Showing posts with label सावली. Show all posts
Showing posts with label सावली. Show all posts

देवटोक येथे शिलापुजन खासदार मा अशोक नेते यांच्या हस्ते

सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली : तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या वैनगंगा नदीच्या काठावरील या तीर्थस्थानी आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते आज शिलापुजन करण्यात आले. यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष परम पूज्य संत मुरलीधर महाराज उपस्तीत होते.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी बाध सभापती संतोष तंगडपल्लीवार, भाजपा अध्यक्ष अविनास पाल,नगसेवक न.प. सावली सौ निलीमाताई सुरमवार,नगराअध्यक्ष न. प.मुल सौ रत्नमालाताई भोयर, न. प. नगरशेविका सौ शारदाताई गुरनुले सावली, ग्रामपंचायत साखरी सरपंच ईश्वरदास गेडाम, उपसरपंच दादाजी पा. किनेकार, नारायनजी गंदेवार, देवराव सा. मुदमवार,आरोग्य अधिकारी जोगडन सर आरोग्य सेविका पुनवटकर, सा. आ. अ. वृषाली गौ. थुल आणि कु. रामटेके त्याचप्रमाणे इतर मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.
 मा खासदार अशोक नेते यांनी दिलेला शब्द पाळला यामुळे या वेळी श्री पुण्यभूमी देवस्थान खंडेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने त्यांचे आभार मान्यण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमपूज्य संत मुरलीधर महाराज तर संचालन जकुलवार सर, आभार डॉ.पवन कवठे यांनी मानले. यावेळी श्री पुण्यभूमी मुरकुंडेश्वर ट्रस्ट चे सचिव नरेश जक्कुलवार, गुणाजी ठोंबरे, नामदेव हजारे, सूरज बोम्मावार, भास्कर पोवनवार, राकेश गोलेपल्लीवार, प्रतीक संगीळवार, निलखंठ फाले, कवेशर पुल्लीवार,यांच्या सह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.

आज पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार देवटोक येथे, शिवपिंडीचे घेणार दर्शन व सामाजिक सभागृहाचे करणार भूमिपूजन


सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

चंद्रपूर : जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार आज दिनांक १ मार्च ला सुप्रसिद्ध असलेल्या देवटोक येथे उत्खननात सापडलेल्या नवीन शिव पिंडीचे दर्शन घेवून मंजूर केलेल्या सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजनासाठी दुपारी १ वाजता येत आहेत.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी मोठी यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे नवीन मंदिर बांधकाम करीत असतांना उत्खननात पुरातन शिवपिंडी सापडली त्यामुळे त्या ठिकाणी भव्य शिव मंदिर निर्माण साठी शीला पूजन कार्यक्रम सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे.

या ठिकाणी यापूर्वीसुद्धा पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन रस्त्यासाठी ६० लाख रुपये मंजूर केले होते त्याचप्रमाणे सामाजिक सभागृहासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आणि त्याचे भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. त्याचप्रमाणे ते उत्खननात सापडलेल्या शिवपिंडीची सुद्धा दर्शन आणि पूजन करणार आहे.

महाशिवरात्री निमित्ताने मोठे भाविक या ठिकाणी येत असल्याने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. श्री पुण्यभूमी पुण्यभूमी मुरकुंडेश्वर देवस्थान यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. संत श्री मुरलीधर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सदर ट्रस्ट काम करत असून यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून कोविड नियमांचे पालन करून या महाशिवरात्री कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

महाशिवरात्रि निमित्त निघालेल्या.पालखीचे सावली शहरात भव्य स्वागत.


सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार 

सावली : श्री पुण्य भुमी तिर्थक्षेत्र श्री मुर्केंडेश्वर देवस्थान पंचकमेटी देवटोक (सिर्सी) येथून महाशिवरात्रि च्या पर्वावर दि 23 फेब्रुवारी पासुन पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर सावली तालुक्यातील अनेक गावांना दर्शन देत सदर पालखीचा समापन सोहळा देवटोक येथे होणार आहे, याचाच एक भाग म्हणून देवटोक येथून निघालेल्या शिव पालखीचे सावली नगराच्या स्मशानभूमी परिसरातील योगी संत नारायण बाबा मठात भव्य स्वागत करण्यात आले.

