Showing posts with label महागांव. Show all posts
Showing posts with label महागांव. Show all posts

रेतीचे भरधाव ट्रॅक्टर अंगावर चालविण्याचा प्रयत्न , पाेलिस स्टेशनला रिपोर्ट दाखल


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 

महागांव : तालुक्यात काही रेती घाटाचा लिलाव झाला नसल्यामुळे रेती तस्करांनी (वाहन व्दारे) दिवस रात्र अवैध रित्या रेती नेण्याचा सपाटा लावला आहे.

अश्यातच वराेडी मार्गावर उभ्या असणा-या अनिल माराेती अडकीने यांचे वर एका वाहन चालकाने काही कारण नसतांना भरधाव अवैध रेती वाहन नेण्याचा प्रयत्न केला. एव्हढेच नाही तर त्या चालकाने अडकीने यांस जिवानिशी मारण्याची धमकी सुध्दा दिली.या बाबतीत अनिल अाडकीने यांनी महागांव पाेलिस स्टेशनला दि.२६फेब्रुवारीला रितसर तक्रार दाखल केली आहे. वराेडी येथील रेती घाटाचा अद्याप लिलाव झाला नसुन रेती तस्कर सर्रासपणे दिवसाढवळ्या या ठिकाणाहुन रेती नेत असल्याची जनतेत आेरड आहे.यास गांव पातळीवरील तलाठ्याचा रेती तस्करांना आशीर्वाद असल्याचे खुलेआम बाेलल्या जाते.

महागाव पाेलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचा-यांनी या घटनेतील मुजाेर व हेकेखाेर वाहन चालकावर गुन्हा दाखल करुन त्याचेवर याेग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी अनिल अडकीने यांनी केली आहे .तदवतचं महागांव महसुल प्रशासनाने अश्या रेती तस्करांच्या मुसक्या आवळून त्यांना वेळीच याेग्य धडा शिकवावा अशी वराेडी ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे.

जन्मांध मायासाठी सरसावले मदतीचे हात (जीवनावश्यक वस्तु सह केली आर्थिक मदत)

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 

महागाव : जन्मताच आलेले अंधत्व त्यात पाच वर्षांची असतांना आईचा मृत्यु झाल्यानंतर वडीलच तिच्यासाठी सर्वस्व बनले वडिलांची ही मुलीच्या पालनपोषणाची धडपड बघुन समाजमन गहिवरून आले व मदतीसाठी सरसावले.

हदगाव तालुक्यातील हरडफ येथील वाठोरे दाम्पत्याला माया नावाची मुलगी झाली परंतु ती जन्मांध असल्याने या दाम्पत्याने तिचा सांभाळ करण्याची भीष्म प्रतिज्ञा घेतली .सर्व सुरळीतच चालु असतांना अचानक आजारपणाने आईचा मृत्यु झाला आता मायाच्या पालनाची सर्वस्वी जबाबदारी वडील भिमराव वाठोरे यांच्यावर आली मोलमजुरी करून ते आपल्या मुलीचा सांभाळ करीत आहेत.

गावात काम मिळत नसल्याने त्यांनी गावातील नागरिकांसह ऊसतोडी साठी जाण्याचा मार्ग निवडला व ते मायाचे सर्व दैनंदिन कामे आटोपुन ऊस तोडण्यासाठी जात अशातच ही ऊसतोड करणारी मजुरांची टोळी महागाव तालुक्यातील कासारबेहळ येथे आली असतांना नंदकुमार मस्के यांना याबाबत कळाले अंध मुलीसाठी पित्याची धडपड पाहुन त्यांनी ही गोष्ट माजी पंचायत समिती सदस्य संदीप ठाकरे, मोहनराव कर्हे, टेंभी चे सरपंच अमोल चिकणे, यांना सांगितली त्यांनी व गावकऱ्यांनी आपल्या मानवता धर्माची जाण ठेवुन अंध मायाला आर्थिक व जीवनावश्यक वस्तुची मदत करून तिला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी नंदकुमार मस्के,अवधुत पंडागळे, संजय पावडे,सुधाकर चिकने, सचिव आशिष देशमुख, साहेबराव राठोड यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

