मारेगाव: क्रांतीविर शामा दादा कोलाम संघटना कार्यकारण गठीत

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२८ ऑक्टो.) : येथील आज क्रांतीवीर शामादादा कोलाम संघटना गठीत करण्यात आली.  नव्यानेच नियुक्ती झालेल्या कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांचे समाज बांधवांनी एकमताने सहमती दर्शवून स्वागत केले. यावेळी तालुकाध्यक्ष पदी प्रशांत टेकाम, तालुका उपाध्यक्ष दादाराव आत्राम, तालुका सचिव पोतु आत्राम, कोषाध्यक्ष राजू टेकाम, कोषाउपाध्यक्ष दादाराव ढोबरे, सहसचिव रवींद्र आत्राम, वेगाव सर्कल विभाग तुकाराम आस्वले, सुदर्शन टेकाम, रामपाल रामपुरे, हरिभाऊ रामपुरे यांचीही यावेळी नविन कार्यकारीणी मध्ये निवड करण्यात आली आहे.
आयोजित करण्यात आलेल्या नवीन क्रांतीवीर शामा दादा कोलाम संघटनेच्या नवनियुक्त कार्यकर्ते, कार्यकारणी, कार्यकर्ते समाजबांधव निश्चितच दिलासा देणारी ठरेल असे उपस्थितांच्या वतीने सांगण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकीची व आदिम कोलाम समाजातील अन्याय अत्याचार, शोषणाचा पर्दाफाश करण्याचे ताकद निश्चितच कोलाम समाजातील लोकांना आहे. या अगोदर सुध्दा आदिवासी चळवळीत सामाजिक आंदोलनात कोलाम अग्रभागी होताच व आहे. सामाजिक जागृती चा प्रमाण बराच आहे पण, एवढ्या वरच आपल्याला समाधान मानता येणार नाही. त्या दृष्टीने मारेगाव तालुक्यातील कोलाम समाज बांधवांनी एकजुट होवून संघटीतपणा दाखवावा लागेल. 
जंगल,जल वनजमीनीचे महसूल गावे पिण्याच्या शुद्ध पाणी, शिक्षण आरोग्य, रोजगार, रस्ते, विकासासाठी अनेक समस्यांना घेऊन वेळ आली तर रस्त्यावर उतरून संघर्ष व आंदोलन सुद्धा करावा लागेल. वरील सहजासहजी प्रस्थापित यंत्रणाकडून होईलच असेही म्हणतात येणार नाही.

यंग चांदा ब्रिगेडच्या प्रयत्नाला यश - मनपा प्रशासनाने घेतली निवेदनाची दखल !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२८ ऑक्टो.) : चंद्रपूर शहरातील इंदिरानगर हनुमान टेकडी येथे पायभूत सुविधांचा अभाव असून या सुविधा अभावी येथील नागरिकांना ब-याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या भागात तात्काळ पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात अश्या मागणीचे एक लेखी निवेदन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना काल दि.२७ ऑक्टाेंबरला सादर करण्यात आलेे हाेते. दरम्यान, आज दि. २८ ऑक्टाेंबरला मनपाच्या काही अधिकारी व कर्मचा-यांनी प्रत्यक्ष इंदिरा नगर येथे भेट देवून खरी परिस्थिती जाणून घेतली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे हे स्वता हजर हाेते. तर काल याच मागणीचे निवेदन देतांना संघटक आनंद इंगळे, राम जंगम, नरेश आत्राम, नरेश मुलकावार, शकील शेख, व बंडू पटले उपस्थित होते.
इंदिरानगर येथील हनुमान टेकडी परिसरात दाट लोकवस्ती आहे. मात्र येथे नाली रस्ता नसल्याने घरातून निघणारे सांडपाणी रस्त्यावर वाहते. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. या सर्व प्रकारामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून परिसरातील नागरिकांना डेंग्यू, ताप, हिवताप, डायरिया अशा रोगांची वांरवार लागण होत आहे.
त्यामूळे या भागाचा विकास करुन येथे पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यांची मागणी निवेदनातुन प्रामुख्यांने करण्यांत आली हाेती. येत्या आठ दिवसात येथील सर्व समस्या सुटाव्या अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी आपल्या बाेलण्यांतुन व्यक्त केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यासाठी गरजेनुसार महामंडळाच्या ५० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून द्या- आ. जोरगेवारांची मागणी

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२८ ऑक्टो.) : चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत महामंडळच्या बसेस कमी पडत असल्याने प्रवासी वाहतूक प्रभावित होत असून बसेसची कमतरता लक्षात घेता फेऱ्या कमी करण्यात आल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, अतिरिक्त भाडे देऊन खाजगी प्रवासी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याचे दिसुन येते. सदरहु बाब लक्षात घेता चंद्रपूर जिल्हाकरिता एसटी महामंडळने ५० अतिरिक्त बसेस उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना केली आहे. आमदार जोरगेवार यांनी आज गुरुवारी मुबंई मंत्रालय येथे परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली असून सदरहु मागणी संदर्भात सविस्तर चर्चा केली आहे.
   
