मारेगाव तालुक्यात विजेचा लपंडाव नित्याचाच !


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात असा एकही दिवस नसेल ज्या दिवशी विजेचा लपंडाव झाला नाही. शहरासह ग्रामीण भागात विजेची समस्या सतत उद्भवत असते. तूर्तास विजेचा वारंवार होणारा लपंडाव व खंडीत वीज,अंखंडित वीज पुरवठा ठेवण्यात यावी अशा आशयचे निवेदन उपाभियंता कार्यालय मारेगाव यांना देण्यात आले. 

आकापूर, नेत, गौराळा, वरुड, चिंचाळा या भागात अधूनमधून लपंडाव सुरूच असतो. वीज विभाग आणि अधिकारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु गेल्या काही दिवसापासून विजेचा लपंडाव व खंडीत होणे याला यश आले आहे. त्यामुळे यावर्षी चा उन्हाळा पाहता,जीवाची लाही लाही होत आहे. त्यातच लाईन मात्र दिवसातुन 50-60 वेळा बंद चालू असते. तसेच वीज बिलात मोठी रक्कम आवाजवी वाढ येत आहे. 

अनेकदा वारंवार फोनव्दारे संपर्क करुन याबाबत अवगत करून सुद्धा वीजपुरवठा खंडित होण्याचाही प्रकार सुरू असतो. त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना करावी अन्यथा मारेगाव वीज कंपनी चच्या विरोधात धडक मोर्चा काढण्यात येइल किंवा उपोषण करू, त्वापासुन होणाऱ्या परीणामास आपण स्वतः जबाबदार राहाल असा ईशाराही दिला.

बुधवारी (ता.29) मे रोजी दिलेल्या निवेदनावर मयुरी चंद्रकांत धोबे (गौराळा सरपंच), संदीप कारेकार (नेत सहपंच), गोवर्धन तोडासे (चिंचाळा सरपंच), अनुल गानफाडे (गौराळा उपसरपंच), सरपंच शशीकांत नावडे (चिंचाळा उपसरपंच), देवीदास भट (वरुड संरपंच) मनोज झट्टे,अनिकेत कारेकर,शुभम उपरे, आकाश जांभुळकर, प्रशांत धोबे,सागर राऊत,मयूर मरस्कोल्हे, अनिल कारेकर, विनोद कारेकर यांच्या सह्या आहेत.



शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संजय खाडे यांचे निवेदन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : पीकविमा तसेच बी-बियाणे व खतांच्या किंमतीबाबत कापूस पणन महासंघाचे संचालक व काँग्रेस नेते संजय खाडे यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले. यील्डबेस पीकविम्यापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात तात्काळ रक्कम जमा करावी व बि-बियाणे, खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 

सन 2022-23 या शेतीच्या हंगामाचा यील्डबेस पीकविमा सरसकट मंजूर झाला आहे. मात्र काही शेतकरी अद्याप लाभापासून वंचित आहे. तसेच सन 2023-24 या हंगामात तालुक्यातील अनेक शेतक-यांना पीकविम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. शिवाय ज्या शेतक-यांना पीकविम्याची रक्कम मिळाली आहे ती अत्यल्प आहे. त्यामुळे पीकविम्याची रक्कम तात्काळ जमा करावी. तसेच किती शेतकरी अद्याप लाभापासून वंचित आहे. किती शेतकरी प्रोसेसमध्ये आहे. याची यादी जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 


निवेदन देते वेळी प्रमोद वासेकर, पुरुषोत्तम आवारी, राजाभाऊ पाथ्रडकर, विवेक मांडवकर, तेजराज बोढे, संदीप ढेंगळे, अक्षय कुचनकर, प्रशांत जुमनाके, आकाश टेकाम, उमेश कोसारकर, सिताराम झाडे, वेदांत चाफले, विजय ढेंगळे, अरुण नागपुरे, प्रतिक गेडाम, अनुराग गायकवाड, अनिकेत गंधारे, कैलास पचारे, भारत डंभारे, मनोज भगत, भास्कर वासेकर, यादव आसुटकर, विकेश पानघाटे, ईश्वर खाडे, अशोक पांडे, अरुण चटप, काजल शेख, करण आसुटकर, गणपत कोसारकर, शालिक काथवटे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.

