सरकारकडून विधानसभा निवडणुकापुर्वी धडाका !

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. त्यामध्ये विविध खात्यासह एकूण ३८ निर्णय घेण्यात आले आहेत. विविध लाभाच्या योजना जाहीर करीत सरकारने विधानसभा निवडणुकीचा धडाका उडवून दिला आहे, आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकाचे मने जिंकण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे. 

विधानसभा निवडणुकांसाठीच्या आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वी हे महत्त्वाच निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, कोतवालांच्या मानधानात १० टके वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यातील पहिल्याच आठवड्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊन आदर्श आचारसंहिता लागू केली जाईल. त्यामुळे, राज्य सरकारच्यावतीने जास्तीत जास्त निर्णय घेऊन जनतेला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण, विधानसभा निवडणुकानंतर नवीन सरकार स्थापन होईल. तत्पूर्वी बैठकांचा आणि निर्णयाचा धडाका सुरू आहे. कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ,अनुकंपा धोरणही लागू, ग्राम रोजगार सेवकांना आंता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान ऑरेज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार, एमएमआरडीए ला बिनव्या राजी दुय्यम कुड़े सहाय्य देण्यास मान्यता. ठाणे वर्तुळाकार मंट्री रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार, १२ हजार २०० कोटींचच्या सुधारित आराखड्यास मान्यता, ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारणार, देशी गाईच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना, भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड व वाढवण येथील जागा नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार, रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार, जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणार, जळ‌गाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता ३० हजार हेक्टर जमीन सिचिंत होणार, लातूर जिल्ह्यातील हासाळा, उबडगा, पेठ, कव्हा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता. धुळ्याच्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थाच्या विकासासाठी जमीन, रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार, एमएआरडीए ला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत, केंद्राच्या, मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार, दुर्बलासाठी घराच्या योजनाना वेग येणार, पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प जेएसडब्ल्यू इन्फ्रस्ट्रिक्चर विकासक, धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्वावरील घरे योजना,

धारावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी, सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख. अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले. अधिकाधिक शेतकऱ्याऱ्यांना लाभ होणार. सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ, जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूतगिरणीला अर्थसहाय्य करणार. राज्यातील होमगाडांच्या भत्त्यात भरीव वाढ, सुमारे ४० हजार होमगार्डना लाभ. नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार, आयुर्वेद, यूनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती. राज्यातील आणखी २६ आयटीआय संस्थाचे नामकरण, आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ.

विविध लाभाचे निर्णय घेत जनतेची मने जिंकण्याचा प्रयत्न

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सद‌स्यांची संख्या वाढवून १५ अधिसंख्य कर्मचाऱ्याचा एक दिवसाची तांत्रिक खंड क्षमापीत, बार्टीच्या धरतीवर वनार्टी स्वायत्त संस्था, मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या जिल्हा पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत, जिल्हा परिषदेतील २००५ नंतर रुजू कर्मचाऱ्याना एक वेळ पर्याय, पचगंगा नदी प्रदूषणासाठी साइपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करणार, राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती, ४८६० पदे शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय. हमी शुल्क माफी मिळणार नाही, अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा जनजागृतीवर भर. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला. राज्यातील सैनिकी शाळासाठी आता सुधारित धोरण, डाळिंब, सीताफळ इस्टेट उभारणार, उत्पादकांना मोठा लाभ. महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा, असे विविध खात्यातील निर्णय सरकारने आज घेत जनतेला आपल्याकडू आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीच लाड़की बहीण सारखी योजना राबवून महिला वर्गाला आपल्याकडे, आकृष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न या सरकारने केला आहे. आता आचारसंहिता लागण्यापूर्वी समाजातील सगळ्याच वर्गाला विचारात घेऊन सरकारकडून योजनांचा धडाका दिसतेय.

यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी विनोद माहुरे यांची निवड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
 
राळेगाव : भारत सरकार नोंदणीकृत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी विनोद माहुरे यांची निवड करण्यात आली. 

