Showing posts with label कळंब. Show all posts
Showing posts with label कळंब. Show all posts

कळंब येथे ड्रेस डिझायनिंग व ब्युटी पार्लर प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख

कळंब : कलाकुंज बहुउद्देशीय महिला प्रशिक्षण संस्था यवतमाळ द्वारा संचालित महिला सक्षमीकरण "गाव तिथे महिला प्रशिक्षण" योजनेअंतर्गत ड्रेस डिझायनिंग ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे उद्घाटन राम मंदिर रोड कळंब येथे करण्यात आले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा अजित राठोड ठाणेदार कळंब, प्रा भुजाडे सर,सेवानिवृत्त अधीक्षक मा अशोक भाऊ उमरतनकर,भारतीय नारी रक्षा संघटनेच्या पदाधिकारी सारिका ताई ठोंबरे, मनीषा कोठारी नगरसेवक अज्जूभाई शेख, नगरसेवक रुपेश राऊत, कला कुंज चे सचिव दुर्गा पटले, ड्रेस डिजाइनिंग प्रशिक्षिका जोशना, बीसेन सौंदर्य शास्त्र च्या प्रशिक्षिका राखी मेश्राम, उर्मिलाताई कवडे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. 
प्रा भुजाडे सर यांनी महिला सक्षमीकरण व स्वावलंबी कशा बनतील यासाठी कळंब चे ठाणेदार मा अजित राठोड यांनी महिलांवर होणारे अत्याचार आणि सक्षम होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना रूपाली भोयर यांनी केली आभार प्रदर्शन शालिनी बोपचे यांनी केले.

खोटी माहिती देऊन प्रधानमंत्री आवास योजने पासून वंचित ठेवणाऱ्या मुख्यधिकारी नगर पंचायत कळंब यांचेवर कारवाही करावी - ओमप्रकाश भवरेजिल्हाधीकारी यवतमाळ यांच्या कडे तक्रार.


सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख

कळंब : "सर्वांसाठी घरे 2022" या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतलीआहे. माननीय मंत्रीमंडळाने दिनांक 13 /11/ 2018 च्या बैठकीत राज्यातील महसूल विभागाच्या खात्यातील सर्व प्रकारच्या शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या आणि प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र अतिक्रमण धारकांना योजनेचा लाभ मिळावा. यासाठी अशा शासकीय जमिनीवर अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी 01 डिसेंबर 2018 रोजी मा. मुख्याधिकारी नगरपंचायत कळंब, मा.उपअधीक्षक भूमी अभिलेख कळंब, मा. तहसीलदार कळंब, मा.उपविभागीय अधिकारी राळेगाव, यांना कळविले असून सदर अतिक्रमण केलेल्या जागेची तात्काळ मोजणी करून पात्र लाभार्थी यादी पाठवा अशा सूचना दिल्या आहे.
         
वरील पत्राचा संदर्भ देऊन मुख्याधिकारी नगरपंचायत करून यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख विभाग करून यांना दिनांक 10/12/2018 रोजी धारकांची मोजणी लवकरात लवकर करून नगरपंचायत कडे पाठवा असे पत्रक दिले भूमिअभिलेख कळंब यांनी तात्काळ कारवाई करून मोजणीला सुरुवात केली व 140 अतिक्रमण लोकांची मोजणी करून नकाशा व यादी दिनांक 12/03/2019 रोजी मुख्याधिकारी नगरपंचायत कळंब यांचेकडे सादर केलेली असतांना सुद्धा माननीय जिल्हाधिकारी यांना व भारस्त अधिकारी (PMAY) यांना खोटी माहिती दिल्याचे सिद्ध झाले आहे.वास्तविक पाहता भूमिअभिलेख कार्यालयांनी आपले कर्तव्य पूर्णपणे जरी पार पाडले नसेल तरी अंदाजे 1400 घरे शासकिय जमीनीवर अतिक्रमण करून घर बांधून राहत आहे. त्यापैकी फक्त 140 घराची मोजणी करून नकाशा तयार करून यादीसह नगरपंचायत कळंब कडे सादर केलेला आहे. भूमिअभिलेख विभागाकडून मोजणी झालेली नसल्यामुळे अतिक्रमित क्षेत्र निश्चित करता येत नाही अशी खोटी माहिती देऊन सदर लाभार्थी यांना प्रधानमंत्री आवास योजने पासून व शासकीय जमिनीच्या पट्ट्या पासून वंचित ठेवले आहे. याला सर्वस्वी जबाबदार मुख्याधिकारी नगरपंचायत कळंब हेच असल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगा सह विभागीय चौकशीचे आदेश देण्यात यावे .अशी तक्रार ओमप्रकाश भवरे यांनी लोकशाही दिनामध्ये जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे केली आहे.