चंद्रपूर जिल्हा औद्योगिक पाश्र्वभूमी आणि पर्यटन साठी प्रसिद्ध आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रकारचे उद्योगधंदे प्रस्तापित असून राज्यातील सर्वात मोठे विद्युत प्रकल्प येथे स्थित आहे. पोलाद, सिमेंट, कागद, रासायनिक, उद्योगांसोबत मँगनीज, लोह, कोळसा या सारख्या खनिज संपत्तीच्या खाणी मोठ्या प्रमाणात चंद्रपूरात अस्तित्वात आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग स्थायिक आहे. या कामगार वर्गाला आर्थिक दृष्ट्या खाजगी प्रवासी वाहतूक परवडण्या सारखी नाही. त्यामुळे बहुतांश कामगार वर्ग हा प्रवासी वाहतूकीकरिता महामंडळच्या बसेसला प्राधान्य देतो. त्याचप्रमाणे इतर सामान्य नागरिक व विद्यार्थी वर्ग सुद्धा ग्रामीण भागातून इतर भागात प्रवासाकरिता मोठ्या प्रमाणात एस.टी.नी प्रवास करतात. ग्रामीण भागाला जिल्ह्यातील महत्वपूर्ण शहरांना जोडण्यांचे काम महामंडळच्या बसेस द्वारे होत असते. त्यामुळे खाजगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत सवलतीच्या दरात महामंडळच्या एस.टी. बसेसला नागरिकांकडून प्राधान्य दिले जाते. परंतु जिल्ह्याच्या वाढत्या लोकसंख्याच्या तुलनेत उपलब्ध महामंडळच्या बसेस कमी आहे.
आजच्या स्थितीत चंद्रपूर जिल्ह्याला केवळ २४५ बसेस उपलब्ध आहे. त्यातील २० ते २५ बसेस अकार्यक्षम आहे. अशा स्थितीत जिल्ह्याला बसेसचा अत्याधिक तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बस फेऱ्या कमी करण्यात आलेल्या आहे. परिणामी कामगार वर्ग, सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना अतिरिक्त भाडे देऊन खाजगी प्रवासी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. जिल्ह्याला अतिरिक्त ५० बसेसची गरज असून ती पूर्ण करण्यात यावी अशी मागणी यावेळी आमदार जोरगेवार यांनी परिवहन मंत्री यांना केली आहे.
 

महसूल विभाग : दोन मंडळ शासकिय मदतीपासून राहणार वंचित


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (२८ ऑक्टो.) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टीची नुकसान भरपाई मदत म्हणून प्रति हेक्‍टरी १० हजार दिवाळीच्या आत देण्याचे आवाहन केले. परंतु झरी जामणी तालुक्यातील सहा मंडळापैकी खडकडोह आणि पाटण या दोन मंडळांना मदत मिळणार नसल्याची चर्चा असल्याने शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त होत आहे. खडकडोह मंडळातील अकरा गावात शेतकऱ्यांनी सरसकट मदत मिळावी यासाठी तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिले.

यावर्षी मृग नक्षत्रापासून सुरुवाती पिकांच्या गरजे नुसार पाऊस पडाला. पोळ्यानंतर जोर पावसाचा  वाढला सप्टेंबर महिन्यामध्ये सतत १७ दिवस पाऊस व त्यानंतर एकदोन दिवसाआड पाऊस झाल्याने गरजेपेक्षा पाऊस जास्त पडल्याने जमिन दलदली होवून कापूस तूर पिकाची वाढ रोखली पिक पिवळी येवून फळधारणा झाली नाही. पावसा अगोदर काढणीला आलेले सोयाबिन कापूस खराब झाला असतांना एकदा आठवडा पाऊस थांबला व पुन्हा पावसाने ऑक्टाेंबर मध्ये दि. १७ आक्टोंबर ५७.८ मिमी, दि.१८ ला १८.४ मिमी पाऊस पडला एकूण ८४८ मिमी पाऊस तालूक्यात पाऊस झाला.

अतिवृष्टीमुळे फुटलेला कापुस वारा व पावसाने खाली पडला झाडावरच्या लाही,कोंब फुटले. खाली पडलेला कापसाची तीच गत झाली असून, जमिनीवर पडलेला पराटी च्या झाडांचे चार सहा पाणी पुंजके आजही शेतात पाहायला मिळते. कापलेले सोयाबीन पावसात सापडले, गंजी केलेल्या सोयाबीन पावसात भिजले आणि उभ्या असलेल्या सोयाबीनला काढणे कठीण चाललेले आहे. प्रत्यक्षात अजूनही काही शेतात चिखल आहे.
तालुक्याची सर्व शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले असतांनाही प्रत्यक्ष पाहणी न करता केवळ तर्किक माहिती जिल्हा प्रशासनाला केली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून,महसूल विभागाच्या चुकीमुळे शेतकरी मदती पासून वंचित राहणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना-युवासेना वणी विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (२८ ऑक्टो.) : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेशानुसार येणाऱ्या नगर पालीका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भाने पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मिलिंद आनंद पेंडणेकर वणी विधानसभा संपर्क प्रमुख, दिलीप घुगे युवासेना विस्तारक, जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, राजेंद्र गायकवाड, शिवसेना नेते संजय देरकर, विधानसभा संघटक सुनील कातकडे, दिपक कोकास, संजय निखाडे, शरद ठाकरे, राजू तुराणकर, डिमन ताई टोंगे, संजय आवारी, चंद्रकांत घुगुल, रवी बोढेकर, टिकराम खाडे, संतोष कुचनकर, परशुराम पेंदोर, गणपत लेडांगे, गीताताई उपरे यांचे उपस्थितीत संपन्न.