Showing posts with label मनोरंजन. Show all posts
Showing posts with label मनोरंजन. Show all posts

इंजि. राहुलभाऊ लोखंडे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा...!

"अभिष्टचिंतन"

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा, दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो तुला दादा, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा भाऊसाहेब ..! 
सामायिक केलेल्या आठवणी, अविस्मरणीय साहस आणि अंतहीन हास्याच्या आणखी पुढील वर्षासाठी शुभेच्छा. जन्मदिनाच्या शुभेच्छा, माझ्या भावा. “तुम्हाला पुढील वर्ष रोमांचक संधी, नवीन यश आणि सुंदर क्षणांनी भरलेले जावो.” “माझ्या आश्चर्यकारक भावासाठी, तुझा वाढदिवस तुझ्यासारखाच अविश्वसनीय असू दे.
"Wish you Happy Birthday Rahulji

शुभेच्छुक : कैलास मेश्राम 
सह परिवार भालेवाडी, (ता.मारेगाव)

मायेच्या छायेखाली : कवी उदय रायपुरे

मायेच्या छायेखाली:

मायेची ममता मुलापरी काय असते
कितीही दुःख झाले तरी ती लपवीत असते..
आपल्या कुशीत ती संभाळीत असते
वेदना कितीही झाल्या तरी ती सोसित असते..
सांगुणी कुणाला दुःख, वाटले जातं नसते
म्हणुनी जीव बाळासाठी ती दुखवीत असते..
जिणे आयुष्य त्याच्यासाठी झिझविले असते
काहीही होऊ दे जीवाला तरी तिचं प्रेम साबूत असते..
काबाळ कष्ट करुनी घास ती घालीत असते
स्वतः उपाशी राहून मुलास ती घालीत असते..
जिव्हाळा मायेचा अंतःकरणातुनी असते
त्याला काहीही झाले मायेच्च्या डोळ्यात आसू असते...
लेकरापरी व्याकुळ मनाने सर्व काही सहन करते
तीचा त्याचे वरती नेहमी प्रेमाचा हात असते..
मायेच्या ममतेचे जाण ठेवणारे काही असते
थकल्या काळामध्ये तिरस्कार करणारेही दिसते..
अशीच आठवण झाली ती रस्त्याच्या कडेला दिसते
क्षणाक्षणाला माझ्या आईचं प्रेम मला नजरेत भरते..
ध्यानात ठेव उद्या मायेची ममता काय असते
म्हणुनी लेकरू कसं का असेना त्याचे साठी तीचा जीव दुखते..
मायेची ममता मुलां परी काय असते...

