Showing posts with label अग्रलेख. Show all posts
Showing posts with label अग्रलेख. Show all posts

लोकनेते संजय खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

अ|भि|ष्ट|चिं|त|न | वा|ढ|दि|व|स

काँग्रेसचे दिलदार नेते, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, महिला सक्षमीकरणासाठी कायम प्रयत्नशील असणारे, सामाजिक राजकीय क्षेत्रात आपल्या मनमिळाऊ स्वभाने छाप पडणारे संचालक - महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ मर्या. मुंबई, संस्थापक अध्यक्ष जय जगन्नाथ मल्टी स्टेट केडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. वणी, जनरल सेक्रेटरी- यवतमाळ जिल्हा कॉग्रेस कमिटी, तथा समाजकारिणी, कामगार लोकनेते, तरुणांईच्या गळ्यातील ताईत, आदरणीय संजय भाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...!!
आज आपला वाढदिवस, या वाढणाऱ्या प्रत्येक दिवसगणिक आपलं यश, आपलं ज्ञान, आपली कीर्ती अशीच वाढत जाओ...हिच सदिच्छा...
भाऊसाहेब आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..💐🙏🙏


शुभेच्छुक:-
संजय_खाडे मित्र परिवार, वणी विधानसभा क्षेत्र

स्वरांगण तबला विद्यालय मारेगाव तर्फे गुढी पाडवा व रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा...!

गुढी पाडव्याच्या व रमजान ईद च्या स्वरांगण तबला विद्यालय मारेगाव तर्फे हिंदू मुस्लिम बांधवाना हार्दिक शुभेच्छा...!

-रवि घुमे
उच्च शिक्षित तबला शिक्षक
तबला विशारद, तबला भास्कर व पत्रकार

मारेगाव तालुक्यातील सर्व जनतेला गुढी पाडवा व नूतन वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा...


आजपासून मराठी नवीन वर्षाला सुरवात होते तसेच साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर गुढी पाडवा साजरा केला जात आहे. 

यानिमित्त लोकांमधील परस्पर स्नेह, बंधुभाव व एकोपा वृद्धिंगत होवो, या प्रार्थनेसह मारेगाव तालुक्यातील जनतेला नवीन वर्ष व गुढीपाडवाच्या शुभेच्छा...

शुभेच्छुक :- 
माजी तालुका अध्यक्ष : रुपेश ढोके, मनसे 
सरपंच : सुषमा रुपेश ढोके, कानडा ग्रामपंचायत 

गणेशभाऊ झाडे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

अ|भि|ष्ट|चिं|त|न 

सुखाची लाट तुमच्या जीवनात यावी, दुःखं दूर जावीत आणि तुम्ही सदैव आनंदी राहा. तुमच्या जन्मदिनी अनंत शुभेच्छा! तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो आणि तुमच्या जीवनात अमूल्य प्रेम आणि आनंदाचा अनुभव द्विगुणित मिळो. भाजपा मारेगाव तालुका सरचिटणीस तथा जिवलग मित्र गणेश भाऊ झाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

शुभेच्छुक : सर्व मित्र परिवार 
मारेगाव, वणी, झरी तालुका 

स्त्री आणि स्त्रीत्व....

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

शनिवार, ८ मार्च २०२५ आज जागतिक महिला दिनाची थिम "त्वरीत करा" ही आहे. महिलांवरील शारीरिक अन्यायाविरुद्ध शिक्षा सुनावणी व अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी या धरतीवर ही थिम ठरवण्यात आलेली आहे. दोन दशकांपुर्वी लेकीची भृणुहत्या टाळा म्हणत खपणार्या शासनापुढे फारच कमी काळात महिला सुरक्षेचे गंभिर आव्हान उभे ठाकले आहे.पुर्वी लेक भृणुअवस्थेत पोटात व आता समाजात ,काळ कोणताही असला तरी स्त्री व तिचे स्त्रीत्व धोक्याच्या उंबरठ्यावर उभे आहे हे नक्की. स्त्री देह पोसणे ,सुरक्षीत ठेवणे व त्यातील स्त्रीत्व जपणे हे हल्ली आव्हानच झाले आहे.ज्याप्रकारे अतिप्रमाणात रासायनिक खते वापरून जमिनीचा पोत खालावत चालला त्याचप्रमाणे स्त्री देहातील स्त्रीत्वही धोक्यात येत आहे.
 
