."
~मंगेश पाचभाई अडेगाव,
जनसेवक (सामाजिक युवा कार्यकर्ते)


"प्रदूषण निगम मंडळाचे नियंत्रण नसून कंपनीला वरदान
टॉपवर्थ ऊर्जा अँड मेटल पॉवर लिमिटेड पांढरकवडा (लहान) येथील कोळसा कंपनीसोबत चंद्रपूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मिलीभगत असल्यामुळे या कंपनीकडे दुर्लक्ष आहे. प्रदूषण निगम मंडळाचे नियंत्रण नसून या कंपनीला वरदानच दिले आहे त्यामुळे ही कंपनी कोणालाही जुमानत नाही. प्रदूषण नियंत्रणा संदर्भातील निकषानुसार येथील कोळसा कंपनी नियमाचे पालन करीत नसल्यामुळे चंद्रपूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर लक्ष केंद्रित करून कठोर कारवाई करण्यात यावी."
- नारायण गोडे
कोसारा, समाज सेवक वणी मतदार संघ.

मिशन कवच कुंडल मोहिमेअंतर्गत लसीकरण आपल्या दारी


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

मुकूटबन : मिशन कवच कुंडल या मोहिमेअंतर्गत भारतात 'लसीकरण आपल्या दारी' अभिनव उपक्रम, १६ जानेवारी २०२१ पासून राबवण्यात येत आहे. तर झरी जामणी तालुक्यात १३ मार्च पासून राबवण्यात येत आहे. तरी सुध्दा उद्दिष्ठ पार केले नसून पाहिल्या डोसचे ७६ टक्के तर दुसऱ्या डोसचे ३५ टक्केच उद्दिष्ठ पार पाडले आहे. पाहिल्या डोसचे उद्दिष्टपूर्ती पैकी २३:९३ टक्केनी लसीकरणाचं प्रमाण कमी झाल्याने ही तालुक्यासाठी चिंतेची बाब आहे.

झरी जामणी तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र झरी, शिबला व मुकूटबन येथे असून एक ग्रामीण रुग्णालय झरी जामणी येथे आहे. या अंतर्गत १०३ गावे येत असून ७१,९८४ लोकसंख्या आहे.
वय १८ ते वयाला मर्यादा नाही अशी लोकसंख्या ५०,४२५ असून पाहिल्या डोसची उद्दिष्टपूर्ती ५०,३८८ म्हणजेच ९९:९३ टक्के होती. त्यापैकी ३८ हजार ३२३ नागरिकांनी फक्त पहिला डोस घेतला असून पाहिल्या डोसचे ७६ प्रमाण टक्के झााले असून २३:९३ टक्के नी कमी झाली.

 तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात १३ मार्च पासून लसीकरण आपल्या दारी ही संकल्पना राबवण्यात येत आहे. ३१ ऑक्टोंबर पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र झरी येथे कोवीशील्ड १३६९५ तर कोवैक्सीन ३९९८ एकूण १७६९३ नागरिकांनी लसीकरण केले. प्राथमिक आरोग्य केंद्र शिबला येथे कोवीशील्ड ६१९० तर कोवैक्सीन १०४४ एकूण ७२३४ नागरिकांनी लसीकरण केले. प्राथमिक आरोग्य केंद्र मुकूटबन येथे कोवीशील्ड २१२३० तर कोवैक्सीन ३८२१ एकूण २५०५१ नागरिकांनी लसीकरण केले. तर ग्रामीण रुग्णालय झरी जामणी येथे कोवीशील्ड ४१२३ तर कोवैक्सीन २०१० एकूण ६१३३ नागरिकांनी लसीकरण केले. तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात व एक ग्रामीण रुग्णालयार कोवीशील्ड ४५२३८ तर कोवैक्सीन १०८७३ असे एकूण ५६१११ नागरिकांनी लसीकरण केले.