©® कवी :- उदय रायपुरे
मु पो त मारेगाव जि.यवतमाळ
मो.7020615358

सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रतिष्ठेच्या विविध पुरस्कारांची घोषणा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून सन 2023 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज ही घोषणा केली.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, राज्य सांस्कृतिक पुरस्कार इत्यादी पुरस्कार सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत दरवर्षी देण्यात येतात. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली असून राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे तसेच पुरस्कारांच्या क्षेत्रांमध्येही विस्तार करण्यात आल्याचे समाधान असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
2023 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झालेला आहे. संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारास हा पुरस्कार देण्यात येतो.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार 2022 पुरस्कारासाठी पं. उल्हास कशाळकर यांचे नाव घोषित झाले असुन, 2023 च्या पुरस्कारासाठी पं. शशिकांत (नाना)श्रीधर मुळ्ये यांची घोषणा करण्यात आली आहे. शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पण केले आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्काराच्या 2022 साठी सुहासिनी देशपांडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे तर 2023 साठी अशोक समेळ यांना पुरस्कार घोषित झाला आहे. मराठी रंगभूमीवर ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, अशा कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.
संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव 2022 चा पुरस्कार नयना आपटे यांना जाहीर झाला असून, 2023 च्या पुरस्कारासाठी पं. मकरंद कुंडले यांची निवड झाली आहे. ज्या कलाकारांनी संगीत रंगभूमीसाठी विशेष योगदान दिले आहे त्या कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2022 व 2023 ची ही घोषणा केली आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण बारा वर्गवारी असून, यामधील प्रत्येक वर्गवारी मध्ये दोन वर्षाचे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. नाटक या विभागासाठी 2022 चा पुरस्कार वंदना गुप्ते यांना तर 2023 चा पुरस्कार ज्योती सुभाष यांना जाहीर झाला आहे. उपशास्त्रीय संगीत वर्गवारीमध्ये 2022 चा पुरस्कार मोरेश्वर निस्ताने यांना जाहीर झालेला असून, 2023 चा पुरस्कार ऋषिकेश बोडस यांना जाहीर झाला आहे. कंठ संगीत प्रकारातील 2022 चा पुरस्कार अपर्णा मयेकर यांना घोषित झाला असून, 2023 चा पुरस्कार रघुनंदन पणशीकर यांना मिळाला आहे. लोककला क्षेत्रातील 2022 चा पुरस्कार हिरालाल रामचंद्र सहारे यांना जाहीर झाला असून, 2023 चा पुरस्कार कीर्तनकार भाऊराव थुटे महाराज यांना जाहीर झाला आहे. शाहीरी क्षेत्रातील 2022 चा पुरस्कार जयंत अभंगा रणदिवे यांना तर, 2023 चा पुरस्कार राजू राऊत यांना घोषित झाला आहे. नृत्य वर्गवारीतील 2022 चा पुरस्कार लता सुरेंद्र यांना जाहीर झाला असून, 2023 साठी सदानंद राणे यांची निवड झाली आहे. चित्रपट क्षेत्रासाठी 2022 चा पुरस्कार चेतन दळवी यांना तर, 2023 चा पुरस्कार निशिगंधा वाड यांना घोषित झाला आहे. कीर्तन प्रबोधन क्षेत्रातील 2022 चा पुरस्कार संत साहित्यिक व लेखिका प्राची गडकरी यांना जाहीर झाला असून, 2023 चा पुरस्कार अमृत महाराज जोशी यांना घोषित झाला आहे. वाद्य संगीत क्षेत्रातील 2022 चा पुरस्कार पं. अनंत केमकर यांना मिळाला असून, 2023 साठी शशिकांत सुरेश भोसले यांची घोषणा झाली आहे. कलादान या प्रकारासाठी 2022 साठी संगीता राजेंद्र टेकाडे यांचे नाव घोषित झाले आहे तर, 2023 साठी यशवंत रघुनाथ तेंडोलकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तमाशा वर्गवारीतील राज्य सांस्कृतिक पुरस्कार बुढ्ढणभाई बेपारी (वेल्हेकर) यांना तर, 2023 चा पुरस्कार उमा खुडे यांना घोषित झाला आहे. आदिवासी गिरीजन वर्गवारी मध्ये 2022 साठी भिकल्या धाकल्या धिंडा तर, 2023 साठी सुरेश नाना रणसिंग यांची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कारांच्या रकमेत मोठी वाढ

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विविध पुरस्कारांच्या रकमेत मोठी वाढ करत असल्याची घोषणा केली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पंणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार या पुरस्कारांची रक्कम पाच लक्ष रुपये होती, ती यापुढे दहा लक्ष रुपये होईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच राज्य सांस्कृतिक पुरस्काराची जी एक लाखाची रक्कम होती ती रक्कम तीन लाखाची करण्यात येत आहे अशीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
राज्य सांस्कृतिक पुरस्काराच्या क्षेत्रामधील व पुरस्कारांमधील वाढ

