Showing posts with label अमरावती. Show all posts
Showing posts with label अमरावती. Show all posts

मुलांची माहिती दडवणे सरपंचाला भोवले


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

अमरावती : सन‌ २०२२ मध्ये पार पडलेल्या खापरखेडा ग्रामपंचायत निवडणुकीत मुलांची माहिती दडवून निवडणूक लढवणे सरपंचाला भोवले असुन अप्पर जिल्हाधिकारी, अमरावती यांनी खापरखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच रामभाऊ सज्जुलाल पटेल यांस अपात्र घोषित केले आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार दोन पेक्षा अधिक मुले असलेल्या व्यक्तीला निवडणुकीत उभे राहता येत नाही. परंतु गंभेरी येथील रामभाऊ सज्जुलाल पटेल यांना चार मुले असतानाही सन २०२२ मध्ये ग्राम पंचायत खापरखेडा च्या सरपंच पदांची निवडणुक लढविली होती. या निवडणूकीत रामभाऊ सज्जुलाल पटेल यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना मुलांची माहिती दडवून आपले नामांकन दाखल केले होते व विजयी झाले होते. मुलांची माहिती दडवून सरपंच पदावर निवड झाल्याने खापरखेडा येथील किशोर रामकिशन जांभेकर यांनी ॲड निखिल भि. सायरे यांचेमार्फत अप्पर जिल्हाधिकारी अमरावती यांचेकडे सरपंच पदाचे अपात्रता प्रकरण दाखल केले होते. 

प्रस्तुत प्रकरणात अर्जदारातर्फे ॲड. सायरे यांनी दाखल केलेले पुरावे तसेच लेखी व तोंडी युक्तीवाद विचारात घेऊन अप्पर जिल्हाधिकारी अमरावती यांनी दिनांक २८/०८/२०२४ रोजीच्या आदेशानुसार किशोर जांभेकर यांचा अर्ज स्विकारुन रामभाऊ सज्जुलाल पटेल यांना ग्रामपंचायत खापरखेडा ता. धारणी जि. अमरावती येथील सरपंच पदाकरीता अपात्र घोषित केले आहे. 


अमरावती लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बळवंत वानखडे विजयी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

अमरावती : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत 07-अमरावती मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांनी हा निकाल जाहीर केला.

 उमेदवार श्री. वानखडे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी सामान्य निरीक्षक सी.जी. रजनीकांथांन तसेच मतमोजणी निरीक्षक अंजना पंडा उपस्थित होत्या.

उमेदवार निहाय एकूण मतदान याप्रमाणे : बळवंत बसवंत वानखडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 5 लक्ष 26 हजार 271, नवनीत रवि राणा (भारतीय जनता पार्टी) 5 लक्ष 6 हजार 540, दिनेश गणेशराव बुब (प्रहार जनशक्ती पक्ष) 85 हजार 300, आनंदराज यशवंत आंबेडकर(रिपब्लिकन सेना) 18 हजार 793, संजयकुमार फत्तेसींग गाडगे (बहुजन समाज पार्टी) 4 हजार 513, इंजी. अविनाश हरिषचंद्र धनवटे (पिपल पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक) 730, गणेश नानाजी रामटेके (अखिल भारतीय परीवार पार्टी) 629, गाजी सादोद्दीन जहीर अहमद (राष्ट्रीय ओलमा कौंसिल) 331, दिगांबर वामन भगत (नकी भारतीय एकता पार्टी) 762, नरेंद्र बाबुलाल कठाणे (देश जनहित पार्टी) 422, भाऊराव संपतराव वानखडे (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) 329, ॲड राजू मधुकरराव कलाने (बहुजन भारत पार्टी) 495, सुषमा गजानन अवचार (जय विदर्भ पार्टी) 659, अनिल ठवरे ऊर्फ अनिलकुमार नाग बौद्ध (अपक्ष) 1 हजार 206, अरुण यशवंतराव भगत (अपक्ष) 2 हजार 88, किशोर भीमराव लबडे (अपक्ष) 4 हजार 524, किशोर ज्ञानेश्वर तायडे (अपक्ष) 2 हजार 72, गौतम उर्फ अनंता रामदास इंगळे (अपक्ष) 1 हजार 570, तारा सुरेश वानखडे (अपक्ष) 527, प्रभाकर पांडुरंग भटकर (अपक्ष) 365, प्रमोद रामकृष्ण चौरपगार (अपक्ष) 1 हजार 307, ॲड. पृथ्वीसम्राट मुकिंदराव दीपवंश (अपक्ष) 337, भरत चंपतराव यांगड (अपक्ष) 441, मनोहर कृष्णाजी कुऱ्हाडे (अपक्ष) 871, मानकर ज्ञानेश्वर काशीराव (अपक्ष) 539, रवी गुणवंत वानखडे (अपक्ष) 288, राजू महोदवराव सोनोने (अपक्ष) 232, राजेश तुळशीराम खडे (अपक्ष) 239, वर्षा भगवंत भगत (अपक्ष) 443, श्रीकृष्ण सखाराम क्षीरसागर (अपक्ष) 510, सतीश यशवंतराव गेडाम (अपक्ष) 943, श्रीमती. सुमित्रा साहेबराव गायकवाड (अपक्ष) 2 हजार 690, सुरज धनराज नागदवने (अपक्ष) 1 हजार 818, सुरेश पुंडलीक मेश्राम (अपक्ष) 1 हजार 52, सोनाली संजय मेश्राम (अपक्ष) 272, संदीप बाबुलाल मेश्राम (अपक्ष) 257, हिमंत भीमराव ढोले (अपक्ष) 670, तर नोटा 2 हजार 544 असे एकूण 11 लक्ष 73 हजार 579 असे वैध मते ठरले. तसेच अवैध मते 1 हजार 200 तर टेंडर मते 59 होते.

          या मतदार संघासाठी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल रोजी मतदान झाले. मतमोजणी लोकशाही भवन, अमरावती येथे आज सकाळी 8 वाजेपासून सुरू झाली. मतमोजणीच्या एकूण 20 फेऱ्यानंतर निकाल जाहीर झाला. मतमोजणीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून सी.जी. रजनीकांथांन हे बडनेरा, अमरावती व तिवसा विधानसभा मतदार क्षेत्राकरिता तसेच अंजना पंडा यांनी अचलपूर, दर्यापूर व मेळघाट विधानसभा मतदार क्षेत्राकरिता काम पाहिले.

          मतमोजणीचे अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार टपाली मतपत्रिकांची मतमोजणी 10 टेबलवर व ईव्हीएम वरील मतांची मोजणी विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय प्रत्येकी 18 टेबल वर करण्यात आली.

