शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमातून साजरा

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील शिरपूर, लालगुडा, व वणी शहरातील अनेक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात गरजुंना छत्री वाटप व वृक्षारोपण करून महाराष्ट्राचे माजी कुटुंब प्रमुख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम शहरातील साई मंदिर चौकातील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिरपूर येथील आरोग्य केंद्रात छत्री वाटप व वृक्षारोपण केले. त्यानंतर व श्री गुरुदेव माध्यमिक विद्यालयात, पोलिस स्टेशन शिरपूर, महावितरण कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. लालगुडा येथेही गरजुंना छत्री वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेष्ठ पत्रकार जब्बार चिनी व परशुराम पोटे, रमेश तांबे यांच्या हस्ते गरजुंना छत्री वाटप, साई मंदिर चौकात गोरगरीब गरजुंना छत्री वाटप करण्यात आले. अशा प्रकारे सामाजिक उपक्रम राबवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी राजु वाघमारे, अविनाश भुजबळ, सचिन भोयर, लक्ष्मण डावरे, सतिश प्रफुल बोरडे, मयूर नागपुरे, सचिन करमळर, नयन कैराती, शत्रुघ्न मालेकर, राकेश मालेकर, चेतन उलमाले, निलेश ठमके, युवराज नागपुरे, प्रवीण गिरोले, यश बोबडे, राहुल सूर्यवंशी, ललित पोतराजे, मारुती गिरोले, दिपक मत्ते, शंकरजी गुरनुले, प्रवीण खोबरे, श्रीकांत वाढई, किशोर ठाकरे, कुणाल डोंगरकर, गोपाल वाढई, महादेव ठमके, अविनाश कोंगरे आदीची उपस्थिती होती. 

मणिपूर सरकार बरखास्त करा - तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : मणिपूरच्या कलंकित अत्याचाराचे तीव्र पडसाद शहरात उमटले असून २५ जुलैला मोर्चे काढून असंतोष व्यक्त केला आहे. तालुका काँग्रेस कमिटी, कॉम्युनिष्ट पक्ष, शिवसेना (उ. बा. ठा.) वंचित बहुजन आघाडी, अल्पसंख्यांक सेल व जिजाऊ ब्रिगेड संघटनांच्या वतीने २५ जुलै रोजी तीव्र निषेध करण्यात आला आहे. मणिपूरचे सरकार बरखास्त करण्याची व गुन्हेगारांना फाशी द्या, व मणिपूर येथे राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली जात आहेत.
गेले दोन महिने मणिपूर जळत आहे. हिंसक हल्ले होत आहेत. दीडशेपेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. या दंगलीमध्ये आदिवासी व महिलांवर अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना सत्तेवर राहण्याचा एक क्षणभरही अधिकार नाही. त्यांचा ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांना बरखास्त केले पाहिजे तसेच पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना ह्या दंगली, महिलावरील अत्याचार, आटोक्यात आणण्यात अपयश आल्याने गृहमंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, गौरीशंकर खुराणा यांनी तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केली आहे. 
या निवेदनावर मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, सभापती गौरीखुराणा, प्रफुल विखणकर, संतोष मडावी, विजय घोरपडे, शालिक नेहारे, सय्यद समीर, युवक काँग्रेस अध्यक्ष, नयन आसूटकर, माया गाडगे महिला ता. अध्यक्ष, माया पेंदोर, शांता निझाडे, साधना खापणे, गुलाब बरडे, सोनू टेकाम, तुषार पवार, शकुंतला वैद्य, आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. यावेळी तालुक्यातील असंख्य काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते तथा नागरिक उपस्थित होते. 

