Showing posts with label वरोरा. Show all posts
Showing posts with label वरोरा. Show all posts

चंद्रपूर नागपूर हायवेवर कार, ट्रॅक व ट्रॅव्हल्सचा एक्सीडेन्ट


सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 

वरोरा : आज चंद्रपूर नागपूर महामार्गांवर भीषण अपघात झाला. यात कार पलटी झाली असून ट्रॅव्हल्स आणि ट्रॅक एकमेकांना भीडले असल्याचे वृत्त आहे. ही घटना खांबाडा जवळ घडली.

वृत्त अस की, चंद्रपूरहुन नागपूर कडे जाणारी कार अचानक वन वे क्रॉस करीत असतांना ट्रॅक व ट्रॅव्हल्स (DNR) नागपूरहुन चंद्रपूर ला येत असतांना अचानक कार वन वे करीत असता, कार ला वाचविण्याच्या चक्कर मध्ये ट्रॅक आणि ट्रॅव्हल्स ची धडक झाली.

यात कार मध्ये बसलेल्या इसमाना किरकोळ जखमा झाल्या. तूर्तास अपघातात तीन जन जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

मा.अहेतेशाम अली यांचा हस्ते शिवजयंती निमित्य वरोरा शहरात विविध उपक्रम व कार्यक्रम

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 

वरोरा : आज दि.१९ फेब्रुवारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वरोरा शहरात मोठ्या थाटा माटात उत्साहात साजरी करत श्री.अहेतेशाम अली मा.नगराध्यक्ष न.प. यांच्या हस्ते युवा क्रांती सोशल क्लब तर्फे सर्वप्रथम शिवाजी चौक येथे राजे श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या नंतर ग्रामिण उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे महाराजांचा प्रतितिमेला माल्यार्पण करून रुग्नांचा तब्बेती ची विचारणा केली व फळ वाटप केले.

या वेळी ग्रूप चे अनिकेत नाकडे, राहुल आत्राम, निखिल श्रीरामे, नितेश मनुसमारे, प्रशित लोखंडे, आयुष मधुमटके, पराग तितरे, ईश्वर ठाकरे, सन्नी रामपुरे, अमन नायडू, वसंता गेडाम, आकाश धरने, दीपक लडी, शफीक शेख,निखिल चंदेल, अक्षय टेनपे, हाशिम अली, अनिकेत दातारकर, राजिक शेख, सतीश अड्डे, विकास बुरडकर, प्रथम बुरडकर, अभिजित चौधरी, अरहान सिद्दीकी, अरुण बावने, प्रतीक मुडे, आकाश गायकवाड उपस्थित होते. 
तसेच छावा ग्रूप तर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी रक्तदान शिबिरचे उदघाटन श्री.अहेतेशाम अली यांचा हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सर्वानी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले आणि रक्तदान शिबिराला सुरवात करण्यात आली.

या प्रसंगी कृषि उत्पन्न बाजार समिति सभापती राजुभाऊ चिकते, बोर्डा येथील सरपंच सौ.ऐश्वर्याताई खामनकर, ग्रामपंचायत सदस्य सौ.भोयर मॅडम सुधाकर कुंकुले, आकाश लिगाडे, राहुल नन्नावरे, निहाल मत्ते, समीर देठे, मंगेश पिजदुरकर, अमित नन्नावरे, अनिमेश रेड्डी, कपिल राऊत या सर्वांच्या उपस्थितीत शिवजयंती मोहत्सव साजरा करण्यात आला.

कवी नीरज आत्राम "महाराष्ट्र प्रतिमा गौरव पुरस्कार २०२१" ने सन्मानीत


सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 

वरोरा : इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटर, कला साहित्य सामाजिक लोकसंवाद प्रतिमा संमेलन कोल्हापूर २०२१ आयोजित हा कार्यक्रम राजर्षी शाहू स्मारक सभागृह कोल्हापूर येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ए. आर. आखाडे अध्यक्ष निवड समिती कला साहित्य सामाजिक लोकसंवाद कला संमेलन प्रमुख पाहुणे मा. माधव अभ्यंकर सुप्रसिद्ध अभिनेता झी मराठी रात्रीच खेळ चाले मालिका फेम, श्री बालक्रीष्ण खरात हे लाभले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सेंटर मार्फत विविध क्षेत्रात निस्वार्थीपणे सामाजिक तथा सेवाभावी उल्लेखनीय कार्य करुन सामाजिक परिवर्तनाची प्रतिमा आपल्या कर्तृत्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेच्या जोरावर आदर्श समाजसेवेची गौरव मुद्रा उमटविले आहेत. अश्याच नामवंत कला, क्रिडा, शिक्षण, साहित्य, व सामाजिक कार्यात योगदान देवून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटर कोल्हापूर च्या वतीने दरवर्षी महाराष्ट्र प्रतिमा गौरव पुरस्कार देवून सन्मान केला जातो, यावर्षी विदर्भातील निवडक व्यक्तींमध्ये सामाजिक कार्यकता, शिक्षक, कवी नीरज महादेव आत्राम, आनंदवन वरोरा "महाराष्ट्र प्रतिमा आरोग्य सेवा पुरस्कार २०२१" ने या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले रात्रीस खेळ चाले मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या शुभहस्ते सन्मानीत करून गौरविण्यात आले.

