मच्छिन्द्रा गटग्रामपंचायत अंतर्गत 24 डिसेंबर 'पेसा दिन' साजरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मच्छिन्द्रा गट-ग्रामपंचायत अंतर्गत 24 डिसेंबर 'पेसा दिन' कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्याचा उद्देश पेसा ग्रामपंचायतींतर्गत पेसा गावांमध्ये पेसा कायद्याविषयी जनजागृती करावी, नागरिकांपर्यंत पेसा कायद्याची माहिती देण्यासाठी विविध उपक्रम साजरे करावे, नागरिकांनी देखील या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन पेसा दिवस साजरा करावा या बाबत जनजागृती करण्यात आली.
त्यामध्ये ग्रामपंचायत चे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पेसा अध्यक्ष, व इतर आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गट, मोबाईलायजर आदी कर्मचारी व गावातील नागरिक आणि महीला वर्ग उपस्थीत होते.

सर्वप्रथम गावातून प्रभात फेरी काढण्यात आली, त्यानंतर क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. शाळेतील मुलांनी आदिवासी पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन, मार्गदर्शन व आभार प्रदर्शन सचिव श्री.एम ए तिरपूडे यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायतची सभा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

खैरी रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करा; ग्रामवासीयांनी आंदोलन छेडून केली मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : खैरी स्टॉप ते वरोरा कडे जाणाऱ्या सिमेंट रोडचे अर्धवट काम तत्काळ सुरु करा, यामागणीला घेऊन खैरी ग्रामस्थांनी आज मंगळवारला सकाळी 11 वाजता नमूद रस्त्यावरच आंदोलन सुरु केले. यावेळी किमान एक तास वाहतुक कोलमडली होती.

गेल्या दिड वर्षांपासुन खैरी गावाच्या मुख्य मार्गाचे काम अतिशय संथगतीने आहे. त्यामुळे खैरी गावातील शाळेतील विद्यार्थी, शेतकरी, तसेच वाहनचालकांना खूप नाहक त्रास सहन करावा लागत होता,रस्त्याच्या अर्धवट कामामुळे अनेक अपघात होऊन किरकोळ दुखापतीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांना पण येजा करावी लागत असल्याने अनेकदा मोठ्या वाहनांचे चाक रस्त्याच्या खाली उतरुन रस्त्यावरील रखडलेली गिट्टी विद्यार्थ्यांच्या डोक्याला लागत असल्याची ओरड होत असल्याने सदर रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र, संबंधित विभागाकडून काम विलंब होत असल्यामुळे संथगतीने होणारे रोडचे काम हे जलद गतीने करून लवकरात लवकर रोडचे काम पूर्ण करण्यात यावे,या मागणीसाठी खैरी गावातील ग्रामस्थांनी आज चक्क रोडवर बसुन "चक्काजाम आंदोलन" करण्यात आले. 

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी आंदोलनास भेट देऊन रोडचे काम हे सुरु करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन जोरदार मागणी केली होती. 

माजी आमदार बोदकुरवार यांच्या मुळे शेतकऱ्याचा कापूस खरेदी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : कृषी उत्पन्न बाजार समिती वणी येथे सी.सी.आय कडून कापूस खरेदी सुरू आहे. दिनांक 23 डिसेंबरला शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर कापूस विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत गाड्या आणल्या होत्या. दिवसभर खरेदी होवूनही सायंकाळ पर्यंत 150 ते 200 गाड्या बाजार समितीच्या आवारात उभ्या होत्या. वेळ झाल्यामुळे सी.सी. आय. ने खरेदी बंद केली. ही बाब माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना समजताच त्यांनी बाजार समिती गाठून वरिष्ठांशी बोलणी करून तत्काळ कापसाच्या गाड्या खरेदी करायला लावल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. 
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कापसाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दररोज सी.सी. आय. ठरलेल्या वेळेपर्यंतच कापूस खरेदी करते. परंतु खेड्या - पाड्यावरून आलेल्या शेतकऱ्यांना येथे बाजार समितीत कापसाच्या गाड्यासह मुक्काम करणे अतिशय त्रासदायक आहे. काल शेतकऱ्यांच्या कापसाच्या गाड्या बाजार समिती परिसरात उभ्या असल्याची माहिती मिळताच माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सायंकाळी 6 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती गाठली. तिथे शेतकरी बांधवांच्या अवस्था पाहून त्यांनी लगेच अकोला झोनचे मुख्य व्यवस्थापक निरज कुमार यांच्याशी संपर्क साधून सी.सी.आय. ने कापूस खरेदी सुरू करून बाजार समितीच्या आवारात उभ्या असलेल्या शेतकरी बांधवांच्या गाड्या सोडण्यात याव्या याविषयी विनंती करून वणी केंद्र प्रमुख हेमंत ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्वरित 10 मिनिटात शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करायला भाग पाडले. यावेळी उपसभापती विजय गारघाटे,सतीश दोरखंडे उपस्थीत होते.
माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे या परिसरात असलेल्या शेतकऱ्याची होणाऱ्या हाल अपेष्टा पासून सुटका मिळाली. सर्व शेतकऱ्यांनी माजी आमदार बोदकुरवार यांचे मनापासून आभार मानले.