खैरी येथे भीमराव घोडाम यांचा खून

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख

कळंब : तालुक्यातील खैरी येथे अज्ञात इसमांनी भीमराव सोनबा घोडाम वय ६५ वर्ष यांचा खून केल्याची घटना घडली .

 सविस्तर वृत्त असे की खैरी येथील रहिवासी भीमराव सोनबा घोडाम तलावावर चौकीदार म्हणून काम करीत होता. आज रोजी तलावाजवळ भीमराव घोडाम यांचा खून झाल्याची माहिती मृतक यांच्या भावाला मिळाली असता मृतकाची पत्नी रुकमा भीमराव घोडाम यांनी कळंब पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली.

माहिती मिळताच लगेच पोलीस स्टेशनचे ठाणेदार घटना स्थळी पोहचले व तपास करून मृतकला पोस्टमार्टम करिता ग्रामीण रुग्णालय कळंब येथे आणण्यात आले.
मुख्य आरोपी अजून पर्यंत सिद्ध न झाल्याने सदर खून हे अज्ञात इसमाने केला असल्याची माहिती पोलिस स्टेशन मधून मिळाली.

कळंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदशनाखाली आरोपीचा शोध घेणे सुरु आहे.

कळंब येथे महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचा स्तुत्य उपक्रम


सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख

कळब : राळेगाव चौफुली येथे स्थित असलेल्या महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय प्रथम वर्धापन दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त उत्सव साजरा करण्यात आला.
 त्या निमित्ताने बिकट परिस्थितीवर मात करण्या साठी सावित्री आईचा वारसा घेऊन स्वतःचा उद्योग यशस्वीपणे उभारणाऱ्या कर्तृत्ववान उद्योजक महिलांचा सत्काराचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला या कार्यक्रमासाठी सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा सौ नंदिनी ताई खसाळे यांनी भूषविले.
शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सावित्री आज जगाची शिलेदार असा योग्य समज त्यांनी आधुनिक काळातील महिलांना दिला.

या प्रसंगी प्रस्ताविक डॉ सौ. माधुरी माणिक केवटे यांनी केली. त्या म्हणाल्या महामानवांना फक्त जयंती पुण्यतिथी पुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या विचारांना आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. स्त्री शिक्षणाचे सावित्री ज्योतीने लावलेले रोप गगनाला भिडावे यासाठी त्या सदैव प्रयत्नरत राहतात. या कार्यक्रमाचे आयोजन तसेच महात्मा फुले सार्वजनिक वाचनालया साठी त्यांनी स्वतःची जागा उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच तळागाळातील महिलांच्या उत्थानासाठी व शिक्षणासाठी त्या सतत झटत असतात. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तसेच महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष माननीय श्री मनोज भाऊ पद्माकर काळे हे होते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी तळमळीने मार्गदर्शन केले. ही अभिनव संकल्पनाही त्यांचीच होती. माननीय श्री विनोद भाऊ काळे यांनी परिस्थितीला न घाबरता स्वतःतील आत्मविश्वास वाढीस लावून आत्मनिर्भर व्हावे अशा शुभेच्छा सर्वांना दिल्या. माननीय श्री अंभोरे सरांनी सावित्री आईचा आदर्श घेण्याचे आवाहन उपस्थित बंधू-भगिनींना केले. बालकलाकारांनी सावित्री आईच्या जीवनावरील सुंदर अशा गीतपंक्ती सादर करून वातावरण भारावून टाकले होते.

