शेतकऱ्यांना यलो मोझॅकच्या नुकसानीची भरपाई द्या - युवा मोर्चाची मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात लष्करी अळी व यलो मोझॅक हा विषाणूजन्य रोग खूप झपाट्याने फैललेला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून हातातील नगदी पिक हातून निसटून जात असल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे वतीने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना निवेदन सादर करण्यात आले.

मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन या पिकांवर पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव वाढला असून संपूर्ण सोयाबीन पिवळे पडून सुकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लावलेला खर्च निघेल की नाही अशी चिंता लागली आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून भरीव मदत देण्यात अशी मागणी भा यु मो जिल्हा सचिव तथा आत्मा समिती चे अध्यक्ष प्रसाद ढवस यांच्या नेतृत्वात आमदार बोदकुरवार यांना करण्यात आले आहे.

सदर निवेदनाची दखल घेऊन दोन ते तीन दिवसात तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी आग्रही विनंती सह मागणी करण्यात आली, यावेळी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, संचालक, अविनाश लांबट, उपसरपंच प्रशांत भंडारी, पवन ढवस, आशिष खंडाळकर, आदींची उपस्थिती होती.

रांगणा येथे अमृत कलश यात्रा...


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : 'माझी माती माझा देश' अभियान अंतर्गत देशभरात अमृत कलश कार्यक्रम साजरा होत असताना रांगणा ग्रामपंचायत व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने आज दि.30 सप्टेंबर 2023 रोजी अमृत कलश यात्रा कार्यक्रम संपन्न झाला.
    
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपूर्ण गावामध्ये विद्यार्थी युवक व गावकऱ्यांची अमृत कलश घेऊन मिरवणूक काढण्यात आली तसेच धान्य व माती गोळा करण्यात आली. तसेच सार्वजनिक पटांगणावर स्वच्छतेबाबत शपथ घेण्यात आली. यावेळी सरपंच प्रकाश बोबडे यांनी उपास्थिताना स्वच्छतेबाबत व विविध प्रश्नावर मार्गदर्शन केले.
     
यावेळी गावातील सरपंच मा. प्रकाश बोबडे, उपसरपंच अ‍ॅड.दिलीप परचाके, शाळा समितीचे अध्यक्ष राजेश वांढरे, रामनाथ जरीले, रविकांत वांढरे, विजय दुर्गे, प्रशांत खिरटकार, अमृत खिरटकर, उमेश खापणे सर, दिवाकर वांढरे, गुणवंत वांढरे, राकेश बोधाणे, प्रकाश बोढे, शंकर बदकी, राजू शिवरकर, अरुण परचाके, प्रकाश बदकी, लक्ष्मण वांढरे, सिमा लोडे, मनीषा कुळमेथे, गीतांजली अतकरे मॅडम, अं.से.चंदे मॅडम व विध्यार्थी-विध्यार्थीनी व मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते. या प्रसंगी विध्यार्ध्याना खाऊ वाटप करून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश खापणे सर, यांनी केले. तर आभार प्रदर्शन शरद गोंडे सर,यांनी केले.

आता तर हद्दच झाली...तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि शिपाई भरती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

जिल्हाधिकारी जळगाव, सक्षम प्राधिकारी जळगाव उप विभागीय अधिकारी भूसावळ, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव आदी भागांमध्ये सहा महिन्यांकरीता सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची विविध पदांवर पदभरती केली जाणार आहे. याची जाहिरात समाज माध्यमांवर फिरत असून यानुसार आता सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदार, लिपिक- टंकलेखन, शिपाई या पदावर भरती केली जाणार आहे. तहसीलदारासारखे महत्त्वाचे पद कंत्राटी पद्धतीने भरले जाणार असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. ही जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांनी प्रकाशित केली असल्याचे सोशल माध्यमात वायरल होत आहे. त्यानुसार तहसीलदार, कारकून किंवा मंडळ अधिकारी या पदांवर कंत्राटी भरती केली जाणार आहे. यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. तहसीलदार पदासाठी ४० हजार रुपये मानधन तर कारकून पदासाठी २५ हजार रुपये मानधन राहणार आहे. यासाठी शैक्षणिक अर्हता आणि विविध नियम दिले आहेत. मात्र, शासनाने बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतल्यावर आधीच तरुणांमध्ये रोष असताना आता तहसीलदार पदच कंत्राटी भरले जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