 कवी नीरज आत्राम हे अनेक नामवंत सामाजिक साहित्यिक संस्थेच्या वेगवेगळ्या पदावर कार्यरत असून,ते आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालय आनंदवन वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे वाणिज्य शाखेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम केलेले आहेत. त्यांच्या अनेक कविता चारोळ्या रेडिओ पुणेरी आवाज FM 107.8 वर सादर झाले आहेत. त्यांचा चारोळ्यांची माड चारोळी संग्रह प्रकाशित झालेला आहे. अनेक पुस्तकांमध्ये त्यांच्या कविता, हायकू संपादकीय पुस्तकात प्रकाशित झाले आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, नामांकित स्पर्धा मधे सहभाग, परीक्षक, आयोजक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. अनेक साहित्य संमेलन व कवी संमेलनामध्ये त्यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून अनेक सामाजिक व ज्वलंत विषयांना हाताळलेले आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक नामवंत संस्थेने पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल कवी, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, सहकारी शिक्षक वृंद, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ पदाधिकारी, आदिवासी सामाजिक संघटना, विद्यार्थी वर्ग, मित्रपरिवार व परिवारातील, श्री महादेव आत्राम सौ. वेणू आत्राम,सौ. नीता आत्राम, दिलीप आत्राम, सुनील आत्राम, सौ दिक्षा आत्राम, अश्विन आत्राम कु. आचल आत्राम या सर्वांनी अभिनंदन केले व सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वरोऱ्यात ट्रक-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, दोन्ही वाहन चालक जागीच ठार

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 

वरोरा : वरोरा-चंद्रपूर-नागपूर महामार्गावर दिनांक 14 ला सायंकाळी अंदाजे साडेपाच सहा वाजताच्या दरम्यान नागपूर कडून येणाऱ्या ट्रॅव्हल्स व चंद्रपुर कडून जाणाऱ्या ट्रक मद्धे आमने सामने भिंडत झाल्याने मोठा भीषण अपघात झाला. यात दोन्ही वाहन चालक जागीच ठार झाल्याची माहिती असुन, मृतांचा आकडा अजूनतरी अस्पष्ट असून कित्येकांना अपंगत्व आलं आहे.

संपूर्ण जगात सध्या कोरोनाने थैमान घातले असून सर्वत्र नियमावली महाराष्ट्र शासनाकडून लादण्यात आली आहे. दिनांक 14 ला चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-चंद्रपूर-नागपूर महामार्गावर सायंकाळी अंदाजे सहा वाजताच्या दरम्यान, रत्नमाला चौका नजिक नागपूर कडून येणाऱ्या ट्रॅव्हल्स जे योग्य मार्गाने मार्गक्रमण करीत असताना अचानक ट्रॅव्हल्स चा समोरील चालता टायर फुटल्याचे चर्चा आहे. यामुळे वाहन चालकाचे नियंत्रण बिघडले व डिव्हाडर वरून दुसऱ्या मार्गाने चंद्रपूर कडून नागपूर कडे जात असलेल्या ट्रकला समोरासमोर भिडल्याने मोठा भीषण अपघात झाला. यामध्ये ट्रक क्र. (MH-34 B-G9540) चालक अमोल भुजाडे (३५) रा. चिखलगाव,वणी आणि ट्रॅव्हल्स क्र. (MH-40A-80481) शेख शबीर शेख अहेमद (48) चंद्रपूर हे दोन्ही चालक जागीच ठार झाले. दरम्यान, असंख्य बघ्यांची गर्दी उसंडून आली होती. अपघातात काही जखमींची नाव समोर आली ती पुढील प्रमाणे :
हर्षा झाडे (वंधली),सुमित मानकर (वणी),
प्रवीण घाटे (वरोरा), प्रणाली नंदकटे (टेमुर्डा),
सुरज दाते (मजरा), संतोष गाळगटे (भद्रावती),
रीना बागेसर, भोजराज बागेसर, अनिता परचाके (घुग्गुस), रुक्मा तुलस (कोरपना), सविता रांगडे, 
प्राची झगडे, सरस्वती डाहुले, आवेश अहमद (घुग्गुस) हे असून जखमी आहे, घटनेची माहिती पोलीस विभागाला लागताच घटनास्थळी फौजफाटा दाखल होऊन क्रेन च्या साहाय्याने ट्रॅव्हल्स व ट्रकला काढण्याचे कार्य वृत्त लिहेपर्यंत सुरू होते. 


वरोरा : संदर्भ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १ दिवशीय प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण


सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 

वरोरा : येथील संदर्भ बहुउद्देशीय संस्था वरोरा अंतर्गत आत्मा, वनधन जनधन विकास परिषद, नागपूर च्या वतीने १ दिवशीय प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण (ता.६ जाने.) ला महिलासाठी राबविण्यात आले ले. या प्रशिक्षणाला वरोरा शहर व शहरालगत च्या गावातील बचत गटातील महिला उपस्थित होत्या.

या प्रशिक्षणाला मार्गदर्शन करण्यासाठी श्री राजेंद्र डेकाटे आत्मा वनधन जनधन विकास परिषद, नागपूर हे उपस्थित होते. तर प्रशिक्षणाला नगरपरिषदेचे श्री विठ्ठल टाले व चंद्रकला चिमुरकर ह्या उपस्थित होत्या. तसेच संस्थेच्या अध्यक्षा ज्योती केनेकर व इतर मंडळी उपस्थित होते.

तुलसी अलाम आता प्रस्थापित नेत्यांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद निवडणुकीत मैदानात.


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वरोरा : जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर आली असून युवा पिढी बदल घडवून आणण्यासाठी या निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर करत आहे. तसेच बोर्डा-शेगाव जिल्हा परिषद मधून तुलसी अलाम यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

सध्याची परिस्थिती अशी आहे की वर्तमान जिल्हा परिषद सदस्य समस्याचे समाधान करण्यात अपयशी ठरले. तुलसी अलाम बोर्डा येथे राहत असून सभोवताली असलेल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत सर्व सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपड करत आहे. गेल्हा पाच वर्षापासून तुलसी सामाजिक कार्यात व राजकारणात सक्रिय आहेत.

