अन्न पुरवठा निरीक्षक अधिकारी ए सी बी (ACB) च्या जाळ्यात अडकला

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील अन्न पुरवठा विभागाचे निरीक्षक अधिकारी यांना आज ७० हजार रुपयांची लाच घेतांना एसीबी (ACB) ने रंगेहाथ पकडले. ही कारवाई २४ ऑक्टोबर ला दुपारी ३ वाजता दरम्यान अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केल्याची माहिती आहे. 

वणी तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले संतोष उईके यांनी रास्त धान्य दुकान बंडू देवाळकर रा. चिखलगाव यांना राशन दुकान संदर्भात सत्तर रुपयाची लाच मागितली याबाबत बंडू देवाळकर यांनी पुरवठा निरीक्षक संतोष उईके यांची ए सी बी (ACB) कडे तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत आज सापळा रचला व अन्न पुरवठा निरीक्षक अधिकारी संतोष उईके यांना कार्यालयातच मागणी केलेल्या रकमेसह लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. 

पुढील कारवाईसाठी शासकीय विश्रामगृह येथे आणण्यात आले होते. या कार्यवाहीने तालुका प्रशासन चांगलेच खळबळले...

प्रहार मधून मनसेत जाहीर प्रवेश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : विधानसभेच्या तोंडावर विविध राजकीय घडामोडीला वेग आला. यातच आज प्रहार जनशक्ती पक्षाला रामराम करत जिल्हा उप प्रमुख निलेश माहूरकर यांनी आपल्या समर्थकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दाखल झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते नेते राजु उंबरकर यांच्या हस्ते आज वणी येथील पक्ष कार्यालयात माहूरकर यांचा मनसेत पक्ष प्रवेश पार पडला. माहूरकर यांच्या पक्षप्रवेशनाने मनसेला बळ मिळाले असून आगामी विधानसभेत याचा फायदा पक्षाला होणारं असल्याचे बोलले जात आहे.

निलेश माहुरकर यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात अनेक सामाजिक आणि राजकीय उपक्रमासह विविध मुद्द्याला घेऊन आक्रमक स्वरूपाचे आंदोलने केली होती. तर नुकत्याच पार पडलेल्या बुटीबोरी नगर परिषदेमध्ये त्यांनी निवडणूक लढवून समाधानकारक मताधिक्य प्राप्त केले होते. तर कामगार क्षेत्रामध्ये विविध कंपन्यावर त्यांनी कामगार संघटनेच्या माध्यमातून पकड निर्माण केली असून नामांकित कंपन्यावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या कामगार संघटना उभ्या केल्या. आता या सर्वांचा फायदा मनसेच्या पदरात पडणार. माहूरकर यांनी आज अचानक मनसेत प्रवेश केल्याने विविध राजकिय चर्चांना उधाण आले. मनसेचे नेते राजु उंबरकर यांनी माहूरकर यांच्या गळ्यात पक्षाचा दुप्पटा टाकून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नागपुर जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर, बिजाराम किनकर ( हिंगणा मनसे उमेदवार) वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शिवराज पेचे, विलन बोदाडकर, अजित शेख, शुभम भोयर, मयूर गेडाम, संदिप वाघमारे, लक्की सोमकुंवर यांच्या सह नागपुर येथिल सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..

बोलोरो वाहणाची दुचाकीला धडक, एक ठार एक गंभीर


सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील खडकी फाट्यानजीक एका मोटारसायकलला विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकल चालक जागीच ठार तर, एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवार ला रात्री साडेसात वाजता राज्यमहामार्गांवर घडली.

शेतातून गावाकडे जाणाऱ्या बुरांडा शिवारात असलेल्या शेतातून दोघेजण मोटारसायकल ने राज्यमहामार्गाने खडकी गावाकडे निघाले. अशातच वणीवरून भरधाव येणाऱ्या बोलेरो वाहनाने खडकी फाट्या जवळ मोटारसायकल ला धडक दिली. यात खडकी (बु.) येथील हरी उर्फ रविंद्र दिगांबार अवताडे (वय ४५) हे जागीच ठार झाले तर, त्याचा सहकारी अतुल झिंगू उईके ( वय २७) हे गंभीर जखमी झाले. 

वणीचा तिढा सुटला : विधानसभेची उमेदवारी शिवसेना 'उबाठा'कडे


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेले काँग्रेस, उद्धवसेना या पक्षातून कोणत्या पक्षाला वणी विधानसभेची उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी वणी मतदारसंघातून संजय देरकर यांना अखेर उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर होताच वणी येथे शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्याभऱ्यापासून वणीचा नाट्यमय तिढा कायम होता,येथील अनेकजन तिकीट मिळवण्यासाठी दिल्लीवारी तर मुंबईत तळ ठोकून होते.

वणी मतदारसंघातून महाविकास आघाडी,काँग्रेस पक्षासह अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी आपल्या पक्षश्रेष्ठीकडे रेटून प्रयत्न केला. त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनही मोठी रस्सीखेच चालू असल्याची चर्चा होती. रविवारी महायुतीची यादी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची वणी मतदार संघाची उमेदवारी कोणाला मिळेल! याची उत्कंठा वाढली होती, उद्धवसेनेचे संजय देरकर यांनी उमेदवारी मिळविण्यात अखेर यश मिळवले आहे. महाविकास आघाडी चे ८५-८५-८५ असा फार्मुला ठरला असून उर्वरित जागा मित्र पक्षांना. मात्र,वणीत कार्यकर्त्यांकडून श्री.देरकर यांचं अभिनंदनासह विजयश्रीचा वर्षाव केला जात आहे. 

प्रचाराला कमी कालावधी असल्याने लवकरच आता प्रचाराची रणधुमाळी चालू होणार असून जनतेचा कल कोणाकडे राहणार, हे काही दिवसातच समजेल. आता मात्र, वणी विधानसभा ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा निवडणूक आखाडा रंगणार आहे.

दहावीच्या परीक्षेत सर्वात मोठा बदल; आता विषयांत 35 ला नाही तर 20 ला पास

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. दहावीमध्ये काही विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान हे विषय अवघड जातात. त्यामुळे या विषयात नापास होण्याची संख्या देखील जास्त आहे. 

मात्र, आता दहावीच्या बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 पेक्षा कमी आणि 20 पेक्षा जास्त गुण मिळाले तरी देखील अकरावीमध्ये प्रवेश घेता घेणार आहे.

 नव्या अभ्यासक्रम आराखड्यात यासंदर्भात तरतूद देखील करण्यात आली आहे. मात्र त्या विद्यार्थ्यांच्या रिझल्टवर एक विशिष्ट शेरा देण्यात येणार आहे. 

मात्र आता ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान हे विषय अवघड जात होते त्यांना बोर्डाच्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.