सावर्ला येथील घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात यावी-प्रवीण खानझोडे

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : तालुक्यातील सार्वला येथील घरकुल लाभार्थ्यांना नोव्हेंबर २०२४ मधे महाराष्ट्र शासनाच्या वतीने वणी पंचायत समितीच्या माध्यमातून घरकुल मंजूर होऊन त्याचा १५००० रुपयाचा पहिला हफ्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला व त्यानुसार त्यांनी राहते घर उकलून घरकुल बांधायच असल्याने तात्पुरती राहायची व्यवस्था केली.

मात्र,फक्त रेतीअभावी घरकुल लाभार्थी आज उघद्यावर आले आहे. त्यामुले तहसीलदार वणी यांना सार्वला येथील घरकुल लाभार्थी ने रेती उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवीण खानझोडे लढा संघटना चे संयोजक वणी यावेळी सार्वला येथील गावातील लाभार्थी पांडुरंग आवगाण, श्रीराम चिव्हाने, कर्नू नैताम, शंकर बावणे, विकास चौधरी, जंगलू नैताम, सुनीता ठमके, संतोष मडावी, संजीवनी मुन, प्रताप मुन, उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेंडे, अजय धोबे, आशिष रिंगोले, विकेश पानघाटे यांचीही उपस्थिती होती.

वणीत 22 मार्चला विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील मनिषा सुरेंद्र निब्रड व संस्कार भारती समिती आणि सागर झेप बहुउद्देशीय संस्था वणी यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत जिनींग, येथे जागतिक महिला दिन निमित्त २२ मार्चला साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त अ गट, ब गट, क गट, व ड गट अशी विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

यानिमित्त सकाळी अकरा मान्यवरांच्या उपस्थित दीपप्रज्वलन व जागतिक महिला दिन सोहळा होणार आहे. त्यानंतर दोन ते दहा या वेळात नृत्य स्पर्धा होणार आहे. अ- वयोगट ६ ते १३ असेल, ब- वयोगट १४ वरील आहे तर क-गट हा फक्त महिलाकरिता असणार आहेत. यासाठी (अ) गटाची १०० रुपये, (ब) गटाची २०० रुपये, (क) गट १०० रुपये, तर (ड) गट, महिला स्पेशल समूह नृत्य स्पर्धा गटाची २०० रुपये अशी फी ठेवण्यात आली आहे. स्पर्धेत काही नियम घातले आहे. ते पुढीलप्रमाणे असणार आहे. 
१) पेनड्राईव्ह किंवा मोबाईल मध्ये गाणे असावे. 
२) कोणत्याही गीतावर नृत्य सादर करता येईल,  
३) एकल नृत्याचे गीत फक्त 3 मिनिट राहील. 
४) समूह नृत्य ५ मिनिटांचे राहील.    
५) प्रत्येक स्पर्धेकाला नोंदणी शुल्क देतांना फार्म भरून देणे आवश्यक राहील. 
६) सर्व अधिकार आयोजकांचे राहील. 

पारितोषिक म्हणून प्रथम क्रमांकास, द्वितीय, तृतीय, प्रोत्साहन सन्मानचिन्ह देऊन सर्व स्पर्धेकांना गौरविण्यात येणार आहे. महिलांकरिता खास बक्षिसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सागर मुने यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या अन्यथा आंदोलन छेडू - तालुका काँग्रेस कमिटीचे उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 
 
वणी : विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात महायुतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले होते. आणि शेतकऱ्यांनी भरभरून मतदान करून महायुतीचे सरकार स्थापन झाले. मात्र सरकारला आता आपल्या दिलेल्या वचनांचा विसर पडत चालला की काय असेच दिसत आहे. सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केलेली नाही त्यामुळे सरकारला केलेल्या घोषणेचा विसर पडला की काय शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी कधी देणार असा प्रश्न वणी तालुका काँग्रेस कमिटीने उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जाच्या डोंगराखाली दबलेला आहे. खरीप हंगाम 2025 काही महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या तोंडावर आहे व त्यांच्या समोर मोठी समस्या म्हणजे शेती करिता झालेला खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ लावला तर खर्चापेक्षा उत्पन्न कमी, असे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. त्यामुळे पुढील हंगामातील शेती कशी करायची व शेतीला खर्च कसा लावायचा या विवंचनेत शेतकरी आहे. वणी झरी, मारेगाव परिसरात काँग्रेस कमिटीने दौरे करून माहिती गोळा केली असता, असे दिसून आले की परिसरातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उत्पादन खर्चात झालेली वाढ, बी - बियाणे व खताच्या किमतीत झालेली वाढ आणि शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव, शेतीकरिता मजुरांची कमतरता, परिणामी मजुरीचे दरात झालेली वाढ या कारणामुळे शेतकऱ्यांकडे घेतलेले कर्ज भरण्याची ऐपत राहिली नाही. त्यामुळे बरेच शेतकरी पुढील शेती कशी करायची बँकेचे कर्ज कसे फेडायचे, मुलीचे लग्न आणि बारा महिन्यांचा शेतीचा व प्रपंचाचा खर्च कसा चालवायचा या विवंचनेत आत्महत्येला सुद्धा सामोर जात आहे. 

महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे सरकार मायबाप सरसकट कर्जमाफीची घोषणा करेल या आशेवर शेतकरी सरकारकडे चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. तरी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी वणी तालुका काँग्रेस कमिटीचे वणी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. येत्या पंधरा दिवसात जर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली नाही तर मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना व शासकीय कामाकरिता रेती उपलब्ध करून द्या - सरपंच संघटनेची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

यवतमाळ : जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना व शासकीय कामाकरिता रेती उपलब्ध करून द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम माथनकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
 
यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रमाई, शबरी, आदीम, मोदी आवास व पंतप्रधान आवास योजना मंजूर झाल्या असून रेती अभावी घरकूल योजनेचे सर्व कामे व ग्राम पंचायत स्तरावरील शासकीय विकासात्मक कामे रखडलेले आहे. यवतमाळ जिल्हा विभागामध्ये १६ तालूके असून प्रत्येक तालूक्यामध्ये २ रेती घाट घरकूल योजना व ग्राम पंचायत अंतर्गत शाककीय विकासात्मक कामाकरीता राखीव देण्यात यावे. याआधी सरपंच संघटनेच्या वतिने दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ ला निवेदन देण्यात आले होते,मात्र यवतमाळ जिल्ह्यातील रेती घाट अद्याप सूरू करण्यात आलेले नाही. १५ दिवसाच्या आत रेती घाट सूरू न केल्यास महाराष्ट्र प्रदेश संघटना यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने तिर्व आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी जिल्हा अध्यक्ष तुकाराम माथनकर, सौ सविता जाधव जिल्हा महामंत्री, निलेश पिंपळकर यवतमाळ तालुका अध्यक्ष उमेश राठोड, प्रमोद नाटकर व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

कुमार चिंता पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचेतर्फे यवतमाळकरांना आवाहन व निर्देश

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या मार्फतीने यवतमाळ जिल्हयातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, नागपुर शहरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभुमीवर कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे किंवा दोन धर्मामध्ये तेढ पसरविणारे आक्षेपार्ह मॅसेज, इमेजेस, व्हिडीओज घटनेची व माहितीची शहानिशा न करता व्हॉटसअॅप, फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्राम व ईतर सोशल मिडीया माध्यमांवर पोस्ट प्रसारीत करु नये. कोणत्याही अफवा पसरवु नये. अशा कोणत्याही पोस्टमुळे दोन व्यक्ती, समाज, धर्म पंथ अशांच्या भावना दुखावुन समाजात तणाव निर्माण होवुन कोणतीही अनुचित घटना घडल्यास सदर पोस्ट करणाऱ्या इसमांस गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याचे समजुन त्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

यवतमाळ जिल्हयात सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त नेमण्यात आलेला असुन सर्व पोलीस दल सतर्क आहे. तसेच सोशल मिडीया मॉनीटरींग सेल स्थापन करण्यात आला असुन सर्व व्हॉटसअॅप, फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्राम व ईतर सोसल मिडीया माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. याव्दारे यवतमाळ जिल्हयातील सर्व नागरींकाना निर्देश देण्यात येते की, नागपुर शहरातील झालेल्या घटनेच्या संदर्भाने खोटे मॅसेज व अफवा सोशल मिडीयावर पसरविण्यास तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्या व संबधीत ग्रुप अॅडमीन यांना जबाबदार धरण्यात येईल असे कृत्य करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच भारतीय न्याय संहीता प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, तरी सर्व व्हॉटसअॅप अॅडमीन यांना सुचित करण्यात येते की, आपण सर्वांनी यवतमाळ जिल्हयामध्ये शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस दलास सहकार्य करावे.