२८ पासून मेंढोली येथे माकपचे आमरण उपोषण


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : येथून १५ किमी अंतरावर असलेल्या मेंढोली गावातील स्मशानभूमी शेजारी झोपड्या बांधून गेल्या २० वर्षापासून पारधी समाजाचे लोक वस्ती करून राहत आहेत. येथे राहणाऱ्या पारधी समाजाला अजूनही नागरी सुविधा उपलब्ध करून न दिल्याने येथील पारधी समाज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्वात दि. २८ एप्रिल पासून मेंढोली येथे आमरण उपोषणाला सुरुवात करीत आहेत.

वणी तालुक्यातील मौजा मेंढोली येथील गावठाण खरवडी गट नं. ३६ मध्ये अर्जदार प्रकाश घोसले व त्यांचे समवेत २३ पारधी कुटुंबे झोपड्या बांधून राहत आहेत. ह्या २४ पारधी कुटुंबांनी त्यांची घरे नियमानुकुल करून गाव नमुना ८- अ देऊन घरकुलाचा लाभ देण्यात यावा, प्रत्येक कुटुंबाला रेशन कार्ड देण्यात यावे, रेशनकार्ड अती महत्वाचे कागदपत्र असल्याने पारधी समाजातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी जात प्रमाणपत्र व अन्य शालेय दाखल्यासाठी आणि कार्यासाठी आवश्यक आहे. ह्या मागण्या संदर्भात ह्यांनी अनेकदा संबंधित विभागाकडे निवेदने, अर्ज, देऊन सातत्याने पाठपुरावा केला असतानाही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. पण त्याच वेळेस गावात नियमबाह्य पद्धतीने भोगवटदार २ च्या जागेवर नमुना ८ अ देण्यात आल्याचा पुरावा असल्याचे सांगण्यात येत आहे.

शासन निर्णयानुसार निवासी प्रयोजनार्थ उपलब्ध जागेवर जागा देण्यात यावे अशी तरतूद असताना मेंढोली ग्रामपंचायत पारधी समाजाला जागा देण्यास का टाळाटाळ करीत आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. आदिवासी मंत्री अशोक उईके यांना निवेदन देऊन ताबडतोब मागण्या पूर्ण करण्यात याव्या अन्यथा दिनांक २८ एप्रिल पासून आमरण उपोषण करण्यात येईल असे सांगितले असून मेंढोली येथील पारधी कुटुंबांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्वात ह्या आमरण उपोषणाला सुरुवात करीत आहे. जोपर्यंत पारधी समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार प्रकाश घोसले, मालाबाई घोसले, विशाल घोसले, अनिशा घोसले, शुभम घोसले, विठ्ठल घोसले, राजमल घोसले आदी व अन्य लोकांनी केले आहे.

खेळण्यातून घालवा मुलांचे नैराश्य...

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : डॉक्टरांच्या मते जी किशोरवयीन मुले एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहतात त्यांच्यात नैराश्याचा विकार जडण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच खेळण्यातून मुलांचे नैराश्य घालवा असे आरोग्य तज्ञ सांगतात.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार संशोधनानुसार किशोरवयीन मुले रोज काही वेळ हलका व्यायाम करतात त्यांना पुढे आयुष्यात त्याचा फायदा होतो. जी मुले १२ ते १६ या वयात आठवड्याला कमीत कमी तीन दिवस हलका व्यायाम व शारीरिक हालचाली करतात त्यांच्यात नैराश्याचे प्रमाण फार कमी असते, असे एका अभ्यासात दिसून आले असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. डॉक्टरांच्या मते बसून राहण्यापेक्षा काहीतरी शारीरिक हालचाली जी मुले करतात त्यांना पुढे आयुष्यात त्यांचा फायदा होतो. सांगण्यानुसार किशोरवयीन डॉक्टरांच्या काही मुलांचा करण्यात आलेल्या अभ्यासानुसार

