पालकमंत्री मा. विजय वडेट्टीवार यांच्या ताफ्याला लोडशेडिंग बंद करा, अशी घोषणाबाजी देऊन निर्देशन आंदोलन


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी,भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने पडोली फाटा चौक चंद्रपूर(ग्रामीण) येथील महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वीज टंचाई विरोधात मेणबत्ती पेटवून चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय विजय वडेट्टीवार यांच्या ताफ्याला लोडशेडिंग बंद करा अशी घोषणाबाजी नारे देऊन विरोध दर्शविण्यात आला.

माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री तथा लोक लेखा समिती प्रमुख विधिमंडळ व माननीय देवरावदादा भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा, मा. नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा यांच्या मार्गदर्शनात व प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा अनिल डोंगरे यांचे नेतृत्वात झालेल्या या निदर्शने आंदोलनात विजय आग्रे तालुका महामंत्री भाजपा, सौ.दुर्गा बावणे तालुका महामंत्री भाजपा, महिला आघाडी रामू बल्की तालुका महामंत्री, विनोद खेवले तालुका सचिव, विनोद खडसे, आशिष वाढई,अशोक पटेल,विनोद करमरकर,रोहन चालेकर,विक्की रेगुंत्वार,मोनू ठाकुर,दीपक गायकवाड, विष्णू वर्भे,संतोष सोनकर,राहुल पेंदल,बबन श्रिसागर, जागेश्वर चांदेवार, इत्यादी यांच्या उपस्थितीत या आंदोलन वेळी अनिल डोंगरे यांनी मागील भाजपा सरकारच्या काळात शेतकरी छोटे-मोठे उद्योग व्यापारी घरगुती वीज ग्राहक यांना वीज टंचाई व लोडशेडिंगमुळे कसल्याही प्रकारचा त्रास व नुकसान भरपाई चा सामना करावा लागला नाही. परंतु या महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र प्रकाशातून अंधारात जात आहे.

चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे या जिल्ह्यात मोठ मोठे वीज प्रकल्प आहे. कोळसा खाणी, सिमेंट कारखाने,पोलाद कारखाने इत्यादी मुळे पहिलेच चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान संपूर्ण भारतातून उच्चांक गाठत आहे. या तापमानामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. आमची या आंदोलनाच्या रूपाने शासनाला विनंती आहे की, चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला या वीज टंचाईचा (लोडशेडिंग) भार पडू देऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे ते यावेळी बोलले.या आंदोलनाला चंद्रपूर (ग्रामीण) तालुक्यातून पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आबड भवनला भीषण आग, फर्निचर जळून लाखोंचे नुकसान

सह्याद्री | चौफेर न्यूज

वणी :  टागोर चौकात असलेल्या आबड भवन ला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान अचानक भीषण आग लागली. आग लागल्याचे वृत्त परिसरात पसरताच नागरिकांनी भवन कडे धाव घेतली. दरम्यान भवन अगीच्या विळख्यात असतांना भवन लगत दुकान आगीत जळून खाक झाल्याचे वृत्त आहे.

  
थोडक्यात असे,शहरातील टागोर चौकात असलेल्या  आबड भावनातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले, जवळपास दुपारचे ३ वाजले असतील. बघता बघता धूरातून भीषण आग दिसून आल्याने त्याठिकाणी बघ्यांची एकच गर्दी उसळली होती.

अग्निशमन दलाला कळताच अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत असून,यात लगतचे फर्निचर शॉप जळून खाक झाले. लाखोंचे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे,मात्र नेमकी आग कशाने लागली याबाबत माहिती मिळू शकली नाही.


किरकोळ विक्रेत्याने कॅरीबॅगसाठी माणसाकडून 12 रुपये आकारले. आता त्याला 21,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी लागेल

                       (फाईल फोटो)


विशाखापट्टणम येथील वकील सीपना रामा राव या ग्राहकाने किरकोळ विक्रेत्याकडून 600 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कपडे खरेदी केले होते. चेकआउटच्या वेळी, त्याला आउटलेटचा लोगो असलेल्या कॅरी बॅगसाठी पैसे देण्यास सांगण्यात आले.

