Showing posts with label नवी दिल्ली. Show all posts
Showing posts with label नवी दिल्ली. Show all posts

यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील ६० हून अधिक उमेदवारांचे यश, निकालात महिलांची बाजी

 
सह्याद्री | चौफेर न्यूज 

नवी दिल्‍ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण ६८५ उमेदवारांपैकी ६० हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास १० टक्के महाराष्ट्रातील आहेत. यावर्षीच्या निकालात महिलांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातूनही महिला उमेदवार पुढे आहेत. राज्यातून प्रियंवदा म्हडाळकर प्रथम तर अंजली श्रोत्रीय यांचा दूसरा क्रमांक आहे. देशभरातील गुणानूक्रमानुसार या दोघी १३ व्या आणि ४४ व्या क्रमांकावर आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष २०२१ च्या परीक्षेचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमधे महाराष्ट्रातील पाचपेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये प्रियंवदा म्हडाळकर (१३) अंजली श्रोत्रीय (४४), श्रध्दा गोमे (६०), शुभम अशोक भैसारे (९७), अंकित हिरडे (९८), आदित्य काकडे (१२९), शुभम भोसले (१४९), विनय कुमार गाडगे (१५१), ओंकार पवार (१९४), रामेश्वर सब्बनवाड (२०२), अक्षय वाखरे (२०३), अक्षय महाडिक (२१२), तन्मयी देसाई (२२४), अभिजीत पाटील (२२६), तन्मय काळे (२३०), विशाल खत्री ( २३६), संचित गुप्ता (२३७), उत्कर्ष खंडाळ (२४३), मृदुल शिवहारे (२४७), इशान टिपणीस (२४८), प्रतीक मंत्री (२५२), सुयश कुमार सिंग (२६२), सोहम मांढरे(२६७), अश्वीन राठोड (२६५), अर्शद मोहम्मद (२७६), सागर काळे (२८०), रोहन कदम (२९५), रणजित यादव (३१५) गजानन बाळे (३१९), वैभव काजळे (३२५), अभिजीत पठारे (३३३), राहूल देशमुख (३४९), सुमित रामटेके (३५८), विनायक भोसले (३६६), आदित्य पटले (३७५), स्वप्न‍िल सिसळे (३९५), सायली म्हात्रे (३९८), हर्षल महाजन (४०८), शिवहर मोरे (४०९), चेतन पंढेरे (४१६), स्वप्न‍िल पवार (४१८), पंकज गुजर (४२३), अजिंक्य माने (४२४), ओंकार शिंदे (४३३), रोशन देशमुख (४५१), देवराज पाटील (४६२), अनिकेत कुलकर्णी (४९२), शिल्पा खानिकर (५०६), अस्मर धनविजय (५५८), नितीश डोमले(५५९), निरज पाटील (५६०), आकांक्षा तामगाडगे (५६२), आशिष पाटील (५६३), शुभम नगराळे (५६८), अमीत शिंदे (५७०), स्वप्न‍िल माने (५७८), प्रशांत डगळे (५८३), अभय सोनारकर (६२०), अश्विन गोलपकर (६२६), मानसी सोनवणे (६२७), अमोल आवटे (६७८), पुजा खेडकर (६७९).
एक नजर निकालावरः केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी २०२१ मध्ये परीक्षा घेण्यात आली. जानेवारी २०२२ मध्ये मुख्य लेखी परीक्षा घेण्यात आली असून एप्रिल-मे २०२२ महिण्यात मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण ६८५ उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (खुला) गटातून २४४, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) ७३, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) २०३, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) १०५, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ६० उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये २६ दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने १२६ उमेदवारांची आरक्षित सूची तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट ६३, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) २०, इतर मागास वर्ग ३६, अनुसूचित जाती ०७ उमेदवारांचा समावेश आहे. अनुसूचित जमातीच्या एकाही उमेदवाराचा आरक्षित सूचीत समावेश नाही.