सामाजिक,मानसिक, आर्थिक, वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांमुळे तरुण मुलींमधुन एक नवा व चुकीचा सुर जन्माला यायला लागला आहे.आम्हा मुलींत व मुलांत समानता आहे.तर आम्ही पुर्णतः मुलांसारखे अधिकार,वागणे बोलणे ठेवून जगणार म्हणत मुली मुलांसारखे जिन्स टिशर्ट,बाईक चालवणे, कोणत्याही प्रकारचे स्त्रीत्व दर्शक शृंगारिक दागिने न घालणे.मोठ्या डायलची मनगटी घड्याळे वापरणे , अर्वाच्य शिवराळ भाषा वापरणे, रात्रीबेरात्री बेधडकपणे बाहेर वावरणे ,डॅशिंग दिसावं ,म्हणजे कुणी पुरुष वाटेला जाणार नाही या भ्रमात जगत आहेत,.क्वचितदा पुरुषांकडुन एखाद्या वाईट अनुभव आलाच तर एकटीने आयुष्य काढायचा निर्णय घेणे.किंवा लग्नाप्रती निरसता बाळगणे.वगैरे वगैरे दुखावलेली स्त्री मानसिकता जन्माला येत आहे.

नवीन आयुष्य जन्माला चालणार्या मुलींच्या मनात स्वतः:घ्या आयुष्याप्रतीची ही नकारात्मकता समाजातील वातावरण कारणी तर आहेच, शिवाय मुलींची चुकीची जडणघडण ही तेवढीच जबाबदार आहे. नर,मादी असे भिन्न देह विधात्याने सृष्टीची रचना करण्याच्या हेतूनेच निर्माण केली आहे .मग आपण रचियेत्याच्या निर्मितीवर साशंक तर व्यक्त करत नाही ना? यावर मंथन व्हायला हवे. आणि मुलामुलींत समानताच ठेवायची आहे तर ती प्रेम ,अधिकार,मानसन्मान,यात असावी हे अपेक्षित आहे.मुलींनीच मुलांची बरोबरी का करावी ? मुलांनी मुलींची बरोबरी का करु नये? शाळा महाविद्यालयांत मुलींना मुलांच्या बरोबरीने न्याय देण्यासाठीचा उपाय म्हणून शर्ट पँट असा गणवेष असतो.प्रश्न जर बरोबरीचा आहे तर, मुलांना मुलींचा पेहराव का नसतो? इथे वैचारिक स्तब्धता येते.विधात्याची उलट चौकशी करणे असा हा मामला आहे.
 