-अनंता पाचपोहर
मार्डी, ता.मारेगाव जि.यवतमाळ.
संपर्क : 8010704509

सरकारची वाटचाल बदलली, वेळीच ओळखा - मारोती गौरकार


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सुधारित संवाद सोशल मिडियाच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. सोशल मिडिया ही एक सकारात्मक भूमिका निभावतं, ज्या द्वारे कोणतीही व्यक्ती,गट,संस्था आणि देश ई. आर्थिक, सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या समृद्ध होऊ शकते. अशी बरीच विकास कामे सोशल मिडियाच्या माध्यमातून केली गेली, ज्यांनी लोकशाही समृद्ध करण्याचे काम केले आहे. 
मात्र हल्ली, या सोशल मिडियाचा वापर आगपाखड, टिका टिपणी करणे आणि राजकारण ह्यातच वेळ घातला जात असल्याचे काहींचे मत आहे. "नुसतं राजकारण करू नका सरकारची वाटचाल बदलली, सरकार कोणचेही असो जनतेच्या, व शेतकऱ्याच्या हिताचं असल पाहिजे. नुसते टिका टीपणी करून जमणार नाही, ह्यातच वेळ निघून गेल्यावर पुढे आपण आपल्या पिढीला काय उत्तर द्याल! असे मत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी मारेगाव तहसील कार्यालयाला सोयाबीन वर आलेल्या रोग संदर्भात निवेदन देताना 'सह्याद्री चौफेर' ला संवाद साधताना म्हणाले. पुढे असेही ते सांगतात की, सरकार म्हणजे जनता होय,यास वेळीस लगाम नाही लावला तर देशातल्या गरीब जनतेला जगणं मुश्किल होईल म्हणून टिका टिपणी बाजूला सारून सर्व एक व्हा, असे आवाहन सोशल माध्यमातून गौरकार यांनी केले.

मारोती गौरकार हे शेतकरी शेतमजूरासाठी संघर्षाची वाटचाल करणारे नेतृत्व मारेगाव तालुक्यात एकमेव करताना दिसून येत. कष्ट करणार्‍या जनतेच्या प्रत्येक लढ्यात गौरकार हे अग्रेसर असतात. त्यांच्या संघर्षातूनच अतिवृष्टी, पीकविमा, गरजूना किट वाटपाचा आग्रह या समाज हिताच्या उपाययोजना शासन दरबारी लावून धरतात. रस्त्यावरच्या लढाई लढणारा अत्यंत शांतप्रिय व आग्रही असणारं मारेगाव तालुक्यातील नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. 

निवेदनातून सोयाबीन पिकांवर आलेल्या पिवळ्या मोझॅक रोगाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अती पावसामुळे कपाशीचे सुद्धा नुकसान झाले आहे, त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई तत्काळ द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत चा बाजार समितीने ठराव सुद्धा घेतला असून तो तहसीलदार यांना सादर केल्याचे निवेदनात नमूद केले आहे, यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

निशा कांबळेच्या आजारपणात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे धावून आले


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : तालुक्यातील सोईट (नविन) येथील निशा कांबळे (१२) ही मुलगी मागील काही दिवसांपासून आजारी आहे. सामाजिक बांधिलकीतून सहकार्य करीत निशा कांबळेच्या आजारपणात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे धावून आले. शिंदे यांनी स्वखर्चातून ऑक्सीजन मशीन उपलब्ध करुन निशाला जगण्याची नवी उमेद दिली.  
सोईट (नविन) येथील कांबळे कुटूंबांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. यामुळे निशाच्या उपचारात असंख्य अडचणी निर्माण होत आहे. तिच्या आजारपणात ऑक्सीजन मशीनची गरज असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. निशाचे पालक तिच्या आजाराने फारच दुःखी झाले. रविंद्र शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी लेकीच्या आजाराची करून कहानी कथन करुन मदतीची अपेक्षा व्यक्त केली. रविंद्र शिंदे यांनी कुठलाही विलंब न करता तत्काळ निशाच्या आजारपणात ऑक्सीजन मशीन उपलब्ध करून दिली. तसेच अधीक मदतीचे आश्वासन सुध्दा दिले.निशाच्या आजारपणात निस्वार्थी वृत्तीने मदत केल्याबद्दल निशाच्या पालकांनी रविंद्र शिंदे यांच्या प्रति कृत्यज्ञता व्यक्त केली.

जनसेवेत सदैव तत्पर : गरजूंनी संपर्क साधावा
रोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात आम्ही जनसेवेत सदैव तत्पर आहोत. गरजूंनी आरोग्य विषयक मदतीसाठी संपर्क साधावा. असे आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधान सभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले आहे.