भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या ३७ व्या स्मृतीदिना निमित्त नरेशबाबू पुगलिया यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रध्दांजली कार्यक्रम संपन्न


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३१ ऑक्टो.) : भारत देशाच्या माजी पंतप्रधान भारतरत्न प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांच्या ३७ व्या स्मृतीदिनी आज दिनांक ३१ ऑक्टोंबर, २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूरच्या वतीने स्थानिय प्रियदर्शिनी चौकातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात नरेशबाबू पुगलिया यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रध्दांजली कार्यक्रम घेण्यात आला.
प्रारंभी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांनी इंदिराजींच्या पुतळ्याला मालार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यांत आली. या वेळी विदर्भ किसान मजदूर काँग्रेस, युवक काँग्रेस, एन.एस.यू.आय. च्या वतीने पुतळ्याला मालार्पण करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

नरेशबाबू पुगलिया आपल्या मार्गदर्शन पर भाषणात या वेळी म्हणाले की, इंदिरा गांधी ह्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांनी आपल्या कणखर व दूरगामी नेतृत्वात देशाच्या व जनतेच्या विकासाचे व हिताचे अनेक धाडसी निर्णय घेतले. भारताच्या स्वातंत्रप्राप्ती नंतर पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री व इंदिरा गांधी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात विज्ञान, अणुशक्ती, उद्योग, कृषी सिंचन, शिक्षण इत्यादि क्षेत्रात देशाला प्रगतीच्या उच्च शिखरावर पोहोचविण्यासाठी विविध योजना, प्रकल्प व धोरण अमलात आणली.
 पुगलिया पुढे म्हणाले, "राष्ट्रमाता इंदिराजी गांधी यांनी देशाच्या अखंडतेसाठी स्वतःची कुर्बानी दिलेली आहे. इंदिराजी आपल्या प्रेरणास्त्रोत असून आदर्श आहेत. इंदिराजींच्या आदर्शानुसार आपण कार्य केले पाहिजे हीच खरी राष्ट्रमाता इंदिराजीना श्रध्दांजली ठरेल".
यानंतर विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूरच्या वतीने शासकीय सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ, बिस्कीट वाटप व मातोश्री वृध्दाश्रम येथे भोजन वाटप करण्यात आले.

सदरहु कार्यक्रमाला विदर्भ किसान मजदूर काँग्रेस चंद्रपूर, ग्रामिण जिल्हा अध्यक्ष गजाननराव गावंडे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष करण पुगलिया, जिल्हा महासचिव अॅड. अविनाथ ठावरी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र बेले, नगरसेवक अशोक नागापूरे, इंटक चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पोडे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुधाकरराव कुंदोजवार, नगर परिषद चंद्रपूरचे माजी उपाध्यक्ष अरुनभाऊ बुरडकर, माजी नरगसेवक विनोद पिंपळशेंडे, काँग्रेसचे रमजान अली, कामगार संघटनेचे रामदास वाग्दरकर, विरेंद्र आर्य, गजानन दिवसे, अनिल तुंगीडवार, काँग्रेसचे सुधाकरसिंह गौर, बाबूलाल करुणाकर, मुरलीधर चौधरी, रतन शिलावार, गोविंदा आदे, अनिता बोबडे, संगिता बैद, अंजली लहामगे, सिमा शेडाम, अर्चना नागापूरे, हेमन्त आक्केवार, सचिन गावंडे, किष्णा यादव, दर्शन बुरडकर व शेकडों कार्यकर्ते उपस्थित होते.

... आणि म्हणून या लक्ष्मीला थोडं समजून घ्या, तिला प्रेम द्या

                       

                          Il लक्ष्मी ll 

           घरची लक्ष्मी असते पत्नी... 
           घराचे घरपण असते पत्नी... 
           दिव्यातली वात असते पत्नी...
          अंगणातील तुळस असते पत्नी...