लोकसेवा मिळविण्यासाठी अडचणी आल्यास आयोगाकडे दाद मागा – आयुक्त डॉ. एन. रामबाबू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

अमरावती : महाराष्ट्र राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अमंलात आणला आहे. त्याद्वारे प्रत्येक शासकीय विभागाने पात्र व्यक्तींना लोकसेवा प्रदान करणे कायद्याद्वारे बंधनकारक केले आहे. या कायद्याद्वारे राज्य शासनाच्या विविध 38 विभागाच्या एकूण 642 लोकसेवा अधिसूचित केलेल्या आहेत. त्यापैकी 451 सेवा ह्या ऑनलाईन पोर्टलवर प्रदान करण्यात येतात. नागरिकांनी कायद्याचे महत्त्व समजावून घेऊन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक लोकसेवा ह्या ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करुन घेण्यासाठी ‘आपले सरकार पोर्टलचा’ वापर करावा तसेच अधिसूचित केलेल्या लोकसेवा प्राप्त करण्यामध्ये अडचणी येत असल्यास आयोगाकडे दाद मागावी, असे आवाहन राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. एन. रामबाबू, यांनी केले.

राज्य शासनाच्या विविध विभागाने अधिसूचना निर्गमित करुन अधिसूचित केलेल्या सेवांचा तपशिल, त्या प्रदान करण्यासाठी लागणारी विहित कालमर्यादा, सेवा प्रदान करणारे पदनिर्देशित अधिकारी, सेवा प्रदान करण्यास विलंब होत असल्यास किंवा दिरंगाई होत असल्यास करावयाच्या प्रथम व द्वितीय अपिलाबाबतची माहिती प्रसिद्ध केलेली आहे, अशी माहिती आयोगाने दिली आहे.

या कायद्याच्या प्रयोजनासाठी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली असून त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. उर्वरित सहा महसूल विभागामध्ये आयोगाची प्रत्येकी एक विभागीय कार्यालय आहे. राज्य सेवा हक्क आयोग, अमरावती विभाग, अमरावती या कार्यालयाची स्थापना डिसेंबर 2021 मध्ये करण्यात आली आहे. अमरावती महसूल विभागासाठी डॉ. एन. रामबाबू,(भा.व. से.) (से. नि.) यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या आयोगाचे कार्यालय ‘कार्य आयोजना इमारत, पहिला मजला, वन विभाग, उर्ध्व वर्धा प्रकल्प वसाहत मार्ग, कॅम्प, अमरावती 444602’ येथे कार्यरत आहे.

शासनाच्या विविध विभागानी अधिसूचित केलेल्या सेवा प्रदान करण्यामध्ये विलंब होत असल्यास अथवा दिरंगाई होत असल्यास, त्यानुषंगाने पात्र व्यक्ती या आयोगाकडे तृतीय अपिल दाखल करु शकतो, जास्तीत जास्त नागरिकांना या कायद्याची ओळख व्हावी यासाठी अमरावती विभागामध्ये झालेल्या विविध कृषि प्रदर्शनी, शासन आपल्या दारी कार्यक्रमांमध्ये आयोगातर्फे माहितीवर्धक स्टॉल लावण्यात आले होते. तसेच या कायद्याचा व्यापक प्रचार-प्रसार होण्यासाठी आकाशवाणीवर मुलाखती व ध्वनीफिती प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय अमरावती महसूल विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय व इतर जिल्हास्तरीय तसेच उपविभागस्तरीय शासकीय कार्यालयांमध्ये आयोगाकडून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 बाबत सजगता आणण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम व आढावा बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

आयोगाकडे प्राप्त होणाऱ्या अपिल प्रकरणांवर आयोगाव्दारे कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी अधिसूचित असलेली लोकसेवा प्रदान करण्यामध्ये दिरंगाई अथवा दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या प्रकरणांमध्ये आयोगाकडून दंडात्मक कार्यवाही सुध्दा करण्यात आलेली आहे.

या कायद्याचे महत्व समजावून घेऊन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक लोकसेवा ह्या ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करुन घेण्यासाठी “आपले सरकार पोर्टलचा” सर्वसामान्य नागरिकांनी वापर करावा. तसेच अधिसूचित केलेल्या लोकसेवा प्राप्त करण्यामध्ये अडचणी येत असल्यास नागरिकांनी आयोगाकडे दाद मागावी, असे आवाहन राज्य सेवा हक्क आयोज आयुक्त डॉ. एन. रामबाबू यांनी केले आहे.

युवकांनी सोशल मीडियाचा वापर कमी करुन आपल्यातील कला वृद्धींगत कराव्यात – मंत्री सुनिल केदार

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

अमरावती : युवा देश म्हणून भारताची जगात ओळख आहे. मानवी संसाधने आपल्या देशात अधिक आहेत. युवकांचा आय.क्यु. जुन्या पिढीपेक्षा अधिक आहे, असे असतांना आमचे युवक सोशल मिडीयाचा जास्तीतजास्त वापर करीत असून त्यावर मर्यादा घालून आपल्यातील कला वृद्धींगत कराव्यात, असे आवाहनात्मक प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने आजादी का अमृत महोत्सव वर्षात शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये अखिल भारतीय विद्यापीठ संघाकडून मान्यता प्राप्त कलाप्रकारांकरिता व नियमानुसार आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव स्पर्धेचे आयोजन दि. २२ एप्रिल ते २५ एप्रिल, २०२२ दरम्यान ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावती याठिकाणी करण्यात आले, त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, प्रमुख अतिथी म्हणून ब्रजलाल बियाणी शिक्षा समितीचे अध्यक्ष अॅड. अशोक राठी, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर, संयोजक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिपक धोटे, नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल गवई, युवा महोत्सव समितीचे समन्वयक डॉ. संजीव ई.रकर, माजी संचालक डॉ. दिनेश सातंगे, प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे, विद्यार्थी परिषद अध्यक्ष श्री राहुल सोळंके आदी उपस्थित होते.

उद्घाटन झाल्याची घोषणा करुन मार्गदर्शन करतांना श्री.सुनिल केदार म्हणाले, नवीन पिढीचा आय.क्यु. जास्त आहे. भारताचा विकास नवीन पिढीच्या खांद्यावर आहे. तंत्रज्ञानाने भारतात क्रांती केली असून त्याचा जास्तीतजास्त वापर आपल्या देशात होत आहे. परंतू आमचा युवक वर्ग सहा ते सात तास वेळ फेसबुक व व्हाट्सअॅप वर खर्ची घालतो, त्यातल्या त्यात यामध्ये मध्यम वर्गातील विद्यार्थी बळी पडत असून युवकांनी जागृत होवून सोशल मीडीयाच्या वापरावर मर्यादा ठेवावी आणि आपल्यातील असलेल्या कलाकौशल्यांना वृद्धींगत करण्याकरिता अधिकाधिक वेळ द्यावा.