जन्माला घातल्यानंतर मुलीला मुलीसारखे वाढवणे,तिच्यातील नैसर्गिक लज्जा,शृंगार,श्रध्दा,भक्ती या भावना न दडपता तिला खंबीरत्वाचे धडे देणे ही स्त्रीत्व जपताना काळाची गरज आहे..विरांगणा झाशीची राणी पुरुषी पराक्रम करताना पाठीशी मुलं बांधुन ममत्व जपते, राजमाता जिजाऊ शिवरायांना महाभारत,रामायणातील कथा सांगताना त्यांचा एक हात शिवरायांज्या पाठीवर तर दुसरा हात कमेरेतील समशेरीवर दिसतो.पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या हातात महादेवाची पिंड बघायला मिळते.यावरुन हे लक्षात येते पुरुषी क्षेत्रात भिमपराक्रम गाजवलेल्या या स्त्रीयांनी स्त्रीत्व कसोशीने जपलेले दिसतेय.हल्लीच्या मुलींना स्त्री देहाचा अभिमान वाटत नाही.स्त्रीत्व दर्शक मासिक स्त्राव हा मनोकायिक छळ वाटतो.यातुनच नैराश्य ग्रासित भाव उत्पन्न होतात.पुढे स्त्री शरीरात स्त्रवणारे प्रोजेस्टेराॅन,इस्ट्रोजन,यांचे असुंतलन होते.सतत पुरुषी हावभाव ,पेहराव,पुरुषी विचारधारा यामुळे स्त्री देहात पुरुषत्व दर्शक संप्रेरके स्त्रवायला लागतात.आणि स्त्रीत्व , प्रजननक्षमता ओसरते.आपण महादेवाच्या एका रुपाला अर्धनारीनटेश्वराच्या रुपात पाहतो.यात महादेवाच्या निम्म्या अंगात देवी पार्वती वास करते.प्रत्येक पुरुषात वत्सल माता असते तर प्रत्येक स्त्रीमध्ये उत्पत्ती,स्थिती आणि लयाची शक्ती ठेवणारा खंबीर,प्रसंगी विनाशकारी महादेव ही वसतो.फक्त या दोन्ही तत्वांची सरमिसळ न करता संतुलन गरजेचे आहे.हल्लीचे वाढते वंध्यत्व, प्रजजन अंगाचे कर्करोग,पाळीच्या समस्या, गर्भाशय निर्हरण शल्यक्रिया यांची गरज हे शरीरातील स्त्रीत्वावरील आघात आहे . स्त्रीदेहाची कर्तव्ये,भावनिक गरजा,श्रम,क्लम, श्रमपरिहार ह्या सगळ्या बाबी पुरुष देहापेक्षा कैकपटीने भिन्न असतात.हे समाजास कळणे गरजेचे आहे.
 
मुली शिकुन आर्थिक रित्या संपंन्न होत आहे.त्यांची सहचारी निवड निकष तात्विक आहे.जर हे निकष पुर्णत्वास जात नसतील तर त्या सरळ अविवाहीत आयुष्य जगण्यास तयार आहेत.किंवा करिअर व स्वातंत्र्य यात कौटुंबिक जबाबदाऱ्या नकोत म्हणून पुरुष व स्त्रीया एकत्रीत राहुन देहाच्या गरजा भागवताना दिसत आहे,.कुटुंबसंस्था ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे.आर्थिक स्थिरतेनंतरही जेव्हा कधी तरी मानसस्थिरतेची गरज असते तेव्हा स्त्रीपुरूष दोघांनाही एकमेकांच्या आधाराची गरज असते. आत्मिक सुखाची अनुभुती देणार्या भारतीय संस्कृतीचे डोहाळे उगाच लागले नाहीत.
आयुर्वेदामध्ये " नास्ति मुलंविनौषधी"असे म्हटले आहे. पृथ्वीवरील उत्पन्न एखाद्या वनस्पतींचा काहीच उपयोग नाही अशी एकही वनस्पती नाही तर व्दिपाद, चतुष्पाद, किटक, पशुपक्षी यांतील मादी देह निर्मितीचा हेतूही तेवढाच खास आहे. बुद्धीजिवी मानवजातीने स्त्री देहाचा पर्यायाने निसर्गानिर्मितीचा खास आदर करावा,त्यास कसोशीने जपावे.हे स्त्री व पुरुष दोघांचेही कर्तव्य आहे.

-वैद्य सुवर्णा चरपे
सर्वोदय चौक, वणी 

स्त्री आणि अध्यात्म....