स्वताच्या ने्तृत्वाच्या व कामाच्या जोरावर वरोरा तालुका अध्यक्ष, वरोरा विधानसभा महासचिव, जिल्हा अध्यक्ष, वरोरा,भद्रावती, चिमूर पदा पर्यंत मजल गाठली आहे.
तालुक्यातच नाहीतर जिल्हात स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले आहे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. सर्व सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे.

सामाजिक कार्य करत आहे युवकांना एकत्र घेत दिशा देण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याच्या समस्या निराकरण करण्यासाठी धडपड सुरु आहे. शेतकऱ्याचे कोणतेही काम असो त्यासाठी तुलसी कोणत्याही परिस्थितीत त्याचे काम करून देतो कित्येक शेतकऱ्याचे थकलेले हप्ते. विहिरीचे पैसे त्यांनी अधिकाऱ्याशी चर्चा पाठपुरावा करून नसेल ऐकत तर आंदोलनाचा इशारादेत मागण्या पूर्ण केल्या अपगाच्या निधी असो त्याचे प्रश्न असो, निराधार लोकांचे आधार तुलसी झाला आहे परिसरातीलच नाही तर तालुक्यातील प्रश्नाना वाचा फोडण्याचे काम करत आहेत. राजकारणाऱ्या माध्यमातुन सामाजिक कार्य कसे करता येणार यासाठी ते प्रयत्नशील असतात. लोकांची सेवा करणे हाच हेतू घेऊन राजकारणात प्रवेश केला असेत्यांनी सांगितले.

लॉकडाऊन मध्ये मजुरांना अन्न धान्य किट वाटप केले. वेगळया वेगळया प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात आली. गावाचा सर्वागीन विकास आराखडा घेऊन ते काम करत आहेत. कोणताही व्यक्ती त्याच्या कडे आशेचा किरण म्हणून बघत आहे. नेहमी लोकांच्या प्रश्नांना घेऊन ते काम करत आहेत.

लोकांच्या मनात त्याची वेगळी छाप पडली आहे. सर्व सामान्य माणसाला शेतकरी अपंग व्यक्ती, निराधार यांचा तुलसीला पाठींबा आहे. युवकांमध्ये तुलसीचे ने्तृत्व डोक्यावर घेतले आहे अनेक युवक त्याच्या काम करण्याच्या प्रयत्नात सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत.

आपल्या आगळया वेगळया प्रकारची आंदोलन करून ते लोकांचे प्रश्न प्रशासना पर्यंत घेऊन जातात. अधिकाऱ्यावर त्याची वचक आहे. कारण ते अभ्यासु कार्यश्रम व्यक्तिमत्व आहे. संपूर्ण विधानसभेत युवकांचे पाठबल त्याच्या पाठीशी आहे.

तुलसीने निवडणूकीत मैदानात उतरावे अशी सर्व सामान्य माणसाची भावना आहे कोणत्याही क्षेत्रात ने्तृत्व करणे म्हणजे हुकूमत गाजवणे नसून जबाबदारी स्विकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून सोबत घेऊन प्रगती करणे होय...... याच हेतूने ते लोकांसाठी कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करतात. सर्व सामान्य कुटूंबातील मुलगा असून देखील सर्व सामान्य माणसासाठी तुलसी जीवाचे रान करून घेतो.

वरोरा येथील सिमेंट काँक्रिट रोडचे भूमिपूजन समारंभ



सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 

वरोरा : जिल्ह्या खनिज निधी अंतर्गत 10 लक्ष रुपये किंमतीचे सिमेंट काँक्रिट रोडचे भूमिपूजन समारंभ नगराध्यक्ष अहेतेशाम अली व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या हस्ते टिळक वार्ड येथे पार पडले.

बूधवारी सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास वरोरा येथील टिळक वार्ड परिसरातील ढवस ते कापसे यांच्या घरादरम्यानचा रोडचे भूमिपूजन नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हाखनिज निधी चे सदस्य नितीन मत्ते यांनी सूचक वक्तव्य करत वरोरा शहरात शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन झाल्यास यापेक्षा अधिक ताकतीने काम करण्याचे आश्वासन जनतेला दिले. तर वरोरा न.प. चे विद्यमान नगरध्यक्ष अहेतेश्याम अली यांनी खानिज विकास निधी अंतर्गत शहरात रस्ते बांधकामाकरीता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.

यावेळी या समारंभात नगराध्यक्ष अहेतेशाम अली, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, नगरसेवक दिनेश यादव, नगरसेविका सुषमाताई भोयर, मुकेश जिवतोडे ,कॉन्ट्रॅक्टर सह वार्डातील मान्यवर उपस्थित होते.

वरोरा शहरात अवैध रेती चोरांचा सुळसुळाट

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 

वरोरा : तालुक्यात अवैध रेती साठयासह अवैध रेती तस्करी करणार्‍यांचे प्रमाण वाढले असून नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या धडक कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.पैशाची आवक मंदावल्याने रेती तस्करांनी आता नवीनच शक्कल लढवून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रेती चोरी करून काळ्या बाजारात विकण्याचा गोरखधंदा सुरू केल्याचे शहरात निदर्शनास येत आहे.
        
तालुक्यातील अर्ध्याअधिक रेती घाटांचे लिलाव झालेले नसून याचा विपरीत परिणाम बांधकाम उद्योगांवर झालेला असून रेती मिळणे कठीण झालेले आहे.काही बांधकाम कंत्राटदारांनी आणि काही घरमालकांनी वैध मार्गाने आपल्या कामासाठी रेती साठा साठवून ठेवला असून या रेती साठ्यांवर रेती चोरांची नजर जात आहे. दिवसभर शहरात भ्रमंती करून कोणत्या ठिकाणी किती रेती साठा ठेवलेला आहे आणि तो कायदेशीर किंवा बेकायदेशीर याची शहानिशा न करता हे रेती चोर मध्यरात्रीला या रेती साठ्यातून ट्रॅक्टर च्या माध्यमातून रेती चोरी करीत असून रात्रीलाच ठराविक ग्राहकाला चढ्या दरात रेती विक्री करण्याचे प्रकार शहरात घडत आहेत. त्यामुळे शहरात चर्चांना उधाण आलेले आलेले आहे. एखाद्याने यावर आक्षेप घेतला तर तुमची रेती बेकायदेशीर असून एखाद्या बड्या अधिकार्‍याचे नाव सांगून दमदाटी करून त्याला चूप बसविले जात आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारे रेतीची चोरी करणारे कुणी एक व्यक्ती नसून हे टोळीचे काम असले पाहिजे याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहे. रेती चोरीच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढत असून पोलिस प्रशासनाने या सर्व प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.