झरी जामणी तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने आता प्रशासन जागे होऊन प्रत्यक्ष घरोघरी भेटी देऊन कोरोनाची जनजागृती करीत आहे. तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम यांचे मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, सहायक गटविकास अधिकारी सखाराम इसलकर, तहसीलदार गिरीश जोशी, नायब तहसीलदार महेश रामगुंडे, अशोक ब्राम्हणवाडे, झरीचे वैद्यकीय अधिकारी अशोक गायकवाड, शिबलाचे वैद्यकीय अधिकारी जमीर शेख, मुकूटबनचे वैद्यकीय अधिकारी अरविंद वानखेडे, विस्तार अधिकारी इंदू राखुंडे, आरोग्य सहाय्यक अशोक मस कुल वार, वामन माहूरे, हेमंत कळसकर, सुनील तूमकोड, मेश्राम, कविता राऊत, सुवर्णा काळे, सुनीता पंधरे, तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर व आरोग्य सेविका हे सर्व कर्मचारी ज्यांनी लस घेतली नाही अशा लाभार्थ्यांचा शोध घेऊन लसीकरण करण्यात येत आहे.

"कोरोनासंसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती पाहता, जास्तीत जास्त लसीकरण झाल्यास कोव्हिड-19 ची लाट आपण टाळू शकतो. एकीकडे लसीकरणाचा टक्का हळूहळू वाढत असताना ऑक्टोबर महिन्यात तालुक्यात लसीकरणाचं प्रमाण घटल्याचं पाहायला मिळतंय. लशींचा तुटवडा नसताना लसीकरणाचं प्रमाण का कमी झालं? लसीकरण कमी झाल्याने तिसऱ्या लाटेची भीती वाढेल का? असे प्रश्न भेडसावत आहे."

ऑक्टोबर महिन्यात लसीकरण कमी होण्याची कारणे:
ऑक्टोबर महिन्यात अनेक उत्सव आलीत. नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात. त्यामुळे लस घेण्यासाठी बाहेर पडले नसतील. सणांच्या दिवसात लस घेतल्यानंतर आजारी पडू नये म्हणून लोक टाळाटाळ करत असण्याची शक्यता. कोव्हिशिल्ड लशीच्या डोसमध्ये ८४ दिवसांचं अंतर. रुग्णसंख्या कमी होत असल्याने बाहेरगावी सुट्टीवर गेलेले नागरिक. लोकांमध्ये कोरोनाची भीती आता राहिलेली नाही. लोक आजाराला गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. लसीकरण कमी होण्यामागचं ही कारणे होऊ शकते.


भिमनाडा येथे गाय गोधन उत्सहात साजरा

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
झरी जामणी : माथार्जुन पासून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या भिमनाळा येथील बिरसा देव वसलेला आहे. या ठिकाणी गेल्या शंभर वर्षापासून ही जत्रा भरत असून, या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे गाय गोधनाच्या दिवशी या परिसरातील सर्व पशुधन  येथील बिरसा देवाची पूजा करून वाजत गाजत जनावरांना चरायला घेऊन जातात व यामुळे ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आपल्या वेशभूषा मध्ये आदिवासी नृत्य करीत हा सण साजरा करतात. येथील नृत्य दृष्य पाहून कधी न नाचणाऱ्यांचे सुद्धा पाय थिरकतात.

झरी जामणी तालुका हा आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो. येथील पोड, गाव परिसरामध्ये मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात, असं म्हटले जात की ही परंपरा गेल्या एक शतकापासून या ठिकाणी साजरी केली जातेय. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये देशात कोविड -19 संसर्ग असल्याने या ठिकाणचा सण साजरा होऊ शकला नाहीत,परंतु कोरोना लाट ओसरताच शासनाच्या शिथिलतेने या वर्षीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. 


