Showing posts with label किनवट. Show all posts
Showing posts with label किनवट. Show all posts

दिव्यांग बांधवाच्या विविध मागण्यासाठी चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

सह्याद्री न्यूज नेटवर्क |

किनवट : येथील गटविकास अधिकारी यांना दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली किनवट तालुका अध्यक्ष अंकुश राठोड, महीला अध्यक्ष बालीताई जागनेवाड, शिष्टमंडळ गटविकास अधिकारी व नायब तहसीलदार किनवट यांना भेटून निवेदनातील प्रश्नावर चर्चा करीत असता दोन्ही अधिकारी यांना ऊतर देता आले नाही. 
     
आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले यावेळी डाकोरे पाटिल यांनी गटविकास अधिकारी यांना सात प्रश्न व तहसिलदार साहेब यांना नऊ प्रश्नाचे लेखी ऊतर दि 9 मार्च 22 पर्यंत दोन्ही कार्यालयाकडून निवेदनाद्वारे माहिती व हक्क खालील मागण्याची दखल न घेतल्यास दि 13 मार्च 22 पासुन जिल्हाधिकारी नांदेड येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली बेमुधत धरणे व आंदोलन करण्याचा इशारा दिला.

 दिव्यांग बांधवाच्या मागणी असलेले प्रश्न पुढील प्रमाणे :

1) दिव्यांग मित्र अॅप नांदेड
दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या समाज कल्याण विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सुविधा दिव्यांगाला घरपोच मिळण्याकरीता दिव्यांग मित्र अॅप नांदेड ची निर्मिती नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री व माजी जिल्हाधिकारी नांदेड यांनी केली व एकही दिव्यांग वंचित राहू नये वेळेचे बंधन वेळापञक 14 जुलै ते 31 जुलै 20 नाव नोंदणी व दि .1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 20 पर्यंत छाननी व 15 ऑगस्ट 20 ला लाभ देण्याचे व एकहि दिव्यांग वंचित राहिल्यास कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आदेश दिले असता अठरा महिन्यात आपल्या तालुक्यात किती दिव्यांगाची दिव्यांग मिञ अँप मध्ये नोंदणी,मंजुरी,किती दिव्यांगाना लाभ दिला वरीष्ठाचे वेळापञक व आदेश न माननार्या अधिकारी यांच्यावर आपण काय कार्यवाही केली.त्याची यादीसहित माहिती त्वरित देण्यात यावी.
2) दिव्यांग कायदा 2016 ची अंमलबजावणी दिव्यांग बांधवाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे म्हणून त्यांना त्यांचे हक्क व अधिकार मिळावा म्हणून दिव्यांग हक्क 2016 च्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आपल्या कार्यालयासहित किती ग्रामपंचायत ने दिव्यांगाच्या ग्रामसभा किंव्हा बैठकीत माहिती दिली त्यांची माहिती रजिस्टर सहित देण्यात यावी.
3) दिव्यांग साहित्य व पायाभूत साधने शिबीर
नांदेड जिल्ह्यातील डिसेंबर 2019 मध्ये दिव्यांगासाठी पायाभूत साधने व साहित्य मोजमाप शिबीराचे आयोजन करून लाखो रुपये खर्च करण्यात येऊन अनेक दिव्यांगाना साहित्य का मिळत नाही ते आज हि आपल्या पंचायत समिती का? पडुन आहे आज पर्यंत किती दिव्यांगाना वाटप केले किती देणे बाकी आहे त्याच्या कारणासहित लाभार्थी यादीसहित त्वरीत माहिती देण्यात यावी.
4) दिव्याग राखीव पाच टक्के निधी ग्रामपंचायत, व पंचायत समिती, येथे 2016 ते 2021 पर्यंत आज पर्यंत आपल्या तालुक्यातील किती ग्रामपंचायत व आपल्या कार्यालयातून किती वेळेस दिव्यांग निधी देण्यात आला त्या लाभार्थी रक्कमेसहित यादी देण्यात यावी. दिव्यांग पाच टक्के निधी दिला नसेल तर का देण्यात आला नाही ते कारणासहित माहिती त्वरित देण्यात यावी. 
5) म.ग्रा.रो.ह.योजनेत दिव्यांगाला काम मिळेना
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दिव्यांगाला दरवर्षी किमान 100 दिवस गावातच रोजगार देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आपल्या तालुक्यातील किती गावात दिव्यांगाना काम किंव्हा बेरोजगार बता देण्यात आला किंव्हा नाही दिला तर त्यांचे कारणासहित दिव्यांग लाभार्थी यादीसहित माहिती देण्यात यावी.
 6) दिव्यांगाला स्वयंरोज गारासाठी जागा
गावातील शासकिय व निमशासकीय कार्यालयात व कार्यालयीन परिसरात दिव्यांगाला स्वयं रोजगारासाठी 200 स्केअर फुट जागा देण्याबाबत शासन निर्णय व परिपत्रक काढण्यात आले आहे. आपल्या कार्यालयासहित किती ग्रामपंचायत ने दिव्यांगाना जागा देऊन किती दिव्यांगाना आधार दिला जर दिला नसेल तर कारणासहित लाभार्थी यादीसहित माहिती त्वरीत देण्यात यावी. 
7) दिव्यांग बांधवाना घरकुल योजनेत प्राधान्य म्हणून पाच टक्के प्रमाणे घरकुल आपल्या तालुक्यात किती गावात दिव्यांगाना लाभ देण्यात आला व नाही दिला तर त्यांच्या कारणासहीत लाभार्थी यादी देण्यात यावी.
    
