विसर्जनाकरिता गेलेल्या होतकरू युवकाचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील भिमनगर येथील वास्तव्यास असलेल्या युवकाचा गुरूवारच्या रात्री चंद्रपूर येथे गेलेल्या अनंत चतुर्थी गणपती विसर्जन मिरवणूकीत बॅन्ड वाजवितांना दुर्देवी मृत्यू झाला. या होतकरू तरुणाचा अशा अकाली निधनाने शहरात शोककळा पसरली आहे.


सिध्दार्थ मरकवाडे (30) रा. भीमनगर ता. वणी असे, मृतक युवकाचे नाव आहे. सिध्दार्थ हा एका बॅन्ड पथकात बॅन्ड वाजविण्यासाठी चंद्रपूर येथे गेला होता. बॅन्ड वाजवित असताना अचानक त्याला भोवळ आली व तो निपचित खाली कोसळला असता त्याच्या सहकाऱ्यांनी तत्काळ त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषित केले.

सिध्दार्थ हा होतकरू युवक होता. तो फोटोग्राफी व्यवसाया सोबतच वणी नगरपरिषदेच्या घंटागाडी वर चालक म्हणून सुध्दा कार्य करीत होता. सिद्धार्थ याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.


'केशवस्मृती' नवीन मुख्यालयाचे लोकार्पण थाटात संपन्न

सह्याद्री चौफेर | राजू डावे

वणी : शहरातील केशव नागरी सहकारी पतसंस्थेची स्वमालकीचे मुख्य कार्यालय "केशवस्मृती" या नवीन मुख्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण मोठ्या थाटात संपन्न झाले. यावेळी मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग अध्यक्ष माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, रा. स्व. संघांचे अखिल भारतीय प्रमुख सहसंपर्क प्रमुख सुनील देशपांडे, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, चंद्रशेखर खोंड आदी मान्यवर विचार पिठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक चंद्रशेखर खोंड यांनी केली,सर्व सामान्य घटकापर्यंत पोहचण्याचं त्यांचा प्रयत्न असल्याचे म्हणाले, यावेळी शाखा विस्तार करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. ते आपल्या प्रास्ताविकेतून बोलताना सामाजिक हित जोपसणारी संस्था असल्याचे सांगितलं.
प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भाष्य केले, या प्रसंगी बोलताना पतसंस्थाना प्रशिक्षणाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. लोकांचा विश्वास अधिकाधिक वाढत असल्याचेही ते म्हणाले. हंसराज अहिर यांनी पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. आपल्या भाषणात त्यांनी संस्थेचे भरभरून कौतुक केले, सुनील देशपांडे हे प्रकल्प पुरुष आहे असे ते यावेळी बोलताना म्हणाले. आमदार मदन येरावार यांचा निरोप वाचून दाखवण्यात आला. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी संस्थेच्या कार्याचे अथोचित कौतुक केले, शेतकरी, युवक, बेरोजगार, व्यावसायिक यांना संस्थेकडून कशा पद्धतीने आर्थिक मदत मिळते तेही सांगितले.
यावेळी विविध क्षेत्रात कार्य करण्याऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बचतीचे महत्व कळावे म्हणून विद्यार्थ्यांना गुल्लफ वाटप करण्यात आले. सुनील देशपांडे यांनी भगवान बुद्धांच्या विचार आपल्या भाषणातून मांडले, त्यांच्या अष्टांगिक मार्गांवर सविस्तर असे विवेचन केले.हे अष्टांगिक मार्ग व्यक्तिगत तथा संस्थात्मक क्षेत्रात कसे महत्वाचे आहे त्यावर मोलाचे मार्गदर्शन केले. दीकुंडवार यांनी सर्वांचे आभार मानले, रेणुका अणे यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली, यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, संस्थेचे पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी या लोकार्पण सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



वणी-मारेगाव महामार्गावर भीषण अपघात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार आज (गुरुवारी) रात्री वणी-मारेगाव महामार्गावर भीषण स्वरूपाचा विचित्र अपघात झाला. या अपघातात जवळपास वीस ते पंचवीस जखमी असल्याची माहिती आहे. मात्र, कॅबिन मध्ये फसलेल्या महिलेला बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून हमसफर ट्रॅव्हलची ट्रकला मागून भिडल्याचे समजते.

वणी -यवतमाळ महामार्गावर आज रात्री 9.15 च्या सुमारास यवतमाळ हून वणीकडे ट्रॅव्हल क्र.एम एच 27 ए 9994 हे जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने उभ्या असलेल्या ट्रक ला मागून धडक दिल्याचे समजते, त्यामुळे हा भीषण अपघात झाला. ही घटना राज्य महामार्गांवरील गौराळा फाट्यावर 9.15 ला घडली असून या अपघातातील अपघात ग्रस्ताना बाहेर काढण्याचे काम सुरु असून अपघात स्थळी ऍम्ब्युलन्स, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते यांचे मदत कार्य सुरु आहेत.