या अभिनव कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी फिरोज काझी, चेतन भिसे, प्रवीण निमकर, संदीप वैद्य, दुर्गेश ठाकरे, सतीश मरापे, तुषार शेंडे, विलास गोरे, फुलकर सर, प्रतिभाताई मेत्रे, संध्या वाके, जया कठाळे, अश्विनी फाळके, कामडी भाऊ, तुषार आसुटकर, दिनेश वानखेडे, काळे भाऊ, धोबे भाऊ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता निमकर यांनी व आभार प्रदर्शन सपना ताई कोठारी यांनी केले.

"कळंब मध्ये तयार झालेल्या उपकरणाला थेट जर्मनीतून जागतिक पेटेंट प्राप्त"


सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख

कळंब : कळंब येथे तयार झालेल्या उपकरणाला थेट जर्मनीतुन जागतिक पेटेंट प्राप्त झाले आहे .
या बाबत सविस्तर वृत्त असे की कळंब येथील उद्योजक श्री प्रशांत मुरलिधरराव डेहनकर यांच्या सारथी या नवीन उपकरणाला नुकतेच जर्मनी मधून पेटेंट प्राप्त झालेले आहे.

गेल्या 28 वर्षांपासून पेट्रोलियम आणि गॅस व्यवसायिक असलेले कळंब येथील उद्योजक श्री प्रशांत डेहनकर यांचे या व्यवसायामध्ये येणाऱ्या अडीअडचणी व गरजा या करीता अविरत संशोधन कार्य सुरू असते. 
गेल्या जवळपास बारा वर्षां पासून त्यांनी अनेक उपकरणे या दरम्यान विकसित केली व इंडियन ऑईल कार्पोरेशनची मान्यता मिळवून त्या उपकरणांना संपूर्ण देशात त्यांच्या ए टू झेड इंजीनियरिंग च्या माध्यमातून वितरीत केले.

अलीकडेच त्यांनी तयार केलेले "सारथी" नावाचे नवीन उपकरण त्यांच्या या व्यवसायात अतिशय उपयोगी ठरणारे आहे ज्याच्या माध्यमाने एकावेळी दोन सिलेंडरची हाताळणी व गोडाऊन किंवा गॅस बॉटलिंग प्लांट मध्ये विना प्रयासाने सहज शक्य आहे .

 या उपकरणामुळे गॅस गोडाऊन मध्ये सिलेंडरची होणारी ने आन अतिशय सोपी झालेली असून पर्यायाने होणारी आदळ आपट सुद्धा बंद होईल व सिलेंडरचे आयुर्मान वाढण्यास मदत होईल त्यामुळे कंपनीचे सिलेंडर दुरुस्ती वर होणाऱ्या भल्यामोठ्या खर्चाची बचत होईल.

या उपकरणाची गरज गॅस बॉटलिंग प्लांट व एलपीजी वितरकांचे गॅस गोडाऊन या ठिकाणी असेल.
याचे यशस्वी प्रात्यक्षिक इंडियन ऑईल कार्पोरेशन च्या धनज जिल्हा वाशिम या बॉटलिंग प्लांट मध्ये नुकतेच पार पडले. 
आणि याचा उपयोग महाराष्ट्रा मधील इंडियन ऑईल कार्पोरेशन च्या सर्वच बॉटलिंग प्लांट व काही वितरकांच्या गोडाउन मध्ये सुरू झालेला असून याबाबतीत तेथील कामगार व कर्मचारी अतिशय आनंदी आहे.

जगात टेक्नॉलॉजी च्या बाबतीत अग्रगण्य असणाऱ्या जर्मनी सारख्या प्रगत देशा मधूनच जागतिक पेटेंट या उपकरणाला मिळालेले असल्या मुळे यवतमाळ जिल्ह्या करिता हा मोठा बहुमान आहे. फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी , जर्मन पेटेंट आणि ट्रेडमार्क ऑफिस चे मुख्य कार्याध्यक्ष कॉर्नेलिया रुडलोफ शोफर यांचे कडून हे पेटंट मंजूर झाले असून या बाबतीत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाचे श्रेय ते त्यांचे वडील श्री मुरलीधरराव डेहनकर यांना देतात कारण वडील सुद्धा संशोधक वृत्तीचे असून त्यांनी कृषी क्षेत्रात अनेक नवनवे प्रयोग केल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.
 