"त्या" नदी पात्रात एका अज्ञात इसमाचे आढळून आले प्रेत

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी : मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंप्रड गावाच्या नजीक असलेल्या पैनगंगा नदीच्या परसोडा घाटाजवळ (ता.२ नोव्हें.) ला एका अज्ञात इसमाचा मृतदेह सकाळी ११ वाजता च्या दरम्यान ये-जा करणाऱ्या नागरिकांना नदीच्या काठावरील पाण्यात तरंगताना आढळून आला. अज्ञात इसमाचा मृतदेह बघण्याकरिता नागरीकांची तोबा गर्दी उसळली होती.

या घटनेची माहिती ठाणेदार अजित जाधव यांना देण्यात आली. ठाणेदार आपल्या चमूला घटनास्थळी पाठवून मृतक कुठला व कोण आहे? याचा शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. 
या मृत्यूदेहाची नदी काठालगत असलेल्या गावात व पाटण पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग किंवा इतर तक्रारीबाबत माहिती घेण्यात आली. मात्र, अशी कोणतीही तक्रार नसल्याने सदर इसम हा तेलंगाणातून वाहत आल्याचा अंदाज  वर्तविण्यात आला असूनवाहून आलेला मृतदेह पाण्यात असल्याने पूर्णपणे फुगला होता. पोलीस कर्मचाऱ्यांनी अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाच्या जागेची पाहणी करून सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह झरी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदना करीता पाठवण्यात आला असून, सध्या तरी मृतदेहाची ओळख पटली नसल्याने या घटनेचा पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रंजना सोयाम करीत आहे.

रात्री एकदा गेली का सकाळी 12 वाजताच येते?


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी : गेल्या चार दिवसांपासून माथार्जून परिसरामध्ये विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. परिणामी येथील "लाईट का जात आहे हे कळायला मार्ग नाही.

सतत पडणाऱ्या पावसामुळे घरामध्ये डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यात विजेअभावी पंखे बंद असल्याने अनेकांची झोपमोड होत आहे. या परिसरात विजेवर चालणारे पंप वापरले जातात, परंतु वीज खंडित होत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपावर धाव घ्यावी लागत आहे. माथार्जून परिसरामध्ये गेल्या चार दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. मध्यरात्रीपासून ते सकाळी बारा वाजेपर्यंत  वीजपुरवठा खंडित होत आहे. एकदा वीज गेल्यानंतर आठ ते दहा तास पुरवठा सुरळीत होत नाही.

या कोरोनाच्या काळात सर्व सामान्य माणसाला वीज बिलाचे पैसे मोजावे लागले आहे. 2 वर्षापासून कोरोना मुळे सर्व सामान्य गरीब माणसाची आर्थिक परिस्थिती ढासळली असून, अशा कठीण काळात हाताला काम अद्यापही पाहिजे तसे मिळत नाहीये. मात्र, 2 ते 3 वर्षातील थकबाकी काही करून विज बिल भरावीच लागले आहे.
झरी जामणी तालुक्यातील माथार्जुन येथील चार दिवसापासून "बत्ती" गुल होत असून, रात्री 1 वाजता लाईट जात असून सकाळी 12 वाजता लाईट येत आहे. नेमकं रात्रीच लाईट जाण्याचे कारण समजत नसून या परिसरातील शेतकरी,शेतमजूर त्रस्त झाले आहे. गल्लोगल्ली अंधार असून, रात इकारी घराबाहेर पडायला एक प्रकारची भीतीच निर्माण झाली आहे.

विशेष उल्लेखनीय की, या गावात सबस्टेशन असूनही विजेचे लपंडाव सुरु आहे...

झरी व खडकडोह मंडळाला अतिवृष्टीची आर्थिक मदत द्या - शेतकऱ्यांची मागणी


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी : यंदा अतिवृष्टीमुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या कापुस, सोयाबीन, तूर या मुख्य पिकांबरोबर इतरही पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सरसकट मदतीची आवश्यकता असतांना ही ५ पैकी मार्थाजुन, शिबला, मुकुटबन हे ३ मंडळ अतिवृष्टीच्या मदतीस पात्र ठरवून खडकडोह आणि झरी हे मंडळातील ३५ गावातील शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहत आहे. त्यामुळे तेरा ग्रामपंचायतीत ग्रामसभेत ठराव घेऊन जिल्हा प्रशासनाकडे नुकसान ची मदत मागितली आहे.