नगर परिषद वरोरा तर्फे बुद्ध भूमि चे खासदार बाळूभाऊ धानोरकर व नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा हस्ते भूमिपूजन संम्पंन्न

सह्याद्री न्यूज | कालू रामपूरे 

वरोरा : नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी आपल्या वचनाची पूर्ति करत आज वरोरा शहरातील जत्रा मैदान येथील ऐतिहासिक बूद्ध भूमि ला संरक्षण भिंत बांधकाम या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
     
सुमारे तिन एकर परिसरात वसलेल्या बुद्ध भुमिला संरक्षण भिंत नसल्याने विविध सामाजिक कार्यक्रम घेतांना आयोजकांना अनेक अडचणी च्या समस्या उदभवत होत्या, त्यामुळे विविध संघटनांचे व सामाजिक कार्यकत्यांचे निवेदन नगराध्यक्ष यांना येत होते. सदर बाबीची दखल घेत जिल्ह्यातील वरोरा येथील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या जत्रा मैदान येथील बुद्ध भूमी परिसरातील या ठिकाणी अणाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत बूद्ध भूमिचा खुल्या मैदानाला संरक्षण भिंत बांधकाम करणेया कामाचे भूमिपूजन बाळूभाऊ धनोरकर (खासदार-चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र), अहेतेशाम अली (नगराध्यक्ष न.प.वरोरा) यांचा हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख उपस्थिति- भंते धम्म सारथी, अनिल झोटिंग (उपाध्यक्ष न.प.वरोरा), सौ.राखी काळबांडे (नगरसेविका न.प.वरोरा), श्री.पंकज नाशिककर (नगरसेवक न.प.वरोरा), श्री.डॉ.गुनानंद दुर्गे (नगरसेवक न.प.वरोरा), सौ.चंद्रकला चिमुरकर(नगरसेविका न.प.वरोरा) उपस्थित होते. सोबतच सुनील वरखडे,बंडूभाऊ लभाने,मोनू चिमुरकर,विजय धोपटे,जयंत ठमके,प्रवीन चिमुरकर,यांचासह बहुद्देशीय पंचशील मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
भमिपूजन प्रसंगी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी आपल्या संभाषणीय भाषणात सांगितले कि, वरोरा शहरातील संपूर्ण कार्यकाळामध्ये जे कोणी केले नाही, समाज बांधवांचा शब्दाला जपून धडपड करून नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी बौद्ध भूमिचा विकासासाठी जे कार्य केले ते ऊलेखनीय आहे. खा. धानोरकर यांनी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचे बूद्ध भूमिचा विकास कामाला मार्गी लावल्या बद्दल शुभेच्छा दिल्या.

नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या हस्ते आदिवासी समाज भवन इमारतीचे भूमिपूजन संपन्न



सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 

वरोरा : वरोरा शहरातील मध्यभागी असलेले कॉलरी प्रभागातील आदिवासी नियोजित जागेवर वरोरा शहराचे नगराध्यक्ष श्री.अहेतेशाम अली यांचा हस्ते जननायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडाजी यांच्या जयंती चे औचित्य साधून आदिवासी समाज भवन बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. नगर परिषद मार्फत आदिवासी सगा समाज बांधवांना समाज भवनचा रुपी भेट देऊन समाजातील लोकांमध्ये उत्साह आणि आनंदाची लहर निर्माण झाली आहे. अहेतेशाम अली यांचे समाज बांधवांतर्फे आभार आणि सक्तार करण्यात आले.
सदर भूमिपूजन प्रसंगी श्री गजानन मेश्राम (विरोधी पक्ष नेते न.प.वरोरा), सौ.प्रणाली मेश्राम (नगरसेविका न.प.वरोरा), संदीप मेश्राम, कविश्वर मेश्राम, राजेन्द्र जुगनाकेजी, राहुल आत्राम, द्त्ताभाऊ गावंडे, अमर आत्राम, आनंद गेडाम, मारोती किन्नाके, सुरज पेंदोर, अतुल पेंदोर, माधव आत्राम, देवानंद मडावी उमेश मेश्राम, नागोराव सिडाम, प्रमोद पेंदोर, अविनाश मडावी, आशिष टेकाम, अभिषेक सोयाम, आकाश गावंडे, अशोक पंधरे, गणेश पंधरे, दिपक गेडाम, तसेच असंख्य आदिवासी सगा समाज बांधवांची या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी उपस्थिति होती.

घरपोच सातबारा पोहचवण्याची मोहीम सुरु

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वरोरा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात गुरुवारी मोफत डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन वितरित करण्यात आला.
 
वरोरा येथील पटवारी विनोद खोब्रागडे यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. मात्र, अशातच सातबारा घरपोच मिळाल्याने शेतकरी सुखावला. तहसीलदार रोशन मकवाने व वरोरा उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या आदेशानुसार वरोरा तालुक्यात शेतकऱ्यांच्या घरपोच सातबारा देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
अनेक वेळा शेतकऱ्यांना सातबारासाठी अनेक फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे. या समस्येतून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी वरोरा महसूल विभागाने मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी पटवारी यांनी एकूण 260 शेतकऱ्यांना सातबारा वाटप केले.