एकाच वेळी दोन सिलेंडर वाहून नेणाऱ्या "सारथी" उपकरणा साठी त्यांना इंडियन ऑईल कार्पोरेशन चे विक्रय अधिकारी श्री. निलेश ठाकरे, व मुख्य क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. अनिल मेहेर नागपूर यांचे मार्गदर्शन लाभले आहे असे त्यांनी नमूद केले.
अभियंता असलेले उद्योजक श्री प्रशांत डेहनकर हे पर्यावरण प्रेमी सुद्धा आहे ज्यांनी आतापर्यंत कळंब च्या आजूबाजूला हजारो वृक्षांची लागवड स्वखर्चाने करून त्यांचे संगोपनाचे कार्य सुद्धा अविरत सुरू असते.
पर्यावरणाच्या या कार्या सोबत प्रशांत हे उत्कृष्ट गायक व अभिनेता सुद्धा आहे ज्यांचे देशात अनेक ठिकाणी गायनाचे कार्यक्रम झाले असून आतापर्यंत इंडियन ऑईल कार्पोरेशन करिता स्वरचित एज्युकेशनल व मोटिवेशनल दहा ते बारा शॉर्ट फिल्म स्वतः अभिनय करून तयार केलेल्या आहे.

सध्या सारथी या उपकरणाची निर्मिती सुरू असून लवकरच देशभरातील गॅस व्यवसायिकांच्या एलपीजी गोडाऊन वर व बॉटलींग प्लांट वर याचा उपयोग सुरू होईल अशी माहिती प्रशांत मुरलीधरराव डेहनकर. कळंब यांनी आमचे प्रतिनिधी रूस्तम शेख यांना दिली.

भारतीय मानवधिकार परिषद जिल्हाध्यक्ष पदी रूस्तम शेख यांची निवड

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

कळंब : कळंब तालुक्यातील दैनिक लोकदूत तालुक प्रतिनिधी तथा राष्ट्रीय क्रांतीकारी महासंघाचे मुख्य संयोजक रुस्तम शेख यांची भारतीय मानवधिकार परिषद (PSP) यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
जिल्हा अध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल रुस्तम शेख यांनी भारतीय मानवधिकार परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शेख, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र सिंह वालीया, प्रदेश अध्यक्ष वाल्मीक केदारे, सुरेश कोट, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष (हनिफ) राजू शेख, यांचे आभार व्यक्त केले.
भारतीय मानवधिकार परिषद च्या माध्यमातून समाजातील अन्यायग्रस्त, उपेक्षित घटकाला न्याय देण्या करिता सदैव प्रामाणिक प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष रुस्तम शेख यांनी "सह्याद्री न्यूज"शी बोलतांना व्यक्त केली. 

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ कळंब तालुका अध्यक्ष पदी संदिप इंगोले यांची निवड

सह्याद्री न्यूज | रुस्तम शेख
कळंब, (१३ ऑक्टो.) : स्थानिक विश्राम भवन कळंब येथे जिल्हाध्यक्ष मा.आनंद भगत यांचे अध्यक्षते खाली व जेष्ठ नेते नामदेव थुल, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार आत्राम, अति.सरचिटणीस विक्रांत खरतडे यांचे प्रमुख उपस्थितीत कास्ट्राईब कर्मचारी महासंघ तालुका शाखा कळंब चे तालुका अध्यक्ष पदी मा.संदिप इंगोले तहसील कार्यालय कळंब यांची नियुक्ती करून मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र बहाल करण्यात आले.
तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रूस्तम शेख यांनी अभिनंदन व्यक्त केले.
संदिप इंगोले यांच्या माध्यमातुन कर्मचारी बांधवांचे समस्याचे निश्चित निवारण होईल अशी अपेक्षा सर्व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
संघटनेच्या माध्यमातुन कर्मचारी बांधवांचे समस्याचे निवारण करण्या करीता मी प्रामाणिक प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष संदिप इंगोले यांनी आमचे प्रतिनिधी रूस्तम शेख यांच्या कडे व्यक्त केली.

