Showing posts with label नागपूर. Show all posts
Showing posts with label नागपूर. Show all posts

युवकांनी जनसामान्यांच्या मूलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी – आमदार प्रणिती शिंदे

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

नागपूर : युवकांनी जनसामान्यांच्या मूलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी, या चळवळीतूनच जनसामान्यांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी मदत होत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात आज ‘संसदीय कार्यप्रणाली व लोकशाही संवर्धनासाठी युवक चळवळींचे योगदान” या विषयावर आमदार प्रणिती शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.



यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, देशातील सामान्य जनतेच्या विविध प्रश्नावर युवकांनी जागृत राहून चांगल्या भावनेतून काम करणे आवश्यक आहे. या कामातूनच आपले राजकीय भवितव्य घडवायचे आहे. यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. युवकांनी लोकशाहीसाठी मतदार नोंदणीमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. महिला व युवकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी काम केले पाहिजे. देशात विविध विचारप्रणाली आहेत. आपल्या आवडीच्या व योग्य विचाराप्रणालीत सहभागी होऊन नागरिकांच्या समस्या सोडवून देशातील लोकशाहीसाठी काम करणे आवश्यक आहे. देशात विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून युवकांना राजकीय भवितव्य घडविण्यासाठी संधी मिळू शकते. महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आहे. युवक-युवतींना राजकारणामध्ये येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठी संधी आहे.
युवकांनी जनमत व कार्यप्रणाली याची सांगड घालून काम करावे. स्वावलंबी होण्यासाठी कठोर मेहनत घेवून सतत प्रयत्न केले पाहिजे. समुपदेशनाद्वारे वैयक्तिक समस्या सोडवाव्यात. त्यासाठी मदत घ्यावी, संकोच बाळगू नये. महिलांचा आदर केला पाहिजे. घरापासूनच महिलांचा सन्मान करणे आवश्यक आहे. समाजाच्या आशा आकांक्षा युवकांच्या हाती असतात. लोकशाही संवर्धनासाठी युवकांनी सतत जागरुक राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आमदार श्रीमती शिंदे यांनी समर्पक अशी उत्तरे दिली.

यावेळी प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी श्रीमती शिंदे यांचा परिचय करुन दिला. अवर सचिव सुनिल झोरे यांनी आभार व्यक्त केले.

स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी वेळेचे योग्य व्यवस्थापन हवे – विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अल्प आहे. या भूमीचे ऋण फेडण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला न घाबरता आत्मविश्वासाने समोर जावे. दिवसभराचे मिनिट टू मिनिट नियोजन करावे. वेळेचे सुरळीत व्यवस्थापन करुन अभ्यासक्रमातील बारकावे ओळखावे. अभ्यासक्रमातील संबंधित विषयांची माहिती घेऊन त्यानुसार सातत्यपूर्ण अभ्यास करुन आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी तरच यशप्राप्ती होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी आज येथे केले.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे सामाजिक न्याय भवनातील सभागृहात एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. जिल्हाधिकारी आर. विमला, बार्टी पुण्याचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य तथा प्रादेशिक उपायुक्त सुरेंद्र पवार, प्रादेशिक उपायुक्त (समाजकल्याण) सिध्दार्थ गायकवाड, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून द युनिक ॲकडमी पुण्याचे तुकाराम जाधव, बीएस एज्युकेशन बॅकींग सोल्युशनचे अखिल कस्तुरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. खोडे म्हणाल्या की, वेळेचे अचूक नियोजन व सातत्यपूर्ण अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करणे कठीण नाही. केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची संख्या कमी आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाव्दारे (बार्टी) मागासवर्गीयांना युपीएससी व एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण, पुस्तके उपलब्ध करुन दिली जातात. मुलाखतीची तयारी करुन घेतली जाते. संस्थेच्या या स्तूत्य उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन परीक्षेत यश प्राप्त करुन आपले जीवन उज्वल करावे.

जिल्हाधिकारी श्रीमती विमला म्हणाल्या की, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांनी कोणाचा व कुठला आदर्श धरावा, हे निश्चित करणे आवश्यक आहे. अनेक महापुरुषांनी शून्यापासून सुरुवात करुन यशाचे उंच शिखर गाठले आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेले अथक परिश्रम व प्रयत्नांची पराकाष्ठा ही बाबपण लक्षात घेणे आवश्यक आहे. सातत्यपूर्ण जिद्दीने अभ्यास करुन स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करावे. बार्टी या संस्थेने विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाची चांगली सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. स्पर्धा परीक्षेचे आव्हान स्वीकारुन सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरवावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यामागचा मुख्य हेतू व बार्टीकडून देण्यात येणारे स्पर्धापूर्व प्रशिक्षण यासंदर्भात श्री. गायकवाड यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. या कार्यशाळेत स्पर्धा परीक्षा शिकवणीवर्गाचे अखिल कस्तुरकर व तुकाराम जाधव यांनी स्पर्धा परीक्षांच्या विविध पैलूंचे विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना पुष्पहारार्पण व दीप प्रज्वलनाने झाली. सूत्रसंचलन सतीश सोमकुंवर तर शितल गडलिंग यांनी आभार मानले. या कार्यशाळेला विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 जुलै "महाराष्ट्र कृषी दिन"

                  कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन (१ जुलै) 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे, त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो.

आजही महाराष्ट्रात शेतकर्‍यांची स्थिती बिकट आहे. देशाचा अन्नदाता असणार्‍या बळीराजावर बिकट संकट असल्याने अनेकजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. मात्र, आजच्या 'कृषी दिना'पासून प्रत्येकाने शेतकर्‍याप्रती आपलं असलेले सामाजिक भान लक्षात घेता बिकट काळात शेतकर्‍याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ देणं गरजेचे आहे.
राज्यातील तमाम शेतकऱ्यांना 'महाराष्ट्र कृषी दिना'च्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छुक :- श्री विठ्ठल पाटील खारकर 
कृषी मार्गदर्शक तथा संचालक
सुमेध ऍग्रो ट्रेडर्स, वरोरा 



वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांना पालकमंत्र्यांकडून सांत्वनपर शासकीय मदत


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नागपूर : वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर शासकीय मदत दिली.
गेल्या काही दिवसात मान्सून पूर्व वादळ वाऱ्यामध्ये ग्रामीण भागात काही ठिकाणी वीज पडून शेतात काम करणारे मजूर मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा दोन दुर्घटनाग्रस्त कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी आज पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या उमरेड तालुक्याला भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी आर. विमला होत्या.
वीज पडून निधन झालेल्या इतवारीपेठ, उमरेड येथील दिवंगत उषा मांढळकर यांची कन्या दीपाली मांढळकर हिला ४ लाख रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द केला. तर दुसऱ्या घटनेत शेतात काम करीत असताना वीज पडून मृत्युमुखी पडलेले मौजा हिवरा येथील शेतकरी दिवंगत भाऊरावजी वाढई यांच्या पत्नी रमाबाई वाढई यांना सांत्वनपर शासकीय मदत म्हणून ४ लाखांचा धनादेश सुपूर्द केला.

याप्रसंगी आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला उपस्थित होत्या.