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील एका ग्राहक न्यायालयाने अलीकडेच एका किरकोळ विक्रेत्याला ग्राहकाला त्याच्या लोगो असलेल्या बॅगसाठी शुल्क आकारल्याबद्दल नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

विशाखापट्टणम येथील वकील सीपना रामा राव या ग्राहकाने किरकोळ विक्रेत्याकडून 600 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कपडे खरेदी केले होते. चेकआऊटच्या वेळी त्याला कॅरीबॅगसाठी 12 रुपये देण्यास सांगण्यात आले. राव यांनी कॅशियरला सांगितले की ते बॅगसाठी पैसे देणार नाहीत परंतु त्यांनी आग्रह केल्यावर त्यांनी हे प्रकरण स्टोअर व्यवस्थापकाकडे मांडले.

त्याला बॅग फुकट देण्यासही व्यवस्थापकाने नकार दिला. जेव्हा राव यांनी दुकानाची जाहिरात करणाऱ्या बॅगसाठी शुल्क आकारणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले तेव्हा व्यवस्थापकाने त्याच्यावर ओरडले, अहवालानुसार.

त्यानंतर झालेल्या मानसिक छळाबाबत ग्राहकाने भरपाईची मागणी करत शहरातील ग्राहक न्यायालयात धाव घेतली.

टाईम्स ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, विशाखापट्टणम जिल्हा ग्राहक आयोगाने किरकोळ विक्रेत्याला त्या व्यक्तीला 21,000 रुपये नुकसानभरपाई, 1,500 रुपये कायदेशीर खर्च आणि बॅगसाठी आकारलेले पैसे परत करण्याचे आदेश दिले. किरकोळ दुकाने कंपनीचा लोगो असलेल्या कॅरी बॅगसाठी शुल्क आकारू शकत नाहीत.

2021 मध्ये, हैदराबादमधील एका ग्राहक न्यायालयाने असा निर्णय दिला होता की, लाइव्ह लॉ (live law) अहवालानुसार, हे एक अयोग्य व्यापार प्रथा आहे.

जोपर्यंत ईच्छा आकांक्षा असेल तोपर्यंत सुख दुःख कधीही संपणार नाही: अंध बाल कलाकार "चेतन"


सह्याद्री | चौफेर न्यूज 
          
मारेगाव : स्वतःच्याच हाताने स्वतःचा मृत्यु ओढवुन घेणे अर्थात आत्महत्या करणे ही कृती चुकीची असल्याचे मनोगत (ता.२०) एप्रिल रोजी नगरपंचायत मारेगावच्या प्रांगणात झालेल्या चेतन सेवाकुंर प्रस्तुत "मैफिल स्वरांची" ह्या संगीतमय कार्यक्रमातील मुख्य वादक अंध बाल कलाकार "चेतन" ह्याने व्यक्त केले. जीवनाशी संघर्ष करणाऱ्या या अंध बाल कलावंतानी सादर केलेल्या हिंदी मराठी गीतांनी मारेगावकरांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले होते.
        
दरम्यान या कार्यक्रमाचे उद्घाटन ठाणेदार राजेश पुरी, राकेश खुराणा, ॲड.सूरज महाडोळे, याचे हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नेते गजानन किन्हेकर,माजी जि. प.सदस्य अनिल देरकर, नगरसेवक नंदेश्वर आसुटकर होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर व एस.बि.ट्रेडर्स चे संचालक गौरीशंकर खुराणा तसेच कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मामचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.
            