या सभेला कळंब तालुक्यातील संघटनेचे विविध विभागाचे बहुसंख्य कर्मचारी बांधव उपस्थित होते.
तालुका अध्यक्ष पदी निवड केल्या बद्दल संदिप इंगोले यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपुर्वक आभार व्यक्त केले.

ओबीसी जागृतीच्या प्रक्रियेत आत्म विश्वास वाढवण्याची गरज - डॉ ज्ञानेश्वर गोरे

सह्याद्री न्यूज | रुस्तम शेख
कळंब, (५ ऑक्टो.) : भारतीय पिछडा ओबीसी संघटना, ओबीसी जनमोर्चा यांच्या वतीने कळब तालुक्याची बैठक तालुका अध्यक्ष गायत्री ताई नवाडे यांचे घरी पेट्रोल पंपा जवळ घेण्यात आली सदर बैठकीच्या अध्यक्ष स्थानी डॉ. ज्ञानेश्वर गोरे होते तर, प्रमुख अतिथी विलास काळे. संघटक ज्ञानेश्वर रायमल जिल्हाध्यक्ष प्रमोद राऊत, राज्य कोषाध्यक्ष भानुदास केळझरकर, जिल्हा संघटक अशोक मोहुरले, समन्वयक किशोर थोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ओबीसीच्या जागृतीच्या प्रक्रियेत आत्मसन्मानाची लढाई आपण लढणे फार महत्त्वाचे आहे.

ओबीसीची जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे,
ओबीसी प्रमाणे रीजर्वेशन इं प्रोमोशन मध्ये स्थान मिळाले पाहिजे, ओबीसीचे यवतमाळ जिल्ह्यात 14 चे 17 टक्के आरक्षण केले त्याबद्दल शासनाचे आभार कोणते आरक्षण 19% करण्यात यावे. या आशयाची भूमिका उपस्थित सर्वांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता माणिकराव केवटे. चंदूभाऊ चांदोरे, रमेशभाऊ मेहेत्रे, नीलिमा अरविंद हजारे, अर्चना प्रवीण हजारे, ललिता सुरेश ओंकार, राज्य संघटक प्राध्यापक सविताताई हजारे, तालुका अध्यक्ष गायत्री नवाडे, समन्वयक अशोक उमरतकर, प्रसिद्धी प्रमुख रुस्तम शेख हे उपस्थित होते. या प्रसंगी गायत्री नवाडे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

बोरीमहाल येथे सोयाबिन च्या शेतात अजगर

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब, (४ ऑक्टो.) : तालुक्यातील बोरीमहल येथे शेतात सोयाबिन कापणी सुरू असतांना भला मोठा ९ फूट लांबीचा अजगर दिसताच मजुरांची घाबरगुंडी उडाली, मंगेश रुईकर या शेतकऱ्याने वाईल्डलाईफ कंझर्वेशन अँड रिसर्च संस्थेचे रेस्क्युअर अब्दुल कलाम यांच्याशी फोन वरून संपर्क साधला, क्षणाचाही विलंब न करता सर्पमित्र अब्दुल कलाम आणि सय्यद तौसीफ व वैभव काळे या सर्पमित्रांनी शेतात पोहचून अजगरला सुरक्षित रित्या जेरबंद केले व मजुरांना सांपाविषयी जनजागृती करून आपल्या परिसरात कुठेही वन्यप्राणी दिसल्यास न मारता वन्यजीव रक्षकांना बोलविण्याचे आव्हान केले.

वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक एल. के. उपाध्ये यांच्या उपस्थितीत दुर्ग च्या जंगलात मुक्त करण्यात आले. त्या वेळी संस्थेचे रेस्क्युअर श्वेतल लांडगे, अक्षय मोहणापुरे, नदीम शेख उपस्थित होते.