यावेळी संत मुर्लीधर स्वामी महाराज, हरणघाट, यांच्या प्रमुख उपस्थितीत, नरेंद्र जक्कलुवार सचिव,नामदेव हजारे कोषाध्यक्ष,भास्कर पोहनकर,राकेश गोलेपल्लीवार ग्रा. प. सदस्य, पत्रुजी चुदरी उपाध्यक्ष, गजानन पाल (सेवक) सुधीर महाराज, निलकंठ फाले पुजारी, सोबतच सामाजिक कार्यकर्ता नितीन भाऊ गड्डमवार, अंकुश भाऊ शेंडे,सावली लोकमत दुधे (पत्रकार) बाबा मेश्राम (पत्रकार) प्रकाश लोनबले (पत्रकार )तसेच कार्यकर्ते संजय गेडाम, सोमा मोटघरे, सतीश भाऊ कोतपल्लीवार, कवी पुल्लीवार, वासुदेव मोहूर्लै, सुनिल नापे, मोरेश्वर मंगर, अलोक पोशेट्टीवार, शम कोहपरे, मंगल पिटारे, आदी मान्यवर उपस्थित होते.
   
कोरोना च्या काळात गेली दोन ते तीन वर्षापासून बंद असलेले मंदिर, यात्रा,मज्जीद, जत्रा, सोबत लग्न कार्यक्रम व सामाजिक कार्यक्रम यावर कोरोनाची तिसरी लाट थंडावल्यानंतर काहीसे निर्बंध हटवण्यात आले त्यामुळे अनेक सामाजिक, धार्मिक कार्याना सुरुवात झाली , यातच विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान हे विदर्भातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे,त्यामुळे विदर्भासह अनेक जिल्ह्यातील भाविक तसेच परप्रांतीय भावीक यात्रे दरम्यान येत असतात, मात्र मार्कंडा यात्रेच्या पूर्वी सावली तालुक्यातील देवटोक(सिर्सी ) येथे मोठी जत्रा भरण्याचे.महत्त्व आहे असे जुने जाणकार सांगतात. त्यांमुळे देवटोक मंदीर परीसराचे महत्त्व लक्षात घेता परम पुज्य संत कार्तीक स्वामी महाराज यांचे परमशिष्य ,हरणघाट हनुमान मंदीराचे.उद्धारकर्ते परम पुज्य.संत बाबा मुर्लीधर स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्रि च्या पर्वावर शिव पालखीचे आयोजन करण्यात आले.

सदर पालखीची सुरुवात देवटक येथून सुरुवात झाली असून तालुक्यातील सावली ,जिबगाव, बोथली,किसान नगर, कापसी ,उपरी ,सामदा पाथरी व्याहाळ आदी गांवाना.दर्शन देत.हर.हर महादेव या शिवशंभु चा जयघोष करत.पालखीचा समापन सोहळा देवटोक(सिर्सी) येथे दि 1,2 मार्च.2022 ला प.पु मुर्लीधर स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत.आहे , त्याचाच एक.भाग म्हणून सदर.पालखीचे उत्साहात स्वागत सावली नगरातील जागृत संत.श्री.योगी नारायण बाबा मठात भव्य स्वागत करण्यात आले.

खेडी येथे मा. मनीषाताई चिमुरकर जि.प . सदस्य यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचे उद्घाटन संपन्न


सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार
      
सावली : श्री साई क्रिकेट क्लब खेडी यांच्या वतीने अंडरआर्म क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.क्रिकेट सामन्याचे शुभारंभ दि.१३/०२/२०२२ रोज रविवारला मा. मनीषाताई चिमुरकर सदस्या जि.प.चंद्रपुर यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी सरपंच श्री सचिन काटपल्लीवार, उपसरपंच,सौ.मुक्ताबाई गडतुलवार, माजी सदस्य श्री अनिल माचेवर,श्री अतुलभाऊ लेनगुरे माजी सरपंच सावली,श्री सुरेश नंदुरबार, श्री परशुराम मर्लावार, श्री सागर येलट्टीवार,सर्व ग्रामपंचायत सदस्य,तरुण युवक, गावातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