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नागपूर : ग्रामीण अर्थव्यवस्था हा मूलभूत विषय घेऊन ग्रामीण भागाचा विकास करण्याचा ध्यास घेतला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण होतकरुंना शेळी वाटप, कुक्कुट पालनाचे उद्योग राबवून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. या उपक्रमास राज्याने सुध्दा अंगिकारले आहे. हे कार्य नेहमी संस्मरणी राहील, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले.

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर कार्यालयाच्या प्रशासकीय इमारत बांधकामाचा भूमिपूजन व प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र येथील नवीन पक्षीगृह व कुक्कुट प्रशिक्षण केद्रांच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त डॉ. संजय गोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजूषा पुंडलिक, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मोहन खंडारे, डॉ. सतीश राजु, डॉ. नितीन फुके, प्रादेशिक अंडी उबवणे केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री. बळी, डॉ. वर्षा तलमले, उपविभागीय अभियंता प्रशांत शंकरपुरे आदी यावेळी उपस्थित होते.
कोरोना काळात राज्यातील सर्व उद्योग, व्यवसाय बंद पडले होते, त्यावेळी कृषी व पशुपालन हाच एकमेव व्यवसाय सुरु होता. त्यामुळे राज्याला महसूल मिळाला आहे. शासकीय कुक्कुट उद्योगाद्वारे निर्मित दीड कोटी अंडी इतर राज्यात देण्यात येत आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या अनेक योजनाद्वारे ग्रामीण भागात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. यामुळेच गावची अर्थव्यवस्था मजबूत होईल, असा दृढविश्वास श्री. केदार यांनी व्यक्त केला. अंड्यामुळे मानवी शरीरास प्रोटिन्सचा पुरवठा होतो. त्यामुळे आरोग्य चांगले ठेवण्यासही मदत होते. पशुसंवर्धन विभागाचे उपक्रम योग्य रितीने राबवा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पश्चिम महाराष्ट्रात दुग्धव्यवसाय प्रगती पथावर आहे. त्याच धर्तीवर विदर्भात या पूरक व्यवसायास चालना द्या. शासकीय कॅटलफिल्डचा कारखाना नागपुरात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. धनंजय परकाळे यांनी प्रास्ताविकात महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या कार्याचा आढावा सांगतांना हे कार्यालय पुणे येथून नागपूर येथे स्थलांतरित करण्यात आले. म्हापसु विद्यापीठासह पशुविज्ञानाविषयी कार्यालय येथे असल्याने दुग्धव्यवसाय व अर्थाजनसाठी उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले. पशुसंवर्धन मंत्र्यांनी नेहमी पाठपुरावा करुन पशु विमा योजनेसाठी केंद्रात पाठपुरावा केला. त्यामुळेच पशुपालकांना हा विमा मिळणार आहे. त्यासोबतच केज योजना सर्व राज्यात लागू करण्यात येणार आहे. कुक्कुट प्रशिक्षक केंद्रामुळे पशुपालकांना हजारोच्या संख्येने येथेच प्रशिक्षण देणे सोयीचे होणार आहे. मंजूषा पुंडलिक यांनी नवीनअंडी उबवण केंद्रांच्या इमारतीमुळे अंडी उत्पादनात निश्चित वाढ होणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी वळू संगोपन केंद्रातील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर कार्यालयाच्या 6 कोटी 25 लक्ष किमंतीच्या प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन श्री. केदार यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर सेमीनरी हिल्स येथील 6 कोटी 40 लक्ष रुपये किंमतीच्या प्रादेशिक अंडी उबवण केंद्राच्या नवीन इमारत व 1 केाटी 43 लाख रुपये किंमतीच्या पक्षीगृहांचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. यावेळी श्री. केदार यांनी गोट शेडला भेट दिली व तेथील वळूची माहिती जाणून घेतली.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त डॉ. संजय धोटे यांनी केले. विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.             

जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्मार्ट करणार – पालकमंत्री डॉ नितीन राऊत


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नागपूर : जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या विद्युतीकरणासह डिजीटलायझेशन करुन स्मार्ट पोलीस स्टेशन करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. त्यासोबतच सर्व शाळा सौर ऊर्जेवर करा, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

जिल्हा नियोजन कार्यकारी समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवन येथे घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार कृपाल तुमाने, आमदार अभिजीत वंजारी, राजु पारवे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधिक्षक विजय मगर, कार्यकारी समितीचे सदस्य, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

डिजीटलायझेशनमुळे पोलीस स्टेशनमध्ये वाय-फाय सर्व ठिकाणी राहील. त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेच्या समस्या निवारणासाठी होईल. यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण पोलीस विभागाने द्यावे. सौर ऊर्जेचे उपकरण सर्व शाळांवर कार्यान्वित करा. यामुळे विद्युत बचत होईल. पोलीस व शिक्षण विभागाने तसा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
शहरी भागासोबतच ग्रामीण भागावर जास्त भर द्या, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रशासकीय सेवापूर्व स्पर्धा परीक्षा केंद्राचे डिजीटलायझेशन करुन त्याचा लाभ तेथील विद्यार्थ्यांना द्या. जास्तीत जास्त विद्यार्थी युपीएसी व एमपीएससी स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण व्हायला हवेत, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात ७ पैकी नागपूर येथील केंद्र प्रथम क्रमांकावर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावर पालकमंत्री म्हणाले की, केंद्र शासनाच्या तुलनेत राज्याचा वाटा किती आहे, राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा वाटा किती आहे याचा आढावा घ्या. त्यानुसार प्रस्ताव सादर करा. या सेंटरमधील वसतिगृह सर्व सोयीयुक्त करा, अभ्यासासाठी वातावरण निर्मितीसह चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. विद्यार्थी युपीएससी व एमपीएससी मध्ये अग्रणी राहतील यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात विधानसभा निहाय सेंटर चालु करा व ते मुख्य सेंटरला जोडा व वैचारिक पध्दतीत बदल घडवून आणा, असेही पालकमंत्री म्हणाले.
कौशल्य विकासाचा आढावा घेतांना पालकमंत्री म्हणाले की, महास्वयंम पोर्टलवर सर्व उद्योग व व्यवसायांची शंभरटक्के नोंदणी करा, व्यवसायाभिमुख प्रशिक्षणावर भर द्या. प्लेसमेंटनुसार निधी वाटप करण्यात येइल.

