विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अंजुम कादरी (शेख) यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते ॲड मनोहरराव गोमारे यांच्यासह मान्यवरांची सदिच्छा भेट

बालाजी सुवर्णकर | सह्याद्री चौफेर 

उदगीर : नुकत्याच उदगीर येथे झालेल्या 15 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा डॉक्टर अंजुम कादरी (शेख) यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते तथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लातूर जिल्हाध्यक्ष ॲड मनोहर
 गोमारे,अंधश्रध्दा निर्मुलन समितिचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे,लातूर जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर,सचिव सुधीर भोसले, उदगीर येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत शिक्षक तथा ज्येष्ठ साहित्यिक विश्वनाथ रावजी मुडपे, साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य तथा पत्रकार धनंजय गुडसुर, श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयातील शिक्षक तथा सावित्रीबाई फुले महिला शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचे संचालक बालाजी सुवर्णकार यांनी सदिच्छा भेट देऊन उदगीर येथे पार पडलेल्या विद्रोही साहित्य संमेलना विषयी चर्चा झाली. या वेळी डॉ.अंजुम कादरी (शेख) यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करुन त्यांना पुढील कार्यासाठी सर्व उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा डॉ.अंजुम कादरी (शेख) व नगरसेवक अहमद सरवर शेख यांनी सन्मान केला.

 या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नगरसेवक अहमद सरवर यांनी पुढाकार घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहमद यांनी केले. तर संमनाबद्दल आभार बालाजी सुवर्णकार यांनी केले.

महिला सरपंचांनी युवकाला केली मारहाण, तक्रारीतून कारवाईची मागणी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : तालुक्यातील कोलार (पिंप्री) येथील सरपंचांकडून गावातील युवकाला मारहाण केल्याची घटना शनिवारला दहा वाजताच्या दरम्यान घडली.

गावातील समस्या संदर्भात दीपक नरवाडे यांनी ग्रामसभेत प्रश्नांची विचारणा केली असता, या प्रश्नाचे उत्तरे नंतर देण्यात येईल असे सांगून दीपक नरवाडेंना घरी बोलावण्यात आले.
समस्ये संदर्भात माहिती घेण्यासाठी दीपक सरपंच साधना बंडू उईके यांचे घरी गेला. त्यावेळी 'मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे का देवू' असे म्हणत २५ वर्षीय दीपकला मारहाण करण्यात आली. दरम्यान, बंडू उईके वि दीपक कांबळे हे घरी पोहचले व दिपक नरवाडेला ओढतान करून, जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दीपक नरवाडे यांनी तक्रारीतून केली आहे. 

चुकीच्या खात्यात ट्रान्स्फर झालेले पैसे परत मिळवा

योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : हल्ली पैशांचे व्यवहार करण्याचे अनेक मार्ग निर्माण झाले आहेत. बँकेचे पैशांचे व्यवहारदेखील आता आपल्या स्मार्टफोनवरून आपल्याला सहज करता येतात. कोणालाही पैसे पाठवणं किंवा कोणाकडून पैसे घेणं आता अगदी सोपं झालं आहे; मात्र स्मार्टफोनवरून किंवा एखाद्या बँक अ‍प्लिकेशनच्या साह्याने व्यवहार करताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. ऑनलाइन पैशांचे व्यवहार कसे करावेत, याची आपल्याला पुरेशी माहिती असणं गरजेचं आहे.

ऑनलाइन व्यवहार जेवढे सोपे तेवढेच अवघडदेखील असतात. एखादेवेळी आपण पैसे पाठवत असताना चुकून ते पैसे कोण्या दुसऱ्याच व्यक्तीला जाण्याची शक्यता असते. असं झाल्यास घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. कारण चुकीच्या खात्यात पैसे गेल्यास ते तुम्हाला परत मिळू शकतात. 

पैशांचा व्यवहार करताना तुमच्याकडून चुकून पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्स्फर झाले असतील तर त्वरित तुमच्या बँकेला याची माहिती द्या. त्याचबरोबर कस्टमर केअरला फोन करून घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती द्या. बँकेने तुम्हाला ई-मेलवर सर्व माहिती विचारली, तर या चुकून झालेल्या व्यवहाराची माहिती द्या. यामध्ये झालेल्या व्यवहाराची तारीख आणि वेळ, तुमचा खाते क्रमांक आणि ज्या खात्यात तुमच्याकडून चुकून पैसे ट्रान्स्फर झाले आहेत त्याविषयी संपूर्ण माहिती द्या.