नगराध्यक्ष पदासाठी इछुकांची सुरु झाली गर्दी; लता वाळके,साधना वाढई,ज्योति गेडाम नाव चर्चेत


सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली : नागरी स्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक निवडणुकीचे नि काल हाती आल्यानंतर अपेक्षे प्रमाने का होईना सा ऱ्याच पक्ष्याने आपापल्या परिने प्रयन्त करुण उमेदवार निवडून आणण्याचा प्रयन्त केला. मात्र,  मतदारानी इतराना आपली जागा दाखवत विकासाच्या दृष्टीने कौल दिला सावली न प निवडणुकीत काँग्रेसने १४ उमेदवार निवडुन आणित पुन्हा दुस ऱ्यादा आपला तिरंगा फडकविला तर भाजपाने ३ उमेदवार निवडून आणून आपले खाते उघडले परंतु बसपा सह इतराची मोठी गोची झाली त्यामुळे सदरचा निकाल अनेकांना आत्मचिंतन करणारा ठरला निकाला नतर नगराध्यक्ष पदाच्या सोडतीकडे. सर्वाचे लक्ष लागले होते अनु जमाती कींवा खुला प्रवर्ग असा अनेकांचा अंदाज असताना सावली नगर पंच्यायत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला निघाल्याने नगराध्यक्ष पदासाठी चढाओढ सुरु झाली त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापु लागले आहे आपल्याच मताची महिला नगराध्यक्ष व्हावी अशी अनेकाची इच्या असून या बाबत निर्वाचित उमेदवारात आंतरिक कुजबुज सुरु आहे त्यासाठी नगराध्यक्ष पदासाठी लता वाळके,साधना वाढ़ई, ज्योति गेडाम आदि नावाची जोरदार चर्च्या सुरु आहे.

सावली नगरपंचायत चे नगराध्यक्ष पद.हे सर्वसाधारण महिला असे निघाल्याने.निर्विवाद बहुमत असलेल्या कांग्रेस पक्षाकडे लता लाकडे, साधना वाढ ई, ज्योती गेडाम यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे, असे असले.तरी यामधे बहुतेक चेहरे हे.पहिल्यांदा निवडुन.आले असून कांग्रेस पक्षाकडे सहा महिलाचा समावेश आहे ,परंतु लता लाकडे या प्रभाग क्रमांक १६ (अनुसूचित जाती महिला) मधून सर्वात जास्त २८३ अशी मते घेत विजय झाल्या यापूर्वी त्या तत्कालीन ग्रामपंचायत असताना सन १९९५ -२००० या कालावधीत त्या सरपंच (भारिप ) म्हणून योग्य कामगिरी बजाविली आणि खऱ्या अर्थाने त्याच्या सामाजिक आणि राजकीय कार्याला सुरुवात झाली. पेशाने अध्यापिका असताना सामाजिक जाण ठेऊन अनेक कार्यात त्या हिरहिरिने भाग घेत महिला संघटन एक वक्त त्यामुळेच जयभीम वाचनालयाच्या विद्यमान अध्यक्ष म्हणून त्या आपले कार्य पार पाडित आहे. त्यामुळेच नगराध्यक्ष पदासाठी लता लाकडे या नावाला अधिक पसंती दिली जात आहे तर दुसरीकडे विचार केल्यास माळी समाजाच्या साधना वाढई या सुध्दा ग्रामपंचायत असताना दोनदा ग्रामपंचायत सदस्य तर ,नगरपंचायत मध्ये रुपांतर झाल्यावर पहिल्या टर्म मध्येही त्या माळी साजाचे नेतृत्व करत निवडुन आल्या. ग्रा.प. ते नगरपंच्यायत पर्यन्त चा मोठा काळ त्यानी प्रशासन नात घालविला त्यामुळे सामाजिक राजकीय आणि स्थानिक प्रशासनाचा दाडगा अनुभव त्यामुळे सुधा नगराध्यक्ष पदासाठी साधना वाढई याचे नाव चर्चिले जात आहे तर सर्वसाधारण गटातून ज्योती गेडाम या निवडून आल्या त्या ढिवर (एन.टी) समाजातील असल्याने त्या सुधा नगराध्यक्ष पदासाठी दावेदार मानल्या जात आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी इछुकांची भाऊ गर्दी सुरु असल्याचे दिसुन येत आहे निवडून आलेल्या महिला पैकी महिला आरक्षण असल्याने अनेकांनी माला संधि मिळावी यासाठी गुड़ग्याला बारशिग बांधुन तयार असले तरी राज्याचे. काबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटिवार यांच्या कार्यावर विश्वास ठेवून सावली नगराचा कायापालट कसा करता येईल यावर जोर देत सावली वासियांनी कांग्रेसला निर्विवाद दुसऱ्यानंदा संधि बाहाल केली आहे त्यामुळेच नगराध्यक्ष पदाची माळ नेमकी कोणत्या महिलेच्या गळ्यात पडेल हे पक्षश्रेष्ठीच ठरवेल. मात्र, लता लाकडे या नावाला अनेकांची अधिकच पसंती दिली जात असल्याचे चर्चेत समोर येत आहे.