असा लाईनमन परत मिळणे नाही; अभियंतांना ग्रामस्थांनी घातले साकडे

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यातील म्हैसदोडका येथील कार्यरत लाईनमन यांची प्रशासकीय कारणास्तव बदली झाली. ही बातमी गावाकऱ्यांना कळताच ग्रामस्थ गहिवरले आणि वेळ न घालवता आज 27 जुलै रोज गुरुवारला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मारेगाव येथील कार्यालयावर धडकले. आणि सहा.अभियंता यांना निवेदनातून आग्रही मागणी केली.
भिमेश फुलझेले लाइनमन अत्यंत कुशल, विजेच्या कामात, असो की वारा वादळानंतर उद्भवल्यास वीज पुरवठा ते प्रामाणिकपणे पूर्ववत करतात. रात्री बेरात्री विद्युत पुरवठा कुठेही खंडीत, प्रॉब्लेम आल्यास,सुरळीत करण्यासाठी धावून येतात, ट्रान्सफॉर्मर, मीटर, मीटरिंग उपकरणे, स्थापना, बांधकाम, देखभाल आणि दुरुस्ती ऐका हाकेवर तातडीने कर्तव्य पार पडतात. शिवाय फुलझेले हे मनमिळाऊ स्वभावाचे ते म्हैसदोडका परिसरात सुपरिचित आहे. त्यामुळे ग्रामस्थांची त्यांच्या सोबत एक आपुलकीची भावना जुळली आहे, असा लाईनमन पुन्हा आम्हांला मिळणे नाही,असे उपस्थित नागरिकांनी यावेळी 'सह्याद्री चौफेर'ला बोलतांना सांगितले.
मौजे म्हैसदोडका येथील लाईनमन यांची बदली झाल्यामुळे ग्रामस्थ भावुक झाले, आम्हाला हेच लाईनमन हवे म्हणून त्यांनी आज मा सहा. अभियंता शैलेंद्रकुमार पाटील, म.रा.वि.वि.कं.मारेगाव यांना निवेदनातून साकडे घातले आहे. फुलझेले यांनी सोज्वळ पद्धतीने परिसरातील अनेक नागरिकात आपुलकीचे संबंध दृढ केले. आपल्या कर्तव्यात कसूर न करता सामाजिक बांधिलकी जपत अनेकांना आपलंसं करून आपले कर्तव्य पार पडतात.त्यांच्या कामांना कधीच विसरता येणार नाही. त्यांची ही स्थानांतरण (बदली) त्वरित रद्द करून भिमेश फुलझेले यांनाच म्हैसदोडका येथे कायम द्यावे अशी आग्रही आर्तहाक निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी मारोती तुरणकार, जिवन डाखरे, नारायण सोनेकार,
बालु पारखी, निलेशपारखी, नरेश तुराणकर, रामचंद्र जरिले, 
मारोती वांढरे, विजय घागी, गणेश वांढरे, शुभम हेपट, 
छत्रपती सोनेकार, वामन मटाले, खुशाल पारखी यांचे सह असंख्य गावकरी उपस्थित होते.


आमच्या कर्मचाऱ्यावर अशी प्रेम करणारे ग्रामस्थ बघितले, आभार, छान वाटलं..मी आपणास या बदलीबाबत काही बोलू शकणार नाही. वरिष्ठ काय निर्णय घेतात ते त्यांच्या अधिकारात असून मी आपण सर्वांची मागणी वरिष्ठाकडे मांडतो.

-शैलेंद्रकुमार पाटील
सहा. अभियंता विद्युत वितरण कंपनी, मारेगाव 

कलंकित घटनेतील गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी- वंचित बहुजन आघाडीची मागणी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : मणिपूरमध्ये गेल्या दोन अडीच महिन्यापासून महिलांवर अत्याचार करून त्यांना जीवानीशी ठार मारल्याच्या घटना घडत आहे. प्रचंड हिंसाचार सुरू आहे. शेकडो लोकांचे मृत्यू झाले आहे. हजारो लोक बेघर आहे. लहान मुलामुलींचे अतोनात हाल सुरू आहे. त्यामुळे या कलंकित घटनेचा वंचित बहुजन आघाडी तीव्र शब्दात निषेध करत असून घटनेतील गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 
जमाव जेव्हा एखाद्या महिलेला रस्त्यावर निर्वस्त्र करतो आणि जाहीरपणे त्या महिलांची धिंड काढतो तेव्हा आमचा प्रधानमंत्री त्यावर काहीही बोलत नाही, मणिपूर सरकार व केंद्र सरकार हा अत्याचार रोखण्यास अपयशी ठरत असल्यामुळे मणिपूर सरकार बरखास्त करून येथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी वंचित मागणी आहे.