शिर्डी येथील हाॅटेल साईगोल्ड इन मध्ये दिनांक २९/९/२४ रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती देण्यात आली. यावेळी यवतमाळ जिल्हा भारत सरकार नोंदणीकृत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे पत्रकार, तसेच विविध बहुउद्देशीय संघाचे प्रतिनिधि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विनोद माहुरे यांची राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्हातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच "सह्याद्री चौफेर" ई न्यूज परिवारातर्फे त्यांना पुढील वाटचालीस खूप खुप शुभेच्छा... 

महादापेठ रस्त्यावर जीवघेणे खड्डे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : करणवाडी ते खैरी या मार्गावरील महादापेठ परिसरातील खड्ड्यांनी वाहनधारकांच्या नाकीनऊ आणले आहेत. हा मार्ग उपविभागाने येथे केलेल्या थातुरमातूर उपाययोजनेचे पुरते तीनतेरा वाजले आहेत. यामुळे येथील खडड्यांनी आपले ‌डोकं वर‌ काढण्यास सुरवात केली आहे. या खड्ड्याने अपघाताची शक्यता बळावली असून स्थानिकही प्रचंड हैराण झाले आहेत.
 
या मार्गाने वाहतूक बोटावर मोजण्याइतकी आहे. तरीही एवढी बिकट अवस्था अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या मार्गावरून वाहने, दुचाकीवरून विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात ये-जा करतात. महादापेठ कुंभा या रस्त्यावर एवढा भयावह गड्डा असूनही संबंधितांना दिसत कसा नाही असा प्रश्न उपस्थित होत आहेत. 

रस्त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च?

महादापेठ ते कुंभा रस्ता असो की तालुक्यातील रस्ते ग्रामीण रस्त्याच्या कामासाठी लाखो रुपयांचा खर्च करूनही मात्र अलीकडच्या काही दिवसात या मार्गावर जीवघेणे खड्डे पडलेत, याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे एवढीच अपेक्षा आहे. 
-विजय बोथले 
उपाध्यक्ष : तालुका काँग्रेस कमिटी, मारेगाव