रेतीसह ट्रॅक्टर जप्त : करंजखेड रोडवर कारवाई

                        (File photo)

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के

महागांव : अवैध उत्खानन करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पोलिसांनी पकडून जप्त केले.
ही कारवाई करंजखेड रोडवर करण्यात आली. एम एच २९ ए के. ३०६८ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने एक ब्रास रेतीची चोरटी वाहतूक करण्यात येत होती. पोलिसांनी ट्रॅक्टर अडवून चौकशी केली असता अनधिकृतपणे वाहतूक होत असल्याचे लक्षात आले.
त्यामुळे ट्रॅक्टर आणि रेती असा एकूण सहा लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस कर्मचारी जाधव यांच्या तक्रारीवरून महागांव पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करून अधिक तपास सुरु केला आहे.

महागांव : नगरपंचायत आरक्षण सोडत जाहीर


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 

महागाव : येथील नगरपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण दि.१२ नोव्हेंबर रोजी जाहिर करण्यात आले. यामध्ये ९ प्रभाग विविध प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे.

प्राधिकृत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी आरक्षण व सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले त्यात प्रभाग क्र. १,१३,१४ आणि १५. येथील जागा सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे. नागरिकांसाठी प्रभाग क्र २.३ आरक्षित झाले. अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी प्रभाग क्रमांक ४ तर अनुसूचित जातीच्या महिलांसाठी प्रभाग क्र. ६.१० राखीव आहे.

प्रभाग क्र.५,८,९,१२,१६ सर्वसाधारण असुन प्रभाग क्रमांक ७,११ नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तर प्रभाग क्रमांक १७ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. १७ पैकी ९ प्रभाग क्र. मध्ये महिलांसाठी आरक्षित झाले आहे.
वरील प्रमाणे सर्व उपस्थितासमोर आरक्षण सोडतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. 

महागावात एकाच रात्री पाच घरे फोडली

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के

महागांव : सरकारी कर्मचारी दिवाळीत बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी शहरात एकाच रात्री तब्बल पाच घरफोड्या केल्या. आमणी (खुर्द) रस्त्यावरील संभाजी ले आऊट मध्ये चार ठिकाणी घरफोड्या करून मुद्देमाल लंपास केला; तर बाजूलाच आमणी (बु.) रस्त्यावरील गिरीजानगर येथे एका ठिकाणी घरफोडी करण्यात आली.

रुपेश देशमुख यांच्या फ्लॅट मध्ये मारोतराव तमन्ना हे शिक्षक भाड्याने राहतात. बाजूलाच सतीश चौधरी यांचे घर असून, शिक्षक दत्तात्रय जंगमवाड तेथे भाड्याने राहतात. दिवाळीत हे कुटुंब मुळगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी डल्ला मारला. चांदीचे दिवे, चिल्लर नाणी व काही रक्कम चोरट्यांनी पळवली.

गिरीजानगरमधील अवधूत साबळे हे शिक्षक दिवाळी सणाला वडद या मुळगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांचे घर फोडून दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पळविले. दत्तराव काळसरे यांच्या घरी स्टेट बँके चे कर्मचारी आगम भाड्याने राहतात. त्यांचेही घर चोरट्यांनी फोडले. पाच ठिकाणी घरफोड्या करून चोरट्यांनी दोन लाखांच्या वर ऐवज लंपास केला. या संदर्भात अवधूत साबळे यांनी महागांव पोलिसांत तक्रार दाखल केली.

संत नगरी शेगाव येथे 7 ला महाअधिवेशन


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 

महागांव : आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने आदिवासी कोळी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा व त्यांना न्याय हक्क मिळावा या संदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी राज्यातील एक कोटी तीस लाख आदिवासी जमातींच्या विकासासाठी माजी कॅबिनेट मंत्री तथा आदिवासी लोक नेते डॉ दशरथजी भांडे साहेब यांच्या अध्यक्षते खाली दिनांक ७/ ११/ २०२१ रविवार रोजी संत नगरी शेगाव जिल्हा बुलढाणा येथे राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला यवतमाळ जिल्ह्यातील सर्व कोळी समाज बांधवाना उपस्थित राहण्याचे जिल्हा अध्यक्ष अशोक तुमवार यांनी जाहीर आवाहन केले. 