यावर्षी सतत चा पाऊस पडल्यामुळे आमच्या मंडळात प्रमाणात पेक्षा जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे आमच्या शेतातील पिकांची भरपूर नासाडी नुकसान झालेली आहे. तरी पण, अतिवृष्टी मधून आमचे झरी व खडकडोह वगळण्यात आले. हा आमच्यावर होत असलेला  मोठा अन्याय आहे. परिणामी आम्ही सर्व शेतकरी बांधव तुम्हाला विनती करतो की, झरी आणि खडकडोह मंडळ अतिवृष्टी च्या यादी मध्ये आमच्या मंडळाला समाविष्ट करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा आम्हाला सहकुटुंब उपोषणाला बसावे लागेल अशा आशयाचे निवेदन तहसीलदार गिरीश जोशी यांना (ता.१ नोव्हें.) ला देण्यात आले.
यावेळी निलेश येल्टीवार, सतिश नाकले, मारोती येडमे जिवन उलेमाले, सचिन डहाके, हरिदास गुर्जवार, व्यंकटेश कोडापे, राकेश गालेवार, प्रकाश राजकडकर, जिवन काळे, विकास मानकर, विनोद भोंग ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

झरीत ओबीसी चे एक दिवशीय धरणे आंदोलन


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (३१ ऑक्टो.) : झरी तालुक्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समितीच्या वतीने शनिवार दिनांक ३० आक्टोबर २०२१ रोजी झरी तहसील कार्यालयासमोर स.११ ते दु.२ वाजे पर्यंत एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
   
ओबीसीचीं जातनिहाय जनगणना करण्यास स्पष्ट नकार देणाऱ्या मुजोर केंद्र सरकारचा धिक्कार करण्यात आला. विधिमंडळाच्या मागासवर्गीय समितीने दि.५-१०-२०१५ मागासवर्गीय मुला-मुलींसाठी स्वतंत्र वस्तीग्रह निर्माण करून देखबाल करण्याच्या सूचना केल्या होत्या. युती सरकारच्या काळात ३० जानेवारी २०१९ प्रत्येक जिल्ह्यात एक यानुसार ३६ वसतिगृहे सुरु करण्याचा आदेश देण्यात आले. २२ आगस्ट १९ ला नागपूर अहमदनगर यवतमाळ ज्या ठिकाणी नवीन वसतिगृह बांधण्यात अनुमती देण्यात आली.
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एका जिल्ह्यासाठी दोन या प्रमाणे ३६ जिल्हयात एकूण ७२ शासकिय वसतिगृहे उभारण्याचे आश्वासन दिले. पण मात्र, कुठेच आजवरी एकही वस्तीगृह उभारलेले दिसत नाही. एक प्रकारे महाविकास आघाडी सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांची फसगत केली आहे. विद्यार्थ्यांच्या भावनाशी खेळ खेळल्याने राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. 

ओबीसी विद्यार्थ्यांच्या भावना चा विचार करून प्रत्येक मुला मुलींसाठी सहा विभागात पाचशे पाचशे जागेचे वस्तीगृह बांधण्यात यावे. बांधकाम पूर्ण होईपर्यंत भाडे तत्त्वावर सुरू करण्यात यावे. या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरु करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार झरी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.
यावेळी ओबीसी जनगणना कृती समितीचे आशिष साबरे, प्रकाश बेरेवार, आजाद उदकवार, प्रफुल चुकलवार, साई बोंगिरवार, तुळशीदास आवारी, नेताजी पारखी, सौ.छबुताई आसुटकर, ममता पारखी, सविता व-हाटे, संतोष गोहकार, गणेश बुट्टे, संजय चामाटे, सुनील शिरपूरे निलेश निलमवार, प्रेम नडलवार यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.