सध्या 50 वर्षे वयावरील पुरुष कलाकारांना व 40 वर्षावरील महीला कलाकारांना राज्य सांस्कृतिक पुरस्कारा अंतर्गत 12 विविध क्षेत्रातील पुरस्कार दिले जातात. यापुढे पन्नास वर्षावरील पुरुष आणि महिला कलाकारांना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराच्या सध्याच्या क्षेत्रामध्ये वाढ करण्यात येत असून, ही क्षेत्रे 24 करण्यात आलेली आहेत. वाढ करण्यात आलेल्या क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने; प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार, लोकनृत्य, लावणी /संगीतबारी, भारुड/गवळण /विधेनाट्य, वाद्यनिर्मिती करणारे कलाकार, झाडीपट्टी/खडीगंमत /दंडार, दशावतार /नमन खेळे / वही गायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणाऱ्या व त्यांचे जतन वहन संवर्धन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था, प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था, ध्वनी तंत्रज्ञ /संकलक, संगीत संयोजक, वाईस ओवर आर्टिस्ट / निवेदक अशा विविध बारा क्षेत्राची वाढ राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये करण्यात आली आहे. या पुरस्काराची रक्कमही तीन लक्ष रुपये असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
युवा पुरस्कार

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत युवक कलाकारांसाठी विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात यावी अशी अनेक संघटनांची फार पूर्वीपासूनची मागणी होती. या मागणीचा विचार करून राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील संग्रहालय वगळता इतर सर्व 23 क्षेत्रांमध्ये युवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार घोषित करण्यात येणार आहेत. युवा राज्य सांस्कृतिक पुरस्कारासाठी वयाची मर्यादा 25 ते 50 एवढी राहणार असून, या पुरस्कारांची रक्कम एक लक्ष एवढी असेल.
राज्यातील कलाकारांना विविध माध्यमातून प्रोत्साहन मिळण्याबाबत, सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच प्रयत्नशील राहत असून, भविष्यात कलाकारांसाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली आहे.
निवड प्रक्रियेसाठी समिती

उपरोक्त सर्व प्रकारच्या पुरस्कारासाठी निवड समितीची निवड समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या निवड समितीचे अध्यक्ष सांस्कृतिक कार्यमंत्री ना. श्री. सुधीर मुंनगंटीवार हे असून त्यामध्ये प्रधान सचिव विकास खारगे व इतर नामवंत अशासकीय सदस्यांचा समावेश आहे. या समितीचे सचिव संचालक सांस्कृतिक कार्य हे आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाकडे आलेल्या शिफारसी व सदस्यांनी सुचवलेल्या शिफारसी यामधून पुरस्कारर्थीची निवड करण्यात आली आहे.

'हायवे मॅन ॲाफ इंडिया'चा 'गडकरी' ते 'रोडकरी' जीवनप्रवास उलगडणार; बहुचर्चित गडकरी चित्रपट ट्रेलर पहिला का...?

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांचे आयुष्य रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. लवकरच त्याचा 'गडकरी' नावाचा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'गडकरी' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून या ट्रेलरमध्ये नितीन गडकरी यांच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे.

'गडकरी' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बालपण, निवडणुकीचा पराभव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवक, जीवघेणा हल्ला, समाजकारण असा प्रवास पाहायला मिळणार आहे. नितीन गडकरी यांच्या जीवनप्रवासामधील अनेक चढ उतार आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळणार आहे.

सक्षम आणि कार्यतत्पर नेतृत्त्व, सडेतोड भूमिका, नव्या भारतासाठी दूरदृष्टी ठेवून धडाकेबाज निर्णय घेणारे राजकारणी नेते अशी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख आहे. काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचा टीझरही समोर आला होता. आता चाहते सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.https://m.youtube.com/channel/UCf40kH47yvowumzzK9LVKKg?sub_confirmation=1