यावेळी दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, तालुका अध्यक्ष अंकुश राठोड, सचिव गणेश जाधव, महीला अध्यक्ष बालीताई जानगेनवाड, आनंदराव मेश्राम, गजानन लामसोंगे, देवराव आञाम, पायल आडे छाया वानखेडे, गोंविद वाकोडे, शेख गौस, देवानंद सोनकांबळे ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रांतीसुर्य काशिनाथ नायक यांची जयंती सर्वत्र साजरी करण्यात यावी

सह्याद्री न्यूज | वासुदेव राठोड

किनवट : गोर सीकवाडीचे मुखिया,गोर बंजारा समाज संघटित करण्यासाठी त्यांना एकत्र करून मार्गदर्शन करणारे क्रांतीसुर्य काशिनाथ नायक यांची जयंती सर्वत्र साजरी करण्याची गरज आहे.त्यांनी समाजाला अंधश्रद्धेपासून दूर ठेवून गोर बंजारा समाजाची बोली भाषा त्यांचीवेषभूषा, केशभूषा, सन,तेव्हार टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. गोर बंजारा समाजाला स्वतःची ओळख निर्माण करून दिली आहे. एवढेच नव्हे तर समाजासाठी लढा उभारून वेळोवेळी समाजाला न्याय मिळवून दिला आहे. सर्वांना संघटित करण्यासाठी, वेळोवेळी गोर बंजारा समाजाचा मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करून सर्व भारतातील गोर बंजारा समाजाला एकत्र बसवून मार्गदर्शन लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन त्यांना प्रेरित करण्यासाठी रात्रंदिवस प्रत्येक तांडयात जाऊन समाज कार्य त्यांनी केले आहे.

ज्यांचा आदर्श घेऊन त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये आज लाखो लोक समाज कार्य करत आहेत,गोर सीकवाडी चळवळ सर्व लोकपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत आहेत अशा आमच्या सर्वांचे आदर्श मार्गदर्शक गोर सीकवाडीचे मुखिया क्रांतीसुर्य काशिनाथ नायक यांची जयंती १३ जानेवारी रोजी कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव लक्षात घेऊन जे सरकारचे नियम असतील त्यांचे पालन करून सर्वत्र आणि प्रत्येक घराघरामध्ये जयंती साजरी करण्यात यावी असे, आवाहन गोर केसुला ग्रुप महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव राठोड यांनी केले आहे.

वानोळा जिल्हा परिषद गटात निवडणूकीची रंगीत तालीम

सह्याद्री न्यूज | वासुदेव राठोड
किनवट, (१७ ऑक्टो.) : माहूर-आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जवळच येऊन ठेपल्याने वानोळा जि.प.गटात चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. इकडे-तिकडे निवडणूकीचे हलके वारे वाहतांना अनेक जण या वायात आपले कपडे वाळवण्याची तयारी करीत आहे. प्रत्येक पक्षाकडुन अनेक ईच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. परंतु मतदान राजा कोणाला पसंती देतो हे येणार वेळच ठरवले. प्रत्येक पक्ष आप आपल्या परीने कसे निवडून येता येईल याकडे लक्ष केंद्रित केले आहे. मागील निवडणूकीत काँग्रेस पक्षाने हा गड आपल्या कडे राखत संजय राठोड यांना उमेदवारी देऊन विजय खेचून आणला,परंतु मागील पाच वर्षात विकासाचा अवुशेष भरून निघेल असा विश्वास मतदार राजा बाळगुन होता,परंतु आशेच निराशा झाली असे सुर जनतेतुन ऐकावयास मिळत आहे. परिणामी या वेळेस संजय राठोड यांना निवडून येण्यासाठी मतदाराची मनधरणी करावी लागणार आहे. भारतीय जनता पार्टी हे केंद्रात क्रमांक एकचा पक्ष असून राज्यात या पक्षाची जी परिस्थिती आहे. ठिक हिच परिस्थिती वानोळा जि.प गटात पहावयास मिळत आहे, कारण विघमान आमदार भिमरावजी केराम साहेब हे मागील दोन वर्षात वानोळा गटात गावोगावी कार्यकर्ता भेटी न घेतल्याने कार्यकर्त्यांत नाराजीचे सुर निघत आहे. यामुळे भा.ज.पा. चे ईच्छूक उमेदवारांत विधिज्ञ ॲड रमन जायभाये, धरमसिंग राठोड, सुमित राठोड, दिलीप राठोड या पैकी ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांना जनतेची मनधरणी करून गॕस दरवाड,पेट्रोल,डिझेल दरवाड यांचा बळी होऊ नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. आगामी जि.प.व प.स.निवडणूक महाविकास आघाडी स्वबळावर लडणार असे काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नवरत्रीत रेणुका गडावर जाहिर केले म्हणून शिवसेना सुद्धा वानोळा गटात आपला उमेदवार निवडणूक रिंगणात देणार हे निश्चित आहे, शिवसेनेकडुन सुदर्शन नाईक हे एकमेव उमेदवार दिसत आहे. मागील काळात ज्योतिबा दादा खराटे यांना वानोळा गटात चांगलीच कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली होती परंतु मागील पाच वर्षात ज्योतिबा खराटे यांचा वानोळा गटात जनसंपर्क कमी झाल्याने सेनेचे अनेक कार्यकर्ते ईतर पक्षात प्रवेश करून सेनेत कार्यकर्त्यांची एक पोखली निर्माण केले आहे.हि पोखळी भरून काढण्यासाठी सेनेला अनेक प्रयत्न करावे लागणार आहे.