वणी विधानसभेची उमेदवारी कोणाच्या पत्यावर; कार्यकर्त्यांचा मुक्काम पोस्ट शिगेला


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : वणी मतदारसंघ हा पंचरगी मतदार संघ म्हणून ओळखला जातो.याच मतदार संघात निवडणूकीचा सामना अटीतटीचा रंगताना आगामी विधानसभेच्या अनुषंगाने पाहायलाही मिळतो. जर मागील काळ बघितला तर माजी आमदार वामनराव कासावार यांनी वणी या मतदारसंघांमध्ये मागील २० वर्षाची सत्ता भोगली आहे. तसेच याच विधानसभेत मागील बऱ्याच वर्षापासून शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक काम करत आहे. कासावार नंतर नांदेकर हे आमदार झाले आणि या वणी मतदार संघाचे चित्र आणखीनच बदलले. मात्र,यादरम्यान सेनेचा मित्र पक्ष भाजपने कासवाच्या चालीने जनसंपर्क वाढवत २०१४ पासून सत्ता काबीज केली आणि दहा वर्ष काँग्रेस आणि शिवसेना सत्तेपासून दूर लोटली गेली. राज्यात पक्षामध्ये बंडखोरी झाल्यानंतर सुद्धा बाळासाहेबाचा एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दृढ विश्वास ठेवत वणी विधानसभा मतदार संघातील शिवसैनिक गटबाजीला झूगारून आपापल्यापरीने आजही कार्य करत आहे. जिल्हाप्रमुखांनी पक्षांमध्ये अनेक कार्यकर्ते जोडले असून, त्यांच्या पंचवार्षिक काळामध्ये त्यांचे कार्य तर अतुलनीय आहेत त्यांनी मतदार संघातील अवैध धंदे प्रथम बंद केली, जे आजतागायत कोणी करू शकलं नाहीत. तसेच गावोगावी शाखा उघडल्या आहे. गावोगावी, खेडोपाडी जाऊन अनेक उपक्रम राबविली आहे. त्यामुळे त्यांचं वलय अजूनही असल्याचे बोलल्या जाते. मात्र होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची उमेदवारी मिळाल्यास जनसामान्यांची सेवा करण्यासाठी आता अनेक जन दावेदार उभे ठाकले असल्याचं आता चित्र पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या तोंडावर ग्रामिण भागात दावेदार उमेदवारांनी भेटी चालू केल्या असून, विधानसभा निवडणूकीच्या कामाला लागले आहे. मात्र, होऊ घातलेल्या वणी विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळेल? याकडे मतदारांचे लक्ष लागले असताना शिवसेना (उबाठा) कडे वणी विधानसभेची शीट गेल्याची बातमी वायरल झाली असल्याने अनेकांना धक्का बसला तर, नव्याने आमदार होऊ पाहणाऱ्यांचे स्वप्नभंग होणार का?,असे तूर्तास बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे ज्यांनी स्वतंत्र दावा केला त्यांना तर मोठा धक्कातंत्र असल्याचे चर्चा आता रंगत आहे. मात्र, महाविकास आघाडी असल्याने कोणाचं काहीही चालणार नाहीत. आघाडी नाहीतर बिघाडी. तूर्तास यवतमाळ जिल्ह्यात चार काँग्रेस, एक राष्ट्रवादी (शपागट) तर दोन शिवसेना (उबाठा) असा फार्मुला ऐकीवात असल्याने उद्धव सेनेमधून कोणाच्या गळ्यात माळ पडणार ही चर्चा आता जनतेतून होऊ लागली आहे. वणी मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे वातावरण गरम असल्याने नांदेकर, देरकर, निखाडे की, कातकडे अशी खमंग चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उद्धव सेनेत दोन गटबाजी, यातूनच फोर्थलाईन मार्ग निघू शकते असेही आता चर्चील्या जात आहे.

राजकारणाच्या नादात संपूर्ण अस्तित्व गमावून बसलेले सामाजिक कार्यकर्ता ताटके

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वासिम : रातोरात श्रीमंत होण्याचा फंडा म्हणून राजकारणातलं करिअर अनेकजन निवडतात.गॉगल घातलेले एक दोन चार कार्यकर्ते,आलिशान कार, आणि लोकांचा गराडा.अशी भुरड अनेकांना पडते. मात्र राजकारणात अपयश आलं की राजा रंक कसा होतो, तसं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वासिमचे महादेव ताटके. राजकारणापायी कोट्यावधी संपत्तीचा कचरा झाला,आणि ते रस्त्यावर आले. राजकारणाच्या नादात संपूर्ण अस्तित्व गमावून बसलेले सामाजिक कार्यकर्ता महादेव ताटके (मंगरूळपीर जि.वासिम) 

ज्यांनी कार्यकर्त्यांना मोटारसायकली वाटल्या,ज्यांनी चारचाकी भेट म्हणून दिल्या,ज्यांनी शेतकऱ्यांना मोफत बियाणं वाटलं,त्याच महादेव ताटकेवर आज उपासमारी ची वेळ आली आहे. 
कुणी पन्नास शंभर रुपये दिले तरी एकवेळ चे पोट भरतं अशी वाईट परिस्थिती त्याच्यावर ओढवली आहे. वासिम च्या मंगरूळपीरचे महादेव ताटके हे रोजगाराच्या शोधात मुंबई ला गेले.लाखों नाही तर, करोडो रुपये कमवून त्यांनी आपलं नाव मोठं केलं. गरीबीची जाण असणाऱ्या महादेव ताटके यांना समाजसेवा करण्याचा विचार आला आणि ते मुंबई सोडून परत गावी आले.समाजकारण करताना त्यांना राजकारणाचा विचार आला आणि तिथेच त्यांचा उलट प्रवास सुरू झाला.