विद्यापीठ स्तरावर टेक्नॉलॉजीचा कसा वापर करायचा, याचे धडे विद्यार्थ्यांना दिल्या जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करुन ते पुढे म्हणाले, विदेशात क्रीडा कौशल्याला अधिक महत्व दिले जाते. महाराष्ट्रात देखील स्थापन झालेल्या क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून मैदानी खेळांसह इतर कलाप्रकारांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येईल. त्यामध्ये अधिकाधिक खेळाडूंचा सहभाग असण्यावर भर दिला जाईल, असे सांगून युवा महोत्सवात सहभागी सर्व कलावंत विद्याथ्र्यांना आपल्या कला उत्कृष्टरितीने सादर करण्याकरिता व विजेता होण्याकरिता त्यांनी शुभेच्छा दिल्यात.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाने युवा महोत्सव आयोजनाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद दिले. ते पुढे म्हणाले, विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये अडीच लाख विद्यार्थी असून त्यापैकी अडीच हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ही संख्या जास्तीतजास्त वाढविण्याची गरज असून पुढील वर्षी अधिकाधिक कलावंत विद्यार्थी सहभागी होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठातून दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांपैकी चाळीसहजार विद्यार्थी पदवी घेवून बाहेर पडतात आणि साठहजार विद्यार्थ्यांना पदवी मिळत नाही. साठ हजारांचा आकडा कमी होण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व चॉईस बेस्ड क्रेडीट सिस्टीम (सी.बी.सी.एस.) पद्धत महत्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना अधिक रोजगारक्षम बनविण्यावर भर दिला जाणार असून ऑनर्स व मायनर डिग्री देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होईल. याशिवाय कौशल्य अभ्यासक्रमांचा समावेश, अभ्यासक्रमांसाठी प्रोजेक्ट व इंटर्नशीपची सक्ती असणार आहे. विद्यापीठात प्लेसमेन्ट सेलची निर्मिती, संशोधनासाठी अनुदान, पूर्णवेळ आचार्य पदवीकरिता संशोधक, मराठीमध्ये बी.एस.सी. आदी सुधारणा करण्यात येणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. विद्यापीठाच्या खेळाडूंनी आपल्या स्तरावर गौरवास्पद कामगिरी करुन विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याप्रसंगी सर्व सहभागी कलावंतांना कुलगुरूंनी शुभेच्छा दिल्यात.

संयोजक तथा ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिपक धोटे यांनी स्वागतपर भाषणात सांगितले, महाविद्यालयाचे यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. दोन कोटीपेक्षा जास्त रूपयाचे इनडोअर स्टेडियम महाविद्यालयात तयार होणार असून त्याचे भूमीपूजन मंत्री महोदायांच्या हस्ते संपन्न झाले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा युवा महोत्सवामध्ये जास्तीतजास्त सहभाग होण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाला एक लक्ष रूपयाचे सानुग्रह अनुदान क्रीडा व युवक कल्याण विभागाच्यावतीने दिल्या जावे, अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली. सांस्कृतिक कार्यक्रमाध्ये सहभागी विद्यार्थ्यांना नॉन एक्झामिनेशनसाठी क्रेडीट मिळावे, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकतेतून संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी युवा महोत्सव आयोजनामागील भूमिका विशद केली. पाच प्रमुख कलाप्रकारांत व पस्तीस उप कलाप्रकारांत विद्यार्थी आपल्या कलेचे सादरीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 125 महाविद्यालयांचा यामध्ये सहभाग असणार आहे. याप्रसंगी ब्रजलाल बियाणी शिक्षा समितीचे अध्यक्ष अॅड. अशोक राठी यांनी मनोगत व्यक्त केले.

विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मागीलवर्षी शासकीय विदर्भ ज्ञान व विज्ञान संस्थेने उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल तेथील डॉ. सुधीर मोहोड व डॉ. विनोद गावंडे यांचा यावेळी शाल, श्रीफळ देवून मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ देवून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. संचालन डॉ. क्षिप्रा मानकर यांनी, तर आभार डॉ. संजीव ई·ारकर यांनी मानले. उद्घाटन कार्यक्रमाला ब्रजलाल बियाणी शिक्षा समितीचे पदाधिकारी, नियोजन समितीचे सदस्य, युवा महोत्सव व्यवस्थापन समितीचे सदस्य, सर्व संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यापीठाच्या विविध प्राधिकारणींचे सदस्य, पत्रकार, युवा महोत्सवामध्ये सहभागी कलावंत विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

वऱ्हाडी, कोरकू अशा स्थानिक भाषेतून शासकीय योजनांचा प्रचार


सह्याद्री चौफेर | न्यूज 

अमरावती : लोककलावंतांच्या पारंपारिक लोककलेतून सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयांमार्फत विशेष कार्यक्रम राज्यभर राबविण्यात आला. या अभिनव कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्थानिक भाषेतून शाहिरी, लोकगीत, पोवाडा, भारुड आदी पारंपारिक लोककलांच्या माध्यमातून आणि विशेषतः वऱ्हाडी आणि कोरकू भाषेतून गावकऱ्यांपर्यंत राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती अमरावती जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पोहचविण्यासाठी आली. गावकऱ्यांचे मनोरंजनात्मक पद्धतीने प्रबोधन करुन त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. जिल्ह्यात लोककला पथकांच्या माध्यमातून गावोगावी, खेडोपाडी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.

राज्य शासनाने दोन वर्षात विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी आणि ते शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावेत, हा या मोहिमेचा उद्देश होता.


लोककलावंतांच्या अभिनयाने दिली शासकीय योजनांना प्रसिद्धी
गत दोन वर्षात महाविकास आघाडी शासनाने घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी, विविध योजना, उपक्रम, कोरोना काळात राबविण्यात आलेले विविध उपक्रम, शिवभोजन थाळी, महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना, महिला व बाल विकास योजनेसाठी राखीव निधीची तरतूद, विद्यार्थी, शेतकरी बांधव, आरोग्यसेवा, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम आदी योजना व उपक्रमांची माहिती लोककला पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र पोहोचवण्यात आली.

समर्पण बहुद्देशीय संस्था, माई मानव बहुद्देशीय संस्था तसेच गंधर्व बहुद्देशीय संस्था या लोककलापथकामार्फत जिल्ह्यात 63 च्या वर प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. जिल्ह्यातील अमरावती, भातकुली, चांदूरबाजार, अचलपूर, चांदुररेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, मोर्शी, वरूड, अंजनगाव सूर्जी, दर्यापूर, चिखलदरा तसेच धारणी तालुक्यात कलापथकाच्या माध्यमातून विविधरंगी मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात आले. धारणी तसेच चिखलदरा या भागात कोरकु भाषेतूनही ग्रामस्थांना प्रबोधन करण्यात आले, हे विशेष.


ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया
जिल्हा माहिती कार्यालयाचा लोककलापथकामार्फत शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी राबविण्यात आलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. लोककलेच्या माध्यमातून आमच्यासाठी शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती आम्हाला सोप्या भाषेत सांगण्यात आली. आता आमच्यासाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत ते समजल्यामुळे आम्ही या योजनांचा अवश्य लाभ घेणार, अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केल्यात.