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू: भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण 180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) ७२, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) १८, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) ४९, अनुसूचित जाती (एस.सी.) २७, अनुसूचित जमाती (एस.टी.) १४ जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण ३७ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (खुला) १४, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) ०४, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) १०, अनुसूचित जाती (एस.सी.) ०६, अनुसूचित जमाती (एस.टी.) ०३ जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण २०० जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (खुला) ८३, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) २०, इतर मागास प्रवर्गातून ५१, अनुसूचित जाती प्रवर्गातून २६, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून २० उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.
केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण २४२ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (खुला) १०३, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) २३, इतर मागास प्रवर्गातून ६८, अनुसूचित जाती प्रवर्गातून ३१ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून १७ उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब या सेवेमध्ये एकूण ९० जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (खुला) ३६, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) ०८ उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून २५, अनुसूचित जाती प्रवर्गातून १५ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून ०६ उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.       
 ८० उमेदवारांची निवड तात्पुरती असेल. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

गर्भनिरोधकांच्या वापरात मोठी वाढ - देशातील तरूण पिढीला का नकोयत मुलं

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाने आपला पाचवा अहवाल प्रसिद्ध केला. यासाठी आरोग्य मंत्रालयाने भारतातील सर्व राज्यात सर्वेक्षण केलं आहे. 

सर्वेक्षणानुसार भारतात आता प्रत्येक महिलेला सरासरी 2 मुलं आहेत. गेल्या सर्वेक्षणा पेक्षा आता घट झाली आहे तसेच देशातील तरूण पिढीला लवकर मुलं नाही पाहिजे असं दिसतंय. 

आता भारतात गर्भनिरोधकांचा वापर वाढल्याचं दिसून आले. 2015 मध्ये 54 टक्के लोकांनी गर्भनिरोधकांचा वापर करत होते, तर 67 टक्के लोक आता गर्भनिरोधक पद्धत वापरत आहेत.
तसेच आता दवाखान्यात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी 60 टक्के स्त्रिया गरोदर राहिल्यानंतर,पहिल्या तीन महिन्यांत क्लिनिकमध्ये जात होत्या, 
तर आता हे प्रमाण वाढले आता 70 टक्के महिला क्लिनिकमध्ये जातात. सर्वात महत्वाचे म्हणजे सध्या भारतात 89 टक्के प्रसूती रुग्णालयात होत आहेत,असे देखील अहवालातून स्पस्ट झाले.

किरकोळ विक्रेत्याने कॅरीबॅगसाठी माणसाकडून 12 रुपये आकारले. आता त्याला 21,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी लागेल

                       (फाईल फोटो)


विशाखापट्टणम येथील वकील सीपना रामा राव या ग्राहकाने किरकोळ विक्रेत्याकडून 600 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कपडे खरेदी केले होते. चेकआउटच्या वेळी, त्याला आउटलेटचा लोगो असलेल्या कॅरी बॅगसाठी पैसे देण्यास सांगण्यात आले.

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील एका ग्राहक न्यायालयाने अलीकडेच एका किरकोळ विक्रेत्याला ग्राहकाला त्याच्या लोगो असलेल्या बॅगसाठी शुल्क आकारल्याबद्दल नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

विशाखापट्टणम येथील वकील सीपना रामा राव या ग्राहकाने किरकोळ विक्रेत्याकडून 600 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कपडे खरेदी केले होते. चेकआऊटच्या वेळी त्याला कॅरीबॅगसाठी 12 रुपये देण्यास सांगण्यात आले. राव यांनी कॅशियरला सांगितले की ते बॅगसाठी पैसे देणार नाहीत परंतु त्यांनी आग्रह केल्यावर त्यांनी हे प्रकरण स्टोअर व्यवस्थापकाकडे मांडले.

त्याला बॅग फुकट देण्यासही व्यवस्थापकाने नकार दिला. जेव्हा राव यांनी दुकानाची जाहिरात करणाऱ्या बॅगसाठी शुल्क आकारणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले तेव्हा व्यवस्थापकाने त्याच्यावर ओरडले, अहवालानुसार.

त्यानंतर झालेल्या मानसिक छळाबाबत ग्राहकाने भरपाईची मागणी करत शहरातील ग्राहक न्यायालयात धाव घेतली.