मोठी बातमी : राज्यातील सर्व शाळा पुन्हा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती


सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली : राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून म्हणजेच 24 जानेवारीपासून सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. 

 तसेच पालकांची समंती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असं संपूर्ण शिक्षण सुरू होणार आहे. असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.शाळांबाबतचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे :कोरोनाचा प्रादुर्भाव आणि इतर बाबी पाहून स्थानिक प्रशासन शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेऊ शकणार आहेत. त्याबाबतचे सर्व निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आले आहेत. असं शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. 

 दरम्यान, राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे आता शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी विविध घटकांतून केली जात होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

मालपिरंजी येथे स्मशानभूमी मध्ये नवीन हातपंपाचे भूमिपूजन

सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली : तालुक्यातील कवठी पं.स.क्षेत्रात येणाऱ्या मालपीरंजी या गावात स्मशान भूमी मध्ये नवीन हातपंपाची गरज लक्षात घेऊन पंचायत समितीच्या माजी सभापती तथा पं सं.सदस्य सौ.छायाताई शेंडे यांनी 15 वा वित्त आयोग (पं. स.स्तर) अंतर्गत 1.25 लाख मंजूर करून नवीन हातपंप मंजूर करून घेतला.
     
यावेळी हातपंपाचे भुमिपूजन सौ छायाताई शेंडे सदस्य पं. स.सावली यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित अर्जुन भोयर कोषाध्यक्ष भाजपा सावली ,प्रकाश पा.गड्डमवार जेष्ठ नेते भाजपा सावली,जगन संगावार,रघुनाथ नैताम,सुरेश गोरलावर,जांकिराम मडावी संतोष एडमलवार,नानाजी एडमलवार,गजानन एडमलवार,मारोती कुळमेथे, सुनीता जुमनाके,शीतल मडावी,दिलीप गडमवार,राकेशभाऊ मडावी,दीपक शेंडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

अखेर मद्यपी शिक्षकावर निलंबनाची कारवाई - मुख्यकार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांचे आदेश.

सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली : शालेय वेळेतही शिक्षक मद्यधुंद अवस्थेत राहत असल्याची पालकांची तक्रार व पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांचे भेटीत आढळल्याने संबंधित शिक्षकाची पाथरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली होती.

शिक्षकाच्या वैद्यकीय तपासणीनंतर गुन्हा दाखल करून कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदला सादर करण्यात आला. प्रकरणाची दखल घेत मुख्यकार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी दिलीप ढोक या शिक्षकास निलंबित केले.
    
सावली तालुक्यातील उसरपार तुकुम येथील मुख्यध्यापक दिलीप ढोक हे नेहमी दारू पिऊन येत असल्याने पालकांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. तक्रारीची दखल घेत सभापती विजय कोरेवार यांनी अचानक शाळेत भेट दिली असता मुख्यध्यापक दारू पिऊन आढळले. शालेय वेळेत दारू पिऊन कर्तव्यात असल्याची तक्रार खुद्द सभापती विजय कोरेवार यांनी पाथरी पोलीस स्टेशनमध्ये केली. सदर शिक्षकाची वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल करण्यात येऊन पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून कारवाईकरीता अहवाल जिल्हा परिषदला सादर केला. या प्रस्तावाची दखल घेत मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाचे आदेश दिले. सभापती विजय कोरेवार यांच्या धडक कारवाईमुळे सावली तालुक्यात खळबळ माजली आहे.