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

बुलढाणा : स्त्री आणि अध्यात्म यांचे पुरातन काळापासून आजतागायत अगदी जवळचे नाते आहे .स्त्री या शब्दातच एक अद्भुत शक्ती आहे. तेहतीस कोटी देवाचे सामर्थ्य या स्त्रीत्वात लपलेले आहे. प्रत्येक स्त्रीला आपल्या कुटुंबावर परमेश्वरी दयेची सावली पाहिजे असते. त्यासाठी ती सतत उपास तपास, जप तप,उपासना , अनेक व्रतवैकल्ये,म्हणजे सगळे शोडशोपचार करायला तयार असते. जणू काही आपल्या कुटुंबासाठी ती आदिशक्तीचा अवतार घेऊनच कार्यरत असते.
 म्हणून प्रत्येक कुटुंबातील स्त्री ही एक आदिशक्तीच म्हणा की .
अशात एका साक्षात आदिशक्ती रुपात जन्मलेल्या परमपूज्य श्री निर्मला देवी. यांचा जन्म छिंदवाडा येथे 21 मार्च 1923 ला झाला. त्या स्वतः डॉक्टर असून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात गांधीजीं सोबत क्रांतिकारी कार्यात भाग घेतला. गांधीजींनी जेव्हा या महामायेला क्रांतिकारी रूपात पाहिले तेव्हा गांधीजी म्हणाले, की आता "दैवी शक्ती पृथ्वीवर आलेली आहे . श्री निर्मला देवी या सहज योगाच्या प्रणेत्या .
आतापर्यंत आपण हटयोग, कर्मयोग ,राजयोग, भक्तियोग, लय योग, अष्टांग योग इत्यादी योगाचे प्रकार पाहिले. मात्र सहज योग म्हणजे काय? तर हे आपण जाणत नाही तर चला आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
 सह म्हणजे सोबत आणि ज म्हणजे जन्मणारे म्हणजेच आपल्या सोबत जन्मणारा योग, म्हणजेच "सहज योग" यात आपली कुंडलीनि शक्ती जागृत करून परमेश्वरांशी आपण एकरूप होतो. 
 आपले शरीर हे सात चक्र आणि तीन नाड्या यापासून बनलेले आहे .ते सात चक्र कोणते? 
 १)मुलाधार चक्र 
२) स्वाधीष्टान चक्र 
३) नाभिचक्र 
४) अनाहत चक्र 
५) विशुद्धी चक्र
६) आज्ञाचक्र
७) सहस्त्रार चक्र .
तसेच तीन नाड्या...
१) इडा नाडी.
२) पिंगला नाडी.
३) सुषुम्ना नाडी .
या सर्वांचे ज्ञान परमपूज्य आदिशक्ती श्री निर्मला देवी यांनी पृथ्वीवर प्रसारित केले. किती अद्वितीय ..किती अद्भुत शक्ती या माउलीजवळ. साक्षात आदिशक्ती च .
लहान असताना एका पाठात शिकले होते की कुटुंबातील एक स्त्री जरी शिकली, सुशिक्षित झाली तर अवघे कुटुंब सुशिक्षित होते. त्याचप्रमाणे श्री निर्मलादेवी यांनी पूर्ण विश्वाला आपले कुटुंब म्हणून विश्वातील प्रत्येक व्यक्तीला सुशिक्षित म्हणजेच आत्मसाक्षात्कारी बनविण्याचा प्रयत्न केला या देवीने पृथ्वीवर जनसामान्यांना आपली कुंडलिनी शक्ती जागृत करून आत्मसाक्षात्कार देण्याचे महान कार्य केले जेणेकरून आपले परमपिता परमेश्वराशी कनेक्शन जोडले जावे. प्रत्येक चक्राची अधिष्ठित देवता कोण ?
याचे ज्ञान जनसामान्यात पोहोचविले ... म्हणजेच १)मुलाधार चक्राची अधिष्ठाती देवता --श्री गणेश 
२) स्वादिष्टान चक्राची --ब्रह्मदेव सरस्वती 
३)नाभिचक्र -- श्री विष्णू लक्ष्मी 
४) अनाहत चक्र ---जगदंबा ५) विशुद्धी चक्र ---राधाकृष्ण 
 ६)आज्ञाचक्र --, महावीर गौतम बुध्द,एकादश रुद्र, महालक्ष्मी ,महा गणेश. ७)सहस्त्रार --- सदाशिव आदिशक्ती .

