Showing posts with label कोरपना. Show all posts
Showing posts with label कोरपना. Show all posts

काेरपना भागातील मुजाेर रेती तस्कराच्या विराेधात पाेलिस स्टेशनला तक्रार दाखल !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : काल शुक्रवार दि. २१जानेवारीला अतिदुर्गम काेरपना भागातील काेडशी बुजरुक पैनगंगा नदीच्या पात्रातुन पहाटेला अवैधरित्या रेती नेणारे एक ट्रॅक्टर पाेलिस पाटील पांडुरंग जरीले, उपसरपंच बंडु नामदेव वासेकर व गावातील काही नागरिकांनी अडविले परंतु या सर्वांना न जुमनता ट्रॅक्टर चालक अरेरावी करीत ट्रॅक्टरसह पसार झाला .सदरहु वाहन नेतांना चालकांने उपरोक्त मंडळीच्या अंगावर ट्रॅक्टर आणण्यांचा प्रयत्न केल्याचे विश्वसनीय सुत्राने या प्रतिनिधीस काल सांगितले.

दरम्यान, या अवैध रेती ट्रॅक्टररची माहिती गावक-यांनी काेरपना मंडळाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांना सांगताच ते पटवारी दिलीप देठे व काेतवालासह घटनास्थळी दाखल झाले परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता त्यांनी लगेच तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांना या बाबतीत सविस्तर माहिती दिली. सदरहु नदीपात्रातुन रेती तस्कर नामे प्रदीप सीताराम कुडमेथे यांनी पन्नास ते साठ ब्रास रेती वाहनाने नेली असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे मत मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांनी व्यक्त केले. उपरोक्त मुजाेर रेती तस्कराच्या विराेधात पाेलिस स्टेशन काेरपनाला पाेलिस पाटील पांडुरंग जरीले यांनी रिपोर्ट दिली आहे. पाेलिस कर्मचारी या मुजाेर अवैध रेती तस्कराचा शाेध घेत आहे. हा रेती तस्कर रात्रीला वाहना व्दारे माेठ्या प्रमाणात रेती चाेरुन नेत हाेता असे गावक-यांचे म्हणणे आहे .आता या मुजाेर रेती तस्करावर नेमकी काेणती कारवाई हाेते.

या कडे काेरपना वासियांचे लक्ष लागले आहे .विशेष म्हणजे या मुजाेर रेती तस्कराच्या ट्रॅक्टर व ट्राँली ला कुठल्याही प्रकारचा नंबर दिलेला नाही.  

दालमिया कंपनी समाेर कामगाराचे उपाेषण सुरुच - ५ जणांची प्रकृती खालावली ?

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : काेरपना तालुक्यातील भारत दालमिया कारखान्यासमाेर दि.२३ नाेव्हेंबर पासून कामगारांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपाेषण पुकारले असून या उपाेषणाचा आज चवथा दिवस आहे.

दरम्यान या उपाेषण मंडपात उपाेषणाला अनुक्रमे अशाेक निळकंठ कुचनकार (नारंडा), दशरथ सुधाकर वडस्कर (अंतरगांव), श्रीकांत तुळशिराम धानाेरकर (पिंपळगांव) गड, अनिल दादाजी आत्राम (नारंडा), निळकंठ बाळकृष्ण लांडगे (नारंडा), राजेन्द्र छब्बी दुर्वे (नारंडा) व जीवनलाल जगतपाल निषाद (गडचांदूर) हे बसले असून आज शनिवार दि.२७ नाेव्हेंबरला वैद्यकिय चमूने उपाेषण कर्त्यांची प्रकृती तपासणी केली असता यातील पाच कामगारांना रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉ.मंडळीने दिला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या आधी या कामगारांनी आपल्या रास्त मागण्या पदरात पडाव्या या साठी धरणे आंदोलन पुकारले हाेते परंतु त्या आंदाेलनातुन त्यांचे मागण्यांची पुर्तता झाली नसल्याने शेवटी या कामगारांनी बेमुदत उपाेषणाचा पवित्रा उचलला. अद्याप शासन व प्रशासनाने त्यांचे या सुरु असलेल्या उपाेषणाची दखल घेतली नाही हे येथे उल्लेखनिय आहे.

सदरहु आंदोलन हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमांतुन सुरु असून आंदोलन स्थळी पाेलिस बंदोबस्त ठेवण्यांत आला आहे.

महसुल विभागाचा वरिष्ठ लिपीक विलास ठमके एसीबीच्या जाळ्यात


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२७ ऑक्टो.) : चंद्रपूर जिल्ह्यातील महसुल विभागातील बहुचर्चित मंडळ अधिकारी प्रशांत बैस व महादेव कन्नाके यांना याच वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्या नंतर काेरपना तहसील कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विलास ठमके यांस आपल्या सहका-याचे मदतीने आज मंगळवार दि.२६ ऑक्टाेबरला दुपारी अडीच हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडल्याची घटना काेरपना तहसील कार्यालयाच्या परिसरात घडली.

