Showing posts with label उमरखेड. Show all posts
Showing posts with label उमरखेड. Show all posts

वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पुसद आणि उमरखेड मध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 

उमरखेड़ : वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड या तालुक्यांमध्ये वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया ची शाखा स्थापन करणे व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीत पक्षाचे उमेदवार उभे करण्याकरिता पुसद आणि उमरखेड च्या विश्रामगृहात वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात वेल्फेअर पार्टी ऑफ इंडीयाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अबरार अहेमद खान,पक्षाचे जिल्हाध्यक्ष मिर्झा अतवार बैग,जिल्हा उपाध्यक्ष निलेश त्रिपाठी,जिल्हा संघटक सचिव वासीक जुबेर शेख हे प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अबरार अहेमद खान यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसोबत चर्चा करताना वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया या पक्षाबाबत सांगितले की हे पक्ष नैतिक सिद्धांताच्या आधारावर स्थापित करण्यात आलेले आहे आणि याच दृष्टिकोनातून पक्षाची पुढची वाटचाल सुरू राहील। महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा,तालुका व गाव पातळीवर लोकशाही पद्धतीने पक्षाची स्थापना करून पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात येईल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया हे आपले उमेदवार निवडणुकीत उभे करणार आहात.

या मेळाव्यामध्ये पुसद येथून एजाज अहमद खान,गफ्फार आतिश,प्रो.सैय्यद सलमान,मसूद मिर्ज़ा,अमजद खान,आकिब रिजवी, मोहम्मद जांबाज,सोहेल रिजवी,आतिफ शेख,शकील बागवान,हाफिज समीर रब्बानी आणि उमरखेड मधून महमूद जनाब,कासिम अली,इब्राहिम अली नवाब,जावेद मंसूरी,मज़हरोदिन,शारुख पठान,एस.के ज़मीर,ताहिर मिर्ज़ा,देवानंद डी मोरे या सह तालुक्यांमधून समाजसेवेची व राजकारणाची जाणीव असलेले असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. ह्या कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थितांनी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अबरार अहेमद खान यांच्या सोबत येऊन पक्ष बळकट करण्यासाठी वचनबद्धता दिली.

पिरंजी येथे गावठी दारू विक्रेत्यावर उमरखेड पोलिस स्टेशनची धडाकेबाज कारवाई


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 

उमरखेड : ग्रामपंचायत पिरंजी,गावकरी मंडळी,महिला बचत गट यांच्या वतीने दिनांक १२/१०/२०११ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले होते.

त्याचाच पडसाद म्हणून दिनांक १७/११/२०२१ रोजी उमरखेड पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक बनसोडे मॅडम, बीट जमादार चव्हाण व जाधव यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत पदाधिकारी शंकर सुळ (उपसरपंच), ग्रामपंचायत सदस्य संतोष भवाळ, देवानंद पाईकराव,कृष्णा लोखंडे,तसेच दिगंबर मुरमुरे,सचिन वाहूळे,पांडुरंग डुकरे,अभिजीत आडे,महिला बचत गट सागरबाई दवणे,लता कांबळे,वनिता वाहुळे,सुभद्राबाई पठाडे,नंदाबाई ढोके,नंदाबाई पाईकराव व इतर महिला यांच्या समक्ष दारू विक्रेत्यावर खूप मोठी कारवाई पिरंजी येथे करण्यात आली. या कारवाईमध्ये मुद्देमाल पकडून दारू काढण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले. या केलेल्या कारवाईवर समाधान व्यक्त करत पोलीस कर्मचाऱ्याचे महिला मंडळ मार्फत स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना सहाय्यक निरीक्षक बनसोडे मॅडम यांनी महिला मंडळ व ग्रामपंचायत शब्द दिला आपल्या परिसरामध्ये जो कोणी दारू विकत असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. या केलेल्या कारवाईवर ग्रामपंचायत, गावकरी व महिला समाधान व्यक्त करत आहे.

ग्रामपंचायत पिरंजी च्या वतीने माहेरभेटीचा आयोजीत सोहळा संपन्न

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव : दिवाळी सणाचे औचित्य साधुन दि.४/११/२०२१ रोजी ग्रामपंचायत पिरंजी ता. उमरखेड च्या वतीने माहेरभेटीचा सोहळा आयोजीत केला. पिरंजी ग्रामपंचायत अंतर्गत ज्या महिलांनी मुलीला जन्म दिला अशा महिलांना साडी चोळी भेट देऊन लक्ष्मीपूजन च्या दिवशी खऱ्या लक्ष्मीचे पूजन अर्थात नव्या मुलीच्या जन्माचे स्वागत करून माहेरभेट कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी या शुभप्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण काळे, प्रमुख पाहुणे सुनील जाधव सर, शंकर सुळ उपसरपंच, विजय नखाते मारुती मुरमुरे, संजय आडे,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई गणेशराव लोखंडे, वंदना संजय खूपसे, संतोष संभाजी भवाळ,देवानंद पाईकराव, कृष्णा लोखंडे,देवानंद रोकडे, सुनील मुरमुरे, सचिन वाहुळे, गंगाराम दवणे, महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक युवक मंडळ व समस्त गावकरी मंडळ उपस्थित होते.