ग्रामस्थांनी घेतला लोककलेचा आस्वाद
आपल्या महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात लोककलेला अनन्य साधारण महत्त्व आहे. परंतु कोरोना निर्बंधामुळे लोककलेचे आयोजन दोन वर्षात झाले नव्हते. जिल्हा माहिती कार्यालयामुळे ग्रामस्थांनी लोककलेचा आनंद घेतला. या पारंपारिक लोककलेच्या कार्यक्रमाचे प्रथमच जिओ टँगिंगही करण्यात आले होते. कलापथकांच्या सादरीकरणाच्या वेळी गावातील सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील यांनी या अभिनव उपक्रमाचे स्वागत करुन कलावंतांचे आदरतिथ्य केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथ संपदा प्रत्येकाने वाचली पाहीजे - शिवा प्रधान


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

अमरावती : येथील बौध्द उपासक संघ भिमटेकडी,परीसर अमरावतीच्या वतीने आयोजीत संडे मिशनचा कार्यक्रम नुकताच सपन्न झाला. 
कार्यक्रमाच्या प्रारंभी बौध्द उपासक संघाचे अध्यक्ष मा शिवा प्रधान यांचे हस्ते व प्रमुख अतिथी मा प्रभाकर गवई या मान्यवरांनी दिप प्रज्वलन करुन भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागथ भगवान गौतम बुध्द यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन केले.

बुध्द वंदना सामुहीक घेण्यात आली तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आदराणीय अशोकराव झटाले यांच्या निधनाबद्दल त्यांना सामूहीक आदरांजली देण्यात आली. तदनंतर मंचावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. 
कार्यक्रमा चे प्रास्ताविक ऊपासक संघाचे कोषाध्यक्ष मा गंगाधरराव ईंगळे यांनी केले सदर कार्यक्रमामध्ये मा संजय बनसोड संचालक शासकीय ग्रंथालय महाराष्ट्र शासन मुंबई यांनी अभ्यासीकेच्या विद्यार्थ्याना स्टेज डेअरींग यावे या करीता त्यांचा समन्वय असावा असे कार्यक्रमात सांगितले. 

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष,बौध्द उपासक संघाचे अध्यक्ष, आंबेडकरी विचारवंत मा शिवा प्रधान अध्यक्षीय भाषणात बोलतांना ते म्हणाले की आजच्या दिवसी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस आणि गांधी,यांनी अस्पृश्यतेबाबत काय केले हा ग्रंथ लिखानास प्रारंभ केला तो हा ऐतिहासिक दिवस होय डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथ संपदा खुप विपूल आहे, ती मानवाच्या ती सर्वहारा मानव मुक्तीचे सुक्त उजागर करणारी आहे. महात्मा गांधी आणि काँग्रेस अस्पृश्यांना यांनी अस्पृश्य संदर्भात काय कार्य केले कसाकसा बाबासाहेबांना विरोध झाला स्वतंञ्य मतदार संघ ईग्रजांशी गांधीचा पञव्यवहार त्यांच्या शिफारसी हा असा तत्काळातला शिरस्ता आहे माञ, बाबासाहेबांनी स्वातंञ्य समता बंधूता यांची कास धरत न्यायाची व राष्ट्राची एकात्म भूमीका घेवून कार्य केले बाबासाहेबांची कार्यप्रणाली समतेच्या अधिष्ठानावर आरुढ आहे बाबासाहेबांनी विविध ग्रंथ लिहून तमाम भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला तत्वज्ञानाची अनमोल संजीवनी दिली आहे. एक सत्याचा वैचारिक वारसा दिलेला आहे माञ, तो सर्वानी वाचणे गरजेचा आहे. बाबासाहेबांना समजून घेतांना त्यांची ग्रंथ संपदा प्रत्येकाने वाचली पाहीजे त्यामूळे बाबासाहेबांचे मनोहारी विचार सौंदर्य प्रत्येकाला मोहित केल्याशिवाय राहत नाही बाबासाहेबांच्या विचारातील सामाजीक तत्वे यांचा विचार करून समाजात एकसंघता कशी राहील या बाबीकडे सर्व जातीधर्माच्या पलीकडे जावून राष्ट्र हीत जपणे सुध्दा महत्वाचे आहे. त्यामूऴे संविधानात याची विचार सरणी अंतःर्भूत आहे तीला आपण सर्वजण मिळून जपूया आजच्या दिनाचा संकल्प धरुया असे मौलिक प्रतिपादन "संडे मिशन" या बौध्द उपासक संघाच्या कार्यक्रमात केले आहे.
या प्रसंगी उपासक संघाचे सदस्य मा प्रभाकरराव गवई व शरद सोनोनो यांच्या वाढदिवस प्रित्यर्थ त्यांना मा शिवा प्रधान यांचे हस्ते पुष्पगुच्छ व ग्रंथ त्यांना देवून अभिष्टचींतनपर सदीच्छा दिल्या, कार्यक्रमाचे सुञ संचालन आयू ज्योती बोरकर यांनी केले, आभार प्रदर्शन आयु डी के बागडे यांनी केले. 

सदर कार्यक्रमात प्रामूख्याने उपस्थितामध्ये आयु डी जी वानखडे, आयु एस बी खोब्रागडे, नामदेवराव वाघमारे, सूर्यभान बनसोड, सुधाकर राउत, प्रभाकर गवई, शरद सोनोने, अवधूत गजभीये, गोपाळ रामटेके, नलीनी नागदिवे, प्रतिभा प्रधान, अनिता रोडगे, प्रभाकर गाडगे, वर्षा गाडगे, गंगाधर ईंगळे, बापूराव गुळसुंदरे, व्यंकट खोब्रागडे, अस्मीता सोमकुवर, माला चव्हान, ज्योती बोरकर, डी के बागडे, प्राजक्ता सोमकुवर आदी उपस्थिती होती, बराच वेळ चाललेल्या या कार्यक्रमाची सांगता भिक्खूणी प्रजापती यांच्या आशिर्वाद गाथेने संपन्न झाली. अशी माहिती सहसचिव नामदेवराव वाघमारे यांनी दिली.
 

बौध्द उपासक संघ भिमटेकडी,परिसर,अमरावती द्वारा 124 व्या रमाई जयंतीचा कार्यक्रमसोत्साह सपंन्न

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

अमरावती : बौध्द उपासक संघ भिमटेकडी परिसर ,अमरावती द्वारा एकशे चोवीसाव्या माता रमाई जंयतीचा कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला.
 