दिग्दर्शक अनंत भुसारी यांनी गडकरींच्या या बायोपिकचं दिग्दर्शन केलं आहे. तर अक्षय देशमुख यांनी निर्मिती केली आहे. अभिनेता राहुल चोपडा यांनी नितीन गडकरी यांची आव्हानात्मक भुमिका साकारली आहे. तर त्यांच्या पत्नीची म्हणजेच कांचन गडकरी यांची भूमिका ऐश्वर्या डोरले साकारली असून विशेष म्हणजे या ट्रेलरमध्ये नितीन गडकरी यांच्याबरोबरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही झलक पाहायला मिळत आहे. ‘जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे’ असे मानणाऱ्या ‘गडकरी’ यांचा प्रवास येत्या 27 ॲाक्टोबरपासून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.


रोहित सेनेने पाकला धू धू धुतले; वर्ल्ड कपमध्ये मिळवला सलग आठवा विजय

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वर्ल्डकपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविला आहे. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 191 धावांवर ऑलआऊट केले. प्रत्युत्तरात 192 धावांचे लक्ष्य भारताने 30. 3 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात गाठले आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 86 धावांची मोठी खेळी केली आहे. तर श्रेयस अय्यर नाबाद 53 धावा करत भारताला विजय मिळवून दिला आहे.

रोहित शर्मा एका बाजूने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करतच होता. रोहित शर्माने अवघ्या 36 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. शाहीन शाह आफ्रिदीच्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. तोपर्यंत सामना भारताच्या बाजूने झुकला होता. रोहित शर्माने 63 चेंडूत 86 धावांची खेळी केली. या खेळीला 6 चौकार आणि 6 षटकारांचा साज होता. रोहित तंबूत परतल्यानंतर अय्यरने केएल राहुलच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला. 

या विजयासह टीम इंडियाने न्यूझीलंडला मागे टाकत गुणतक्त्यात अव्वल स्थानी पोहोचली आहे. 

वर्ल्डकपमधील भारताचे पाकिस्तानवरील विजय.

▪️१९९२- भारताचा ४३ धावांनी विजय
▪️१९९६- भारताचा ३९ धावांनी विजय
▪️१९९९- भारताचा ४७ धावांनी विजय
▪️२००३- भारताचा ६ विकेटनी विजय
▪️२०११- भारताचा २९ धावांनी विजय
▪️२०१५- भारताचा ७६ धांनी विजय
▪️२०१९- भारताचा ८९ धावांनी विजय
▪️२०२३- भारताचा ७ विकेटनी विजय


13 ऑक्टोबरला फक्त ९९ रुपयांत फिल्म पाहण्याची संधी; असा घ्या लाभ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

जर तुम्हाला सिनेमे बघायला आवडत असतील व टीमची सिनेमांचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची ठरणार आहे. १३ ऑक्टोबर हा राष्ट्रीय चित्रपट दिन आहे. त्यामुळे फुकरे, राणीगंज, जवान सारखे सिनेमे तुम्ही फक्त ९९ रुपयांत पाहू शकता.

 १३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिनाचे औचित्य साधून सर्व चित्रपटगृहे ग्राहकांना ९९ रुपयांत सिनेमाची तिकिटे देत आहेत. ही ऑफर देशातील सर्व पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिसवर लागू आहे. 

अशा प्रकारे बुक करा तिकिटे
ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि PVR, BookMyShow, Paytm इ. सारख्या वेबसाइटवर १३ ऑक्टोबरला तुम्ही तिकिटं रु.९९ मध्ये बुक करू शकता. 

