कळंब येथे महिला सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख 

कळंब : महिलांचे अधिकार, मुली व महिला वर होणारे अन्याय , अत्याचार या महत्त्व पूर्ण विषयावर चर्चा करण्याच्या उद्देशाने पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य कळंब विभागाच्या वतीने दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोज शनिवारला सकाळी ११ वाजता राम मंदिर कळंब येथे पोलीस मित्र परिवार समन्वय समिती संस्थापक अध्यक्ष डॉ संघपाल उमरे यांच्या अध्यक्षतेखाली "महिला सक्षमीकरण कार्यशाळेचे" व समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र वाटपाचे आयोजन केले आहे.
 
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कळंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री राजेश राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुभाष मानकर गटविकास अधिकारी पंचायत समिती कळंब, श्री. धिरज स्थुल तहसीलदार कळंब, श्री. अमोल वरसे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कळंब, डॉ. विजय अकोलकर तालुका आरोग्य अधिकारी कळंब, वंदना नानवटे प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कळंब, जया अराठे यवतमाळ महिला अध्यक्षा पो. मि. प. स. समिती, श्री मनीष गुडघे अमरावती विभाग प्रमुख , श्री पवन धोत्रे ग्रामीण पत्रकार सघं उपाध्यक्ष ,निखिल वाहाने चांदुर (रेल्वे) विभागीय प्रमुख इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. 

तरी तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी विनंती पोलीस मित्र समन्वय समिती कळंबच्या वतीने करण्यात आली आहे.

वणी येथील मान्यवरांनी घेतली साहित्यीक बाबाराव मडावी यांची स्नेह भेट


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : वणी येथे दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी आदिवासी सामाजिक न्याय संसद होत असुन, या संसदेचे निमंञण घेवुन वणी येथील मान्यवर ऊत्तम गेडाम, गित घोष, रामदास गेडाम, भाऊराव आञाम, श्रीकृष्ण मडावी, महेश आञाम यांनी आदिवासी साहित्यीक बाबारावजी मडावी यांची भेट घेतली. आदिवासी न्याय संसदेबाबत गित घोष आणि ऊत्तम गेडाम यांनी सविस्तर चर्चा करुन भुमिका सांगितली. या संसदेस विविध पक्षाचे मंञी, खासदार, आमदार यांना निमंञीत करण्यात आले आहे. संसदेत आदिवासीच्या संविधानात्मक हक्कावर होत असलेल्या अन्यायाचे संबधाने भुमिका घेणार आहात की नाही? अशी रोखठोक भुमिका घेण्यात येणार आहे. आदिवासीचा विकास राजकिय प्रतिनिधिंच्या अनास्थेमुळे अडगळुन पडला असुन आदिवासींनी केवळ मतदान देण्याची भुमिका घ्यायची व अन्याय सहन करीत रहायचे काय. या भुमिकेवर या संसदेने आदिवासीत जागरण करुन राजकिय विद्रोही भुमिका घेण्याचे ठरविले. ही भुमिका आदिवासीच्या राजकिय विद्रोहाची ठीणगी होय. ती पेटणे आवश्यकच होते. राजकारण अन्याय शोषण झुगारणारे असल्या शिवाय विकास होणार नाही. विशेषतः आदिवासी राजकिय प्रतिनिंधींनी राजकिय सशक्त भुमिका स्विकारुन समाज विकासासाठी सावध होणे गरजेचे आहे. आदिवासीचे आरक्षण पळवल्या जाते? बोगस आदिवासी लुटताहेत म्हणजे आदिवासींच्या संविधानात्मक स्वातंञ्यावरच घाला होय. ही जबाबदारी समजुन घेऊन वणी येथील समाजनेत्यांनी आदिवासी न्याय संसद आयोजीत करुन सुरवात केली आहे. या निमंत्रण अनुषंगाने सर्व मान्यवरांचे साहत्यीक बाबारावजी मडावी व सुनंदा मडावी माजी नगरसेविका यांनी स्वागत केले.