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी बौध्द उपासक संघाचे अध्यक्ष मा जेष्ठ आंबेडकरी विचारवंत शिवा प्रधान हे होते
प्रारंभी भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतीमेला प्रमूख अतिथी तथा व्याख्यात्या आयु धम्मचारीणी,आर्यश्री मॅडम यांचे हस्ते प्रतीमेला माल्यार्पण करण्यात आले तसेच माता रमाई यांच्या प्रतीमेला मा शिवा प्रधान यांचे हस्ते माल्यार्पन करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात येवून आदर्शांना अभिवादन करण्यात आले. 
प्रसंगी उपासक गोसावी यांनी सामूहिक बुध्द वंदना घेतली रमाई जयंती या मंचावर आसनस्थ असलेल्या मान्यवरांना उपासक संघाच्या वतीने पुष्पगूच्छ देवून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतीथी मा धम्मचारीणी आर्यश्री मॅडम यांचे स्वागत उपासक संघाच्या माजी संघटीका प्रतिभा प्रधान यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले तसेच मा डॉ कमल राउत सर प्रमुख अतीथी यांचे स्वागत एस बी खोब्रागडे माजी अध्यक्ष बौउस यांनी पुष्पगुच्ज देवून केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मा शिवा प्रधान यांचे स्वागत उपासक संघाचे माजी सचीव मा बापूराव गुळसुंदरे यांनी केले 
मंचकावर रमाईच्या प्रती भूमिकेत महाविद्यालयीन विद्यार्थीनी प्राची जवंजाळ हीने हुबेहुब प्रती रमाई साकारली ते या जयंती कार्यक्रमाच प्रमूख आकर्षन होते.
या प्रती रमाईचे स्वागत प्रतिभा प्रधान यांनी पुष्पगुच्छ देवून केले तसेच नलिनी नागदिवे,पुष्पा दंदे,ज्योती बोरकर यांनीही स्वागत केले. 
प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमूख वक्त्या मा धम्मचारीणी आर्यश्री मॅडम आपल्या प्रमूख भाषणात म्हणाल्या की,रमाईचे बालपण अत्यंत हालअपेष्टेत गेले आणि नंतरचा जिवन प्रवास तर तो ही खडतर होता. कष्ट आणि त्याग याचे मूर्तिमंत उदाहरण हे रमाई पेक्षा कुणाचे असू शकत नाही माता रमाईचा ध्यास घेवून हरेक महीलेने आपले जिवन फुलवावे असे मौलीक प्रतीपादन त्यांनी प्रमूख व्याख्यात्या म्हणून जयंती कार्यक्रमात केले.
 
प्रसंगी डॉ कमल राउत सरांनी अतीथीपर भाषनात सांगीतले की रमाईचा त्याग आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समन्वयातून कार्याची विजयी शलाका गाठत रमाईचे ऋण हे कीती आहेत यांची प्रत्येकाने जाण ठेवली पाहीजे असे उद,बोधन डाँ कमल राउत यांनी केले.
कार्यक्रमात माजी अध्यक्ष मा एस बी खोब्रागडे यांनी ही रमाईच्या जीवनावरील कीस्से सांगून उपासकांना अंतःर्मूख केले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा शिवा प्रधान यांनी सांगीतले की, बाबासाहेबांच्या प्रत्येक कार्यात माता रमाईची साथ होती त्यामूळेच रमाबाई अत्यंत काळजीपूर्वक बाबांना जपत होती बाबासाहेबांना विजयाकडे नेत होती कर्नाटक धारवाड मधील डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेल्या वस्तीगृहात मुलांचे अन्नधान्य संपल्यामूळे मुलावर उपासमारीची पाळी आली तेंव्हा माञ रमाईला हे कळताच त्यांनी हातातील सोन्याच्या बांगड्या मोडून त्याचे अन्नधान्य आणायला लावून स्वतः भाकरी भाजी करुन विद्यार्थ्यांची भूक भागवीली. किती मोठे हे दातृत्व त्यांचे केवढे मोठे औदार्य होते हा दातृत्वाचा मोलाचा वाटा रमामातेचा होता. रमामातेने एकदा बाबासाहेबांना पंढरपूरला जाण्याची ईच्छा व्यक्त केली तेंव्हा बाबासाहेब म्हणाले की, रामू मी तुझ्यासाठी नवीन पंढरपूर वसवेन माञ ते पंढरपूर म्हणजे आताची नागपूरची दिक्षाभूमी होय अशा अनेक पैलूवर शिवा प्रधान यांनी भाष्य केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाच्या वादळाशी रमाचा संसार हा खुपच त्यागाचा होता म्हणून रमा माता एक मूर्तीमंत सर्वस्वी त्याग करुणा शिलतेच प्रतीकच होत्या असे गौरवोद्गार शिवा प्रधान यांनी अध्यक्षीय भाषनात प्रतीपादन करतांना व्यक्त केले. 
तदनंतर मा मीनाताई नागदीवे पञकार,यांनीही रमाई जयंतीदिनाच्या सर्व उपासक संघाच्या आला उपासकांना सदिच्छा दिल्या उपासक संघाच्या उपासीकेंनी रमाईवर कविता गीते सादर करुन कार्यक्रमाचा उस्साह वाढविला. त्यामधे रमाई माउली ही कविता प्रतीभा प्रधान यांनी तर अनीता जवंजाळ यांनी झोपडीवरची कविता सादर केली तसेच सुनिता रायबोले पुष्पा दंदे माला चव्हान,हिनल गाडगे यांनी चरणदास काळे यांनीही रमाई वरील गीत गावून उपासकांना मंञमुग्ध केले तसेच महादेव बागडे कवी यांनीही प्रबोधनाची कविता प्रस्तूत केली. डी के बागडे यांनीही गाणे सादर केले बराच वेळ चाललेल्या या जयंती कार्यक्रमाचे सुञसंचालन आयू ज्योती बोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन आयू बापूराव गुळसुंदरे यांनी केले. 
कार्यक्रमाला उपासिकामधे आयू नलिनी नागदिवे, प्रतिभा प्रधान, अनिता जवजाळ, अनिता रोडगे, मीना नागदिवे, अस्मिता सोमकुवर, सविता भगत, वर्षा गाडगे, हिनल गाडगे, मेश्राम काकू, कोथळकर, ज्योती बोरकर, ज्योती गजभीए, तायडे, प्राजक्ता सोमकुवर, लता तायडे, उपासकामधे आयू नामदेवराव वाघमारे, रामकृष्ण तायडे, हिम्मत वरघट, आनंद ईंगळे, नरेश कांबळे, डी के बागडे, बोरकर गुरूजी, राहूल सोमकुवर, राहूल हिरकने,  किशोर तायडे, अवधूत गजभीए, हंसराज रंगारी, चरणदास काळे, प्रभाकर गाडगे, नाखले काका, गोपाळ रामटेके, सूर्यभान बनसोड, विद्याधर जवंजाळ,भाउराव दहाट, एस बी खोब्रागडे, संजय घरडे आदिची उपस्थीती होती शेवटी रमाईच्याच गिताने कार्यक्रमाची सांगता झाली. 

अर्ज लिहिण्यापासून सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध



सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

अमरावती : नागरिकांना अर्ज लिहायला मदत करण्यापासून झेरॉक्स, फॉर्म, सेतू कक्ष व इतर सुविधाही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. तलाठी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी असे वेगवेगळे अधिकारी- कर्मचारी एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने प्रत्येक ठिकाणी सही-शिक्क्यासाठी स्वतंत्रपणे जाण्याची गरज भासत नाही. या सुलभ प्रक्रियेमुळे नागरिकांची कामे होऊन त्यांना दिलासा मिळतो. आपण ‘नायक’ हा चित्रपट पाहिला होता. तो पाहून मला अशा शिबिराची कल्पना सुचली. पंधरा वर्षांपूर्वी मी हा उपक्रम सुरू केला. आता मेळघाटातही हा उपक्रम सुरु केला आहे. अभियानात मोठी ताकद असते. त्यामुळे पारदर्शकता निर्माण होऊन गैरव्यवहार रोखायला मदत होते, असेही श्री. कडू यांनी सांगितले.

