अजित जाधव यांच्याकडे वणी पोलीस स्टेशनचे सूत्र

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : यवतमाळ जिल्ह्यातील वणी स्टेशन महत्वपुर्ण ठाणे म्हणून ओळखले जाते, त्यात प्रशासकीय बदल्यांचा आदेश. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी अजित बाळकृष्ण जाधव यांच्याकडे वणी पोलीस स्टेशनचे सूत्र सोपविले आहे.

अल्पवाधित लोकप्रियता मिळवलेले प्रदीप शिरस्कर यांची जिल्ह्याबाहेर बदली झाल्याने मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार असलेले पो. नि अजित जाधव यांनी सोमवार 26 जून रोजी वणी ठाणेदार पदाचे सूत्र स्वीकारले.

अजित जाधव यांनी उपविभागातील मुकुटबन येथे योग्यरित्या काम सांभाळले. तसेच त्यांना परिसराची चांगलीच जाण आहे. त्यामुळे वणी ठाणे सांभाळताना त्यांना अडचण जाणार नाही. मात्र, अवैध धंदे फोफावणार नाही, याची खबरदारी त्यांना घ्यावी लागणार आहे. मटका जुगार, भंगार चोरी, गोवंश तस्करी, सुगंधी तंबाखूची होणारी आयात याचे समूळ उच्चाटन करण्याचे तगडे आव्हान त्यांच्यापुढे आहे.


पैकूजी आत्राम यांना 'आदिवासी समाजभुषण पूरस्कार' प्रदान


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : पैकूजी आत्राम हे आदिवासींच्या सामाजिक,कला व साहित्य क्षेत्रात नेहमी उल्लेखनिय कार्य करीत असतात.ते कोलामी भाषीक विध्यार्थ्यांच्या प्रगती साठी कोलामी भाषेतून विविध शैक्षणिक साधने,उपक्रम व लेखन करीत असतात.त्यांनी कोलामी भाषीक विध्यार्थ्यासाठी कोलामी-मराठी द्विभाषीक पुस्तकांची निर्मीती करून यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी शाळेत वितरीत केलेले आहे.ते कोलामी भाषीक मुलांसासाठी नवनवीन उपक्रम राबवित असतात.नुकतेच त्यांच्या एका उपक्रमाला 'National Level Teacher Innovation Award' मिळालेला आहे.ते आदिम कोलामी भाषेच्या संशोधनासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पूणे येथे कोलामी-मराठी शब्दकोश दिलेला आहे.

जिल्ह्यातील जिल्हापरिषद शाळेतील बहूल कोलामी भाषीक विध्यार्थ्यांच्या शाळेतील अनेक शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे.तसेच कोलामी भाषेतील बोधप्रद व प्रेरणादायी गीतांची रचना करून आदिवासी प्रबोधन कार्यक्रमात सादर केलेली आहे.या बाबींचा विचार करून वणी येथे दिनांक २४ जून २०२३ ला दुसरे नवोदित आदिवासी साहित्य परीषदेत त्यांचा 'आदिवासी समाज भुषण पुरस्कार' साहित्य परिषदेच्या अध्यक्षा साहित्यीक व विचारवंत आ.कुसूम अलाम यांच्या हस्ते पैकूजी आत्राम यांना प्रदान करण्यात आला.या प्रसंगी श्री.प्रभु राजगडकर,सौ.उषाकिरण आत्राम, श्री.दशरत मडावी,श्री.वसंत कनाके व सौ.शितल ढगे इत्यादी साहित्यीक व विचारवंत उपस्थित होते.

सिंधी येथील नागरिकांची ओरड, प्रभागातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : रविवार च्या मध्यरात्री पासून पावसाची रिपरिप सुरु झाली. काल सोमवारला दुपारी झालेल्या पावसाने तालुक्यात जोरदार पाऊसाने हजेरी लावली, त्या पावसाने  घाण वाहून गेली, मात्र काही गावातील पायदळी चालणाऱ्याची डोकेदुखी वाढवल्याचे चित्र आहे.

सिंधी (महागांव) येथील प्रभाग 1 मध्ये, नळ योजनेच्या कामासाठी गावातील चांगल्या रस्त्यांचे खड्ड्यात रूपांतरण झाल्याचे नागरिकांतून ओरड आहे. त्यावर कोणत्याही पद्धतीचे पुनर्भरणा करण्यात आला नसल्याने अधून मधून सुरु असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या चिखलाचा नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहे.