"या" महामार्गावर अज्ञाताकडून ट्रक चालकाची दगडाने ठेचून हत्या

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
उमरखेड, (२३ ऑक्टो.) : तालुक्यातील चिल्ली व सुकळी (ज) गावादरम्यान तुळजापूर नागपूर महामार्गावर अज्ञातांनी ट्रक चालकाची दगडाने ठेचुन हत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली असुन, महामार्गावर घडलेल्या या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे.

हत्या करण्यात आलेला ट्रक चालक हा बिहार राज्यातील औरंगाबाद येथील रहिवासी असुन त्याचे नाव अमर कुमार (वय २५) असल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असुन, आज सकाळी ६ वाजता सुकळी येथील शेतकरी मधुकर गंगात्रे यांच्या शेताच्या धुर्‍यावर एक मृतदेह असल्याची माहीती पोलिसांना मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. मृतकाची ओळख हायवेवरुन जात असलेले दुसरे ट्रक चालक वेदराम ठाकूर रा.भिलाई छत्तीसगड यांनी पोलिसांना दिली तसेच मृतका सोबत रात्री ८ वाजता फोनवर संभाषण झाल्याचे सुद्धा वेदराम ठाकूर यांच्याकडून सांगण्यात आले. मृतक अमरकुमार ट्रक चालक हे ट्रक घेऊन बिलासपुर छत्तीसगढ ते परळी ला ट्रक क्रमांक CG 07 A X 3772 दगडी कोळसा घेऊन जात होते. सदर घटना रात्री १ ते ४ च्या दरम्यान घडली असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
  
परिस्थितीजन्य पुराव्यावरून मृतकाचे हत्या झाल्याचे वर्तवण्यात येत आहे. तपास करण्यासाठी यवतमाळ येथून फॉरेन्सिक लॅब तज्ञ व डॉग स्कॉट बोलावण्यात आलेले आहे. हत्या चे कारण अद्यापही समोर आले नाही व मारेकरी अजूनही कोण आहेत हे सुद्धा समोर आले नाहीत.

सदर घटनेचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल माळवे, पीएसआय विनीत घाटोळ, ए.पी.आय. संदीप गाडे करत आहे. मृतक शरीर शवविच्छेदनासाठी उमरखेड शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे.

उमरखेड नगरीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान लोकार्पण सोहळा

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
उमरखेड, (१९ ऑक्टो.) : उमरखेड नगरीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान लोकार्पण सोहळा (ता.१८) ला संपन्न झाला.

समाजभूषण पद्मश्री मा. खासदार डाॕ. विकासजी महात्मे साहेब यांच्या शुभहस्ते. मा.खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली. मा.श्री रामराव वडकुते हिंगोली भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष, लोकनेते माजी आमदार मा.श्री उत्तमराव इंगळे साहेब,मा.आमदार नामदेवराव ससाणे, मा.नितीन भुतडा भाजपा जिल्हाध्यक्ष यवतमाळ मा.श्री बाळासाहेब नाईक बांधकाम सभापती नगरपरिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

जी वडकुते साहेब हिंगोली भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष, लोकनेते माजी आमदार मा.श्री उत्तमरावजी इंगळे साहेब,मा.आमदार नामदेवरावजी ससाणे साहेब, मा.नितीनजी भुतडा साहेब भाजपा जिल्हाध्यक्ष यवतमाळ मा.श्री बाळासाहेब नाईक बांधकाम सभापती नगरपरिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
उमरखेड, (३० सप्टें.) : तालुक्यातील कृष्णापुर येथील अल्पभुधाक शेतकऱ्याने कर्जाला कंटाळुन टेकडीवर जाऊन टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केली.

अर्जुन रामचंद्र आडे (४३) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार ढाणकी येथून जवळच असलेल्या उमरखेड तालुक्यातील कृष्णापुर येथील तरुण अल्पभूधारक शेतकरी अर्जुन आडे यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.

मृतक शेतकरी यांच्या वर विविध सहकारी सोसायटी ढाणकी यांचे कर्ज असल्याचे समजते. व त्याच कर्जाच्या परतफेडीची काळजी त्यांना असल्याचे बोलल्या जात आहे. त्यांच्या पश्चात आई पत्नी,दोन मुले व एक मुलगी असा कुटूंब आहे. 