▪️तुमच्या पसंतीच्या सिनेमा नेटवर्कवर जा (उदाहरणार्थ: BookMyShow)
▪️BookMyShow ला भेट द्या
▪️तुमचं शहर निवडा
▪️सर्व तिकिटं भारतात रु.९९ मध्ये उपलब्ध असतील
▪️तारीख आणि वेळ स्लॉट निवडा
▪️पेमेंट पूर्ण करा


मुलांना मोबाईल फोन देण्याचे योग्य वय कोणते? लाडामुळे तुमचे मूल बिघडणार नाही याची घ्या काळजी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

आजकाल लहान वयातच मुले मोबाईलशी जोडली जात आहेत. याला कारण आहे आई-वडिलांचे प्रेम आणि आपुलकी. मुले लहान असताना त्यांचे मनोरंजन करण्यासाठी पालक त्यांना फोन देतात, जे योग्य नाही. 10 वर्षे वयाच्या 42 टक्के मुलांकडे स्मार्टफोन असून वयाच्या 12 व्या वर्षी हे प्रमाण 71 टक्क्यांपर्यंत पोहोचते आणि वयाच्या 14 व्या वर्षी 91 टक्के मुलांच्या हातात मोबाईल असतो. जर तुम्ही तुमच्या मुलाची खूप काळजी करत असाल तर तुम्हाला समजले पाहिजे की मुलाला स्मार्टफोन देण्याचे योग्य वय कोणते आहे.
आजकाल इंटरनेटमुळे मुले फोनवर काहीही करू शकतात. जे त्यांच्या वयानुसार धोकादायकही ठरू शकते. हत्या, हिंसाचार, पॉर्न, अपघात आणि अशा असंख्य व्हिडिओंचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा धोक्यांपासून दूर राहण्यासाठी मुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवले पाहिजे. मोबाईलमुळेही झोपेची समस्या उद्भवू शकते. सायबर क्राईम, गुंडगिरी आणि ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात मुलंही अडकू शकतात.
 
मुलांना मोबाईल दिला तर 'या' काही गोष्टींचा अवलंब करा -
• जर तुम्ही या वयात तुमच्या मुलाला फोन देत असाल तर त्याला गरज नसलेली सर्व ॲप्स आणि वेब सर्च लॉक करा.
 
• जर तुम्ही तुमच्या मुलांना फोन दिला तर त्यांच्यावर सतत लक्ष ठेवा, जेणेकरून मुले काय करत आहेत याची माहिती तुम्हाला मिळू शकेल.
 
• सुरुवातीला, मुलांना एक साधा फोन द्या, जेणेकरून ते फक्त कॉल करू शकतील. तुम्ही तुमच्या मुलासाठी स्क्रीन वेळ देखील सेट करू शकता.
 
• मुलांना हे देखील सांगा की तुमचे लक्ष ते फोनवर काय करत आहेत यावर आहे. मुलांच्या फोनचे पासवर्ड जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना सांगा, हे त्यांच्याच फायद्याचे आहे.
 
• मूल वयात आल्यावर त्याच्याशी मनमोकळेपणाने बोला आणि त्याच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. 


असा करा राष्ट्रीय चित्रपट दिवस साजरा, येत्या 13 ऑक्टोबरला सिनेमाची तिकिटे फक्त 99 रुपये मध्ये


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

सिनेप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त पुन्हा एकदा प्रेक्षकांना स्वस्त दरात तिकिटे पाहायला मिळणार आहेत. वास्तविक, मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच MAI ने गुरुवारी जाहीर केले की यावर्षी 13 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाईल. MAI ने जाहीर केले की 13 ऑक्टोबर रोजी चित्रपट चाहत्यांना देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रति व्यक्ती केवळ 99 रुपये दराने चित्रपट पाहता येईल.

99 रुपयांमध्ये कुठे पाहाल चित्रपट?
 MAI ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, PVR, INOX, Cinepolls, Mirage आणि Delight यासह देशभरातील 4,000 हून अधिक स्क्रीन्सनी राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हातमिळवणी केली आहे. 

तिकीट बुक करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.