घडलेला प्रकार तुम्ही बँकेला कळवल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात. काही वेळा अशी प्रकरणं सोडवण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधीदेखील लागू शकतो. तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन याबद्दल चौकशी करू शकता, की ट्रान्स्फर झालेली रक्कम कोणत्या शहरातल्या कोणत्या बँकेच्या कोणत्या शाखेतल्या खात्यात जमा झाली आहे. मग तुम्ही तुमच्या शाखेशी बोलून पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करू शकता. यानंतर ज्या व्यक्तीच्या खात्यात तुमचे पैसे जमा झाले आहेत त्या व्यक्तीच्या बँकेला तुमची बँक घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती देईल. त्यानंतर ती बँक त्या व्यक्तीकडून हे चुकून ट्रान्स्फर झालेले पैसे परत करण्याची परवानगी मागते.
याव्यतिरिक्त अनेक प्रकारांमध्ये तुम्ही कायद्याचा आधारदेखील घेऊ शकता. ज्या व्यक्तीच्या खात्यात चुकून पैसे जमा झाले आहेत. त्या व्यक्तीने पैसे परत देण्यास नकार दिला, तर तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल करू शकता. कारण त्या व्यक्तीने पैसे परत न केल्यास ते रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं उल्लंघन करण्यासारखं आहे.
अशा परिस्थितीत तुम्हाला न्यायालयात जाण्याचा अधिकार प्राप्त होतो. आरबीआयने बँकांना सूचनादेखील दिल्या आहेत, की जर चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले, तर तुमच्या बँकेला लवकरात लवकर यावर कार्यवाही करावी लागेल. अर्थात, आपण स्वतःही चुकीच्या खात्यात पैसे जाणार नाहीत, यासाठी आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं आहे.

मुस्कान सय्यद ठरली विद्यापीठ उत्कृष्ठ रासेयो स्वयंसेवक पुरस्काराची मानकरी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाने नुकतेच राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी व उत्कृष्ठ स्वयंसेवक पुरस्काराची यादी आज (२८ मे) ला जाहीर केली. त्यात  लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथील राष्ट्रीय सेवा योजना ची स्वयंसेविका कु.मुस्कान सय्यद ही उत्कृष्ठ स्वयंसेविका पुरस्काराची मानकरी ठरली आहे.

कु.मुस्कान सय्यद हीने रासेयो मध्ये अतिशय महत्वपुर्ण योगदान दिले असून, जनजागृती अभियान, पाणी बचाव अभियान, रक्तदान, मतदान, मुलीच्या जन्माचे स्वागत करू अभियान, आपत्कालीन व्यवस्थापन यात तिने विशेष योगदान दिले असून ती TDRS मध्ये क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम करतांना समाज जीवनात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेतून हजारो विद्यार्थ्याना प्रशिक्षणातून धडे देण्याचे काम केले आहे.
कोरोना महामारीच्या काळात रूग्णाना मदतीचा हात सुद्धा मुस्काननी दिला आहे. "बेटी बचावो बेटी पढाओ" या ब्रिद वाक्याच प्रत्यक्ष उदाहरण कु.मुस्कान असून तीच्या कार्याची दखल मा.डॉ.दिलीप मालखेडे, कुलगुरू यांच्या नेतृत्वात व डॉ.राजेश बुरंगे संमन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पुरस्कार निवड समितीने घेतली असून, कु.मुस्कान सय्यद हीला राष्ट्रीय सेवा योजना चे उत्कृष्ठ स्वयंसेविका पुरस्कार जाहीर झाला आहे.
ती आपल्या यशाचे श्रेय मा.प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे, रा.से.यो कर्तव्यदक्ष कार्यक्रम अधिकारी व मुस्कानच्या मार्गदर्शीका डॉ.निलीमा दवणे तसेच प्रा. किशन घोगरे आणि आपल्या आई वडीलांना देते.
मुस्कानला उत्कृष्ठ स्वयंसेविका पुरस्कार जाहीर झालाबद्दल तिचे सर्वस्तरावरून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

युवा शेतमजुराची गळफास घेवून आत्महत्या


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील म्हैसदोडका येथील एका युवा शेतमजूराने आज 28 मे रोजी दुपारीच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली.

शुभम उत्तम देवतळे (28) असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या शेतमजूराचे नाव आहे.

तालुक्यात आत्महत्येची मालिका कायम दिसून येत आहे. आज  म्हैसदोडका येथील एका शेतमजूराने राहत्या घरी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली.

आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट असून वृत्त लिही पर्यंत इतर माहिती प्राप्त होऊ शकली नाही. मात्र त्याने आत्महत्या केल्याची चर्चा गावात आहे.