दीपोत्सव 2021: शुभेच्छा संदेश

              "दीपोत्सव 2021"

सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त सर्व नागरिकांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जावो हीच मनोकामना…!
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
             
~शुभेच्छुक :
• गायत्री शिंदे (सरपंच)
• प्रमोद आडकीने उपसरपंच
तथा शेतकरी संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष
• सचिव गाडेकर साहेब, ग्रामपंचायत वरोडी 

~पैनल प्रमुख
रामहारी पाटील आडकीने

दीपोत्सव 2021: शुभेच्छा संदेश

 

                  "दीपोत्सव 2021"

"उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..

"चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती,
थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती

अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा"


सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त सर्व नागरिकांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जावो हीच मनोकामना…!
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

~ शुभेच्छुक : सौ सुलोचना शरद राठोड (सरपंच)
                श्री विष्णू दादाराव जाधव (उपसरपंच)
                श्री दयानंद दोडके (ग्रामसेवक)

व समस्त सदस्य गण कासारबेहळ-सेवानगर ग्रामपंचायत 

दीपावली 2021: शुभेच्छा संदेश


"दीपोत्सव 2021"

सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त सर्व नागरिकांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जावो हीच मनोकामना…!
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
             
~ श्री झारेवाड साहेब
कृषी सहाय्यक महागांव 

दीपावली 2021: शुभेच्छा संदेश


"दीपोत्सव 2021"

सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त सर्व नागरिकांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जावो हीच मनोकामना…!
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
             
श्री नंदकुमार मस्के आणि परिवार

उपसरपंचाने केले स्वखर्चाने रस्त्यावरील पाण्याचे व्यवस्थापन


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
महागाव : तिवरंग येथे वार्ड क्र.२ मधील मस्जिद व पोचमाय मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सांडपाणी साचुन चिखलाचे साम्राज्य पसरले होते .कार्तिक महिन्यात काकडा निघत असुन दिंडीच्या मार्गामध्ये व मस्जिदमध्ये जाण्यास अडचण निर्माण होत असल्याने रहिवाशांनी ग्राम पंचायत प्रशासनाकडे या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी केली परंतु सामान्य फंडात पैसे नसल्याने व १५ व्या वित्त आयोगात सचिव साहेबांनी कसलेही आराखडा (इस्टीमेट) बनवण्यात न आल्याने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवुन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, उपसरपंच गुणवंत राठोड यांनी स्वखर्चाने मजुर लावुन या सांडपाण्याची विल्हेवाट लावली.

यावेळी ग्रा.प.सदस्य इरफान चव्हाण, संदिप मदने, संजय नांनोर, सुनिल तायडे, अजय आडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. उपसरपंच गुणवंत राठोड यांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेचे गावकरी कौतुक करीत असून, त्यांचे आभार मानत आहेत.

युवासेनाचे महागाव येथे पेट्रोल,डिझेल दरवाढी विरोधात सायकल चालवुन आंदोलन

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव : युवा सेना प्रमुख मा.श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार तथा युवासेना सचिव श्री.वरुन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ विस्तारक श्री.दिलीप घुगे
 युवासेना जिल्हा प्रमुख विशाल पांडे यांच्या उपस्थितीत युवासेना महागाव तालुका यांच्या पुढाकाराने महागाव येथे केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल चालवुन हाताला काळ्या फित्या बांधुन काळे झेंडे दाखवुन आंदोलन करण्यात आले.
या वेळी युवासेना जिल्हा प्रमूख म्हणाले की, आधीच महागाई ने कळस गाठला असुन सामान्य जनता त्रस्त असताना केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल, इंधन दरवाढ करतच असल्याने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सामान्य जनता केंद्रातील महागाई फेम सरकार ला धडा शिकलव्याशिवाय राहणार नाही असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी युवा जिल्हा प्रमूख विशाल पांडे, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद उर्फ शाखा भरवाडे, युवासेना तालुका प्रमुख, उप.सभापती, राम तंबाके, शिवसेना शहर प्रमूख राजू राठोड, शिवसेना प्रसिद्धि प्रमुख सुमित गोविंदवाड, युवासेना शहर प्रमूख, ओम कसुमवार, शॅम कदम, ऋषिकेष बलखंडे, देशमुख, गजानन शिंदे, ऋषी दातकर, गणेश कदम, आशितोष कदम, सुमित लोंबडे, किरण कदम, लक्ष्मीकांत घाटोळे, सारंग पिसाळ, प्रविण कोकरे, यांच्यासह शेकडो शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.