प्रशासन, ठेकेदार, की ग्रामपंचायत पदाधिकारी याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वर्दळीच्या रस्त्यावर पावसाचे घाण पाणी साचून रस्त्याची चाळण झाली असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळतेय. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. याकडे ग्रामपंचायत पदाधिकारीचे दुर्लक्ष होत असल्याचे तक्रारी समोर येत असून या मार्गांवरून येणाऱ्या जाणाऱ्यांकडून संताप व्यक्त आहे.

दोन दिवसापासून वरून राजाचे आगमन झाले असून हवामान अंदाज मुसळधार पाऊस बरसणार असे संकेत असतांना तातडीने या समस्याकडे ग्रामपंचायतने लक्ष देऊन ग्रामस्थांना होणारा नाहक त्रास कायमचा सोडवावा अशी मागणी सह अपेक्षा आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे. सुरु असलेले काम पुर्ण झाल्याशिवाय सदर रस्ता पूर्ववत करता येणार नाही, मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सध्या मुरूम टाकून दिल्या जाईल.

-अविनाश लांबट
उपसरपंच तथा कृ. बा. स मारेगाव 

यंदाही साई मित्र परिवारातर्फे भव्य रक्तदान शिबिर व जाहीर व्याख्यानचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सतत 13 वर्षांपासून रक्तदान शिबीर घेवून अनेक गरीब गरजवंत लोकांना जीवनदान दिले आहे, तेच कार्य अविरत सुरु असून याही वर्षीही गुरुपौर्णिमा महोत्सव निमित्त (2023) भव्य रक्तदान शिबीर रविवार दि.2 जुलै ला सकाळी 11 ते 4 वाजे पर्यंत येथील महामार्गवरील जगन्नाथ महाराज मंदिर, राष्ट्रीय विद्यालय मारेगाव येथे संपन्न होणार आहे.
या शिबिरात वसंतराव नाईक शासकीय रक्तपेढी यवतमाळ यांच्या सौजन्याने पार पडणार असून सायंकाळी 7. वाजता सोपानदादा कनेरकर यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे. सोमवार दि. 3 जुलै ला दुपारी 3 ते सायं.5 वाजता महा प्रसादाचा लाभ घेता येईल त्यानंतर पाच वाजता भव्य शोभा यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या भव्य रक्तदान शिबिरास, जाहीर व्याख्यान, महाप्रसाद व शोभा रात्रेत तालुक्यातील जनतेनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान, महाप्रसाद व शोभा यात्रेला उपस्थित राहण्याचे आवाहन साई मित्र परिवार यांचे वतीने करण्यात आले आहे.

कोतवाल हा तहसीलचा कणा आहे: तहसीलदार उत्तम निलावाड यांचे प्रतिपादन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : कोतवाल हा तहसीलचा कणा आहे. त्यांच्याशिवाय अनेक कामे अपूर्ण आहे. पद कोणतेही असले तरी ते लहान नसते. त्या पदाला न्याय देण्याचे काम खऱ्या अर्थाने तुम्ही कोतवाल लोक करीत आहात असे प्रतिपादन तहसीलदार यु एस निलावाड यांनी केले. ते कोतवाल संघटनेतर्फे (ता.२५ जून) नवरगांव येथील स्नेहभोज कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त तलाठी रामदास वरारकर, कनिष्ठ लिपिक गजानन ढेंगळे, तुळसामाता देवस्थान नवरगांवचे सचिव विलास नक्षीणे, कोतवाल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत निमसटकर उपस्थित होते.
   
यावेळी पुढे बोलतांना निलावाड म्हणाले की, तहसील कार्यालयामध्ये अशी अनेक कामे आहेत जी कोतवाल सक्षमपणे करू शकतात. व्यक्ती हा पदाने लहान किंवा मोठा होत नसतो तर, कार्य करण्याची उर्मी आणि कार्यनिष्ठा ही त्या व्यक्तीला महान बनवत असते. काही ठिकाणी रेतीच्या अवैध वाहतुकीवर आम्ही धाडी टाकल्या त्यावेळीही आम्हाला कोतवाल बांधवांचे मोठे सहकार्य लाभले. कदाचित त्यांच्याविना ही प्रक्रिया अधुरी राहिली असती असेही तहसीलदार निलावाड म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष सुरेश येरमे यांनी, प्रास्ताविक अतुल बोबडे यांनी तर आभार प्रदर्शन कु. रोशनी वरखडे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व कोतवाल बांधव त्यांच्या कुटुंबियांसमवेत उपस्थित होते.