Showing posts with label वर्धा. Show all posts
Showing posts with label वर्धा. Show all posts

निष्काळजी तलाठ्याकडून निराधारांची हेळसांड थांबवा - मंगलाताई ठक यांची मागणी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

हिंगणघाट : शासनाच्या निराधारने जेष्ठ नागरिकांना जगण्याची उमीद असून म्हाताऱ्या वयात एक आधारवड आहे. कमवणारी, मिरवणारी पोरं आपल्या आईवडिलांना मारझोड करतात ह्या धाकाने कित्येकांनी आपलं घर दार सोडून कुठेतरी एका कोपऱ्यात जगणं पसंत केले. मात्र, त्याही जगण्याला आधार असेल तर एकमेव शासनाचा मिळणारा "निराधार". परंतु काही तलाठी म्हाताऱ्यांना बोलावून आपण स्वतः मात्र, कार्यालयाला किंबहुना बोलावलेल्या ठिकाणी गैरहजर राहत असल्याने अनेकांना निराधारापासून मुकावे लागेल की काय? असा सवाल जेष्ठ नागरिक निराधार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मंगलाताई ठक यांनी उपस्थित केला आहे.

आज दुपारी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात निराधारांना हयातीचे प्रमाणपत्र सोबतच 21 हजार रुपयाचा उत्पन्नाचा दाखला हा निराधारांना वेळेवर मिळत नसल्याने त्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या पटवाऱ्यांनची हकालपट्टी करून प्रामाणिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून भर उन्हात  होणारी निराधारांची हेळसांड थांबवावी व शासन नियमावली वेळेतच प्रमाणपत्र दाखले लाभार्थ्यांना द्यावे, ज्यामुळे त्यांची परवड होणार नाही अशी मागणी दिलेल्या निवेदनातून लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे. तसेच जर एखाद्या अधिकाऱ्याच्या हातून निराधारांचा महिना बंद पडला तर त्या बेजबाबदार अधिकाऱ्याकडून निराधार वसुल करावी असा इशाराही यावेळी देण्यात आला. 

निवेदन देताना तालुक्यातील असंख्य जेष्ठ नागरिक महिला यावेळी उपस्थित होत्या. 



 

मोहता मिल कामगार साखळी उपोषण व उपजिल्हा रुग्णालय मागील झोपडपट्टी उपोषणास मंगलाताई ठक यांनी दिली भेट


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

हिंगणघाट : गेल्या 3 महिन्यापासून तहसील कार्यालया समोर येथील मोहता मिल कामगारांचे साखळी उपोषण सुरू आहे. मात्र, अजूनही त्यांना न्याय मिळाला नसल्याने आज सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई ठक यांनी भेट देऊन आपले आंदोलनास समर्थन असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे.

मागील 7 मे 2021 पासून मोहता मिल वीणा परवानगीने बंद करून ठेवण्यात आली आहे, व कामगारांचे पगारही अजुन पर्यंत दिल्या गेले नाही. त्यामुळे कामगारांना व त्यांच्या परिवारावर उपासमारी ची वेळ आली आहे. हाताला काम नसल्याने आर्थिक चनचन भासत असल्याने त्यांच्या जगण्याच्या मोठा प्रश्न निर्माण झाल्याने संतापलेल्या मोहता मिल कामगारांनी तहसील कार्यालयासमोर अखेर साखळी उपोषणाला बसले आहे.
कामगारांचे दैनंदिन जीवन चव्हाट्यावर आल्याने मंगला ठक यांनी उपोषणास बसलेल्या कामगारांना भेट दिली. कामगारांशी संवाद साधला. 

तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमाघे झोपडपट्टी वसाहत असून प्रशासन त्यांना राहण्यासाठी वेगळी व्यवस्था न करता वारंवार नोटीस देवून येथील गोरगरीब लोकांना झोपडपट्टी उठविण्याची धमकी देत असून दबंगगिरी चालवली जात असून असा आरोप झोपडपट्टी वासियांनी केला आहे. मात्र, येथील लोकांची राहण्याची अवस्था फार बिकट असल्याने झोपडपट्टी हटवू नये या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर नागरिक उपोषणाला बसले आहे.
मंगलाताई ठक यांनी या दोन्ही आंदोलनाला आज भेट दिली असता उपोषण कर्त्यांनी त्यांना मदत्तीचा हात मागितला. यावेळी शक्य होईल तेवढे या गरजू लोकांच्या पाठीशी उभ राहून त्यांना मदत करणार असल्याचे मंगलाताई ठक यांनी सांगितले.

गोंडवाना गणतंत्र पार्टी वर्धा जिल्हा चा वायगाव "गोंड" च्या नावबदल निर्णयाला विरोध "राष्ट्रीय एकता च्या नावाखाली पहिला घाव या देशाच्या मुळवंशी गोंड समुदाय वर"- चंद्रशेखर मडावी (जिल्हाध्यक्ष.गों.ग.पा.)


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
वर्धा, (ता.२५) : महाराष्ट्र सरकारने ज्या गावांच्या,वस्त्यांच्या,रस्त्यांच्या नावाची ओळख जाती च्या आधारे आहे अश्या नावांना राष्ट्रीय एकता च्या दृष्टीने बदलण्याचा निर्णय घेतला आहे.त्या बाबत शासन निर्णय काढला असून त्या निर्णयाची अंमलबजावणी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (गोंड) या गावापासून होणार असल्याची माहिती वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली होती आणि त्याकरिता तात्काळ एक समिती गठीत करण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळाल्याने गोंडवाना गणतंत्र पार्टी वर्धा द्वारे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडावी यांच्या नेतृत्वात या शासन निर्णयानुसार गोंड या समूहवाचक नावाचा नाव बदलविण्याच्या शासन निर्णयाचा विरोध जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन च्या स्वरूपात केला.महाराष्ट्र शासनाने गोंड हे जातीवाचक नाव नसून समूहवाचक नाव आहे याचा अभ्यास करावा या देशाचा मुळवंशी म्हणून गोंड नावाला मान्यता आहे.गोंड जर जातिवाचक नाव असते तर "गोंडवाना एक्स्प्रेस, गोंडवाना युनिव्हर्सिटी" सारखी नावं राष्ट्रीय स्तरावर मान्य झाली असती का..? असा प्रश्न सुद्धा गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या वतीने निवेदनात विचारण्यात आला,सरकार आदिवासींची मूळ ओळख नष्ट करण्याचा मागे लागली असून गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा-वर्धा च्या वतीने या शासन निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला.
गोंड नावाने ओळख असलेल्या गावांच्या रस्त्यांच्या,वस्त्यांच्या नाव बदलविल्याने राष्ट्रीय एकता निर्माण होत असेल तर आडनाव चा उल्लेख असलेल्या गावांची सुद्धा नावे बदलविण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन त्यावर सर्वप्रथम अंमलबजावणी केली पाहिजे असे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना चंद्रशेखर मडावी यांनी चर्चेदरम्यान सुचवले.जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
शासनाने आदिवासींच्या सहनशीलता चा अंत बघू नये.शासनाने ईतर कोणाची नाव बदलवायची असल्यास खुशाल बदलवावी परंतु गोंड नाव असलेल्या किंवा आदिवासींची ओळख असलेल्या ईतर कोणत्याही नावाची बदल केल्यास जिल्हाभर "गोंडवाना गणतंत्र पार्टी" उग्र स्वरूप धारण करेल,असा इशारा गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या द्वारे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडावी यांनी दिला. यावेळी गों.ग.पा. चे किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष दमडुजी मडावी, वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष सचिन मसराम, सेलू तालुकाध्यक्ष अजित इरपाते, आदिवासी विकास परिषद युवाध्यक्ष सचिन नराते, रोशन चिकराम, शत्रुघ्न सडमाके, अमोल सडमाके, गजानन सडमाके, मंगेश मसराम, मनोज सिडाम, प्रवीण सराटे ईत्यादी उपस्थित होते.