ग्रामपंचायत कासारबेहळ येथे पहिली ग्रामसभा पार पडली


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
महागांव : दि.३१ ऑक्टो. २०२१ रोजी कासारबेहळ ग्रामपंचायत येथे ग्रामसभा घेण्यात आले आली. कोविड कालावधीत सर्व सभा ठप्प पडल्या होत्या, परिणामी अनेक प्रश्न, समस्या व कामं रखडली होती. कोरोनामुळे या दोन वर्षाच्या काळात एकही सभा घेता आली नाही. मात्र, हळूहळू सर्व पूर्वपदावर परिस्थिती येत असतांना पाहून कासारबेहळ येथे आज रोजी पहिली ग्रामसभा पार पडली. यासभे मध्ये तंटामुक्त अध्यक्ष पदी फेर निवड दशरथ राठोड यांची करण्यात आली आहे. उपस्थितांनी राठोड यांचे पुषगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


या ग्राम सभेमध्ये समाजसेवक नंदकुमार मस्के यांनी काही विशेष मुद्दे मांडले ते पुढील प्रमाणे :
• रोजगार सेवक यांचे कोरोना काळात केलेल्या कामाचं मानधन देण्यात यावे.

• सार्वजनिक शौचालय च्या बाजूची उर्वरित मोकळी जागा, त्या जागेवर महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाकरीता जागा उपलब्ध करून द्यावी.

• सिंचन विभागाचा क्र.1 व क्र 2 येथील ज्या संस्थेला सिंचन विभागाने मच्छी व्यवसायासाठी तलाव देण्यात आले त्या संस्थेला लेखी स्वरूपात पत्र देऊन त्या मच्छी चे सध्याचे दर स्थानिकांना दर 200 रु. किलोने मिळत असल्यामुळे ते 120 रु. किलो करण्यात यावे.

• संबंधित (पं.स) विभागाने ग्रामपंचायत चे सन 2014 -15 मध्ये दिलेले गाव नमुना आठ कॉन्ट्रॅक्ट कोणत्याही शेजार्यांना विश्वासात न घेता, पाचशे ते हजार रुपये घेऊन ग्रामपंचायत ची खुली जागा व ग्राम रोड पैसे देऊन वाढविण्यात आले तरी, ग्रामपंचायत ने आजूबाजूच्या लोकांना विश्वासात घेऊन परत नमुना आठ तयार करण्यात यावा.

• गावठाणा येथील मोजमाप करून संबंधित लाभार्थ्यांना गाव नमुना आठ देण्यात यावा.

• सध्या वातावरणात बदल होत असल्यामुळे साथीच्या रोगाचे थैमान असून आरोग्य सेवकांनी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करावी, असे काही मुद्दे मांडण्यात आले. या गंभीर विषयाकडे सदर ग्रामपंचायत जातीने लक्ष देते किंवा नाही याकडे कासारबेहाळ व सेवानगर येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दशरथ राठोड यांची निवड :
या ग्राम सभे मध्ये दशरथ थावरा राठोड यांची फेरनिवड सर्वानुमते सलग तीन वेळा निवड करण्यात आली. तसेच या निवडी मध्ये नवनिर्वाचित लोळबा पाटील यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या निवडीचे श्रेय तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ राठोड यांच्या समवेत सर्व गावाकऱ्यांना देण्यात आले.