मेळघाटात प्रथमत:च हा कार्यक्रम घेतला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. दुर्गम भागापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही मेळघाटात ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले. मेळघाटातील दुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी बांधवांच्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला आहे, अशी प्रक्रिया आमदार श्री. पटेल यांनी व्यक्त केली.

अंजनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस लिलाव सुरु


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

अंजनगाव सुर्जी : अंजनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दि.06/12/2021 सोमवार रोजी कापुस लिलाव सुरु झाला. प्रथम आवक आणणाऱ्या शेतकरी दत्ता ढोक जवर्डी यांना समिती प्रशासक गुडधे यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कापुस खरेदीदार व प्रकियाकार यांनी व समिती सचिव गजानन नवघरे यांनी सत्कार केला.

कापूस लिलाव करतांना अनिल मंगल पुरी खुर्माबाद यांच्या कापसाला सर्वाधिक रु. 8955 प्रति क्विंटल प्रमाणे भाव प्राप्त झाला. कापुस लिलाप प्रसंगी कापूस व्यापारी कमलेश पटेल, आशिष राठी, प्रविण नेमाडे, शहजाद अहमद, पंकज मोदी, अय्याज खान, सै. जलील , अय्युब खान, बबलु शेळके उपस्थित होते.

बाजार समिती कर्मचारी अमर साबळे, घोगरे, पोटे, आठवले कडव, निशाने यांनी लिलाव यशस्वी करिता प्रयत्न केले. आजपासून सर्व शेतकरी बंधुनी आपला कापूस विक्रि करिता आणावा असे बाजार समिती मध्ये दररोज सकाळी 10.00 ते1.00 व दुपारी 3.00 ते5.00 या वेळेत लिलाव होत असल्याने कापूस जिनिंग मालक व समिती प्रशासक व सचिव यांनी कापुस बाजार समितीमधे आणण्याचे आवाहन सर्व कापुस उत्पादक शेतकरी यांना केले.

आरोग्य उपकेंद्र जारीदा अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरीकांचे ८० टक्के लसीकरण यशस्वीरित्या पूर्ण


सह्याद्री न्यूज नेटवर्क |

चिखलदरा : चिखलदरा तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र जारीदा येथील आरोग्य कर्मचारी यांनी मोठे यश प्राप्त केले आहे.मेळघाट हा भाग अतिदुर्गम व डोंगराळ भाग आहे. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे लोकं अंधश्रध्दा वर विश्वास ठेवतात. कोरोना लसीबद्दल मेळघाटातील लोकांच्या मनात उदासीनता होती. अफवा वर जास्त प्रमाणात लोकांचा विश्वास होता. या कारणामुळे लोक कोरोना लस घेण्यासाठी टाळाटाळ करत होते. डॉ. अजय ठोसरे सामुदायिक आरोग्य अधिकारी आरोग्य उपकेंद्र जारीदा, श्री.डी. एन. तायडे आरोग्य सेवक, श्रीमती एस.एस.बन आरोग्य सेविका यांनी प्रत्येक गावात जाऊन लशीकरन बदल जनजागृती केली. आज या जनजागृती मुळे आरोग्य उपकेंद्र जारीदा अंतर्गत येणाऱ्या गावातील लोकांचे ८० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. या कामगिरी मुळे श्री.जयंत बाबरे गटविकास अधिकारी चिखलदरा व श्री.सतीष परधान तालुका वैदयकीय अधिकारी यांनी मेहरियाम या गावात भेट देऊन आरोग्य कर्मचारी यांना फुल देऊ अभिनंदन केले. आदिवासी क्षेत्रात काम करताना कर्मचारी यांना अनेक अडचणींच्या सामना करावा लागतो. या सर्व समस्या वर मात करून आरोग्य कर्मचारी यांनी कौतुकाचे काम केले आहे.मेळघाट मध्ये असे अनेक गावे आहेत की,लोकांचा मनात कोरोना लस बदल उदासीनता आहे.

प्रत्येक उपकेंद्र कर्मचारी यांनी कोरोना लशी बद्धल जनजागृती केली तर, कोरोना लक्षीकरणाचा वेग वाढेल. लसीकरण करण्यासाठी डॉ. अजय ठोसरे, डॉ अंकित राठोर, डी. एन. तायडे, श्रीमती एस.एस.बन, एन. ढोकणे, श्रीमती रविना नागले, कु.प्रिती बेलकर, कु.हर्षा बेलकर, कु.प्रेरणा सेमलकर याचा सिंहाचा वाटा आहे. तसेच गावातील सखाराम धिकार, शंकर धिकार, हिरालाल आठोले, ताडील तलाठी, चव्हाण ग्रामसेवक व गावातील लोकांचा सहकार्य मिळाले.



"गावातील लोकांचा सहकार्य मुळे आज माझा उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांचे ८०% लशीकरन पूर्ण झाले आहे.व माझे सहकारी कर्मचारी यांनी मला वेळोवेळी साथ दिली.माझा उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावातील लोकांचे लवकरात लवकर १००% लशीकरन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे."

डॉ. अजय ठोसर 
(आरोग्य सामुदायिक अधिकारी,जारीदा)

तिवसा तहसील कार्यालयात कायदेविषयक जनजागृती


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

अमरावती : विधी प्राधिकरणाच्या निर्देशानुसार व तालुका सेवा विधी सेवा तिवसा व तालुका वकील संघ तिवसा यांच्या संयुक्त विद्यमाने 'आझादी महोत्सव' अंतर्गत कायदेविषयक जनजागृतीचा कार्यक्रम नुकती तिवसा तहसील कार्यालय शांततेत पार पडली. 
तालुका विधी सेवा प्राधिकरण तर्फे मागील महिन्यांपासून तिवसा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजादी का अमृत महोत्सव या शिर्षकाखाली सर्वसामान्य जनतेला कायद्याचे महत्त्व पटावे तसेच त्यांच्या मनातील कायद्याची भीती निघावी यासाठी कायदे विषयक शिबीर आयोजित करण्यात आले यामध्ये वकील मंडळींनी आपल्या ज्ञानाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना करून दिला.
अनेक आबालवृद्धांना तसेच स्त्रियांना आपल्या हक्काची जाणीव करून देण्यात आली विशेष करून हा कार्यक्रम समाजातील तळागळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणून कायद्याचे ज्ञान त्यांना देण्यात आले. त्याचबरोबर नालसा तर्फे सुचित करण्यात आलेल्या कायदेशीर उपाय योजनेबाबत लोकांना माहिती देऊन गरजू लोकांना मोफत कायदेशीर सहाय्य कसे घ्यावे? तसेच त्याबद्दलची संपूर्ण प्रक्रिया ही सर्वसामान्य भाषेत लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले.
या कार्यक्रम तिवसा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तालुका विधी सेवा अध्यक्ष लिलाधर कोरडे यांनी 'महाराष्ट्र जमीन नियम १९६६' सल्ला दिला, राईट ऑफ रेकॉर्ड, वारस कायदा अश्या महत्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.