शिक्षणासारख्या पवित्र कार्यात दारू पिऊन राहणे ही गंभीर बाब आहे. असाच प्रकार केशरवाही शाळेत चालत असल्याने येथील शिक्षक रजनीकांत गेडाम व इतर कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिक्षकांचा प्रस्तावही जिल्हा परिषदला पाठविला आहे. त्यांच्यावरही योग्य ती कारवाई केल्या जाईल. 
    विजय कोरेवार
सभापती पंचायत समिती सावली.

ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे निधन; काल टीव्हीवर लाइव्ह होते आणि.

..
सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली: : (दिनांक-१४जानेवारी) ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे आज लखनऊ येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने टीव्ही पत्रकारितेतील एक प्रसिद्ध चेहरा काळाच्या पडद्याआड गेला असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरे बोलले कमाल खान हे गेल्या ३० वर्षांपासून एनडीटीव्हीत होते. सध्या ते लखनऊ ब्युरोचे प्रमुख होते. अगदी कालच त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर विशेष रिपोर्टिंग केले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण त्याआधीच त्यांचे निधन झाले होते. कमाल खान यांच्या पश्चात पत्नी रुची कुमार आणि मुलगा अमन असा परिवार आहे. रुची कुमार यासुद्धा पत्रकार आहेत.

कमाल खान यांच्या निधनाने टीव्ही पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली असून राजकीय क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कमाल खान यांना उत्कृष्ट पत्रकारितेसाठी रामनाथ गोयंका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कारही मिळाला होता.
राजकीय नेते हळहळले..
.
कमाल खान यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्रद्धांजली वाहिली. 'कमाल खान यांच्या निधनाने पत्रकारितेची कधीही भरून निघू शकणार नाही अशी हानी झाली आहे. एका निष्पक्ष पत्रकाराला आज आपण मुकलो आहोत', अशा शोकभावना आदित्यनाथ यांनी व्यक्त केली.

ग्रामिण भागातील शाळा सुरू करण्यात यावे - सावली तालुक्यातील पदाधिकारी यांची मागणी

सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली : कोविड, ओमायक्राॅनचा धोका लक्षात घेता १५ फरवरीपर्यंत शाळा बंद करण्याचा आदेश शासनाने दिला आहे. या आदेशामुळे पालक व ग्रामिण भागातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरलेला आहे त्यामुळे सावली पंचायत समितीचे सभापती व सरपंच, उपसरपंच, पालक यांनी शाळा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे पाठविले आहे.

मागील 2 वर्षापासुन शाळा बंद होत्या काही महीण्यापूर्वी शाळा सुरू झालेल्या आहेत व ते सुध्दा बंद करण्यात आल्याने ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांनाचे फार शैक्षणिक नुकसान होत आहे. ग्रामिण भागात मोबाईल व नेटवर्कचा प्रश्नामुळे मागील काळात एकही विद्यार्थी आॅनलाईन शिक्षण घेऊ शकला नाही. ग्रामिण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव फार कमी असल्याने व विदयार्थ्यांची संख्या फारच कमी असल्याने शाळाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक ग्रामपंचायतीना दिला पाहीजे. अशी मागणी केली आहे.
 पंचायत समिती सावली अंतर्गत तालुक्यातील विद्यार्थी पटसंख्या फारच कमी आहे. वर्ग १ ते १२ वि पर्यंत असलेल्या शाळा एकुण १२० आहेत. त्यापैकी १ ते ३० पटसंख्या असलेल्या शाळा २९ आहेत. ३१ ते ५० पटसंख्या असलेल्या शाळा १८ आहेत. ५० ते १०० पटसंख्या असलेल्या शाळा १९ आहेत व १०१ ते २०० पटसंख्या असलेल्या शाळा ३४ आहेत तर २०१ पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळा २० आहेत. त्यामुळे १०० पटसंख्या असलेल्या शाळा कोरोनाचे नियम पाळून नियमित सुरू होऊ शकतात तर जास्त पटसंख्या असलेल्या शाळा एकदिवसाआड घेता येईल. असेही निवेदनात सुचविले आहे.