यावेळी सरपंच सुलोचना शरद राठोड, उपसरपंच विष्णू जाधव, ग्राम. सदस्य तथा माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव करे, ग्राम.सदस्य अर्चना जाधव, ग्राम.सदस्य आश्विनी राठोड, ग्राम.सदस्य कांताबाई पाटे, माजी सरपंच अशोक तुमवार, माजी सरपंच ताराचंद चव्हाण, दिपक करे, सचिव दोडके साहेब, नायक साहेबराव राठोड (सेवानगर), एम डी राठोड, सचिन जाधव, पोलीस पाटील अशोक करे, रामेश्वर पाटील (सेवानगर पो.पा.), निरंजन कवाने, छत्रु ठाकरे, लोडबा पाटे, राजु पाटे, सदानंद जाधव, कृष्णा कवाने सह ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप पिटलेवाड व रोजगार सेवक गाजुसिंग राठोड व सर्व गावकरी उपस्थित होते.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस व सामाजिक न्याय विभाग सेल च्या वतीने सत्कार

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (३० ऑक्टो.) : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुका सचिव व काळी दौ च्या माजी सरपंच सौ साधनाताई आळणे यांची भाची कु. दिक्षा अरुण भवरे (मोहदी) हिने युपीएससी (UPSC) परीक्षेत राज्यात (STATE) दुसरा क्रमांक घेऊन यश संपादन केल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग सेलच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आझाद पटेल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वहाब भाई, अनिल चवरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हंसराज मोरे, सामाजिक न्याय विभाग सेल चे तालुकाध्यक्ष उज्वल रणविर, शरद काळे, राजू राठोड, विश्वपाल ढोबळे, आदिंची प्रमुख्याने उपस्थित होते. सदर छोटेखानी कार्यक्रम अशोक आळणे यांच्या निवास्थानी कार्यक्रम संपन्न झाला.

अतिवृष्टीचे पैसे नाही, विमा कंपनीचे हात वर, महावितरणचा कनेक्शन तोडण्यावर भर, व्यापाऱ्यांची लुटमार वरून नैसर्गिक संकटांचा भार, सांगा शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (२७ ऑक्टो ल.) : "अतिवृष्टीचे पैसे नाही, विमा कंपनीचे हात वर, महावितरणचा कनेक्शन तोडण्यावर भर, व्यापाऱ्यांची लुटमार वरून नैसर्गिक संकटांचा भार, सांगा शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं" 
नैसर्गिक संकटामुळे अगोदरच आर्थिक कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना या वर्षी पुन्हा निसर्गाने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे मरण दारात असताना शासनाचे हसू गालात अशी परिस्थिती दिसून येत आहे यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही, विमा कंपनीने हात वर केलेत, विद्युत बिल न भरल्यामुळे महावितरणचा कनेक्शन तोडण्यावर भर आणि जे काही पिकले त्याला योग्य भाव नसल्याने व्यापाऱ्यांची लुटमार यासह नैसर्गिक संकटांचा भार अशा अवस्थेत शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं असा प्रश्न पडला आहे.

 यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व ईसापुर धरण प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील नदी-नाल्या काठावरची हातातोंडाशी आलेली पिके नेस्तनाबूत झालीत अशा परिस्थितीमध्ये शासनाकडून आज पर्यंत कुठलीच मदत मिळाली नाही असे असताना विमा कंपनी शेतकऱ्याकडे पाहत नसतांना महावितरण कंपनी रब्बी पिकासाठी लागणारी विज रब्बी पिकाच्या लागवडीच्या तोंडावर तोडण्याचा कार्यक्रम चालू केला असताना व्यापार्‍या कडूनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट होत आहे. अशावेळी आम्ही कोणाकडे जावे अशी आर्त हाक तालुक्यातील शेतकरी शासनाकडे करत आहे.