स्टेप 1: सर्वप्रथम पीवीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस या वेबसाइट्स ओपन करा. 
स्टेप 2: त्या साइट्सवर लॉग-इन करा. 
स्टेप 3: त्यानंतर सिटी आणि एरिरा सिलेक्ट करुन थिएटर निवडा.
स्टेप 4: जो चित्रपट बघायचा आहे, तो सिलेक्ट करा. 
स्टेप 5 : त्यानंतर सर्वात शेवटी वेळ सिलेक्ट करा. वेळ सिलेक्ट केल्यानंतर ऑनलाइन पेमेंट करुन प्रोसेस पूर्ण करा. त्यानंतर तुमचं तिकीट बुक होईल.


अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या फॅन्ससाठी मोठी घोषणा

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त "वेलकम टू द जंगल" सिनेमाची खास पद्धतीने घोषणा करण्यात आलीय. या सिनेमाच्या टीझर अनाउंन्समेंट मध्ये असंख्य बॉलिबूड कलाकार दिसत आहेत.. 
वेलकम 3 ची खास घोषणा
वेलकम-3 म्हणजेच वेलकम टू ग जंगल सिनेमात बॉलिवूड कलाकारांची फौज आहे. अक्षय कुमार, परेश रावल यांच्यासह सुनील शेट्टी, संजय दत्त, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, रवीना टंडन, जॅकलीन फर्नांडीस, दिशा पटानी, जॉनी लिव्हर, तुशार कपूर अशा कलाकारांच्या सिनेमात भुमिका आहेत. एकूणच वेलकम 3 मध्ये संपूर्ण बॉलिवूड अवतरलेलं दिसतंय. सिनेमाचा 3 मिनिटांचा खास व्हिडीओ सध्या चांगलाच लक्ष वेधून घेतोय.
नाना पाटेकर, अनिल कपूर शिवाय मज्जा नाही
वेलकम चे पहिले दोन्ही भाग नाना पाटेकर, अनिल कपूर यांनी गाजवले. नाना आणि अनिल यांनी उदय आणि मजनू भाईच्या भुमिकेत झळकले होते. दोघांची अफलातुन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. पण वेलकम टू द जंगल सिनेमात मात्र नाना आणि अनिल दिसत नाहीत. त्यामुळे प्रचंड निराशा झालीय. अनेक जण नाना आणि अनिल शिवाय वेलकम-3 ला काही अर्थ नाही असं म्हणत आहेत.
कधी रिलीज होणार वेलकम 3
अक्षय कुमारने त्याच्या वाढदिवसानिमित्त स्वतःला आणि त्याच्या फॅन्सला गिफ्ट दिलंय. वेलकम 3 यावेळी जंगल थिमवर आधारीत असल्याचं समजतंय.
अक्षय कुमारच्या 'वेलकम-3' चं शुटींग लवकरच सुरु होणार असुन हा सिनेमा पुढील वर्षी डिसेंबर 2024 ला ख्रिसमसला रिलीज होणार आहे. इतके सारे कलाकार वेलकम 3 मध्ये असल्याने हा सिनेमा मनोरंजनाचं पॅकेज असणार यात शंका नाही..


प्रसिद्ध अभिनेता रवींद्र महाजनी यांची एक्झिट वेदनादायी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

'झुंज' या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपट सृष्टीतून कारकीर्द सुरू करणारे चतुरस्त्र अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपट व कला क्षेत्राची मोठी हानी झाली असून त्यांची एक्झिट अतिशय वेदनादायी आहे, 

रवींद्र महाजनी हे त्यांच्या देखण्या आणि भारदस्त व्यक्तीमत्वामुळे 1980 च्या दशकात 'चॉकलेट हिरो' म्हणून प्रसिद्ध होते. गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, देवता, दुनिया करी सलाम अशा चित्रपटातून त्यांनी साकारलेल्या अभिनयाच्या विविध छटा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. त्यांची देऊळबंद चित्रपटातील संत श्री गजानन महाराज यांची भूमिका छोटी पण लक्षात राहणारी आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने दमदार अभिनय असणारे रुबाबदार व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे,देखणे व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू अभिनयाच्या बळावर ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांनी मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर अनेक दशके अधिराज्य करणारा महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. रवींद्र महाजनी यांच्या अभिनयाने मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला. मराठी कलासृष्टी समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या निधनाने एक देखणा कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे.

