परिस्थितीशी लढा देणाऱ्या विनोद आदे यांचा लढा संघटनेकडून सत्कार


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : वणी उपविभागातील कला क्षेत्रातील हिरा विनोद आदे यांनी आपल्या जीवनाची यशस्वी घडी बसविण्यासाठी परिस्थितीशी लढा देत यशाची गवसणी घालून आज वणी सारख्या ठिकाणी आपल्या कलेच्या माध्यमातून यशाची शिखर गाठणाऱ्या विनोद आदे यांचा सामाजीक क्षेत्रात काम करणाऱ्या लढा संघटनेच्या वतीने मान्यवरच्या उपस्थितीत सत्कार करून गौरविण्यात आले.
       
लढा संघटनेच्या वतीने वणी येथील शेतकरी मंदीर येथे युवा संमेलन व भन्नाट काव्य मैफिल कार्यक्रम घेण्यात आला, यात सुप्रसिध्द कवी अनंत राऊत अकोला यांच्या कवितेचा कार्यक्रम व प्रा डॉ संतोष डाखरे यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमात वणी उपविभागीय भुषण विनोद आदे यांच्या विविध कलागुणाचा सन्मान करून भविष्याच्या वाटचालीसाठी लढा संघटनेच्या माध्यामातून शुभेच्छा दिल्या, यावेळी लढा संघटनेचे प्रविण खानझोडे, अजय धोबे, विकेश पानघाटे सह विचारपिठावर जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे, लक्ष्मी नारायन पत संस्थेचे संजय खाडे, वणी वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे उपस्थित होते, अष्टपैलु कलेचा शिलेदार विनोद आदे यांच्या कला गुणाची पारख करित या प्रसंगी लढा संघटनेच्या वतीने सत्कार करून प्रोत्साहन देण्यात आले, या कार्यक्रमात अनंत राऊत यांच्या कविताचा हजारो रसिकांनी आस्वाद घेतला.

मुलांना मोबाईल फोन देण्याचे योग्य वय कोणते? लाडामुळे तुमचे मूल बिघडणार नाही याची घ्या काळजी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

आजकाल लहान वयातच मुले मोबाईलशी जोडली जात आहेत. याला कारण आहे आई-वडिलांचे प्रेम आणि आपुलकी. मुले लहान असताना त्यांचे मनोरंजन करण्यासाठी पालक त्यांना फोन देतात, जे योग्य नाही. 10 वर्षे वयाच्या 42 टक्के मुलांकडे स्मार्टफोन असून वयाच्या 12 व्या वर्षी हे प्रमाण 71 टक्क्यांपर्यंत पोहोचते आणि वयाच्या 14 व्या वर्षी 91 टक्के मुलांच्या हातात मोबाईल असतो. जर तुम्ही तुमच्या मुलाची खूप काळजी करत असाल तर तुम्हाला समजले पाहिजे की मुलाला स्मार्टफोन देण्याचे योग्य वय कोणते आहे.
आजकाल इंटरनेटमुळे मुले फोनवर काहीही करू शकतात. जे त्यांच्या वयानुसार धोकादायकही ठरू शकते. हत्या, हिंसाचार, पॉर्न, अपघात आणि अशा असंख्य व्हिडिओंचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा धोक्यांपासून दूर राहण्यासाठी मुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवले पाहिजे. मोबाईलमुळेही झोपेची समस्या उद्भवू शकते. सायबर क्राईम, गुंडगिरी आणि ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात मुलंही अडकू शकतात.
 
मुलांना मोबाईल दिला तर 'या' काही गोष्टींचा अवलंब करा -
• जर तुम्ही या वयात तुमच्या मुलाला फोन देत असाल तर त्याला गरज नसलेली सर्व ॲप्स आणि वेब सर्च लॉक करा.
 
• जर तुम्ही तुमच्या मुलांना फोन दिला तर त्यांच्यावर सतत लक्ष ठेवा, जेणेकरून मुले काय करत आहेत याची माहिती तुम्हाला मिळू शकेल.
 
• सुरुवातीला, मुलांना एक साधा फोन द्या, जेणेकरून ते फक्त कॉल करू शकतील. तुम्ही तुमच्या मुलासाठी स्क्रीन वेळ देखील सेट करू शकता.
 
• मुलांना हे देखील सांगा की तुमचे लक्ष ते फोनवर काय करत आहेत यावर आहे. मुलांच्या फोनचे पासवर्ड जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना सांगा, हे त्यांच्याच फायद्याचे आहे.
 
• मूल वयात आल्यावर त्याच्याशी मनमोकळेपणाने बोला आणि त्याच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. 


