वणी : काँग्रेस समर्थक तथा भूतपूर्व कॅसिअर निलजई उपक्षेत्र अरविंद बोबडे यांचे आज रविवारी सकाळी नागपूर जात असताना वरोरा येथे हृदय विकाराचा झटका आल्याने वाटेतच निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 65 वर्षाचे होते. ते लालगुडा मधील भूमि पार्क फ्लॅट मध्ये राहत होते. लगेचच त्यांचे पार्थिव वणी येथे आणण्यात आले. एक दोन दिवसापासून त्यांना अस्वस्थता वाटत होते. त्यामुळे ते आज नागपूर ला जात असताना त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा (हमु.श्रीलंका), एक मुलगी (हमु.अस्ट्रेलिया) असा आप्त परिवार आहे.
लाठी येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास खोके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य ॲड राहुल खारकर,ग्रामपंचायत सदस्य रिना लाडे,पोलिस पाटील संजीवनी खिरटकर,ग्रामपंचायत अधिकारी मंगेश खोके, माजी तंटामुक्ती अध्यक्ष धर्मा डोहे,हरिदास वाघाडे,रमेश खिरटकर,सुरेश माहूरे,महादेव माहूरे यांची उपस्थिती होती.सत्कार सोहळ्याची सुरुवात तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने झाली. स्वागतपर भाषणात आयोजकांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
वणी : लाठी येथील तुकडोजी महाराज सभागृहात दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि.२५/५/२०२५ रोज शनिवार ला मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन गुरुदेव सेवा मंडळ लाठी येथील युवकांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास खोके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य ॲड राहुल खारकर,ग्रामपंचायत सदस्य रिना लाडे,पोलिस पाटील संजीवनी खिरटकर,ग्रामपंचायत अधिकारी मंगेश खोके, माजी तंटामुक्ती अध्यक्ष धर्मा डोहे,हरिदास वाघाडे,रमेश खिरटकर,सुरेश माहूरे,महादेव माहूरे यांची उपस्थिती होती.सत्कार सोहळ्याची सुरुवात तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने झाली. स्वागतपर भाषणात आयोजकांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यात दहावी व बारावी परीक्षेत शालेय तसेच विभागीय पातळीवर विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.त्याचसोबत 15 ऑगस्ट 2025 रोजी राज्यपाला पुरस्काराने गावातील पोलिस पाटील संजीवनी खिरटकर यांचा सत्कार करण्यात आला होता त्यामुळे त्यांचा सुद्धा या कार्यक्रमा निमित्त गावातील गुरुदेव सेवा मंडळ लाठी यांनी सत्कार केला. त्याचसोबत गावातील विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह,पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये समीक्षा खारकर,गौरी डोहे, मानसी मांडवकर, लाभेश दोरखंडे, अक्षता खोके आदींचा समावेश होता.
पालकवर्गानेही कार्यक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.प्रदीप माहूरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री.नंदू माहूरे यांनी केले.या सत्कार सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले असून, हा उपक्रम पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात राबविण्याचा निर्धार प्रभाकर वाघाडे,आशिष माहूरे,संदीप गोवारदिपे, निलेश करडे,ईश्वर माहूरे,मंगेश मोते,यासह गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
मे महिन्यातच जून-जुलैसारखा पाऊस का पडतोय?
सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मे महिना : उन्हाळा की पावसाळा?
मे महिना म्हणजे उन्हाळ्याचा कडाका, आंब्याचा हंगाम आणि शाळा - महाविद्यालयांच्या सुट्ट्या. पण यंदा मे 2025 मध्ये महाराष्ट्रात पावसाने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. पुणे, मुंबई, कोकण, मराठवाडा आणि घाटमाथ्यांवर मुसळधार पावसामुळे सर्वत्र पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे.
मे महिन्यात पावसाचे कारणे :
• अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे समुद्रातील वाफेने भरलेली हवा वर उचलली गेली आणि त्यामुळे मुसळधार पाऊस झाला. हे कमी दाबाचे क्षेत्र पुढे depression मध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे.
• पश्चिमी विक्षोभ (Western Disturbances)
भूमध्यसागरातून येणारे थंड वारे उत्तर भारतात येऊन उष्ण हवेला वर ढकलतात. यामुळे आर्द्रता वाढते आणि पाऊस पडतो. यंदा हे विक्षोभ महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत.
• ला नीना (La Niña) प्रभाव
ला नीना परिस्थिती सक्रिय झाल्यामुळे पावसाचे प्रमाण वाढते. यंदा ही परिस्थिती सक्रिय असल्यामुळे मे महिन्यातच जास्त पाऊस पडत आहे.