टाईम्स ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, विशाखापट्टणम जिल्हा ग्राहक आयोगाने किरकोळ विक्रेत्याला त्या व्यक्तीला 21,000 रुपये नुकसानभरपाई, 1,500 रुपये कायदेशीर खर्च आणि बॅगसाठी आकारलेले पैसे परत करण्याचे आदेश दिले. किरकोळ दुकाने कंपनीचा लोगो असलेल्या कॅरी बॅगसाठी शुल्क आकारू शकत नाहीत.

2021 मध्ये, हैदराबादमधील एका ग्राहक न्यायालयाने असा निर्णय दिला होता की, लाइव्ह लॉ (live law) अहवालानुसार, हे एक अयोग्य व्यापार प्रथा आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्र दालनास देश-विदेशातील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

नवी दिल्ली : राजधानीत सुरु असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (आयआयटीएफ) विद्युत धोरण, स्टार्टअप व हस्तकलांच्या वस्तूंनी सज्ज महाराष्ट्र दालनास देश-विदेशातील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे .

महाराष्ट्र शासनाच्या लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने प्रगतीमैदान येथील हॉल क्र. २ मध्ये ‘आत्मनिर्भर भारत’ या मध्यवर्ती संकल्‍पनेवर सुबक असे महाराष्ट्र दालन साकारण्यात आले आहे. या दालनात राज्यशासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या विद्युत वाहन धोरण, विविध स्टार्टअप, औरंगाबाद औद्योगिक शहर, कोस्टल रोड प्रकल्पाची माहिती देणारे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. राज्याची समृध्द हस्तकला दर्शविणारे उद्योग समूह (क्लस्टर्स),बचतगट आदींचे उत्पादने प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या भारत व्यापार प्रोत्साहन संस्थेच्यावतीने (इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशन) प्रगती मैदानावर सुरु असलेल्या ४०व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात भेट देणाऱ्या देश-विदेशातील ग्राहकांना महाराष्ट्र दालन आकर्षित करीत आहे.

विद्युत वाहन धोरण व स्टार्टअप्सचे आकर्षण:

दालनाच्या दर्शनी भागात स्थित टाटा नेक्सॉन या चार चाकी विद्युत गाडीकडे ग्राहकांची ओढ दिसते. या गाडीत बसून तसेच गाडीचे निरिक्षण करून ही ग्राहक मंडळी राज्याच्या विद्युत धोरणाचीही माहिती घेत आहेत व आपल्या जिज्ञासा, शंका व प्रश्नांचे निरसण करून घेत आहेत. येथून बाहेर पडताना ‘वा, महाराष्ट्र सरकार अच्छी पहल कर रही है’ अशा उत्स‌्फुर्त प्रतिक्रियाही देत आहेत.
दालनाच्या प्रवेशद्वारावरच महाराष्ट्रातील स्टार्टअप्सची उत्पादने व त्यांचे उत्तम सादरीकरण ग्राहकांची पसंती मिळवत आहे. आत्मनिर्भरतेचा संदेश देणारी भली मोठी वज्रमुठ आणि त्याभोवती फिरणा-या खास सायकली,ड्रोन आणि वॉशरुम ओडर फ्री इंस्ट्रुमेंट तर दालनाला भेट देणा-यांना येथेच थबकवते. पुणे येथील जीएमएस स्टार्टअप्सने तयार केलेल्या टायटेनियमपासून निर्मित, वजनाने हलक्या व आकर्षक सायकली, मुंबईच्या स्कायडॉक स्टार्टअपकडून तयार करण्यात आलेले आकर्षक ड्रोन व त्याचे ॲडव्हान्स फीचर जाणून घेण्यासही येथे गर्दी दिसत आहे. न्हानी घरातील दुर्गंध बाहेर काढणारे खास यंत्रही (वॉशरुम ओडर फ्री इंन्ट्रुमेंट) येथे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.
महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य केंद्र ‘मैत्री’, ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ‘उमेद’, महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या ‘माविम’, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या आणि खादी ग्रामोद्योग विभागाशी संलग्न आठ उद्योग समुहांची (क्लस्टर) उत्पादनेही येथील स्टॉलवर प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. राज्याची प्रसिध्द पैठणी साडी, सांगलीची प्रसिध्द हळद, कोल्हापुरी चप्पल व अन्य पादत्राणे, चंद्रपूर व गडचिरोलीचे अनुक्रमे कारपेट क्लस्टर आणि हस्तकलांचे स्टॉल्स, कुडाळ येथील वुडीग्रास हे बांबू पासून निर्मित फर्निचर व वस्तुंच्या स्टॉललाही या दालनास भेट देणाऱ्या ग्राहकांची पसंती मिळत आहे व ते विक्रीही करीत आहेत.