कौशल्य विकासातून रोजगार निमिर्ती झाल्यास बेरोजगारीचा प्रश्न थांबेल. स्थानिकांनी व्यवसायात प्राधान्याने सामावून घ्या, असे खासदार कृपाल तुमाने म्हणाले. यावेळी आमदार अभिजीत वंजारी व राजु पारवे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

पाणी पुरवठा विभागांतर्गत जलजीवनच्या सर्व नळ योजना सौर ऊर्जेवर करा. पुण्याच्या धर्तीवर सर्व नागरिकांना स्वच्छ फिल्टरचे पाणी द्या जिल्ह्यात उच्च रक्तदाब व मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे, त्यावर उपाययोजना करण्यासाठी लागणारे साहित्य वाटप करा. महापालिकेने विधानसभानिहाय सीबीएससी शाळा सुरु करण्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र सुरु करावेत, असेही ते म्हणाले.
विकास निधीच्या कामांच्या भूमिपूजनासाठी पालकमंत्री व लोकप्रतिनिधी आमंत्रित करा. योजनांतर्गत शिलाई मशीनचे वाटप करा. शहरी व ग्रामीण भागात स्मार्ट स्कुलसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शेळी पालन व दुधाळ जनावर वाटप योजना सुरु करा. त्यास निधी देण्यात येईल. दिल्लीच्या धर्ती जिल्ह्यात स्मार्ट स्कुल योजना राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. गडचिरोलीप्रमाणे नाविण्यपूर्ण योजनेतून मॉडुलर स्कुलसाठी प्रस्ताव सादर करा. लवकरच नगरपालिका व महानगरपालिकांची निवडणूक येत असल्याने मुद्देनिहाय व योजनानिहाय सर्व प्रस्ताव तत्काळ सादर करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी अपारंपारिक ऊर्जा, पोलीस विभाग, महापालिका, जि. प. शाळा दुरुस्ती, वाचनालय, शिक्षण विभागासह विविध विषयाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस संबंधित सर्व विभागाचे प्रमुख,पदाधिकारी उपस्थित होते.

नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशासन अधिक गतिशील करा – डॉ. नितीन राऊत

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नागपूर : लोकसंवाद कार्यक्रमात आज जनतेने मांडलेल्या तक्रारी, गाऱ्हाण्यांची गंभीर दखल घेत पुढील पंधरा दिवसात सर्व समस्यांचा निपटारा झालाच पाहिजे, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे दिले.

नागपूर जिल्हा प्रशासनाने आज पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या निर्देशाप्रमाणे पहिल्या लोकसंवाद कार्यक्रमाचे लक्षवेधी आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात केले होते. निवडणुकीप्रमाणे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येक नागरिकाला आपल्या शंकांचे समाधान करण्याची संधी यावेळी देण्यात आली.

प्रशासन हे अधिक गतिशील, संवेदनशील असणे आवश्यक आहे.जनतेच्या प्रश्नांना सर्वप्रथम शांततेने ऐकून घेणे, सर्वात महत्त्वाचे आहे. मधली दोन वर्ष कोरोनामध्ये गेली. त्यामुळे शासन-प्रशासन, सामान्य जनता यातील संवाद जवळपास बंद होता. आरोग्य यंत्रणेकडे शासनाचे लक्ष होते. मात्र आता कोरोना सावटातून बाहेर निघाल्यानंतर सामान्यांच्या वेदना, संवेदना ऐकणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सूचित केले.

आजच्या लोकसंवाद कार्यक्रमाला आमदार अभिजित वंजारी, आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी आर. विमला, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, याशिवाय सर्वच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गेल्या दहा वर्षांपासून काही प्रश्न सुटले नसल्याचे काही नागरिकांनी त्यांच्या लक्षात आणून दिले.अशा जटिल व कठीण प्रश्नांना त्यांनी स्वतःकडे घेतले. यासंदर्भात पालकमंत्री कार्यालयाला पत्र द्यावे, या समस्यांचा निपटारा स्वतः लक्ष घालून करेल. तर काही महत्वपूर्ण प्रश्न मंत्रालयात बसून सोडवू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी तक्रारकर्त्यांना दिले.

आजच्या लोकसंवाद कार्यक्रमात प्रामुख्याने जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, नगर रचना, भूमिअभिलेख कार्यालय, संजय गांधी निराधार योजना व तत्सम लाभार्थी योजना, जमिनीचे फेरफार, वनविभागाच्या जमिनी संदर्भातील समस्या, भूसंपादन, अतिक्रमण, याबद्दलच्या तक्रारी अधिक होत्या. एकूण 193 प्रकरणावर चर्चा झाली.
जिल्हाभरातील शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तसेच शहरातील सार्वजनिक सोसायटी, पट्टेधारक यांचा सहभाग अधिक होता. अनेक ज्येष्ठ नागरिकांना आपल्या समस्या सांगताना शब्द फुटत नव्हते. अशावेळी त्यांच्यालेखी तक्रारीवरून न्याय देण्याची भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली. काही समस्या त्यांनी जागेवरच निकाली काढल्या.जवळपास दोनशे तक्रारींपैकी शंभर तक्रारीवर त्यांनी पुढील आठवड्यात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हाधिकारी आर. विमला यांना कालमर्यादेत पूर्ण करायच्या समस्यांबाबत सर्वाधिकार देण्यात आले आहे. पुढील आठवड्यात ज्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले

गेले त्याची नोंद आज घेण्यात आली आहे. लोकसंवाद कार्यक्रमात चर्चेत आलेला कोणताही प्रश्न प्रलंबित राहता कामा नये, अशी ताकिद त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आज दिली.

तत्पूर्वी उन्हाळ्याच्या दिवसात प्रशासनाने केलेल्या नियोजन पूर्ण कार्यक्रमासाठी त्यांनी ‘जिल्हाधिकारी आर. विमला व त्यांच्या अधिनस्त अधिकाऱ्यांचे कौतुक केले. जवळपास 35विभागाचे विभाग प्रमुख आज या ठिकाणी सार्वजनिक सुटीच्या दिवशी सामान्य नागरिकांसाठी तैनात होते.

प्रशासनाने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांना बसण्यासाठी बाहेर दोन सुसज्ज मंडप उभारले होते. नागरीकांसाठी चहा बिस्कीटची व्यवस्था करण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था, प्रत्येक ठिकाणी कुलर लावण्यात आले होती.
दहा स्टॉलवर सामान्य नागरिकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी व्यवस्था सेतू केंद्रामध्ये करण्यात आली होती. टोकन मिळालेल्या नागरिकांना आतमध्ये प्रवेश दिला जात होता. त्यानंतर त्यांना सन्मानपूर्वक बसवून प्रशासन त्यांचे म्हणणे एकूण घेत होते. पालकमंत्र्यांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी नागरिक व संबंधित अधिकारी यांच्यामध्ये समन्वयकाची भूमिका घेतली. प्रत्येक प्रकरणात त्यांनी स्वत: निर्देश दिले. उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्यविषयक कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणेने प्राथमिक उपचाराची व्यवस्थाही या ठिकाणी केली होती. जवळपास पाच तास पालकमंत्र्यांनी नागरिकांचे म्हणणे स्वतः ऐकून घेतले.

खतांचा तुटवडा नको; नियोजन करा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नागपूर : युक्रेन रशिया या युद्धाचा रासायनिक खतांच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ नये व त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू नये, यासाठी उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देण्याची सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत केली.

जिल्ह्याच्या नियोजनात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीला आमदार आशिष जायस्वाल, आमदार राजू पारवे, यांच्यासह जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे व्यासपीठावर उपस्थित होते.

या बैठकीमध्ये सर्वप्रथम हवामान खात्याचा अंदाज वर्तविण्यात आला. केंद्रीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस राहणार आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पीक पेऱ्याचे नियोजन करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली.