वानोळा जि.प.गट हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो, या पक्षात मोठी कार्यकर्त्यांची फळी असून अनेक मतदार हे कट्टर "प्रदिपवादी"आहे. माजी आमदार प्रदिप नाईक यांना माननारा मोठा गट या सर्कल मध्ये आहे. मागील निवडणूकीत वानोळा गटात सौ.कलावती बंडू पाटील भुसारे यांना उमेदवार दिली परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या वेळेस या पक्षाकडुन बंडू पाटील भुसारे हे मागील पराभवाचा कसर काढण्यासाठी उमेदवारी मागीत आहे तसेच कुंदन पाटील पवार पालाईगुडाकर हे सुद्धा निवडणूक रिंगणात उतरण्यास तयार आहे. नाईक साहेबांचे अतिशय निकटवर्तीय प्रकाश पाटील पवार यांचे चिरंजीव आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे ता.सचिव अभिजित दशरथ राठोड हे सुद्धा या पक्षाकडुन उमेदवारी मागत असुन त्यांना या वानोळा सर्कल मध्ये मोठा जनाधार आहे. मोठा राजकीय वारसा त्यांच्या सोबत असून कै.दत्तरामजी राठोड साहेब जे या सर्कलचे जूने राजकीय वारस असून त्यांनी या सर्कल मध्ये 1965 ते 2020 पर्यत अनेक विकास कामे केली आहे. शिक्षणाचे संकुल उभे करून अनेक कुटुंबासाठी शिक्षणाची दारे उघडी केली त्यांचे राजकीय वारस म्हणून अभिजित राठोड यांना वानोळा सर्कल मध्ये निवडून येणे आहे,तरूण तडफदार, मनमिळावू व्यक्तीमत्व म्हणून त्यांना पसंती मिळेल असे बोलले जात आहे. वानोळा हे माहूर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असुन या ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद त्यांनी भुसविले आहे. युवकांशी त्यांचा दांडगा संपर्क असुन युवकांची मोठी फळी त्यांच्या सोबत आहे. अभ्यासु ,वकृत्व संपन्न व्यतीमत्व म्हणून तालुक्यात त्याचा परिचय आहे.

मा.आ.नाईक साहेबांचे खंदे समर्थक म्हणून त्यांना ओळखतात. वानोळा गटात युवकांना संधी दिल्यास निश्चितच विजय होईल असे जनतेतुन बोलले जात आहे. तसेच वानोळा गटातून किशोर पाटील पवार मा.प.स सदस्य हे सुद्धा ईच्छूक असून सामाजिक कार्याचा वेड मनात बाळगुण जातपंचायती मार्फत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोठ्या दिलाचा राजा म्हणून सुद्धा त्यांना लोक संबोधतात त्यांना कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळेल हे अध्यावत निश्चित नसुन मतदार हा सभ्रमात आहे.

वासुदेव राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त फळ व खाऊ वाटप


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
किनवट, (५ ऑक्टो.) : गोर केसुला ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका विद्यार्थी प्रमुख मा.वासुदेव राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त किनवट शहरात गोर केसुला ग्रुप व प्रहार जनशक्ती पक्ष वतीने विविध कार्यक्रम साजरा करण्यात आले .या मध्ये किनवट ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले.

सदरील कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्याकरीता गोर केसुला ग्रुपचे नांदेड जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ राठोड व गोर केसुलाचे सर्व पदाधिकारी व प्रहार पक्षाचे सर्व कार्यकर्ते आदींनी परिश्नम घेतले.