शेतकरी सल्लागार समिती (आत्मा) कळंब च्या अध्यक्षपदी संजय भाऊ दरणे (हिवरा) यांची अविरोध निवड

सह्याद्री न्यूज | रुस्तम शेख
कळंब, (४ ऑक्टो.) : गेल्या काही दिवसांपासून कोविड च्या कारणांनी प्रलंबित आत्मा अध्यक्ष पदाची निवडणूक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात पार पडली. यामध्ये सर्व नवनियुक्त सदस्यांनी एकमुखाने संजय भाऊ दरणे यांची अध्यक्ष म्हणून अविरोध निवड केली. याप्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून तालुका कृषी अधिकारी एस. एस भगत तथा विष्णू गायकवाड बी. टी. एम.(आत्मा) यांनी सांभाळली.

यावेळी कृषी विभागाचे मयुर गोफने, महेंद्र ओंकार, प्रविण चंदनशिवे, शयाम कडपेवाड, मोकडे आदी उपस्थित होते.

कळंब तालुका ओला दुष्काळ जाहीर करा - तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसची मागणी

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब, (२ आक्टो.) : कळंब तालुका काँग्रेस व तालुका युवक काँग्रेसच्या वतीने 2021 च्या खरीप हंगामात सतत पाऊस असल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात जिकडेतिकडे पाणीच पाणी साचले आहे, कापनिस आलेले सोयाबीन शेंगांना कोंब फुटली, बोंडावर आलेलं कपाशीचे पीक आडवे झाले आहे, त्यामुळे बोड सोडलेलं आहे, यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे. या सर्व नुसकाणीचे महसूल व कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व नुसाकान भरपाई देण्यात यावी, करीत तालुका काँग्रेस व युवक काँग्रेस च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

सदर निवेदन देण्याकरीत उपस्थित, मुरलीधर डेहनकर, बाबासाहेब दरने, नरेंद्र मानकर, विलास राठोड, महादेव काळे, गजानन पंचबुद्धे, बाळाभाऊ नित, आनंदराव जगताप, चांदुभाऊ चांदोरे,राजू पोटे, योगेश धांदे, सिद्धेश्वर वाघमारे, मारोती वानखेडे, मधुकर गोहणे, सरपंच आरती जगताप, पपीता मुन, अनिल घोटेकर, मनोज रुईकर, सुवर्णा सिडाम, वनिता कांबळे, वसंतराव निकम, प्रदीप जाधव, राजू कदम, संजय पांडे, गजानन दांदडे, शरद वानखेडे, संतोष विधाते, आकाश गदई, संजीवनी कासार, मंजुषा हजारे, गायत्री नवाडे,अर्चना हजारे, संगीता गावंडे, भास्कर साठे, सुधाकर साळुंखे, शफी कुरेशी, राहुल सोनाळे, अभिलाष नित, कुणाल पंचबुद्धे, प्रशांत शास्त्रकार व सर्व काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या कळंब तालुकाध्यक्षपदी दिलीप डवरे यांची नियुक्ती

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब, (२२ सप्टें.) : गेल्या काही वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकारणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बरखास्त करण्यात आलेली होती. अशातच नुकतीच अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील विश्रामगृहात झालेल्या बैठकीत प्रहार जनशक्ती पक्ष कळंब तालुका अध्यक्षपदी म्हणून दिलीप महादेव डावरे यांची नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा. बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशानुसार प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष तथा यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख बल्लूभाऊ जवंजाळ यांनी नियुक्ती केली.

यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नितीन मिर्झापुरे तसेच बिपिन चौधरी, आशिष तुपटकर जी.संघटक, विलास भाऊ पवार, लोकसभा प्रमुख अंकुश वानखडे, सरचिटणीस पिंटू भाऊ दांडगे, प्रमोद कातरकर, सजंय दुरबुडे, स्वप्नील मापारे, गोपाल काकडे, राजु हिरेखन सह जिल्ह्यातील अन्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

दिलीप भाऊ डवरे यांची निवड झाल्या बद्दल राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघांचे मुख्यसंयोजक रूस्तम शेख यांनी अभिनंदन व्यक्त केले.
दिलीपभाऊ डवरे यांच्या माध्यमातुन जनसामान्यांचे प्रश्न सुटतिल अशी अशी अपेक्षा ग्रामीण भागातील कार्यकर्ते तसेच नागरीकांनी व्यक्त केली.

