हे आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम आमच्या पाठीशी असु द्या -संजय खाडे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : जनतेच्या समस्याना वाचा फोडणारी नवी चळवळ वणी विधानसभा मतदार संघात निर्माण झाली आहे. असं म्हणणं काही आता वावगं नाही. जन्मजात धाडसी वृत्ती, वादळे झेलण्याचा; अनेकदा अशी वादळे ओढवून घेण्याची बेदरकार वृत्ती आणि जनमानसाची नस ओळखण्याची कला या आधारे संजय खाडे यांना मिळालेली संधी राजकीय वर्चस्वात कशी बदलवली हे भल्या-भल्यांना कळले नाही. सध्या ते वणी विधानसभा मतदार संघात शेतकऱ्यांचा प्रश्न असो की, कामगारांच्या समस्या या जन आंदोलनाचे नेतृत्व संजयभाऊ खाडे भुषवित आहेत. 

त्यांच्या झुंजार कार्य पध्दतीमुळे मतदार संघातील कार्यकर्त्यांना बळ मिळाले असुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पर्याय उपलब्ध झाल्याने कार्यकर्त्यामध्ये वेगळाच उत्साह दिसून येत आहे. वणी मतदार संघात श्री.खाडे, यांनी जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडीट को. आपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करुन आर्थिक विकासाचे रोपटे वणी शहरात लावले आहे. त्याच सोबत अनेक सामाजिक कार्यात ते नेहमीच सक्रिय असतात. म्हणूनच त्यांनी केलेल्या विविध कार्याची पावती म्हणुन नुकत्याच पार पडलेल्या वसंत जिनिंग च्या निवडणुकीसह मुंबई पणन महासंघाच्या निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळालं आहे. सरपंच पदासह ईतर संस्थाच्या कार्याचा अनुभव असल्यामुळे त्यांना मतदार संघात अनुभवी नेता म्हणुन त्यांची लोकप्रियता प्राप्त झाली आहे. नुकतेच संजयभाऊ खाडे मित्र परिवारातर्फे गुरुवारी 23 मे रोजी त्यांचा "अभिष्टचिंतन सोहळा" आयोजित करण्यात आला होता. वणी, झरी, मारेगाव, उपविभागीय क्षेत्रात आयोजित या अभिष्टचिंतन सोहळ्यात अफाट जनसमुदाय उसळला होता. 

विशेष म्हणजे, वणी विधानसभा मतदार संघातील समस्यांची जाण, संजयभाऊ खाडे यांना असल्यामुळे भविष्यात या मतदार संघात प्रतिनिधित्व करण्याची त्यांना संधी मिळेल, असा आशावाद त्यांच्या चाहत्याकडुन व्यक्त होत आहे. या जन्मदिनी अनेकाकडुन त्यांच्या कार्याचा गौरव करुन पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. 'Thakns'आभार धन्यवाद! हे आशीर्वाद आणि प्रेम कायम आमच्या पाठीशी असु द्या असे, आवाहन देखील खाडे यांचेकरून करण्यात आलं आहे.

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, रिझल्ट कधी व कसा पाहायचा? जाणून घ्या...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी ता.२७ दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.

या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

साईटवर कशी पाहाल मार्कशीट?
- अधिकृत वेबसाइटला mahresult.nic.in वर भेट द्या.
- मुख्यपृष्ठावर उपलब्ध महाराष्ट्र SSC Results 2024 लिंकवर क्लिक करा.
- लॉग इन तपशील भरून सबमिट वर क्लिक करा.
- एंटर क्लिक करा आणि पेज डाउनलोड करा.
- निकाल डाउनलोड केल्यानंतर प्रिंट काढा.

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी आवश्यक तपशील
- हॉल तिकीटवरील रोल नंबर
- आईचे नाव

ॲप किंवा digilocker.gov.in वर आपला निकाल असा पाहा..
१. सर्वप्रथम, तुमच्या मोबाईल फोनवर किंवा इतर कोणत्याही डिव्हाइसवर DigiLocker ऍप्लिकेशन उघडा.
2. आता, तुमचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. आवश्यक असल्यास, तुमच्या प्रोफाइल पेजवर आधार क्रमांक सिंक प्रक्रिया पूर्ण करा.
3. डाव्या साइडबारवर, 'पुल पार्टनर डॉक्युमेंट्स' असे लिहिलेल्या पर्यायावर क्लिक करा.
4. ड्रॉपडाउन मेनूमधून 'महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ' निवडा.
5. तुम्हाला हवा असलेला प्रकार निवडा, जसे की SSC मार्कशीट, स्थलांतर किंवा उत्तीर्णता प्रमाणपत्र.
6. उत्तीर्ण होण्याचे वर्ष आणि तुमचा रोल नंबर प्रविष्ट करा.
7. तपशील सबमिट करा आणि मार्कशीट स्क्रीनवर दिसेल.
8. डाउनलोड करा व प्रिंटआउट घ्या.