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तुर, ऊस इत्यादी सर्व पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासन स्तरावर जिल्हयाची आणेवारी मात्र साठ पैशाच्यावर दाखवण्यात आली असल्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय अनुदान व पिक विमा मिळण्याची सुतराम शक्यता नाही. अशावेळी शासकीय व्यवस्थेवर दबाव टाकण्याची जबाबदारी ही राजकीय नेत्यांची असते परंतु त्यांना शेतकऱ्यांबद्दल पुतना मावशी चे प्रेम फक्त निवडणुकीच्या वेळी दिसते त्यामुळे शेतकरी अधिक आर्थिक संकटामध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी खरीप हंगामामध्ये खतांचे व बियाण्याचे भाव गगनाला भिडले होते. मधल्या काळामध्ये सोयाबीनचा भाव दहा हजाराच्या पलीकडे पोचला होता परंतु शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे व्यापाऱ्यांचे फावले असून आज सोयाबीनचा भाव 5000 च्या भोवती फिरत आहे. अशा परिस्थितीमध्ये लागवडी साठी लागणारा खर्च नीघण्याची शक्यता नाही पिक विमा कंपन्या गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना लुटून आपले उखळ पांढरे करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये राजकीय नेत्यांकडून दबाव आणण्याची जबाबदारी असताना ते कुठलेही पाऊल उचलायला तयार नाहीत.

ईसापुर धरण प्रशासनाबाबत अनेक तक्रारी असून सुद्धा त्यांच्यावर कुठलीच कार्यवाही होत नाही. ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी वरून पाऊस असतांना सुद्धा धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे नदी नाल्याकाठची सोयाबीनची पिके अक्षरशः नदीपात्रात वाहून गेली असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पहावयास मिळाले. आता शासन शेतकऱ्याच्या मृत्यू सर्वांनी मिळून केल्यामुळे कसा होतो हे सोशल मीडियावर पाहण्याची ची वाट पाहत आहे का? असा प्रश्न निर्माण केला जात असून, महावितरण कंपनीकडून शेतीचे वीज तोडणी त्वरित थांबवावी असा आग्रह शेतकरी करीत आहे.

मोहदी येथे बौध्द विहारात संविधान वाचन समारोह व सत्कार समारंभ संपन्न


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (२६ ऑक्टो.) : तालुक्यातील मोहदी येथील बौद्ध विहारात संविधान समारोहा सोबत सत्कार समारंभ करण्यात आला. 
भारतीय संविधानाची जनतेला माहिती व्हावी या हेतूने प्रजापती महिला मंडळ मोहदी, पंचशील नवयुवक मंडळ मोहदी च्या वतीने बुध्द विहारात संविधान समारोहा सोबतच सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विजयराव खडसे, सत्कार मुर्ती म्हणून अॅड आप्पाराव मैंद होते.

प्रमुख अतिथी महेन्द्र कावळे, प्रकाश गायकवाड, मिलींद मानकर, वर्षाताई नाना भवरे, दादारावजी जाधव, तातेरावजी मानकर, टि. वी कांनदे, गोवर्धन मोहिते, पुंडलिक भगत, कृष्णाजी मुनेश्वर, सागर दादा पाईकराव, अंकुश कावळे इ. मान्यवर उपस्थित होते. 

प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प पुजन व धुप पुजन प्रथम विजयरावजी खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भिमराव भवरे यांनी भारतीय संविधान प्रार्थना व राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाला सुरुवात केली.

या वेळी गोवर्धन मोहिते, महेंद्र कावळे, तातेराव मानकर, विजयराव खडसे, प्रकाश गायकवाड इ. अनेक मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी मिलींद भगत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीकरीता मोहदी येथील प्रजापती महिला मंडळ, पंचशील नवयुवक मंडळ व गावातील जेष्ठ मंडळी यांनी अथक परीश्रम घेतले.

दुचाकीची आमने -सामने धडक, ३ गंभीर जखमी


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागाव, (२६ ऑक्टो.) : भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी तर एक जण किरकोळ जखमी झाला असल्याची घटना २५ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता दरम्यान, कासारबेहळ गावालगत घडली.