तसेच चांदुर रेल्वे वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवाजी देशमुख यांनी 'अघोरी विद्या प्रतिबंधक कायदा' विषयवर मार्गदर्शन केले. तिवसा वकील संघाचे सचिव ॲड. पी. डी. राजनेकर यांनी प्रास्ताविक भाषण केले. ॲड. प्रियंता राजनेकर यांनी वारस कायदेविषयक मार्गदर्शन केले. पदाधिकारी कार्यक्रमाला तहसीलदार वैभव फरतारे, तालुका वकील संघ

वऱ्हा येथील नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई मिळवून द्या – पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे प्रशासनाला आदेश

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
अमरावती, (१२ जुलै) : जिल्ह्यातील तिवसा परिसरातील वऱ्हा गावात वादळामुळे अनेक घरांचे नुकसान आणि पडझड झाली. या नुकसानीची पाहणी महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद साधून दिलासा दिला.

वऱ्हा येथे घरांचे वादळामुळे नुकसान झाले. त्याची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी याठिकाणी आज भेट देऊन नुकसानग्रस्तांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांना अन्नधान्यवाटप करून मदतीचा हातही दिला.

वऱ्हा येथील नुकसानीची पाहणी करून पंचनामे व सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव तत्काळ करून संबंधिताना सानुग्रह अनुदान लवकरात लवकर मिळेल, यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करण्यात येईल. प्रशासनाने तत्काळ आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले. वऱ्हा येथे ५० हून अधिक घरांचे नुकसान वादळामुळे झाल्याची माहिती तहसीलदार योगेश फरताडे यांनी दिली.

शिवसेनेकडून जुन्या शिवसैनिकांची विदर्भात महामंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
अमरावती, (१२ जुलै) : जुने आणि कडवट शिवसैनिक, बाळासाहेब आणि आता उद्धव साहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ असे सुधीर सूर्यवंशी अमरावती, अशोक शिंदे वर्धा, अजय स्वामी चंद्रपूर, बाळू मुंगीलवार यवतमाळ, श्रीरंग पिंजरकर अकोला, प्रतापराव जाधव बुलढाणा, मुकेश शिवअरे गोंदिया, यांना शिवसेने कडूनमहामंडळ मिळण्याची दाट शक्यता गुप्त माहिती नुसार वर्तविण्यात आली आहे.

सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे प्रमुख पक्ष असून, प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना पक्षवाढ करण्यासाठी नवनवीन जबाबदारी देत आहेत. त्यामध्ये शिवसेना सुद्धा मागे नाही. शिवसेनेने सुद्धा आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना महामंडळ देण्याचे ठरवले आहे.
आता हे पाहावे लागेल की या महामंडळाला राज्यपाल नियुक्त आमदार सारखा वेळ लागेल की लवकर महामंडळ मिळून कार्यकर्ते कामास लागणार आहे.

वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवतीची पालकमंत्र्यांकडून विचारपूस

                         (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

अमरावती, (१० जुलै) : मोर्शी तालुक्यातील बऱ्हानपूर येथील कु. आरती संजय काळे या अभियांत्रिकीच्या युवतीवर दोन दिवसापूर्वी रानडुक्करांनी हल्ला केला. या हल्ल्यात आरती जखमी झाली असून तीच्या पायाला पंधरा टाके पडले. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज तीच्या घरी जाऊन तीची प्रत्यक्ष भेट घेतली. तीची आस्थेने विचारपूस करुन आर्थिक मदत केली. वैद्यकीय उपचारार्थ लागलेला संपूर्ण खर्च व मोबदला वनविभागाने तीला लवकर मिळवून द्यावा, असे निर्देश राज्याच्या माहिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

मोर्शीचे तहसीलदार सिध्दार्थ मोरे, वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद सुरत्ने, पदाधिकारी रमेश काळे यांच्यासह गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, ग्रामीण भागात सध्या शेतीची कामे सुरु आहेत. पीक पेरणीचे दिवस असल्याने वनविभागाने वन्यप्राण्यांकडून गावांत किंवा शेतात हल्ले होणार नाही, यासाठी वनविभागाने दक्षतापूर्वक गस्ती घालाव्यात. वन्यप्राण्यांकडून मणूष्यांवर किंवा बैल, गायी, म्हैस यारख्या पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याच्या घटनांना आळा घालावा. गावातील नागरिक किंवा विद्यार्थीनीवर वन्यप्राण्यांद्वारे हल्ला ही अकस्मात घटना झाली आहे. यापूढे असे प्रसंग घडू नये म्हणून वनविभागाने जंगलाच्या बाजूने कुंपन किंवा मोठा चर खोदून वन्यप्राण्यांना गावात येण्यासाठी अटकाव करावे.

कु. आरतीला रानडुक्कराच्या हल्ल्यात पायाला दुखापत झाली असून पंधरा टाके पडलेले आहे. वनविभागाने तातडीने वैद्यकीय अहवाल प्राप्त करुन तातडीने तीला मदत उपलब्ध करुन द्यावी. तीच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार लक्षात घेता, आरतीचे मदतीचे प्रकरण तत्काळ मार्गी लावून मदत मिळवून द्यावी, असेही श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते पेरणीचा शुभारंभ; विधिवत बैल तिफण पूजन


सह्याद्री न्यूज नेटवर्क |

अमरावती, (ता.१३) : 12मान्सूनचे जिल्ह्यात दमदार आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मूळचे शेतकरीच असलेले राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनीदेखील आज  पेरणीचा शुभारंभ केला. 

राज्यमंत्री बच्चू कडू व त्यांच्या पत्नी प्रा.डॉ.नयना कडू यांनी विधिवत बैल तिफण पूजन करून पारंपरिक पद्धतीने पेरणीला सुरूवात केली. कोरोनामुळे आधीच सगळे संकटात सापडले आहे.अशातच सततच्या लॉकडाऊनमुळे खते, बियाणेदेखील उपलब्ध होतील की नाही अशी शंका असतानाच लॉकडाऊन शिथील झाले आणि शेतकऱ्यांमध्ये पेरणीसाठी उत्साह संचारला. मात्र, स्वतः राज्यमंत्री बच्चू कडूदेखील आपल्यासोबत शेतात पेरणी करणार हे बघून शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

यावेळी प्रहारचे ज्येष्ठ पदाधिकारी दिपक भोंगाडे, राहुल म्हाला, संदीप मोहोड, गौरव बोंडे, सतीश मोहोड, मनिष मोहोड, उमेश कपाडे व गोलू ठाकुर आदी उपस्थित होते.