बोरगाव वाळू घाटावर महसूल पथकाची धाड, तीन हायवा जप्त

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यातील बोरगाव वाळू घाटावर अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची गुप्त माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या पथकाने धाड टाकून दंडात्मक कारवाई साठी तीन हायावा जप्त केले असून यात एक वाळू भरलेला हायवा असून दोन हायवा (ट्रक) रिकामे आहेत.
घाट बंद असलेल्या घाटातून वाळू उपसा करून वाहणे चोरट्या मार्गाने वणी तालुक्यात धावत आहे. याबाबत संबंधित विभागाला तक्रारी, निवेदने प्राप्त होत आहे. परंतु प्रशासनाला न जुमानता वाळूचा गोरखधंदा सुरूच होता. त्यामुळे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात नेमलेल्या पथकाला कार्यान्वित करून वाळू तस्करांचे दिवस असो की रात्रीचे खेळ, हाणून पाडा अशा सूचना देत असताना गुरुवार च्या रात्री बोरगाव घाटावर अवैध उपसा होत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान गस्तीवर असलेल्या नायब तहसीलदार खिरेकर व मंडळ अधिकारी देशपांडे यांनी त्या ठिकाणी धाड टाकून एक वाळू भरलेला हायवा क्र.(एम एच 40, बी जि- 0198) व दोन त्याच ठिकाणी खाली केलेले हायवा क्र. (एम एच 40, सि टी-3742) आणि (एम एच 34, बी जि - 9064) असे या तीनही वाहणांना ताब्यात घेत तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केले. या कारवाईने वाळू माफियाचे धाबे चांगलेच दनाणले आहे.
वणी तालुक्यातील वाळू घाटावरून सर्रास वाळूची अवैध वाहतुक केली जात आहे. ह्या अवैध वाळूचा उपसा रोखण्यासाठी वणी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले व तहसीलदार निखिल धुळधर यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर, मंडळ अधिकारी देशपांडे, तलाठी पाचभाई, इंगोले, गोहणे व मोहितकर यांनी कारवाई करिता कंबर कसल्याचे दिसून येत आहेत.

बुद्ध जयंती निमित्त अन्नदान व खीर वाटप


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : जगाला शांती, सत्य, अहिंसेचा संदेश देणारे जगातील पहिले वैज्ञानिक तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६८ व्या जयंती निमित्त मारेगाव येथे समता सैनिक दल मिशन जय भीम यांच्या तर्फे भोजनदान व खीर वाटप करण्यात आली. 
बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्म मानणाऱ्यांचा प्रमुख सण आहे. वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला, या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच दिवशी त्यांना महानिर्वाणही मिळाले. बुद्ध पौर्णिमेला जगभर त्यांची जयंती साजरी केली जाते. त्याच अनुषंगाने मारेगाव येथेही बुद्ध जयंती साजरी करण्यात आली, या निमित्ताने समता सैनिक दल मिशन जय भीम तर्फे आंबेडकर चौक येथे अन्नदान व खीर वाटप करण्यात आली. 
या सामाजिक उपक्रमात मार्शल सातपुते, मार्शल तेलंग, मार्शल वनकर, मार्शल सिडाम, मार्शल हस्ते, अविनाश सातपुते आदींनी उपस्थिती दर्शवली होती.

उदिष्ट गाठण्यासाठी ध्येय निश्चित केले पाहिजे- मुनि अर्हतकुमारजी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

प्रगतीचे उदिष्ट गाठण्यासाठी मनुष्याने आपले ध्येय निश्चित केले पाहीजे,असे प्रतिपादन आचार्य श्री महाश्रमणजी यांचे शिष्य मुनि अर्हतकुमारजी यांनी केले.ते मारेगाव येथील तातेड निवासात प्रथम आगमना प्रित्यर्थ उपदेश करताना बोलत होते,ते पुढे बोलतांना म्हणाले की,विना ध्येय व्यक्ती कोणत्याच ठिकाणी पोहचु शकत नाही. 

याबाबतचे उदाहरण देताना ते म्हणाले की,लिफाफा ज्या पत्त्यावर पाठवायचे आहे तो पत्ता लिहिला गेला नाही तर तो लिफाफा त्याठिकाणी पोहचु शकत नाही.सोबतच प्रगती करायची असेल तर व्यक्ती ला सहनशीलता ठेवणे आवश्यक आहे.ही सहनशिलता प्रबळ होण्यासाठी देव गुरू धर्मावर श्रध्दा असावी व गुरूनी दिलेल्या मार्गदर्शनावर चालून आपले लक्ष साध्य करावे असा उपदेशात्मक प्रबोधन करत ते शेकडो कि.मी. अंतर पायदळ विहार करत आहे. मुनी अर्हतकुमारजी, मुनि भरतकुमारजी,मुनि द्विपकुमारजी आदि ठाणा तिन औरंगाबाद वरुन पायदळ विहार करत करत मारेगाव तालुक्यातील बुरांडा येथील जुमनाके यांच्या फार्म हाऊस मध्ये पोहचल्यानंतर ते मारेगाव शहरातील प्रतिभा तातेड निवासात काही वेळाच्या विश्रांती साठी थांबले होते. त्यांतर त्यांचा मांगरुळ येथील डॉ.लोढा यांच्या फार्म हाऊस मध्ये मुक्काम करुन पुढचा विहार सुरु होणार असुन आज रामदेवबाबा मंदिर कडे विहार करून उद्याला वणी येथे 10 दिवस येथे थांबण्याची संभवना आहे. तेथे प्रवचनाचा कार्यक्रम होणार असून धर्म आराधना व अध्यात्मा वर चर्चा होणार आहे.

मुनिश्रींचा आगामी चातुर्मास नागपुर येथे होणार असून ते वनोजा, मार्डी, खैरी, वडकी विहार करत करत ते चातुर्मास पुर्वी नागपूर ला पोहचणार आहे.उन्हाचा तडाखा सुरु असतानाही मुनीजींचा पायदळ प्रवास सुरु आहे.मारेगाव तालुक्यात त्यांचे आगमन झाले विहरामध्ये धर्मेंद्र भंडारी, अंकुश भंडारी, संभव भंडारी, प्रतिभा तातेड, गुनेश तातेड, आदेश तातेड, यांच्यासह जैनधर्माचे श्रावक तथा श्राविका त्याच्या सेवेत सहभाग घेत आहे.