आणि तीन नाड्या 
१) इडा नाडी-- महाकाली आणि भैरवनाथ .ही चंद्र नाडी आहे. ही नाडी भूतकाल दर्शविते.
२) पिंगला नाडी ही सूर्य नाडी आहे .या नाडीवर साक्षात महा सरस्वती व हनुमानजींची शक्ती आहे. ही नाडी भविष्यकाळ दर्शविते.
३) सुषुम्ना नाडी -- महालक्ष्मी व महा गणेश . ही नाडी वर्तमान काल दर्शविते.
    एवढे अगाध ज्ञान आपल्याला देणारी ही माऊली, या माऊलीला कोटी कोटी नमन .
   आपण रोज पेपर वाचतो म्हणा किंवा पेपर उघडतो त्यावेळेस आपल्या नजरेस काय येते ..कोणत्या बातम्या असतात पेपरमध्ये ..एक बलात्कार ,दुसरा म्हणजे नशेत ,वाईट संगतीत मदमस्त होऊन वावरणारी ही पिढी.. असं मोठं शीर्षक असतं आणि तिसरं म्हणजे अपघात बस ..एवढे वाचले की एका आईच्या मनात धास्ती भरते की माझी मुलगी माझा मुलगा बाहेर शिकायला गेले आहे, तसेच नोकरीसाठी बाहेर जाणारा आपला पती यांना तर काही होणार नाही ना? अशा विचारात असणारी आजची आधुनिक स्त्री ..तिला आपल्या पाखराभोवती आपल्या सख्या भोवती एक दैवीवलय, सुरक्षा कवच पाहिजे असतं .हो की नाही या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी आज सहज योग ही एक काळाची गरज बनलेली आहे. सहज योग ही एक "ध्यानधारणा" करण्याची पद्धती आहे या पद्धतीने आपल्या भोवती एक दैवी औरा निर्माण होतो या औरात, या वलयात आपल्याला परमेश्वरी साम्राज्यात असण्याचा भास होतो. भास म्हणण्यापेक्षा एक दैवि कवचच निर्माण होते आणि या कवचात आपले सर्व प्रकारचे संरक्षण होते.म्हणून माझी सर्व स्त्री जातीला नव्हे तर समाजातील सर्वच लहान मोठ्या मंडळींना नम्र विनंती की आपण सर्व सहज योगाच्या दिशेने वाटचाल करावी.

सौ. मंजुषा राजेंद्र प्रसाद पांडे

मा. मनोजभाऊ केळकर यांना वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा...!!

Happy #Birthday #Manoj Bhau Kelkar 

4 मार्च, आजपासून परत तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंदाने, प्रेमाने आणि सूर्यप्रकाशाच्या किरणांनी उजळून जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. 
मनोज भाऊ केळकर साहेब आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...!!
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हिच मित्र परिवारातर्फे सदिच्छा...!!
"Many many happy return of the day" 
HAPPY BIRTHDAY 

शुभेच्छुक :- मनोज केळकर मित्र परिवार, शिरपूर वणी 

डुग्गू बाळा तुला या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा...!


" औक्षवंत "

आज माझ्या मुलाचा '3' वाढदिवस...🎉
औक्षवंत हो, यशवंत हो, किर्तीवंत हो, दीर्घायुषी हो...
  "डुग्गू" बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा...!🎂🎊🎉

शुभेच्छुक :- सपना आकाश व समस्त कुमरे परिवार 

सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रवीण बोथले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!


खुशीयांची लाट तुमच्या जीवनात यावी, दुःखं दूर जावीत आणि तुम्ही सदैव हसत राहा. तुमच्या जन्मदिनी ढेर सारी शुभेच्छा! तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो आणि तुमच्या जीवनात अमूल्य प्रेम आणि आनंदाचा अनुभव मिळो. आमचे बिजनेस पार्टनर तथा जिवलग मित्र प्रवीणजी बोथले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छुक :- अविनाश लांबट 
• भाजप तालुका अध्यक्ष मारेगाव 
• कृ. ऊ बा. स संचालक, मारेगाव 
• सरपंच संघटना तालुका अध्यक्ष, मारेगाव 

वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजयभाऊ देरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

मा. आमदार श्री.संजयजी देरकर साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्त उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना..
साहेब आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हिच सदिच्छा...

