मुलांची माहिती दडवणे सरपंचाला भोवले
अमरावती लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बळवंत वानखडे विजयी
लोकसेवा मिळविण्यासाठी अडचणी आल्यास आयोगाकडे दाद मागा – आयुक्त डॉ. एन. रामबाबू
युवकांनी सोशल मीडियाचा वापर कमी करुन आपल्यातील कला वृद्धींगत कराव्यात – मंत्री सुनिल केदार
वऱ्हाडी, कोरकू अशा स्थानिक भाषेतून शासकीय योजनांचा प्रचार
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथ संपदा प्रत्येकाने वाचली पाहीजे - शिवा प्रधान
बौध्द उपासक संघ भिमटेकडी,परिसर,अमरावती द्वारा 124 व्या रमाई जयंतीचा कार्यक्रमसोत्साह सपंन्न
अर्ज लिहिण्यापासून सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध
अंजनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस लिलाव सुरु
आरोग्य उपकेंद्र जारीदा अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरीकांचे ८० टक्के लसीकरण यशस्वीरित्या पूर्ण
तिवसा तहसील कार्यालयात कायदेविषयक जनजागृती
वऱ्हा येथील नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई मिळवून द्या – पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे प्रशासनाला आदेश
शिवसेनेकडून जुन्या शिवसैनिकांची विदर्भात महामंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता
वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवतीची पालकमंत्र्यांकडून विचारपूस
(संग्रहित फोटो)
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
अमरावती, (१० जुलै) : मोर्शी तालुक्यातील बऱ्हानपूर येथील कु. आरती संजय काळे या अभियांत्रिकीच्या युवतीवर दोन दिवसापूर्वी रानडुक्करांनी हल्ला केला. या हल्ल्यात आरती जखमी झाली असून तीच्या पायाला पंधरा टाके पडले. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज तीच्या घरी जाऊन तीची प्रत्यक्ष भेट घेतली. तीची आस्थेने विचारपूस करुन आर्थिक मदत केली. वैद्यकीय उपचारार्थ लागलेला संपूर्ण खर्च व मोबदला वनविभागाने तीला लवकर मिळवून द्यावा, असे निर्देश राज्याच्या माहिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
मोर्शीचे तहसीलदार सिध्दार्थ मोरे, वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद सुरत्ने, पदाधिकारी रमेश काळे यांच्यासह गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, ग्रामीण भागात सध्या शेतीची कामे सुरु आहेत. पीक पेरणीचे दिवस असल्याने वनविभागाने वन्यप्राण्यांकडून गावांत किंवा शेतात हल्ले होणार नाही, यासाठी वनविभागाने दक्षतापूर्वक गस्ती घालाव्यात. वन्यप्राण्यांकडून मणूष्यांवर किंवा बैल, गायी, म्हैस यारख्या पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याच्या घटनांना आळा घालावा. गावातील नागरिक किंवा विद्यार्थीनीवर वन्यप्राण्यांद्वारे हल्ला ही अकस्मात घटना झाली आहे. यापूढे असे प्रसंग घडू नये म्हणून वनविभागाने जंगलाच्या बाजूने कुंपन किंवा मोठा चर खोदून वन्यप्राण्यांना गावात येण्यासाठी अटकाव करावे.
कु. आरतीला रानडुक्कराच्या हल्ल्यात पायाला दुखापत झाली असून पंधरा टाके पडलेले आहे. वनविभागाने तातडीने वैद्यकीय अहवाल प्राप्त करुन तातडीने तीला मदत उपलब्ध करुन द्यावी. तीच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार लक्षात घेता, आरतीचे मदतीचे प्रकरण तत्काळ मार्गी लावून मदत मिळवून द्यावी, असेही श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते पेरणीचा शुभारंभ; विधिवत बैल तिफण पूजन
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
अमरावती, (ता.१३) : 12- मान्सूनचे जिल्ह्यात दमदार आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मूळचे शेतकरीच असलेले राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनीदेखील आज पेरणीचा शुभारंभ केला.
राज्यमंत्री बच्चू कडू व त्यांच्या पत्नी प्रा.डॉ.नयना कडू यांनी विधिवत बैल तिफण पूजन करून पारंपरिक पद्धतीने पेरणीला सुरूवात केली. कोरोनामुळे आधीच सगळे संकटात सापडले आहे.अशातच सततच्या लॉकडाऊनमुळे खते, बियाणेदेखील उपलब्ध होतील की नाही अशी शंका असतानाच लॉकडाऊन शिथील झाले आणि शेतकऱ्यांमध्ये पेरणीसाठी उत्साह संचारला. मात्र, स्वतः राज्यमंत्री बच्चू कडूदेखील आपल्यासोबत शेतात पेरणी करणार हे बघून शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
यावेळी प्रहारचे ज्येष्ठ पदाधिकारी दिपक भोंगाडे, राहुल म्हाला, संदीप मोहोड, गौरव बोंडे, सतीश मोहोड, मनिष मोहोड, उमेश कपाडे व गोलू ठाकुर आदी उपस्थित होते.