शाळा बंद असल्यास मुले कोणतेही कोरोनाचे नियम न पाळता गर्दीत व इतरत्र भटकत असतात. शाळा सुरू असल्यास कोरोना किंवा इतर आजाराचे लक्षण लवकर लक्षात येऊन उपचार करता येते. शाळा बंद असल्यास शैक्षणिक नुकसानीसोबतच आरोग्याची काळजी पालकांना आहे. शासनाने आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय दिला आहे मात्र ग्रामिण भागातील ९० टक्के पालकांकडे अॅंड्राईड मोबाईल नाही. ज्यांचेकडे मोबाईल आहे त्यांचा मुलांकडून शिक्षणासाठी वापर न करता गेमसाठी वापरत असल्याचा अनुभव आलेला आहे. ग्रामिण भागातील मुले गावातीलच शाळेत जात असल्याने पायीच जातात. त्यामुळे वाहनातुन दाटीत जाण्याचा प्रश्नही येत नाही.
कोविडची परीस्थिती लक्षात घेता स्थानिक पातळीवर शाळा बंद करता येईल. परंतू सरसकट शाळा बंद करणे हे ग्रामिण जनतेवर अन्यायकारक आहे. असल्याने ग्रामिण भागातील शाळा सुरू करावे अशी मागणी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, सदस्या छाया शेंडे, व्याहाड खुर्दचे सरपंच सुनीता उरकुडे, जीबगावचे सरपंच पुरुषोत्तम चुधरी, उसेगावचे सरपंच चक्रधर दुधे, पेंढरी मक्ता सरपंच ठुमदेवी वलादे, घोडेवाही उपसरपंच चेतन रामटेके, केरोडा उपसरपंच ओमप्रकाश ढोलणे, व्याहाड खुर्द उपसरपंच भावना बिके, हिरापूर शाळा अध्यक्ष संजय सायत्रावार, पालक अजय मारकवार, ईश्वर बट्टे, श्रीकांत बहिरवार, सचिन इंगुलवार, राकेंद्र वलादे यांनी तहसीलदार सावली यांचे मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे निवेदन पाठविले.

कै. मा.सा. कन्नमवार जयंती निमित्य वाचनालयाला आलमारीची भेट

सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली : महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आदरणीय मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंती निमित्य त्यांना अभिवादन करीत सावली येथील कै. मा.सा. कन्नमवार सार्वजनिक वाचनालयात दि महाराष्ट्र अर्बन को ऑप. संस्थेच्या वतीने पुस्तके ठेवण्यासाठी कपाट देण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष चरणदासजी बोम्मावार यांनी या कपाट चे फित कापून उदघाटन केले. यावेळी वाचनालय चे अध्यक्ष सूरज बोम्मावार, तसेच दि महाराष्ट्र अर्बन चे संचालक,व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

कोविड 19 मुळे छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वाचनालयाच्या वतीने पतसंस्थेचे आभार मानण्यात आले.

रेफरच्या नादात मातेने गमावले आपले अडीच किलोचे बाळ

सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली : पेंढरी उप केद्रतील कर्तव्यावर असणाऱ्या परिचारीकेच्या बेजबाबदार पणामुळे रेफरच्या नादात एका गरीब पीडित मातेला आपल्या अडीच किलोच्या गोंडस उपजत बाळास मुकावे लागले. या संदर्भात तालुका आरोग्य विभागाकडे सभपतिच्या माध्यमातून तक्रार दिल्या नतर ही महिन्याचा काळ लोटूनही दोषिवर कार्यवाही थठंबसत्यात असल्याचे दिसुन येत आहे.