"सर्वांसाठी घरे २०२२" या शासन निर्णायाची अंमलबजावणी करण्यासाठी मा.राजुभाऊ गायकवाड शिवसेना जिल्हा प्रमुख यवतमाळ यांचे नेतृत्त्वात २८५ बेघर लोकांचे मुख्याधिकारी कळंब यांचेकडे अर्ज सादर.

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख 
कळंब, (२१ सप्टें.) : शहरांमध्ये नगर पंचायत कळंब तर्फे शासन निर्णय क्रमांक:- एमयुएन-/२०१८/प्र.क्र.१९७/नवि-२०१८दि.१७ नोंव्हें.२०१८ "सर्वांसाठी घरे २०२२" या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ओमप्रकाश मारोतराव भवरे यांनी १५ आगस्ट २०२१पासुन आमरण उपोषणाचा इशारा दिल्या नंतर नगर पंचायत कळंब खडबडून जागी होवून गरजु बेघर व्यक्तीचे अर्ज मागविण्यात आले होते.  
त्यामुळे मा.राजुभाऊ गायकवाड शिवसेना जिल्हा प्रमुख व राजुभाऊ मांडवकर यांचे नेतृत्त्वाखाली प्रभाग क्रमांक ९,१०,११, व १२ मधिल शासकीय जागेवर अतिक्रमण करून कच्चे घर बांधून राहत असलेल्या लोकांचे कडून मुख्याधिकारी यांचे नावाने विनंती अर्ज व हमीपत्र लिहून घेवून २८५ अर्ज शासन निर्णयानुसार सन २०११ पुर्विचा रहीवासी पुरावा घेऊन मा.राजुभाऊ गायकवाड शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख यांचे शुभ हस्ते मा.मुख्याधिकारी नगर पंचायत कळंब यांचेकडे उचित कारवाई करणे करीता सादर करण्यात आले. सादर केलेल्या अर्जावर शासन निर्णयानुसार सकारत्मक भुमिका घेतली जाईल व कोणीही अर्जदार या योजने पासुन वंचित राहणार नाही. असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले आहे.

यावेळी दिगांबर भाऊ मस्के उपजिल्हा प्रमुख, राजुभाऊ मांडवकर, ज्येष्ठ समाजसेवक ज्ञानेश्वरराव मोहनापुरे काकाजी, मा.शारदाताई थोठे उपजिल्हाप्रमुख, निलेश भाऊ मेत्रे शिवसेना तालुका प्रमुख, रोशनभाऊ गोरे शिवसेना शहर प्रमुख, सुनिता ताई डेगमवार नगर सेविका, मारोती भाऊ दिवे नगरसेवक, पंकज भाऊ बांन्ते, दिलीपभाऊ डवरे, रुस्तम शेख, ओमप्रकाश भवरे, राजेश नेहारे, शिवा गांवडे, विजु एकणार, सुनिल मोरे, उमेश शिंदे, राहुल थोरात, राजेश नेहारे, देवानंद शेंद्रे, यांचेसह शेकडो नागरिक हजर होते.