ह.भ.प. युवा किर्तनकार सोपानदादा कनेरकर यांचे 28 सप्टेंबरला वणीत जाहीर व्याख्यान

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : पारसमल प्रेमराज फाउंडेशनच्या वतीने वणी येथे दिनांक 28 सप्टेंबरला दुपारी 1 वाजता शेतकरी मंदिराच्या सभागृहात महाराष्ट्रातील प्रसिद्ध ख्यातनाम वक्ते ह.भ.प. युवा किर्तनकार सोपानदादा कनेरकर यांचा व्याख्यानाचा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

युवकांच्या उज्वल भविष्याकरिता मार्गदर्शन व पालकांची भूमिका या विषयावर हे जाहीर व्याख्यान होणार असून या व्याख्यानाचा लाभ वणी उपविभागातील विद्यार्थी, युवक युवतींनी तसेच पालकांनी घ्यावा, असे कळकळीचे आवाहन भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया यांनी केले आहे.

लाखो युवकांचे प्रेरणास्थान सोपानदादा कनेरकर हे आपल्या प्रबोधनातून विद्यार्थी, युवक युवतींना व पालकांना भगवद्गीतेद्वारे आवडेल अशा वाणीतून ते यशाचा कानमंत्र देतात. त्यांच्या व्याख्यानाला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेसाठी सोपानदादा कनेरकर यांचे व्याख्यान म्हणजे एक पर्वणीच असणार आहे.


खासदार धानोरकर यांना सकल नाभिक समाजाचे निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील वसंत जिनिंग कार्यलयात २४ सप्टेंबर रोज मंगळवार ला दुपारी 3 वा. 'जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर ह्यांची प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी नाभिक युवा क्रांती बहुउद्देशीय संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने मारेगाव तालुक्यातील सकल नाभिक समाजाच्या नेतृत्वात दि.30 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या आजाद मैदान आंदोलनाबाबत चर्चा करून खा. धानोरकर यांना निवेदन देण्यात आले. 
निवेदन देताना नाभिक युवा क्रांतीचे उपाध्यक्ष निरंजन येसेकार, कोषाध्यक्ष मनोज चौधरी, सेनाप्रमुख भाऊ वाटेकर, विनोद आंबेकर, तुळशीदास वाटेकर व मारेगाव ता.नाभिक असोसिएशनचे अध्यक्ष आनंद नक्षीने, गजू नक्षीने आदींची  उपस्थिती होती.

चतुर्थ श्रेणीच्या मागणी साठी भर पावसात कोतवाल संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार, दि. २४ सप्टेंबरला राज्य कोतवाल संघटनेमार्फत धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना देण्यात आले.

राज्य कोतवाल संघटनेचे राज्य स्तरीय लक्षवेधी आंदोलन मंत्रालयस्तरावरील कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावे, यासह विविध मागण्या सोमवार, दि. २३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण न झाल्याने दि. २४ सप्टेंबरला राज्यभर जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करण्यात आले. या भरपावसात सुरू असलेल्या आंदोलनात शेकडो कोतवाल सहभागी झाले होते. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना देण्यात आले. 

यावेळी कोतवाल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष योगेश शेडमाके, जिल्हाध्यक्ष उत्तम पाचभाई, उपाध्यक्ष पंकज जाधव, सचिव प्रशांत प्रभाते, महिलाध्यक्षा छाया दरोडे यांच्यासह दिलीप इंगोले, देवानंद फोपसे, अतुल अहिरे, अमोल लोंढे, किरण मोरे, राकेश संकिलवार, शंकर चव्हाण, रोशन जोगे यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष आणि शेकडो कोतवाल कर्मचारी उपस्थित होते.


आजपासून कामबंद आंदोलन करणार

कोतवाल संघटनेच्यावतीने बुधवार, दि. २५ सप्टेंबरपासून राज्यभर कामबंद आंदोलन करण्यात येणार असून गुरूवार, दि. २६ सप्टेंबरपासून मुंबई आझाद मैदान मागण्यापूर्ण होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनात यवतमाळ जिल्ह्यातील कोतवाल संघटना सहभागी होणार आहे.

-उत्तम पाचभाई
जिल्हाध्यक्ष, कोतवाल संघटना


-