बी-बियाणे व खतांच्या किमती कमी करा
अवघ्या काही दिवसात शेतीचा नवीन हंगाम सुरु होणार आहे. मात्र सध्या बी-बियाणे व खतांच्या किमती वाढलेल्या आहेत. गेल्या हंगामात सातत्याने ओला व कोरडा दुष्काळ, गारपीट याचा उत्पादनावर परिणाम झाला. तसेच गेल्या हंगामात शेतमालाला अत्यल्प दर मिळाला. त्यामुळे बी-बियाणे व खतांच्या किमती कमी करा, अशी मागणी संजय खाडे यांनी केली आहे. 

तहसीलदारांनी अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. आज बुधवारी 2.45 पहाटेच्या सुमारास तहसीलदारांनी आपल्या टीमला घेऊन मार्डी फाट्यावर एका ट्रक वर कारवाई केली. 

तालुक्यातील सावंगी, कोसारा घाटातून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी होत होत्या. त्यामुळे महसूल पथक होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर नजर ठेऊन होते. आज दिनांक 29/5/2024, बुधवार रोजी पहाटे 2.45 वाजता मार्डी चौफुली, आदर्श शाळेजवळ अवैध उत्खनन करून वाळू वाहतूक करीत असताना एक ट्रक पकडण्यात आला आहे. 

ही कारवाई तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या उपस्थितीत,मंडळ अधिकारी अमोल गुघाने, तलाठी सनी कुळमेथे, विवेश सोयाम व वाहन चालक विजय किनाके यांनी केली. ह्या धडक कारवाईने अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकात चांगलीच दहशत पसरली आहे. 


लिपीक हबीब शेख यांचे अल्पशा आजाराने निधन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील नगर पंचायतचे वरिष्ठ लिपीक शेख हबीब शेख लाल यांचे आज दि.28 मे रोजी साय.6 वा. अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते 44 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व 2 मुली असा आप्तपरिवार आहे.

हबीब मागील 2 महिन्यापासून कावीळ आजाराने ग्रस्त होते. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सेवाग्राम (जि. वर्धा) येथे दाखल करण्यात आले. येथे चार दिवसापासून उपचार घेत होते. परंतु प्रकृतीत सुधारणा जाणवत नसल्याने त्यांना पुढील उपचारार्थ नागपूर येथे हलवीत असताना शेख हबीब यांनी अखेर चा श्वास घेतला.

      

विवो कंपनीचा सापडलेला मोबाईल केला परत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : अनेकदा फोन हरविण्याच्या घटना घडत असतात, मग कुठे रस्त्यात, बसमध्ये, अगदी कुठेही. मात्र अनेकदा हे मोबाईल सापडत नाहीत. पण काहीवेळा माणुसकीमुळे अनेकजन मोबाईल परत करतात. आज प्रत्येकाजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे, मात्र मोबाईल फोन एकदा हरवला की परत मिळणे कठीण होऊन बसते. तर काहीवेळा अनेक माणसे स्वतःहून मोबाईल फोन परत करत असतात.
तसाच काहीसा प्रकार वनोजा देवी परिसरात पहायला मिळाला. काल दिवसा (ता.27) मे ला प्रशांत भंडारी उपसरपंच वनोजा देवी येथील रहिवासी हे नेहमीप्रमाणे शेत शिवारात जात असतांना त्यांना विवो (vivo) कंपनीचा मोबाईल सापडला. त्यांनी बराच वेळ तेथील परिसरात कोणी मोबाईल संबंधित चौकशी करेल याची वाट बघितली, पण कोणीही आले नाही. 
एखाद्या व्यक्तीला स्क्रीन टच मोबाईल सापडला तर तो खूप खुश होतो. परंतु त्यांनी मोबाईल सापडल्यानंतर, हा मोबाईल कोणाचा हरवला असेल, तो व्यक्ती किती काळजीत असेल असा विचार करत आज सकाळी प्रशांत भंडारी यांनी सापडलेला मोबाईलच्या मूळ मालकापर्यंत पोहचवण्यासाठी गावात लाऊडस्पीकरने दिवंडी मारून चौकशी केली असता मोबाईल हा गावातीलच रोशन आस्वले यांचा असल्याचे समजले. यावेळी प्रशांत भंडारी यांनी आज दि. 28 मे ला संबंधित मोबाईलच्या मूळ मालकाच्या वडिलांना हरवलेला मोबाईल परत दिला. यावेळी विठ्ठल आस्वले यांनी मोबाईल परत केल्यानंतर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 
प्रशांत भंडारी यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक केले. असा प्रामाणिकपणा आजकाल क्वचितच पाहावयास मिळत आहे. परिसरात सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.