कळंब शहरात स्वराज्य ध्वज दिंडीचे जलोष्यात स्वागत

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख 
कळंब, (१७ सप्टें.) : शहरात रात्री उशिरा स्वराज्य ध्वज दिंडीचे सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या वतीने जलोष्यात स्वागत करण्यात आले. 
बारा हजार किमोमीटर प्रवास दिंडी करणार असून , स्वराज्य ध्वज स्तंभाची उंची 74 मीटर असून वजन 18 टन असणार आहे, स्वराज्य ध्वजाचा आकार 96×64 फूट असणार आहे तर वजन 90 किलो आहे..आजचा 8 दिवस दिंडीचा होता.
एकतेच प्रतीक असलेल्या स्वराज्य ध्वज दिंडीचे मार्गदर्शक नानाजी गवळी व ऋषीकेश करभजन व संदीप शिंदे जी यांनी संकल्पना मांडली स्वराज्य ध्वज दिंडी सहभागी पदाधिकारी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष आशिषभाऊ मानकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्षा सारिकाताई ताजने, राष्ट्रवादी यवतमाळ शहर अध्यक्ष पंकजभाऊ मुंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राहुलभाऊ काणारकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटिका वर्षाताई निकम, मुरलीधरराव डेहनकर, चिंतामणी देवस्थान चे अध्यक्ष चदुभाऊ चांदोरे, श्यामभाऊ केवटे, अभिषेक पांडे, करण मून,संगीता ताई गावंडे, गायत्री ताई नवाडे, लताताई खांदवे, सारिका ताई ठोंबरे, अरुणा ताई गावंडे,संजय मेश्राम, चंद्रकांत ताजने, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मनिषा काटे,राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रितेश बोबडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा अध्यक्ष शितल कुरटकर, दिपकभाऊ धात्रक, राजुभाऊ वनकर, कुमार चौधरी, उमेश चव्हाण,युवती जिल्हा उपाध्यक्ष शुभांगी चांदोरे, कळंब शहर अध्यक्ष राहुल धाडसे, युवक अध्यक्ष निलेश गोंदे, विध्यार्थी अध्यक्ष मनोज पिसे , युवती तालूका अध्यक्ष किरण येरमे, युवती कलमं शहर अध्यक्ष नंदिनी शेंडे, अमोल मेश्राम, देविदास कासार,प्रशांत भोयर,अक्षय राऊत, बबलू ढगे,बशु भाऊ माहुलकर, विशाल आढल, गजू मडावी, अल्ताब, अनुप भाले राव, विकी ओंकार, प्रदीप भोयर, शुभम कांबळेनिखिल आसुटकर, रोशन पोटे, बाबुराव राठोड, समीर मस्कर, अमित भोयर, प्रफुल ठाकरे, मनवर अली सैय्यद, तन्वीर अली सैय्यद, लक्ष्मण ढाले, प्रशांत भोयर, हेमंत शिरोडे, आकाश काटे, नयन बारदमवार, शुभम मिठे, राजुभाऊ गरुड, आदी सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

मावळणी येथे ग्रा.पं. कार्यालय व जि.प. शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब, (१६ ऑगस्ट) : तालुक्यात मावळणी येथे ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अमृत महोत्सवी ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
सरपंच दीपाली ताई जामुनकर यांनी ग्रामपंचायत येथील तर शाळे मधील शाळा समितीच्या उपाध्यक्षा भारती अवसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी गावच्या सरपंच दिपाली ताई जामुनकर, उपसरपंच मनीषा ताई काटे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकरराव कांबळे, प्रफुलभाऊ ढोंगे, शिलाताई भोयर, प्रफुलभाऊ कोठारी, शेवंतां बाई मडावी, शिक्षक लोखंडे सर, खाडे मॅडम, पोलीस पाटील राजुभाऊ मडावी, राणिताई माने, लताताई बुरबुरे, ग्रामपंचायत कर्मचारी हरीभाऊ भोंडे, शाळा समितीच्या उपाध्यक्षा भारती अवसरे, महिला बचत गटाच्या रुपाली गणेशकर, ज्योत्स्ना भोंडे, जाणरावजी हेठे, संजय राव जामुनकर, राधाताई शेरेकर, अंगणवाडीच्या दुमने बाई, चंदा मोहूर्ले, सुनंदा दुमने, विष्णु चौदरी, कैलासभाऊ वानखेडे, राजुभाऊ सोनावणे, प्रभाकर गाडगे,आकाश काटे, आशिष हेठे, सोनू शेंडे, पवन हेठे, संतोष मून, जया ठाकरे, जया अवसरे व गावकरी उपस्थित होते.