कळंब तालुका ओला दुष्काळ जाहीर करा - तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसची मागणी
सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब, (२ आक्टो.) : कळंब तालुका काँग्रेस व तालुका युवक काँग्रेसच्या वतीने 2021 च्या खरीप हंगामात सतत पाऊस असल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात जिकडेतिकडे पाणीच पाणी साचले आहे, कापनिस आलेले सोयाबीन शेंगांना कोंब फुटली, बोंडावर आलेलं कपाशीचे पीक आडवे झाले आहे, त्यामुळे बोड सोडलेलं आहे, यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे. या सर्व नुसकाणीचे महसूल व कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व नुसाकान भरपाई देण्यात यावी, करीत तालुका काँग्रेस व युवक काँग्रेस च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदन देण्याकरीत उपस्थित, मुरलीधर डेहनकर, बाबासाहेब दरने, नरेंद्र मानकर, विलास राठोड, महादेव काळे, गजानन पंचबुद्धे, बाळाभाऊ नित, आनंदराव जगताप, चांदुभाऊ चांदोरे,राजू पोटे, योगेश धांदे, सिद्धेश्वर वाघमारे, मारोती वानखेडे, मधुकर गोहणे, सरपंच आरती जगताप, पपीता मुन, अनिल घोटेकर, मनोज रुईकर, सुवर्णा सिडाम, वनिता कांबळे, वसंतराव निकम, प्रदीप जाधव, राजू कदम, संजय पांडे, गजानन दांदडे, शरद वानखेडे, संतोष विधाते, आकाश गदई, संजीवनी कासार, मंजुषा हजारे, गायत्री नवाडे,अर्चना हजारे, संगीता गावंडे, भास्कर साठे, सुधाकर साळुंखे, शफी कुरेशी, राहुल सोनाळे, अभिलाष नित, कुणाल पंचबुद्धे, प्रशांत शास्त्रकार व सर्व काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.