चायला घरात भला मोठा अजगर, सर्पमित्र आले धावून

सह्याद्री चौफेर | राजू डावे

वणी : तालुक्यातील उकणी येथे एका घरी भला मोठा अजगर असल्याचे निदर्शनास येताच सर्प मित्रांना बोलवून पाच मिनिटात पकडून अजगराला वनविभागाच्या उपस्थितीत सोडण्यात आले.
सर्पमित्र हरीश कापसे यांना रात्री 2 च्या सुमारास उकणी वरुण प्रवीण पचारे यांनी संपर्क साधून घरात मोठा अजगर साप दिसत आहे अशी माहिती दिली. तातडीने उकणी येथील सर्पमित्र सुरज पारशिवे व हरीश कापसे टीम यांनी पचारे यांच्या घरातील अजगराला पाच मिनिटात सुरक्षित पकडले व वनविभागाच्या उपस्थितीत सुरक्षितपणे सोडण्यात आले.
यावेळी सर्पमित्र टीम गणेश चौधरी, धनराज मतिरे, स्वप्नील गोवरदीपे, अभय मोडक, प्रफुल पिंपळशेडे, यांचे पचारे परिवारानी आभार मानत त्यांचे कौतुकही केले. 

कासारबेहळ येथे शिव महापुराण कथा संपन्न

सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के 

महागांव : तालुक्यातील कासारबेहळ येथे हनुमान मंदिरात शिव महापुराण कथाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण वातावरण शिवमय गजराने दुमदुमून गेले. अशा भक्तिमय वातावरणात हा कथा पारायण कार्यक्रम संपन्न झाला. 

शिव कथा समारोपप्रसंगी हभप उत्तमराव महाराज यांच्या मधुरवाणी तून शिव कथेचा महिमा भक्तांपर्यंत पोहोचवला.
कासारबेहळ येथे महिना भर चाललेल्या शिव महापुराण कथेचा काल शुक्रवार दि. 29 सप्टेंबर ला महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता, गावातील महिला पुरुषांच्या उपस्थितीत गावातील मुख्य मार्गाने ग्रंथ दिंडी काढण्यात आली व कथेची सांगता झाली. त्यानंतर महाप्रसादाचा लाभ गावातील सर्व भाविक भक्तांनी घेतला.

या कार्यक्रमाला अविनाश करे, अशोक पाटील, येसाजी पाटे, ज्ञानदेव मोहटे, नामदेव ठाकरे, भगवानराव करे, श्रावण लोंढे, प्रकाश कवाने, गजानन करे, यांच्या सह असंख्य भाविक उपस्थित होते.

माधव नगरातील घरफोडीच्या आरोपीना तात्काळ अटक करण्याची केली स्थानिकांनी मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : 14 सप्टेंबरला मारेगाव शहरातील माधव नगरी येथे चोरट्यानी घरे फोडली होती. या प्रकरणाला 15 दिवस लोटून गेले, तरी अजून एकाही चोरट्याला अटक झालेली नाही. त्यामुळे या माधव नगरातील स्थानिकांनी मारेगाव येथील ठाणेदारांची भेट घेत चोरट्याना तत्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली.
       
शहरात दि.14 सप्टेंबरला धाडसी चोऱ्या झाल्या. एकाच रात्री तब्बल 17 घरे फोडत धाडसी चोरी झाली. ही जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि अद्भुत घटना होती. यात एकट्या माधव नगरातील तब्बल 10 घरे होती. यावेळी नागरिकांनी चोरीची रीतसर तक्रार दाखल केली होती. परंतु या घटनेला 15 दिवस लोटून गेली. मात्र अजूनपर्यंत चोरीचा कसलाही मागमूस न लागल्याने माधव नगरातील नागरिकांनी पोलीस स्टेशनवर धडक देत पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांची भेट घेत त्यांच्याकडून घटनेच्या प्रगतीविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी माधव नगर परिसरातील अनेक नागरिक ठाण्यावर धडकले होते.

निवेदन देताना हेमराज कळंबे, अनिता हेमराज कळंबे, विजय झाडे, नंदिनी झाडे, सुरेश आत्राम, सौ. दुर्गा आत्राम, मंगेश गवळी, सौ. सुचित्रा गवळी, सुंदरलाल आत्राम, सौ.रंजना सुंदरलाल आत्राम, संतोष ठाकरे, सौ. नंदा संतोष ठाकरे, सौ. सुनंदा राजु कोळेकर, राजु कोळेकर, बाबू काकडे, सौ प्रांजली बाळू काकडे,सुनिल भोयर, सौ. रंजना सुनिल भोयर, श्री. राजु तुकाराम डवरे, सौ संगिता राजु डवरे, प्रविण बदकी, चंद्रशेखर बोकडे, सौ उज्वला बोकडे, दिपक उरकुडे, गणेश कनाके, सौ रेखा गणेश कनाके, यासह असंख्य रहिवाशांची उपस्थिती होती. 


या प्रकरणातील चार संशयितांची नावे व नंबर वरिष्ठाना पाठवण्यात आली आहे, स्थानिकांनी फेरीवाल्याकडून सामान, वस्तू खरेदी करू नये, बाजारात जाऊन खरेदी करावे. काही संशय आल्यास पोलिसांना संपर्क साधावा.

-जनार्धन खंडेराव
ठाणेदार पोलीस स्टेशन,मारेगाव