ग्रामपंचायत कासारबेहळ येथे पहिली ग्रामसभा पार पडली


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
महागांव : दि.३१ ऑक्टो. २०२१ रोजी कासारबेहळ ग्रामपंचायत येथे ग्रामसभा घेण्यात आले आली. कोविड कालावधीत सर्व सभा ठप्प पडल्या होत्या, परिणामी अनेक प्रश्न, समस्या व कामं रखडली होती. कोरोनामुळे या दोन वर्षाच्या काळात एकही सभा घेता आली नाही. मात्र, हळूहळू सर्व पूर्वपदावर परिस्थिती येत असतांना पाहून कासारबेहळ येथे आज रोजी पहिली ग्रामसभा पार पडली. यासभे मध्ये तंटामुक्त अध्यक्ष पदी फेर निवड दशरथ राठोड यांची करण्यात आली आहे. उपस्थितांनी राठोड यांचे पुषगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


या ग्राम सभेमध्ये समाजसेवक नंदकुमार मस्के यांनी काही विशेष मुद्दे मांडले ते पुढील प्रमाणे :
• रोजगार सेवक यांचे कोरोना काळात केलेल्या कामाचं मानधन देण्यात यावे.

• सार्वजनिक शौचालय च्या बाजूची उर्वरित मोकळी जागा, त्या जागेवर महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाकरीता जागा उपलब्ध करून द्यावी.

• सिंचन विभागाचा क्र.1 व क्र 2 येथील ज्या संस्थेला सिंचन विभागाने मच्छी व्यवसायासाठी तलाव देण्यात आले त्या संस्थेला लेखी स्वरूपात पत्र देऊन त्या मच्छी चे सध्याचे दर स्थानिकांना दर 200 रु. किलोने मिळत असल्यामुळे ते 120 रु. किलो करण्यात यावे.

• संबंधित (पं.स) विभागाने ग्रामपंचायत चे सन 2014 -15 मध्ये दिलेले गाव नमुना आठ कॉन्ट्रॅक्ट कोणत्याही शेजार्यांना विश्वासात न घेता, पाचशे ते हजार रुपये घेऊन ग्रामपंचायत ची खुली जागा व ग्राम रोड पैसे देऊन वाढविण्यात आले तरी, ग्रामपंचायत ने आजूबाजूच्या लोकांना विश्वासात घेऊन परत नमुना आठ तयार करण्यात यावा.

• गावठाणा येथील मोजमाप करून संबंधित लाभार्थ्यांना गाव नमुना आठ देण्यात यावा.

• सध्या वातावरणात बदल होत असल्यामुळे साथीच्या रोगाचे थैमान असून आरोग्य सेवकांनी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करावी, असे काही मुद्दे मांडण्यात आले. या गंभीर विषयाकडे सदर ग्रामपंचायत जातीने लक्ष देते किंवा नाही याकडे कासारबेहाळ व सेवानगर येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दशरथ राठोड यांची निवड :
या ग्राम सभे मध्ये दशरथ थावरा राठोड यांची फेरनिवड सर्वानुमते सलग तीन वेळा निवड करण्यात आली. तसेच या निवडी मध्ये नवनिर्वाचित लोळबा पाटील यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या निवडीचे श्रेय तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ राठोड यांच्या समवेत सर्व गावाकऱ्यांना देण्यात आले.

यावेळी सरपंच सुलोचना शरद राठोड, उपसरपंच विष्णू जाधव, ग्राम. सदस्य तथा माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव करे, ग्राम.सदस्य अर्चना जाधव, ग्राम.सदस्य आश्विनी राठोड, ग्राम.सदस्य कांताबाई पाटे, माजी सरपंच अशोक तुमवार, माजी सरपंच ताराचंद चव्हाण, दिपक करे, सचिव दोडके साहेब, नायक साहेबराव राठोड (सेवानगर), एम डी राठोड, सचिन जाधव, पोलीस पाटील अशोक करे, रामेश्वर पाटील (सेवानगर पो.पा.), निरंजन कवाने, छत्रु ठाकरे, लोडबा पाटे, राजु पाटे, सदानंद जाधव, कृष्णा कवाने सह ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप पिटलेवाड व रोजगार सेवक गाजुसिंग राठोड व सर्व गावकरी उपस्थित होते.