सदर प्रतिनिधिनी या बाबत पीडीत मातेशी संपर्क साधला असता, आपल्या गोंडस बाळास आरोग्य सेवेच्या अपुऱ्या सोईमुळे गमावलेल्या पीडीत मातेने आपली व्यथा मांडली. त्या नुसार तालुक्यातील जवळच असलेल्या आणि चारशे लोकवास्तिच्या गावात अनु.जमातीचे वास्तव्य आहे. गावालगत जंगली भाग असल्याने नेहमीच वन्य जीवांचे दर्शन होत असते,अश्या परीस्थिती भागातील लोकांचे जीवन, पती मोलमजूरी करुण कुटुंबाचा प्रपंच चालविणाऱ्या पीडीत महिला,शिल्पा मोरेश्वर गावळे ३० वर्ष रा. पांढरसराड ही दूसऱ्यानंदा गर्भवती राहिली. परिस्थिति बेताची असूनही या कालावधीत आपले बाळ सुखरूप व्हावे. या उद्देश्याने तिने खाजगी सह सरकारी आरोग्य सेवेचा आधार घेतला. गरोदर पणाचा कालावधी पूर्ण होते वेळी ३/११/२१ रोजी पुन्हा तपासणी करुण बाळ योग्य असल्याची खात्री करुण घेतली. मात्र, २९/११/२१ रोजी पोटात दुखत असल्याने पीडीत मातेने रुग्णवाहिका अभावी खाजगी वाहनाने आई भाऊ व मामी च्या मदतीने नजीकच्या उपकेंद्र पेढरी येथे आशा वर्कर वीणा सह नेण्यात आले. त्यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या परिचारीकेने पीडीत मातेला कोणत्याही तपासणी वीणा रेफरचा सल्ला दिला. तोपर्यंत बाळाचे पाय बाहेर आले होते केवळ डोक फसुन असल्याने उपकेंद्र पेंढरी ते सावली ग्रामीण रुग्णालय या १० कि.मी च्या प्रवासात गुदमरुन बाळाचा सावली रुग्णालयासमोर खाजगी वाहनातच मृत्यु झाला
 आणि पीडीत मातेने उप केंद्र पेढरी येथील कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिकेच्या रेफर केल्याने आपले गोंडस बाळ गमविले. सदरच बाळंतपण पेंढरी उप केंद्रात योग्य रीतीने करता आले असल्याचे सावली येथील आरोग्यकर्मचाऱ्या कडून सांगण्यात आले. मात्र, पेंढरी उपकेंद्रातील परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे उपजतबालकाचा मृत्यु झाला. त्यामुळे दोषिवर कार्यवाही करण्यात यावी. अशी पीढित मतेची मागणी आहे. घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन पं स सभापतीनी दोषी विरुद्ध तालुका आरोग्य विभागाकडे तक्रार केली. मात्र, महिन्याचा काळ लोटूनही कार्यवाही थंडबसत्यात असल्याचे दिसुन येत आहे. पोटदुखन्यापासून ते बाळंतपण या कालावधीत सदर उपकेंद्राअंतर्गत ना आशा वर्कर;ना परिचारिका; ना रुणवाहिका अशी कोणतीही सुविधा या कालावधीत पीढित मातेला मिळू शकल्या नाही. सोबतच बाळाच्या मृत्यु पश्च्यात मातेला कोणतीही साहनुभूती कर्तव्यावर असणाऱ्या आरोग्य सेवेकडून मिळू शकल्या नसल्याची खंत पीड़ित मातेकड़ून व्यक्त केली जात आहे.

 उपकेंद्रा अंतर्गत दिल्या जाना ऱ्या १ ते १६ सुविधा पैकी क्र.६. गारोधर माता नोंदणी तपासणी व उपचार ; क्र .७ प्रसूति सोय क्र.८ प्रसुतिपश्यात सेवा पैकी कोणतीही सेवा पीढित मातेला योग्य रित्या मिळू शकल्या नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे मग कर्तव्यावर कसूर करुण रेफरच्या नावावर गरीब मातेला तिच्या उपजात बालकास मुकविणाऱ्या दोषिवर कार्यवाही होणे गरजेचे आहे.