महागाव तालुक्यातील वाकान येथील आकाश साहेबराव राठोड (२२), सचिन आडे (१९) हे दोघे आपल्या दुचाकी क्र.एम एच १२ बी क्यु ६८९४ या क्रमांकाच्या दुचाकी ने हिवरा मार्गे टेंभीकडे ऊस तोडण्याच्या कामासाठी निघाले असतांना कासारबेहळ गावानजीक त्यांचे दुचाकी वरील नियंत्रण सुटुन समोरून येणाऱ्या डिस्कव्हर दुचाकी क्र.एम एच २९ एपी ४५४० ला बेधडक जोरदार धडक दिली. यामध्ये दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चकणाचूर झाला असुन, घटनास्थळी रक्त बंबाड वातावरण होते.

या भीषण अपघातात आकाश राठोड, दत्ता बिरंगणे (४५) रा.कासारबेहळ व पांडुरंग सुभाष ढोणे (२५) रा. कुंभारी ता.पुसद हे गंभीर जखमी झाले आहेत तर, सचिन आडे रा. वाकान हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती असुन, कासारबेहळ येथील पोलीस पाटील रामेश्वर राठोड यां विठ्ठल करे यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने अपघातात झालेल्या जखमींना माहुर येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने अपघातग्रसताना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आले. परंतु आकाश राठोड व दत्ता बिरंगणे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारास नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

तालुक्यातील नदी नाल्याचा साठ्यावर रेती तस्करांच्या कडव्या नजरा


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (२६ ऑक्टो.) : महागांव तालुक्यात पंधरा ते वीस दिवस सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी व नाले तुडुंब भरुन गेले त्यात रेती माफियांने अवैध रेतीचा उपसा केलेल्या ठिकाणी आडमाप रेती साठा जमा झाला असून पाण्याचा सतचा प्रवाह चालु असल्याने रेती माफिया अडगळीस आलेले दिसुन येत आहेत तर पाणी कमी होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. या करीता नित्यनियम नदी नाल्याला हजेरी लावत आहेत. अवैध रेती वाहतुक होत असताना संबंधित प्रशासन दक्ष राहील काय? आणि या रेती माफियांवर कार्यवाई होईल काय? अशी जनमानसात चर्चा सुरु असुन रेती माफीयावर खरंच प्रतिबंध प्रशासन करेल का? 
रेती अभावी शहरात अनेक मोठमोठी बंधकामे रखडली असुन रेती माफियांना रेती साठी मागणी करीत आहे. नदी ला पाणी असल्याचे कारणे दाखवून चोरटी रेती वाहतूक बंद असल्याचे बांधकाम कर्त्यास कळविल्या जात असून, रेतीचे भाव गगनाला भिडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 
या विषयी संबंधित प्रशासनाने जातीने लक्ष घालण्याची आज काळाची गरज निर्माण होत आहे.

कापूस वेचण्यासाठी गेलेल्या युवतीवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (२५ ऑक्टो.) : महागांव तालुक्यातील करंजखेड शिवारात बिबट्याने येथीलच युवती नामे  वृषाली निळकंठ ठाकरे (१८) हिच्या वर हल्ला  केला. या हल्यात युवती गंभीर जखमी झाल्याचे समजते. ही घटना ११ च्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार युवती गावातील महिला सोबत आपल्या शेतामध्ये कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती. अशातच नाल्याच्या बाजुस असलेल्या विहिरीचे पाणी आणण्यासाठी युवती गेली असता, आधीच दबा धरून बसलेल्या बिबट्याने वृषालीवर अचानक अंगावर हल्ला केला. युवतीने आपला जिव वाचवण्यासाठी हातात असलेल्या गुंडाने बिबट्यावर वार केला असता, बिबट्या मागे सरकला आणि तिच्या वर एकदम हल्ला चढवला केला. दरम्यान, मुलीने बिबट्याला गुंड फेकुन मारल्याने बिथरलेल्या बिबट्याने मुलीस जखडून धरले असतांना युवतीने जोरजोरात आरडाओरड केल्या नंतर शेतातील मंजुरांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. लोकांचा कल्ला ऐकूण बिबट्या घटनास्थळावरून पळाला. मात्र, मुलीने प्रसंगावधान दाखवत आरडाओरडा केल्याने वेळीच मंजुर धावून आले. त्यामुळे बिबट्याचा जबड्यातुन युवतीची सुटका झाली. 