बृह्नमुंबई महानगर पालिकेचा स्टॉलही या दालनात उभारण्यात आला असून देशाची आर्थिक राजधानी म्हणून गौरव असणा-या मुंबई शहराच्या सर्वांगीण विकासाला चालणा देणारे कोस्टल रोड प्रकल्पाविषयी येथे सविस्तर माहिती व आकर्षक प्रदर्शन करण्यात आले आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरीडॉर अंतर्गत सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज व पर्यावरणपूरक अशी एक हजार एकरावर तयार होत असलेले औरंगाबाद औद्योगिक शहराविषयी माहिती देणारा आकर्षक स्टॉलही या दालणास भेट देणा-या व्यापार व उद्योग क्षेत्रातील मंडळींचे लक्ष वेधून घेत आहे.

संशयित अतिरेक्यांनी अनेक ट्रकला लावली आग, आसाममध्ये पाच ट्रक चालकांचा जळून मृत्यू


                          (ndtv credit)

मिळालेल्या माहितीनुसार, दिमा हसाओमधील उमरंगसो-लंका रस्त्यावरील दिस्माओ गावाजवळ बदमाशांनी किमान 7 ट्रक जाळले. तत्पूर्वी, बदमाशांनी अनेक फेऱ्या मारल्या आणि वाहने पेटवली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाच मृतदेह बाहेर काढले.

गुहाहाटी, (२७ ऑगस्ट) : संशयित अतिरेक्यांनी काल रात्री आसामच्या दुर्गम दिमा हसाओ जिल्ह्यातील डायंगब्रा जवळ अनेक ट्रक जाळले. यामुळे पाच ट्रक चालक जळून खाक झाले. मिळालेल्या माहितीनुसार, दिमा हसाओमधील उमरंगसो-लंका रस्त्यावरील दिस्माओ गावाजवळ दहशतवाद्यांनी किमान 7 ट्रक पेटवून दिले. तत्पूर्वी, बदमाशांनी अनेक फेऱ्या मारल्या आणि वाहने पेटवली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाच मृतदेह बाहेर काढले. असे NDTV इंडिया ने वृत्त दिले.

वनहक्क कायद्यांतर्गत प्रलंबित जमिनीचे वाटप आदिवासींना करण्यात यावे – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
नवी दिल्ली, (ता.१७) : वनहक्क कायद्यांतर्गत राज्यातील शेकडो आदिवासींचे प्रलंबित जमिनीचे वाटप लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी आज राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आणि आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांची भेट घेऊन केली.

आज श्री. झिरवाळ यांनी केंद्रीय मंत्री श्री जावडेकर आणि श्री मुंडा यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना निवेदन सादर केले. या बैठकीत राज्यातील आदिवासींशी निगडीत अनेक विषयांवर चर्चा झाली. तसेच आदिवासांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे संबंधितांना निर्देशित करण्याची, मागणीही श्री. झिरवाळ यांनी यावेळी केली.

आतापर्यंत राज्यातील 1 लाख 85 हजार 926 आदिवासी लाभार्थ्यांना 4 लाख 23 हजार 641 हेक्टर जमीन मंजूर करून देण्यात आलेली आहे. आताही शेकडो शेतकरी या लाभापासून वंचित आहेत. त्यांनाही वनहक्क कायद्यांतर्गत लवकरात लवकर जमीन देण्यात यावी, अशी मागणी श्री. झिरवाळ यांनी केली.

