चोपणमध्ये उगवला जिवंत नाला: उन्हाळ्यात सुद्धा वाहत असते या रस्त्यावरून पाणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 
                    
मारेगाव : चोपणमध्ये मागील अनेक दिवसांपासून जिवंत नाला अवतरला असून या जिवंत नाल्यामुळे चोपण गावातील मुख्य रस्त्यावर उन्हाळ्यातसुद्धा पाणी वाहत असते. त्यामुळे गावामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.या वाहणाऱ्या पाण्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
       
मारेगाव तालुक्यातील राजकीय व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले चोपण हे गाव.परंतु मागील अनेक दिवसांपासून या गावाला गावातील मुख्य रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे अवकळा आलेली आहे. या मुख्य रस्त्याने वर्षभर सांडपाणी वाहत असते. त्यामुळे गावातून एखादा नाला तर वाहत नाही ना असा भास सुद्धा होत असतो.

चोपणचे भूषण असलेले मंदिर. पण या रस्त्यामुळे सगळे लोप पावत आहे. बाहेर गावातील नागरिक या वाहणाऱ्या पाण्यामुळे छी... थू... करतांना दिसत आहे. या रस्त्यावरील वाहणाऱ्या पाण्यात अनेकजण आपली वाहने घेऊन पडलेली आहे. तरीही ग्रामपंचायतला जाग येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
या घाण पाण्यामुळे गावामध्ये रोगराई पसरत आहे. अनेक वेगवेगळ्या बिमाऱ्या वाढत आहे. त्यामुळे याकडे कोण लक्ष देईल असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.

महात्मा फुले अभ्यासिका येथे महात्मा फुले पुण्यातिथी निमित्त अभिवादन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शिक्षण ही मानवाची मुलभूत गरज आहे, शिक्षण घेतले तरच जीवन जगण्याला खरा अर्थ आहे; ही शिकवण महात्मा जोतीबा फुले यांनी समाजाला दिली. विद्येविना मती गेली, मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ता, विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्वेने केले. असे महात्मा फुले सांगायचे. जो शिक्षणाचा प्रचार करतो, तोच समाजाचा उद्धार करतो. त्यामुळे शिक्षणाचा अधिकाधिक प्रचार व प्रचार झाला पाहिजे. असे मनोगत संजय खाडे यांनी व्यक्त केले. वणीतील जटाशंकर चौक येथील महात्मा फुले अभ्यासिका येथे महात्मा फुले पुण्यातिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रशांत गोहोकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
संजय खाडे फाउंडेशन संचालित महात्मा फुले अभ्यासिका येथे 28 नोव्हेंबर रोजी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. सुरुवातीला महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी संजय खाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी तसेच शिक्षण व समाजसुधारणेच्या कार्यासाठी संजय खाडे फाउंडेशन सदैव तत्पर राहील, असे वचन खाडे यांनी दिले. प्रशांत गोहोकर यांनी महात्मा फुले यांची समाजसुधारणा, शैक्षणिक कार्याचे महत्त्व आणि आजच्या काळातील शिकवण यावर विचार मांडले.
कार्यक्रमाला सुरज गौरकार, निखिल तुरणकर, अक्षय नालमवार, देवांश आसकर, निखिल गानफाडे, शितल बोर्डे, कुणाल भेले, आकाश घोरपडे, अनिकेत थेरे, दिपक माडेवार, प्रदीप सातपुते, स्वप्निल सातपुते, विवेक खिरटकर, संतोष ताडुलवार, नितेश विंचू, अमित काळे, शंकर उपरे, शुभम राठोड, दिपक पथाडे, हर्षल मोहितकर यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय खाडे फाउंडेशनचे स्वयंसेवक व अभ्यासिकेचे कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

वेकोली उपप्रबंधकाची चालाखी वाहन चालकाने दिली कबुली

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वेकोलि उकणी खाणीतून भंगार चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी उपप्रबंधक व वाहन चालक या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील उकणी कोळसा खाणीतून कोळसा खाणीच्या यांत्रिकी उपप्रबंधक अनुप कुमार साही यांच्या सांगण्यावरून वाहन चालक अतुल गजानन पिदूरकर यांनी भंगार वाहणात लोड करून विकायला आणले गेलेले भंगार एम.एस.एफ. च्या जवानांनी पकडले व शिरपूर ठाण्यात जमा केले.
या प्रकरणाची पोलिसात तक्रार उकणी व जुनाड कोळसाखाणीचे उपक्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश विनायक फुलारे यांनी यांनी केली, शिरपूर पोलिसांनी त्यांच्या गुन्हा दाखल केला. यांचेकडून अंदाजे दोन लाख 85 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पुढील तपास ठाणेदार माधव शिंदे करीत आहे.

शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतुन तयार केला पांदण रस्ता

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : ग्रामीण भागांत शेतांना रस्ते नसल्याने हंगामात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शासकीय योजना असूनही त्याची अंमलबजावणी योग्य प्रमाणात नसल्यानेही फारसा फायदा नाही.
यामुळे शेतकऱ्यांनी लोकवर्गणी करीत शेतरस्ता तयार करण्याचे काम हातात घेतले आहे. बामर्डा येथील सुधाकर वाघमारे, भास्कर गायधन, उमेश ढुमणे, दत्तू थेरे, अतुल जिवतोडे, गणेश काळे, सुभाष तोतडे, या शेतकऱ्यांनी बामर्डा ते गोरज हा पांदण रस्ता करण्यासाठी लोकवर्गणी जमा करीत काम सुरू केले. 

मच्छिन्द्रा गट-ग्रामपंचायतीच्या वतीने प्रस्ताव पाठविण्यात आला होता. असे असताना बामर्डा येथील पांदण रस्त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने शासनाने गावातील शेतकऱ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना बनली आहे. 
या रस्त्यासाठी बामर्डा येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लोकवर्गणी गोळा केली. श्रमदान करीत हा पांदण रस्ता तयार करण्यास सुरुवात केली आहे. जवळपास जाण्या-येण्यासाठी हा रस्ता कच्चा स्वरूपात केला गेला आहे.मात्र,पक्या पांदण रस्त्याची शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा आहे. लोकप्रतिनिधींनी नुकतेच शेतकऱ्यांना कापूस खरेदीत टोकन मुक्त केलं, तसेंच शेतकऱ्यांना पांदण रस्ते युक्त करावे अशी मागणी केली जात आहे.

"विधी क्षेत्रातून जनसामान्यांच्या हिताचा वारसा पुढे चालवा!" : सहाय्यक शासकीय अभियोक्ता ॲड. अरुण मोहोड यांचे प्रतिपादन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : "विधी क्षेत्राला मोठा ऐतिहासिक वारसा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आदींनी वकीली क्षेत्राला मोठा नावलौकिक मिळवून दिलेला आहे. वकील हे सामाजिक अभियंता म्हणून भूमिका निभावत असुन माझ्या कनिष्ठ वकिलांनी देखील विधी क्षेत्रातून जनसामान्यांच्या हिताचा वारसा पुढे चालवावा", असे प्रतिपादन सहाय्यक शासकीय अभियोक्ता ॲड. अरुण मोहोड यांनी केले. संविधान दिनाचे औचित्य साधून ॲक्विटस लिगल सोल्युशन्सच्या नविन कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी ॲड.अरुण मोहोड यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.

ॲड. निखिल सायरे यांच्या संकल्पनेतून व ॲड. रंजित अगमे व ॲड. श्रीकृष्ण खोब्रागडे यांच्या सहकार्याने ॲक्विटस लिगल सोल्युशन्सची स्थापना केली असुन व याचे नविन कार्यालय यवतमाळ येथील चापनवाडी येथे सुरू केले. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून ॲक्विटस लिगल सोल्युशन्सच्या नविन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याकरीता डॉ. सुमेध जाधव (आय.पि.एस.) हे उद्घाटक म्हणून तर श्रीधर कोहरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ अर्बन को-ऑप. बॅंक लि. यवतमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी सहाय्यक शासकीय अभियोक्ता ॲड.अरुण मोहोड हे होते. डॉ. सुमेध जाधव (आय.पि.एस.) व श्रीधर कोहरे यांनी ॲक्विटस लिगल सोल्युशन्सच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व समायोजित मार्गदर्शन देखील केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. निखिल सायरे, प्रास्ताविक ॲड.‌ रंजित अगमे यांनी तर आभारप्रदर्शन ॲड. श्रीकृष्ण खोब्रागडे यांनी केले.

कार्यक्रमास सर्वश्री सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामजी राऊत, दै. अमरावती मंडलचे जिल्हा प्रतिनिधी विजय बुंदेला, यवतमाळ अर्बन को ऑप बॅंकेचे व्यवस्थापक राजेंद्र खोतकर, यवतमाळ जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय जैन, सचिव मनमोहन ठाकरे, अश्विन‌ सव्वालाखे, ॲड. श्रेया आनंद, बाल कल्याण समितीचे डायरे, भगवान अगमे, सौ. अगमे, सौ. खोब्रागडे, श्रीमती निशा‌ सायरे, अशोक सहारे, दिनेश बोटरे, सौ. गौरी बोटरे, अमर शिंदे, राजु बुल्हे, रजनी बुल्हे, नितीन नेवारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भुषण ब्राह्मणे, प्रज्वल सहारे, प्रणव देशपांडे, काजल अगमे यांनी अथक परिश्रम घेतले.