"या घटनेच्या अगोदर एका म्हशी च्या वासरावर या बिबट्याने हल्ला करुन जिवे मारण्याची घटना घडली होती. त्याचा पंचनामा होत असतांना हि दुसरी घटना घडली असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते."

बिबट्याने युवतीला जखमी केले असता जखमी
अवस्थेत मुलीला शेतात कामाला असलेल्या मंजुराने गावातील नागरिकांना कळविण्यात आले. जखमी अवस्थेत प्रविण ठाकरे, संदिप ठाकरे यांनी तातडीने  उपचारासाठी सवना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. बिबट्याच्या हल्यात जखमी झालेल्या युवतीचे लचके तोंडल्याने शिवाय करंजखेड परीसरात एकाच दिवशी दोन घटना घडल्याने परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे. हजारो संख्येची लोकवस्ती असुन या वस्तीला लागूनच डोंगराळ भाग असून या बिबट्याच्या हल्लाने येथील नागरिक दहशतीखाली आले आहेत.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वन अधिकारी उबाळे यांची टीम घटनास्थळी दाखल होऊन परीस्थिती चा आढावा घेत, येथील नागरिकांना व शेतमंजुराना शेतात न जाता आपापल्या घरी थाबण्याचे सांगितले.
करंजखेड परीसरात बिबट्याने दहशत निर्माण केली असून वनविभागाने या बिबट्याच्या बंदोबस्त करून जखमी मुलीला वन विभागाने मदत करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

संतापलेल्या घरकुल लाभार्थ्यांने पंचायत समिती कार्यालय पेटविण्याचा केला प्रयत्न


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागाव, (२४ ऑक्टो.) : महागाव पंचायत समीती कडुन सतत होत असलेली अवहेलना आणि घरकुल  योजनेचा लाभ  मिळत नसल्याने एका हाताने अपंग असलेल्या पिडीत लाभार्थी दीपक यादवराव पिसाळ  याने चक्क पेट्रोल टाकुण कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न केला .परंतु कर्तव्यावर असलेले शिपायी संजय कदम व इलेट्रीक फीटींग करणाऱ्या  कामगारांनी त्या माथेफेरूला पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळला . 

दगडथर येथील दिपक पीसाळ हे एका हाताने अपंग असुन त्यानी घरकुल, शौचालयासाठी पंचायत समितकडे अर्ज दाखल केला. परंतु पंचायत समिती कडुन कुठलाही शासकीय लाभ मिळत नसल्याने संतापलेल्या लाभार्थ्यांने चक्क! अर्धा लिटर पेट्रोल घेऊन पंचायत समितीच्या कार्यालयात प्रवेश केला. आणि कार्यालयातील कॉम्प्युटर, टेबल आणि लाकडी आलमारीवर पेट्रोल ओतले. माचीस घेऊन पेटवित असतांना उपस्थित असलेल्या शिपायी व कामगारांनी त्याला पकडले आणि मोठा अनर्थ टळला. घटनेची माहीती मिळताच महागाव पोलीस घटना स्थळी दाखल झाले व संबधीत माथेफीरूला ताब्यात घेऊन अटक केली.

या घटनेची माहीती मिळताच गटविकास अधिकारी गौतम ठाकुर यांनी कार्यालयाला भेट देऊन आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला . 




"गेल्या अनेक वर्षापासुन मी घरकुल व शौचालय करीता वारंवार मागणी केली. अर्जही दाखल केले. आमदार, खासदार, जि.प सदस्य, सरपंच यांना भेटुन आपबीती सागीतली .व घरकुल देण्याची मागणी केली .परंतु प्रत्येक ठीकाणा वरून नकार भेटला.एका इसमाने सांगीतले की तु पेट्रोल घेऊन पंचायत समित कार्यालयात जाऊन कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न कर तेंव्हा तुला घरकुल भेटेल त्या सांगण्यावरून मी हे केले. अशी माहीती खुद्द दिपक पीसाळ यांनी पोलिसांना सांगीतले. पोलीस त्या इसमाचा शोध घेत आहे."