सौ. तृप्ती उंबरकर यांच्या वाढदिसानिमित्त वृक्षारोपण


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे. एक वृक्ष लावुन जन्मदिवस साजरा करुया वृक्ष मोठा होई पर्यंत त्या वृक्षाचे संगोपन करुया तरच आपल जिवन अमुल्य, प्रदुषण मुक्त होईल व शुध्द हवा मिळु शकेल. ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळेल. 

वृक्षारोपण वृक्षसंवर्धन "एक वृक्ष आरोग्य स्वस्थ" चला आज पासून संकल्प करुया एक वृक्ष लावुन जन्मदिवस साजरा करुया पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करुया. ही संकल्पना घेऊन मनसे नेते राजू उंबरकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. तृप्ती उंबरकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मनसे परिवाराला सोबत घेऊन शहरातील देशमुख वाडी, विठ्ठलवाडी या भागात वृक्षारोपण करण्यात आले. मनसे परिवारातील प्रत्येक सदस्याच्या वाढदिवसाला असे अभिनव उप्रकम राबविण्यात येतात याचाच एक भाग म्हणून सौ. उंबरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले..

या प्रसंगी मनसे परिवारातील असंख्य महिला व सदस्य उपस्थित होते..

आपण आपल्या समाजाला नाव आणि प्रतिष्ठा मिळवून वाचवू शकत नाही - जसिंता केरकट्टा

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

यवतमाळ : आदिवासी समाजाचे अस्तित्व व निसर्ग वाचवण्यासाठी स्वराज्यासाठी सक्षम होण्यासाठी बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हावे लागेल. केवळ नाव आणि प्रतिष्ठा मिळवून आपण आपल्या समाजाला वाचवू शकत नाही.असे प्रतिपादन विचारवंत, पत्रकार तथा कवियत्री जसिंता केरकट्टा ह्यांनी केले. 

आपल्याला समाजात जावं लागेल व त्यांना भेटावं लागेल. त्यासाठी वाचन, लेखन, घडवण्याची, संघटित होण्याची, आपल्यातील कमतरता आणि बलस्थाने ओळखण्याची गरज आहे. वडगाव रोड सहकार सांस्कृतिक भवन, यवतमाळ येथे 'तिसरी नवोदित आदिवासी साहित्य परिषद’ आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कवियत्री केरकट्टा बोलत होत्या.

साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक वसंत कनाके, प्रब्रह्मानंद मडावी, डॉ. संजय जी लोहकरे, डॉ.अरविंद कुळमेथे, बाळकृष्ण गेडाम, शीतलताई ढगे, राजू मडावी, शंकर मडावी, कुसुम अलाम, विद्याताई परचाके, कनाके, पैकू आत्राम, ऍड. अरविंद सिडाम आदी उपस्थित होते.

या प्रसंगी विचारवंत, पत्रकार तथा कवियत्री जसिंता केरकट्टा (झारखंड) यांचा सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना जसिंता केरकेट्टा म्हणाल्या की, विकास आणि धर्माच्या नावाखाली आदिवासींचा बळी देणारी मोठी व्यवस्था ओळखण्याचीही गरज आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आदिवासींनी एकत्र येण्याची गरज आहे. चांगल्या जगाची स्वप्ने पाहणाऱ्या सर्व लोकांना जुडण्याचे आणि जोडण्याचे मार्ग देखील आपण शोधले पाहिजेत. यावेळी त्यांनी या साहित्य परिषदेला शुभेच्छा देत आयोजकांचे मानले. त्यानंतर इतरही मान्यवरांचा सत्कार व आपापले विचार मांडले. या 'तिसरी नवोदित आदिवासी साहित्य परिषदेला राज्यभऱ्यातून मान्यवर व साहित्य प्रेमी उपस्थित होते.