ठमके हे गेल्या सात वर्षापासून याच काेरपना तहसील कार्यालयाला लिपीक म्हणून काम करीत असुन त्यांनी भूमिधारी जमीन भुमिस्वामी करण्याचे जूण्या दस्तऐवजाची सत्यप्रत देण्यासाठी वनाेजा येथील एका शेतक-यांकडुन तब्बल अडीच हजार रुपयांची मागणी केली हाेती असे चाैकशी अंती कळले. त्यांना सेवानिवृत्ति हाेण्यांस अवघ्या नव महिण्यांचा कालावधी शिल्लक राहिला हाेता. इतकेच नाही तर त्यांचे बाबतीत जनतेच्या अनेक तक्रारी देखिल हाेत्या शेवटी आज ऐन दिवाळीच्या ताेंडावर खासगी व्यक्ती प्रदीप आदे यांचे मदतीने अडीच हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात ताे अलगद अडकला.या घटनेमुळे जिल्ह्यातील संपूर्ण महसुल विभागात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पाेलिस उपायुक्त राजेश ओला, अप्पर पाेलिस अधीक्षक मिलिंद ताेतरे, पाेलिस उपअधिक्षक अविनाश भामरे, यांचे मार्गदर्शनाखाली पाेलिस निरीक्षक शिल्पा भरडे यांचे नेत्रूत्वात ना.पाे.का.संतोष येलपुलवार,रवीन्द्र कुमार ढेंगळे, संदेश वाघमारे , वैभव गाडगे व सतिश शिडाम यांनी केली.

उद्य्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोरपना बंद चे आवाहन


सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे 
कोरपना, (२६ सप्टें.) : केंद्र शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ भारत बंदसह अनेक महिन्यापासून शेतकरी निदर्शने आंदोलन दिल्ली दरबारात करत असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र डोळे बंद करीत प्रश्न मार्गी लावण्यात सरकार अपयशी ठरला आहे.

उद्याला संपूर्ण देशामध्ये "भारत बंद" पुकारल्याने शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार तालुकास्तरावर बंदला पाठिंबा दिला असून, कोरपना येथे निदर्शने व शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचे आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद जोगी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोहेल अली, राष्ट्रवादी किसान आघाडीचे अध्यक्ष विनोद जुमडे, महिला राष्ट्रवादी आघाडीचे अध्यक्ष रितिका ढवस, कार्याध्यक्ष ज्योत्स्ना  कोडापे, अल्पसंख्यांक राष्ट्रवादी आघाडीचे अध्यक्ष महबूब अली राष्ट्रवादी, ओबीसी आघाडीचे वासुदेव बल्की, सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष धनराज जीवने, आदिवासी आघाडीचे विकास टेकाम, भटक्या-विमुक्त आघाडीचे प्रवीण जाधव यांनी भारत बंदला पाठिंबा दर्शवून बंदचे आवाहन केले आहे.

आठ दिवसात रस्त्याचे काम सुरू करा, अन्यथा "रास्ता रोको"


सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
कोरपना, (२५ सप्टें.) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या धानोरा -भोयेगाव, गडचांदुर- जिवती रस्त्याचे काम सुरू झाले मात्र, गडचांदुर येथील पेट्रोल पंप चौक ते माणिकगड सिमेंट कंपनी गेट पर्यंतच्या रस्त्याचे काम एकतर्फी रस्ता खोदून एक वर्षापासून अत्यंत संथ गतीने करण्यात येत आहे. तसेच या मार्गाने माणिकगड सिमेंट कंपनीची जड वाहने या रस्त्याने ये जा करत असल्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. या रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करावे असे न झाल्यास प्रहार रस्ता राेकाे आंदोलन करेल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी तालुका प्रमुख सतीश बिडकर यांनी एका निवेदनातून दिला आहे.

सदरहु रस्त्याने प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते अशातच एक तर्फी रस्त्याचे बांधकाम होऊन त्याचे अर्धवट काम झाले असल्याने आतापर्यंत अनेक अपघात होऊन त्यात अनेक जीव सुद्धा गेले आहे, अनेक नागरिक गंभीर जखमी होऊन त्यांना अपंगत्व आले. येत्या आठ दिवसात कामाला सुरुवात करावी व तात्काळ रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास न्यावे. एक तर्फी रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवून रस्ता सपाट करण्यात यावा ही कामे तातडीने पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यांत येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे सतिश बिडकर, पंकज माणूसमारे, सागर गुडेल्लीवार, शैलेश विरुटकर, अरविंद वाघमारे, महादेव बिस्वास, अनुप राखुंडे सूरज बार, नितेश कोडापे, व अन्य कार्यकर्त्यांनी एका निवेदनातून संबधित विभागास दिला आहे.

कोरोना काळात आशा सेविकांचे योगदान मोलाचे: आमदार सुभाष धोटे


सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
कोरपना, (२० सप्टें.) : तालुक्यातील गडचांदूर औद्योगिक नगरी गडचांदूर येथील प्रसिद्ध गडचांदूरचा राजा गणेश मंडळाने सामाजिक आदर्श जपत आशा सेविकांना साडी व सन्मानचिन्ह देऊन गौरविले. यावेळी २३ आशा सेविकांची उपस्थिती होती.