बाहेर निघताच त्या'ने ठोकली जंगलाच्या दिशेने "धूम"


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वरोरा : एक पट्टेदार वाघ हरणाच्या कळपाचा पाठलाग करतांना थेट विहिरीत पडला. हे वृत्त सर्वत्र पसरताच परिसरातील नागरिक त्या दिशेने धाव घेतली.
वनविभागही त्या घटनास्थळी पोहचले. आणि तब्बल सहा तासाच्या अथक परिश्रमानंतर वाघाची विहिरीतून सुटका करण्यात यश आले.
विहिरीबाहेर निघताच वाघाने थेट जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. हे थरारक दृश्य तेथे जमलेल्या नागरिकांनी डोळ्यात साठवले. ही घटना वरोरा तालुक्यातील अल्फेर गावाच्या शिवारात सोमवारी सकाळी घडली.
वरोरा तालुक्यातील शेगाव उपवन क्षेत्रातील अल्फर गावाच्या शेतात बांधकाम केलेली विहिर आहे. सकाळी सहा वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघ हरणाच्या कळपाचा पाठलाग करीत होता. कळप विहिरीच्या दिशेने धावत होता. मात्र, विहीर दिसताच, हरणाच्या कळपाने अचानक वळण घेतले. वाघाचे लक्ष कळपावर असल्यामुळे त्याला विहीर दिसली नाही. अशातच तो विहिरीत पडला. ही थरारक घटना शेतकरी संजय सरपाते यांनी स्वतः च्या डोळ्यांनी बघितली. ही माहिती वनविभागाला दिली. घटनेचे वृत्त पसरताच, वाघाला बघण्यासाठी हजारो लोकांची शेतात झुंबड उडाली. अखेर शेगाव पोलिसांना पाचारण करण्यात आले. वाघ पडलेल्या विहिरीत एक दोरखंड सोडण्यात आला. त्यानंतर दोरीच्या साह्याने पलंग विहिरीत सोडण्यात आला. वाघ त्या पलंगावर उभा झाला आणि त्याने विहितून थेट बाहेर उडी घेत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.

नागरिकात भीतीचे वातावरण :
तब्बल सहा तासानंतर वाघ विहिरीच्या बाहेर निघाला. अंदाजे तीन वर्षाचा हा नर असल्याचे बोलल्या जाते. वाघाचा वावर सध्या याच परिसरात असल्याने शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे. सध्या शेतात कापूस वेचणी, चना व गव्हाची पेरणी सूरी आहे. परिणामी वाघ ज्या दिशेने गेला त्या परिसरात वनविभागाने गस्त वाढविली. 

दीपावली 2021: शुभेच्छा संदेश

              
                
                 "दीपावली 2021"

"उटणंचे अभ्यंगस्नान
रांगोळीची प्रसन्नता
दिव्यांची रोषणाई
फराळाचा बेत
फटाक्यांची आतिषबाजी
थोऱ्या-मोठ्यांचे आशीर्वाद
शुभेच्छांची देवाण-घेवाण
उत्साही-आनंदी वातावरण
असाच असो दिवाळीचा सण"

सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त सर्व नागरिकांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जावो हीच मनोकामना…!
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
            
प्रतिष्ठान : सुमेध एग्रो ट्रेडर्स, वरोरा
बावणे कॉम्प्लेक्स, मोहबाळा रोड वरोरा (चंद्रपूर)

💫✨ Happy Diwali ✨💫

वरोरा तालुक्यातील बोरी नदीपात्रातील कारवाही, उपविभागीय पोलीस अधिकारी यांची सर्वात मोठी कार्यवाही


सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (२३ ऑक्टो.) : वरोरा तालुक्यात मोजके रेती घाट लिलाव झाले असून,काही घाट लिलाव झाले नाही.त्यामुळे जे घाट लिलाव झाले नाही त्या ठिकाणावरून रेतीतस्कर कोणताही परवाना नसतांना रेती तस्करी करीत आहे. रेतीतस्कर बोरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीतस्करी करीत असल्याची गुप्त माहिती खबरीवरून पोलीस विभागाला मिळाली.
उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सापळा रचला आणि पोलीस चमुनी बोरी नदीपात्र गाठले. त्याठिकाणी पोकळ्यांड व बोरचे मदतीने रेती उत्खनन करीत असल्याचे आढळून आले. घटनास्थळावर ट्रक क्र. एम एच 34 एबी 2960 ,एम एच 32 वि यु 6451,ट्रक क्र.एम एच 40 बिजी 5080,ट्रक क्र.एम एच 35 के 2724 हे वाहने रेती भरून दिसून आले.
योगेश रामटेके,नाना चांभारे, दिशान कुरेशी रा.वरोरा व इतर एक अशा चार आरोपींवर कार्यवाही करण्यात आली आहे. सदर कार्यवाही 18 ऑक्टोम्बर ला रात्रौ दरम्यान करण्यात आली. कोणताही परवाना नसतांना संगनमत करून बोरी नदीचे पात्रातून अवैद्यरित्या रेती चोरी करीत असता मिळून आले असून रेतीसह एकूण 52 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांचेवर कलम 379, 34 भांदवी गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.

नव्याने रुजू झालेल्या एस डी पी ओ (आय पी एस) आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वात मोठी कार्यवाही अवैद्य धंद्याना आळा घालणे हे माझे पहिले कर्तव्य असे सांगणारे एसडीपीओ यांनी अवैद्य धंद्यामध्ये वर्षानुवर्षे गुंतून असलेल्या मोठ्या माशांना आपल्या जाळ्यात लटकविण्याची धडाडी सुरू केली आहे. कर्तव्यदक्ष व दमदार अशा पोलीस अधिकाऱ्याकडून रेतीतस्कर अथवा सट्टा व्यावसायिकांच्या मुसक्या नक्कीच आवळल्या जाणार आणि अवैद्य धंद्याना निश्चितच आळा बसणार अशा आशा पल्लवित झाल्या आहे अशी जनतेत चर्चा दिसून येत आहे.