ताटकेंच्या राजकीय प्रवासाबद्दल सांगायचं म्हटलं तर 2009 साली विधानसभा निवडणूक लढवण्याच्या त्यांनी निर्णय घेतला.कार्यकर्त्यांना त्यावेळी त्यांनी 75 मोटारसायकली भेट दिल्या.टाटा कंपनी ची 3 चारचाकी वाहनही भेट दिल्या.खत, बी बियाणे, साडया चोळी वाटप केलं.वर्तमान पत्रातून त्यांच्या पान भरून जाहिराती येऊ लागल्या.मात्र 2009 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

मी आयुष्यात स्वतःचा विचार कधीच केला नाही. लोकांचा, गोरगरीबांचा विचार केला.कारण गरिबी मी जवळून बघितली.कमीतकमी त्यावेळी माझे निवडणुकीत दोन करोड रुपये गेले.सामाजिक कार्य करताना दोन करोडो रुपये खर्च झाले.आहो त्यावेळी माझ्याकडे करोड रुपये होते साहेब, आता दहा रुपये सुद्धा नाही. अशी परिस्थिती आली आहे, मुंबई च घर, ऑफिस सगळं विकून टाकलं, आता इथलं पण घर विकायची पाळी आली, माझ्यावर लोकांचं कर्ज आहे.
-महादेव ताटके

राजकारणात यशस्वी होण्याच्या नादात आर्थिक ताळमेळ न साधता आल्याने ताटकेंना हातचा पैसा गमवावा लागला.

दानशूर व्यक्तिमत्व म्हणून महादेव ताटकेची ओळख मात्र,राजकारणात त्यांनी मोठा खर्च केला,हातचे सगळे पैसे संपले,कार्यकर्ते दुरावले,ज्यावेळी त्यांना मदतीची गरज होती, त्यावेळी त्यांच्याकडे अनेकांनी पाठ फिरवली. 

त्यावेळेस भरपूर पैसा होता,त्यावेळेस त्यांच्या आजूबाजूला जबरदस्त गर्दी राहायची.जसाजसा पैसा कामी झाला तसेतसे लोकं त्यांना सोडत गेले.आज त्यांची परिस्थिती एवढी बिकट आहे की, त्यांना त्यांच घर चालवणे ही कठीण आहे.
-नागरिक 
कालपर्यंत ज्यांनी मदतीचा हात इतरांना दिला,ते आता मदतीची आस लावून बसले आहे.ज्यांनी माणुसकी चा धर्म पाळला,माणुसकी चा धागा विनला त्याच ताटकेंना,माणुसकीचं दर्शन घडणार का?,ताटकेंच्या मदतीसाठी पुढे कोणी येणार का? असाच प्रश्न ताटकेंच्या नजरेतून दिसतोय. आपल्या मतदार संघातील लोकांसाठी, आपल्या कार्यकर्त्यासाठी ज्यांनी लाखों करोडो चा खर्च केला त्याच्यावर अणवानी चालण्याची वेळ आली आहे.
एकेकाळी नेते मंडळींच्या गराड्यात असणारे ताटके, आतामात्र ऐकाकी पडले आहे.एकेकाळी इस्त्रीचे कडक कपडे घालून फिरणारे ताटकेंवर फाटके कपडे घालून फिरण्याची वेळ आली आहे.त्याला कारण ठरलीय ती राजकारणाची वाट.ही वाट धरली नसती तर कदाचित तटकेंचे दिवस काही वेगळे असते.
आता ते म्हणतात की, तरुणांनी राजकारणात पडू नये, राजकारण करा, पण व्यवसाय सोडून करू नका. राजकारणात काही पडलं नाही. तुमच्यासमोर ताज उदाहरण आहे मी. माझी कळवडीची विनंती आहे की आधी शिक्षण घ्या, व्यवसाय, घर सांभाळा ही सगळ्या तरुण पिढीला विनंती आहे.