गेल्या १४ वर्षापासून गडचांदुरचा राजा गणेश मंडळ समाजपयोगी उपक्रमातून समाजात आदर्श निर्माण करत आहे. आशा सेविकांचा सत्कार करताना आमदार सुभाष धोटे यांची विशेष उपस्थिती होती. कोरोना काळात आशा सेविकांना केलेले कार्य अतुलनीय आहे. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. कृतज्ञतेच्या भावनेने साडी व सन्मानचिन्ह देऊन केलेला गौरव त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणारा ठरेल असे मत आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.

यावेळी गडचांदूरच्या नगराध्यक्षा सौ. सविता टेकाम, नगरसेवक अरविंद मेश्राम, नगरसेवक विक्रम येरणे, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, नगरसेविका अर्चना वांढरे, माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर, नगरसेवक राहुल उमरे यांची विशेष उपस्थिती होती. महिलांचे आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान आहे. आशा सेविका तळागाळात पोहचवून सेवाभावी काम करतात. गडचांदुरचा राजा गणेश मंडळाने घेतलेल्या पुढाकाराने आशा सेविकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी मंडळाचे सुयोग कोंगरे, अक्षय मेंढी, गणेश कवलकर, सचिन सातभाई, भाविक कुळमेथे, नितेश डाकोरे, दत्ता बोढाले, महेश परचाके, वैभव पारखी, निखिल पिंपळशेंडे, अमित कोरे, सचिन जगनाडे आदींनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

अवैध व्यवसायिकांचे मुसके आवळणार काय ठाणेदार ; (सट्टापट्टी,क्लब,सुगंधित तंबाखू अवैध वाळू विक्री जोरात.)


सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
कोरपना, (१९ सप्टें.) : गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल भारती यांची नुकतीच भद्रावती येथे बदली झाली. त्यांच्या जागी सत्यजित आमले हे १० दिवसापुर्वीच ठाणेदार म्हणून रूजू झाले. गडचांदूर परिक्षेत्रात सूरू असलेली सट्टापट्टी, कलब, सुगंधित तंबाखू आणि मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू विक्री, हायप्रोफाईल जुगार अशा अवैध धंद्यांवर अंकुश लावण्याचे आवाहन ठाणेदारापुढे उभे आहे. आता ठाणेदार यांचे मुस्के आवळणार ? की परिस्थिती जैसे थेच राहणार ? असे एकना अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावत असल्याने "काय राव या ठाणेदारावर भरोसा नाय काय ?" तत्कालीन ठाणेदारांनी काय केले,काय नाही केले,हे पाहण्यापेक्षा आता नवीन ठाणेदार काय कामगिरी दाखवतात,हे पाहणे महत्वाचे,असे धीरयुक्त अंदाज सल्ले नागरिक एकमेकांना देताना दिसूत येत आहे.
      
सध्याची परिस्थिती पाहता गडचांदूर परिक्षेत्राचा धावता विश्वानिय आढावा घेतला तर गडचांदूर येथील आठवडी बाजार, नांदाफाटा येथील नांदा बिबी रोड लगत दारू दुकाना समोर एका खोलीत मागील बऱ्याचशा दिवसांपासून खुलेआम, बिनधास्तपणे सट्टापट्टी सुरू आहे. गडचांदूर शहारात बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात सट्टापट्टीच्या खेळ सुरू आहे. तसेच अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूर येथील गेल्या दोन वर्षी पासून सिध्दिविनायक मंदिराच्या परिसरात अवैध रेतीची साठवून करूनही तिची खुल्या बाजारपेठेत विक्री. यादरम्यान किराणा, कन्फेशनरी, पान मटेरिअलच्या दुकानात सुगंधित तंबाखूची विक्री होताना दिसत आहे. लाखोंचे हप्ते पोलीसांना देत आहो म्हणून हे धंदे सुरू आहे अशी माहिती एका दुकानदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली या अणुषंगाने येथील असून यात खरे काय आणि खोटे काय ? हा मात्र संशोधनाचा विषय बनला आहे. तसेच दारूबंदी उठल्यानंतरही अंबुजा फाटा येथे अवैध दारूची विक्री सुरू आहे. गडचांदूर भोयगाव मार्गावरील काही टायर पंक्चरच्या दुकानात अवैध डिझेल साठवणूक करून इतर ठिकाणी विक्री केली जात आहे. गडचांदूर येथे एकाठिकाणी क्लब मध्ये हाय प्रोफाईल जुगार खेळले जात आहे.

नवीन ठाणेदारांना कदाचित यासंबंधीची माहिती नसावी ? तसेही अधिकाऱ्यांचा (काही अपवाद वगळता) मागेपुढे करणारी, लोटांगण घालणारी, चापलुसी करणारी ती टोळी फुकटचे सल्ले व मार्गदर्शन करण्यासाठी सक्रिय होताना दिसत असून, यात नवीन ठाणेदाराची भुमिका म्हत्वाची ठरणार आहे. असे असताना ते लवकरच गडचांदूर परिक्षेत्रातील सर्व अवैध व्यवसायिकांचे मुसके आवळून परिक्षेत्र अवैध धंदे मुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.