रवींद्र महाजनी यांच्या निधनाने त्यांचा चाहता वर्ग, मराठी चित्रपट सृष्टी आणि त्यांचा परिवार सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या गुणवान अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण...

जेष्ठ विनोदी अभिनेता 'सतीश कौशिक' यांचं निधन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
 
कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 मध्ये झाला. हरियाणाच्या महेंद्रगड येथे त्यांचा जन्म झाला होता. सतिश कौशिक यांनी आपल्या करीअरची सुरुवात 1983 मध्ये आलेल्या 'जाने भी दो यारो' या सिनेमातून केली होती. त्यानंतर त्यांनी 100 हून अधिक सिनेमात काम केलं. 1993 मध्ये त्यांनी रुप की रानी चोरों का राजा या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर त्यांनी डझनभर सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यांनी अनेक सिनेमांचीही निर्मिती केली. सतीश कौशिक यांचं वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी प्रत्येक प्रकारच्या भूमिका केल्या. मात्र, त्यांच्या विनोदी भूमिका अधिक गाजल्या. त्यांच्या विनोदी भूमिकांना तोड नव्हती.

मिस्टर इंडियातील कॅलेंडर ची भूमिका गाजली
सतीश कौशिक यांची मिस्टर इंडियातील भूमिका सर्वाधिक गाजली. त्यांना दोन वेळा बेस्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळालेला आहे. अभिनेता गोविंदासोबतचा त्यांचा कॉमेडीचा टायमिंग अफलातून असायचा. त्यांच्या छोट्या भूमिकाही प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहायच्या.

करीयर
सतीश कौशिक यांनी दिल्लीच्या करोलबागमध्ये आपलं शिक्षण घेतलं. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या करोडीमल कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. 1978 मध्ये तिथून ते पास झाले आणि त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात शिक्षण घेतलं.
त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीतला एक चकणारा तारा निखळला. त्यांच्या निधनावर चित्रपट श्रुष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

'तू झूठी मैं मक्कार' ही रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस...


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'तू झुठी में मक्कार' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. होळीच्या सणावर शक्ती कपूरच्या लाडली (श्रद्धा कपूर) सोबत रणबीर कपूरची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. त्यामुळे हे दोन्ही स्टार्स एकदाही एकत्र दिसले नाहीत. अशा परिस्थितीत, थिएटरमध्ये त्यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक दिसत होते. भरपूर प्रणय जोडून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी चाहत्यांना खूप आवडली. या जोडीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. तू झुठी मैं मक्कारला होळीच्या सणाचा खूप फायदा झाला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास 14 कोटींचा व्यवसाय केला आहे. जे वीकेंडला वाढणार आहे.

दिग्दर्शक लव रंजन हे रोमँटिक-कॉमेडी चित्रपट बनवण्यात माहिर मानले जातात. यापूर्वी त्याने दे दे प्यार दे, सोनू के टीटू की स्वीटी आणि प्यार का पंचनामा सारखे चित्रपट केले आहेत. या चित्रपटात पहिल्यांदाच रणबीरसोबत काम करणाऱ्या लवने त्याच्या नवीन चित्रपटातही एक उत्तम कथा दिली आहे, जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

'तू झुठी में मक्कर' हा चित्रपट एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट वाटतो, पण ही अशी प्रेमाची नदी आहे, ज्यात बुडून जावे लागते, तसेच ज्या झऱ्यातून पाणी आले आहे त्याचा उगम आहे. सोबत कार्तिक आर्यन आणि नुसरत भरुचा देखील आहे. पण, हा चित्रपट म्हणजे लव रंजनने सिनेमाच्या मदतीने प्रेक्षकांची समज वाढवण्याच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल आहे असं चित्रपट तज्ञ् म्हणतात.