• हवामान बदल (Climate Change)
ग्लोबल वॉर्मिंग, वृक्षतोड आणि प्रदूषणामुळे हवामानाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे पावसाचे वेळापत्रक बदलत आहे आणि अनियमित पावसाचे प्रमाण वाढले आहे.
• अर्बन हीट आयलंड इफेक्ट (Urban Heat Island Effect)
शहरांतील काँक्रिटच्या इमारती आणि रस्त्यांमुळे उष्णता वाढते. ही उष्णता वाफेत रूपांतरित होऊन पावसाचे प्रमाण वाढवते. तसेच, पावसाचे पाणी निचरा न होण्यामुळे पूरस्थिती निर्माण होते.
हवामान खात्याचे अलर्ट
• रेड अलर्ट: रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी.
• ऑरेंज अलर्ट: छत्रपती संभाजीनगर, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि जिल्ह्यांसाठी.
• यलो अलर्ट: विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी :
• रेड अलर्ट असताना घराबाहेर पडणे टाळा.
• ऑरेंज अलर्टमध्ये गरज असल्यासच प्रवास करा.
• यलो अलर्टमध्ये सावधगिरी बाळगा.
• पावसाच्या बातम्यांकडे लक्ष ठेवा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
निसर्गासाठी एक पाऊल पुढे :
पावसाचे बदलते स्वरूप आणि हवामान बदल लक्षात घेता, आपण निसर्गासाठी काही सकारात्मक पावले उचलूया:
एक तरी झाड लावा :
• वृक्षारोपणामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो.
• प्लास्टिकचा वापर कमी करा:
• प्लास्टिकमुळे नाल्यांचे तोंड बंद होऊन पूरस्थिती निर्माण होते.
• पाण्याचा अपव्यय टाळा:
• पाण्याचा योग्य वापर करून जलसंधारण करा..
त्वरा करा...अवघे काही दिवस: उन्हाळी धमाका, स्पेशल महोत्सव
सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : ऑनलाईन खरेदी मध्ये विशेष सूट, डिस्काउंट, आणि इतर आकर्षक योजना उपलब्ध असतात. परंतु अशा आकर्षक आणि असमाधानकारक योजणांना बळी न पडता वणी शहरामधील जैताई मंदिर, साई मंदिर चौक, यवतमाळ रोडवर असलेल्या ऑफलाईन सेल'ला अवघ्या काही दिवसातच ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून आणखीन प्रतिसाद मिळतच आहे. त्याच कारही तसंच आहे म्हणायला हरकत नाहीये.
या ठिकाणी थेट "खादी कॉटन महोत्सव सेल" आपल्या सेवेत लागला आहे.नवीन स्टॉक, उत्तम क्वालिटी असे ओळखल्या जाणाऱ्या या खादी कॉटन महोत्सवात आतापर्यंत भरपूर व्हेरायटी ग्राहकांनी पर्चेस केली आहे.
या ठिकाणी, विशेषतः भारतीय उद्योगाला चालना मिळावी म्हणून कपडे' किंबहुना 'थेट मार्केट' उभारून, कमी किमतीत चांगले खादी कॉटन चे कपडे उपलब्ध करून देण्याचे या सेल चे कार्यकारी अधिकारी सतीश पाटील यांचा मानस असल्याचे ते म्हणाले.
आता पावसाळा तोंडावर आणि या महोत्सव सेल ला काहीच दिवस उरलेत. त्यामुळे स्वस्त किमतीत चांगले कपडे, तुम्ही खादी कॉटन कपड्यांची खरेदी याठिकाणी उपलब्ध असलेल्या स्पेशल ऑफर चा फायदा घेऊ शकता.
शहरातील रस्ते झाले बिकट, दुरुस्तीची मागणी
सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
निवेदनात म्हटले की, पावसाळा तोंडावर आलेला असताना अजून पर्यंत शहरातील टिळक चौक ते इंदिरा चौक तसेच साई मंदिर ते नांदेपेरा रोड या रस्त्याचे काम अजून पूर्ण झाले नाही. या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशी व सामान्य नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गावर शाळा महाविद्यालय मोठ्या प्रमाणात असून विद्यार्थ्यांचे आवागमन मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्याच्या दुरावस्थामुळे दुचाकी स्वारांना तारेवरची कसरत करून मार्गक्रमन करावे लागतेय. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे कामे पूर्ण करण्यात यावी. अशी प्रहारचे उपजिल्हा प्रमुख मोबीन शेख यांनी मागणी केली आहे.
या गंभीर प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर रघुवीर कारेकर,जयंत उईके यांच्या स्वाक्षरी आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)