देशात असे निर्लज वर्तणूक करणाऱ्यावर कडक कायदे कारवाई फाशीची शिक्षा झाली पाहिजे तरच अशा प्रकारच्या कृत्याला आळा बसेल अन्यथा अशा प्रकारचे मुकदर्षकपणे पाहत रह्ययचे. हे आपल्या सुसंस्कृत देशाला लाजिरवाणे आहे. तात्काळ बंदोबस्त करून तेथील नागरिकांना संरक्षण देण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा गर्भीत ईशारा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निवेदनातून सरकार ला दिला आहे.
तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पाथरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली सोबतच मिरज येथे कमानी निमित्त झालेल्या त्या घटने संदर्भात तात्काळ कारवाई व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा च्या वतीने तहसीलदार यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना करण्यात आली आहे.

निवेदन देताना वंचित चे तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे, प्रफुल आदे, संजय जिवने,ता.उपाध्यक्ष, प्रफुल भगत, भगवान इंगळे, अनंता खाडे, रविंद्र तेलंग, विनय गजभिये, लक्ष्मीकांत तेलंग, रमेश चिकाटे, गौतम मालखेडे, विजय खाडे, नूतनताई तेलंग, सपनाताई वनकर, सुधाकर भगत आदीसह विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

शेतकरी बांधवानो आज होणाऱ्या पीएम किसान संमेलनात सहभागी व्हा - आत्मा समितीचे अध्यक्ष प्रसाद ढवस यांचे आवाहन



सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : अमृतकाळात देशातील गावे, देशाच्या शेतकऱ्यांच्या सामर्थ्यात वाढ करण्यासाठी आता देशाच्या सहकार क्षेत्राची भूमिका खूप मोठी ठरणार आहे. सरकार आणि सहकार एकत्रित होऊन, विकसित भारत, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला दुप्पट मजबुती देतील. याच अनुषंगाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पीएम 'किसान संमेलन' हा महासोहळा सीकर राज्यस्थान येथे आज दि.27 जुलै 2023 रोजी संपन्न होत आहे. या संमेलनाला तालुक्यातील शेतकरी बांधवांना सहभागी होण्याचं आवाहन आत्मा समितीचे अध्यक्ष प्रसाद ढवस यांनी केले आहे.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 2019 आली शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळावे, या उद्दात हेतूने सुरु करण्यात आलेल्या "पीएम किसान" योजनेच्या 14 व्या हप्त्याचे एका क्लिक वर थेट बँक खात्यावर वितरण व प्रधानमंत्री देशातील तमाम शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. सरकार ने डिजिटल इंडियाद्वारे पारदर्शकतेत वाढ केली, थेट लाभ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवला. आज देशातील गरीबातील गरीब व्यक्तीला देखील याची जाणीव झाली असताना, सर्वसामान्य लोक, आपले शेतकरी, आपले पशुपालक यांना दैनंदिन जीवनात देखील याचा अनुभव मिळणे आणि त्यांनी देखील हे सांगणे अतिशय गरजेचे आहे. 
आज डिजिटल व्यवहारांसाठी जगात भारताची ओळख निर्माण झाली आहे. शासनाच्या विविध योजनेचे लाभ थेट खात्यात वितरण होत आहे. यापुढेही काम जलदगतीने करण्याचा केंद्र सरकार चा मानस आहे. त्यामुळे या आयोजित समारंभास सहभागी होऊन या महासोहळ्याचे साक्षीदार व्हा, हा सोहळा ऑनलाईन वेब लिंक द्वारे पाहता येणार आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे शेतकरी धोरणाचे काय ते समजून घेता येणार आहे. त्यासाठी आज सकाळी 11 वाजता 
 https://pmevents.ncog.gov.in/या दिलेल्या वेबलिंक वर जॉईन व्हावे असे आवाहन आत्मा समिती मारेगावच्या वतीने करण्यात येत आहे.