मारेगाव तालुक्यात सातत्याने होणाऱ्या आत्महत्या हा चिंतेचा विषय असुन मागील दोन वर्षात शतकी आकडा पार झाला आहे. हाच धागा जोडत अंध बाल कलाकार चेतन पुढे म्हणाला, आम्ही अंध असुन सुध्दा सकारात्मक (positive) विचार करुन आनंदी जीवन जगतो. जोपर्यंत ईच्छा आकांक्षा असेल तोपर्यंत सुख दुःख कधीही संपणार नाही. यासाठी कर्तव्यनिष्ठ राहुन हिम्मत, परिश्रम उद्योग करण्यात पुरुषार्थ असुन आपले जिवन तेजोमय करण्यासाठी सकारात्मक विचारसरणी असेल तर आत्महत्या होणार नाही. असे मनोगत व्यक्त करुन गीतांच्या संगीतमय कार्यक्रमातून नातेसंबंध व समाज प्रबोधनाचे दर्शन घडवत मारेगावकर तथा परिसरातील बांधवांना मंत्रमुग्ध केले. 

कोट्यावधी निधी शासनाला देणारा मोहदा गाव विकासापासून वंचित: सचिन रासेकर

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : यवतमाळ जिल्हातील तालुका वणी अंतर्गत मौजा मोहदा गाव नावे गौणखनिज शासनाला कोट्याधीश रुपये प्राप्त होतं असताना, 30 वर्षांपासून गाव मात्र स्वामीत्व धनाच्यानिधीपासू आजही वंचित असल्याचे माहिती अधिकाराच्या माहिती वरून समोर आले आहे. ही उदासीनता कोणाची? असा प्रश्न माहिती अधिकार कर्ते सचिन रासेकर यांनी उपस्थित केला आहे.

वणी तालुक्यातील मोहदा हे गाव गौणखनिज साठी प्रसिद्ध असून,वणी उद्योगिक विकास महामंडळ यांच्या कडून स्वामीत्व धन प्राप्त होणाऱ्या धना पेक्षा मोहदा हे एक मात्र गाव मागील तीस वर्षा पासून शासनाला 400 कोटी स्वामीत्व धन देणारे गाव ठरले असून, देणाऱ्यानी देतच राहावे, घेणाऱ्यानी घेतच राहावे हे धोरण शासना प्रती राहिल्याने मोहदा गावाचा विकास हा वाजोटा ठरला असून तो का झाला नाही? झाला तर शासन खर्च किती हा प्रश्न माहिती अधिकार निर्माण कर्ते सचिनला यांना भेडसावला असल्याने दिनांक 21 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्हाअधिकारी खनिकर्म विभाग यांना खनिज विकास निधी अंतर्गत झालेली कामे या बाबत माहितीचा तपशील मागितला असता जन माहिती अधिकारी यांचा अभिप्रायात सन 2016 ते 2021 या कालावधीत खनिज विकास निधी मधून कामे मंजूर झाल्याचे दिसून येत नाही अशी पुष्टी देऊन, शासन कामा प्रति व जनते प्रति जनसेवक कर्तृत्वाचे काम हे निष्टेने पूर्ण करत नसल्याचे चित्र समोर येत असून शासनाच्या तिजोरीत नजाराणा स्वरूपात स्वामीत्व धन प्राप्त होत असताना गावाच्या वाट्याला फक्त खड्डे व पिण्यास दूषित पाणी, प्रदूषण हेच वाट्याला काय?असा संतप्त प्रश्न माहितीधिकार करत्याकडून उपस्थितीत केला असून उत्पन्न प्राप्त गाव विकासा पासून वंचित राहत असेल तर, तांडा वस्ती, पोड वस्ती, यांचा विकास खरंच झालं असतील काय हे माहिती अधिकारावरून समोर येत असून शासन दप्तरी, कामाची दिरंगाई खरंच विकासाच्या दिशेने घेऊन जातील काय हा प्रश्न सचिन रासेकर यांना दिलेल्या माहिती वरून समोर येत असून स्वामित्व धन आकडा लक्षात घेता गौणखनीज गाव निधीच्या थकीत 40 कोटीच्या निधीला दिशा येणार तर केव्हा? अस्या थकीत देयकाच्या विकास निधी वरून प्रश्न सचिन रासेकर यानी केला आहे.