जी मुले १२ ते १६ या वयात आठवड्यातून हलका व्यायाम व शारीरिक हालचाली करीत असतात त्यांच्यात नैराश्य कमी दिसून आले आहेत. डॉक्टरांच्या मते यात फार मोठ्या व्यायामाची आवश्यकता नसते तर साध्या शारीरिक हालचाली गरजेच्या असतात लक्ष न लागणे नूर बदलणे यासारख्या गोष्टी शारीरिक हालचाली करणाऱ्या किशोरवयीन मुलांमध्ये कमी दिसून येतात जर बारा ते सोळा या वयातील मुले नेहमीपेक्षा एक तास जास्त एकाच ठिकाणी बसून राहत असेल तर त्यांच्यात नैराश्य वाढण्याचे प्रमाण जास्त असते. 

१२ ते १६ या सर्व वयोगटातील मुलांनी जर जास्त काळ बसून काढला तर त्यांच्यात नैराश्याचे प्रमाण अधिक दिसून येते डॉक्टरांच्या मते किशोरवयीन काळात एकाच ठिकाणी बसून राहण्याच्या सवयीने तारुण्यात पदार्पण करताना निराशाचा त्रास होऊ शकतो म्हणूनच किशोरवयीन मुलांनी एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून न राहता हलका व्यायाम व शारीरिक हालचाली करून खेळण्यात अधिक वेळ घालवला तर खेळातून नैराश्य घालवता येते,असे आरोग्य तज्ञ सांगतात.

सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, "कही खुशी कही गम"

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत दि.24 एप्रिल रोजी मारेगाव येथे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्या उपस्थितीत तहसीलदार उत्तम निलावाड यांनी जाहीर केली. 2025 ते 2030 अशा पाच वर्षांच्या कालावधीत निवडणूक होणार आहे. आरक्षण सोडतीमुळे 'काही ठिकाणी खुशी, तर काही ठिकाणी गम' दिसून येत आहे. यातील सुमारे 50 ग्रामपंचायती वर महिला राज येणार असल्याने अनेकांचे आचार विचारात बदलल्याचे चित्र दिसून येत आहे. 

यामध्ये अनुसुचीत जाती, जमात, व ईतर मागास वर्गीयाचा प्रवर्ग, तथा सर्वसाधारण गटातील महीलांचा समावेश आहे. 2025 ते 2030 या कालावधीत पार पडणाऱ्या निवडणुका मध्ये 56 ग्रामपंचायतीचा समावेश असुन सर्वांना राजकीय आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी शासनाच्या वतीने नियमावली तयार करुन आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या जाहीर झालेल्या आरक्षणात अनेकांना धक्का बसला असुन अनेकांना खुशी झाली तर काहींना दुखवटा आहे.

