साहेब रुग्णवाहीका दिली पण रेफर, अवहेलनाच काय?

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : उपविभागीय कार्य क्षेत्रात आमदार साहेबांनी वणी झरी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सुविधा  मिळण्यासाठी रुग्णवाहीका दिल्या. मात्र, येथील सर्प दंश व अपघात झालेले रुग्ण अद्यापही रेफर होत आहे. असे चित्र असतांना साहेबांचे या गंभीर प्रश्नाकडे जणू दुर्लक्ष होताना दिसत आहे. आपण या वणी विधानसभा क्षेत्राचे चे आमदार असतांना आपण ह्या जनतेच्या समस्या सोडवू शकत नसतील तर आमदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मनसेने केली होती.

जनतेची सेवा करण्यासाठी येथील विधानसभा मतदार संघातील लोकांनी काम करणारा माणूस म्हणून दुसऱ्यांदा संधी दिली आहे. शेत पांदन रस्ते, बस स्थानक, क्रीडा संकुल हे अद्याप थंड बस्त्यात आहे. सोबतच मारेगाव ग्रामीण रुग्णालयाची अवदसा झाली असतांना याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अपघातातील रुग्णांना यवतमाळ चंद्रपूर रेफर केल जात किंबहुना येथे अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत तासंतास रुग्णांना ताटकळत बसाव लागत आहे. एकीकडे "सबका साथ सबका विकास" चा नारा देणारे आमदार यावर कोणतीही भूमिका स्पष्ट घेताना दिसत नाही हेच वणी विधानसभा मतदार संघांचे दुर्दैव आहे. उपविभागात तीन रुग्णवाहीका प्रदान केली त्याचा उहापोह होत आहे. मात्र, ग्रामीण रुग्णालयात काय चालू आहे. याच यांना काहीच ठाव नाही हीच खरी शोकांतिका आहे. एकदा साहेबांनी येथील भोंगळ कारभार चहाट्यावर आणून गोरगरीब रुग्णांना द्यावा अशी सर्व सामान्य जनतेची अपेक्षा आहे.
गेली दीड महिना वैद्यकीय अधिकारी रजेवर होते, अशात अनेक तक्रारी समोर येत होत्या, अक्खा मारेगाव प्रशासन प्रभारावर असून, रुग्णांना वाऱ्यावर सोडलं जात असतांना साहेब गप्प का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. एकूणच साहेब केवळ प्रसिद्धीसाठी सगळा लवाजमा करित असल्याचे यावरून दिसून येत आहे.
अशावेळी रुग्णवाहीका देण्यापेक्षा रुग्णालयात लक्ष देणे गरजेचे आहे. यातच सामान्यांना न्याय मिळेल हीच अपेक्षा आहे.

केंद्रीय मंत्री मा.श्री.नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्य ग्रामीण रुग्णालय कळंब येथे रुग्णांना फळ वाटप


रूस्तम शेख | सह्याद्री चौफेर 

कळंब : भारतिय जनता पार्टीचे जेब्ठ नेते केद्रिय मंत्री मा नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्त कळंब येथील ग्रामीण रूग्णालयात भाजप कळंब तालुका यांच्या वतीने रूग्णांना फळ वाटप करण्यात आले .

 यावेळी भाजपा कळंब तालुका अध्यक्ष कैलास बोंद्रे, शहर अध्यक्ष संदीप वैद्य, सरचिटणीस सुरेशजी होरे, अशोकभाऊ गारगाटे, सुभाषजी पवार, गणेशजी वाल्दे, तुषार शेंडे, रुपेशजी सुचक, जगदिशजी भेले, भुजंगराव शिंदे, मलमवारजी, रूपेश सुचक इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते..
   

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा कार्यालयाच्या वतीने आदिवासी पारंपारीक नृत्य स्पर्धा

सह्याद्री | चौफेर न्यूज 

पांढरकवडा : आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याकरीता व आदिवासी समाजाच्या पारंपारिक नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा, या कार्यालयाचे स्तरावर आदिवासी पारंपारीक नृत्य स्पर्धा 4 जून 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरीता नृत्य कार्य क्षेत्रातील पथकांनी दिनांक 1 जून 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प कार्यालयात अर्ज सादर करावेत. स्पर्धेत भाग घेणाऱ्या नृत्य पथकातील कलाकारांना मानधन, येण्या-जाण्याचा प्रवास खर्च, दैनिक भत्ता, पेहराव भत्ता, पारितोषिक इत्यादी मिळणार आहे.
या प्रकल्प कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील आदिवासी समाजामधील विविध जमातींच्या पारंपारिक नृत्य पथकांनी आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे संपर्क करावा, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.