इंग्लंड ठरला टी-२० विश्वचषक २०२२ चा विजेता, पाकिस्तानवर ५ विकेट्सने दणदणीत विजय

 
सह्याद्री चौफेर | न्यूज 
 
वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी २० विश्वचषकाचा आज समारोप झाला. टी२० विश्वचषकाचा अंतिम फेरीतील सामना रविवारी (१३ नोव्हेंबर) रोजी ऐतिहासिक मेलबर्न मधील एमसीजी म्हणजेच मेलबर्न क्रिकेट मैदानवर संपन्न झाला. 
 टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात आज मेलबर्न येथे खेळवला गेला त्यात इंग्लंडने पाकिस्तानला पाच गडी राखून पराभव करत टी२० विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरले. बेन स्टोक्सने झुंजार अर्धशतकी खेळी करत संघाला विश्वचषक जिंकून दिला. मात्र मोक्याच्या क्षणी तीन गडी बाद करणाऱ्या सॅम करनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
प्रथम फलंदाजीसाठी पाकिस्तानला इंग्लंडने आमंत्रित केले. पाकिस्तानसाठी बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांनी २९ धावांची सलामी दिली. रिझवान या सामन्यात केवळ १५ धावा करून बाद झाला. युवा मोहम्मद हॅरिस या सामन्यात अपयशी ठरला. कर्णधार बाबरने २८ चेंडूवर ३२ धावांची संथ खेळी केली. शान मसूदने ३८ तर शादाब खानने २० धावांचे योगदान दिले.
 इंग्लंडच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत एकही पाकिस्तानी फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. सॅम करनने टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजीला खेळपट्टीवर तग धरू दिले नाही. त्याने ४ षटकात फक्त १२ धावा देत पाकिस्तानचे ३ फलंदाज बाद केले. याचबरोबर आदिल राशिदने बाबर आझम हा इंग्लंडसमोरील मोठा अडसर दूर केला. त्याने २२ धावा देत दोन गडी बाद केले. ख्रिस जॉर्डननेही २ बळी घेत इंग्लंड संघाला मदत केली. यामुळे पाकिस्तानला २० षटकात ८ बाद १३७ धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक ३८ धावा केल्या. तर कर्णधार बाबर आझमने ३२ धावा केल्या.


बॉलिवूडचा खिलाडी अक्षयच्या बेल बॉटमची बॉक्स ऑफिस वर जादू


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मुंबई, (२२ ऑगस्ट) : बॉलिवूड चा खिलाडी अक्षय कुमार आणि वाणी कपूर चा बेल बॉटम हा चित्रपट १९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. लॉकडाऊन नंतर चित्रपट गृहमध्ये रिलीज होणारा 'बेल बॉटम' हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्यादिवशीच चांगली कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय च्या बेल बॉटम दुसऱ्याच दिवशी २.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर ओपनिंग ला चित्रपटाने ३ कोटी रुपयांची कमाई केली होती. दोन दिवसात चित्रपटाने जवळपास ५.५० कोटी रुपयांची कमाई केली. विकेंड ला जास्त कमाई करण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. बेल बॉटम या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळला आहे. कोरोना काळात बेल बॉटमच्या निर्मात्यांनी चित्रपटाला चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. तर अशा कठीण काळात चित्रपटाला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक सेलिब्रेटिंनी निर्मात्यांचे व कलाकारांचे कौतुक केले आहे. अक्षय कुमार च्या बेल बॉटम या चित्रपटात त्याच्या सोबत लारा दत्ता, वाणी कापूर आणि हुमा कुरेशी देखील आहे. हा चित्रपट १९ ऑगस्ट ला प्रदर्शित झाला आहे. तर या चित्रपटाची निर्मिती निर्माते जॅकी भगनानी आणि दिपशिखा देशमुख यांनी केली आहे.