नेत्रदानातून दृष्टीहिनांच्या आयुष्यात उजेडाचा दीप उजळावा. - हरीना फाउंडेशन


                       (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज नेटवर्क |  
अमरावती, (ता.९) : घरी थोडावेळ वीजपुरवठा खंडित झाला की गडद काळोखाची जाणीव माणसाला हैराण करून सोडते, मग ज्यांच्या आयुष्यात कायमस्वरूपी अंधार आहे त्यांची वेदना शब्दांत मांडणे कठीण आहे. अशा अंध बांधवांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी नेत्रदानाची चळवळ गत दहा वर्षांपासून अमरावतीच्या हरिना फाऊंडेशनद्वारे राबवली जात आहे. या उपक्रमाबद्दल 10 जूनच्या नेत्रदान दिनानिमित्त सांगताहेत फाऊंडेशनचे उपाध्यक्ष चंद्रकांत पोपट.

नेत्रदानातून दृष्टीहिनांच्या आयुष्यात उजेडाचा दीप उजळावा

दृष्टी जाण्याची अनेक कारणे असतात. पण नेत्रदानातून अनेक दृष्टीहिनांना पुन्हा दृष्टी मिळू शकते. गरज आहे सकारात्मक प्रयत्नांची. त्यासाठी नेत्रदानाविषयीचे गैरसमज समूळ काढून टाकण्याची गरज आहे. याबाबत श्रीलंका या देशाकडून बोध घेतला पाहिजे. तिथे कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याचे नेत्रदान केले जाते. अनेक देशांनी ही तरतूद स्वीकारली आहे. भारतात मात्र अजूनही मरणोत्तर नेत्रदानाबाबत बरेच गैरसमज आहेत. या गैरसमजांमुळे नेत्रदानाप्रती समाजात निर्माण झालेली उदासीनता चिंताजनक आहे. भारतात होणाऱ्या मृत्यूच्या आकडेवारीनुसार प्रत्येकाचे नेत्रदान झाले तर संपूर्ण जगातील अंधत्वाचे निवारण होऊ शकते. जर श्रीलंकेत हे स्वीकारले गेले तर, भारतातही झाले पाहिजे, यादृष्टीने फाऊंडेशनमार्फत आम्ही पाठपुरावा करतच आहोत पण या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणेही आवश्यक आहे.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्यांचेही नेत्रदान होऊ शकते

जगातील अंध लोकसंख्येतील एक चतुर्थांश व्यक्ती एकट्या भारतात आहेत. त्यातही बालकांची संख्या मोठी आहे. त्यांचे आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी नेत्रदानाची चळवळ सर्वदूर पोहोचली पाहिजे. 75 वर्षांच्या व्यक्तीचेही नेत्रदान होऊ शकते. केवळ एडस्, कर्करोग आदी गंभीर आजाराच्या रुग्णांचे नेत्रदान होऊ शकत नाही. चष्मा वापरणाऱ्या किंवा अगदी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीचे नेत्रदानही करता येते.

प्रक्रिया असते साधीसुलभ  

नेत्रदानाची प्रक्रिया साधी व सुलभ असते. निधन झालेल्या व्यक्तीच्या नेत्रदानासाठी निधनानंतर डोळ्यांवर ओले कापड व डोक्याखाली उंच उशी ठेवावी. मृतदेह ज्या कक्षात आहे, तेथील पंखे व दिवे बंद करावेत. याबाबत हरिना नेत्रदान समिती किंवा संबंधित स्वयंसेवी संस्था, आय बँक, डॉक्टर यांना वेळीच माहिती द्यावी. व्यक्तीच्या निधनानंतर सहा ते आठ तासांत नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. संस्थेकडून पथक घरी आल्यानंतर 15 ते 20 मिनीटांत नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण करते. निधन झालेल्या व्यक्तीचे डोळे दृष्टीहिनांना दृष्टी मिळवून देतात.

नेत्रदानात डोळे नव्हे तर केवळ कार्निया काढला जातो. डोळ्यातून काढलेला कार्निया 120 तासांत अंध व्यक्तीत प्रत्यारोपित केला जातो. गरजूला दृष्टी प्राप्त होण्यासाठी कॉर्नियल ट्रान्सप्लांटची गरज असते. अशा शस्त्रक्रिया करणारी केंद्रेही पुरेशा संख्येने उपलब्ध असणे गरजेचे असते. अमरावतीमध्ये सध्या तीन प्रत्यारोपण केंद्रे आहेत. तिथे डॉ.पंकज लांडे, डॉ.प्रवीण व्यवहारे, डॉ. नवीन सोनी, डॉ.अतुल कढाणे,डॉ.मनीष तोटे आदी तज्ज्ञ उपलब्ध आहेत.

हरिना फाऊंडेशनने आतापर्यंत 2 हजार 900 व्यक्तींच्या नेत्रदान प्रक्रियेत सहभाग घेतला. आता शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही जनजागृती सुरु केली आहे. मोर्शी, दर्यापूर व परतवाड्यातही फाऊंडेशनची शाखा सुरु करण्यात आली आहे. स्व.मंगलजीभाई जीवनजीभाई पोपट, स्व.लीलाबेन मंगलजीभाई पोपट व स्व.रोहित दिलीपभाई पोपट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अमरावती जिल्ह्यात 46 नेत्रदान शिबिरे घेण्यात आली. त्याचा लाभ 50 हजार व्यक्तींनी घेतला. खापर्डे बगिच्यात स्व.मंगलजीभाई पोपट नेत्रालयात अत्यल्प दरात संगणकाद्वारे डोळ्यांची तपासणी होते व चष्माही दिला जातो. अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवला जात आहे. सीएस डॉ.श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनात नेत्र चिकित्सक डॉ.नम्रता सोनोने व त्यांची टीम मदतीसाठी तत्पर असते. स्व.मधुसुदनजी जाजोदिया नेत्र प्रत्यारोपण केंद्राद्वारे 290 दृष्टिहिनांवर प्रत्यारोपणासाठी सहकार्य करण्यात आले. गरीब व वंचित घटकांसाठी हा उपक्रम राबवला जात आहे. अवयवदानाच्या चळवळीतही अमरावती जिल्हा आघाडीवर असून, आतापावेतो 15 व्यक्तींचे अवयवदान झाले आहे.

दृष्टीहिनाच्या जीवनात प्रकाश पेरणे हीच मृत व्यक्तीसाठी खरी श्रद्धांजली ठरते. त्यामुळे नेत्रदानासाठी किंवा अवयवदानासाठी कुटुंबियांनीही पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी चळवळ सर्वदूर निर्माण होण्याची गरज आहे. देशातील कुणीही व्यक्ती अंधत्वाची शिकार होऊ नये व अवयवदानाअभावी गरजूला प्राण गमवावे लागू नये यासाठी संकल्प करूया व चळवळीला बळ देऊया.

- चंद्रकांत पाटील अमरावती