गोंड बुरांडा येथे भागवत सप्ताहाचे आयोजन


सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : तालुक्यातील गोंड बुरांडा येथे स्व. रोहिदास यशवंत दगडे स्म्रुतीप्रीत्यर्थ भागवत कथेचा कार्यक्रम दगडे परिवाराकडून आयोजित करण्यात आला.

ह. भ. प. भागवताचार्य श्री. श्रीकृष्ण कुमार पांडे महाराज यांच्या मधुर वानीतुन भागवत कथा ऐकण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येतानी दिसत आहेत. बाहेर गावावरून येणाऱ्या भाविकांकरीता गावकऱ्यांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहेत.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यास दगडे परिवाराला सर्व गावकऱ्यांची सर्वच प्रकारची मद्द्त असल्याने भागवत कथेचा आनंद येथील भाविक मनसोक्त घेतानी दिसत आहेत.

या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती संख्या मोठी आहेत. हा सप्ताह २८ डिसेंबर ला मिरवणूक काढून यांची समाप्ती २९ डिसेंबर ला होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहेत.

नवोदित आदिवासी साहित्य परिषदेत डॉ मधुकर कोटनाके ह्याच्या 'कोलाम गुड्याची शिक्षण यात्रा' पुस्तकाचे प्रकाशन


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

यवतमाळ : क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती पर्वाच्या विद्यमाने यवतमाळ येथे 25 डिसेंबर 2021 रोजी नवोदित आदिवासी साहित्य परिषद संपन्न झाली.
  
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ विनायक तुमराम सर तर उद्घाटक म्हणून मा. वाहारुदादा सोनवणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. दशरथ जी मडावी,मा. रामचंद्र जंगले, मा. संतोष पावरा, मा. विश्वास दळवी, मा. दादाजी कूसराम. मा. रामगोपाल भिलावेकर, मा. तुळशीदास भोयर. मा. विठ्ठलराव धुर्वे, मा. वि. रा. राठोड, मा. वसंत कन्नाके, मा. राजाभाऊ चांदेकर, मा. पैकुजी आत्ताम, मा. सौ. गिरिजा गेडाम, मा. विनोद वाडेकर, मा. रवी मेश्राम, मा. नारायणराव मरस्कोले, मा गणपतराव वेते, मा. सौ. मंदाताई मडावी. ह्यांचा उपस्थित कोलाम गुड्याची शिक्षण यात्रा प्रकाशन करण्यात आले.   
कोलाम वस्ती मधे शिक्षणासाठी काय अडचण येते शिक्षण घ्या साठी करावी लागणारी धडपड , त्यातील सत्य परिस्थिती पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न डॉ माधुकर कोटनाके ह्यांनी केला आहे.

पार्वताबाई हरिभाऊ कुमरे यांचे निधन

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मारेगाव : पार्वताबाई हरिभाऊ कुमरे रा.मच्छिन्द्रा यांचे यवतमाळ येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 82 वर्ष्याच्या होत्या.
पं स सदस्य धनराज कुमरे यांचे त्या मातोश्री होत्या. तसेच काँग्रेस चे जेष्ठ कार्यकर्ते तथा आदिवासीचे कैवारी हरिभाऊ शिवराम कुमरे यांच्या त्या पत्नी. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालावली होती. 
आज दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी सात ते आठ वाजता च्या दरम्यान, त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या मागे तीन मुलं एक मुलगी,सुना, जावई, नातवंड असा बराचसा आप्त परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महामार्गवरील अपघातात एकाचा मृत्यू तर, एक गंभीर जखमी

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल

मारेगाव : तालुक्यातील वेगाव येथील दोन युवक मारेगाव वरून गावाच्या दिशेने परत निघाले असता, मारेगाव यवतमाळ हायवे रोड वरील महाविद्यालयासमोर अचानक म्हैस आडवी आल्याने दुचाकीस्वारचे नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू तर,एक गंभीर जखमी झाला आहे. सदर घटना दि.25 डिसेंबर च्या सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान घडली.

संतोष प्रभाकर सुर (अंदाजे 23 वर्षे) रा. वेगाव असे मृतकाचे नाव आहे. तर गोलू टेकाम (हेटी पोड) हा गंभीर जखमी असून त्याला मारेगाव ग्रामीण येथील प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

सूत्राच्या माहितीनुसार संतोष आणि त्याचा मित्र गोलू टेकाम याला घेऊन मारेगाव वरून निघाला. मात्र, गावाकडे मद्य सेवन करून उतारासाठी पव्वेही सोबत घेतले व ते गावाकडे निघाले. अशातच महामार्गांवर म्हैस आडवी आली. त्यामुळे दुचाकीवरून नियंत्रण सुटले आणि डिव्हाडरला धडकले. परिणामी दुचाकीवरून खाली पडून संतोष चा मृत्यू झाला. त्यात त्याच्या पोटाच्या भागाला मद्य शिषा काचेच्या रुतल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला अशी चर्चा आहे.

घटनेचा अधिक तपास मारेगाव पोलीस करीत आहे.


राजू-यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : जिल्ह्यातील राजूरा नगर परिषद अंतर्गत उभारण्यांत आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण साेहळा आज शनिवार दि.२५डिसेंबरला पार पडला.

या वेळी महाराष्ट्राचे बहुजन कल्याण, खार जमिनी विकास, मदत व पुर्नवसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळु धानोरकर, आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष$ अरुण धोटे, राजूरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सभापती, नगरसेवक, यांच्या सह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित हाेते.