पत्नीला कितीही उपमा द्या कमीच असते. तिच्या मुळे घर हसते तिच्यामुळे घर बोलते. तिच्या मुळे घराला घरपण असते. 
पण ऐक बोलावंसं वाटते कित्येक घरी पत्नीला समजून घेतले जात नाही. पत्नीला मान मिळत नाही. तिला समजून घेत नाही. जरा विचार करा ती आपलं माहेर सोडून आपली माहेरची माणसं सोडून सासरी येते. सासरच्या सर्वाना आपलं मानते. सर्वांचा सांभाळ करते. सर्वांची सेवा करते. ती तर नेहमी साठी आपल्या घरी आलेली असते. तुम्ही फक्त्त ऐक दिवस घर सोडून बघा तुम्हालाच कळेल काय अवस्था होते तुमची, आणि ती जर चार दिवस आपल्या घरी नसेल तर बघा घराची काय अवस्था होते. घराला घरपण राहत नाही. घर शांत राहील घर बोलणार नाही. आणि हो आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते. साधं एखाद काम जरी करायचं म्हंटले तरी ते तुम्हाला जमत नाही. जे काम रोजच अगदी व्यवस्थित चाललेलं असते. ते फक्त पत्नीमुळे. 
 
ज्या वेळेला ती तुमचा हात धरून तीच घर सोडून या घरी आली या घरची लक्ष्मी झाली. तीन तुमचं घर सहज आपलं म्हणून .सावरलं यात माहेरच्या आठवणींच किती हुंदक तीनी आवरलं. तीनी तिची आवड तिची स्वप्न बाजूला ठेवली. पतीच स्वप्न पतीची आवड ती जपत गेली. 
 तिचे काही स्वप्न असतील तिच्या काही आवडी असतील हे कधी तिला तुम्ही विचारलं...
  
तिच्या हातचे जेवण रोजच जेवलात एखादा पदार्थ बिघडला तर लगेच नाव ठेवली. पण कौतुकाचे दोन शब्द कधी तुम्ही बोलले नाही. पण हे करत असतांना तिनं किती चटके सोसले तिला किती त्रास झाला याचा कधी तुम्ही विचार केला 
विचार केला नसेल तर विचार करा. 
  
तुम्ही चार पैसे कमावले तिने दोन पैसे वाचविले. तुमच्या नकळत भविष्यासाठी तिने साठवले....
 पती घर चालवते, पत्नी घर सांभाळते. चालवन्या पेक्षा सांभाळणं कठीण असते. तिला जर कुणी म्हंटल मुलं मोठी झाली मार्गी लागली. ती म्हणते चांगली निघाली बापावर गेली. वडिलांच्या संस्कारामुळे चांगली वागू लागली. पण मुलांना घडवतांना ती किती रात्र जागली तिला किती त्रास झाला याचा कधी विचार केला. अशीच वर्ष जात आहे ती मात्र सतत तुमच्या सुखात दुःखात तुमच्या सोबत आहे.

"संसाररुपी सागरात संघर्षाच्या लाटा ll 
 पतीच्या सुखदुःखात पत्नी चा बरोबरिचा वाटा ll 
खरंच आहे ती तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभी आहे. तसे तुम्हीही तिच्याशी दोन शब्द प्रेमाचे बोला. आणि मग बघा घर कसं आंनदी राहत घर सुखशांतीने भरून जाते. कारण घरातील लक्ष्मी आंनदी तर पूर्ण घर आंनदी म्हणून या लक्ष्मीला थोडं समजून घ्या, तिला प्रेम द्या आणि ही दिवाळी आंनदाने प्रेमाने साजरी करा.

ओबीसी, व्ही. जे. एन.टी.साठी नवीन वसतिगृहासह सर्व वसतिगृह तात्काळ सुरू होणार - ना.विजय वडेट्टीवार


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३१ ऑक्टो.) : अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली महाराष्ट्र, जिल्हा शाखा चंद्रपूर द्वारे विमुक्त जाती भटक्या जमाती, व ओबीसी समाजाचे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन 72 वसतिगृह मंजूर करून व राज्यातील कोरोना सदृश वातावरण संपले असल्याने राज्यातील सर्वच वसतिगृह तात्काळ सुरू करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी तात्काळ वसतिगृह सुरू करावे असे आशयाचे निवेदन नुकतेच विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र राज्याचे बहुजन विकास मंत्री यांना आनंदराव अंगलवार यांचे नेतृत्वात व इतर पदाधिकाऱ्यांच्या एक शिष्टमंडळाने नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे भेट घेऊन दिले त्यांचेशी शिष्टमंडळाने चर्चा केली असता ना.वडेट्टीवार यांनी उपराेक्त विषय समजून घेऊन याबाबत सर्व आराखडा व निधी मंजूर करून घेतलेले आहे.
कोरोनामुळे बंद पडलेले सर्व वसतिगृह दिवाळी नंतर सुरू करण्यास संबधित विभागाला तात्काळ सूचना करणार असे आश्वासित केले. सर्व वसतिगृह लवकरच सुरू होणार असे चर्चा दरम्यान सांगितले. या वेळी आनंदराव अंगलवार सतीश मालेकर, ए.ए. डहाक, चंद्रशेखर कोटेवार, विजय पोहनकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सेवादल काँग्रेस कमिटीतर्फे स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी


सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 
वणी, (३१ ऑक्टो.) : वणी शहर व सेवादल काँग्रेस कमिटी तर्फे स्व.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी चा कार्यक्रम घेण्यात आला व स्व.इंदिराजी गांधी प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.

भारताची प्रधानमंत्री प्रथम महिला प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांनी देशाची धुरा सांभाळली व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सक्षम असलेल्या त्यांना आर्यन लेडी म्हणून उपाधी देण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमोद निकुरे शहराध्यक्ष, प्रमोद वासेकर तालुकाध्यक्ष, इजहार शेख जिल्हा उपाध्यक्ष, ओम ठाकूर, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रमोद लोणारे अध्यक्ष शहर सेवादल, डॉ मोरेश्वर पावडे, अनंत चौधरी सुधीर खंडाळकर, सुरेश बन्सोड, रफिक रंगरेज, बाबाराव गेडाम, राजेंद्र खोब्रागडे,  सौ ज्योती सुर, सौ संध्या बोबडे, मंगला झिलपे, वंदना धगडी, वंदना आवारी, मंदा पुसनाके, मंदा सोनारखन इत्यादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

झरीत ओबीसी चे एक दिवशीय धरणे आंदोलन


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (३१ ऑक्टो.) : झरी तालुक्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समितीच्या वतीने शनिवार दिनांक ३० आक्टोबर २०२१ रोजी झरी तहसील कार्यालयासमोर स.११ ते दु.२ वाजे पर्यंत एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
   
ओबीसीचीं जातनिहाय जनगणना करण्यास स्पष्ट नकार देणाऱ्या मुजोर केंद्र सरकारचा धिक्कार करण्यात आला. विधिमंडळाच्या मागासवर्गीय समितीने दि.५-१०-२०१५ मागासवर्गीय मुला-मुलींसाठी स्वतंत्र वस्तीग्रह निर्माण करून देखबाल करण्याच्या सूचना केल्या होत्या. युती सरकारच्या काळात ३० जानेवारी २०१९ प्रत्येक जिल्ह्यात एक यानुसार ३६ वसतिगृहे सुरु करण्याचा आदेश देण्यात आले. २२ आगस्ट १९ ला नागपूर अहमदनगर यवतमाळ ज्या ठिकाणी नवीन वसतिगृह बांधण्यात अनुमती देण्यात आली.
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एका जिल्ह्यासाठी दोन या प्रमाणे ३६ जिल्हयात एकूण ७२ शासकिय वसतिगृहे उभारण्याचे आश्वासन दिले. पण मात्र, कुठेच आजवरी एकही वस्तीगृह उभारलेले दिसत नाही. एक प्रकारे महाविकास आघाडी सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांची फसगत केली आहे. विद्यार्थ्यांच्या भावनाशी खेळ खेळल्याने राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. 

ओबीसी विद्यार्थ्यांच्या भावना चा विचार करून प्रत्येक मुला मुलींसाठी सहा विभागात पाचशे पाचशे जागेचे वस्तीगृह बांधण्यात यावे. बांधकाम पूर्ण होईपर्यंत भाडे तत्त्वावर सुरू करण्यात यावे. या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरु करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार झरी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.
यावेळी ओबीसी जनगणना कृती समितीचे आशिष साबरे, प्रकाश बेरेवार, आजाद उदकवार, प्रफुल चुकलवार, साई बोंगिरवार, तुळशीदास आवारी, नेताजी पारखी, सौ.छबुताई आसुटकर, ममता पारखी, सविता व-हाटे, संतोष गोहकार, गणेश बुट्टे, संजय चामाटे, सुनील शिरपूरे निलेश निलमवार, प्रेम नडलवार यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.