बहात्तर (बोथ) येथे मार्गदर्शन व नेतृत्व कार्यक्रम संपन्न

सह्याद्री | चौफेर न्यूज 

केळापूर : राष्टीय पिछडा वर्ग मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा,राष्टीय आदिवशी एकता परिषद मार्फत मौजा बहात्तर (बोथ) या गावी दिनांक २५ मे रोजी भारत बंद कार्यक्रम आयोजित केले.

या कार्यक्रमाचे नेतृत्व मा.ऍड.अनिल भाऊ किनाके मा.रुची कांलिदे मॅडम यांनी या देशातील बहुजन समाजावर होत असलेल्या अन्याय विरोधात प्रमुख मार्गदर्शन आणि नेतृत्व केले.कार्यक्रमाला बहात्तर (बोथ) येथील तमाम कार्यकर्ते उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडले.
 कार्यक्रमा उपस्थिनी मा.तुकाराम नैताम, भरत मंगाम, अनिल आत्राम, महादेव मेश्राम, वासुदेव पेंदोर,नागोराव धुर्वे,उत्तम साठे, चंदू झामरे, संजय धुर्वे, नामदेव पेंदोर, बळीराम मेश्राम, गावातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

व्यसनापासून दूर रहा, सुखी जीवनाची सूत्रे गवसायाला वेळ लागणार नाहीत - अनिल डोंगरे

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : पूजनीय शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर च्या माध्यमातून गोंडपिपरी येथील पुरुषोत्तम ठाकूर यांच्या गृहप्रवेश वास्तु पूजनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून व्यसनमुक्ती, मार्गदर्शन व सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल डोंगरे जिल्हाध्यक्ष परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना. कार्यक्रमाचे उद्घाटक भाऊराव ठाकरे जिल्हा अध्यक्ष गडचिरोली, प्रमुख अतिथी दिगंबर वासेकर जिल्हा संघटक, भालचंद्र रोहणकर जिल्हा प्रचारक, श्री प्रकाश अल्गमकर,श्री दिपक ठाकरे, श्री आकाश शिरसागर,श्री अशोक पटेल,श्री भोजराज एकोणकार,श्री मारुती वाकुलकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

मार्गदर्शनपर कार्यक्रमात बोलताना डोंगरे म्हणाले की, दारूच्या आहारी गेलेले लोक समाजात आपला मान सन्मान वाढवू शकत नाही,आपल्या परिवारास सुख समाधान,ऐश्वर्य देवू शकत नाही, मात्र व्यसन मुक्त होण्याचा एकदा का निर्धार केला तर "नांदा सौख्यभरे..." सुखी जीवनाची सूत्रे गवसायला वेळ लागणार नाही.
पुढे बोलताना, व्यसनमुक्ती मुळेच आज वास्तु व पूजनाच्या कार्यक्रम आयोजन करण्यात आला त्या निमित्ताने घरचे प्रमुख व्यक्ती नऊ वर्षापूर्वी दारू व्यसनाच्या आहारी गेले होते, त्यांनी परमपूज्य शेषराव महाराज यांचा दारू व्यसनमुक्तीचा संकल्प घेतला आणि ते दारू व्यसन मुक्त झाले. आज ते आपली स्वतः व्यथा मांडत असताना एके काळी ते झोपडीतच राहायचे, त्यांचे मानधन 9000 हजार. मी जर दारू पीत राहिलो असतो  तर एवढे सुंदर पंधरा लाखाचे घर बांधू शकलो नसतो.
आज कित्येक परिवार या दारू व्यसनामुळे उध्वस्त झाले आहे त्यांचे मुले बाळे रस्त्यावर आले आहे.या संघटनेच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाज घडवण्याकरिता हे कार्य जोमात सुरू आहे असे ते या प्रसंगी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमांतर्गत सौ कुसुम पुरूषोत्तम ठाकूर या दाम्पत्याचा व कुमारी प्रतीक्षा घ्यार यांचा जिल्हा संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.