एसटी कामगारांचा संप चिघळला: सेवासमाप्तीचे सूचनापत्र; पांढरकवडा आगारा समोर उपोषण, प्रवाशांची गैरसोय


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
पांढरकवडा :  रा.प. कर्मचाऱ्यांना मान्य केलेल्या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक रा प शासनाकडून होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अडचणीचे जात आहे महिनाभर काम करूनही वेतन वेळेवर दिल्या जात नाही कामगार करारानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेले फायदे वेळेवर मिळत नाही शासकीय कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २०२१ पासून २८ टक्के महागाई भक्ता दिला जात असून, रा.प. कर्मचाऱ्यांना फक्त ९२ टक्के महागाई भक्ता दिल्या जात आहे. ३०/०६/२०१८ चे पत्रानुसार प्रशासनाने मान्य करूनही वार्षिक वेतन दर महा भाडे भक्ता शासनाप्रमाणे दिला गेला नाही २०१८ पासून महागाई भक्तांमध्ये वाढ होऊनही दिली नाही तसेच त्यांची थकबाकी दिल्या गेली नाही शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रिम 12500/ रुपये दिल्या जातो दोन वर्षापासून मागणी करूनही त्यामध्ये आर्थिक अडचण दाखवून ती वाढ दिल्या गेली नाही ही बाबी रा.प. कर्मचाऱ्यावर अन्याय करणारी आहे त्यामध्ये आर्थिक अडचणीत सापडलेल्या २६ कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचललेली आहे कोरणा काळात रा.प. कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता अहोरात्र प्रवाशांची सेवा केली त्यामध्ये करुणा संसर्ग होऊन ३०६ कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला अशा कठीण परिस्थितीतही रा.प. कामगार आपले काम प्रामाणिकपणे करीत आहे एवढ्या कठीण परिस्थितीत काम करूनही हक्काचे देयके वेळीच मिळत नसल्याने कामगारांमध्ये फार मोठा असंतोष असल्याने दिवाळीसारखा सण समोर असतांना हक्काचे देयके कामगारांना मिळत नसल्याने कुपोषण सारखा निर्णय संयुक्त कृती समितीला द्यावा लागला.

मा.श्री. अनिल परब परिवहन मंत्री यांनी रा.प.कर्मचाऱ्यांना सन 2019 चा महागाई भत्ता देण्याचा व दिवाळी करिता दिवाळी भेट म्हणून 2500 देण्याची घोषणा करून रा प कर्मचाऱ्यांना पाने सुचली आहे. रा प कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट 15000/- मान्य असताना तुटपुंजी भेट जाहीर करून कामगारांची बोळवन केली आहे रा प कर्मचाऱ्यांना कामगार करारानुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता वार्षिक वेतन वाढीचा १ टक्का वाढ घरभाडे भत्ता ८/१६/२४ टक्के उत्सव अग्रिम 12500 दिवाळी भेट 15000/- रुपये दिवाळीपूर्वी ही थकबाकी कामगारांना द्यावी. या मागणीकरिता रा फ कर्मचाऱ्यांनी संयुक्त कृती समितीच्या निर्णय यानुसार आज पासून राज्यभर आंदोलन उपोषण होत आहे. या उपोषणाची दखल शासन व प्रशासनाने न घेतल्यास 28/10/2021 पासून आगार पातळीवर बेमुदत उपोषण सुरू आहे.

या उपोषण आंदोलनामध्ये संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी सर्वश्री रवी कनाके, निरंजन खडकीकर, विठ्ठल गेडाम, मंगेश बावनकुळे, संजय राठोड, विनोद मार्कंड, संजय हंमद, कृष्णा कनाके, रमेश आत्राम, मोहन कोरेवार, अतुल खांडरे, गुरुप्रसाद जुमनाके, जय मेश्राम, शेख चांद, नागोराव ईचोडकर, विशाल कल्यमवार, शरद राठोड, चंद्रभान मेश्राम, रमेश कोडापे, अमोल सायकवाड, किसन मडावी, मधुकर नगराळे, लक्ष्मण आत्राम, उद्धव डंभारे, येसनसुरे, गजानन चांदेकर, विनोद पवार, आकाश बेतवार, महेश सिडाम, हिरालाल चिंतामण टेकाम, सुनील मोहुर्ले, सौ लक्ष्मी ताई निमसरकार, प्रतिभा गेडाम, जोशना करलुके, जयश्री मोहुर्ले, रेखा चव्हाण, सौ सरदार अर्चना नेहारे, वनिता उईके, इत्यादी असंख्य कर्मचारी उपस्थित होते.

वनराई बंधाऱ्याची श्रमदानातुन निर्मिती - जिल्हाधिकारी गुल्हाने यांची उपस्थिती

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३१ ऑक्टो.) : आज रविवार रोजी सकाळी 10 वाजता बल्लारपूर तालुक्यातील मोैजा ईटोली येथील हत्ती नाला येथे वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग बल्लारपूर, save फॉरेस्ट save चंद्रपूर एनजीओ, महसूल विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगर परिषद बल्लारपूर यांच्या संयुक्तिक विद्यमाने 50 मिटर x 2.5 मिटर वनराई बंधारा तयार करण्यात आला. यासाठी 1500 रिकाम्या सीमेंट बोरीचा वापर करण्यात आला असल्याचे तहसीलदार राईंचवार यांनी सांगितले. सदरहु बंधा-याची सुरुवात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांचे हस्ते श्रमदान करून करण्यांत आली.
या वेळी बंधारा पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यात आले. प्रामुख्याने मुंडे acf, डॉ.दीप्ती सुर्यवंशी उपविभागीय अधिकारी, संजय राईंचवार तहसीलदार बल्लारपूर, संतोष थीपे वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांचे सहकारी, सतीश नाईक save फॉरेस्ट save चंद्रपूर एनजीओ यांचे सहकारी यांनी श्रमदान केले. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे हस्ते या प्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांचा येत्या १७ नोव्हेंबरला मूल दौरा


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३१ ऑक्टो.) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदराव पवार यांचा येत्या १७ नाेंव्हेबररला विदर्भातील गडचिरोली,मूल, चंद्रपूर दौरा असून याच तारखेला मूल नगरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान मूल येथील बल्लारपूर विधानसभा क्षेत्र कार्यालयात होणाऱ्या कार्यकर्ता मेळावा कार्यक्रम (नियाेजना) बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, बल्लारपुर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत समर्थ, ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एक बैठक पार पडली.
सदरहु बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस मूल तालुक्याचे अध्यक्ष गंगाधर कुणघाडकर, जेष्ठ नेते निपचंदजी शेरकी, मूल शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, तालुका कार्याध्यक्ष महेश जेंगठे ,मूल तालुका कार्याध्यक्ष गुरुदास गिरडकर, पोंभूर्णा तालुका अध्यक्ष विजय ढोंगे, पोंभूर्णा शहर अध्यक्ष भुजंग ढोले, पोंभूर्णा महिला शहर अध्यक्ष सोनाली भुरसे, बोदलकर, पावडे, दुर्वास घोंगडे, मूल तालुका युवक अध्यक्ष समीर अल्लूरवार, अशोक मार्गनवार, सोनल मडावी, हेमंत सुपणार, संदीप तेलंग, नंदू बारस्कर, प्रा.प्रभाकर धोटे, प्रशांत भरतकर, अंकीत वन्नतवार, दुशांत महाडोळे, ईश्वर लोनबले, अजय त्रिपतीवार, विनोद गुरनुले, आदीं पदाधिकारी उपस्थित हाेते.

वांजरी येथे वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी महोसत्व साजरा

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
केळापूर, (३१ ऑक्टो.) : वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची ५३ व्या पुण्यतिथी महोत्सव निमित्ताने श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, वांजरी यांच्या वतीने सामुदायिक ध्यान आणि विनम्र अभिवादन करण्यात आले. या महोत्सवीप्रसंगी गावात रामधून फेरी काढण्यात आली व राष्ट्रसंत तुकडोजी मंदिरात भजनाचा कार्यक्रमही पार पडला.

यावेळी किसन शेडमाके, सुभाष कुमरे, राजू गुडेवार, ह.भ.प. ईश्वर महाराज मासटवार, चंद्रशेखरजी बुर्रेवार, मोहनजी राखुंडे, अर्जुनजी सोयाम, विश्वनाथजी पडलवार, नरेंद्र कावडे, अशोक कुमरे (पोलीस पाटील), महादेव गुडेवार व बालगोपाळ आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.