महसूल विभागाचे कर्तव्य पोलीस विभाग निभावतात तेव्हा----

कोणताही परवाना नसतांना रेती तस्कर रेतीचे मोठमोठे साठे करून चढत्या भावाने रेती विकतात.तसेच पोकलंड व बोरचे सहाय्याने रेती उत्खनन आणि लाखोंचा महसूल डुबत असतांना सुद्धा महसूल विभागाचे दुर्लक्ष का?असा प्रश्न उपस्थित होत असून हा संशोधनाचा विषय आहे.रेती तस्करांवर कार्यवाही करण्याचे प्राथमिक कर्तव्य असतांना सुद्धा पोलीस विभाग कर्तव्य पार पाडतात.हे एक आश्चर्यच आहे.

वरोरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (२१ ऑक्टो.) : वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यस्मरण सोहळ्या निमिताने अ.भा.श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमाचे वतीने सर्व गुरुदेव सेवा मंडंळाना सुचित करुन कोरोना परिस्थिती लक्षात घेता या वर्षीही मागील वर्षी प्रमाणे च पुण्यतिथी साजरी होत आहे त्यामुळे उपासकांनी मोझरीला न येता आपआपल्या मंडळात गावीच हा सोहळा साजरा करावा आणि या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करुन या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे असे कळविले त्या अन्वये वरोरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराची सुरुवात दिपप्रज्वलन व संकल्पगीताने झाली. रक्तदान शिबिराचे उदघाटन डॉ श्री राठोड साहेब अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांचे हस्ते श्री अहतेशामजी अली नगराध्यक्ष वरोरा यांचे अध्यक्षतेखाली व मा.श्री लक्ष्मणराव गमे उपसर्वाधिकारी अ.भा श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम, श्री छोटुभाई शेख सभापती न.प.वरोरा, डॉ श्री शेन्डेसाहेब, श्री चंदनलालजी शर्मा जीवनप्रचारक, लक्ष्मण कातोरे, यांचे प्रमुख उपस्थितीत श्री गुरुदेव सेवा मंडळ आश्रम वरोरा येथे दि. २१/१०/२०२१ ला पार पडले. शासकीय जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथील डॉक्टर व त्यांची चमु मा.संजय गावीत, मा.उत्तम सावंत, मा.रोषण भोयर, मा.मनोज घोळके, मा. चेतन वैरागडे यांनी रक्त दानाची व्यवस्था केली. या प्रसंगी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी आजचा परिस्थितित रक्ताची किती गरज आहे हे पटवून दिले व गुरुदेव सेवा मंडळातिल सर्व सदस्यांचे रक्तदान शिबिर घेतल्याबद्दल खुप खुप आभार मानले आणि सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रा रुपलाल कावळे, लक्ष्मणराव गमे, नंदकिशोर खिरटकर, अविनाश पिंपळकरसर, मनोहरराव पारोधेसर, अशोकराव वैद्य मुख्याध्यापक, चंदशेखर कानकाटे, अशोकराव ठेंगे मध्यवर्ती प्रतिनिधी, धनंजयराव कोहाडे, झुरपुडे, कादर शेख, पुंडलीक राव कवरासे, दानविर वैरागी श्री आंबोरकर तसेच गुरुदेव सेवामंडळाचे सर्व उपासकांनी याकरिता ता अथक परीश्रम घेतले. या कार्यानिमित्ताने श्री जयंतराव पहापळे प्रतिक्षा नगर मुंबई यांचे कडुन रक्तदान करणाऱ्यांना तसेच सर्व मान्यवरांना त्यांच्या सौभाग्यवती स्व.सुहासिनी पहापळे यांचे स्मृती प्रित्यर्थ ग्रामगीता भेट देणयात आली. तसेच त्यांचेकडून ५०० ग्रामगीता भेटस्वरुपात जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी देण्यात आले. यासर्व कार्यक्रमाचे संचालन प्रा रुपलाल कावळे चंद्रपूर जिल्हासेवाधिकारी यांनी केले आभार प्रदर्शन. श्री अशोकराव ठेंगे यांनी केले.

नगराध्यक्ष- अहेतेशाम अली यांचा हस्ते आनंद निकेतन कॉलेज येथे ई-कचरा संकलन केंद्र चे उदघाटन

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (१९ ऑक्टो.) : आजचा परिस्थितीत आधुनिक उपकरण वापरणे ही लोकांचे स्टेटस बनले आहे. अशा परिस्थितीत आपल्या घरी,परिसरात खराब असलेले इलेक्ट्रॉनिक उपकरणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या उपकरणांना योग्य प्रकारे डिस्पोज नाही केले तर पर्यावरनच नाही तर मनुष्य जीवनाच्या आरोग्यावर सुधा वाईट परिणाम होते.
त्यासाठी ई-कचरा एकत्रित करने अतिशय गरजेचे आहे. याचिच दखल घेत आनंदनिकेतन महाविद्यालय यांचा पर्यावरण आरोग्य व सुरक्षा समिति,नगर परिषद आणि सुरिटेक प्रा.लि.बुतिबोरी यांचा संयुक्ताने ई-कचरा केंद्र चे उदघाटन आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिनाचे औचित्य साधून वरोरा शहराचे नगराध्यक्ष श्री.अहेतेशाम अली यांचा हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपप्राचार्य राधा सवाने यांनी आपल्या घरी जमा होणारा ई-कचरा याचे व्यवस्थापन कसे करायचे यावर मार्गदर्शन करून या समस्या चे समाधान या केंद्रावर होणारे अशी माहिती दिली.