नागपूर जिल्ह्यात ४ लाख, ७४ हजार ३२५ हेक्टर क्षेत्रांमध्ये विविध पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हे कापूस लागवडीखाली येते.गेल्यावर्षी दोन लक्ष हेक्टरवर पऱ्हाटीची लागवड करण्यात आली होती. त्याखालोखाल एक लक्ष दहा हजार हेक्टरवर सोयाबीन लागवडीखाली होते. त्यापाठोपाठ भाताची व तुरीची लागवड खरीप हंगामात केली जाते. त्यामुळे यावर्षी सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना आपापल्या क्षेत्रातील पीक लागवडी बाबत उद्दिष्ट लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचना आजच्या बैठकीत करण्यात आल्या.
गेल्या तीन वर्षात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होत आहे. या वर्षीदेखील हवामान खात्याचा अंदाज पावसाचा आहे. त्यामुळे खरिपासाठी कर्ज वाटप करताना बँकांनी आपले उद्दिष्ट पूर्ण करावे, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण १ लक्ष ५० हजार लक्ष कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. आत्तापर्यंत १ हजार ७२९ लक्ष कर्जवाटप झाले आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी आवाहन केले.

नैसर्गिक संकटामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देण्याबाबत तालुका स्तरावर विमा कंपन्यांचे कार्यालय उघडण्यात आले आहे. या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना आपले कार्यालय कुठे आहे,त्याची माहिती द्यावी. कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर ७२ तासाच्या आत विमा कंपन्यांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. त्यामुळे तातडीच्या संपर्क व्यवस्थेसाठी हा समन्वय ठेवावा तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीनाही याची माहिती द्यावी, अशी सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केली.

आमदार आशीष जायस्वाल व राजू पारवे यांनी यावेळी गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी आलेल्या आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळाले नसल्याची तक्रार पालकमंत्र्यांकडे केली. प्रस्तावाबाबत यावेळी चौकशी करण्यात आली. तसेच यासंदर्भात तातडीने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असे स्पष्ट केले.
जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या सिंचन प्रकल्पातून मिळणाऱ्या मुबलक पाण्यामुळे फळबागा लागवड संदर्भात धडक मोहीम जिल्ह्यात राबविण्याचे आवाहन आमदार राजू पारवे यांनी केली. उमरेड भिवापूर आदी भागात या मोहिमेअंतर्गत मागणी आहे. त्यामुळे रोपवाटिका उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी केली.

आमदार आशीष जायस्वाल यांनी राज्य शासनाच्या विकेल ते पिकेल या योजनेअंतर्गत पिकांच्या मूल्य साखळीचे नियोजन करण्यासाठी सूचना केली. नागपुरी संत्रा, भिवापुर मिरची, करवंद, सिताफळ या पिकांबाबत योग्य ते नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

या बैठकीत पीक निहाय बियाणे गरज, मागणी, बियाणे उगवण क्षमता, कमी खताचा पुरवठा झाल्यास करावयाचे उपाय योजना, युरिया बाबतची सद्यस्थिती, महाबीटी, मधील प्राप्त अर्ज, प्रधानमंत्री पिक विमा योजना, खरीप व रब्बी हंगामातील नियोजन, गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना, मागील तीन वर्षातील कर्जवाटप, तसेच जिल्ह्यातील कृषी विभागातील मंजूर व भरलेल्या पदांचा आढावा घेण्यात आला.

सध्या रशिया व यूक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू असून या परिस्थितीत रासायनिक खताचा तुटवडा, त्यांची उपलब्धता यावर या बैठकीत चर्चा झाली. जिल्ह्यामध्ये कोणत्या कृषी केंद्रात किती खत उपलब्ध आहे. याची माहिती शेतकऱ्यांना ऑनलाइन झाली पाहिजे, या अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मिलिंद शेंडे यांनी विभागाने खत उपलब्धतेबाबत तयार केलेले नियोजन सादर केले तसेच भरारी पथक मोठ्या प्रमाणात गठीत केले असल्याचे सांगितले कोणत्याच प्रमाणात या वर्षी तरी तुटवडा पडणार नाही अशा पद्धतीचे नियोजन केले असून कमी खताचा पुरवठा झाल्यास आवश्यक उपाययोजना करण्याची प्रशासनाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सरळ खते वापरून, मिश्र खते तयार करणे, कमी खत उपलब्ध झाल्यास पर्यायी नियोजन, रासायनिक खत कार्यक्षम वापरासाठी प्रशासकीय उपाययोजना युरियाची सद्यस्थिती यावरही चर्चा झाली.

समृद्धी महामार्ग गडचिरोली, भंडारा, गोंदियापर्यंत वाढविणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नागपूर : हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील उद्योग-व्यवसायाला प्रचंड गती मिळणार आहे. गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांनाही या महामार्गाचा फायदा झाला पाहिजे, यासाठी हा महामार्ग या जिल्ह्यांपर्यंत वाढविणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार ते नागपूरपर्यंत २१० किलोमीटर स्वतः वाहन चालवत श्री. शिंदे यांनी आज समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यादरम्यान वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार, वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आदी उपस्थित होते.

शेलूबाजार येथून श्री. शिंदे यांनी पाहणी दौऱ्यास स्वतः वाहन चालवत प्रारंभ केला. वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे त्यांनी महामार्गाची पाहणी केली. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातीलच वेरूळजवळ वन्यप्राण्यांना आवागमन करता यावे, यासाठी बांधण्यात आलेला वन्यजीव उड्डाणपूल, नागपूर जिल्ह्यात वायफळ येथील टोल प्लाझा व परिसर, तसेच नागपूर येथे ज्या भागातून महामार्गास प्रारंभ होतो, त्या भागाची सुद्धा बांधकाम मंत्र्यांनी पाहणी केली.

समृद्धी महामार्गामुळे खऱ्या अर्थाने विदर्भात समृद्धी येणार आहे. येथील औद्योगिकीकरणासह उद्योग-व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. महामार्गाचा विदर्भातील अन्य जिल्ह्यांनाही फायदा झाला पाहिजे, ही भूमिका समोर ठेवून हा महामार्ग गडचिरोली, भंडारा, गोंदियापर्यंत वाढविण्यात येणार आहे. या महामार्गाच्या वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार ते नागपूर या पहिल्या टप्प्यातील २१० किलोमीटर मार्गाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते येत्या २ मे रोजी लोकार्पण होणार आहे. जो मार्ग पूर्ण झाला आहे, तो सर्वसामान्यांसाठी खुला झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे या टप्प्याचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण महामार्ग वाहतुकीस खुला होणार असल्याचे श्री. शिंदे यांनी आर्वी टोल प्लाझा येथे बोलताना सांगितले.

