कुमारी कशिश उईके महाराष्ट्रातुन प्रथम

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

यवतमाळ : आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर आणि कोयाराणी प्रोडक्शन चंद्रपूर यांचे द्वारे कोयराजाल अँड कोयराणी नॅशनल लेवल ट्रायबल कल्चर मॉडलिंग कॉम्पिटिशन शो २०२४ ला चंद्रपूर येथे इम्पेरियल पॅलेस येथे दि. १ डिसेंबरला घेण्यात आला होता. 
या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून कॉम्पिटिशन साठी आदिवासी मुले-मुली आली होती. यामध्ये यवतमाळ येथील लेखापरीक्षक नरेश उईके यांची मुलगी कु. कशिश निकिता नरेश उईके हिचा महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उडीसा, तामीलनाडु, आंध्रप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, राज्याची नॅशनल लेवल मध्ये प्रथम क्रमांक विनर पटकवला आहे.
जिल्ह्यात सगळीकडे तिचे कौतुक होत आहे. कशिश ला लहानपणापासूनच नृत्याची आवड आहे. काही गोंडी अल्बम सुद्धा गोंडी गायक गोंडी गायक सुरेश वेलादे व सुबोध वाळके यांनी तयार केलेली आहे.
आई वडील यांनी तिच्या कलेची जाण ओळखून प्रत्येक स्पर्धेमध्ये तिला सहभागी होण्यासाठी घेऊन जात असतात. कशिशचे अभिनंदन आदिवासी समाजातील संघटनेकडून केले जात आहे.

दुचाकीच्या धडकेत 55 वर्षीय तरुण ठार,चिंचमंडळ गावाजवळील घटना


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील चिंचमंडळ गावाच्या प्रवेशद्वाराच्या समोर भरधाव दुचाकीने समोरासमोर धडक दिली. रामदास गणपत पचारे (वय 55) रा.चिंचमंडळ ह्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले असता सेवाग्राम येथे पोहचताच त्याचे निधन झाले. वृत्तलिहेपर्यंत घटनेची तक्रार झाली नव्हती. ही घटना सकाळी 7.50 वा. दरम्यान, घडली. रामदास यांच्या पाठीमागे पत्नी वं चार विवाहित मुली असा परिवार आहेत. मृतक रामदास पचारे हे सामाजिक कार्यकर्ते अतुल पचारे यांचे चुलत काका होते. 

वणी उपविभागात अपघात वाढले 
सोमवारी रात्री वणी ते नांदेपेरा रोड वर दुचाकी व कार एकमेकांसमोर धडकले. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. आनंद विजय नक्षीणे (अंदाजे वय 27) रा. वांजरी (मजरा) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघाताची माहिती वांजरीत पसरताच मित्र मंडळीनी अपघातस्थळ गाठले. त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय वणी येथे शवविच्छेदनाकरिता आणण्यात आला. दरम्यान, पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचली. उशिरापर्यंत या प्रकरणात प्राणांतिक अपघाताची नोंद झालेली नव्हती.

शामादादा कोलाम ब्रिगेडच्या वतीने रायपूर येथील पाण्याच्या टाकीवर आमरण उपोषणाचा इशारा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

यवतमाळ : जिल्ह्यातील झरी जामनी तालुक्यातील प्रामुख्याने रायपूर कोलाम पोड सहित इतरही कोलाम पोडावर मूलभूत सुविधा नसल्याचा गंभीर आरोप करीत बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा तथा शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी विभागीय आयुक्त, अप्पर आयुक्त आदिवासी विभाग अमरावती यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन सादर केले 

सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की भारतीय संविधानाप्रमाणे राज्यात राहणाऱ्या प्रत्येक समुहकरिता मूलभूत सुविधा पुरविणे प्रामुख्याने घरकुल,आदिवासी कोलाम पोडावर पोहच रस्ते, स्वतंत्र शौचालय, विद्युत पुरवठा, मोफत शिक्षण, ह्या मूलभूत सुविधा पुरविणे सरकारची जबाबदारी असताना यवतमाळ जिल्ह्यातील प्रामुख्याने आदिवासी बहुल वस्ती असणाऱ्या झरी जामनी तालुक्यातील रायपूर कोलाम पोड सहित इतरही कोलाम पोडावर कोलाम समाजाच्या कुटुंबांना मूलभूत सुविधा पासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करुन राज्यात चौदावी विधानसभा विस्थापित होवून पंधरावी विधानसभा अस्तित्वात आलेली असताना सुद्धा आदिवासी कोलाम समुहाकडे राज्यकर्ते तथा लोकप्रतिनिधी यांनी अक्ष्यम्य प्रमाणात दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ नूतन सरकारच लक्ष वेधण्यासाठी संविधानात्मक मार्गाने रायपूर कोलाम पोडावरील पाण्याच्या टाकीवर आमरण उपोषण करणार असल्याबाबत संघटनेच्या मार्गदर्शक त्त्वानुसार लेखी स्वरूपात निवेदन सादर केली असल्याची महिती प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