टाकळी (ई) बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत मृत पावलेल्यांना धनादेश वाटप


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
उमरखेड, (१९ सप्टें.) : तालुक्यातील टाकळी (ई) येथील गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिंपळवाडी येथे दिनांक ३१ ऑगस्ट रोजी आदिलाबाद येथे काम करण्यासाठी पिंपळवाडी येथील मजूर काम करण्यासाठी गेले होते.
शेतामध्ये काम करीत असतांना संगीता संजय जाधव (वय २८) यांच्यावर वीज कोसळून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता व दुसऱ्या घटनेत पिंपळवाडी येथील कर्जबाजारी शेतकरी प्रकाश सिताराम चव्हाण यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. 
या दोन्ही घटनेमधील परिवारांना बळीराजा चेतना अभियानांतर्गत मृत्यू पावलेल्याना धनादेशाचे दि १८/९/ २०२१ रोज शनीवार ला वाटप करण्यात आले.

आदिलाबाद येथे वीज पडून मृत्यू पावलेल्या संगिता संजय जाधव व प्रकाश सिताराम चव्हाण ह्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ग्रामपंचायत टाकळी (ई) बळीराजा चेतना अभियान अंतर्गत धनादेशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी टाकळी ग्रामपंचायतचे सरपंच उज्ज्वला हाके, उपसरपंच दिलीप जाधव, सचिव विनोद चव्हाण, सदस्य संदेश मोरे, विठ्ठल गव्हाळे, उमेश जाधव, बाळू चव्हाण,अतुल देवकते, मोहन जाधव, भारत जाधव प्रमोद जाधव, प्रदीप राठोड (इंजिनीयर) सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, ह.भ.प. दत्ता महाराज, विनोद चव्हाण व नागरिक उपस्थित होते.

विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
उमरखेड, (०३ संप्टें.) : तालुक्यातील टाकळी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ईसापुर( पिंपळवाडी) येथील अल्पभुधाक शेतकरी प्रकाश सिताराम चव्हाण यांनी कर्जाला कंटाळुन विष प्राशन करून आत्महत्या केली फुलसावंगी येथून जवळच असलेल्या उमरखेड तालुक्यातील इसापूर येथील तरुण अल्पभूधारक शेतकरी प्रकाश चव्हाण यांनी विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली आहे.

मृतक शेतकरी यांच्या वर सेंट्रल बँक शाखा फुलसावंगी व विविध सहकारी सोसायटी यांचे कर्ज असल्याचे समजते. व त्याच कर्जाच्या परतफेडीची काळजी त्यांना असल्याचे बोलल्या जात आहे त्यांच्या मागे आई पत्नी,दोन मुले व एक मुलगी असा कुटूंब आहे. पाच  एकर जमीनीत काबाळ कष्ट करून प्रकाश आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होता, त्याच्या अशा टोकाच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटूंब उघड्यावर आले असून, त्याच्या कुटूंबिययांना शासकीय मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

व्‍यंग्‍यचित्रकार प्रभाकर दिघेवार राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
उमरखेड, (३१ ऑगस्ट) : व्यंगचित्रकले द्वारे उमरखेड नगरीचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे येथील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार तथा महावितरण कंपनीत कार्यरत प्रधान यंत्रचालक प्रभाकर दिघेवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रभाकर दिघेवार गेल्या जवळपास २५ वर्षांपासून व्यंगचित्रकला क्षेत्रात कार्यरत असून ते आपल्या कलेद्वारे अनेक सामाजिक तसेच ज्वलंत प्रश्नांवर सतत जनजागृती करीत असतात. त्यांचे पर्यावरण क्षेत्रातील कार्यही उल्लेखनीय आहे. दिवसेंदिवस निसर्गाच्या ऋतुचक्रात होत असलेला बदल व त्यामुळे शेतकऱ्यांवर कोसळणारे संकट यावरही त्यांनी अनेक व्यंगचित्रांव्दारे प्रकाश टाकला आहे. वृक्षसंवर्धन, पाणी बचत, वीज बचत, रेन हार्वेस्टिंग, हागणदारी मुक्त गाव, स्वच्छता अभियान, इत्यादी अनेक विषयावर व्यंगचित्रांच्या माध्यमातून ते सतत जनजागृती करीत असतात. त्यांची एकूण व्यंगचित्रकार क्षेत्रातील तसेच सामाजिक व पर्यावरण क्षेत्रातील कार्य पाहून त्यांना सन २०२१ च्या राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महात्मा बसवेश्वर संस्थान येथे आज एका छोटेखानी कार्यक्रमात गोपालभाऊ अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी कृषी महाविद्यालयाचे चेअरमन डॉ.विजय माने, भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अशोक वानखेडे, एपीआय गाडे, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेचे पूर्व महाराष्ट्र अध्यक्ष दीपक ठाकरे, सर्व सदस्य तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रुस्तम शेख यांनी अभिनंदन व्यक्त व्यक्त केले.