विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
उमरखेड, (०३ संप्टें.) : तालुक्यातील टाकळी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ईसापुर( पिंपळवाडी) येथील अल्पभुधाक शेतकरी प्रकाश सिताराम चव्हाण यांनी कर्जाला कंटाळुन विष प्राशन करून आत्महत्या केली फुलसावंगी येथून जवळच असलेल्या उमरखेड तालुक्यातील इसापूर येथील तरुण अल्पभूधारक शेतकरी प्रकाश चव्हाण यांनी विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली आहे.

मृतक शेतकरी यांच्या वर सेंट्रल बँक शाखा फुलसावंगी व विविध सहकारी सोसायटी यांचे कर्ज असल्याचे समजते. व त्याच कर्जाच्या परतफेडीची काळजी त्यांना असल्याचे बोलल्या जात आहे त्यांच्या मागे आई पत्नी,दोन मुले व एक मुलगी असा कुटूंब आहे. पाच  एकर जमीनीत काबाळ कष्ट करून प्रकाश आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होता, त्याच्या अशा टोकाच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटूंब उघड्यावर आले असून, त्याच्या कुटूंबिययांना शासकीय मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.