या महामार्गावर वाहने १५० च्या गतीने धावू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेचीही पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघाताचे प्रमाण शून्य राहील. महामार्गावर तत्काळ प्रतिसाद पथके राहतील. मार्गाच्या बांधकामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. हा इकोफ्रेंडली रस्ता असून मार्गाच्या दुतर्फा ११ लाख ३० हजार झाडे लावून ग्रीन कव्हर तयार करण्यात आले आहे. महामार्गावर आपण २५० मेगावॉट सौरऊर्जा तयार करतो आहोत. महामार्गाशेजारी एक हजार शेततळी तयार करण्यात आली असून या तळ्यातून दोन हजार ५०० कोटी लिटर पाण्याचा साठा झाला. यामुळे परिसरातील पाणी पातळी वाढली असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

या संपूर्ण महामार्गावर वन्यप्राण्यांना आवागमनासाठी ७६ अंडरपास तर ८ ओव्हरपास तयार करण्यात आले आहेत. यावर ३०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच प्रवाशांना महामार्गावर ये-जा करता यावी, यासाठी २४ इंटरचेंजेस देण्यात आले आहेत. महामार्ग तयार करताना वृक्षारोपण, सौरऊर्जा, शेततळे, पर्यावरण, वन्यप्राणी, उद्योग, शेतकरी आदींचा विचार करण्यात आल्याने हा केवळ महामार्ग नाही तर लोकांच्या आयुष्यात समृद्धी आणणारा महामार्ग ठरणार आहे. विकासाच्या कोणत्याही प्रक्रियेत भूसंपादन अतिशय महत्वाचे असते. या महामार्गाचे महत्व लोकांना समजावून सांगितल्याने आणि पाचपट मोबदला दिल्याने वेळेत भूसंपादन होवू शकले. महामार्गावर नवनगरे उभारण्यात येणार असून त्याचेही काम गतीने होणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

‘महाज्योती’च्या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करा – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नागपूर : इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग या प्रवर्गातील व्यक्तींच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी विविध योजना, उपक्रमांची ‘महाज्योती’मार्फत प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले.

सामाजिक न्याय भवन येथे महाज्योतीच्या संचालक मंडळाची बैठक श्री. वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. महाज्योतीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. महाज्योतीचे सदस्य लक्ष्मण वडले, दिवाकर गमे, बबनराव तायवाडे, व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे, समाजकल्याण उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, मुख्य लेखा वित्त अधिकारी अतुलकुमार वासनिक, कंपनी सेक्रेटरी अविनाश गंदेवार, प्रकल्प अधिकारी कुणाल सिरसाठे आदी यावेळी उपस्थित होते.

समाजातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या कमकुवत घटकांच्या सर्वसमावेशक सर्वांगिण शाश्वत विकासासाठी ‘महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून संस्थेमार्फत मागासवर्गियांसाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, संशोधन, रोजगारभिमुख वृध्दी, कौशल्यविकास, स्वयंरोजगार, ग्रामीण विकास, शेती विकास, व्यक्तिमत्व विकास , स्पर्धात्मकता विकास, सामाजिक ऐक्य व सलोखा आणि तत्सम क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवावे, असे श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील जातींचा इतिहास, संस्कृती, चालीरीती, रुढी-परंपरा, पारंपारिक व्यवसाय आदींची माहिती तसेच समग्र वाङमयाची निर्मिती महाज्योतीतर्फे करण्यात येणार आहे. त्यामध्ये पाच खंडांचा समावेश असून या खंडांची छपाई शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार येथून करण्यात येईल, यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे, असे आदेश महाज्योती प्रशासनास त्यांनी दिले.

महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुषंगाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना युपीएससी, एमपीएसी स्पर्धा परीक्षेसंदर्भात दिल्ली येथील नामांकीत संस्थेत प्रशिक्षण व पंधराशे रुपये प्रतीमाह छात्रवृत्ती (स्टायपेंड) दिल्या जाते. डॉक्टरेट (पीएचडी) करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. जेईई, नीट व एमएचसीइटी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना टॅब पुरवठा केला जाणार असून प्रशिक्षण सुविधाही त्यांना पुरविल्या जाणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग नागरीसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी आर्थिक सहाय्य संस्थेव्दारे देण्यात येणार आहे. संस्थेव्दारे वैमानिक प्रशिक्षणाकरिता वीस विद्यार्थ्यांची निवड केल्याची माहिती श्री. वडेट्टीवार यांनी दिली.

शेतकऱ्यांसाठी करडई तेलबिया उत्पादन प्रकल्पांतर्गत अर्थसहाय्य योजनेतून विदर्भातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी खते, किटकनाशक व पिक संवर्धक औषधीसाठी 2 हजार 200 रुपये अनुदान दिल्या जाईल. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित “तृतीय गुणरत्न” या उत्कृष्ठ नाटकाच्या प्रयोग सादरीकरणासाठी निर्मात्यांना व त्यांच्या चमूला अनुदान दिल्या जाईल. येत्या काळात मुंबई, रत्नागिरी व नांदेडे येथेही महाज्योतीचे कार्यालय स्थापन करण्यात येणार असून त्यामार्फत तेथील क्षेत्रातील मागासवर्गीयांना विविध योजनांचा लाभ दिला जाईल, असेही श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

नागरी सुविधांची कामे गतीने पूर्ण करा

गावांचा व शहरांचा विकास तेथील मुलभूत सोयी-सुविधा, रस्ते, शाळा, आरोग्य केंद्र तसेच स्वच्छता आदी घटकांवर अवलंबुन असतो. गावांचा कायापालट होऊन सुंदर शहर म्हणून लौकीक मिळविण्यासाठी नगर परिषद असलेल्या शहरात नागरी सुविधांची कामे नियोजनबध्द व गतीने पूर्ण करा, असे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले.

सामाजिक न्याय भवन येथे ब्रम्हपूरी, सिंदेवाही व सावली या नगरपरिषदेच्या विकास कामांबाबत आढावा मंत्री महोदयांनी घेतला. ब्रम्हपूरी, सिंदेवाही व सावली नगरपरिषदेचे पदाधिकारी व मुख्याधिकारी यावेळी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी, सिंदेवाही व सावली या नगरपरिषदांना नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यातून नाविण्यपूर्ण योजनेतील कामे, चौक सौंदर्यीकरण, पुतळा उभारणे, डिपी रस्त्यांचे बांधकाम, इमारत बांधकाम, तलाव बांधकाम व सौंदर्यीकरण, जलतरण तलाव आदी कामे नियोजनपूर्वक व गतीने पूर्ण करावी. नगरोत्थान योजनेंतर्गत नियोजित कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करावे. दलीतवस्ती सुधार कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित कामे पूर्णत्वास नेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर दोन डिजीटल शाळा निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्या शाळांमध्ये डिजीटल क्लासरुमसह पिण्याच्या पाणी, स्वच्छता गृह, विविध शैक्षणिक साहित्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करुन शैक्षणिक आलेख उंचाविण्यासाठी प्रयत्न केल्या जाईल, असेही श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

पथनाट्याच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नागपूर : पथनाट्य हा निव्वळ करमणुकीचा प्रकार नाही ते निर्हेतुक नसते. विशिष्ट सामाजिक वा राजकीय विचार जनमानसात पोचवण्याचे काम ही पथनाट्ये करत असतात. ती एक सामाजिक चळवळ आहे. विशिष्ट विचारसरणी असलेले कलाकार आपल्या अभिनयाद्वारे त्यांचा विचार पसरवण्याचे काम अशा नाटकांद्वारे करत असतात. त्याच अनुषंगाने राज्य शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात व त्यामार्फत सामान्यांच्या जीवनात बदल घडून यावा यासाठी स्थानिक भाषेत व स्थानिक कलाकारांच्या सहभागात राज्य शासनाच्या महत्वपूर्ण योजना व गेल्या दोन वर्षातील  उपलब्धीचे सादरीकरण सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

आणि गेल्या दोन वर्षात केलेल्या कामांचा आढावा, तसेच अनुसूचित जाती, जमाती, सर्वसाधारण, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक व सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या प्राथमिक योजनांची माहिती यामार्फत दिली जाते. सदर पथनाट्य जिल्ह्यामध्ये विविध भागात सध्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या मार्फत सुरू आहे. कोरोनाच्या सावटातून बाहेर पडत असलेल्या जनतेच्या पारंपारिक कलांची ही मेजवानी मनाला भावत आहे.