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

शुभेच्छुक : शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व समस्त शिवसैनिक तसेच महाविकास आघाडी चंद्रपूर- वणी आर्णी लोकसभा क्षेत्र 


दिला शब्द केला पूर्ण : मा. डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे जाहीर आभार


वणी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी कार्यक्षम जनसेवक विकासपुरुष मा. डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नातून मारेगाव येथील कॉटन कॅर्पोरेशन ऑफ इंडिया (सी.सी.आय.) ची खरेदी सुरु करून दिल्या बद्दल भारतीय जनता पक्ष मारेगाव तालुका शाखेच्या वतीने जाहीर आभार...!!

आभारकर्ते :
अविनाश लांबट भाजप तालुका अध्यक्ष तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, मारेगाव 

नाट्यानुभूती - महेमूद खान

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : एखाद्या माणसाच्या नावात काय जादू असते, नावाला काय वलय असते याचा मला अलीकडे फार मोठ्ठा अनुभव आला. निमित्त होते राज्य हौशी नाट्य स्पर्धेचे. चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून हौसी नाट्यस्पर्धेचे यावर्षी १८ नाट्यप्रयोग सादर झालेत. आम्ही सुद्धा या स्पर्धेत भाग घेतला.

बुधवार दिनांक ११ डिसेंबर ला आमचे  "अस्सा नवरा नको गं बाई!" हे नाटक होणार होते. एरवी चंद्रपूर चे रसिक प्रेक्षक प्रचंड चोखंदळ आहेत हे ऐकले होते. नाटक बेकार वाटले तर नाट्यगृहाच्या खुर्च्या कधी रिकाम्या होतील याचा नेम नसतो अशी चंद्रपूरची ख्याती. तिथे आमचं नाटकं होणार म्हणजे टेन्शनच तसे आम्ही उशिरा पोहोचलो त्यामुळे पडदा उघडण्याच्या वेळेपर्यंत आमची खूप धावपळ झाली. तितक्यातच या नाटकाचे सिद्धहस्त लेखक सदानंद बोरकर सर रंगमंचावर आम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी मुद्दाम आलेत. आमची घाबरलेली अवस्था त्यांनी अचूक हेरली. "अरे नाटक बिनधास्त करा. घाबरु नका. प्रेक्षक तुमच्या सोबत आहेत. नाटक मस्त होईल." असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.आणि हिरमुसलेल्या आमच्यात मोठे बळ संचारले.

 सदानंद बोरकर हे विदर्भात नाट्य क्षेत्रातील दिग्गज नाव. वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरचे हजारो नाट्य प्रयोग करून रंगमंच गाजविणारा आणि प्रेक्षकांची अचूक नाडी ओळखणारा हा अवलिया कलाकार. एकाच वेळी अनेक भूमिका जगणारा, पार पाडणारा हा रंगकर्मी. लेखन, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शन, अभिनय, मंच व्यवस्थापनासहित निर्मितीच्या अनेक गोष्टी हा रंग तपस्वी लीलया पार पडतो. आणि पूर्णपणे यशस्वी करूनही दाखवीतो. 