वनोजा अनुसुचीत जात, आकापुर अनुसुचीत जमाती, करणवाडी अनुसुचीत जमाती, टाकळखेडा अनुसुचीत जमाती महिला, गौराळा, अनुसुचीत जमाती महिला, कोलगाव, नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग, चिंचमंडळ नागरिकांचा मागासवर्गीयांचा प्रवर्ग, मजरा ना.मा.प्र., कोथुर्ला ना.मा.प्र.,खैरगाव बुट्टी ना.मा.प्र. महीला, टाकळी ना.मा.प्र. महिला, सावंगी सर्वसाधारण, सिंधी सर्वसाधारण, वेगाव सर्वसाधारण, शिवणी धोबे सर्वसाधारण, हिवरा सर्वसाधारण, नवरगाव सर्वसाधारण, केगाव सर्वसाधारण, देवाळा सर्वसाधारण, ईंदिरा ग्राम सर्वसाधारण, गाडेगाव सर्वसाधारण महिला चोपण सर्वसिधारण महिला, दांडगाव सर्वसाधारण महिला, बोरी बू सर्वसाधारण महिला, आपटी सर्वसाधारण महिला, कोसारा सर्वसाधारण महिला, हिवरी सर्वसाधारण महीला, मार्डी सर्वसाधारण महिला, किन्हाळा सर्वसाधारण महिला, कुंभा सर्वसाधारण महिला, मांगरुळ सर्वसाधारण महिला, पिसगाव अनुसुचीत जमाती, घोगुलदरा अनुसुचीत जमाती, बोरी खु. अनुसुचीत जमाती, शिवनाळा अनुसुचीत जमाती, वरुड अनुसुचीत जमाती, गोधणी अनुसुचीत जमाती, अर्जुनी अनुसुचीत जमाती, डोल डोंगरगाव अनुसुचीत जमाती, हटवांजरी अनुसुचीत जमाती, घोडदरा अनुसुचीत जमाती, बुरांडा (ख.) अनुसुचीत जमाती, नरसाळा अनुसुचीत जमाती महिला, पहापळ अनुसुचीत जमाती महिला, चिंचाळा अनुसुचीत जमाती महिला, बोटोणी अनुसुचीत जमाती महिला, सगणापुर अनुसुचीत जमाती महिला, वागदरा अनुसुचीत जमाती महिला, जळका अनुसुचीत जमाती महिला, मच्छिंद्रा अनुसुचीत जमाती महिला, कान्हाळगाव अनुसुचीत जमाती महिला, सराटी अनुसुचीत जमाती महिला, खंडणी अनुसुचीत जमाती महिला, म्हैसदोडका अनुसुचीत जमाती महिलांचा समावेश आहे. 

मारेगाव तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीत उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले, तहसीलदार उत्तम निलावाड, नायब तहसीलदार, तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, उपस्थित होते.

काठीने मारहाण, गुन्हा दाखल...

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : जागेच्या पुनर्वसन बाबत विचारणा केली म्हणून एका इसमाला शिवागिळ करून दुसऱ्याच्या हातात असलेल्या काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना शुक्रवारी तालुक्यातील पिपंरी (कोलार) येथे सकाळी घडली. दिलीप नानाजी लोढे (वय ५५, रा. पिंपरी, कोलार) यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी एका इसमाविरुद्ध कलम 118 (1), 352,351(2)(3) BNS नुसार गुन्हा नोंदविला. या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस हेड कॉनस्टेबल गजानन हेडगीर हे करत आहे.

दोघींना फूस लावून पळविले,नातेवाईकांचे मारेगाव पोलिसात तक्रार

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : "माझं बाळ" म्हणणाऱ्या आई वडिलांना सोडून मुलं रफू चक्कर होतांनाचे चित्र सर्वत्र असतांना मारेगाव तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींना नातेवाईकांनी फूस लावून पळवून नेल्याची पोलिसात तक्रार दाखल केल्याने 'त्या' दोघी नेमक्या कुठं आणि कुणासोबत आहे याबाबत पोलीस प्रशासन कसून चौकशी करीत आहे.

मारेगाव तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावातील अल्पवयीन मुली एक भल्या पहाटे तर, दुसरी प्रांतःविधीला जाण्याच्या बहाण्याने बेपत्ता झाल्या. गंणगोतांनी सर्वत्र नातेवाईकांकडे तपास केला. मात्र, त्या मुलींचा शोध लागला नाही. हतबल झालेल्या आईवडिलांना व नातेवाईकांनी पोलिसात धाव घेत फूस लावून पळवून नेल्याची पोलिसात तक्रार दाखल केली.

परिणामी, या शालेय विद्यार्थिनी नेमक्या कुठं गेल्या असतील याचा शोध सुरु असतांना या सामाजिक दृठ्या संवेदनशील घटनेला नेमकी कशाची किनार आहे.हे त्या मुलींचा शोध लागल्या नंतरच स्पष्ट होईल. तूर्तास या गंभीर घटनेने नातेवाईकांत चिंतेचे सावट आहे.