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या सावटात असणाऱ्या ग्रामीण व शहरी भागात पारंपारिक कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध कलापथक, पथनाट्य, गण, गवळण,कव्वाली, भारूड, बतावणी अशा विविध कला व त्यातून होणारे लोकप्रबोधन याला खीळ बसली होती. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाने स्थानिक जिल्ह्याच्या विविध योजनांमधून हे कार्यक्रम राबविण्यासोबतच आपल्या नव्या मोहिमेत दमदार कला पथकांच्या गटामार्फत राज्य शासनाच्या दोन वर्षातील उपलब्धी संदर्भात मांडणी सुरू केली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयामार्फत हे पथनाट्य ग्रामीण भागात होत आहे. शहराच्या काही भागातही पथनाट्य होत असून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात विविध तालुक्यात पथकाने आपल्या स्थानिक भाषेतून लोकांसमोर योजनांची मांडणी केली. याला शहरी व ग्रामीण जनता उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे.

अभिनेत्री हेमामालिनी गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था च्या उदघाटनाकरिता नागपूर येथे...

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नागपूर : येथील द.म.सा.के. सिव्हिल लाईन येथे आज २५ मार्च रोजी ड्रिम गर्ल(स्वप्न सुंदरी); खा.हेमामालिनी त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 
चक्क ड्रीम गर्ल उदघाटन ला आल्याने जणू अप्सरा उतरल्या. 
      
महिला ऊद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर एम एस एम ई. मंत्रालय आणि गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ते २८ मार्च २०२२ या कालावधीत महिला ऊद्योजकांसाठी " व्हिजन एक्सपो-"२०२२ चे आयोजन दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर येथे करण्यात आले आहे. विदर्भातील महिलांना ऊद्योजकातेमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि आर्थिक द्रुषट्या स्वावलंबी बनाव्यात ही या एक्सपोमधिल संकल्पना गायत्री महिला औद्योगिक संस्था च्या नागपूरच्या अध्यक्षा कांचनताई.नितीन गडकरी या आहेत. ईतकेच नव्हे तर महिला उद्योजकांना बाजारपेठ उपल्ब्ध करून देणे आणि रोजगाराच्या संधी वाढवणे आणि त्या द्वारे महिलांनास्वयंरोजगार करून त्यांचे सक्षमीकरण करणे हा या मागचा उद्देश आहे. 

या उदघाटन प्रसंगी गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था. मर्यादित ना.अध्यक्षा कांचनताई नितीन गडकरी, आर. विमला जिल्हाधिकारी, यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला.

नागपूर येथील कॅन्सर रूग्णालय लवकरच सुरू करणार - वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय उभारण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत दिली.

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय लवकर उभारण्यासंदर्भात विधानसभा सदस्य समिर मेघे यांनी प्रश्न उपस्थित केला.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, नागपूर येथे शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय उभारण्यासाठी २०१८ मध्ये २३ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला होता. सन २०१९ ला बांधकामाच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आणि सन २०२० मध्ये कोरोनाचे संकट आले त्या कालावधीत राज्य सरकारने बांधकामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्या काळात हे काम बंद होते. सध्या हे काम नागपूरचीच एनआयटी ही संस्था करत असून या संस्थेने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. हे काम दोन महिन्यात सुरू होणार आहे.

कॅन्सर रूग्णालय उभारण्यासाठी लागणारा खर्च तसेच यंत्रसामग्रीसाठी खरेदी करण्यात येईल व लवकरात लवकर हे कॅन्सर रूग्णालय सुरू करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सभागृहात दिली.

संताजी ब्रिगेडचे काम वाखाण्याजाेगे व काैतुकास्पद - संगिताताई तलमले

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

नागपूर : उपराजधानी नागपूरातील संताजी ब्रिगेड तेली महासभाचे काम उल्लेखनिय व वाखाण्याजाेगे असल्याचे मत ए.आय.सी.सी. नॅशनल काे - ऑर्डीनेटर प्रदेशच्या कार्यकारी अध्यक्षा संगिताताई तलमले यांनी व्यक्त केले.

संस्थेचे संस्थापक व सचिव अजय धाेपटे यांनी अथक परिश्रम घेवून त्यांनी या संस्थेला पुढे नेण्याचा आटाेकाट प्रयत्न केला ताे खराेखरचं अभिनंदनिय काैतुकास्पद असल्याच्या त्या पुढे म्हणाल्या. नागपूरातील जवाहर विध्यार्थी गृहात काल शनिवार दि.२६ फेब्रुवारीला आयोजित केलेल्या भव्य महिला मेळावा तथा विनामुल्य आराेग्य शिबिर उद्घाटनाच्या निमित्ताने त्या बाेलत हाेत्या. या वेळी उपस्थित महिलांना संगिताताई तलमले यांनी माेलाचे मार्गदर्शन केले. सदरहु आयाेजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रमेशजी गिरडे यांनी विभूषित केले हाेते. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने वेळी एका पथनाट्याचे आयोजन करण्यात आले हाेते. पार पडलेल्या या पथनाट्यातील कलावंताची अनेकांनी प्रशंसा केली. या वेळी एका रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीराचे आयोजन देखिल करण्यात आले हाेते. अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतला असल्याचे आयाेजकानी आमच्या प्रतिनिधीशी बाेलतांना सांगितले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाजी खापर्डे, माजी महापाैर शेखर सावरबांधे, कामठीचे आमदार राधेश्याम हटवार, मनपा नागपूरच्या उपमहापाैर मनिषाताई धावडे, कन्हान नगर परिषदेच्या नगराध्यक्षा करुणा आष्टनकर, पारशिवणी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रतिभा कुंभलकर मंगला गवरे, कल्पनाताई कुंभलकर ,रेखा साकोरे, वंदना भुरे, समिता चकोले, अभिरुची राजगिरे, वंदना चांदेकर, जयश्री वाडीभस्मे, कुसुम बावनकर, शिला कामडे नंदा लोहबरे, मनपा माजी नगरसेविका नयना झाडे, प्रामुख्याने उपस्थित हाेत्या. कार्यक्रमाचे संचालन चित्रा माकडे यांनी केले. संताजी ब्रिगेड तेली समाज महासभाच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय धाेपटे, विजय हटवार, हितेश बावणकुळे, रुपेश तेलमासरे, गजानन तळवेकर, मंगेश साखरकर, कुमार बावणकर, आदींनी अथक परिश्रम घेतले.

आयोजित उपराेक्त कार्यक्रमाला महिला व तरुणींची उपस्थिती लक्षणिय हाेती.