झाडीपट्टी रंगभूमी मध्ये सदानंद सर यांची एक वेगळी आणि स्वतंत्र ओळख आहे.
काही वर्षांपूर्वी यमराजच्या दारावर थाप देऊन परत आल्यानंतर विश्रांतीच्या काळात एका सत्य घटनेवर सदानंद सर यांनी *"असा नवरा नकॊ ग बाई !" हे नाटक लिहायला घेतले आणि केवळ तीन महिन्यात एक सर्वांसुंदर कथा जन्माला आली. दिग्दर्शक म्हणून सरांनी यात स्वतःला झोकून दिले. पात्रांचे पोशाख कसे असावे, नेपथ्य कसे असावे, प्रकाश योजना,नेपथ्य आणि वेशभूषेशा यांची रंगसंगती यांची रचना आपल्या कलात्मक नजरेतून जन्माला घातली. अप्रतिम पार्श्व संगीत, नटांचा वास्तववादी अभिनय, संवादफेक या अत्यंत बारीक सारीक बाबींवर बोरकर सर यांनी सूक्ष्म अभ्यास केला आणि नाटक प्रत्यक्ष रंगभूमीवर आणले एवढेच नाही तर महाराष्ट्रात सदर नाटक सुपरहिट करून दाखविले. आमच्या नशिबात हे नाटकं प्रत्यक्ष बघण्याचा योग आला. आणि सरांचे हे नाटक मी सुद्धा आपच्या ग्रुपसोबत करायचे ठरविले. आणि जुळवाजुळव सुरु केली.

या नाटकाबाबत आमच्या सोबत दोन इतिहास घडले. एक म्हणजे सरांनी आजपर्यंत ही नाट्य संहिता कुणालाच दिली नाही, स्वतःच शेकडो प्रयोग केलेत. आणि अशी संहिता आमच्यावर विश्वास टाकून फक्त आम्हाला दिली.
 
दुसरा इतिहास ११ डिसेंबर ला घडला.
 सदानंद बोरकर या नावात काय जादू आहे हे आम्ही त्या दिवशी चंद्रपूरच्या प्रियदर्शनी नाट्यगृहात अनुभवले. चंद्रपूरात आमचं कोणतंही वलयं नाही. आम्ही कोणताही गाजावाजा न करता नाटक केले. फार फार चार-पाचशे प्रेक्षक येतील असा अंदाज होता. पण सदानंद बोरकर यांचे नाटक आहे हे माहीत झाल्यावर नाट्यगृह अर्धा तास पूर्वीच हाऊसफुल्ल झाले. प्रेक्षक नाट्यगृहात खुर्च्या फुल्ल झाल्यानंतर पायऱ्यांवर, दारापाशी उभे राहून तीन तास नाटक बघत होते. आस्वाद घेतं होते, प्रचंड रिस्पॉन्स देत होते. बाहेर गर्दी आवरता आवरेना. शेवटी आयोजकांनी मुख्य प्रवेशद्वारावर कुलूप लावले. आणि नाईलाजाने शेकडो प्रेक्षक परत गेले. याला म्हणतात लेखकाच्याच्या नावातील जादू....! केवळ एका रंगकर्मीच्या नावावर हजारो प्रेक्षक गोळा होण्याचा आणि प्रयोग हाउसफुल्ल होण्याचा अनुभव आम्ही सर्व कलावंतांनी पहिल्यांदाच अनुभवला होता.

आम्ही नवखे रंगकर्मी असूनही दमदार संहितेमूळे प्रयोग यशस्वी ठरला. प्रेक्षक पोट धरून हसत होते, टाळ्या वाजवत होते, प्रसंगी इमोशनल होतं होते त्यावेळी आम्ही शहारून गेलो. सदानंद बोरकर सारखे नाटककार यांची रसिक मनावर काय जादू आहे हे त्या दिवशी आम्ही अनुभवले. आम्ही सर्व कलावंत अक्षरशः भारावून गेलो. निशब्द झालोत. 

तुमच्या कर्तुत्वाला सलाम सर
तुमच्या हातून नटेश्वराची अशीच सेवा घडत राहो. रंगमंच बहरत राहो....हीच प्रार्थना.
ॲड. मेहमूद पठाण
मारेगावं (वणी)
9423266827

बलिप्रतिपदा व दिवाळी पाडवा च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा...!

सप्रेम...
दिवाळीच्या दिवशी दिवा लागतो दारी.. कंदील, पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी,
फराळ फटाक्याची मजाच निराळी
मिळून साजरे करू ही दिवाळी
   
बलिप्रतिपदा व दिवाळी गोधन च्या सर्वाना हार्दिक 
शुभेच्छा...!
       