सदर ट्रॅव्हल्स यवतमाळहून चंद्रपूर कडे देव दर्शनला जाणाऱ्या या खासगी ट्रॅव्हल्स मध्ये अंदाजे सत्तर प्रवाशी असल्याचे कळते. मात्र,या भीषण अपघातातील मृतक संख्या अजूनही कळू शकली नाही. परंतु जखमीमध्ये वीस ते पंचवीस प्रवाशी असून काही सुखरूप तर ट्रॅव्हल्स मध्ये फसलेल्यांना महिलेला बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, घटना स्थळी बघ्यांची एकच गर्दी उसळली. 

आरक्षण बचावासाठी निघणार मारेगावात आक्रोश मोर्चा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : धनगर समाज आदिवासी नसून त्यांना आदिवासीचे सर्व लाभ दिले जातील असा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे, ह्या निर्णयाच्या विरोधात संतप्त लाट उसळली असून मिंदे सरकारचा निषेध करण्यासाठी राज्यभर आंदोलन, मोर्चा होत आहे. याचेच पडसाद मारेगाव तालुक्यात उमटले असून मारेगावात येत्या मंगळवारी भव्य 'आदिवासी आरक्षण बचाव संघर्ष' आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी मारेगावात होणाऱ्या आंदोलनात तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या सर्व आदिवासी बांधवानी लाखों च्या संख्येने सहभागी व्हावे असे, आवाहन आदिवासी बचाव कृती समिती च्या वतीने करण्यात आले आहे.

येत्या दि.3 ऑक्टोबर 2023 रोज मंगळवारला स्थानिक नगर पंचायत, कार्यालय मारेगाव येथे सकाळी 10 वाजता तालुक्यातील सर्व पक्षीय आदिवासी पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन आदिवासी बचाव कृती समितीच्या वतीने आज करण्यात आले आहे.

अनुसूचित जमातीच्या (ST) आरक्षणाला धक्का लागल्यास सर्व समाज बांधव त्यांच्या पद्धतीने उत्तर दिले जाईल, हक्कासाठी धक्का दिला जाईल. असा सरकारला सूचक ईशारा या आक्रोश मोर्चातून दिला जाणार आहे. 

सर्व आदिवासी बांधवाकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात,तालुक्यात आदिवासी भागात आपापल्या परीने रस्त्यावर उतरून,आक्रोश मोर्चाचे आयोजन करून सरकारचा निषेध करावा. मिंधे सरकारला आदिवासीनी आदिवासिंच्या विरोधात असणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज आहे.

- गीत घोष
प्रगतशील विचारवंत तथा अखिल भारतीय संविधानिक हक्क परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष

शासनाला गोरगरिबांचे कर्ज माफ करावेच लागणार-डॉ. माकणीकर

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : कर्जापोटी राज्यातील बहुतांश लोक कर्जबाजारी झाले असून आत्महत्तेचा मार्ग अवलंबवतात या आत्महत्या थांबवायच्या असतील, राज्यातील मानुस जगवायचा असेल तर शासनाला सरसकट कर्ज माफी करावी लागेल असा मनोदय एस.एम फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला.

कर्जबाजारीपणामुळे राज्यातील बहुतांश संसार मोडकळीस आलेत तर असंख्य संसार संपले आहेत. अश्या अवस्थेत सरकार नको ते उपक्रम राबवत आहे. नको त्या उत्सवाला आर्थिक खतपाणी घालण्यापेक्षा बळीराज्यासह सरसकट महाराष्ट्र राज्य कर्जमुक्त करावं. शासनावर दबाव गट निर्माण करूण महाराष्ट्र कर्जमुक्त अभियान राबवत असून बहुसंख्येने अभियानात सामील व्हावे असे संस्थेच्या सचिव कुमारी संध्याताई शेळके यांनी सांगितले.

कर्ज मिळवल्या नंतर कुणाला परतावा करण्यास विलंब होत असेल. किंवा हप्ते थकले असतील तर कर्ज भरण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. मात्र बँका कर्ज वसुली साठी कर्जदाराचा मानसिक छळ करतात हें आर बी आय च्या मार्गदर्शक नियमावलीच्या विरोधात आहे. खाजगी स्वरूपात नेमलेले वसुली कंपन्याचे प्रतिनिधी गैरवर्तन करतात. यावेळी तात्काल संबंधित बँक व्यवस्थापक व RBI ला लिखित स्वरूपात तक्रार करावी किंवा संस्थेच्या प्रतिनिधीला कळविण्यात यावे असेही कु. संध्याताई शेळके यांनी आवाहन केले आहे.