पुनर्वसन झालेल्या आदिवासींना नियमाप्रमाणे सुविधा मिळाव्यात

राज्यातील संरक्षित वन क्षेत्रातील आदिवासींचे अनेक गावे हलविण्यात आली असून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले मात्र, आताही पुनर्वसन झालेल्या आदिवासी सुविधेपासून वंचित आहेत. त्यांना नियमाप्रमाणे सुविधा मिळण्याबाबत श्री झिरवाळ यांनी मागणी केली.

नवीन होऊ घातलेल्या राष्ट्रीय महामार्ग सुरत-नाशिक-अहमदनगर (ग्रीनफील्ड) च्या भूसंपादनासाठी आदिवासी भागातील जमीन संपादित केली जाईल. या बदल्यात आदिवासींना वनहक्कातंर्गत जमीन मिळण्याची, मागणी श्री झिरवाळ यांनी श्री. जावडेकर यांच्याकडे केली. याविषयी लकरच केंद्रीय भूपृष्ठ मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले जाईल, असे श्री. जावडेकर यांनी सांगितल्याचे श्री. झिरवाळ म्हणाले.



आदिवासींना जीवनावश्यक वस्तू द्याव्यात

जंगलात वास्तव्यास असणारा आदिवासी जंगलातील लाकडावर अवलंबून असतो. त्यांची ही अवलंबितता कमी करण्यात यावी यासाठी त्यांना सौर ऊर्जा पंप, सौर ऊर्जा स्टोव्ह आणि सौरदिव्यांसह गॅस कनेक्शन देण्याची मागणी, श्री. झिरवाळ यांनी केंद्रीय मंत्री श्री. मुंडा यांच्याकडे केली.

जंगल व्यवस्थापनामध्ये आदिवासींचा सहभाग असावा

आदिवासी लोक आजही मोठ्या संख्येने जंगलाच्या सानिध्यात राहतात. त्यामुळे आदिवासी लोकांचा जंगलांचा चांगला अभ्यास आहे. केंद्रीय वने विभागाने महाराष्ट्रातील 24 लाख एकर जंगलात 13500 संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापित केल्या आहेत. या समित्यांमध्ये आदिवासी लोकांचा सहभाग असावा. अथवा नव्या योजनेव्दारे आदिवासींचा सहभाग करण्यात यावा, मागणी श्री झिरवाळ यांनी श्री जावडेकर यांच्याकडे केली.

जंगलांमध्ये इको पर्यटन सुरू करावे

आदिवासी समाजाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जंगलांध्ये इको-पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात यावे, अशी मागणी श्री झिरवाळ यांनी आजच्या बैठकीत केली. यामुळे आदिवासी समाजाला नवीन रोजगार मिळेल. वैविध्यपूर्ण वन संपदा राज्यात आहे. त्याचा परिचय सर्वदूर करण्यासाठी आणि जंगलांचे महत्व पटविण्यासाठीही इको-पर्यटन महत्वाचे ठरेल, असेही श्री झिरवाळ यांनी बैठकीनंतर बोलतांना सांगीतले.

स्पेशल टायगर रिझर्व्ह फोर्सची संख्या वाढवून मानव-वन्यजीव संघर्ष टाळावा

स्पेशल टायगर रिझर्व्ह फोर्सची संख्या वाढवून मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याची मागणी, श्री. झिरवाळ यांनी केंद्रीय मंत्री श्री. जावडेवर यांच्याकडे केली. ज्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहेत अशा ठिकाणी आदिवासी जंगलांमध्ये राहतात. अशा वेळी आदिवासी लोकांचा थेट संबंध वन्य प्राण्यांशी येतो. मानव-वन्यजीव संघर्षामध्ये अनेक आदिवासी लोकांना आतापर्यात आपला जीव गमवावा लागला आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी स्पेशल टायगर रिझर्व्ह फोर्सची संख्या अशा क्षेत्रात वाढवावी, तसेच अशा फोर्समध्ये आदिवासी तरूणांना भरती करावे, अशीही मागणी श्री. झिरवाळ यांनी जावडेकर यांच्याकडे केली.