या प्रसंगी प्राचार्य श्री.मूणाल काले, श्री.प्रशांत वाघ, डॉ.संयोगिता वर्मा, प्रा.मनोहर चौधरी तथा आयोजन समिति चे सदय्य, महाविद्यालय येथील शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते..!

साठ हजारांची लाच घेताना वरोरा येथील रेल्वे उपनिरीक्षक सुरक्षा बलाला रंगेहात अटक

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (१५ ऑक्टो.) : ही कारवाई दरम्यान जप्त केलेले साहीत्य व कोणतेही कारवाई न करण्यासाठी साठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वरोरा रेल्वे सुरक्षा बल उपनिरीक्षक नागपूर सीबीआय व एसीबी च्या पथकाने बुधवारी रात्री नऊ च्या दरम्यान, गोपिका मानकर त्यांना रेल्वे सुरक्षा बल ठाणा त्यांना रंगेहात लाच घेतांना सीबीआय व एसीबी यांनी सापळा रचून गोपिका मानकर (पी एस आय) यांना अटक करण्यात आली.

सविस्तर असे की, तक्रारदाराचे भद्रावती येथे नेट कॅफेचे दुकानं आहे. त्या मध्ये रेल्वे तिकीट बुकिंग सह ऑनलाईन कामे केलेली जातात. या कॅफेमध्ये वरोरा सुरक्षा बल चे उपनिरीक्षक गोपिका मानकर पीएसआय काही दिवस अगोदर भद्रावती येथे जाऊन काही साहित्य जप्त केलेले होते, ते साहित्य सोडवण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी पीएसआय गोपिका मानकर यांनी एक लाख रुपयांची मागणी केली. तडजोडी नंतर साठ हजार रुपये देण्याची कबुली झाली मात्र, तक्रार दाराने याबद्दल ची तक्रार नागपूर सीबीआय व एसीबी कडे केली. 
पोलिसांनी सापळा रचून बुधवार रात्री ९ च्या दरम्यान, त्यांना रंगेहाथ वरोरा रेल्वे ठाण्यात अटक करण्यात आली. त्यानंतर सीबीआय व एसीबी चे पोलीस अधीक्षक सकाळी बारा एक च्या दरम्यान वरोरा शेषन कोर्टात गुरुवारी नेले असता कोर्टात १६ तारखे पर्यंत पिशियार देण्यात आले. ही कारवाही नागपूर सीबीआय व एसीबी चे पोलीस अधिक्षक एम एस खान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कल्याणी हुमने, पोलीस निरीक्षक नीरज कुमार गुप्ता, पोलीस निरीक्षक कविता इसरकर पोलिस उपनिरीक्षक विनोद कराले, डब्ल्यूपीसी कोमल गुजर, संदीप ढोबळे यांनीही कारवाही केली.

"केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या कार्यालयातील कर्मचारी जर लालची मागणी करीत असेल तर त्यासंदर्भातील तक्रार सीबीआय व एसीबीकडे करावी."
  
~ सलीम खान
पोलिस अधीक्षक
सीबिआय व एसीबी नागपूर

मा. आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांचे हस्ते जी एम आर वरोरा एनर्जी लिमिटेड येथील रक्तदान शिबिराचे उदघाटन


सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (९ ऑक्टो.) : जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड, (GWEL) वरोरा आणि जीएमआर वरलक्ष्मी फाउंडेशन,वरोरा याच्या माध्यमातून दरवर्षी १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या दान उत्सव दरम्यान आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भद्रावती आणि वरोरा विधानसभा क्षेत्राचे आदरणीय आमदार श्रीमती प्रतिभा ताई धानोरकर, यांच्या हस्ते ४ऑक्टोबर २०२१रोजी सम्पन्न झाला
सदर कार्य्रक्रमाला जीएमआर वरोरा प्लांट हेड श्री धनंजय देशपांडे, श्रीमती मेधा देशपांडे, अध्यक्ष समृद्धी लेडीज क्लब, श्री अभय चौधरी, (O&M) प्रमुख, आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर. येथील तांत्रिक अधिकारी, रक्तदान केंद्र, डॉ अनंत हजारे,यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिरास प्रामुख्याने उपस्थित होते. 

या उद्घाटन प्रसंगी श्रीमती. प्रतिभा ताई यांनी रक्तदान शिबिराच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आणि रक्तदानासाठी पुढे येण्याची विनंती केली. त्यांनी आपल्या भाषणातून विशेषतः कोविद -१९ या साथीच्या काळात रक्ताची अत्यंत गरज असल्याचे सांगितले व या कालावधीत रक्ताच्या कमतरतेमुळे व जास्त मागणीमुळे चंद्रपूर जिल्यात रक्ताची अत्यंत कमतरता निर्माण झालेली आहे त्यामुळे जास्त संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन केले. जीएमआर वरलक्ष्मी फाऊंडेशन (जीएमआरव्हीएफ) च्या सीएसआर उपक्रमांचा गेल्या दहा वर्षांत जवळच्या सभोवतालची गावांमध्ये मोठया प्रमाणात वेगवेगळे उपक्रम राबवून एक चांगले उदाहरण आपल्या समोर उभे केले आहे. आणि विशेषत: गावांमध्ये आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण आणि उपजीविका क्षेत्रात लक्षणीय बदल घडवून आणले आहेत. विशेषतः १० गावामध्ये ७५० हून अधिक घरांमध्ये वैयक्तिक शौचालये तयार करण्यात आले असून त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे गावे आता स्वच्छ आणि उघड्यावर शौचमुक्त झाल्याचे दिसून येत आहेत याचे सर्व श्रेय जीएमआर कंपनीस त्यांनी दिले याशिवाय १७ गावामध्ये १ वॉटर एटीएम प्लांट बसवून स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्याने गावातील लोकांचे पाण्यामुळे होणाऱ्या साथीचे रोग प्रमाण कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-१९ च्या साथी मध्ये जीएमआर कंपनीद्वारे दिलेल्या प्रतिसादाचाही उल्लेख केला विशेषतः सरकारी रुग्णालयात केलेली मदत तसेच अन्न पॅकेट्स, नास्ता, मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिजन सिलिंडर प्रदान केल्याबद्दल धन्यवाद दिले एवढेच नाही तर सरकारी आरोग्य यंत्रणेला ग्रामीण भागात आणि वरोरा शहरात लसीकरण करण्यात मदत केली याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