पुढें प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, पाटणबोरी ते मुकुटबन मुख्य रस्त्यावर रायपूर फाटा ते रायपूर कोलाम पोड पर्यंत डांबरीकरण करण्यात यावे, रायपूर कोलाम पोडवरील निधन झालेल्या व्यक्तींसाठी स्वतंत्र दफन भूमी करीता जमीन आरक्षित करुन देण्यात यावी, म्हणजे जिवंत आदिवासींना राहण्याकरिता व्यवस्थित जागा तर नाहीच परंतू मरण पावल्यावर सुद्धा दफन करण्याकरिता स्वंतत्र दफन भूमी नसल्याची निवेदनातून खंत व्यक्त केली तसेच पेसा कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासी गोंड, प्रधान, कोलाम समाजाच्या कब्जात असलेल्या महसूल व वन जमिनी देण्यात यावे, आदिवासी महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा बिन व्याजी कर्ज देण्यात यावे, सदर मागण्या ह्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व एकात्मिक आदिवासी विभाग यांच्याशी संबंधित असताना त्याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे विभागीय आयुक्त, अप्पर आयुक्त आदिवासी विभाग अमरावती यांच्या सहित कायदा व सु व्यवस्थेचा प्रश्न सुरक्षित रहावा म्हणून पोलिस महानिरीक्षक अमरावती यांच्या कडे निवेदन सादर करुन रायपूर कोलाम पोडावरील पाण्याच्या टाकीवर आमरण उपोषण करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून प्रदेश अध्यक्षा सौ.इंदिरा बोंदरे यांनी कळविले आहे.


        

त्यांच्या धाडसाने 'ते' आरोपी झाले जेरबंद


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : 1 डिसेंबर रोज रविवारी सकाळी नऊ च्या सुमारास घरात घुसून एका युवकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यात युवक गंभीर जखमी झाला त्याचेवर नागपूर येथे उपचार सुरु आहे. मात्र, या घटनेतील आरोपीना घरात डांबून ठेवण्यात आल्याने ताई आणि काकांच्या दाखवलेल्या धाडसचं सर्वत्र कुतूहलाने कौतुक होतं आहे.
प्रणय मुकुंद मुने (23) असे त्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. शहरातील मध्यवर्ती भागात आपल्या आई सह वास्तव्यास असलेल्या वरील नमूद युवकांवर घरात घुसून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला, त्याला त्याच्याच घरात खाली पाडून गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले, ही धक्कादायक घटना आई च्या तत्काळ निदर्शनास येताच तिने आरडा ओरड केली. त्यामुळे आवाजाच्या दिशेने शेजारील लोक धावली आणि बघतात तर काय प्रणय हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. शेजारील ताईंनी व काकांनी क्षणाचा विलंब न कर्ता आणि मोठ्या हिमतीने घराचे दार बाहेरून बंद केले, त्यामुळे आरोपी सहज पोलिसांच्या जाळ्यात अडकले. "जर बाहेरून दार बंद केले नसते तर आरोपी हाती लागले नसते आणि कदाचित पोलिसांसमोर घटनेचा उलगडा करण्यास मोठं आव्हाने असते", असं खुद पोलीस प्रशासनातून सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्या ताईचं आणि काकांचे कौतुक करावं तितकं कमीच आहे. त्यांनी दाखवलेले धाडस हे कौतुकास्पद आहे. 

आरोपी अजिक्य संतोष चौधरी (24) रा. हिंगणघाट, विधी संघर्ष बालक रा. हिंगणघाट जि. वर्धा असे त्याचे नाव आहे. यातील अजिंक्य चौधरी यावर 302 गुन्हा हिंगणघाट मध्ये दाखल आहे. याप्रकरणी आरोपीवर बीएन एस 109(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा ठाणेदार अनिल बेहराणी यांच्या मार्गदर्शनात एपीआय अपसुंदे, एपीआय रत्नपारखी, पीएसआय गुल्हाने, पीएसआय आश्वले, ह्यांची चमु सखोल चौकशी करीत आहे.

• वर्दळीच्या ठिकाणी जीवघेणा हल्ला
घटना शहरातील घरसंसार सेलजवळ घडली, जे ठिकाण अत्यंत वर्दळीचे आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असलेल्या ठिकाणी अशा प्रकारच्या हल्ल्याने शहरातील सुरक्षा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

• वाढत्या गुन्हेगारीमुळे चिंता
वणीसारख्या शांत शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या हल्ल्याने नागरिक भयभीत झाले असून, सुरक्षा व्यवस्थेची चांगली व्यवस्था करण्याची मागणी जोर धरत आहे. 

• शहरात सुरक्षा वाढवण्याची गरज
या घटनेने शहरातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी अधिक उपाययोजना राबवण्याची आवश्यकता आहे. असे नागरिकांतून बोलल्या जात आहे.

वणीमध्ये युवकांवर दोघांकडून सशस्त्र हल्ला; तरुण गंभीर




सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरातील वामनघाट रोड घरसंसार परिसराच्या बाजूच्या मागील गल्लीत वास्तव्यास असलेल्या एका युवकांवर सशस्त्र जीवघेणा हल्ला केल्याची आज (१ डिसें.) ला सकाळी नऊ वाजता च्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील दोघांना ताब्यात घेतलं असून प्रकृती गंभीर असलेल्या युवकाला नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे. 
प्रणय मुकुंद मुने (अंदाजे वय २३ रा. माळीपुरा) असे हल्ल्यात गंभीर जखमीचे नाव आहे. आरोपींनी धारदार शस्त्राने घरात घुसून त्याच्या गळ्यावर जीवघेणा वार करून सशस्त्र हल्ला केला. प्रणयला उपचारासाठी प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे रवाना केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी करून जखमीला नागपूर ला पाठवले आहे. हल्लेखोर हे हिंगणघाट वर्धा जिल्हा येथील असून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदर युवकांवर हल्ला का केला? हे पोलिस तपासातून समोर येणार असून तूर्तास वणी शहरात या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे.