मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी,भाजपाचं ठरलं!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश संपादन केले आहे. महायुतीने तब्बल २३० जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. या ऐतिहासिक विजयानंतर आता मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार याबाबतच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच भाजपकडून राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत तब्बल 132 जागा जिंकत भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद भाजपकडेच असणार आहे. भाजपकडून मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरु असतानाच दिल्लीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीमध्ये भाजप हायकमांडने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येत आहे.

शामादादा कोलाम यांच्या जयंती निमित्त बिगर सातबारा शेतकरी संघटनेची बैठक संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

अमरावती : अनुसूचित जमाती पैकी कोलाम समाजाचे दैवत क्रांतिवीर शामादादा कोलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून बिगर सातबारा शेतकरी संघटनेची महत्वपूर्ण बैठक संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या आदेशाने विदर्भ अध्यक्ष अजय मंडपे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय कार्य अध्यक्ष डॉ सुखदेव कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झाली बैठकीला मार्गदर्शन करतांना सांगीतले की राज्यात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक विधान सभेच्या निवडणुकीत महविकास युतीला मिळालेलं स्पष्ट बहुमत ऐतिहासिक असल्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधींचे त्यांच्या निवासस्थानी जावून अभिनंदन करुन बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्याबाबतच्या सूचना संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांनी दिल्या असल्याची महिती अमरावती येथे पार पडलेल्या बैठकीत डॉ सुखदेव कांबळे यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना सांगितली पुढें बैठकीत मार्गदर्शन करतांनाडॉ सुखदेव कांबळे म्हणाले की यापूर्वी राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असताना संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या नेतृत्त्वात दादर चैत्यभूमी ते मुंबई मंत्रालय पायदळ मोर्चा काढून भूमिहीनांना जमिनी तर बेघर कुटुंबांना घरे देण्याबाबत मागणी केली असता देवेंद्र फडणविस यांच्या मंत्रिमंडळाने सर्वांसाठी घरे या धोरणाची अंमलबजावणी करणे करिता ग्रामीण भागातील निवासी अतिक्रमणे नियमनुकुल करण्याचा निर्णय घेतला होता त्यांची अंमलबजावणी राज्यात सुरु असुन त्याचा बऱ्यासच्या बेघर कुटुंबांना लाभ मिळत आहे त्याच धर्तीवर पुन्हा देवेंद्र फडणविस यांच्या मार्गदर्शनात स्थापन झालेल्या नवीन सरकारने सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करून शेतीची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात निर्गमित करावा या करिता प्रत्येक आमदाराच्या निवासस्थानी जावून अभिनंदन करुन निवेदन सादर करुन त्यांच्या पोहच पावत्या संघटनेकडे उपलब्ध करुन द्या जेणेकरून हिवाळी अधिवेशनाची तारीख घोषित होण्यापूर्वी भाई जगदीश कुमार इंगळे यांना राज्य विधिमंडळ सचिवालयाकडे पाठपुरावा करणे सोईचे होईल त्याकरिता सर्व कार्यकर्त्याने एकाजुटिने कामाले लागा अश्या सूचना डॉ. कांबळे यांनी बैठकीतून दिल्या.

जनतेनी आशीर्वाद दिला पण पक्षांतर्गत गद्दारीने घात केला - संजीवरेड्डी बोदकुरवार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : राज्यात महायुतीचे बहुमताने सरकार परत आलं असं जवळ जवळ निश्चित आहे. मात्र, वणी विधानसभा मतदार संघातून भाजप महायुतीची जागा पडल्याने विधानसभा क्षेत्रातील जनतेत आता नाराजीचा सूर दिसून येत आहे. 

रविवारी भारतीय जनता पार्टी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यात महायुतीच्या प्रचंड जागा निवडून आल्या, याचा वणी मध्ये माजी आमदार यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात आला. तालुक्यातील सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्रित येऊन विजयाचा नारा देण्यात आला. माजी आ. संजयरेड्डी बोदकुरवार हे अनेक वेळा भावुक झाल्याचे दिसून आले. 
त्यानंतर सभेत बोलताना ते म्हणाले,अतिशय प्रामाणिकपणे काम केलं,मनात थोडीशी बेईमानी राबविली नाही. ज्याचं काम केलं, अतिशय निष्ठेने काम केलं.कधी आमदार व्हावं, जिल्हा परिषद लढवावं मनात कधीच नव्हतं.2014 मध्ये आपल्या आशिर्वादामुळे, प्रेमामुळे अतिशय पंधरा दिवसात तुम्ही आम्ही घेतलेल्या मेहनतीने आमदार झालो. आणि आमदार झाल्यापासून जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ पक्षाला दिला. कार्यकर्त्यांना दिला, जनतेला दिला.दहा वर्षात मी परिवाराला, पत्नी मुलांबाळांना वेळ देऊ शकलो नाही, तेवढा मी पक्षाला दिला. असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. पुढं ते म्हणाले कि, पराभवाची चिंता नाही, मात्र पक्षात राहून अतिशय प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांनी मला हरवण्यासाठी गद्दारी, बेईमानी केली याच शल्य माझ्या मनात आहे, आज तुम्ही इतक्या संख्येने इथे जमलात मला याच आनंद आहे. मात्र, पक्षात प्रामाणिकपणे काम करा, पक्ष कुठेही तुम्हाला कमी पडू देत नाही. मी तिकिटासाठी दिल्ली ला गेलो नाही, नाही मुंबईला गेलो. देवेंद्रजींनी मला स्वतः संपर्क साधून सांगितलं की तुमची तिकीट पक्की आहे, तुम्ही तयारीला लागा. म्हणून मी लढलो. परंतु आता मी माझा स्वभाव बदलणार आहे, जे गद्दार बेईमान आहे त्यांना मी माझ्या दारात पाय ठेवू देणार नाहीत. असे बोलताना बोदकुरवार गहिवरले.
तुम्ही सोबत राहा मी तुमच्या सदैव पाठीशी आहे. एवढ्या मोठ्या पदाचा माणूस, माझ्या विरोधात प्रचार केला ही मोठी खंत आहे. पक्षात राहून अशी बेईमानी होत असेल तर हे पक्षाचे मोठं दुर्दैव आहे. आज राज्यात महायुतीचे सी एम (मुख्यमंत्री) होणार आहे, आम्ही आमदार नसलो तरी कोणाचे काम अडणार नाही. माझे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आहे. मग देवेंद्रजी असो सुधीरजी असो, आणखी काही लोकं असतील. खूप चांगले स्नेहाचे संबंध मी सर्वांशी जपले. त्यामुळे आपल मी काम अडू देणार नाही. नवीन आमदारांना माझ्या शुभेच्छा आहे, मात्र ज्या पद्धतीने राजकारणाची दिशा बदलत आहे ही येणाऱ्या तरुण पिढीसाठी घातक आहे.माझा पराभव का झाला, कसा झाला हे तुम्हा सर्वाना माहिती आहे. परंतु यावर आता बोलणार नाही. मी विकासात कुठेही कमी पडलो नाहीत, खूप कामे केली. मला 80 हजार मत मिळाली हे आपल्या प्रेमाची साक्ष आहे. जर तर सोडून आपण पराभव मान्य करू, आणि पुढील कार्यासाठी नव्या दमाने जोमाने तुमच्यासाठी मी लढणार आहे. जेवढा वेळ पूर्वी देत होतो तेवढाच वेळ आताही तुमच्यासाठी देणार आहे हे बोलताना ते अतिशय भावुक होऊन म्हणाले. 
यावेळी वणी विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे व महायुतीचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

21 वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या नवरगाव येथील एका 21 वर्षीय युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपवल्याची घटना शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. 

खुशी सुभाष मोहुर्ले रा. नवरगाव (धरण),असे घरात गळफास लावून आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.आई सकाळी कामाला गेली होती, ती सायंकाळी कामावरून घरी परतली असता घरात मुलगी दोरीच्या सहाय्याने गळफास अवस्थेत आढळून आली. ही दुःखद वार्ता कळताच गावकरी घटनास्थळी जमली,युवतीला रुग्णालयात हलविले डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. ख़ुशी ही शेजारच्या वणी तालुक्यात अकॅडमी प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेत असल्याचे समजते. 

मुतकाच्या पश्चात आई व दोन विवाहित बहिणी असून वडिलांचे निधन झाले आहे. सध्या खुशीच्या आत्महत्येचे कारण अस्पस्ट असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास पोलीस करित आहे.

वणी विधानसभेत संजय देरकर 15560 मतांनी विजयी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : वणी विधानसभा क्षेत्रात उबाठा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, शिवसेना वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी 15560 मतांची आघाडी घेत दणदणीत विजय संपादन केला असून ते पंचवीसव्या वर्षीच्या लढ्यानंतर विधानसभेत पोहोचले आहे. यापूर्वी चार वेळा विधानसभा निवडणूक लढवणारे संजय देरकर ते यावर्षी 2024 मध्ये उबाठा महाविकास आघाडीची उमेदवारी त्यांना मिळाली होती. आज शनिवार दि.23 नोव्हेंबर रोजी विधानसभेचा निकाल होता,समोर आलेल्या निकालात देरकर यांनी भाजप महायुतीचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना पराभूत केलं आहे. 

विशेष म्हणजे देरकरांनी पहिल्या फेरी पासूनच मतांचा जोर पकडला होता, त्यानंतरही मतांचा आकडा फुगत गेला आणि दहाव्या फेरीनंतर संजय देरकर यांच्या विजयाची घोडदौड सुरु झाली. यामध्ये काँग्रेस ठाम राहिल्यामुळे शिवसेना उबाठाचे उमेदवार विजयी झाल्याचे देखील बोललं जात होत. प्रत्येक फेरीचे आकडे व दर मिनिटाला येणारी देरकरांची आघाडी, वणी मतदार संघातील नागरिकांची उत्कंठा वाढवत होती. बहुमताच्या आघाडीमुळे विजय निश्चित शिगेला पोहचली होता.अखेर संजीवरेड्डी बोदकुरवार यांना मात देत संजय देरकर यांनी 15560 मतांनी दणदणीत विजय मिळविला आहे. त्यांचं वणी विधानसभा क्षेत्रात नवनिर्वाचित आमदार म्हणून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

पहा कुणाला किती मते मिळाली
अरुणकुमार खैरे (बसपा) 1163, राजू उंबरकर (मनसे) 21977, संजय देरकर (शिवसेना उबाठा) 94618, संजीवरेड्डी बोदकुरवार (भाजप) 79058, अनिल हेपट (भाकप) 3875, राजेंद्र निमसटकर (वंचित बहुजन आघाडी) 3605, अपक्ष राहुल आत्राम 2532,  संजय खाडे 7540, केतन पारखी 407, नारायण गोडे 855, हरिष पाते 1307, निखिल ढुरके 2246 असे मते मिळाली.  तर नोटा 1328.