वणी : केदारनाथ जवळील गौरीकुंड येथे झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅश दुर्घटनेत सात लोकांचा मृत्यू झाला होता. यात वणी येथील जयस्वाल परिवाराचाही समावेश होता. राजा जयस्वाल, श्रद्धा राजा जयस्वाल आणि त्यांची दोन वर्षाची मुलगी काशी हिचा करून अंत झाला होता. सात भाविकांच्या मृत्यू ची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी होती. राजा जयस्वाल यांनी मागील वर्षी प्रथमच वणी येथे शिव पुराण कथेचे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या उपस्थितीत आयोजन केले होते. जयस्वाल दांपत्याचा या हेलिकॉप्टर दुर्घटनामध्ये अपघात झाला, अशी बातमी कळल्यानंतर त्यांनी काल सोमवारी सायंकाळी जयस्वाल परिवाराची सांत्वनपर भेट घेऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले, या दुःखद क्षणी ते क्षणभर निशब्द झाले. आम्ही शिवभक्त गमावल्यामुळे अशा कठीण परिस्थितीतून जयस्वाल परिवार जात असताना पंडित यांनी मृतकांच्या आत्म्यास शांती लाभावी अशी जड अंतःकरणाने प्रार्थना केली. यावेळी जयस्वाल मित्र परिवार आणि शहरातील इतर मान्यवर उपस्थित होती.