शुभेच्छुक :-
- खुशाल येरगुडे 
ता. अध्यक्ष, ग्रामरोजगार सेवक, मारेगाव 

बलिप्रतिपदा व दिवाळी निमित्त सर्वाना लक्ष लक्ष शुभेच्छा...

सप्रेम...
आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा! कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा! दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे, सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे…

शुभेच्छुक :- 
-ज्ञानेश्वर चिकटे 
माजी ता.अध्यक्ष भाजप, मारेगाव 

दिवाळी निमित्त सर्वाना इजहार शेख यांच्या कडून लक्ष लक्ष शुभेच्छा...

दीपोत्सव...
आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा!  बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा! दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे, सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे…लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा
घेवूनी येवो नवी उमेद, नवी आशा
दिवाळीच्या आमच्या कडून लक्ष लक्ष शुभेच्छा...
     
शुभेच्छुक :-
- इजहारभाई शेख 
उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी 

रॉकवेल मिनरल्स तर्फे सर्व ग्राहकांना दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा...!

आमचे आदरणीय ग्राहक, प्रिय मित्रपरिवार आणि कुटुंबीयांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! या उत्सवाच्या प्रकाशाने तुमच्या जीवनात नवीन आशा, उत्साह आणि यशाचा प्रकाश उजळो. दिवाळीच्या या मंगलमय पर्वाने तुमचं आयुष्य आनंद, प्रेम, आणि समृद्धीने भरून जावो हीच मनःपूर्वक सदिच्छा!

सर्वांना दीपावलीच्या आनंदी शुभेच्छा..!

शुभेच्छुक :-
- रॉकवेल मिनरल्स, एम आय डीसी, वणी 

अतुल पचारे कडून बलिप्रतिपदा व दिवाळी च्या सर्वाना मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा...


सप्रेम...
दिवाळी आली सोनपावली... उधळण झाली सौख्याची... 
धनधाण्याच्या भरल्या राशी
सर्वांच्या घरी नांदू दे सुख समृद्धी..!
   
बलिप्रतिपदा व दिवाळीच्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा...!
     
शुभेच्छुक :- 
- अतुल पचारे 
सामाजिक कार्यकर्ता, चिंचमंडळ ता. मारेगाव 

बलिप्रतिपदा व दिवाळी निमित्त मारेगाव तालुका वासियांना लक्ष लक्ष शुभेच्छा...!

सप्रेम...
दिवाळीच्या दिवशी दिवा लागतो दारी.. कंदील, पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी,
फराळ फटाक्याची मजाच निराळी
मिळून साजरे करू ही आनंदाची दिवाळी...
 
बलिप्रतिपदा व दिवाळी निमित्त सर्व तालुका वासियांना हार्दिक शुभेच्छा...!
       
शुभेच्छुक :- 
-सौ. सुषमा रुपेश धोके 
सरपंच ग्रामपंचायत कानडा पं स मारेगाव 

श्री. रुपेश ढोके 
ता.अध्यक्ष : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मारेगाव 

बलिप्रतिपदा व दिवाळीच्या वणीकरांना लक्ष लक्ष शुभेच्छा...!


सप्रेम...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा
घेवूनी येवो नवी उमेद, नवी आशा
बलिप्रतिपदा व दिवाळीच्या वणीकरांना आमच्या कडून लक्ष लक्ष शुभेच्छा...!
    
शुभेच्छुक :-
डॉ. गजानन मेश्राम 
आदित्य क्लिनिक, नांदेपेरा रोड, वणी 

बलिप्रतिपदा व दीपावली निमित्त सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा...!


सप्रेम...
नवी स्वप्ने, नवी क्षितिजे, घेवून येवो ही दिवाळी... ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्य यशाची मिळो झळाळी
बलिप्रतिपदा व दीपावली सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा...!

शुभेच्छुक :-
अध्यक्ष : डॉ. मनिष मस्की 
नगर पंचायत, मारेगाव