उपराजधानी नागपूरात आज संताजी ब्रिगेड तेली महासभाच्या वतीने भव्य महिला मेळावा व रक्तदान शिबिराचे आयाेजन

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

नागपूर : नागपूरातील संताजी ब्रिगेड तेली महासभा वतीने शनिवार दि. २६फेब्रुवारीला दुपारी १ वाजता स्थानिक जवाहर विध्यार्थी गृहात भव्य (नंदनवन पाण्याच्या टाकीजवळ) महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ह्या मेळाव्याच्या निमित्ताने पथनाट्य, रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीराचे देखिल आयोजन करण्यात आले आहे. सदरहु मेळाव्याचे उद्घाटन ए.आय.सी.सी.नँशनल काे.- ऑर्डीनेटर प्रदेशच्या कार्यकारी अध्यक्षा (आेबीसी) संगिताताई तलमले यांचे शुभ हस्ते हाेत आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रमेशजी गिरडे हे विभूषित करणार आहे. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री तथा वि.प.आमदार चंद्रशेखर बावणकुळे, पूर्व नागपूरचे आमदार क्रूष्णाजी खापर्डे, वि.प. आमदार अभिजीत वंजारी, माजी महापाैर शेखर सावरबांधे, कामठीचे आमदार टेकचंदजी साखरकर, उद्याेजक व समाजसेवक राकेश भावळकर उपस्थित राहणार असल्याची माहिती संताजी ब्रिगेड तेली महासभा संस्थापक व सचिव अजय धाेपटे यांनी काल नागपुर मुक्कामी दिली.

उपराेक्त कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय हटवार, सहसचिव हितेश बावनकुळे, कोषाध्यक्ष रुपेश तेलमासरे, गजानन तळवेकर, मंगेश साखरकर, कुमार बावनकर आदीं अथक परिश्रम घेत आहे.

महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेची विदर्भिय बैठक संपन्न


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

हिंगणघाट : आज महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेची विदर्भिय बैठक नागपूर येथे घेण्यात आली. नागपूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात आली. नागपूर चा दोन दिवसीय दौरा मंगलाताई ठक जेष्ठ नागरिक निराधार अत्याचार मुक्ती संघर्ष समिती च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा यांनी फिरून केला. 

या वेळी नागपूर मधील वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग वेगळ्या परिसरातील अनेक महीला सहभागी झाल्या व मंगला ताईंनी महिलांना विदर्भाचे व नागपूर शहराचे पदभार सोपविले. संघटनेच्या नागपूर शहरा अध्यक्ष पदी सुनिता ताई इंगळे, उपाध्यक्ष पदी सारिकाताई मुलकलवार, तर सचिव पदी उज्वलाताई रोडगे यांना पदभार सोपविण्यात आला. विदर्भ नागपूर विभागाच्या समन्वयक पदी राजश्री दुब्बावार यांची नियुक्ती करण्यात आली, या वेळी सपना मुंगसे, अश्विनी मुंगसे, वनिता वाघुलकर उपस्थित होत्या. सर्वांनी मंगला ताईंचे आभार मानले.

निराधार संघटनेचे कार्य वाढविण्यासाठी व तळागळतील गोरगरीब जनतेस ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेच्या माध्यमातून योजनांचा लाभ जाणते पर्यंत पोहचविण्यासाठी मदत व्हावी व महीला प्रत्येक क्षेत्रात अजूनच मजबूत व्हाव्या यासाठी आपली संघटना महाराष्ट्र भर फिरून संघटना बांधणीचे कार्य करीत आहे. आपण या पदाचा सत्कार्य व समाजपयोगी कार्य करावे अशी पदाधिकाऱ्यांना मंगला ताई यांनी सांगितले तसेच  "पाठभार जखमा" एक सत्य कथन मंगला ताईंनी लिहिलेले पुस्तकं महिलांना वाणाच्या स्वरूपात देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

इंडिया ओपन २०२२ मधील यशाबद्दल नागपूरकर मालविका बनसोड हिचे पालकमंत्र्यांनी केले अभिनंदन

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

नागपूर : इंडिया ओपन 2022 बॅंडमिंटन स्पर्धेत जगज्जेत्या सायना नेहवालला नागपूरची मालविका बनसोड हिने तिसऱ्या फेरीत चित करुन विक्रमी कामगिरी केली आहे. या विक्रमी कामगिरीची दखल घेत राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मालविकाला प्रत्यक्ष फोन करून तिचे अभिनंदन केले.

"मालविका तू केलेली कामगिरी तमाम नागपूकरांसाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. तुझे करावं तेव्हढे कौतूक कमीच आहे. तू अशीच उंच भरारी घेत यशाची शिखरे पादाक्रांत करत जा, मी सदैव तुझ्या पाठिशी आहे," असे गौरोद्वगार डॉ. राऊत यांनी यावेळी दिल्लीत आपल्या आईसोबत आलेल्या मालविकाशी बोलताना काढले. कस्तुरचंद पार्क येथील एका कार्यक्रमात मालविकाचा सत्कार केल्याची आठवण ही त्यांनी यावेळी काढली.

नागपूरसारख्या शहरातून मालविका हिने इंडिया ओपन 2022 मध्ये सहभाग घेत केलेली कामगिरी राज्यासाठी अभिमानास्पद आहे. नागपूर शहरातून मालविका सारखे खेळाडू उंच भरारी घेत आहेत. मालविकाने केलेल्या कामगिरीमुळे नागपूर शहराचे नाव अजून एकदा जागतिक पातळीवर उंचावले आहे. भविष्यात मालविका अशीच उत्तोमोत्तम कामगिरी करीत राहील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही विजय मिळवत राहील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. मालविकाला भविष्यात जागतिक पातळीवर खेळण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे डॉ राऊत यांनी तिच्याशी बोलताना म्हटले.

 प्रतिकूल परिस्थितीतही मात करून विजय कसा मिळवायचा याचे उत्तम उदाहरण मालविका हिच्या रूपात सर्वांसमोर आले आहे. उदयोन्मुख खेळाडूंना तिच्याकडून प्रेरणा मिळेल व विशेषत: ग्रामीण भागातून यामुळे दर्जेदार जागतिक पातळीवरचे खेळाडू निर्माण होतील असा विश्वास डॉ. राऊत यांनी व्यक्त केला.

कस्तुरचंद पार्क येथे 2020 मध्ये डॉ. नितीन राऊत यांनी मालविका हिचा सत्कार केला होता, ती नेहमी राऊत साहेबांची आठवण काढते, तुमचे आशिर्वाद व शुभेच्छा माझ्या मुलीसोबत असू दया अशी प्रतिक्रिया मालविकाचे वडील डॉ. प्रबोध बनसोड यांनी यावेळी व्यक्त केली.

सेतू केंद्रावर अर्ज करा, पैसे ऑनलाईन खात्यात जमा होईल


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

नागपूर : कोरोना महामारीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या बाधिताच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये सानुग्रह निधी देण्याच्या शासनाच्या निर्णयाची आजपासून प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा व महानगरपालिका यंत्रणेला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी काल एका उच्चस्तरीय बैठकीत दिले. नागरिकांनी ऑनलाइन अर्ज करावे. ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांनी सेतू केंद्राची मदत घ्यावी, आपला अर्ज दाखल केल्यानंतर लगेच आपल्याला मदत मिळेल, अशी ग्वाही त्यांनी बैठकीनंतर दिली आहे.

कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या निकटतम नातेवाईकांना तातडीची मदत देण्यासाठी राज्य शासन सज्ज झाले असून आजपासून जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रावर हे अर्ज दाखल केले जातील. महानगरपालिका क्षेत्रातील नागरी सुविधा केंद्र .तसेच महानगरपालिकेच्या दहा झोनमध्ये विशेष केंद्र यासाठी उघडण्यात येणार आहे. झोनल ऑफिस मध्ये ही व्यवस्था केली जाणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सेतू केंद्रावर कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना सौजन्याने हे अर्ज भरून देण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. अतिशय सोपी माहिती अर्जात दयावी लागणार आहे.

जिल्हा व महानगर पालिका प्रशासनाकडे कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नोंदी आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांच्या नोंदी यापूर्वी झालेल्या आहेत त्यांना तातडीने राज्य शासनामार्फत मदत केली जाणार आहे. ज्यांच्या मृत्यू दाखल्यावर (डेड सर्टीफिकेटवर) डॉक्टरांनी कोविडमुळे मृत्यू लिहिले आहे.त्यांना देखील तातडीने मदत केली जाणार आहे.ज्यांच्या डेड सर्टिफिकेट व अन्य कागदपत्रांमध्ये काही समस्या आहेत या संदर्भात जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली असून ही समिती तातडीने याबाबत निर्णय घेईल, असे निर्देश आज विभागीय आयुक्तांनी दिले आहे. त्यामुळे ज्यांचे नाव यापूर्वीच कोरोना मुळे मृत्यू झाल्याच्या यादीत आहे त्यांनी केवळ सोपा फॉर्म भरणे आवश्यक आहे. त्यामध्ये आपला बँक अकाउंट व्यवस्थित नोंद केली की, राज्य शासनामार्फत त्यांच्या या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. ज्यांचे अर्ज अडचणीचे आहेत शासनाच्या अधिकृत यादीत नाव नाही व डॉक्टरचे सर्टिफिकेट नाही अशा काही अर्जाचा गुंता सोडविण्यासाठी तातडीने समिती तयार करण्यात आली असून उद्यापासून ही समिती देखील आपले काम बघणार आहे. त्यामुळे कोरोना मध्ये मृत्युमुखी पडलेल्या बाधित यांच्या नातेवाईकांना सानुग्रह मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यात काही असामाजिकतत्त्व असाह्य नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही मध्यस्थ एजंटच्या मागे न लागता थेट सेतू केंद्राला संपर्क साधावा. सर्व सेतू केंद्राच्या चालकांना कोरोना संदर्भातील अर्ज सौजन्याने भरण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच एजंट या ठिकाणी आल्यास त्याबाबत पोलिसांना अवगत करण्याचेही बजावण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही मध्यस्थांच्या मागे न लागता नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 बैठकीला विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी विमला आर, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रामजोशी, आरोग्य यंत्रणेतील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या संकेतस्थळावर अर्ज करा कोविड आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास ५० हजार रुपयांचे सहाय्य मिळणार असून त्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ई-अर्ज दाखल करता येईल. यासाठी राज्य शासनाने http://mahacovid19relief.in  (महाकोविड१९ रिलीफ डॉट इन) संकेतस्थळावर संबंधितांनी लॉगीन करून अर्ज करण्याचे आवाहन आहे.

1253 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

नागपूर : प्राणिजन्य आजारांमुळे भविष्यात कोविडसारखे संकट उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे आजार वेळेत रोखण्यासह त्यांचा मानवाला संसर्ग होवू नये, यासाठी पशुवैद्यकशास्त्रात संशोधनाला चालना देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा महाराष्ट्र पशु व मत्स्य व्यवसाय विद्यापीठाचे प्रतिकुलपती सुनील केदार यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र पशु व मत्स्य व्यवसाय विद्यापीठाचा दहावा पदवीदान समारंभ श्री. केदार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झाला. वैज्ञानिक व औद्योगिक विभागाचे सचिव तथा वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे दूरदृश्य प्रणालीद्वारे या समारंभात सहभागी झाले होते. कुलगुरू कर्नल डॉ. आशिष पातुरकर, कुलसचिव सचिन कलंत्रे, अधिष्ठाता डॉ. एस. व्ही. उपाध्ये, डॉ. पी. टी. जाधव, डॉ. वासनिक आदी यावेळी उपस्थित होते.

1253 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान: 

पदवीदान समारंभामध्ये 2018-19 व 2019-20 वर्षात पशुवैद्यक, मत्स्य विज्ञान तसेच दुग्ध तंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना, तसेच 2020-21 या सत्रातील मत्स्य विज्ञान व दुग्ध तंत्रज्ञान शाखेच्या एकूण 939 उमेदवारांना स्नातक, 275 उमेदवारांना स्नातकोत्तर आणि 39 उमेदवारांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. तसेच विशिष्ट गुणवत्तेसाठी 59 सुवर्ण, 15 रजत पदके आणि प्रत्येकी 25 हजार रुपयांची दोन पारितोषिके वितरीत करण्यात आली. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाची 2018-19 शैक्षणिक सत्रातील विद्यार्थिनी रितू पांघल हिने सात सुवर्ण आणि चार रजत पदके पटकाविली, तर मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयची विद्यार्थिनी नाम्बीर जासना सुरेश हिने 2019-20 वर्षामध्ये उत्तम गुणांकन प्राप्त करून पाच सुवर्ण पदके आणि एक रोख पारितोषिक पटकाविले.

नागपूरच्या याेग प्राणायाम शिबिराला चंद्रपूर जिल्ह्याच्या पदाधिका-यांची सदिच्छा भेट !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर : उपराजधानी नागपूर स्थित "प्रभात याेग प्राणायाम शिबीर"गोरखेडे काॅमप्लेक्स सीमीनरी हिल नागपूर येथे चंद्रपूर जिल्ह्याचे भारत स्वाभिमानचे अध्यक्ष विजय चंदावार, पतंजली योग समितीचे संघटन मंत्री शरदजी व्यास , पतंजली योग समितीचे उपप्रभारी रमेशजी ददगल तथा भारत स्वाभिमान चंद्रपूरचे कोषाध्यक्ष मुरलीधर शिरभय्ये यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.

या वेळी नित्य योग वर्ग मार्गदर्शिका, योग शिक्षिका तथा महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूर निवासी मायाताई कोसरे यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पाहुण्यांनी त्यांचे या नित्य चालणां-या निःशुल्क प्राणायाम वर्गाचे मुक्तकंठाने काैतुक करीत त्यांचे पुढील कार्याला शुभेच्छा प्रदान केल्या. या वेळी विनोद झुंगरे याेग साधिका पूनम काेसरे, स्मिता झुंगरे, सुशिलाताई झुंगरे, साधना गर्ग, सोनु भुक्ते उपस्थित होत्या.

चंद्रपूर जिल्ह्यातील सास्ती येथे या पुर्वी मायाताई काेसरे यांनी नित्य याेगा प्राणायाम वर्ग चालविले आहे. विशेषत: त्यांचे या वर्गाला महिला व तरुणींचा उत्तम प्रतिसाद मिळताेयं! सहजं सुचलंच्या वाटचालीतही त्यांचा सिंहाचा वाटा आहे.