या प्रसंगी श्री धनंजय देशपांडे यांनी सांगितले की GWEL च्या मध्येमातून दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सप्ताहात दान उत्सव साजरा करण्यात येतो आणि GWEL चे प्रत्येक कर्मचारी आसपासच्या गावातील विद्यार्थी व गरजू व्यक्तीसाठी व त्यांच्या कल्याणासाठी यथोचित योगदान देतात. जी एम आर कंपनी द्वारे कर्मचारी तसेच कामगार वर्गासाठी दरवर्षी दोनदा रक्तदान शिबिरे आयोजित केली आणि आजपर्यंत सुरुवातीपासून 1500 युनिट पेक्षा जास्त रक्तदान केले गेले आहे. त्यांनी उपस्थिनांना सर्व सीएसआर उपक्रमांची माहिती दिली आणि समाजाच्या कल्याणाकरिता GWEL आणि स्थानिक प्रशासनासोबत चर्चा करून दोन्हीच्या सहयोगाने विकासात्मक काम करण्यात येईल असे सांगितले. सर्व कामगारांना पुढे येण्याची संधी निर्माण करण्यासाठी आणि विशेषत: महामारीच्या या संकटात रक्त दान करून समाजाची सेवा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जेणेकरून समाजाच्या हितासाठी त्यांना योगदान देता येईल.

डॉ.अनंत हजारे, रक्त संकलन युनिट, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना या रक्तदान शिबिराचा भाग घेण्यासाठी आमंत्रित केले आणि रक्तदानाचे महत्व पटवून दिले जे उच्च मूल्याचे आहे. त्यांनी विशेषतः कोविड परिस्थितीत रक्तदानाचे महत्त्व सांगितले.
सहयोगी कर्मचारी आणि रक्षा टीमसह सर्व GWEL कर्मचाऱ्यांकडून 65 युनिट रक्तदानाच्या विक्रमी यशाने शिबिराचा शेवट झाला. सर्व रक्तदात्यांना रक्तदानानंतर सहभागाचे प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन रक्तदान शिबिराचे उद्घाटनाची 

वराेरा-तहसील कार्यालय परिसरात जाेरजाेराने घोषणाबाजी करणां-या विरुध्दात तक्रार दाखल करणार !



सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (४ ऑक्टो.) : आज सोमवार दि.४ ऑक्टाेंबरला वराेरा तहसील कार्यालय परिसरात दुपारी 12-30 वाजता किशोर डुकरे रा.आसाळा यांनी कोरोना काळात, नियमबाह्य व बेकायदेशीररित्या जाेराजाेराने शासनाविरुध्द घाेषणाबाजी केल्याची घटना घडली सदरहु घाेषणाबाजीमुळे काही वेळ शासकीय कामात व्यत्यय निर्माण झाला हाेता. एव्हढेच नाही तर त्या व्यक्तीने शासना विरुद्ध नारेबाजी करून लोकांचे लक्ष विचलित केल्याच्या कारणास्तव तहसीलदार वरोरा यांच्या एका आदेशाच्या अनुषंगाने वराेरा साजाचे तलाठी विनोद खोब्रागडे हे पोलिस स्टेशन येथे संबंधित व्यक्तिच्या विरुध्दात फौजदारी तक्रार दाखल करीत असल्याचे खुद्द त्यांनी या प्रतिनिधीशी बाेलतांना आज सांगितले.

इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा ने घेतला "मानसिक दृष्ट्या विशेष दिव्यांग आणि सामान्य मुलांसाठी " दिवाळीच्या दिव्यांचे " डेकोरेशन व पेंटिंग "चा वर्कशॉप"

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (४ औक्ट.) : या करोनाकाळात प्रत्येक गोष्ट ऑनलाईन वर सुरू आहे, शाळा पण ऑनलाइन त्यामुळे मुले बालपणातील खेळण्याचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडत नाहिये.
             
म्हणून " जिओ जिंदगी " प्रोजेक्ट अंतर्गत आमच्या क्लब च्या C.C. झेनब सिद्दीकोट यांनी चंद्रपूर च्या राखी बोराडे यांच्या मदतीने दिवाळीच्या दिव्यांचे डेकोरेशन व पेंटिंग करिता वरोरा येथील गांधी उद्यान येथे दि. ३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ ते ११ या दरम्यान कार्यशाळा आयोजित केली.
              
यात २६ मानसिक दृष्ट्या दुर्बल व अन्य सामान्य २०० च्या वर मुलांनी सहभाग घेऊन याचा आनंद घेतला. यासाठी लागणारे सर्व साहित्य क्लब तर्फे उपलब्ध करून देण्यात आले.
                 
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी क्लब च्या अध्यक्षा मधू जाजू, सेक्रेटरी वंदना बोढे, C.C. झेनब सिद्दीकोट, स्नेहल पत्तीवार, सुचेता पद्ममावार, दिपा माटे, आभा सायरे, दिपाली टिपले, संध्या बारई, पूजा गोठी, प्रणाली बेदरकर, प्राजक्ता कोहळे, हर्षदा कोहळे व अन्य सदस्या उपस्थित होत्या.