3 कोटी खर्च करुन बांधण्यात आलेली आरोग्य केन्द्राची इमारत धुळखात

सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली : तीन कोटि छेचाळीस लाख रुपये खर्च करुण ईमारत सुसस्ज बांधकाम बांधण्यात आले. मात्र,ती ईमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. जिबगाव येथील प्राथमिक स्वास्थ केन्द्राच्या नवीन इमारती बांधकाम करण्यासाठी राकेश गोलेपेलीवार यांनी अनेक प्रत्र केले असताना ३ कोठी ४६ लाख रुपये निधी मंजुर होत, प्रा आरोग्य केंद्र नविन ईमारतीचा बांधकाम पुर्ण झाला.  मात्र मा ईमारत धुळखात पडली आहे. 
 
तालुक्यातील अनेक वर्षांपासून जिबगांव येथील प्रा. आरोग्य केंद्र अंगणवाडी ईमारतीच्या दोन छोट्याशा खोलीत स्थलांतर करण्यात आले. मात्र अगंणवाडी ईमारत पाऊसात गळत असल्यामुळे छोट्याशा उपकेंद्र येथे दोन तीन वर्षापासुन स्थालानंतर करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी याना मोठ्या अडचणींचा सामना करून आरोग्य सेवा देताना दिसुन येत आहेत. तेव्हा सामाजीक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार यानी त्यावेळचे तत्कालीन आमदार प्रा आ अतुल देशकर यांना जिबगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र च्या ईमारतीचे बांधकाम करण्यासाठी पाठपुरवठा केले असता प्रा.देशकर यानी दखल घेत जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचे सोबत स्वतः बसुन स्मशानभुमीची सात एकर जागे पैकी तिन एकर जागा प्रा.आरोग्य केंद्र साठी राखीव करून घेतली. त्यानंतर एक कोटी विस लाख रुपये नीधी मंजुर करण्यात आले होते. पंरतु ती निधी इमारत बांधकामासाठी कमी पडत होती. त्यामुळे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपुर जिल्हाचे पालकमंत्री व अर्थ मंत्री असताना त्यांचेकडे सामाजीक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार यानी पाठपुरावा केला असता अंदाजे तिन कोटी छेचाळीस लाख सत्ताविस हजार रुपये मंजूर करून घेण्यात आले. त्यानंतर आलेल्या निधी खर्च करून बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र आरोग्य सेवा मिळावी म्हणून ईमारती बांधकाम करण्यात आली. परंतु ईमारतीचे बांधकाम पुर्ण होऊनही ईमारत धुळ खात असल्याने ईमारतीचे लोकार्पण सोहळा पार पाडण्यात यावी व उत्तम सेवा मिळावी अशी मागणी होत आहे. अशातच जिबगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ईमारतीची पाहणी करण्यासाठी अनेक नेते व अधिकारी यांनी वेळोनवेळी भेट देत प्रा आरोग्य केंद्र च्या ईमारतीची पाहणी करीत असतात पण प्रा आरोग्य केंद्र ईमारतीचा  लोकार्पण सोहळा केव्हा पार पडणार आहे याचे कडे कुणाचे लक्ष वेधत नसल्यामुळें जिबगांव परिसरातील जनता त्रस्त आहे. तर दुसरी कडे प्रा आरोग्य धुळखात पडली असुन सर्वाना विसर पडले आहेत. याकडे लक्ष कोण देणार व आरोग्य प्रा इमारतीचे लोकार्पण सोहळा पार पाडुन उत्तुम आरोग्य सेवा मिळणार का? असे प्रश्न उपस्थित होत होते. तेव्हा ग्रा प सदस्य, माजी तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार यांनी मा. उद्ववजी ठाकरे मुख्खमंत्री मा. राजेश टोपे आरोग्य मंत्री महा रा, व जिल्हाचे पालकमंत्री तथा सावली-ब्रम्हपुरी क्षेत्राचे आमदार मा. विजय वडेटीवार,यांना सुध्दा पत्र पाठविलेले आहेत तर, चिमुर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते,माजी चंद्रपुर जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,जि प अध्यक्ष चंद्रपुर संध्याताई गुरुनुले, मुख्यकार्यकारी अधिकारी जि प चंद्रपुर,जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपुर यांना प्रत्र पाठवण्यात आले असताना देखील मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे.